24 December 2012

इतिहास म्हणजे चोपड्या नव्हेच !

          "इतिहास" हा व्यक्तींभोवती फ़िरतो, व्यक्तिपरत्वे गुणदोष आलेच.इतिहास लेखणाची पुर्नछाननी व मुल्य तपासले जावे.त्यातील बारकावे आणि तपशील देताना शास्त्रशुद्ध ओघवते विवेचन दिसले पाहिजे. सत्याचा अपलाप न करता काल्पनिक, पुर्णत: कादंबरीमय घटना आणि व्यक्तिचित्रणे असता कामा नयेत.तटस्थ व्रुत्तीने आणि निष्पक्षपणे लेखण व्हावे लागते.मराठ्यांच्या इतिहासात अनेक समज, गैरसमज आणि अपसमज आढळून येतात.इतिहासलेखण देखील व्यक्तिच करतात.छत्रपती संभाजी महाराज, महादजी शिंदे, होळकर, दुसरे बाजीराव, आनंदीबाई, सोयराबाई शिर्के, टिळक, शाहू एवढेच काय पण विश्ववंद्य छत्रपती शिवाजी राजे यांच्याबाबतीतही आपल्या काही इतिहासकारांनी अवास्तव, अवाजवी गोष्टी लिहुन ठेवल्या आहेत. तसेच काही काल्पनिक पात्र इतिहासात घुसडली आहेत.विशेषत: बखरकारांना गोंधळ व भडक, रंजक चित्रणे तर विचारायला नकोच , म्हणूनच त्यातील सत्य शोधणे आवश्यक आहे. 
आता याला इतिहास तरी कसे म्हणावे ? कारण इतिहास शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिलेला असतो.ती पद्धत या इतिहासात जास्त दिसून येत नाही.इतिहास लेखण हे ब्राह्मण इतिहासकारांना लिहिता येते का ? कारण इतिहास लेखणात प्रामाणिकपणा असावा लागतो, पण तो यांच्यात दिसून येत नाही.इतिहासकार हुशार असू शकतात पण प्रामाणिक असू शकत नाहीत.त्यांनी जो इतिहास लिहिला तो इतिहास नसून काल्पनिक गोष्टी आहेत.असे त्यांच्या लिहिलेल्या इतिहासाची चिकित्सा केल्यावर दिसून येते.म्हणून असा इतिहास म्हणजे "चोपड्या" आहेत असे हमखास मानावं लागेल आणि या चोपड्यांना जे बिनडोक इतिहास समजतात ते भटांचे "पिट्टू" आहेत असे समजावे.अर्थात वर्णवर्चस्ववादी इतिहासकर नसून इतिहासविध्वंसक आहेत.हा इतिहास केवळ बहुजनांवर वर्चस्व लादण्यासाठी लिहिलेला आहे.पण आता त्यांची चांगलीच चिकित्सा होत चालली आहे.जाग्रुतीचा वनवा पसरला आहे.या वणव्यात त्यांना खाक व्हावे लागेल अन्यथा सुधरावे लागेल.काय करायचे ते त्त्यांनीच ठरवायचे आहे.दादू कोंडदेवचा पुतळा काढून इतिहास शुद्धीकरणाला सुरुवात झाली आहे असे म्हणायला काही हरकत नसावी.अजुन अशी बरीच घाण साफ़ करायची आहे.त्यांनी जे लिहिले ते त्यांचे वर्चस्व रहावे म्हणून  लिहिले तो इतिहास होऊ शकत नाही.जातीयपुर्वाग्रहातून जे लेखण केले जाते त्याला इतिहास म्हणता येत नाही. मुळात इतिहास म्हणजे काय ? ते समजुन घेतले पाहिजे.
फ़्रॉंन्सिस बेकन यांचे मत इतिहास म्हणजे "मानवाला शहाणे बनविणारी विद्याशाखा म्हणजे इतिहास होय", तर हेन्री जॉन्सन म्हणतात इतिहास म्हणजे " जे घडले ते जसेच्या तसे सांगणे होय" आणि" ज्या घटनांनी मानवी मनावर खोल ठसा उमटतो , अशा घटना म्हणजे इतिहास होय".इतिहासाची व्याख्या करताना प्रो.लेस्की म्हणतात, "इतिहास म्हणजे नैतिक कल्पनांचा संग्रह व स्पष्टीकरण होय".तर इतिहास लेखणाबाबत डॉ.भिमराव आंबेडकर म्हणतात "प्राचीन भारताच्या इतिहासाचा बहुतेक हिस्सा हा इतिहास नाही, असे नाही की प्राचीन भारत इतिहासविना आहे.प्राचीन भारताला फ़ार इतिहास आहे परंतू तो आपले स्वरून गमावून बसलेला आहे.स्रियांचे व मुलांचे मनोरंजन करण्यासाठी त्याला जाणीवपुर्वक पौराणिक  स्वरूप दिले आहे" ,"पुढे ते म्हणतात की ,प्राचीन भारताच्या इतिहासावरील पडदा हटविला जावा याशिवाय प्राचीन भारत इतिहासविहीन राहील.आनंदाची गोष्ट अशी की बौद्ध साहित्याच्या मदतीने प्राचीन इतिहासाला त्या मलब्यातून खोदून काढता येवू शकते. ज्या मलब्याखाली इतिहासकारांनी पागलपणात त्याला लपवून ठेवले आहे "
           या द्रुष्टिने विचार करता ब्रह्मव्रुंदांचे लिखाण इतिहास लेखनाच्या कसोटीवर खरे उतरत नाही.जर ते इतिहासाच्या नावाने आमच्यावर गुलामी लादत असतील तर ती आम्ही ठोकारून लावणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे.जो इतिहास त्यांनी रचला आहे तो साफ़ चुकीचा व दिशाभुल करणारा आहे.त्यांनी जो इतिहास लिहिला तो स्वत:चे हित बघुनच.ब्रह्मव्रुंद इतिहासकारांनी लिहिलेल्या इतिहासात शेंबड्याला राष्ट्रिय नेता बनविले जाते व आमच्या महापुरुषाला हे एवढे लहान करून ठेवतात की आम्हाला आमचा महापुरुष आमचा वाटत नाही. तेली,तांबोळी, कुणबी यांचा जाहीर अपमान करणारे टिळक राष्ट्रिय पुरुष ठरतातच कसे ? महात्मा फ़ुले यांचे कार्य राष्ट्रीय स्वरुपाचे असताना त्यांना महाराष्ट्रापुरतेच मर्यादित करण्याचे महापातक याच वर्णवस्चस्ववादी इतिहासकारांनी केले.उमाजी नाईक हे पहिले क्रांतीकारक असताना कोणा दुसर्याला आद्य क्रांतीकारक म्हणने हा इतिहास आहे ? ज्या राजाच्या शौर्याला जगामध्ये तोड नाही अशा राजाला स्त्रीलंपट म्ह्णून अपमानित केले हा इतिहास आहे ? शिवरायांच्या आकाशाला गवसणी घालणार्या कार्याचे श्रेय स्वजातीय किड्यांना देणे हा इतिहास होऊ शकतो ? एका  चाकराला गुरुपदी बसवले जाते हा इतिहास आहे ? इतिहास लिहिताना स्वार्थाचा लवलेशही नसावा. मग याला आपण इतिहास म्हणायचे ?.
काय हा खरा इतिहास होऊ शकतो ? वर्णवस्चस्ववादी पुरुषांचा इतिहास (गोष्टी) रंगवून सांगितल्या जातात. खलनायकांना नायक बनविणे हा इतिहास होऊ शकतो काय? अशा इतिहासातून राष्ट्रिय भावना कशी काय निर्माण होऊ शकते ?. म्हणूण अशा इतिहासातील घाण साफ़ करणे आवश्यक आहे.पण ती घाण ब्राह्मण साफ़ करणार नाहीत.ते बहुजन इतिहासकारांनाच करावी लागेल.कारण यांचा इतिहास अर्थात चोपड्या रद्दीत फ़ेकण्यालायकच असतात.म्हणून बहुजन इतिहासकार निर्माण होणं आवश्यक आहे.आत्ता पर्यंत बराच इतिहास स्वच्छ झालेलाच आहे त्याबद्दल त्या इतिहासकारांचे आभार आणि अभिनंदन.
  आज बरेच साहित्यिक ,इतिहासकार सत्य इतिहास लेखण करीत आहेत.अर्थात त्याची आवश्यकता आहेच.खरा इतिहास जाणुन घ्यायचा असेल तर हे होणे नक्कीच गरजेचे आहे."ध" चा "मा" करण्यात वर्णवस्चस्ववादी इतिहासकार पटाईट असतात.संभाजी महाराजांचे चरित्र बदनाम करण्याचे काम या वर्णवस्चस्ववादी तथाकथित विद्वानांनीच केले.जिजामातेची बदनामी याच तथाकथित विद्वानांनीच केली.त्यामुळे बहुजन इतिहासकार व साहित्यिकाने या गोष्टीकडे विशेष लक्ष देऊन त्यांचे मनसुबे नेस्तनाबूत करावेत आणि या पिढीला स्वच्छ आणि खरा इतिहास द्यावा हिच विनंती.
जय शिवराय ॥ जय महाराष्ट्र 

6 November 2012

जेंव्हा इतिहास लिहिला जाईल.........

            एक कथा आहे चिमणी आणि कावळ्याची की एक जंगल होते त्या जंगलात विविध प्राणी राहत होते.एक दिवस जंगलाला आग लागली सर्व प्राणी,पक्षी इकडे तिकडे पळू लागले.त्यावेळी चिमणीने विचार केला ही आग कशी विझवायची.त्यावेळी चिमणी चोचीमध्ये पाणी भरून ती त्या आग आगीवर आणुन टाकू लागली. तिची ती धडपड बराच वेळ चालली. तिथेच असलेला कावळा त्या चिमणीला पाहुन हसत होता.तेंव्हा त्या कावळ्याने चिमणीला प्रश्न केला."चिऊताई चिऊताई तुझ्या इवल्याशा चोचीमधील पाण्याने जंगलाला लागलेली आग विझेल का ?" असे म्हणून तो कावळा हसला.चिमणीने त्याच्या हसण्याकडे लक्ष न देता पुन्हा आपल्या कामात ती गर्क राहीली.चिमणीने धडपड करून चोचीत जेवढे मावेल तेवढे पाणी आणुन त्या घरट्यावर ओतत होती.ती आग वाढतच चालली होती.पण चिमणीची धडपड कमालीची होती.चिमणीची ती धडपड बघून कावळा आणखी मोठ्याने हसू लागला.त्याचे ते हास्य कुत्सित होते.पुन्हा तो कावळा चिमणीला म्हणाला-"चिऊताई चिऊताई तु वेडी आहेस का ? तुझ्या चोचीतल्या पाण्याने आग विझेल का ? ". आता मात्र चिमणीला रहावले नाही.चिमणी त्याला म्हणाली- " अहो कावळेदादा, या जंगलाला आग लागली आणि या जंगलाच्या आगीला विझविण्याचा जेंव्हा इतिहास लिहिला जाईल तेंव्हा त्यात माझे नाव नक्कीच आग विझवणार्यांच्या यादीत असेल, आग लावणार्यांच्या किंवा त्याच्या समर्थकांच्या यादीत माझे नाव नसेल".
         ही कथा सांगण्याचे कारण हे आहे की आज सर्वत्र जातीयवाद,वर्चस्ववाद, ब्राह्मणवाद वाढला आहे. कोणत्याही  अडाणी लोकांना हाताशी धरून महापुरुषांचा अपमान करणे ,इतिहासाचे विक्रुतीकरण करणे याचे प्रमाण वाढले आहे.इतिहासाचे विक्रुतीकरण करणे हे काही लोकांचे धंदेच बनले आहेत.त्यातील एक वाद म्हणजे जेम्स लेन आणि दादू कोंडदेव  प्रकरण.आता ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे की जेंव्हा जेम्स लेन ला हाताशी धरून काही वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणांनी शिवरायांचा अपमान केला तेंव्हा फ़क्त संभाजी ब्रिगेड सारख्या शिवप्रेमी संघटनाच पुढे सरसावल्या निषेद नोंदवायला.संभाजी ब्रिगेड ने जेंव्हा दादू कोंडदेव यांचा पुतळा काढला तेंव्हा ते शुभ क्रुत्य सर्व जाणव्यांना झोंबले.कुणीही असो ते क्रुत्य त्यांना झोंबण्याचे कारण देखील होते.कारण हे इतिहास शुद्धीकरणाचे संकेत होते.याचे कारण म्हणजे दादू कोंडदेव यांच्या प्रती असलेले प्रेम.पण जे कार्य संभाजी ब्रिगेड ने केले त्याबद्दल समाजामध्ये मोठी चर्चा सुरु झाली.संभाजी ब्रिगेड ही एक शिवप्रेमी संघटना आहे हे विचार रुजू लागले.संभाजी ब्रिगेड गावोगावी पसरली.समाजामध्ये चित्र स्पष्ठ झाले की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी ही प्राच्यविद्या संस्थेतील त्या १४ भटांनीच केली आहे.
आज पर्यंत इतिहासाला वाचविण्याचे आणि शुद्ध करण्याचे काम संभाजी ब्रिगेड ने केले.खरे तर समाज काय आहे किंवा जातीपाती काय आहेत? सगळ्या जाती-धर्मा मधले लोक आपले बांधव आहेत हे विचार समाजात संभाजी ब्रिगेड मुळेच पसरले.आपले खरे शत्रु कोण आहेत आणि मित्र कोण आहेत हे संभाजी ब्रिगेड मुळेच समजले. नाहीतरी वर्णवर्चस्ववादी लोकांनी सगळ्यांना अंधारात ठेवून जाती - धर्मात फ़ुट पडण्याचे काम केले होते.शिवप्रेमी कोण आणि शिवद्रोही कोण हे सर्व बहुजनांना संभाजी ब्रिगेड मुळेच कळले.आज अशा बर्याच गोष्टी होत्या त्यामुळे महापुरुष बदनाम होत होते,इतिहास विक्रुत होत होता पण संभाजी ब्रिगेड ने त्यावर गदा आणली.आपल्या इतिहासाला वाचविण्याचे महत्वाचे काम संभाजी ब्रिगेड ने केले आहे.संभाजी ब्रिगेड नसते तर काय अवस्था झाली असती इतिहासाची, कल्पना ही करवत नाही.उदा.दादू कोंडदेव हा शिवरायांचा गुरु म्हणूनच बोंबाबोंब झाली असती आणि पावलो-पावली शिवराय दादू कोंडदेव मुळे कर्त्रुत्ववान झाले, नाही तर कुठ्ले ! हे ऐकावे लागले असते.इथेच हे थांबले नसते तर यापुढे जेम्स लेन च्या पुस्तकाच्या माध्यमातून अतिशय अपमान कारक इतिहास आपल्या माथ्यावर मारला गेला असता जर संभाजी ब्रिगेड नसते तर. हे तर संभाजी ब्रिगेडचे आभार मानले पाहिजेत.
संभाजी ब्रिगेड हा बहुजन महापुरुषांच्या स्वाभिमानाचा त्यांच्या चळवळीचा मुद्दा आहे.त्यामुळे वरील बोधकथा येथे सुद्धा लागू होते.छत्रपती शिवरायांचा आणि जिजामातेचा अपमान झाला त्या इतिहासामध्ये बदनामी करणार्यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड लढले असा इतिहास होईल ना की समर्थकांच्या यादीत त्यांचे नाव असेल.भांडारकर प्राच्यविद्या संस्था ही संशोधनाचे किंवा ज्ञानाचे केंद्र राहीले नसून ते मनुवाद्यांच्या नालायकपणाचा आणि षडयंत्राचा अड्डा बनले आहे.ही बाब तेंव्हा  नोंदविली जाईल.ज्याप्रमाणे चिमणीने आपल्या क्षमते प्रमाणे आग विझवण्यासाठी धडपड केली म्हणूण तीचे नाव आग विझवण्यार्यांच्या इतिहासात अव्वल राहील.तसेच आज ज्या भांडारकर नावाच्या बौद्धिक वेश्यागिरी केंद्राने जी घाण किंवा जे षडयंत्र केले त्याच्या विरोधात संभाजी ब्रिगेड लढले हा इतिहास लिहिला जाईल.त्या इतिहासात संभाजी ब्रिगेड चे नाव अमर होईल यात तीळमात्र शंका नाही.छत्रपती शिवरायांचा आणि जिजामातेचा अपमान करणार्या मनुवाद्यांना संभाजी ब्रिगेड चांगलाच धडा शिकवेल अशी अपेक्षा करुया.मराठ्यांनो आपला तेजस्वी इतिहास जीवंत ठेवायचा असेल तर संभाजी ब्रिगेडला पर्याय नाही हे लक्षात घ्या. तो इतिहास त्याचा पुरावा राहील.हे होणार आहे ते निश्चित होणारच आहे.      

आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके

           उमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक.... परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी नाईक उपेक्षित क्रांतिकारक आहे....कारण उमाजी नाईक हे रामोशी समाजातील. त्यामुळे त्यांचा खराखुरा इतिहास लिहिण्यापेक्षा लेखणी ज्यांच्या हातात आहे अशा लोकांनी पूर्वग्रह आणि जातीयवाद मनात बाळगून इतिहासाचे लेखन केले. त्यांच्या या उपद्व्यापामुळे उमाजी नाईक सारखे अस्सल हिरो झिरो झाले आणि झिरो हिरो झाले. ही कला अवगत असते ज्याच्या हातात प्रचार-प्रसार माध्यमे असतात त्याला. लोकांना एखादी खोटी गोष्ट सांगितली तर ती पटतेच असे नाही. परंतु एकच खोटे शंभर वेळा खरे म्हणून सांगितले तर लोकांना ते नक्की पटते. 
          आद्य’ या शब्दाचा अर्थ आहे ‘पहिला’. ‘आद्य क्रांतिकारक’ म्हणजे ‘पहिला क्रांतिकारक’. प्रथम ज्याने सशस्त्र क्रांती सुरु केली असा क्रांतिकारक ‘आद्य क्रांतिकारक’ ठरू शकतो. ‘आद्य क्रांतिकारक’ एकच असू शकतो. दोन-दोन आद्य क्रांतिकारक असणे शक्य नाही. दोघांचाही कार्यकाल भिन्न आहे. तरीही या दोघांचीही मांडणी आद्य क्रांतिकारक म्हणून कशी काय होवू शकेल ? यात मला कुणाचाही अवमान करायचा नाही. परंतु हे वास्तव आहे कि दोघांचीही मांडणी आद्य क्रांतिकारक म्हणून होवू शकत नाही.
        त्यासाठी आपण जरा दोघांच्याही जीवनपट आणि कार्यकालावरून नजर टाकू. दोघांचाही इतिहास पारदर्शक आहे त्यामुळे समजायला वेळ लागणार नाही की कोन असली हिरो, आद्य क्रांतिकारक आहेत. 
आधी आपण आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या विषयी जाणुन घेऊया
आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक
               उमाजी नाईक यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ साली पुणे भिवडी येथे झाला. उमाजी नाईक हे शिवरायांचे निस्सीम भक्त होते . शिवरायांनी ज्यापद्धतीने जुलमी, परकीय शक्तीविरोधात लढा उभारून स्वराज्य निर्माण केले तसेच स्वप्न उमाजी नाईक ही पाहत होते. इंग्रजी सत्ता उलथवून टाकण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्याबरोबर इंग्रजी सत्तेच्या विरोधात रणशिंग फुंकले. याकामी त्यांना विठूजी नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळकर आणि इतर सहकाऱ्यांनी बहुमोल मदत केली. इंग्रजांच्या खजिन्यावर धाडी टाकणे, तो गरिबांना वाटणे, इंग्रज सैन्याला सळो कि पळो करून सोडणे, प्रसंगी जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांना ठार कारणे अशा मार्गाने उमाजी नाईक यांनी पाहिली सशस्त्र क्रांती सुरु केली. डिसेंबर १८३० ला त्यांनी इंग्रज सत्तेच्याविरोधात जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. इंग्रजांनी उमाजी नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रचंड धास्ती खाल्ली होती. परंतु फितूर भोरच्या सचीवामुळे १५ डिसेंबर १८३२ रोजी अवघ्या ४१ व्या वर्षी उमाजी नाईक देशासाठी फासावर चढले.
क्रांतिकारक वासूदेव बळवंत फ़डके यांच्या विषयी जाणुन घेऊया
क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके
          वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म उमाजी नाईक यांच्या मृत्युनंतर १३ वर्षांनी म्हणजे ४ नोव्हेंबर १८४५ रोजी झाला. वासुदेव बळवंत फडके हे इंग्रजांच्या सैन्य लेखा सेवेत नोकरीस होते. एकदा त्यांची आई आजारी असताना त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी रजा नाकारली. त्यामुळे ते आजारी आईला भेटायला जावू शकले नाहीत. जेव्हा ते आईला भेटायला गेले तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले होते. या प्रकाराने संतापून फडके यांनी इंग्रजी नोकरीचा राजीनामा दिला आणि इंग्रजाविरुद्ध संघर्ष चालू केला.आता जरा थोडा विचार केला की जर त्यांची रजा मंजुर झाली असती तर ? त्यांनी शस्त्र घेतले असते का ? यामुळे आद्य राहुदेत नुसते क्रांतिकारक यावरच प्रश्न निर्माण होतो असो....
           दोघांचाही कार्यकाल अभ्यासाला तर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात यायला हवी कि उमाजी नाईक यांच्या मृत्युनंतर तब्बल १३ वर्षांनी वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला. मग फडके यांच्या कितीतरी अगोदर उमाजी नाईक यांनी सशस्त्र क्रांती सुरु केली होती. मग आद्य क्रांतिकारक हा बहुमान उमाजी नाईक यांना मिळायला हवा. मात्र त्यांना डावलून वासुदेव बळवंत फडके यांची मांडणी आद्य क्रांतिकारक म्हणून केली जाते. त्यामुळे होते काय कि ज्या अर्थी वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक आहेत त्या अर्थी त्यांनी पाहिली सशस्त्र क्रांती सुरु केली. अर्थात त्यांच्या आधी कुणीही सशस्त्र क्रांती सुरु केली नाही. मग वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हटल्याने उमाजी नाईकांचे कार्य-कर्तुत्व डावलले जात नाही का ? कि मुद्दाम त्यांना उपेक्षित ठेवण्यासाठीच असे प्रकार होतात ? अशाने खरा इतिहास समाजासमोर कसा येणार ?
          महापुरुषांच्या नावाला आणि कर्तुत्वाला जातीचे परिमाण लावणे हे जितके चुकीचे तितकेच त्यांना जातीत बंदिस्त करून त्यांचा इतिहास लिहिणेही चुकीचे. मात्र इतिहास लिहितानाच अशा लबाड्या केल्या गेल्या असतील तर त्या दाखवून देताना जातींचे संदर्भ आले म्हणूण महापुरुषांच्या कर्तुत्वाला धक्का पोहचला असे कुणी मानू नये.याला इतिहासाचे विक्रुतीकरण म्हणत नाहीत तर इतिहासाचे शुद्धीकरण म्हणतात.

5 November 2012

मानवतेचे महान उपासक : संत गाडगे महाराज

        "मनुष्य" सुद्धा उमललेल्या फ़ुलासारखा असतो. मनुष्य जन्माला येतो तो अस्तित्वाचा भाग म्हणून.चैतन्य त्याच्या नसानसातून धवत असतं .दु:खातून आनंदाकडे जाणारा हा प्रवाह अनेक दु:खी,कष्टकरी जनतेच्या अंत:करणात भरून जातो.ते भरणं त्यांच्या कष्टाचं सार्थक असतं.जन्माचं कल्याण करतं , आनंदाची , चेतनेची ज्योती चेतविण्याकरीताच हे अस्तित्वाचं लेणं आकार घेतं.
        "शेणगांव" एक लहानसं खेडं.गावात शंभर - सव्वाशे कौलारू झोपड्या.ह्या खेड्यात परीट जातीचं एक घर,समोर दोन - तीन मडकी,सारवून स्वच्छ केलेलं अंगण.घराचा मालक झिंगराजी.त्यांच्या बायकोचं नाव सखुवाई, कष्ट करणारी. या  मायमाउलीच्या पोटी १८७६ साली जन्माला आलं मुल नाव ठेवलं ’डेबू’.’डेब’ झाला तुकोबांचा कर्मयोगी ,सार्या कुळाचा उद्धार केला.डेबुंचे कार्य महान सारी मानवता खुश झाली.दीनांचा कैवारी मानवतेच्या अपंगाचा आधार..अमाप कार्य महाराष्ट्रावरच नव्हे तर सर्व भारत मातापिता त्यांच्या कार्यावर धन्य झाली.
          संत गाडगेबाबांना संत तसेच कार्यवीर म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.कोणत्याही प्रकारच्या चमत्काराचा स्पर्ष न होता हे व्यक्तिमत्व येवढे थोर कसे ? अंगठेबहाद्दर डेबूजी बघता बघता अनेक स्वनामधन्य विद्वानांचा बाप कसा झाला ? आजुबाजुला पसरलेल्या हजारो निरक्षर , अडाणी , देवभोळ्या व अंधश्रद्ध लोकांच्या ज्ञानाचा दिप चेतविण्यासाठी गाडगेबाबांनी ग्रुहत्याग केला आणि तथागत बुद्ध गाडगेबाबांच्या रुपाने पुन्हा समाजात वावरले.
              संत गाडगेबाबांमध्ये तथागत बुद्धांची करूणा, तुकोबांची अहिंसा यांचे विलक्षण मिश्रण झाले आहे. जेंव्हा तिकडे सावकरांनी डेबुजींच्या मामाची जमीन फ़सवणुकीने  गिळंक्रुत करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा डेबुजींनी त्याला विरोध केला.सावकाराला शेतातून पळवून लावले.सावकाराने डेबुजींच्या आजोबांना व मामेभावाला गाठले आणि धाकदपटशा दाखवून पुन्हा जमीन गिळंक्रुत केली.आपण दाताच्या कण्या करून, हाडाचे काडे करून सावकाराचे कर्ज फ़ेडले आणि तरीही इथल्या व्यवस्थेमुळे आपल्या बापजाद्यांच्या निरक्षरतेमुळे आपला आणी आपल्या कष्टाचा बळी गेला हे बाबांच्या मनाला फ़ार लागले.त्या दिवसापासून बाबा संसार पराड:मुख झाले आणि ग्रुहत्याग केला.
            " बाबा घरातून बाहेर पडल्यावर जेंव्हा वर्षभराने त्यांची आई, बायको व मुलाबाळांची भेट झाली त्यावेळी त्यांच्या आईने आता आम्ही कुणाच्या भरवश्यावर जगावे ?" असा प्रश्न केला.त्यावेळी बाबांनी दिलेले उत्तर मार्मिक आहे.ते म्हणतात "ज्याच्या घरचा माणुस मेला त्याचे काय होते त्याच्या वाचून अडते काय ? " असे समजा की डेबुजी मेला, मग जसे जगले असते तसे जगा.ग्रुहत्याग केलेला माणुस वेगळ्या अर्थाने घरच्यांसाठी मेलेलाच असतो.डेबुजीला स्वत:च्या अंगातला आळस  झडावा म्हणून कोणाच्याही शेतात काबाडकष्ट कर.कोणाच्या घरची लाकडे फ़ोडून दे, कधी स्वत:ला महार मांग म्हणवून घेवून विहिरीला स्पर्श, मालकाचा बेदम मार खा, जिभेचा लोभ झडला पाहिजे म्हणुन केवळ पुरणपोळीची मागणी करायची आणि काटेरी फ़ांदिने स्वत:ला झोडपून घ्यावे.ही सगळी क्रुत्ये वेडेपणाची लक्षणे होती काय ? नक्कीच नाही!
             आपल्या अस्तित्वाचे विश्व चैतन्याशी विलीनीकरण झाले पाहिजे म्हणून स्वत:च्या देहावर केलेला तो उपचार होता ! अंगावर सतरा ठिगळांचे कुडते.एका कानात कवडी तर दुसर्या कानात बांगडीचा तुकडा, डोक्यावर कापर हा सगळा वेश,म्हणजे गबाळेपणा काय ? सतरा ठिगळांचे कुडते सर्वधर्मसमभावाचे निदर्शक, कानातली कवडी माणसाचे जीवन कवडीमोल आहे हे दाखविणारे ,तर फ़ुटक्या बांगडीचा तुकडा जिवनाचे क्षणभंगुरत्व निर्देशित् करणारा, डोक्यावर खापर म्हणजे जीवनाच्या फ़ुटक्या मडक्याचा अन्वयार्थ स्पष्ट करणारे ! म्हणुनच आपण जीवनाचा साक्षात्कार झालेल्या डेबुजींना गाडगेबाबा म्हणतो.संसारात लिप्त असलेल्या ग्रुहस्थाला नाही.
                बाबांना अहंकाराचा वारा लागलाच नाही. त्यांच्या अहंकाराची राख झाली होती.ज्यांचा अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला.बाबा म्हणत "मी काही वेगळं करत नाही. मी करतो ती मानचाची सेवा होय. गरजवंतांकरीता झिजणं हा मानवता धर्म आहे.मी तो धर्म पाळतो आहे.हा देह सेवेत खर्च व्हावा एवढेच मला वाटते."जसं बाबांची सेवा आणि बाबा म्हणजे विलक्षण आश्चर्य होते.त्यांचा शब्द म्हणजे मोत्याचं पाणी.बाबा म्हणजे सन्मार्गाची वाट.त्यांची प्रत्येक क्रुती माणसाला वळणशील बनवी. त्यांची कार्यपद्धती आणि कार्य अचाट होते.
            समाजोपयोगी अनेक कार्याची बाबांनी उभारणी केली.सारा महाराष्ट्र त्यांच्या कार्याने उजळून निघाला. त्यांच्या कार्याची साक्ष म्हणजे त्यांनी बांधलेल्या टोलेजंग धर्मशाळा.शिक्षणावर त्यांचं नितांत प्रेम होतं.ते नेहमी डॉ.बाबासाहेबांचं उदाहरण देत.शिक्षणाशिवाय माणुस आंधळा होतो.परिस्थितीमुळं माणसाला शिक्षण मिळत नाही,अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात.गरिबांना शिक्षण कसं मिळेल याची बाबांना सदैव चिंता.त्याकरीता बाबांनी शाळा काढल्या, वसतीग्रुहे काढली, आश्रमशाळा सुरु केल्या, जागोजागी अन्नछत्रे उभी केली.उपाशी माणसं जेवायला लागली.आंधळे,पांगळे आशेने फ़ुलुन गेले.बाबा त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले.जिवाचं रान करून हे हिमालयाएवढे मोठे कार्य बाबांनी उभं केलं.
            कोहिनुर हिर्याला पहावं रत्नात, सिंहाला पहावं वनात, तसं बाबांना पहावं कीर्तनात. बाबा खराट्याने गावातील घान साफ़ करीत.बाबांनी आपल्या जीवनातील शेवटचे कीर्तन मुंबई पोलीस ठाण्यात करून नोकरदारांच्या डोक्यातील वेडगळ समजुती व अंध:श्रद्धारुपी घान साफ़ केली.गोपाला ॥ गोपाला ॥ देवकीनंदन गोपाला ॥.........गजरात मोटार नागरवाडीच्या मार्गावर असताना पेढीनदीचे पुलावर मोटार आली अन बाबांचे महापरीनिर्वाण झाले.तो दिवस होता २० डिसेंबर १९५६ त्यांच्या स्म्रुतीस मन:पुर्वक अभिवादन ! 

29 October 2012

समता प्रिय संत शिरोमणी संत नामदेव महाराज

           संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत. त्यांचं कर्त्रुत्व महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून उत्तर- वायव्य भारतापर्यंत आपला ठसा उमटवून गेले."नाचू किर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥" यांसारख्या शब्दांनी समाजात समतेच्या मार्गाने ज्ञानदीप लावण्याचा ध्यास घेतलेल्या संर नामदेव महाराजांनी भाषा,प्रांत,धर्म, जातपात या पलीकडे जाऊन समाज जीवणाचा विचार केला.त्यामुळे संत नामदेव महाराज केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता पंजाबमधील शिखांनाही तितकेच पुज्य ठरतात.प्रतिकुल ,राजकीय, सामाजिक अन धार्मिक आतावरणात मराठी आणि अन्य प्रादेशिक लोकजीवनाला नवे वळण लावण्याचे कार्य ज्या काही थोर संतांनी केले त्यांचे अग्रणी संत नामदेव महाराज होते.
                 मध्ययुगीन समाज जीवन प्रामुख्याने धर्मप्रधान होते.पण कर्मकांड आणि विधिनिषेद यांचे स्तोम फ़ार माजलेले होते. वर्णाश्रमाच्या धोरणामुळे उच्चवर्णीय समाजामध्ये अराजकता निर्माण झाली होती.धार्मिक संस्कार तेच करायचे ज्ञान , अध्ययन, अध्यापन, धनसंचय, शस्त्र धारण करण्याचा अधिकार त्यांनाच होता.तसेच मंदिर प्रवेश ,सार्वजनिक पाणवठे इत्यादी ठिकाणी पाणी भरण्याचा अधिकार अस्प्रुष्यांना नव्हता.हळूहळू या रुढींनाच धर्माचे महात्म्य प्राप्त होत गेले आणी समाजात भयानक अज्ञान आणि अंधश्रद्धाचे स्तोम माजले होते.
           या पार्श्वभुमीवर २६ ऑक्टोंबर १२७० रोजी नामदेव महाराजांचा जन्म एका शिंपी कुटुंबात झाला.संत नामदेव केवळ भक्तिभावाची (काव्य) गाणी लिहिणारे नव्हते तर समाजात समता प्रस्थापित करण्यात आणि समाज प्रबोधन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.भेदाभेदांनी विदीर्ण (भग्र) झालेल्या भारतीय समाजात संत नामदेवांनी लोकनिंदेचा विचार न करता समतेची बीज रोवून विषमतेवर प्रहार केला.विसोबा खेचरांना गुरु मानणार्या  संत नामदेवांनी जेंव्हा संत चोखोबांच्या परिवारावर आपत्ती आली तेंव्हा ते मंगळवेढ्याला गेले आणि त्यांच्या (चोखोबांच्या) अस्थी स्वत: आणून सनातन्यांच्याच नगरीत खुद्द पंढरपुरच्या विठ्ठ्लाच्या पायरीशी संत नामदेवांनी चोखोबांच्या स्म्रुतीमंदिरांची निर्मीती केली.
           संत नामदेवांनी नेहमी जातीनिरपेक्ष धार्मिक लोकशाहीचा पुरस्कार केला ते एक प्रतिभासंपन्न कवी व संगीताचे चांगले जाणकार होते आणि कीर्तन कलेवर त्यांचे प्रभुत्व होते.संत नामदेवांनी त्रिप्रकरणात्मक, चरित्र, आत्मचरित्र, व्यक्तिचरित्र, आख्यानक रचना,प्रवास वर्णन, काव्य, कुटरचना,लोक कविता, भाव आणि भक्तीपर कविता,सश्यूकुडी वाणीतील हिंदी रचना अशी त्यांनी वैविध्यपुर्ण वाड:मय संपदा लिहिली.
           संत नामदेव महाराजांनी संपुर्ण भारतभर ५४ वर्ष फ़िरून समाजात समता प्रस्थापित करण्याचा अथक प्रयत्न केला.८० वर्षाचे वय झाल्यावर त्यांनी इहलोकाचा निरोप घॆण्याचे ठरविले आणि ३ जुलै १३५० रोजी पंढरपुर इथे विठ्ठ्ल मंदिराच्या महाद्वारात संत चोखोबांच्या समाधी शेजारी समाधी घॆऊन समाजासमोर समतेचा महान आदर्श ठेवला.अशा या महान संत शिरोमणींची २६ ऑक्टॊंबर रोजी जयंती.अशा या समता प्रिय संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांना कोटी - कोटी विनम्र वंदन....

8 October 2012

उल्लेखनीय प्रतिक्रिया !

[ विश्व मराठी ब्लॉग लिहिल्या पासून आतापर्यंत १५०० च्या आसपास प्रतिक्रिया कट्ट्यावर धडकल्या.प्रतिक्रिया या महत्वाच्या असतात कारण त्या लिहायला उत्सुक करतात, प्रेरणा देतात अशीच एक प्रेरणादायक प्रतिक्रिया कट्ट्यावर येवून धडकली ती प्रतिक्रिया एक मोठे लेखक आहे ते म्हणजे "मराठ्यांनॊ षंड झालात का ? " या पुस्तकाचे लेखक डॉ.बालाजी जाधव साहेब यांची.त्यांची प्रतिक्रिया खाली देत आहे. ]
"आपला ब्लोग अतिशय आवडला. अत्यंत सुंदर आणि प्रभावी रीतीने आपण आपल्या ब्लॉगची मांडणी केली आहे. खरेच आहे जिथे आयुष्याला कलाटणी देणारे शिव विचार वाचायला मिळतात ते स्थानही तेवढेच शिवमय असू नये काय? तंत्रज्ञानाचा फार चांगला फायदा आपण करून घेतला आहे. समाजाला लागणारे वैचारिक खाद्य आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पुरवित आहात. आजपर्यंत एवढा नीटनेटका ब्लोग माझ्या तरी पाहण्यात आला नाही. हा ब्लोग खरोखरच लोकप्रियतेच्या कळसावर आहे हे त्याच्या सभासद संखे वरूनच लक्षात येते. यापुढेही आपण समाजाला योग्य दिशा देणारे साहित्य निर्माण करावे आणि आम्हा वाचकांची भूक भागवावी. आपले कार्य हे पुस्तक पेक्षाही अत्यंत प्रभावी आहे कारण पुस्तक निर्मिती प्रक्रियेत बराच वेळ जातो आणि नजर चुकीने जर काही चूक झाली तर ती चूक पुस्तकांच्या प्रती संपे पर्यंत काढता येत नाही, हे मी एक प्रकाशक या नात्याने चांगलेच जाणतो. हा धोका आपल्याला नाही. लेख लिहिला की वाचकांच्या मनाचा वेध घ्यायला तो तयार होतो. चूक असेल तर लगेच दूरोस्त करता येते आणि वाचकही आपल्या विचारांचा आस्वाद घेऊन लगेचच आपली कडू गोड प्रतिक्रिया देऊ शकतो. आपल्या पुढील कार्यास शिवेछ्या. हा ब्लोग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा. विशेष गोस्त म्हणजे आपण आपल्या प्रोफिले मध्ये माझ्या "मराठ्यांनो षंढ झालात काय?" या पुस्तकातील "मराठा लढवय्यी जात ,एकेकाळची राज्यकर्ती जात ,जगातल्या १३ लढवय्या जातीपैकी प्रथम क्रमांक पटकावणारी जात, "पंजाब, सिंध , गुजरात, मराठा "या राष्ट्रगीतात महाराष्ट्राचा उल्लेख "मराठा" असा करायला भाग पडणारी जात , स्वतःच्या शौर्य, धैर्य, त्याग आणि उदारपणा या गुणांमुळे महाराष्ट्राची ओळख बनलेली जात". या ओळी टाकल्या. याचे मला फार बरे वाटले. आई जिजाऊ आपल्याला प्रचंड यश देओ हीच शिव कामना."
जय जिजाऊ!

डॉ.बालाजी जाधव
लेखक : "मराठ्यांनो षंड झालात काय ?"
धन्यवाद ! डॉ. जाधव साहेब आपल्यासारख्या लेखकांमुळेच आणि वाचकांमुळेच आम्हाला लिहायला प्रेरणा मिळते.आपण आमचा मराठी कट्टा ब्लोग वाचत रहा आणि आपलेविचार कळवत रहा.
धन्यवाद पुन्हा एकदा ..
जय जिजाऊ । जय शिवराय  ।

7 October 2012

जातीच्या वर्गात सत्यानाशच..

         "जातीसाठी माती खावी " अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. दैनंदिन जीवण जगत असताना अनेकदा आपण या म्हणीनुसार वागतो, क्रुती करतो.यामुळे आपल्याला समाधान वाटत असते.
पण खरोखरच जातीविषयक असलेला हा गर्व, अभिमान दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या समस्या सोडवू शकतो काय ? याचे उत्तर नकारार्थी असेच आहे.आपल्याला प्रश्न पडणॆ स्वभाविक आहे की जातीविषयीचा अभिमान किंवा गर्व तसेच आपल्या जीवनाशी निगडीत असलेल्या समस्या याचा काय संबंध आहे ? याचा अनिष्ट संबंध आहे.
        संपुर्ण भारतात तथागत बुद्ध, सम्राट अशोक यांच्या काळात जातीव्यवस्था अस्तित्वात नव्हती, तर तथागत बुद्धांनी इथल्या वर्णवर्चस्वादा विरुद्ध संपुर्ण लोकांना जाग्रुत  करून सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्क्रुतीक आदि क्षेत्रात क्रांती केली. याचा अर्थ तत्कालीन वर्ण व्यवस्थेला छेद दिला ही वर्ण व्यवस्था या देशात पसरली होती त्यामध्ये यज्ञयाग,कर्मकांड, पाप-पुण्य, पुनर्जन्म, ब्राह्मणवर्चस्व आदि विषमतावादी गोष्टी होत्या, वर्ण व्यवस्था ही उतरंडीसारखी उभी होती.सर्वात खाली शुद्र, त्यांच्यावर वैश्य, त्यांच्यावर क्षत्रिय़ व सर्वात वरती ब्राह्मण.
            आधुनिक वर्तमान परिस्थिती : वर्तमानात आज आपण आपले महापुरुष व संत यांना जाती-जातीत बंदिस्त करून ठेवलेले आहे.ज्या महापुरुष व संतांनी वर्ण व्यवस्था,जाती व्यवस्था, अस्प्रुश्यता,विषमता, स्त्रीदास्य इ. विषयांवर लोकांचे प्रबोधन केले . त्या सर्वांना इथल्या व्यवस्थेने जाती-जातीत विभाजन करून ठेवलेलं आहे.माझा प्रश्न आहे की, काय महापुरुष व संतांनी केवळ स्वत:च्या जातीपुरतेच प्रबोधन केले ? काय ते स्वत:च्या जातीच्या प्रगतीसाठी आयुष्यभर झटले ? काय त्यांना स्वत:च्याच जातीचा गर्व होता ? या प्रश्नांचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे.यावर चिंतन,मनन होऊन योग्य निष्कर्ष काढला पाहिजे. निष्कर्षावरच योग्य दिशा मिळुन एकत्रितपणे संघटित होण्यासाठी प्रयत्न करता येईल,अहो जात हा बंदिस्त वर्ग आहे.या बंदिस्त वर्गानेच सर्वांना दार उघडे करून देण्यासाठी महापुरुष व संतांनी आपले संपुर्ण आयुष्य खर्ची घातले.सर्वसाधारणपणे आपण दैनंदिन व्यवहारात आमचा समाज, तुमचा समाज असा शब्द प्रयोग करतो.वास्तवीक हा समाज हा भारतीय समाज समजला पाहिजे.
           समस्येचे समाधान करण्यासाठी काय करावे लागेल ? विद्यमान प्रचलित असलेल्या जाती व्यवस्थेची पाळेमुळे जी अतिशय खोलवर रुजली आहेत.यासाठी सर्व प्रथम आपण स्वत:ची ओळख करून घेणे गरजेचे आहे.ओळख ही जातीची नाही तर रक्ताची आहे.केवळ स्वत:च्या जातीचा जर आपण विचार केला तर जाती व्यवस्था नष्ट होण्याऐवजी ती अधिकच घट्ट होईल.म्हणून जातीचे हे मढे स्वत:च्या मन व मस्तिष्कामधुन काढून टाकावे लागेल.यामुळे जातीव्यवस्था.खिळखिळ होऊन आपल्या समोरील अनेक समस्यांना एकत्रीतपणे येवून लढा देण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण होईल.सर्वांच्या समस्या या सारख्याच आहेत.समस्या सारख्याच असतील तर केवळ समस्येवर चर्चा करून रडून दुसर्याला दोष देऊन, त्यावर उपाय काढणे शक्यच नाही.कारण सिद्धांत म्हणतो.की जो समस्या निर्मान करतो तो समस्येचे कधीही समाधान करणार नाही.समस्या जर आपल्याच असतील तर उपाय सुद्धा आपल्यालाच संघटीत होऊन काढावा लागेल.समस्येपासून दुर जाऊन  चालणार नाही तर समस्येला तोंड दिल्यानेच समस्या सुटू शकतात.
           बंधुंनॊ जातीचा गर्व व अभिमान यांचा त्याग केल्यामुळेच आपण भविष्यात एकत्र येवून समता, स्वातंत्र्य बंधुता व न्याय या मानवी मुलभुत तत्वावर आधारीत सम्रुद्ध भारत घडवू शकतो,अशी मला केवळ आशाच नाही तर आत्मविश्वास सुद्धा आहे.

22 September 2012

शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील

            महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी एका शेतकरी घराण्यात २२सप्टेंबर१८८७ मध्ये भाऊरावांचा जन्म झाला. राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांची छाप त्यांच्या जीवनावर पडलेली दिसून येते. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या भाऊरावांनी सत्यशोधक चळवळीत प्रचारक म्हणून काम केले. हे काम करत असतानाच ''बहुजन समाज सुधारायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरूणोपाय नाही'' हे त्यांना कळून चुकले होते. आणि म्ह्णूनच सन १९२४ मध्ये त्यांनी "शाहू बोर्डिंग हाऊस" ची स्थापना केली. गरीब पण हुशार विद्यार्थ्यांना स्वावलंबी शिक्षण देण्याचा त्यांचा उद्देश होता. स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय, आणि स्वातंत्र्य ही त्यांच्या जीवनाची चतु:सूत्री होती. डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले.. ते जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता.
            महाराष्ट्रातील लहान लहान गावात त्यांनी आनेक शाळा काढल्या. सन १९३५ मध्ये त्यांनी "महात्मा फुले ट्रेनिंग कॉलेज" सुरू केले. सन १९४० मध्ये "महाराजा सयाजीराव हायस्कूल" व सन १९४७ मध्ये "छत्रपती शिवाजी रेसिडेन्सियल कॉलेज" त्यांनी सुरू केले. महात्मा गांधींच्या खुनानंतर आपल्या संस्थांमार्फत १०० हायस्कूले उघडण्याची केलेली प्रतिज्ञा त्यांनी केवळ १० वर्षात पूर्ण केली.भाऊरावांनी शिक्षणाची ज्ञानगंगा गरिबांच्या झोपडीपर्यंत नेऊन पोहोचवली. वसतिगृहयुक्त शिक्षणावर त्यांचा अधिक भर होता. श्रममहात्म्य, राष्ट्रीयबंधुत्व, आणि एकतेचा प्रचार त्यांनी केला. व त्याप्रमाणे ते स्वतः  वागले. स्वाभिमान व स्वत्व यांची जोपासना, अन्यायाबद्दल चीड, न्यायाची चाड, आपल्या भूमातेशी इमान, गोरगरीब समाजाविषयी करूणा व आपुलकी, सामाजिक बांधिलकीची जाण या सर्व गुणांचा संगम  भाऊरावांमध्ये होता. 
             भाऊरावांना पुणे विद्यापीठाची 'डि. लिट.' ही पदवी व शासनाचा 'पद्मभूषण 'हा किताब  मिळाला होता. ९ मे १९५९ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. खरच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या या कोल्हापुरच्या जन्मभुमीत आम्ही जन्मले याचा आम्हाला आज खुप अभिमान वाटतॊ.त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन !

21 September 2012

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गटार

               कुविचारी टाळक्याचे भांडार असलेल्या भांडारकर संस्थेमधील वर्णवर्चस्ववादी आणि जेम्स लेन यांनी कट कारस्थान करून लिहिलेल्या "दि हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया" या पुस्तकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल असलेल्या भारतीय न्यायपालिकेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुळका आणित मुक्त केले आहे.वास्तविक पाहता संविधानाच्या (१९/२) या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कलमाचा न्यायालयाने सर्वांगिण विचारच केला नाही.मुख्य म्हणजे या न्यायालयाने या कलमांच्या आधारे न्यायच दिला नाही.खरे तर न्यायालयाने न्याय दिला तो या वर्चस्ववादी नीच अभिव्यक्तीला. आमचे स्फ़ुर्तीस्थान प्राणप्रिय राजे शिवराय आणि माता जिजाऊ यांच्या बदनामी पेक्षा न्यायालयाला अभिव्यक्ती जास्त महत्वाची वाटली.या गोष्टीमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले ते म्हणजे या देशात न्याय नाही आणि तो कधीही नव्हता....
          या सर्व प्रकाराने जेम्स लेनचा खरा मेंदू बाबा पुरंदरे व त्यांचे साथीदार यांना गुद गुल्या होत नसतील  तर नवलच.एकतर स्वत:ला शिवशाहीर व शिवप्रेमी म्हणविणार्या या पुरंदरेने आपल्या हयातीत सारे शिवचरित्रच विक्रुत करून त्यांच्या जातभाईंना सोईस्कर असे शिवचरित्र अडाणी व भोळ्या समाज मनावर बिंबविण्याचे काम केले आहे.शिवरायांच्या नावावर कोट्यावदी रुपयांचा मलिदा लाटून जेम्स लेनच्या माध्यमातून शेवटी हा शिवद्रोही शाहीर जेवेलेल्या ताटातच थुकला आहे. 
          या भारतात सर्व प्रसारमाध्यमे, न्यायव्यवस्था व राजकीय व्यवस्था आपल्या मेंदुच्या इशार्यावर नाचणार्या या ब्राह्मणी निधाडांची बहुजनां प्रति असलेली  व्रुत्ती तसूभरही बदललेली नाही हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
राजकीय पोळी भाजणारे यांचेच हात
           जेम्स लेन प्रकरणातून महाराष्ट्रातील तमाम परिवर्तनवादी विचार संघटनांनी केलेल्या संघर्षामुळेच महाराष्ट्रात एक जाग्रुतीची लाट निर्माण झाली आहे.या नीच अभिव्यक्ती संपन्न विद्वानांच्या पेकाटात लाथा घालण्याची कामना जनसमुदायातून उद्रेकाच्या रुपात बाहेर येत येवू लागले आहे.हा विषय राजकारणाच्या पलीकडे तमाम बहुजनांच्या अस्मितेचा असला तरी या शिवद्रोह्यांचेच राजकीय हात आपली पोळी शेकून घेण्यासाठी पुढे सरसावत आहेत.शिवसेना, मनसे यासारखे पक्ष शिवरायांच्या प्रेमाचा फ़ुसका पुळका आणत जेम्स लेन ला नाईलाजाने निषेद करत आहेत.पण या शिवद्रोही लोकांना रस्त्यावर खेचा असे म्हणताना यांच्या थोबाडातील जीभ मात्र खुपच अडखळते आहे.
         मध्यंतरीच्या काळात मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्या दणक्याने भांबावलेल्या बाबा पुरंदरेची बाजू घेताना राज ठाकरे पुरंदरेंच्या केसाला धक्का लावणार्याचे हात छाटू अशी भाषा करीत होता जसे काय ? बापानेच याच्यासाठी ठेव म्हणुन महाराष्ट्राला परिवर्तनवादी मराठयांना आणि संभाजी ब्रिगेड ला खुले आम दम देत होता.आमच्या शिवरायांवरती व आमच्या आई जिजाऊ यांच्या इज्जतीला धुळीस मिळविणार्या या पुरंदरे विषयी याला प्रेमाच्या उकळ्या फ़ुटतात, त्याच्या संरक्षणाची काळजी वाटते. वारे ! शिवप्रेमी !
ह्यांच्या कुर्हाडीला आमचेच दांडे
                 शिवरायांच्या आणि जिजाऊंच्या इज्जतीला हात घालणार्यांना हे तळ जाताच्या फ़ोडा सारखे जपतात.वर वर मात्र शिवरायांचे नाव घ्यायचे.आतून बदनामीला साथ द्यायची आणि शिवप्रेमाचा पुळका आणित आपली राजकीय दुकानदारी वाढवायची पैसा लाटायचा आणि वेळ आली की, आमच्यावरच कुर्हाडी चालवायच्या.वाईट एवढेच की या कुर्हाडीला आमचेच दांडे असतात.झेंडे तुमचे काठ्या व काठ्या पकडणारे हात आमचेच.शिवरायांचे पोस्टर लावून शिवप्रेमाची हाक दिली की ,आमचे मराठे बांधव निघालेच आपल्याच पैशाने काठ्या घेऊन राडा करायला.यांनी राडे करून आपल्या माड्या भरायच्या या जमलेल्या पैश्याच्या ताकतीवर उन्मादावर आमच्याच बाप जाद्यांच्या आया बहिनींच्या इज्जतीचे धिंडवडे काढणार्या बाबा पुरंदरे , बहुलकर, बेडेकर यांच्या संरक्षणाची भाषा करायचीच नव्हे तर ते त्यांना पुरवायचे ही.शिवरायांच्या महाराष्ट्रातून शिवरायांच्या नावावर पैसा गोळा करायचा आणि शिवरायांची बदनामी करणार्या डुकरांना तुप पोळ्या खाऊ घालून माजवायचे.कुणाला काय का वाटेना पण गेल्या घंट्या मारी.बाबा पुरंदरे याला ठाकरे परिवाराने असेच माजवून ठेवले आणि आमच्या सांस्क्रुतीक इतिहासाच्या बोकांडी बसवले.आमच्या आदर्श शिवचरित्राला हा बाबा पुरंदरे इतका उतला आहे की त्याचे कुठल्या शब्दात वर्णन करू हे मलाच समजत नाही. सर्वोत्तम घाण उपमा सुद्धा याला कमी पडते इतका नीच माणुस आहे.स्वत:ला खुले आम शिवशाहिर म्हणवुन घेतो.अरे शिवरायांचा आमच्या डोळ्यादेखत बाप बदलणारा हा विषारी साप हार,तुरे स्विकारतो.आमचेच काही मेंदू हीन राजकारणी याचे पाय धरत असतात.ह्या सारखी या महाराष्ट्रची शरमेची आणि अक्कल गहान ठेवलेली दुसरी गोष्ट नसावी.पुण्यातील (खोट्या शिवमहालात) खरा शिवमहाल शनिवार वाड्याच्या जागी होता.या ठिकाणी माता जिजाऊ व शिवराय यांच्या सोबत नोकर दादू कोंडदेव चा पुतळा उभा करण्यामागे बाबा पुरंदरे ह्या पेशवाई किड्याचीच पुण्याई होती.खरे तर ही न्यायालयाच्या भाषेत पुरंदरेची अभिव्यक्ती आहे.बाबा पुरंदरे,निनाद बेडेकर व तमाम ब्राह्मणांनी मिळुन दादु कोंडदेव, शिवराय व जिजामाता यांचे एकत्रीत नीच ब्राह्मणी अभिव्यक्ती संपन्न शिल्प उभारले आहे.पुणे महानगरपालिका सुद्धा यांच्या पापात बेअकलीमुळे सामील झाली.
 बाबा पुरंदरे ला ही अभिव्यक्ती का सुचत नाही !
                  बाबा पुरंदरेसह , निनाद बेडेकर सारख्या ब्रह्मव्रुंदांना माझा प्रश्न आहे.तुम्हाला एखाद्या गुरुजीने शाळेत शिकवले असेलच ना ! मग तुमचा एखादा आवडता गुरुजी उदा.बाबा पुरंदरे, त्याची आई आणि तिचा नवरा दिसेल असा तो गुरुजी अशी याची एकत्रित फ़्रेम करून का लावत नाही ? अशी फ़्रेम मी स्वखर्चाने बाबा पुरंदरे व बेडेकर यांना घरात लावण्यासाठी  व जेम्स लेन ला दिसण्यासाठी देण्यास तयार आहे.इतक्या खालच्या स्तरावर जाऊन बोलण्याची ही वेळ आमच्या सारख्या शिवभक्तांवर यावी याचा आम्हाला मानसिक त्रास होतोय.पण नालायकांनो तुम्हाला त्याचा काही फ़रक पडत नाही हे नक्की ! याच बदमाशगिरिचा बादशहा असलेल्या बाबा पुरंदरेला संरक्षणाची हमी व संरक्षण देनार्या राज ठाकरेसह इतर ठाकरे कुटुंबीयांच्या शिवप्रेमाची तपासनीही आता महाराष्ट्राने करायला हवी.
आमची अभिव्यक्ती इंद्रायणीत फ़ेकता ? 
               जगाचे कल्याण आणि मानवतेच्या करूणेचा उद्गार ! तसेच जगातील सर्वोच्च तत्वज्ञानाचा अंतर्भाव असलेली आमच्या तुकोबांची गाथा इंद्रायणीत फ़ेकता.त्यांना कोर्टात खेचता.त्यांच्या वर खोटा धर्म द्रोहाचा आरोप लावून त्यांना ना ना प्रकारे छळता.राष्ट्रपिता जोतिराव फ़ुलेंनी, माता सावित्रीबाईंनी आम्हासाठी शिक्षण हे अभिव्यक्तिचे महाद्वार आमच्यासाठी खुले करू नये म्हणुन त्यांना मारेकरी घातला त्यांच्या अंगावर शेण टाकता ? शिवरायांचे चरित्र समजू नये म्हणुन कागदपत्रे जाळून टाकता ? शिवरायांची पहिली शिवजयंती साजरी करणार्या महात्मा फ़ुलेंचे संदर्भ दडवून ठेवता ? डॉ.बाबासाहेबांचे सहित्य प्रकाशित होऊ नये म्हणुन जिवाचा आटा पिटा करता.आम्ही बोललो तर जिभा छाटणारी,लिहिले तर हात तोडणारी, वाचले तर डोळे काढणारी , ऐकले तर कानात शिसे ओतणारी तुमची औलाद.जेम्स लेन व त्या १४ शिवद्रोह्यांच्या अभिव्यक्तीचा न्याय करीत आहेत.बामणांच्या चारित्राच्या इतिहासात अभिव्यक्ती गटारं तुडुंब भरली आहेत त्याची दुर्गंधी इतकी सुटली आहे की त्याची सीमा नाही.त्यांच्या या गटारघाणीयुक्त अभिव्यक्तीची घाण संस्क्रुतीच्या व धर्माच्या नावाने आता आपण किती दिवस घरात पुजायची हे सार्या मराठ्यांनी एकदाचे ठरविण्याची निर्णायक वेळ आली आहे.नाहीतर या घाणेरड्या अभिव्यक्तीची घाण घेऊन वाहणारी ह्या भटीविचाराची गटारं शिवचरित्रातच नव्हे तर आमच्या रोजच्या निर्मळ जिवनात सुद्धा वाहतच राहतील आणि परत अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली ही वर्णवर्चस्ववादी डुकरं त्यात खेळायला  मोकळी आहेतच.

16 September 2012

जेम्स लेन ब्राह्मणी षडयंत्र,राजकीय पक्ष आणि शिवप्रेमींची जबाबदारी

           कुविचारी टाळक्याचे भांडार असलेल्या भांडारकर संस्थेमधील ब्रह्मव्रुदांनी जेम्स लेन द्वारे छत्रपती शिवाजीराजे आणि राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांची बदनामी करून खर्या शिवप्रेमींच्या अंत:करणावर मोठा घाव घातला आहे. त्यामुळेच पुण्यातील शिवसैनिकांनी डिसेंबर २००३ ला जेम्स लेनचा सहलेखक श्रीकांत बहुलकर याला काळे फ़ासले तेंव्हा तत्कालीन शिवसेना नेते आणि आजचे मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रीकांत बहुलकरांची माफ़ी मागितली आणि शिवरायांची बदनामी  करणार्यांना संरक्षण दिले.आनंद देशपांडे याने शिवसेनेचे मुखपत्र दै.सामना मध्ये ७ सप्टेंबर २००३ रोजी जेम्स लेन च्या पुस्तकाचे कौतुक करणारे परिक्षण लिहिले.ब.मो.पुरंदरे याने सोलापुरच्या जनता बॅंक व्यख्यानमालेत लेनचे दि.१सप्टेंबर २०३३ रोजी कौतूक केले.शिवरायांच्या बदनामी कटाचे केंद्र भांडारकर संस्थेवर संभाजी ब्रिगेडने ५ जानेवारी २००४ कारवाई केली, तेंव्हा मीडियाने संभाजी ब्रिगेड वर आगपाखड  केली.तेंव्हा दै.देशोन्नती, दै.पुण्यनगरी, दै.पुढारी, दै.सम्राट यासारख्या वर्तमानपत्रांनी खरी बाजू जनतेसमोर ठेवली.ग्रुहमंत्री आर.आर.पाटलांनी त्याच दिवशी भांडारकर संस्थेला भेट देऊन हल्ला करणार्यांचा निषेद केला.पण शिवरायांची बदनामी करणारी भांडारकरी व्रुती ना. पाटील यांना समजताच त्यांनी आपली भुमिका बदलली आणि दि.१४ जानेवारी २००४ रोजी पुस्तकावर बंदी घातली , तेंव्हा दि.१६ जानेवारी तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी पुस्तकावर बंदी घालणे चुकिचे आहे असे मुंबई येथील जाहीत कार्यक्रमात सांगितले आणि त्याच वेळी बाळ ठाकरे उपस्थित होते, ते शांतच बसले. २२ जानेवारी रोजी दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पंढरपुर येथे अटलबिहारी वाजपेयींना काळे झेंडॆ दाखवून त्यांचा निषेद केला.तत्कालीन केंद्रीय ग्रुहमंत्री लालक्रुष्ण अडवानी यांनी सोलापुर येथे दि.१६ मार्च रोजी लेनच्या पुस्तकावर बंदी घालण्यास विरोध केला. तेंव्हा १७ मार्च रोजी उमरगा येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवानीचा रथ अडविला व निषेद केला.तर संभाजी ब्रिगेडने २० मार्च रोजी बीड येथे वाजपेयीची जाहीर सभा उधळली. 
            जेम्स लेन ला बेड्या ठोकुन फ़रफ़टत भारतात आणतो असे ओरडणार्या ना.आर.आर.पाटील यांनी लेनच्या पुण्यातील सुत्रधारांना साधी अटक देखील केली नाही.याउलट चौदा ब्राह्मणांना आणि पुरंदरे,बेडेकरांना ना.आर.आर.पाटील यांनी संरक्षण दिले.तर संभाजी ब्रिगेड च्या ७२ कार्यकर्त्यांवर कारवाई केली.सन २००४ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकात ना.आर.आर.पाटील यांनी शिवरायांच्या बदनामीचे भांडवल करून सत्ता काबीज केली.पण न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी जी  शिस्त राखायला पाहिजे होती ती राखली नाही .फ़ुले-शाहू-आंबेडरांचे नाव घेणार्या महाराष्ट्र शासनाने वकील आशुतोष कुंभकोणी या वकिलाला सरकारची बाजू मांडण्यासाठी नेमले आणि त्यामुळे मुंबई हायकोर्टात पुस्तकावरील बंदी उठविली.रयतेला न्याय देणार्या शिवरायांना त्यांच्या महाराष्ट्रातच न्याय मिळाला नाही.याला कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या सरकारचा नालायकपणा जबाबदार आहे.महाराष्ट्रातील जनतेने कॉंग्रेस - राष्ट्रवादीला लायक म्हणुन निवडले नाही तर भाजप - शिवसेनेपेक्षा कमी नालायक म्हणुन निवडले पण हे तर त्यांच्या पेक्षा नालायक निघाले.
         महाराष्ट्र सरकार सुप्रिम कोर्टात गेले.वकील रविंद्र अडसुरे यांचेकडे सदर केस होती .पण बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात्यातील जो सुप्रिम कोर्टात प्रॅक्टीस करण्यासाठीची परिक्षा अनुतिर्ण झाला आहे. अशा वकील संदीप खरडे या वकीलाला कॉंग्रेस - राष्ट्रवादी सरकारने नेमले आणि खरडे यांच्या आणि कॉंग्रेस - राष्ट्रवादी सरकारच्या नालायकपणामुळे पुस्तकावरील बंदी उठली.एरवी सर्वच पक्षाच्या नेत्यांचे वैयक्तिक प्रकरण असेल तर त्या केस मध्ये लक्ष घालणार्या नेत्यांनी शिवाजीराजांच्या प्रकरणी गांभिर्याने लक्ष घातले नाही.त्यामुळे न्यायाधिशांनी पुस्तकावरील बंदी ९ जुलै २०१० रोजी उठवली खरे तर हा निकाल संविधानाला धरून दिला नाही, अभिव्यक्ती विचाराला आहे.घटनेतील कलम १९ नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नैतिकता, सुसंस्क्रुतपणा, जबाबदार पणा, सामाजिक स्वास्थ , राखणारे लेखन असावे असे निर्बंध घातलेले आहेत.लेनचे पुस्तक हे ब्राह्मणांच्या डोक्यातील विक्रुती आहे.न्यायाधिशांनी संविधानाचा अपमान केला आहे.सारांश महाराष्ट्रातील कॉंग्रेस - राष्ट्रवादी - शिवसेना - भाजप, मनसे हे सर्वच राजकीय पक्ष केवळ शिवरायांचे नावच घेतात पण व्रुत्ती तशी नाही.त्यामुळे यांच्या कडून चांगल्या कामाची अपेक्षा करणं म्हणजे हिजड्याकडून पुत्रप्राप्तीची अपेक्षा केल्यासारखे आहे.ना.आर.आर. पाटलांनी तर शिवरायांशी गद्दारी केली आहे.शिवप्रेमी त्यांना कदापी माफ़ करणार नाहीत.ना. पाटील म्हणजे शरद पवारांचा सोंगाड्या आहेत.
             शिवप्रेमींनो काळ कठीण आहे.खचून जाऊ नका, निराश होऊ नका, शिवाजी महाराजांशी गद्दारी करणार्याचा आतापर्यंत सत्यानाश झाला आहे आणि होईल.पुस्तकाचे व शिवरायांचे अपमानाचे समर्थन करणारे जेम्स लेनचे औलाद आहेत.शिवरायांसाठी सर्वस्व पणाला लावा.शिवाजी महाराज आमच्यासाठी आग्राच्या तुरुंगात ५ महिने राहिले आणि स्वराज्यासाठी रक्त सांडले त्यांचे उपकार तर फ़ेडायला तर सात जन्म पण अपुरे आहेत. मग तुम्ही काय करणार शिवरायांसाठी ? जेम्स लेन आला आणि बदनामी करून गेला असे सहजासहजी घडलेले नाही.पुरंदरे - बेडेकर या जेम्स च्या औलादिंनी कथा, कादंबर्या, नाटके, पाठ्यपुस्तके , शिल्प याद्वारे दादू कोंडदेव , रामदास यांना शिवराय व जिजाऊ यांच्या सोबत दाखवुन त्याला समांतर  जोक तयार केला व तो जोक लेनद्वारे  ब्राह्मणांनि लिहुन आणला.दादू कोंडदेव आणि रामदास हे शिवरायांचे गुरु नव्हते हे ऐतिहासिक रित्या सिद्ध झालेले आहे.तेंव्हा शिवप्रेमींनो खर्या शिवचरित्राचा अभ्यास करा आणि विक्रुत आणि भटी महाभागांचे तोंड कायमचे बंद करा हेच शिवरायांना अभिवादन !

14 September 2012

जेम्स लेन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य

         "दि शिवाजी किंग इन इस्लामिक इंडिया" या जेम्स लेन लिखित वादग्रस्त पुस्तकामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला. भारताच्या सर्वाच्च न्यायालयाने या पुस्तकावरील बंदी उठवून जेम्स च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण केली.
          हे पाहुन भारतातील तमाम सनातनी ब्रह्मव्रुंदांना आनंदाच्या उकळ्या फ़ुटल्या  नसतील तरच नवल वस्तुत: ही जेम्स लेन च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण आहे.ही अन्यायी न्याय व्यवस्था अजुनही आमच्याच ताब्यात आहे हे ब्राह्मणांनी दाखवून दिले. जेम्स लेन  खरे तर नावाला आहे या जेम्स लेनच्या माध्यमातून पुण्यातील ब्राह्मणांनी शिवरायांवर तसेच जिजाऊंवर घावा घातला होता.
         तसे पाहिले शिवरायांचे कर्त्रुत्व व जाती अंताचा त्यांनी लढा हा पहिल्या पासूनच ब्राह्मणांच्या पोटात डचडचत होता.शिवरायांच्या लोकउद्धारक संकल्पना आणि विचार आज ना उद्या आमच्या जात भाईंच्या गोरख धंद्यासाठी मारक ठरणार आहेत हे ब्राह्मणांनी चांगले ओळखले होते.हि चाणाक्ष जात शिवरायांच्या हयातीतच जागी झाली होती.शिवरायांचे गुरु जगदगुरु संत तुकोबाराय आणि शिवराय हे ब्राह्मणांना त्यांच्या रस्त्यात काट्यासारखे सलत होते.म्हणुनच त्यांनी शिवरायांना त्रास दिला आणि संत तुकारामांना वैकुंठाला (?)पाठविले.पण या अज्ञानी व भोळ्या माणसांच्या या गोष्टी लक्षात येत नाही.जेम्स लेन ही एक अशीच यांची चाल होती.
        तसे पाहिले तर शिवशाही मातीत घालून पेशवाई निर्माण करणार्यांना  शिवशाहीचे काही देणे घेणे नाही ,शिवरायांचा आणि जिजाऊंचा अपमान झाला तरी चालेल पण आमची अभिव्यक्ती जपली पाहिजे . न्यायपालिका सुद्धा आमचे काही वाकडे करू शकत नाही हे यातून या सर्व मंडळींना दाखवून द्यायचे आहे.
 राष्ट्रपुरुष यांची बदनामी मनुवाद्यांचे हुकमी अस्त्र
            अजुन एक सर्वात महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे परिवर्तनवादी राष्ट्रपुरुष नव्हे तर परिवर्तनवादी छोटे छोटे कार्यकर्ते यांची बदनामी करणे हे ब्राह्मणी हुकमी अस्त्र आहे आणि शस्त्र आहे.राष्ट्रपुरुषांची बदनामी करून समाजात गोंधळ आणि अनादराची स्थिती निर्माण करावयाची वस्तत: स्वत: अतिशय चारित्र्यहिन, नालायक आणि बदमाश असलेले हे आमच्या राष्ट्रपुरुषांची बदनामी करून पतीव्रतेचा आव आणत असतात.बुद्ध, शाहू,फ़ुले, तुकोबाराय सुद्धा यांच्या तावडीतून सुटले नाहीत.मध्यंतरी शाहूराजांविषयी ही जमात असेच घाणेरडे विनोद समाजात पसरवत होती, हाच प्रयत्न जेम्स लेनच्या माध्यमातून यांनी शिवरायांसाठी केला.
          खरे तर करून सवरून नामानिराळे राहण्याची यांची कला कोणालाही जमणार नाही  जेम्स लेन च्या माध्यमातून मात्र या ब्राह्मणांची नालायकी अक्षरबद्ध झाली आहे .तरीही वाईट याचे वाटते की आजही आपला समाज यांना शिवशाहीर, इतिहास संशोधक म्हणून पुजत असतो.भांडारकरवर संभाजी ब्रिगेडने हल्ला केल्यावर त्या संस्थेचे नुकसान होण्याऐवजी फ़ायदाच झाला.जिजाऊंचा अपमान केल्याबद्दल त्यांचे चरित्र्य हनन केल्याबद्दल कोट्यावधी रुपये त्या संस्थेला मिळाले.ज्या जिजाऊंच्या निर्भय त्यागातून हे पुणे शहर उभे राहिले तिथेच जिजाऊंची बदनामी करणारी भांडारकर संस्था आमच्या छाताडावर पाय रोवून उभी आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेबांना अभिप्रेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य
          खरे तर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो  वर्षे ज्यांना याच ब्राह्मणांनी बोलु दिले नाही, लिहु दिले नाही , त्या व्यवस्थेविरुद्ध लढा उभारून अत्यंत उच्चप्रतिच्या प्रतिभेवर बहुजनांसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व त्या अधिकारांचे निर्मान बाबासाहेबांनी  बहुजनांसाठी केले.नाहीतर अभिव्यक्ती ही ब्राह्मणांचीच मिजासदारी होती.आता हे हुशार आणि चाणाक्ष ब्राह्मण याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा डंगोरा पिटत आमच्या अस्मितेला व गौरवशाली इतिहासाला दडपू पाहत आहेत.
         सर्वाच्च न्यायालयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनात्मक चौकटीत राहून निर्णय दिला असला तरी बहुजन समाजाच्या सर्वांगिण द्रुष्टीकोणाचा विचार केलेला दिसत नाही. याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फ़ायदा  घेत स्वत:ला तुकोबांचा वारकरी म्हणवून घेणार्या दिलीप पुरुषोत्तम चित्रे नावाच्या नालायक ब्राह्मणाची तुकोबांना "भ्योंचोद" म्हणण्यापर्यंत मजल गेली होती.दिलीप पुरुषोत्तम चित्रे आपल्या आत्मकथनात म्हणतो "तुकाराम वाण्या भ्योंचोद तु मला मराठीच्या दलदलीत खेचलेस".संदर्भासाठी (आ.ह.साळुंखे, वाद आणि वादांची वादळे).
              असले अभिव्यक्ती स्वतंत्र्य काय चाटायचे आहे आज रोजी जेम्स लेनच्या खांद्यावर बंदुन ठेवून ब्राह्मण आपला निशाणा साधत आहे.या जेम्स लेन प्रकरणातून ब्राह्मणांना एकाच दगडात १०-१२पक्षी आहेत.मुख्य म्हणजे त्यांना मराठ्यांच्या मनगटातील आणि मेंदूतील ताकद मोजायची आहे त्या करीता सर्व मराठा बांधवांनी अतिशय सावध पवित्रा घ्यायला हवा.एकुण सर्व परिवर्तनवादी विचार संघटनांनी मिळुन एक वैचारीक धोबी पछाड यांना देण्याची गरज आहे आणि शेवटी लाथोंके भुत बातोंसे नही मानते हे सार्या समाजाने समजुन घेतले पाहिजे.
          आजवर संस्क्रुतीच्या, धर्माच्या नावाने उडणारे हे कावळे अभिव्यक्तीच्या जिवावर माजणार असतील तर काय चुलीत घालायची आहे ही अभिव्यक्ती ? 

हिंदू - जगण्याची सम्रुद्ध अडगळ

              मराठी साहित्य प्रकाशना दिवशीच रेकॉर्डब्रेक करणारी भालचंद्र नेमाडे यांची "हिंदू - जगण्याची सम्रुद्ध अडगळ" हि प्रदिर्घ प्रतिक्षा असणारी कादंबरी प्रकाशीत झाली तेंव्हा साहित्य विश्वात एकच खळबळ उडाली. कादंबरीवरती अनेक अंगाने चर्चा सुरु झाली.कादंबरीवरती अनेक अंगाने लिहिता येईल, नेमाडेंचा देशी वाद, ब्राह्मणी जोखडातून नेमाडेंनी अस्सल कष्टकर्यांची सुटका केलेली आहे."हिंदू" मध्ये कारुण्य आहे,रंजकता आहे, ग्रामीण जीवणाचे यथार्थ दर्शन आहे, विनोद आहे.गावगाड्यातील समाजजीवनाचे जिवंत असे चित्रण  केले आहे.पारावरच्या, पाराखालच्या, शेतातील. आडोशाचे,खाजगीतील बोली भाषा आहे त्यामुळे कदंबरी अधिकच अक्रुतीम झाली आहे.हिंदू वरती अनेक अंगाने लिहिता येईल भाषाशास्त्राचे, मराठी भाषेचे तज्ञ ते काम करतीलच पण इथे नेमाडेंनी ब्राह्मणी छावणीला दिलेला धक्का याबाबत विवेचन करणार आहे.वैदिक उर्फ़ ब्राह्मणी परंपरेने भारतात विषमता , अंधश्रद्धा, स्त्रीबंधन लादली याविरुद्ध अनेक महापुरुषांनी काम केले, महिलांवर तर ब्राह्मणी परंपरेने अनेक अमानुष नियम लादले.
            ब्राह्मणांची कटकारस्थानं उघड करताना नेमाडे लिहितात "साले हे ब्राह्मण लोकच  गावोगावी अशी जातीभेदाची लफ़डी सुरु करतात....कशावरून  ? .. एवढा मोठा जातिभेद मोडणारा आपला वारकरी पंथ ह्या ब्राह्मणांनी नासवला.पुन्हा ब्राह्मणी धर्मच वारकरी पंथावाटे लादला हो आपल्यावर पेशवाईपासून स्वराज्य तर बुडवलंच, आता चालले एकेक इंग्रजी शिकून नोकर्या धरायला शहराइत, शहरी होत चालले ब्राह्मण ..(प्रुष्ठ क्र.१५७)" जातीभेदाची निर्मिती ब्राह्मणांनीच केली असे नेमाडे सांगतात.तसेच वारकरी पंथ हा जातिभेद मोडणारा होता.पण अलीकडे वारकरी पंथातच जातीभेद पाळला जातो.जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या आरतीला विरोध करणारी प्रव्रुत्ती ब्राह्मणांचीच, वारकरी पंथ हा अंधश्र्द्धा विरोधी आहे पण अलीकडे वारकरी पंथातील लोक अंधश्रद्धाळू,देवभाळे,विषमतावादी झाले आहेत, कारण ब्राह्मण त्यामध्ये घुसले आणि वारकरी पंथ नासवला. वारकरी पंथ हा ब्राह्मण विरोधी पण ब्राह्मणी धर्मच वारकरी पंथाद्वारे लादला आणि हे काम ब्राह्मणांनी पेशवाईच्या काळात केले.छत्रपती शिवरायांनी निर्मान केलेले रयतेचे स्वराज्य ब्राह्मणांनी बुडविले मराठी अस्मितेच्या गप्पा मारणार्या ब्राह्मणांनीच इंग्रजी शिकून शहरे गाठली , हेही नेमाडे यांनी निसंदिग्धपणे लिहिले आहे.भारतातील बौद्ध धर्म का संपला आणि ब्राह्मणांचा हिंदू धर्म खेड्यापाड्यात का गेला ते सांगताना नेमाडे लिहितात "खेडोपाडी कानाकोपर्यात मिलिटरीसारखे ब्राह्मण जाऊन राहिवल्यानं हिंदूधर्म  खेडोपाडी रुजला.बौद्धधर्म शहरीच होता , शहरीच राहिला त्यामुळे संपला" (प्रुष्ठ क्र. १५८,५८७)
          शेतकर्यांची मुलं शिकून डॉक्टर,वकील,इंजिनीअर, प्राध्यापक , कलेक्टर झाली पण परोपकार, प्रेम, समता,विज्ञानवाद विसरत चालली.या बाबत नेमाडे लिहितात "वारकरी हिंदू  धर्माचा नैतिक पाया किती भुसभुशीत झाला आहे.याचा पुरावा म्हणजे ही तळागाळातील गरीब शेतकर्यांची मुलं.शिकून वर गेली आणि शेतकर्यांचा फ़ाळ गोतास काळ बी निसूक निघाल हो हंगाम निष्टुक वाया गेला हो !"(प्रुष्ठ क्र.३०२) ब्राह्मणी धर्म वारकरी पंथात घुसल्यानेच तो नासला आणि पर्यायाने त्यांचे अनुयायी देखील नासले.ब्राह्मण जिथं घुसतो ते नासवुनच टाकतो, असेच नेमाडेंनी सुचित केलेले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काय चालते ? बहुजन मुलांच्या मनावर मुस्लिमद्वेष आणि ब्राह्मणी श्रेष्ठ्त्व कसे बिंबवले जाते याबाबतचे अत्यंत धक्कादायक वर्णन नेमाडे यांनी  प्रुष्ठ क्र.३१८ ते ३२४ वर केलेले आहे.यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही विक्रुतांची टोळधार आहे हे स्पष्टपणे लक्षात येते.
            महात्मा गांधी यांची हत्या ब्राह्मणांने केली असताना देखिल ती मुसलमानानेच केलेली असावी असा संशय होता.पण ती ब्राह्मणाने केली आणि त्यानंतर काय झाले याचे सविस्तर वर्णन नेमाडे यांनी प्रुष्ठ क्र.३२४ ते प्रुष्ठ ३२७ वर केलेले आहे.त्यातील काही भाग पुढील प्रमाने ".. हे असं (गांधी हत्येचं) राक्षसी क्रुत्य फ़क्त ब्राह्मणच  ह्या देशात करु शकतो. ते खरच ठरलं.रात्री दिल्लीहुन इकडे तिकडे केलेल्या ट्रंक फ़ोनवरून खुनी माणूस गोडसे होता, अशा बातम्या मोरगावांत ("हिंदू " कादंबरीचा नायक खंडेराव पाटलांचे गांव) आल्या आणि सकाळी तर ठेंगू जोशीबुवांना दिल्लीहुन मुलाची तारच आली.-- काळजी घ्या ----राजाभाऊ अग्निहोत्री यांनी रात्री ब्राह्मणवाड्यात साखर वाटली. अशी कुजबुज होती." ब्राह्मण आळीत एकाने बायकोला हर्षभरात , अहो, पुरणपोळ्या करा , असंच काहीतरी ओरडून सांगितल्याचही काहिंना ऐकल्याचं स्पष्ट आठवत होतं " ( प्रुष्ठ क्र.३२५) सावरकर देशभक्त वगैरे नसून मुसलमानांचा द्वेष करणारा आणि देशाची फ़ाळणी करणारा असा द्वेषी माणुस होता असे नेमाडे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. "याचं(सावरकराचं) देश कार्य म्हणजे द्वेषकार्य" आपल्या देशात खालच्या जातीच्या लोकांना वैदिक,ब्राह्मणी धर्माने फ़ार छळले त्यामुळेच मुसलमान धर्म लोकांनी जवळ केला, याबाबत उद्वेगाने नेमाडे लिहितात " आपला हिंदूधर्म खालच्यांसाठी काय शेटं करतो ? " (प्रुष्ठ क्र.३२९) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गुप्त अजेंडा काय होता, याबाबत निळुभाऊच्या डायरीतील नोंदिवरून नेमाडे यांनी पुढील विवेचन केले आहे पहिल्याच पानावर.
      " स्वत:च्या रक्तानं रंगवलेला भगवा झेंडा. नंतर एका पानावर एका खाली एक लिहिलं होतं
१७५७
१८५७
१९५७
          काय याचा अर्थ ? याचा अर्थ तुमच्या सारख्यांना सांगुन काय उपयोग ? १७५७ पलाशीची लढाई, १८५७ तात्यांचं बंड, आणि आता १०० वर्षांनी - रक्तरंजित  आसे तु हिमाचल, अखंड हिंदूस्तान, एकुण एक इंग्रज कापून काढला जाणार होता.राजधानी पुणे ठरली होती.राष्ट्रध्वज भगवा, राष्ट्रगीत - नमस्ते सदावत्सले - स्वतंत्रते भगवते एकत्रित घटना वगैरेचा व्यय आणि घोळ कशाला ? मनुस्म्रुती आहेच."(प्रुष्ठ क्र.३३०)मनुस्म्रुतीने बहुजनांच्या हजार पिढ्यांना नरक यातना दिल्या.त्या मनुस्म्रुतीचे राज्य ब्राह्मणांना अपेक्षीत होतं. हे नेमाडेंनी मांडले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करणार्या बहुजन समाजातील तरुनांचा ब्राह्मण वापरून कसा चोथा करतात हे नेमाडेंनी रेखाटलेल्या "निळुकाकाच्या " पात्रावरून लक्षात येतं.ब्राह्मण पत्रकार ,संपादक बहुजनांच्या ग्रामिण भागातील बातम्या वस्तुस्थितीला धरून देत नाहीत.याबाबत ग्रामीण भागातील शेतकर्यांची संपादकाबाबतची प्रतिक्रिया नेमाडे यांनी पुढीलप्रमाणे नोंदवलेली आहे."खरंच आहे हो, तो मायझवाड्या संपादक श्रमाची काय प्रथिष्ठा मानतो ? " (प्रुष्ठ क्र.४०८)
       आजच्या वारकरी पंथात जातीभेद आहे.नुसते देवळात नाचुन अध्यात्मिक सुख मिळवण्याच्या बाता मारतात.मुसलमान तर सोडाच पण महारमांगाना देखील यांनी सामावून घेतले आहे, मुसलमान द्वेष शिकवणार्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांना नेमाडे सवाल विचारतात."एकादशीला मिरची,रताळ,पेरू,पपया, शेंगदाणे,खजुर, बटाटा, साबूदाणा असले म्लेंच्छ यावणी पदार्थ कसे काय चालतात ? हे तर अलीकडे बोटींनी समुद्रावरून आयात केलेले पदार्थ."(प्रुष्ठ क्र.४४१) रामदास हा शिवरायांचा गुरु नसताना , तो तसा ब्राह्मणांनी रेखाटला याउलट तो एका मुलीचे जीवण उद्ध्वस्त करून लग्न मंडपातून पळाला, याबाबत खंडेरावांचे मित्र मछिंदर , वाणखेडे , अनंतराव यांचा संवाद नेमाडे पुढील प्रमाणे रेखाटलेला आहे."(मछिंदर अनंतरावला म्हणतो ) रामदास स्वामींच्या  मंडपात राहुन गेलेल्या बायकोच्या दु:खावर फ़ार सुंदर कविता होईल नाही ? वानखेडे म्हणाला , सुंदर ?  तिकडे कोवळी पोरगी का बोडकी ठवली जन्मभर का मारली - आणि तुला सुंदर कविता लिहायचीय ?  त्यापेक्षा ती उद्ध्वस्त बाई हातात वहान घेऊन याला(रामदासाला) शोधत शिवरथकडे चाललीय अशी कविता - पेक्षा श्लोकच का नाही लिहित- 
         जनाचे श्लोक मनाची नको लाज ठेवू तू जरी ।
     जनाची तरी ठेवी पळपुट्या नागड्या तू ॥
इथे मराठी कवींना तर रामदासाच्या ह्या बिचारीचं नाव सुद्धा माहीत नाही नै.॥" (प्रुष्ठ क्र.४५०)
          ब्राह्मण पत्रकार हा अक्षरज्ञान, धुर्तपणा, कावेबाजपणा याच्या बळावर काय-काय उचापती करतो हे अनंतराव या पत्राद्वारे नेमाडेंनी अत्यंत रसभरीत वर्णन केलेले आहे, आणि हाच अनंतराव काय करायचा हे नेमाडे लिहितात. "मराठे आणि महारांमध्ये कलागती लावून त्याबद्दल कलात्मक भाषेत लिहिणं - ह्या जबाबदार्या एकटा अनंतराव जबाबदारीनं सांभाळायचा" (प्रुष्ठ क्र.४५०) मराठावाडा नामांतराचा लढा पुरोगामी ब्राह्मणांनी कसा लावून दिला, पुणे , मुंबई विद्यापिठाच्या नामांतराबद्दल न बोलणार्या पुरोगामी ब्राह्मणांचे नेमाडे यांनी पितळ उघडे पाडलेले आहे."अशा भंपक सुधारणा आपल्या पुण्यात किंवा मुंबईत न होता दुसर्या मागासलेल्या भागात झाल्या तर उत्तमच, असं वाटणार्या पुण्या - मुंबईच्या उच्चवर्णीय पुरोगामी विचारवंतांनी सगळीकडून मराठावाडा विद्यापिठाचं नाव बदललं पाहिजे , अशी मोहिम सुरु केली "(प्रुष्ठ क्र.४६४) दशमान पद्धती हि आर्य, द्रविडपुर्व अतिप्राचिन असुन त्याबाबतचे संशोधन झाले पाहिजे आणि  ब्राह्मणी व्युत्पतीवर नेमाडेंचा विश्वास नाही , त्याबाबत ते लिहितात "दहा पर्यंतचे आकडे वेगळे करायचे , अकरा- बारा-तेरा - पंधरासतरा-अठरा - ह्या सगळ्यांच्या शेवटी रा आहे. रा म्हणजे दहा -----रावणमध्येही दहा या अर्थी रा-----असावं------राव म्हणजे आवाज म्हणून रावण, असल्या संस्क्रुत बंडल व्युत्पत्त्यांवर आपला विश्वास नाही" (प्रुष्ठ क्र.५३४) ग्रेट निकोबरी सारख्या आदिवासी समाजात बायकोवर कोणत्याही स्वरुपाचा संशय घेत नाहीत्पण हिंदू संस्क्रुतीची अवस्था काय आहे याचे विवेचन करतात , "लहान मुलं ज्या निकोबारी तरुणाला सतत चिकटून असायच त्या तरूणाला मंडीने विचारले , हा कोण ? निकोबारी म्हणाला--माझ्या बायकोचा मुलगा---असं कसं ? ह्यावर तो चिडून म्हणाला , तुम्हा बायकांना हे कळायला पाहिजे, बायकोला मी सोडून दुसर्यापासून मुल नाही होऊ शकत ? आश्चर्य , अरे, इंग्लंड मध्ये सुद्धा कुठलाही नवरा असं चिंतू सुद्धा शकणार नाही.हि नैतिकता भारतीयांच्या केंद्रस्थानी यायला पाहिजे.इथे थोड्याशा संशयावरून बायकोला जाळुन टाकणारी आमची हिंदू संस्क्रुती -----" (प्रुष्ठ क्र.५३८) हिंदूधर्मात मुलींची किंमत नाही, याबाबत नेमाडे लिहितात " मुलींची काय किंमत ?  गचाळ हिंदू कुटूंब व्यवस्था" (प्रुष्ठ क्र.५८३)   
           भालचंद्र नेमाडे यांनी अशा अनेक बाबी प्रस्तुत कादंबरीमध्ये नोंदविल्या आहेत.त्यांचे सविस्तर लेखन म्हणजे एका पुस्तकाचा विषय आहे, हे काम पुढे कोणी तरी करेलच , नेमाडे यांची भाषा लोकभाषा आहे , ती कष्टकरी , श्रमकर्यांना आपली वाटणारी आहे,नेमांडेंच्या भाषेला ब्राह्मणी निकष लावणे गैर आहे, नेमांडेंकडे जस फ़टकळपणा आहे , विनोद आहे तसेच दु:खी, श्रमकरी, कष्टकरी, शेतकरी स्त्रिया यांच्या व्यथा मांडणारे कारुण्य देखील आहे,भाषा , आशय, वाकप्रचार, म्हणी , शब्द, साहित्य, कादंबरी ही ब्राह्मणीच असली पाहिजे या ब्राह्मणी सांस्क्रुतीक दहशदवादाला गाडणारी आणि त्यांच्या  व्यवस्थेला उघडी पाडणारी  भालचंद्र नेमाडे यांची "हिंदू - जगण्याची सम्रुद्ध अडगळ" ही कादंबती आहे.

6 September 2012

आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक

            हिंदुस्तानच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काही तशाच राहून गेल्या.सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला.तो म्हणजे 'उमाजी नाईक'.परंतु रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहिला नाही.आणि उमाजी नाइक फक्त रामोशी-बेरड समाजापुरता सीमित राहून गेल्यासारखे वाटू लागले. क्रांतीकारांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जाती धर्मातील लोकांनी केले पाहिजे मग ते कोणत्या का जातीचे व धर्माचे असेनात.मग हे उमाजी नाइक असे उपेक्षीत का राहून गेले हे समजेनासे झाले आहे.तसे पाहण्यास गेले तर या क्रांतीकाराबद्दल आपल्या समाजाला माहितीही खूप कमी आहे.त्यामुळेच ते उपेक्षीत राहिले असावेत.तर चला थोडेसे जाणून घेऊया या आद्याक्रांतीकाराबद्दल ....
           दिनांक ७ सप्टेंबर हा भारताचे पहिले आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचा जयंती दिन.१७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी उमाजी नाईकांचा जन्म रामोशी जमातीत झाला.महाराष्ट्रात रामोशी जमातीस रानटी जमात म्हणुन ओळखले जायचे.चातुर्वर्णीय व्यवस्थेच्या चौकटीबाहेर फ़ेकले गेल्याने या जमातीच्या वाट्याला असा कोणताच व्यवसाय आला नव्हता.पर्यायाने लुटमार करणे , दरोडे टाकणे त्यांना भाग पडत असे.३५० वर्षापुर्वीही हिच स्थिती होती.शिवरायांनी स्वराज्य निर्मीतीचा निर्णय घेतला, तेंव्हा त्यांनी बहुजनातील अनेक जातीचे मावळे गोळा केले होते. छत्रपती शिवराय रत्नपारखी होते.त्यांच्या सैन्यात सामावून घेण्यासाठी त्यांच्या नजरेतून ही जमातही सुटली नाही.पुरंदरच्या डोंगर कपारीत फ़िरणारे लढाऊ, धाडसी व प्रामाणिक रामोशी आपल्या सैन्यात घेतले. अनेक रामोशी जमातीच्या लोकांनी मर्दमकी गाजवली.स्वराज्यासाठी प्राण दिले.छ.  शिवरायांनी त्यांच्या शौर्याचं चीज म्हणून अनेकांना वतने, इमाने, ताम्रपट देऊ केले, याचा परिणाम असा झाला की , अस्थिर रामोशी स्थिर जीवन जगू लागले.छ.शिवराय गेले तरी त्यांनी स्वराज्याशी कधीही बेईमानी केली नाही.पेशवाई संपेपर्यंत त्यांनी अनेक किल्ल्यांचे किल्लेदार म्हणुन रक्षण केले.
          'मरावे परि क्रांतीरूपे उरावे' अशी उक्ती आहे.ती आद्याक्रांतीकारक उमाजी नाइक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते.ते स्वताच्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीहि स्वताला रोकु शकले नाहीत.इंग्रज अधिकारी रोबर्ट याने १८२० ला इस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे,उमजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजीसारखे राज्य स्थापणार नाही? तर टोस म्हणतो,उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.हे केवळ गौरावौदगार नसून हे सत्य आहे ... जर इंग्रजांनी कुटनीती आखली नसती तर कदाचित तेंव्हाच स्वातंत्र्य लाभले असते.नरवीर उमाजी नाइक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लाक्षिमीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला.उमाजीचे सर्व कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते.त्यामुळेच त्यांना नाइक हि पदवी मिळाली.उमाजी जन्मापासूनच हुशार,चंचल,शरीराने धडधाकट,उंचपुरा,करारी त्यामुळे त्याने पारंपारिक रामोशी हेरकला लवकरच आत्मसात केली होती.जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने दादोजी नाइक यांच्याकडून दांडपट्टा ,तलवार,भाते,कुर्हाडी,तीरकामठी ,गोफणी चालवण्याची कला अवगत केली.या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरवात केली.हळू हळू मराठी मुलुख हि जिंकत पुणे ताब्यात घेतले.१८०३ मध्ये पुण्यात दुसर्या बाजीराव पेशव्यास स्थानपन्न केले.आणि त्याने इंग्रजी पाल्य म्हणून काम सुरु केले.सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्याप्रमाणे पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढू घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली.जनतेवर इंग्रजी आत्त्याचार वाढू लागले.अशा परिस्थतीत करारी उमाजी बेभान झाला.
           छत्रपती शिवरायांना श्रद्धा स्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वताच्या आधीपात्त्या खालील स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक,कृष्ण नाईक,खुशाबा रामोशी,बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली. इंग्रज,सावकार,मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली.कोणत्याही स्त्रीवर अत्याचार ,अन्याय झाल्यास तर तो भावासारखा धावून जाऊ लागला.इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमजीला १८१८ ला एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सरकारने दिली.परंतु तो काळ सत्कारणी लावत त्याने त्याकाळात लिहिणे वाचणे शिकले.आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या कारवाया आणखी वाढल्या.उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटिला आले. उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मोकीन टोस याने सासवड-पुरंदर च्या मामलेदारास फर्मान सोडले.मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला.उमाजीने ५ इंग्रज सैन्याची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली.त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले.उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असत एका टोळीत जवळ जवळ ५ हजार सैन्य होते. १८२४ ला उमाजीने भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता.३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले कि,आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंड सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील,फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.२१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बोईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका,गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते.आणि काहीचे प्राण घेतले होते.
             १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्याने प्रसिद्ध केला त्यात नमूद केले होते,इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात.देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी.इंग्रजांचे खजिने लुटावेत.इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये.इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे.त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून एकप्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला होता.तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला.
            या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले.आणि त्यांनी उमाजीला पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला.मोठे सावकार,वतनदार यांना आमिषे दाखवण्यात आली उमाजीच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले.त्यातच उमाजीने एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून हात कलम केलेला काळोजी नाइक इंग्रजांना जाऊन मिळाला.इंग्रजांनी उमजीची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली.तसेच नाना चव्हाण हि फितूर झाला आणि त्यांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली. १५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला भोरचा सचिव कुलकर्णी याच्या सहाय्याने इंग्रजांनी पकडले.त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला.आणि पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी मोकीन टोस दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता.त्यानेच उमाजीची सर्व माहिती लिहून ठेवली. आहा या नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली.३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाइक हसत हसत फासावर चढला.अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते.उमाजीबरोबर इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाइक आणि बापू सोळकर यानाही फाशी दिली.
            अशा या धाडसी उमाजीनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले.त्यांनी त्यानंतर ३०० रामोशाना बरोबर घेऊन १८५७ चे बंड सुरु केले.त्यावेळीही दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता.

3 September 2012

रा.ग. गडकरीचा राजसंन्यास

            कलेचा , लेखनीचा, आपल्या प्रतिभेचा व आपल्या बुद्धिमत्तेचा वापर प्रत्येकजन विशिष्ठ हेतूने करीत असतात.कुणी समाज प्रबोधनासाठी , कुणी आपल्या सोबत सर्व मानवांचे भले होण्यासाठी कलेचा कलेचा प्रभावी वापर करत असतो, तर कोणी इतिहासाची सत्याशी इमान राखुन ऐतिहासिक महापुरुषांनी दिन-दुबळ्यांसाठी, बहुजनांसाठी केलेल्या कार्याची नोंद करून ठेवण्यासाठी व पुढील पिढीस त्या महापुरुषांकडून प्रेरणा प्राप्त व्हावी यासाठी आपल्या कलेचा, आपल्या प्रतिभेचा वापर करत असतो.पण या भारताचे दुर्भाग्य असे की, भारतातील अनेक ब्राह्मण हे बहुजन  महापुरुषांचे कार्य दुषित करण्यासाठी व या महापुरुषांकडून पुढच्या पिढीला प्रेरणा व प्रोत्साहन मिळु न देण्यासाठी  उलटपक्षी या महापुरुषांची बदनामी करण्यासाठी आपली कला, प्रतिभा, लेखनी वापरत असल्याचे अनेक वेळा जाहीर झाले आहे. 
            राम गणेश गडकरी यांनी "राजसंन्यास" या नावाने एक काल्पनिक नाटक /कथा रचुन या नाटकाआडुन शिवारायांची आणि शिवकुटुंबाची अत्यंत खालच्या पातळीचर जाऊन बदनामी केलेली आहे.या काल्पनिक नाटकाचा रचनाकार गडकरीने शिवकुटुंबाची बदनामी तर केलीच आहे पण ही बदनामी करण्यासाठी त्यांनी बहुजनांच्या दोन महत्वाच्या प्रतिकांचा / नावाचा वापर केलेला आहे आणि या दोन प्रतिकांची नावे आहेत जिवाजी आणि देहु.
        जिवाजी हे छत्रपती शिवरायांचे अत्यंत विश्वासू सेवक होते.अफ़जलखाना विरुद्धच्या मोहिमेत शिवरायांसोबत असताना "होते जिवाजी म्हणुन वाचले शिवाजी " असे इतिहासात जिवाजींच्या शिवप्रेमाची व शौर्याची नोंद आहे.सदर "राजसंन्यास" नाटकात यांच जिवाजी या नावाचा ’जिवाजीपंत’  हे काल्पनिक पात्र रंगवून राम गणेश गडकरी याने बहुजनांना अत्यंत प्रिय असलेल्या ’जिवाजी’ यांचा देखील अपमान केलेला आहे. याच शिवप्रेमी ’जिवाजी’ यांच्या नावाने रंगवलेल्या ’जिवाजीपंत’ च्या तोंडुनच शिवरायांची बदनामी गडकर्याने केलेली आहे आणि आपल्या शिवरायद्वेषाची आग शमुन घेतली आहे.ब्राह्मण इतिहासकारांनी - अभ्यासक - लेखकांनी जिवाजी महालेंचा  आदरार्थी उल्लेख कुठेही केलेला दिसत नाही.  "जिवा" असाच एकेरी उल्लेख सर्वत्र आढळून येतो. 
          दुसरे व बहुजनांचे अत्यंत प्रिय प्रतिक आहे ते "देहू", कारण देहू हे जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान व कर्मस्थान आहे. ब्राह्मणी व्यवस्थेला आपल्या अभंगातून व प्रबोधनातून हादरे देणार्या संत तुकाराम  महाराजांचे त्यांच्या हयातीपासुनच छळ करणारे ब्राह्मण जगदगुरु संत तुकाराम महाराजांना बदनाम करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. छ.शिवरायांवर संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा, वारकरी सांप्रदायाचा  व त्या माध्यमातून तुकाराम महाराज चालवत असलेल्या बहुजन मुक्ती चळवळीचा खुप मोठा प्रभाव होता हे जगप्रसिद्ध आहे.म्हणूनच राम गडकरीने शिवरायांची बदनामी करण्यासाठी मुद्दामच बहुजनांना अत्यंत आदरणीय असलेल्या शिवगुरु  जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा "देहू" या जन्मस्थळाची निवड केली. "देहू" हे संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थळाचं म्हणजे एका गावाचे नाव आहे.मागील हजारो वर्षाच्या इतिहासात "देहू" हे एखाद्या व्यक्तीचे नाव असल्याचे ऐकिवात नाही.
          ही दोन्ही छ.शिवरायांशी जवळीक असलेल्या अत्यंत प्रिय प्रतिकांचा  गडकरी " राजसंन्यास" या नाटकात पात्रांच्या रुपात वापर करून "जिवाजीपंत" व "देहू" यांच्या तोंडून पुढील प्रमाणे छत्रपतींची बदनामी केलेली आहे व ते लक्षात घेण्यासाठी "राजसंन्यास" नाटकातील वरील पात्रांच्या तोंडी बुसडवलेली काही उदाहरणे- 
१)  जिवाजीपंत : शिवाजी सोळा वर्षाचा झाला नाही तोच त्याने आडदांड लोकांची संगत धरून मुलखात पुंडाई (बंडखोरपणा, उपद्रव, लुटारूपणा) आरंभली.
२) जिवाजीपंत : या कलमाच्या करामतीने होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करून दाखविता येते !  ( म्हणजे असे तर नसेल ना की "वाघ्या" हे शिवइतिहासात "अस्तित्वात नसलेले" पात्र "अस्तित्वात आहे " असे दाखुवुन "नव्हत्याचे होते करून दाखविले आहे")
३) जिवाजीपंत : सांगु तुला देहू  ? कलमाच्या मदतीवाचुन कुठल्याही ग्रंथाचे पान हलायचे नाही बघ ! अरे, शिवाजी नुसता नावाला पुढे झाला पण खरी करणी त्या रामदासाची आह.त्याने आपला "दासबोध" ग्रंथ लिहिला नसता , तर शिवबाचा एवढा ग्रंथ कदाकाळी होताच ना ! शिवाजी भवानी तलवारीने ? नाही तुझ्या आडदांड करेलीने ? नाही ! नुसत्या भवानी तलवारीच्या नाचाने मराठेशाहीला रंग चढला नाही, तर दासबोध लिहिणारे कलम त्या सगळ्या भानगडीच्या मुळाशी होते !   आता तुच सांग बघु भवानीचे हातवारे करणारा शिवाजी थोर का कलमाने दासबोध रेखाटणारा रामदास थोर ?
४)जिवाजीपंत : काय, ग्रंथ केला रे शिवाजीने ? मी म्हणतो तसे म्हंटले तर छत्रपती शिवाजी महराजांनी असे  केले आहे तरी  काय ?
        असे अनेक उद्गार आहेत पात्रांच्या तोंडात भटी मेंदूतुन आलेली.हे तर "राजसंन्यास" आहे की "राजसत्यानास" आहे हे लगेच एका ब्राह्मणाला देखील समजु शकेल हां आता तो अमान्य करेल ही गोष्ट वेगळी आहे......
       तमाम जीवस्रुष्टीला फ़सविण्याचा, ठकविण्याचा, गंडविण्याचा आणि बदनाम करण्याचा ठेका ब्राह्मणांनीच घेतला असल्याचे गडकरी येथे अधोरेखीत करतात. अशा अमानवी , कुविचारी टाळक्यांच्या औलादिंना महात्मा फ़ुले "कलमकसाई" का म्हणतात हे यावरून स्पष्ट होते.

19 August 2012

वाघ्या कुत्रा आणि वादाचे कारण

            सध्याचे वातावरण वाघ्या कुत्र्याच्या शिल्पामुळे तापलेले आहे. शिवचरित्रात व इतर सर्व संदर्भ साधनात वाघ्याचा कुठेही उल्लेख नाही.म्हणुन एका काल्पनिक कुत्र्याचे शिल्प  शिवरायांच्या अमाधीसमोर असणे हा शिवरायांचा आणि शिवचरित्राचा अपमान आहे.त्यामुळे शासनाने हे वादग्रस्त शिल्प रायगडावरून तात्काळ हटवावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने गेल्या काही वर्षापासून लावून धरली होती.परंतू वारंवार मागणी करुनही शासनाकडून या शिल्पासंदर्भात कसलाच निर्णय न झाल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी १ ऑगस्ट २०१२ रोजी वाघ्याचे  वादग्रस्त शिल्प हटविले.काही सामाजिक संघटनांनी या कुत्र्याला आपल्या अस्मितेचे प्रतिक मानुन संभाजी ब्रिगेडच्या विरोधात अपप्रचार केला.या सामाजिक दबावाला बळी पडत शासनाने तात्काळ ते शिल्प पुनर्स्थापित केले.
        परंतू या वादात शिवरायांच्या अपमानाचा आणि वाघ्याच्या इतिहासात असण्याचा प्रश्न बाजुला पडला, मुळ प्रश्न आहे तो वाघ्या शिवचरित्र्यात असण्याचा. समकालीन संदर्भ साधनात कसलाही उल्लेख नसणार्या वाघ्याचे शिल्प केवळ दंतकथेवर आधारित आहे.शिवकाळानंतर ज्यांनी ज्यांनी रायगडचा या ना त्या प्रकारे अभ्यास केला  त्यांच्याही साहित्यात या कुत्र्याचा कसलाही उल्लेख मिळत नाही.उदाहरणादाखल : १८६९ साली "महात्मा जोतिराव फ़ुले" स्वत: रायगडावर गेले, शिवरायांची दुर्लक्षीत झालेली समाधी शोधुन काढली आणि शिवरायांवर प्रदिर्घ पोवाडा लिहिला.पण यात कुठेच वाघ्या डोकावला नाही. सन १८८१-८२ मध्ये "जेम्स डग्लज " हा इंग्रज अधिकारीही रायगडावर गेला. या अधिकार्यानेही त्याच्या "बुक ऑफ़ बॉम्बे" या पुस्तकात रायगडचे आणि शिव समाधीचे  नकाशासहीत तपशीलवार वर्णन केले आहे पण त्यांनीही वाघ्याचा कुठेही उल्लेख केला नाही.
१८८५ च्या सुमरास मुंबई इलाख्याचे गव्हर्नर असणरे "सर रिचर्ड टेम्पल" रायगड पाहण्यासाठी गेले त्यावेळी त्यांच्या सोबत "क्रॉफ़र्ड" नावाचा सहकारी होता. या सहकार्याने "सर रिचर्ड टेम्पल" यांच्या मोहिमेवर आधारीत "अवर ट्रबल  इन पुणा एण्ड डेक्कन"  हे पुस्तक लिहिले जे १८९७ मध्ये प्रकाशित झाले.या पुस्तकाचे वैशिष्ट म्हणजे "क्रॉफ़र्ड" यांनी स्वत: शिवरायांच्या शवाचे दहनस्थळ आणि समाधी याचे स्वतंत्र्य चित्र रेखाटले आहे पण याही पुस्तकात वाघ्याचा नामनिर्देश नाही.
            शिवरायांच्या समकालीन संदर्भ साहित्यात वाघ्याचा कोणताही उल्लेख नसणे आणि नंतरच्या मान्यवर लेखकांच्या लिखानातही वाघ्या नसने हे वाघ्याच्या शिल्पाचा फ़ोलपणाच सिद्ध करते. असे असताना वाघ्यासाठी शासनाचा एवढा अट्टाहास का ?
               आता काहींचं मत आहे की या वाघ्याचं अस्तित्व दाखवणारे पुरावे जर्मन लोकांनी अगदी जपुन ठेवले आहेत.आता गंमत अशी की, वाघ्या रायगडावर होता, हे जर्मनीतील लोकांना १० हजार मैलावरून दिसले, पण रायगडाच्या आसपासच्या १० मैलावरील कोणालाही तो दिसला नाही! शिवाजी महाराजांच्या काळातील एकाही माणसाला वाघ्या दिसत नाही. महाराज गेल्यानंतर २५० वर्षांनंतर झालेल्या माणसांना मात्र तो ढळढळीत दिसू लागतो!!असले चमत्कार मद्यपान केल्यानंतर सहजपणे होऊ शकतात.
           दंतकथेतील हा कुत्रा सर्वप्रथम डोकावला तो १९०५ साली "चिं. ग.गोगटे" यांच्या "महाराष्ट्र देशातील किल्ले" या पुस्तकात.या दंतकथेतील कुत्र्याचे ’वाघ्या’ असे नाटककार आद्य नाटककार ’राम गणेश गडकरी’ यांनी त्यांच्या "राजसंन्यास" या नाटकाच्या माध्यमातुन केले.गडकरींनी त्यांचे हे नाटक वाघ्याला अर्पण केलेले आहे म्हणुनच वाघ्याच्या चबुतर्याचर "राजसंन्यास" या नाटकातील काही ओळी कोरल्या आहेत.विशेष म्हणजे गडकरींचे हे नाटक शिवराय आणि शंभुराजे यांच्या बदनामीने ओतप्रत भरलेले आहे हे नाटक वाचतात वाचकांच्या लक्षात येते की , गडकरी हे काही इतिहास संशोधक नव्हते ते एक नाटककार होते.दंतकथा आणि नाटके ही जर इतिहासाच्या वस्तुनिष्ठ पुराव्यांवर टिकत नसतील तर ती एखाद्या युगपुरुषाच्या बदनामीला कारणीभुत ठरत असतील तर अशा दंतकथा नाकारल्याच पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे वाघ्याचे काल्पनिक शिल्प बसविण्यात आले आहे त्या खालील चौथरा हा शिवरायांच्या महाराणी सईबाईंची असण्याची  शक्यता काही इतिहासकारांनी वर्तवली आहे आणि यासंदर्भात इतिहासकारांचे एकमत आहे आणि  तो वाघ्याचा पुतळा शिवरायांच्या समाधीपेक्षा उंच आहे. रायगडावरील वाघ्याला काही संघटनेंचा विरोध आहे तो यामुळेच.वाघ्या कुत्र्याच्या समर्थकांनी आणि पुरातत्व खात्यानेही या कुत्र्या संदर्भात ऐतिहासिक पुरावे द्यावेत अन्यथा शिवप्रेमींची मागणी मान्य करत शिवरायांचा अपमान करणारे शिल्प ताबडतोब हटवावे.

शिवश्री डॉ. बालाजी जाधव, 
प्रकाशक पंचफ़ुला प्रकाशन,औरंगाबाद.
मराठ्यांनो षंड झालात काय ? या विक्रमी खपाच्या पुस्तकाचे लेखक

8 July 2012

समुद्रावरचा राजा - कान्होजी आंग्रे

मराठा साम्राज्याच्या आरमाराचे प्रमुख ’ सरखेल’ कान्होजी आंग्रे यांची ४ जुलै रोजी पुण्यतिथी, त्यानिमित्य त्यांच्या स्म्रुतीला उजाळा देणारा लेख.
             छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्ग येथे चाकरीला होते.१६८८ मध्ये सुवर्णदुर्ग चा किल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेऊन फ़ितूरीने किल्ला सिद्धीकडे सोपवणार असे कळल्यावर कान्होजी यांनी सिद्धीवरून किल्ला लढवला आणि पराक्रम केला.पुढे १६९८ मध्ये सरखेल सिधोजी गुजर गेल्यानंतर राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना सरखेल(आरमाराचा सरसेनापती) पद सोपवले.ते त्यांच्या म्रुत्युनंतर त्यांच्याकडेच होते.मराठा - मुघल युद्धामध्ये कोकणपट्टी सांभाळण्याचे कार्य कान्होजी आंग्रे यांनी यशस्वीरित्या पार पाडले.पोर्तुगीज, इंग्रज, आणि सिद्धी यांना त्यांनी चांगलेच जेरीस आणले आणि संपुर्ण भागात आपला वचक प्रस्थापित केला.
 जन्म आणि वैवाहिक जीवन
            कान्होजी आंग्रे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेडजवळील कालोसे या गावी १६६९ मध्ये झाला वडिलांचे नाव तुकोजी संकपाळ आणि आईचे बिम्बाबाई होते.नवसाने आणि अंगाच्या धुपाराने कन्होजींचा जन्म झाला म्हणून आंग्रे हे आडनाव लावले गेले.त्यांनी ३ लग्ने केली.पहिली पत्नी राजूबाई/मथुराबाई. यांच्याकडून त्यांना सेखोजी आणि संभाजी म्हणजेच आबासाहेब अशी २ मुले झाली.सेखोजी हे नाव त्यांच्या आजोबांच्या नावावरून ठेवले गेले.दुसरी पत्नी राधाबाई/ लक्ष्मीबाई यांच्याकडून त्यांना मानाजी आणि तुळाजी असे २ पुत्र झाले, तर तिसरी पत्नी गहिणबाई यांच्याकडून त्यांना येसाजी आणि धोंडजी असे २ पुत्र झाले.शेवटी एक मुलगी झाल्याने तिचे नाव "लाडूबाई" ठेवले गेले.
समुद्रावरचा शिवाजी
          कान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकुन घेऊन तेथे आपली राजधानी थाटली.छत्रपती महाराजांनी आंग्रे यांना आरमारचा प्रमुख केले आणि आंग्रे कोकण किणार्याचे राजे झाले.इ.स. १७०० मध्ये राणी ताराबाईंनीही या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली.या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना एकाच वेळी परकीय आणि स्वकियांबरोबर लढा द्यावा लागत होता.१७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फ़ुट पडल्यावर त्यांनी कोणाचीही बाजू न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला.पुढे त्यांचे बालमित्र असलेला बाळाजी विश्वनाथ भट (पेशवे ) याने त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर वळवंड, लोणावळा येथे तह करवला.कोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रपासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती.
परकियांना पुरुन उरले 
              सागरी भागात मुक्तपणे संचार करणार्या परकियांवर निर्बंध आले होते. १६९८ पासून मराठी राज्याची सारी सागरी सत्ता कान्होजींकडे आली होती. त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते याचा प्रतिकार करण्याचे परकियांनी ठरवले.सर्व परकियांनी एकत्रित येऊन कान्होजींना संपविण्याचे ठरवले.तरीही त्यांनी इंग्रज, पोर्तुगीजांनाही पराभुत केले.शत्रुच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कान्होजींनी दुर द्रुष्टिने अगोदरच अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवले होते.अशा संबंधांच्या मदतीने त्यांनी आपले आरमार अधिक शस्त्रसज्ज केले.पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीने जहाज बांधनीचे कारखाने त्यांनी उभारले.या सुसज्जतेसह कान्होजींनी समुद्रकिनार्यावर एक दबदबा निर्मान केला होता.कान्होजींचा लढा धार्मिक आक्रमनाची धार कमी करण्यासाठी पण होता.कान्होजी आंग्रे यांनी कोकणातील मंदिरासह , पंढरपुर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या.
         छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्रुत्युनंतरही औरंगजेबाला मराठी मुलूख काबीज करता आला नाही.यामागे अनेक शुर सरदारांचे योगदान होते.कोकण किणार्यावरील राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी हेही त्यातीलच एक. दि.४ जुलै १७२९ रोजी कान्होजींनी जगाचा निरोप घेतला.

1 July 2012

पानिपत : मराठ्यांचे कि पेशव्यांचे ?

राज्य पेशव्यांचे आणि पानिपत मराठ्यांचे कसे ? 
         पानिपत कोणाचे झाले ? असा प्रश्न विचारला की, पहिलीच्या मुलांपासून ते पदवीधर तरुणांपर्यंत सर्वजन एकच उत्तर देतात की, मराठ्यांचे पानिपत झाले.परंतू यामध्ये आपल्या मुलांचा किंवा त्या तरुणांचा दोष नाही.कारण त्यासाठी जबाबदार आहे ती  शिक्षण व्यवस्था आणि इतिहासकार वि.का.राजवाडे, अ.रा.कुलकर्णी, सेतु माधवराव पगडी, पांडुरंग सदाशिव पिसूरलेकर,व्ही.टी.गुन्हे, के.एन.चिटणीस, शं.ना.जोशी, वा.क्रु.भावे, सरदेसाई इत्यादी इतिहासकारांनी मराठ्यांचा इतिहास लिहित असताना मराठ्यांचे पानिपत झाले हा विचार इतिहासामध्ये जाणिवपुर्वक रुजवला.परंतू इतिहासाचा एक चिकीत्सक अभ्यासक या नात्याने विचार केल्यास आपणास ही गोष्ट सिद्ध करता येईल की, पानिपत हे मराठ्यांचे झाले नसून पेशव्यांचे  झाले आहे.
               इतिहासामध्ये पानिपतच्या एकुण तीन लढाया झाल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे - 
१) पहिली पानिपतची लढाई - २० एप्रिल इ.स.१५२६(इब्राहिम लोबी द बाबर)
२) दुसरी  पानिपतची लढाई - ५ नोव्हेंबर इ.स.१५५६(अकबर द हेमू)
३) तिसरी पानिपतची लढाई - १४ जानेवारी इ.स.१७६१(पेशवे द अहमदशाह अब्दाली)
            यापैकी तिसर्या पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचे नव्हे तर पेशव्यांचे पानिपत झाले, ते कसे आपण पाहू.
 मराठ्यांच्या सत्तेचा कालखंड - इ.स.१६३० ते इ.स.१७१३.
पेशव्यांचा म्हणजेच ब्राह्मणांचा कालखंड - इ.स. १७१३ ते इ.स. १८१८.
              इ.स. १७१३ मध्ये बाळाजी विश्वनाथ हा मुख्य पेशवा झाला आणि तेंव्हा पासुनच मराठा छत्रपतींच्या हाती नाममात्र सत्ता राहुन सर्व राजकीय सत्ता पेशव्यांनी आपल्या ताब्यात घेतली.त्याच मराठा राज्याची राजधानी सातारा बदलून ती पुण्यास करण्यात आली.याच बाळाजी विश्वनाथला इतिहासकार मराठा सत्तेचा दुसरा संस्थापक असे म्हणतात.
          बाळाजी विश्वनाथ नंतर पहिला बाजीराव (इ.स.१७३०-४०) हा पेशवेपदी आला. या पहिल्या बाजीरावाच्या शौर्याबद्दल तर इतिहासकार फ़ारच उदो उदो करतात.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर शौर्य आणि धाडस यासाठी पहिल्या बाजीरावाचाच क्रम लागतो, असे इतिहासकार लिहितात.कदाचित असे लिहुन छत्रपती शिवाजी महाराजांइतकी लोकप्रियता पहिल्या बाजीरावालाही मिळेल असे त्यांना वाटत असावे.पण आपण एक गोष्ट समजून घ्यायला हवी ती म्हणजे पहिल्या बाजीराव पर्यंतच मराठा स्वराज्य होते नंतर त्याचे रुपांतर पेशवाईत झाले 
          पहिल्या बाजीरावाच्या म्रुत्यूनंतर त्याचा मोठा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ़ नानासाहेब (इ.स.१७४०-६१) हा  पेशवेपदी असता याच दरम्यान म्हणजे इ.स.१७४८ मध्ये छत्रपती शाहूंचा म्रुत्यू झाला.त्यामुळे संपुर्ण मराठ्यांची सत्ता ही नानासाहेब पेशव्यांच्या हाती आली.(याचा अर्थ असा होतो की, पेशवे ठरवतील तीच पुर्व दिशा, मराठे ठरवतील ती नव्हे !).नानासाहेब पेशव्यांच्याच कालखंडात दोन महत्वाच्या घटना घडल्या 
१) अटक येथील प्रदेशावर विजय (१७५८) 
२) पानिपत लढाईमध्ये पराजय (१७६१)
            या दोन घटनांच्या विशेषणा वरून इतिहासकारांचा पक्षपातपणा लक्षात येतो. कारण इ.स.१७५८ मध्ये नानासाहेब पेशव्यांचा कनिष्ट भाऊ रघुनाथरावाने इंदुरच्या मल्हारराव होळकरांच्या मदतीने अटक किल्यावर जरीपटका फ़डकावून विजय मिळवला.या विजयाचे वर्णन करण्यासाठी इतिहासकारांनी इतिहासामध्ये एक म्हण प्रचलित केली :-
" पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले."
             काही हरकत नाही रघुनाथरावाच्या नेत्रुत्वाखाली विजय मिळवला म्हणुन इतिहासकारांनी अगदी सत्य इतिहास समाजासमोर आणण्यासाठी या म्हणीचा उपयोग केला असेल.
             परंतू अवघ्या ३ वर्षानंतर म्हणजेच इ.स.१७६१ मध्ये नानासाहेब पेशव्याचाच चुलत भाऊ सदाशिवराव याच्या नेत्रुत्वाखाली पानिपतचे युद्ध झाले.या पानिपतच्या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या "गनिमीकावा" या युद्ध तंत्राचा सदाशिवरावांनी वापर केला नाही, म्हणुनच पानिपतच्या लढाईत पेशव्यांना पराभव पत्कारावा लागला. हा पराभव आपला नसून मराठ्यांचा आहे, हे सांगण्यासाठी ढोंगी इतिहासकरांनी आणखी एक म्हण प्रचलित केली :-
" मराठ्यांचे पानिपत झाले"
           अशा प्रकारे या दोन घटनांचे विश्लेषण त्यांच्या पद्धतीने केले आहे.विजयाचे श्रेय स्वत:च्या नावावरती घेतले आणि पराजय मात्र मराठ्यांच्या नावावर खपवला.आमचे एवढेच म्हणने आहे की, पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले असतील तर पानिपतही पेशव्यांचेच झाले आणि मराठ्यांचे पानिपत झाले असेल तर अटकेपार झेंडे ही मराठ्यांनीच लावले, याला म्हणतात वस्तुनिष्ठ इतिहास लेखन करणे. परंतू वस्तुनिष्ठ इतिहास लेखन न करता त्यांना अनुकूल असा इतिहास लिहिला.
            परंतू छत्रपतींचा मावळा आता पुस्तक वाचनातून जाग्रुत होत आहे.तो आता कोणत्याही षडयंत्राला बळी पडनार नाही.कारण आता  इतिहासाच्या पुनर्लेखनास सुरुवार झाली आहे.