Showing posts with label छत्रपती शंभुराजे. Show all posts
Showing posts with label छत्रपती शंभुराजे. Show all posts

17 January 2017

राजसंन्यास, धर्मवीर आणि शंभुप्रेमींची जबाबदारी

             महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात ३ जानेवारी २०१७ हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाच्या दिवसातील एक ठरला. छत्रपती संभाजी महाराज उद्यानात असलेला रा. ग. गडकरी यांचा पुतळा काही तरुणांनी मध्यरात्री हातोडी, कुर्‍हाडीचे घाव घालून फोडला आणि तो मुठा नदीत फेकून दिला. काही वेळातच हा प्रकार सर्वदुर पसरला. या घटनेचे शंभुप्रेमींनी जोरदार समर्थन केले तथा नितेश राणेंनी त्या तरुणांचा शब्द दिल्याप्रमाणे उचित सन्मान केला तर गडकरी प्रेमींनी निषेद आणि संताप व्यक्त केला. पण रा. ग. गडकरींचा पुतळा का तोडला,  यामागची भावना काय होती याचा विचार करणे निषेदार्ह संताप व्यक्त करणार्यां गडकरी प्रेमींना महत्वाचे वाटले नाही. कारण शिवभक्तांनी केलेल्या कोणत्याही घटनेला ब्राह्मणद्वेषाचे लेबल लावून त्यातुम निसटणे हा आज लोकप्रिय फ़ंडा झालेला आहे.
          राम गणेश गडकरीं यांची ओळख सांगायची तर, गडकरींचा जन्म गुजरात मधील नवसारी येथे २६ मे १८८५ रोजी झाला. तर २३ जानेवारी १९१९ रोजी त्यांचा म्रुत्यु झाला. वयाच्या ३४ वर्षात त्यांनी कविता, नाटक तथा विनोदी लेख यांसारखे बरेच साहित्य निर्माण केले. त्यांच्या साहित्यांनी आयुष्याच्या शेवटच्या काळात मराठी भाषा आणि साहित्यावर सत्ता गाजवली. प्रेमसंन्यास, राजसंन्यास, एकच प्याला, पुण्यप्रभाव ही त्यांची गाजलेली काही नाटके लिहिणारे गडकरी हे मराठीतील शेक्सपियर म्हणून ओळखले जात. राम गणेश गडकरींच्या पुतळ्याला मुठा नदीच्या पाण्याची चव चाखायला लावणारे त्यांचे साहित्य म्हणजे "राजसंन्यास" नाटक. आजपर्यंत इतिहासाचे बर्याच प्रमाणात विक्रुतीकरण झालेले आहे तसेच सत्य इतिहासही बाहेर आलेला आहे.महाराष्ट्राच्या इतिहासात अशा विक्रुती करताना बर्याच मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यापैकी म्हणजे इतिहासाचे संशोधन करताना नाना फ़डणीस याने भोगलेल्या रखेल्यांची यादी सापडली होती ती दत्तो वामन पोतदार याने गिळून टाकली. नाना ने रखेल्या भोगल्या पण पोतदार ने तर अखंड रखेल्या गिळुन नाना फ़डणीस वरच कढी केली. महाराष्ट्रातील इतिहास विक्रुतीने सडलेला आहे त्यात गडकरींच्या "राजसंन्यास" ची भर पडली.
राजसंन्यास आणि आधुनिक धर्मप्रेमी
        हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे विरश्रींचे शिरोमणी. वयाच्या १४ व्या वर्षी बुधभुषणम सारखा ग्रंथ लिहुन साहित्य क्षेत्रात आपले नाव अजरामर केले.शिवराज्याभिषेक विधी करणार्या गागा भट्टांनी देखील त्यांचा समयनद हा ग्रंथ संभाजी राजांना अर्पण केला आहे. या महानायकाने भारतातील साहित्यिकांना, कादंबरीकारांना, कथाकारांना, नाटककारांना वेगवेगळ्या प्रकारे खाद्य पुरविले. बुद्धीच्या अनेक ठेकेदारांनी आपापल्या पद्धतीने शंभुराजांचे चरित्र लोकांसमोर मांडले. परंतु राष्ट्ररक्षणार्थ बलिदान देणार्या पराक्रमी शिवपुत्रावर साहित्यिकांनी प्रचंड अन्याय केलेला आहे. राम गणेश गडकरींनी "राजसंन्यास" नाटकाच्या माध्यमातून सर्वांवर कढी केलेली आहे. कारण राजसंन्यास नाट्य छ.संभाजी राजांचे बदफ़ैली, स्त्रीलंपट चरित्र रंगवून प्रचंड अन्याय करणारे आहे. संभाजी राजांच्या बदनामीला सर्वप्रथम कारणीभूत होती ती मल्हार रामराव चिटणीसची बखर. स्वराज्यद्रोहा बद्दल संभाजी राजांनी बाळाजी आवजी चिटणीसला देहांत शासन दिले होते. बाळाजी हा मल्हार रामराव चिटणीसचा खापरपणजोबा होता. आपल्या खापर पणजोबाला शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिले होते, त्याचाच सूड घेण्यासाठी तब्बल १२२ वर्षांनी मल्हार रामरावाने बखर लिहून त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान केले. परंतू कै. वा. सी. बेंद्रे यांनी चाळीस वर्षे कष्ट घेऊन शंभुचरित्राचा खरा इतिहास उभा केला आणि जाज्वल्य इतिहासातून अनेक लेखकांना दिव्य द्रुष्टी दिली. त्यामध्ये शिवाजी सावंत, डॉ.जयसिंगराव पवार, विश्वास पाटील, डॉ.कमल गोखले, विजय देशमुख यांसारख्या विद्वानांनी खरे आणि भव्य दिव्य असे  शंभुराजांचे चरित्र जनमानसांसमोर आणले. पण दुर्दैवाने संभाजी राजांच्या ज्वाज्वल कर्त्रुत्वापेक्षा त्यांच्या इतिहासाची विक्रुत मांडणी करणार्यांना साहित्य क्षेत्रामध्ये आढळ स्थान दिले गेले. त्यावर कढी म्हणजे संभाजी राजांच्या चरित्रावर प्रचंड अन्याय करणार्या गडकरींचा पुतळा संभाजी राजांच्या नावाने असणार्या उद्यानात उभारणे हीच खरी महाराष्ट्राची शोकांतिका आहे.
          संभाजी महाराज उद्यानातील गडकरींचा पुतळा काढल्यानंतर खरी कसोटी लागली ती शंभुच्या रक्तगटाची तरून पिढी निर्माण करायला निघालेल्या आणि आयुष्य ब्राह्मणप्रतिपालनाला वाहुन घेतलेल्या हिंदुत्ववाद्यांची. आता काय करावे ? या प्रश्नाने गोंधळ घातला. एकिकडे शंभुराजांविषयी निष्ठा दाखायची होती तर दुसरीकडे गडकरींचा निषेद करायचा होता अशा धर्मसंकटात सापडलेल्या हिंदुत्ववाद्यांनी या सगळ्या कृत्याला नेहमीप्रमाणे ब्राह्मणद्वेषाची लेबल लावून हात झटकून घेतले. हिंदुत्वावाद्यांचे शिव-शंभुंवरचे खोटे प्रेम वेळोवेळी उघडे पडले आहे. संभाजी ब्रिगेड ने केलेली प्रत्येक गॊष्ट ब्राह्मणद्वेषाचा शिक्का मारून झाकुन ठेवायची ही हिंदुत्ववाद्यांची जुनी खोड आहे, म्हणुनच की काय जेम्स लेन प्रकरणावेळी संभाजी ब्रिगेडने जिजाऊ मातांच्या अपमानाचा तिव्र संताप आणि निषेद व्यक्त केल्यावर हिंदुत्ववाद्यांनी मात्र शांत राहाणंच पसंत केलं होतं. तोच स्थायी स्वभाव त्यावेळीही त्यांनी अबाधित ठेवला आहे. हिंदुत्ववाद्यांना जर संभाजी राजेंविषयी आदर आणि प्रेम असता तर गडकरींच्या लिखानाचा विचार केला असता आणि काही कारणास्तव निषेद करायला जमत नसले तरी किमान खंत तरी व्यक्त असती पण या दोन्ही ठिकाणी ते असमर्थ ठरलेत. बहुजनवाद्यांची काय वेगळी स्थिती नाही. संभाजी राजेंना शाक्तवीर ठरवनार्या बहुजनवाद्यांनी पण या प्रकराणाकडे केवळ संभाजी मराठा आणि गडकरी ब्राह्मण त्यामुळे ते दोघे बघून घेतील असा सोईस्कर विचार करून दुर्लक्ष करणंच पसंत केलेलं दिसतं. त्यामुळे सच्चा शंभुभक्तांच्या जबाबदाऱ्या आहेत.
महात्मा फ़ुले, केळुस्करादी लेखक आणि राजसंन्यास
गडकरींचा पुतळा  काढून फ़ेकल्यानंतर त्यांच्या साहित्यविषयी चर्चेला उधान आलं. बर्याच विद्वानांनी मते मांडली. संभाजी महाराजांविषयीचे हे चित्र दुर्दैवाने इतिहासकारांमध्येच बराच काळ प्रचलित होते. तेंव्हाचे सर्वच इतिहासकार या गैरसमजाला बळी पडलेले आहेत. केवळ गडकरीच नव्हे. त्यामुळे गडकरींनी लिहिलेले नाटक हे त्यावेळच्या संदर्भ आणि पुराव्यावर आधारीत आहे असे म्हणून या विद्वानांनी पद्धतशीरपणे गडकरींना पाठिशी घातले आहे. परंतु हे विद्वान हे विसरले आहेत की गडकरींनी राजसंन्यास मध्ये जो विक्रुतीचा उन्माद मांडलाय तो याआधी कोनत्याही लेखकाने किंवा इतिहासकाराने मांडलेला नाही. इतर लेखकांनी संभाजीराजेंच्या विक्रुत इतिहासातील संदर्भ आहे तसे वापरले आहेत पण गडकरींनी मात्र त्या विक्रुतीमध्ये स्वत:च्या विकृतीची घुसळण केलेली स्पष्ट जाणवते. त्यामुळे इतर इतिहासकार चुकिच्या इतिहासाला बळी पडले असे म्हणता येईल पण गडकरींबद्दल तसं समजता येणार नाही.
               महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड जे काही करेल त्याला ब्राह्मनद्वेषाची पार्श्वभुमी असते तसेच अफ़जल आणि औरंगजेबाची कबर उध्वस्त करणे हा इस्लामद्वेष नाही पण कोंडदेव आणि गडकरींचा पुतळा काढणे म्हणजे ब्राह्मणद्व्वेष आहे असा एक लाडका सिद्धांत हिंदुत्ववाद्यांचा असतो. पण संभाजी ब्रिगेडला विरोध करण्याच्या नादात आपण काय करतोय याचही भान त्यांना राहात नाही. याही प्रकरणात संभाजी ब्रिगेडला विरोध करण्याच्या भरात त्यांनी गडकरींच्या लेखनाचे समर्थन केले. मग खरच जर गडकरींच्या वेळी संभाजी राजेंचा तोच इतिहास प्रचलित होता तर त्या इतिहासामध्ये संभाजींची बदनामी आहे आणि तो आपण ऐतिहासिक आधार म्हणून घेऊ नये एवढी पण अक्कल गडकरींना असू नये हे मात्र न पटण्यासारखे आहे. एक वेळ मान्य केले की संभाजींचा इतिहास त्यावेळी तोच होता त्याला गडकरी बळी पडले पण शिवरायांचा इतिहास तर सत्य होताच ना तरीही शिवरायांना दुय्यम स्थान देऊन स्वराज्ज्याचे श्रेय रामदासांच्या घस्यात घालण्यामागचा गडकरींचा काय हेतु होता ? किमान याचा तरी विचार हिंदुत्ववाद्यांनी करावा. हिंदुत्ववादी मंडळीं दावा करतात की ते नाटक प्रकाशित झालं नाही त्यामुळे जे नाटक कोणीच वाचलेले नव्हते ते आता संर्वांना माहीत झाले. हिंदुत्ववाद्यांची एक सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे त्यांना जे माहीत नाही ते आस्तित्वातच नाही असे ते ग्रुहित धरतात त्यामुळे "राजसंन्यास" आम्हाला माहीत नाही म्हणजे कोणालाच माहीत नाही असे त्यांनी सहज ठरवूनही ठाकले. पण त्यांना माहीत असणे गरजेचे आहे की,  'महाराष्ट्र शासनाने' 'राम गणेश गडकरी समग्र वाड्मय' प्रकाशित केलेले आहे.त्याचे संपादन प्र. के. अत्रे यांनी केलेले आहे. त्यामध्ये राजसंन्यास नाटकही प्रकाशित केले आहे. त्यामुळे हे नाटक कोणालाच माहीत नाही या भ्रमातून हिंदुत्ववाद्यांनी स्वत:ची सुटका करावी.
               राम गणेश गडकरींच्या बचावा साठी हिंदुत्ववाद्यांची एक मांडणी असते की, महात्मा फ़ुलेंनी शिवरायांना अक्षरशुन्य म्हंटले. तसेच क्रुष्णा अर्जुन केळूस्कर यांनीही संभाजी राजें आणि शिवरायांविषयी हेच मत मांडलेले आहे मग यांचं काय करायचं ?. महात्मा फ़ुलेंनी शिवरायांवर जे लिखाण केले ते त्या काळात जे पुरावे उपलब्ध होते त्यानुसार. शिवरायांना ते कमी लेखत नव्हते. किंबहुना शिवरायांचे श्रेष्ठ्त्व त्यांच्या साहित्यातून दिसून येतेच. शिवराय हे निरक्षर नव्हते. आज याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे महात्मा फ़ुलेंना कोणताही दोष लागत नाही. आज महात्मा फ़ुले हयात नाहीत. ते हयात असताना जर असे पुरावे उपलब्ध झाले असते तर त्यांनी आपल्या भुमिकेत निश्चित बदल केला असता.किंबहुना त्यांना या गोष्टींचा खुप आनंदच झाला असता. महात्मा फ़ुले हे खरे सत्यशोधक छ्त्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे अनुयायी होते. परंतु महात्मा फ़ुलेंच्या शिवरायांविषयीच्या बोलण्याची तुलना गडकरींच्या राजसंन्यास शी करणे म्हणजे कानाखाली चपटी मारलेल्याची तुलना आयसीस च्या आतंकवाद्याशी करण्यासारखे आहे. शिवरायांना दुय्यम ठरवून संभाजी राजेंना चरित्रहीन ठरवण्यापेक्षा केवळ अक्षरशुन्य म्हणने हा खुप मोठा अपमान हिंदुत्ववाद्यांना वाटतो यातून शिवरायांविषयीचा आदर नाही तर महात्मा फ़ुलेंविषयीचा द्वेषच स्पष्ट जाणवतो. केळुस्कर गुरुजींबद्दल बोलायचे झाले तर त्यांनीच आपल्या छत्रपती शिवाजी महाराज या पहिल्या शिवचरित्रामध्ये प्रस्थावनेत नमुद असे केले आहे कि, "लेखकाला ज्या गोष्टी आज सत्य वाटल्या व ज्या क्रमाने त्या घडल्या अशी त्याची खात्री झाली, त्या गोष्टी त्या क्रमाने त्याने प्रस्तुत ग्रंथात नमूद केल्या आहेत. अनेक पंडितांचे इतिहाससंशोधनाचे काम सांप्रत चालू आहे. त्यांचे शोध जगापुढे आल्यावर प्रस्तुत चरित्रलेखात दुरुस्ती करावी लागेल हे उघड आहे." त्यामुळे आज आपण त्यांच्या ग्रंथातील अनैतिहासिक मुद्दे बाजुला काढू शकतो पण गडकरींच्या राजसंन्यास मधील असे मुद्दे बाजुला काढण्याची हिम्मत गडकरीप्रेमी हिंदुत्ववाद्यांमध्ये आहे काय ?. त्यामुळे गडकरींच्या राजसंन्यास मधील विक्रुतीची तुलना इतर इतिहासकारांच्या लेखणाशी करणे ही सुद्धा एक विक्रुतीच आहे असं म्हणावं लागेल.
शंभुप्रेमींची जबाबदारी
           संभाजीराजे म्हणजे शिवरायांच्या वंदणीय व्यक्तिमत्वातून हे प्रकटलेले शंभुतेज. आपल्या अफ़ाट पराक्रमाने शंभुराजांनी हिंदवी स्वराज्याच्या सीमारेषा वर्धिष्णू करीत या तेजाची दाहकता सिद्ध केली. शिवरायांनंतर हिंदवी स्वराज्यावर लाखोंचा फ़ौजफ़ाटा घेऊन चालून आलेल्या औरंगजेबाला नामोहरण करणे ही सामान्य बाब नव्हती. नऊ वर्षाच्या अखंड संघर्षात एकही लढाई हरले नाहीत किंवा एकही तह केला नाही.मोगली सल्तनत, पोर्तुगिज, इंग्रज या बलाढ्य शत्रुबरोबरच स्वकियांविरोधात हिंदवी स्वराज्याच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी केलेली एकाकी झुंज ही निश्चितच संभाजीराजांच्या महानतेची आणि पराक्रमाची साक्ष देते.हे सगळं त्यांनी कोणासाठी केले ? स्वराज्यासाठी, तुमच्या - आमच्यासाठी. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षीच संभाजीराजेंनी स्वराज्यकार्यी हौतात्म्य पत्करले. अटकेत असताना त्यांनी दिर्घकाळ यमयातना सहन केल्या, एक - एक अवयव तोडला गेला, अंगाची साल सोलून काढण्यात आली, डोळे काढून जीभ कापली गेली, पायापासून ते मस्तकापर्यंत अवघ्या शरीराची खांडोळी केली गेली, आणि हे सगळं सहन केलं ते स्वराज्यासाठी, आपल्या साठी. एवढ्या मरणयातना सहन करूनही स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा अभेदच राखुन बलिदानाची, त्यागाची एक परंपरा या राष्ट्राला समर्पित केली जिला देशातच काय पण जगाच्या इतिहासात तोड नाही. पण मालती तेंडुलकर "मराठ्यांचा राजा" या नाटकात म्हणतात, "संभाजी म्हणजे स्वाभिमानाची व शौर्याची जळती मशाल, परंतु दुर्दैवाने ते महाराष्ट्रात जन्मले ! त्यांच्या अतुल व अमोघ क्रुतीला आमच्या कारस्थानी इतिहासकारांनी हिडिस रुप दिले व मानभावी इतिहासकारांनी त्याला माना डोलवल्या". याचप्रमाणे संभाजी राजांच्या इतिहासाचे विक्रुतीकरण पुन्हा होऊ शकते.आपल्या समाजाची मानसिकता ही नाटक, कादंबरी, चित्रपट या माध्यमातून मांडला जाणारा इतिहास हाच खरा असे माननारी आहे. कारण ग्रंथापेक्षा या नाटक आणि चित्रपट माध्यमांचा प्रभाव खुप असतो. हेच काही वर्षात हे नाटक प्रकाशित होऊन त्या विक्रुतीखाली संभाजी राजांचा खरा इतिहास दडपला जाऊ शकतो. त्यामुळे संभाजी राजांचं खरे चरित्र आणि इतिहास सर्वांसमोर आणने हे महत्वाचे कर्तव्य आहे. संभाजी राजांचे मद्यान्हीच्या तळपत्या सुर्यप्रकाशाइतके शुद्ध चरित्र सर्वांसमोर आणने हे शंभुप्रेमींचे आद्य कर्तव्य आहे, हिच सर्वात मोठी जबाबदारी आहे. 

10 March 2014

अमर जाहले शंभुराजे !

शिवशाहीर जगदीशचंद्र पाटील
बुलढाणा
|| जय शिवराय | जय शंभुराजे | जयोस्तु मराठा | जयोस्तु महाराष्ट्र ||
              मराठा स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजे म्हणजे जगातील इतिहासकारांचं न सुटलेलं कोडंच आहे. शंभुराजे या महानायकाने हिंदुस्तानातील हजारो साहित्यिकांना, कादंबरीकारांना, कथाकारांना, नाटककारांना, चित्रपट निर्मात्यांना वेगवेगळ्या प्रकारे खाद्य पुरविले. बुद्धीच्या अनेक ठेकेदारांनी आपापल्या पद्धतीने शंभुराजांचे चरित्र लोकांसमोर मांडले.ते सुद्धा बर्याच प्रमाणात विक्रुत चरित्र. शंभुराजांच्या विषयी उणीउरी दोनशे वर्षे गैरसमजांचे जे पिक आले, त्याला कारणीभूत होती ती मल्हार रामराव चिटणीसची बखर; परंतू कै.वा.सी.बेंद्रे यांनी चाळीस वर्षे कष्ट घेऊन शंभुचरित्राचा खरा इतिहास उभा केला आणि जाज्वल्य इतिहासातून अनेक लेखकांना दिव्य द्रुष्टी दिली. त्यामध्ये शिवाजी सावंत, डॉ.जयसिंगराव पवार, विश्वास पाटील, डॉ.कमल गोखले, विजय देशमुख यांसारख्या विद्वानांनी खरे आणि भव्य दिव्य असे  शंभुराजांचे चरित्र जनमानसांसमोर आणले. शंभुराजांनी वयाच्या नवव्या वर्षापासून राजकारणाचे धडे घेतले. हिंदी व संस्क्रुतमध्ये कमी वयात चार ग्रंथ लिहिणारे शंभुराजे एकमेव साहित्यिक होते. मोअज्जमच्या छावणीत शिवरायांनी त्यांना दोन वर्ष पाठविले होते. वयाच्या चौदाव्या वर्षी ते राजकारभारात लक्ष घालू लागले आणि वयाच्या सतराव्या वर्षी रायगडावर युवराज म्हणून घोषित झाले.एकोणीसाव्या वर्षी पन्हाळा, श्रुंगारपूर आणि प्रभावलीचे सरसुभेदार म्हणून नेमले गेले.
        छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार ते दिलेरखानाच्या गोटात गेले आणि स्वराज्यावर होणारे मोघली आक्रमण काही काळ थोपवून धरले. या वेळेस छत्रपती शिवराय दक्षिण मोहिमेवर गेलेले होते. शंभुराजे जालन्याकडील लढाईवर गेले असता, थोरले महाराज निधन पावले. महाराजांच्या निधनाचे व्रुत्त आणि राजाराम महाराजांना गादीवर बसविण्याचे कारस्थान त्यांना पन्हाळ्यावर कळले. त्यानंतर त्यांनी पन्हाळ्यावरूनच कारभार पाहिला. या ठिकाणी शेकडो मराठे त्यांना येऊन मिळाले. रायगडावरील कट करणार्यां प्रधानमंत्र्यांनी शंभुराजांना अटक करण्याचा प्रयत्न केला; परंतू तो त्यांनी हाणून पाडला व स्वत: रायगडावर दाखल झाले. शिवरायांच्या काही मंत्र्यांनी विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार समजताच सर्वांना त्यांनी देहान्त शासन केले. या शिक्षेमध्ये बाळाजी आवजी चिटणीसचा समावेश होता. बाळाजी हा मल्हार रामराव चिटणीसचा खापरपणजोबा होता. आपल्या खापर पणजोबाला शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिले होते. म्हणून त्यांचा सूड घेण्यासाठी तब्बल १२२ वर्षांनी मल्हार रामरावाने शंभूराजांच्या चरित्राची बखर लिहून त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान केले. पण असल्या गोष्टी इतिहासाला मानवत नसतात. शंभुराजे हे साधुसंतांचा आदर करणारे होते. छत्रपती शिवरायांच्या अलौकिक व्यक्तिमत्वातून हे शंभुतेज प्रकटले होते. आपल्या अचाट पराक्रमाने शंभुराजांनी मराठा स्वराज्याच्या सीमारेषा वर्धिष्णू करीत या तेजाची दाहकता सिद्ध केली होती. शिवरायांच्या निधनानंतर अवघं मराठा स्वराज्य नेस्तनाबूत करण्याच्या प्रचंड महत्वकांक्षेने सात लाखांच्या अफ़ाट फ़ौजेसह दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाला नामोहरण करून सोडणं ही काही समान्य बाब नव्हती. या बलाढ्य मोगली सल्तनतीशिवाय जंजिरेकर सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रजांसारखे शत्रूदेखील स्वराज्याचे लचके तोडायला एकवटून उभे झालेले होते. हे कमी पडावेत म्हणुन की काय आमच्यातलेही हिंदू विरोधकही तलवार उपसून सज्ज उभे होतेच. या सर्व आघाड्यांवर मराठा स्वराज्याच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी सांडलेली संभाजी राजांची एकाकी झुंज, ही निर्विवादपणे त्यांच्या महानतेची आणि पराक्रमाची यथार्थ सक्ष देऊन जाते.उण्यापुर्या नऊ वर्षाच्या अखंड संघार्षात सुमारे सव्वाशे लढाया जिंकणारे आणि एकही तह न करणारे संभाजीराजे अलौकिक आणि असामान्य होते. अशा कडव्या धेयवादासाठी आणि अस्मितेसाठी काळीज आणि मनगट संभाजीराजांचेच हवे.येर्यागबाळ्याचे ते काम नव्हे.
           वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षीच संभाजीराजांनी स्वराज्यकार्यी हौतात्म्य पत्करले. अटकेत असताना संभाजीराजांच्या दीर्घाकाळ यमयातना सुरु होत्या.तोज एक एक अवयव तोडल्या जाऊन त्यांच्या संपुर्ण अंगाची साल सोलून काढण्याच आली.डोळे काढून जीभ कापल्या गेली. पायापासून ते मस्तकापर्यंत अवघ्या देहाची खांडॊळी करून संभाजीराजांचे मस्तक भाल्याच्या टोकावर रोवण्यात आले. देह खंडित झाला तरीही शंभुराजांचा स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा अभेदच राहिली. कारण शिवशाहीची हीच उदात्त शिकवण होती. छत्रपती शिवरायांच्या आदर्श पावलांवर पाऊल टाकीत या सिंहपुत्राने बलिदानाची, त्यागाची एक नवी परंपरा राष्ट्राला समर्पित केली. जिला देशातच काय पण जगाच्या इतिहासात तोड नाही. 
रणधुरंदर महापराक्रमी शंभुराजांना मानाच मुजरा... जय शंभुराजे

16 January 2014

मराठा सेवा संघ बदलतो आहे?

             सिंदखेडराजाला १२ जानेवारीला होणारा मराठा सेवा संघाचा जिजाऊ महोत्सव. या सार्‍या उत्सवांना लाखोंची गर्दी असते. हे उत्सव आयोजित करणार्‍या संस्था, संघटना या महाराष्ट्राचे राजकारण व समाजकारणावर निर्णायक प्रभाव टाकणार्‍या असल्याने स्वाभाविकच या उत्सवांमध्ये कुठले निर्णय होतात, कार्यकर्त्यांना कुठली दिशा दिली जाते, याकडे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसोबतच माध्यमांचंही बारकाईने लक्ष असतं.
महाराष्ट्रात काही संस्था-संघटनांच्या वार्षिक उत्सवांचं एक वेगळं महत्त्व आहे. दसर्‍याच्या दिवशी नागपुरात दीक्षाभूमीवर आयोजित होणारा धम्मचक्र परिवर्तन दिन, त्याचदिवशी रेशीमबागमध्ये होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, तिकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा उत्सव आणि
         या संघटनांमध्ये मराठा सेवा संघ ही तुलनेने नवी संघटना. मात्र केवळ २४ वर्षांच्या कालावधीत या संघटनेने सार्‍याच क्षेत्रातील दिग्गजांना दखल घेणे भाग पडावे, असे आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच जिजाऊ महोत्सवात काय निर्णय होतात, याबाबत सार्‍यांनाच उत्सुकता असते. मराठा सेवा संघाबद्दल त्यांचे टीकाकार, विश्लेषक काहीही म्हणो, मात्र महाराष्ट्राच्या समाजजीवनात त्यांनी घडविलेले काही बदल कोणालाच नाकारता येणार नाही. मराठा सेवा संघाचं सर्वात मोठं कुठलं योगदान असेल, तर हजारो वर्षे चुकीच्या रूढी-परंपरा आणि कर्मकांडांचा जबरदस्त पगडा असलेल्या बहुजन समाजाला त्यांनी खडबडून जागं केलं. इतिहासाचं जाणीवपूर्वक केलेलं विकृतीकरण या समाजाच्या लक्षात आणून देताना त्यांना त्यांच्या सत्त्वाची जाण सेवा संघाने करून दिली. असं म्हटलं जातं की, पोथी वाचणार्‍या समाजाला सेवा संघानं पुस्तकं वाचायला शिकविली. ते खरंच आहे. धार्मिक पोथी, पुराणांशिवाय काही न वाचणार्‍या समाजाला सेवा संघानं फुले, आंबेडकर वाचायला लावले. हे परिवर्तन खूप मोठं आहे. सामाजिक समरसता वगैरे अशा भंपक गोष्टी न करता एका समाजाची मानसिकता बदलविण्याचं मोठं काम सेवा संघानं केलं आहे. एका मोठय़ा समूहाला आत्मभान देणारं हे परिवर्तन आहे. हा असा बदल घडवायला शेकडो वर्षे जातात. 
         मात्र २५ वर्षांपेक्षा कमी कालावधीत सेवा संघाने हे काम केलं. दुसरं महत्त्वाचं कुठलं काम सेवा संघानं केलं असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था अशा जातीयवादी आणि समाजात द्वेषाची पेरणी करणार्‍या संघटनांविरुद्ध ताकदीने शड्ड ठोकला. सरकार नावाची यंत्रणा आणि इतर पुरोगामी संघटना या संस्थांचा मुकाबला करताना सपशेल अयशस्वी ठरत असताना सेवा संघाने वैचारिक मार्गाने आणि वेळप्रसंगी मैदानातही या संघटनांना जबरदस्त आव्हान दिले. बहुजन समाजाचं ब्राह्मणीकरण करायला निघालेल्या या संघटनांच्या कारवायांना सेवा संघाने बर्‍यापैकी चाप लावला हे कबूल करावंच लागतं. पुरोगामी विचारसरणीचा पुरस्कार करणारा एक जबरदस्त दबाव गट सेवा संघाच्या निमित्ताने महाराष्ट्रात तयार झाला. हे परिवर्तन करताना मराठा सेवा संघालाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखाच द्वेषाचा मार्ग पत्करावा लागला. ब्राह्मण समाजाला टार्गेट करून इतर जातीयवादी संघटनांप्रमाणेच स्वतंत्र विचार न करू शकणारी पिढी सेवा संघाने तयार केली, असा आरोप त्यांच्यावर होतो. या आरोपात काही अंशी तथ्यांश निश्‍चित आहे. सेवा संघाच्या प्रारंभीच्या काळात आणि अगदी आताआतापर्यंतही देशातील प्रत्येक समस्येला ब्राह्मण जबाबदार आहेत, अशी मांडणी सेवा संघाकडून होत होती. कुठलाही अपवाद न करता सरसकट सर्व ब्राह्मणांना सेवा संघाचे नेते आडव्या हाताने घेत होते. ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या सर्व प्रथा, परंपरा मोडित काढल्या पाहिजेत, आर्यांनी (ब्राह्मणांनी) या देशावर आक्रमण केल्यानंतर येथील समाजाला गुलाम केल्यानंतर ज्या-ज्या गोष्टी लादल्या, त्या सार्‍या नाकारायचा चंग सेवा संघानं बांधला. त्यातून मग गुलामगिरीची सारी प्रतीकं झिडकारून लावायचे आवाहनही सेवा संघाच्या विचारपीठावरून करण्यात येत असे. 
         अगदी आताआतापर्यंत महिलांनी मंगळसूत्र घालू नये, कुंकू लावू नये, बांगड्या घालू नये, असे ठासून सांगणारे काही वक्ते जिजाऊ महोत्सवात असायचे. हिंदू धर्मातील बहुसंख्य ज्यांना देव म्हणून भक्तिभावानं पूजतात, ते आपले देव असू शकत नाही, असेही सांगितले जात असे. हा सर्व प्रचार सनातन व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारण्यासाठी व्यूहरचना म्हणून कदाचित ठीक असेल, पण यातून सामान्य कार्यकर्त्यांच्या डोक्यात जबरदस्त गोंधळ तयार होत होता. तसंही देवाधर्माच्या विषयात हात टाकला की सॉलिड केमिकल लोचा निर्माण होतो, हा पुरोगामी संघटनांचा नेहमीचा अनुभव आहे. मराठा सेवा संघही सध्या या अवस्थेतून जात आहे. त्यामुळेच परवाच्या जिजाऊ महोत्सवात डॉ. आ. ह. साळुंखे यांनी सुधारित शिवधर्मगाथेबद्दल माहिती देताना मानवी स्वातंत्र्यांचा आदर करण्याचे आवाहन करताना महिलांनी मंगळसूत्र घालावे की नाही, कुंकू लावावे की नाही, बांगड्या घालाव्या की घालू नये, हा त्यांचा अधिकार आहे. या विषयात जबरदस्ती करता येणार नाही, अशी भाषा वापरली तेव्हा सेवा संघाचे अनेक कार्यकर्ते चमकले. सेवा संघ बदलत तर नाही ना, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. जिजाऊ महोत्सवाचे अनेक वर्षांपासून वार्तांकन करणार्‍या वार्ताहरांनाही सेवा संघ बदलतो आहे, काहीसा सौम्य होत आहे, हे या वेळी जाणवले. कधी काळी क्रिकेट या खेळाची तीन लाकडं आणि अकरा माकडं अशा वाक्यात संभावना करणारा सेवा संघ आता एका क्रिकेटपटूला मराठा विश्‍वभूषण पुरस्कार देतो, ही विसंगतीही अनेकांना खटकली. अर्थात, रेखाताई खेडेकरांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविण्यासारख्या अनेक विसंगती सेवा संघाच्या प्रवासात दाखविता येतात. मात्र सेवा संघाच्या विचारपीठावर आणि कोअर मीटिंगमध्ये त्यावर वेळोवेळी मोकळेपणाने चर्चाही होते. या लेखाचा तो विषय नाही. सेवा संघ बदलतो आहे का, हा मुद्दा आहे. या विषयात सेवा संघाच्या जडणघडणीत सुरुवातीपासून सहभागी असलेल्या काही जणांसोबत चर्चा केली असता त्यांनी सेवा संघ निश्‍चितपणे बदलत आहे, हे मान्य केले. मात्र हे बदल वैज्ञानिक बदल असून संघटनेला निकोप वाढीकडे नेणारे बदल असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ब्राह्मण समाजाबद्दलचा आक्रमक प्रचार आणि प्रतीक नाकारण्याबाबतचा टोकाचा अट्टाहास याबाबत सेवा संघामध्ये प्रारंभापासूनच दोन मतप्रवाह होते. 
         एक गट इतिहासाचं विकृतीकरण ज्यांनी केलं, ज्यांनी वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था निर्माण करून बहुजन समाजाला हजारो वर्षे गुलामगिरीत ठेवलं त्यांच्याबद्दल आक्रमकतेनेच बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे आणि त्यांनी निर्माण केलेली सारी प्रतीकं उखडून फेकली पाहिजे, नाकारली पाहिजे, या मताचा होता. दुसरा गट मात्र हजारो वर्षांच्या माथी मारलेल्या का होईना परंपरा, प्रतीकं काही दिवसात मोडीत काढता येत नसतात. तसेही माणसं जबरदस्तीने बदलत नसतात. त्यामुळे वैयक्तिक आचरणाबाबत कुठलेही फतवे काढू नयेत. माणसं तयार झालीत की त्यांचे अपसमज आपोआप मोडित निघतात. त्यामुळे टोकाचा विचार न करता चळवळ निकोप आणि सशक्त केली पाहिजे, या मताचा होता. कोणं कोणत्या जातीत जन्माला यावं हे कोणाच्याच हाती नसतं. त्यामुळे ठरावीक समाजाबद्दल न बोलता प्रवृत्तीला विरोध असला पाहिजे, असेही हा गट आग्रहाने सांगत होता. शेवटी डॉ. आ. ह. साळुंखेंसारख्या ज्यांचा इतिहास, धर्म, संस्कृती, समाजशास्त्राबद्दल प्रचंड अभ्यास आहे, त्यांना भूमिका ठरविण्याचे अधिकार देण्यात आले. डॉ. साळुंखे यांचा लौकिक हा अतिशय संतुलित व निकोप विचार करणारा विचारवंत असा आहे. त्यांनी शिवधर्मगाथेतील बदलाबाबत सांगताना, 'लढाई ही ईश्‍वराच्या अस्तित्वाबद्दल कधीच नव्हती. संघर्ष हा शोषणाविरोधातला आहे. त्याविरोधात ठामपणे उभं राहून समतेची शिकवण देणं हाच शिवधर्माचा गाभा आहे,' असे सांगितले. हे त्यांचं सांगणं समजून घेण्याजोगं आहे. 
            विवेकवाद आणि विवेकाचा आधार हीच सुजाण म्हणविणार्‍या सर्वांची जगण्याची पद्धत असली पाहिजे. त्यातही परिवर्तनाच्या चळवळीत काम करणार्‍या माणसांनी चळवळीच्या वाढीसाठी आवश्यक ते बदल स्वीकारले पाहिजे. बदल हा शेवटी माणसाचा स्थायिभाव आहे आणि तसंही कट्टरता ती कोणाचीही असो, शेवटी ती नुकसानच करते. त्यामुळे रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करताना एका व्यापक उद्देशाने मराठा सेवा संघात सकारात्मक बदल होत असेल, तर त्याचं स्वागतच करायला हवं. 

(लेखक दैनिक 'पुण्य नगरी'चे कार्यकारी संपादक आहेत.) भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६