29 March 2013

॥ राजा शिवछत्रपती ॥

॥ राजा शिवछत्रपती ॥
लेखक : बळवंत मोरेश्वर पुरंदरे
आव्रुत्ती चौदावी, दिनांक : १ एप्रिल २००१
        राजाशिवछत्रपती ग्रंथ पुरंदरे यांनी १ एप्रिल २००१ रोजी प्रसिद्ध केला. त्यांनी महाराष्ट्रातील लोकांना चांगलच एप्रिल फ़ुल बनवलं असं दिसतं. त्यांनी ग्रंथात पान नं.१२५ व १२६ तसेच १८१ व १८२ वर जेम्स लेन सारखेच लेखन केलेले आहे. कदाचित त्यांना असं सुचवायचं आहे की काही शब्द व वाक्य वगळून अर्थबोध असे उतारे करा.

पुरंदरेंच्या ग्रंथातील काही लेखन : पंतांचे शहाजीराजांवर, आईसाहेबांवर, शिवबाबर, भोसले कुटुंबावर असे प्रेम होते की स्वामी आणि सेवक हे नाते उरलेच नव्हते. पंत म्हणजे भोसल्यांच्या कुटुंबातलेच. आजपर्यंतची सारी हयात राजांच्या पदरीच गेलेली होती. ते वयाने सत्तरीच्या दारात उभे होते. शहाजी राजेही त्यांना फ़ार मान देत. राजांच्या घरातले ते मानाचे, धाकाचे, दरार्याचे, मायेचे आणि ममतेचे वडीलधारे पुरूष होते, ते सर्वांवर हक्काने प्रेम करीत.
सतत दोन पिढ्या पंत राजकारणात वावरत असावेत. राजांचा आणि त्यांचा स्वभाव सारखाच होता. स्वतंत्र दौलत स्थापावी असं दोघांनाही वाटले. आईसाहेबांवर ते फ़ार माया करीत. हि बाई अशी तशी नाही, हिची जडण घडण काही वेगळीच आहे; पण त्यांची ती मुळची रग थोडीच जाते, हे त्यांनी ओळखले होते. शिवबांवर तर खुद्द शहाजीराजांचाही नसेल इतका जीव पंताचा होता.
ते अधुनमधुन, कधी कधी स्वत:च्या संसारातही लक्ष घालीत. पंत देशस्थ रुग्वेदी ब्राह्मण. गोत्र ? गोत्र शांडिल्य; पण खरे म्हणजे त्यांचे, आईसाहेबांचे आणि शिवबाचे गोत्र एकच होते. पंत म्हातारे झाले होते; पण त्यांच्या स्वभावातला हौशीपणा कमी झाला नव्हता. मोठा हौशी म्हातारा !. म्हातारपणी हौस करायला मन तरूण असावे लागते.
वरील उतार्यांमध्ये एकही शब्द किंवा वाक्य बाहेरचे नाही. किंवा अनुस्वार मात्रा, उद्गारवाचक चिन्हे, प्रश्नचिन्हे  बाहेरून लावलेली नाहीत. वरील लिखाण पुरंदरेंच्या कादंबरीमध्ये पान नं.१२५ व १२६ वर आहे.

पाने १८१ व १८२ वर पुरंदरे त्यांच्या ग्रंथात लिहितात : एखाच्या शिल्पकाराने देवाची सुंदर मुर्ती घडवावी, प्रसन्न देवपण त्या मुर्तीत उतरावे, ओंजळभर फ़ुले भक्तिभावाने वाहावीत अन असे म्हणावे, त्वमेव माता पिता त्वमेव... त्वमेव सर्व ममदेव देव! ही मुर्ती मी घडवली, मीच हिचा निर्माता आहे, हा अहंकार तेथे रतीभरही न सापडावा. त्यांचा आनंद त्या शिल्पकाराचा होता, शिवरायांची मुर्ती त्यांनी घडवली होती. पण ही मुर्ती मी घडवली, मीच हिचा निर्माता आहे असा अहंकार पंतांच्या मनात कधीही उमटला नाही.
            याआधीच्या जुण्या आव्रुत्ती मध्ये सुद्धा पुरंदरेनी जे अकलेचे तारे तोडले आहेत ते तर कहरच आहेत. हे सर्व करण्यामागे पुरंदरेंच्या मनात काय पाप आहे ते दिसून येते. हळू हळू येईल बाहेर यांनी काय काय दिवे लावलेत ते. बर्याच ठिकाणी पुरंदरेनी घेतलेले मुद्दे अनाकलनीय आहेत. परत मला प्रश्न पडतो की पुरंदरेंना शिवशाहीर का म्हंटलं जातं ? वासरात लंगडी गाय शहाणी असा प्रकार आहे हा. पण आज खर्या इतिहासकारांमुळे पुरंदरेंचे पितळ उघडे पडले आहे हे निश्चित.
            पुरंदरे शिवरायांचा इतिहास सांगत नाही, तर ते दादोजी कोंडदेवचे उदात्तीकरण पडद्यामागून करत आहेत. पुरंदरेनी लेन ला कोणत्या प्रकारची माहीती दिली हे चाबकाचे फ़टके मारून काढून घ्यावेत. या अगोदरच सोलापुरच्या समारंभात त्यांनी जेम्स लेन च्या पुस्तकाचे कौतुक केले होते. पुरंदरेचे वरील उतारे जिजामाता, शिवाजी राजांचे चरित्रहनन करतात. आता पर्यंत साप सोडून जमीन धोपटण्यासारखा प्रकार चालला होता. चोर सोडून संन्याशाला फ़ाशी असा प्रकार चालू होता. मराठी संघटना, मराठा समाज यांच्याविषयी पुरंदरेंच्या मनात असुया आहे. व्यासपिठावर त्याचे खाण्याचे दात व दाखवण्याचे दात निराळेच असतात.

पुरंदरे पान नं.५० व लिहितात : मरायला माणसे मराठ्यांची चांगली. दुसर्यासाठी वक्तशीरपणे मरतात. कडक झुंजतात. अगदी कोंबड्यासारखी जीव खावून! मालकाला यश मिळवून देतात...कुठेही चार दाणे फ़ेकले की तेवढे टिपीट पोट भरतात. त्यांना मालकाने कापून खाल्ले तरी त्यांची तक्रार नसते.
            पुरंदरेने लेनच्या पुस्तकाची स्तुती केलेली आहे. आनंद देशपांडे यानेे सप्टेंबर २००३ च्या दैनिक "सामना" मध्ये लेनच्या पुस्तकाचे कौतुक करताना म्हंटले की लेन चे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणुन ग्रंथालयामध्ये असावे. ब्राह्मण संपादक, वार्तापत्रे यांनी मराठी संघटनांना दोष दिला आहे. जेम्स लेनच्या पुस्तकाला कारणीभुत झालेला पुरंदरे यांनी मात्र तोंड उघडले नाही. ते पाहत आहेत महान नाटक. त्यांचे स्वतःचे नव्हे; महाराष्ट्रातील लोकभावनांचे. चाणक्यनितीचा मनुष्य तो म्हणतो "मी माझ्या ’राजाशिवछत्रपती’ चौदावी आव्रुत्ती या ग्रंथात एवढे लिहुनही त्यांच्या डोक्यात अजुनही कसे शिरले नाही ?" या सर्व सर्व घटनांत पुरंदरे सर्वात पुढे आणि पिलावळ त्याच्या मागून. 
            पुरंदरे लेनची स्तुती करतात, धिक्कारही करतात. बेभरवशाचा माणुस! लोकं म्हणतात त्याला शाहीर. पण मला अजुनही समजलं नाही की पुरंदरेंना शाहीर का म्हणतात. कधिही शाहिरी न गायलेली. पण ब्राह्मण लेखकांनी दिलेला शाहिरीचा डगला मात्र अंगावर घालतात आणि शाहिरीचं ढोंग करून ,शिवरायांचा खोटा इतिहास सांगुण साध्या भोळ्या लोकांना फ़सवतात. मराठ्यांचा खरा इतिहास सांगण्याऐवजी खोटा इतिहास सांगतात.
         आधीच्या काळात होनाजी बाळा, राम जोशी, पट्ठे बापुराव हे शाहीर होते. शाहीर स्वतंत्र असतो. तो बुद्धीचातुर्याने लोकांचे मनोरंजन करतो. पोवाडे, कथानकांचे वर्णन करतो. पुरंदरेंचा रग मुस्लिमद्वेष. जळी, स्थळी, पाषाणी त्यांना मुसलमान दिसतो. मुसलमान राज्यकर्यांविषयी ते राईचा पर्वत करतात. पण खरं तर मुस्लिम सुलतानांनी जेवढे अत्याचार प्रजेवर केले तेवढे  अत्याचार पेशवे काळात प्रजेवर झाले आहेत.
            पुरंदरेचा इतिहास थोडा, कल्पना मात्र भव्य. कल्पनेतच वाचायचं...अहंगडाला गोंजारून, सत्याला बाजुला सारून. पुरंदरेवर सेतूमाधवराव पगडी, शेजवळकर, एम.व्ही.धोंड यांनी कडाडून हल्ला केला आहे. हे सर्व जण म्हणतात की ब्राह्मण शाहिरांनी, कादंबरीकारांनी, कथाकारांनी, नाटककारांनी, सिनेमावाल्यांनी इतिहास नासवला आहे. या सर्वांवर पुरंदरेने कडी केली आहे. 
इतिहासकार, इतिहाससंशोधक, श्रीमंत कोकाटे यांनी पुरंदरेच्या फ़ोटोसहीत एका छोट्याशा पुस्तिकेमध्ये लिहिले आहे की, "बाबा पुरंदरे हाच खरा जेम्स लेन" ते म्हणतात लेन च्या लिखाणासारखेच पुरंदरेंचे लिखान भयानक, वाचवतही नाही. मन,अंत:करण द्रुढ करावे लागते. जसजसे वाचत जावे तसतसे रक्त तापत जाते आणि शेवटी उद्गार बाहेर येतात. "काय हा उलट्या काळजाचा माणुस! याने तर जिजामाता, शिवबांचे पंख लावून कोट्यावदी रुपये मिळवले आणि या अशा माणसाने जिजामातेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवावेत ! "
काही वर्षापुर्वी प्रतिकात्मक "शिवस्रुष्टी" शिवाजी पार्क, मुंबई इथे उभी केली होती. चिपळून तालुक्यातील डेरवण येथे कोल्हापुरच्या वालावलकर धर्मादाय विश्वस्त संस्थेकडून "शिवस्रुष्टी" उभा केली. उद्घाटन सरसंचालक सुदर्शन यांच्या हस्ते झाले. त्यासाठी त्यांना त्यांच्या डोक्यावर पडलेल्या चपलांच्या पावसाचे स्वागत करावे लागले. कारण होते "शिवस्रुष्टी"त रामदास आणि कोंडदेवाची शिल्पे. तेथे जी शिल्पे आहेत तेथे शहाजी राजांची शिल्पे नाहीत.

॥ राजा शिवछत्रपती ॥ पान २

             पुण्यात लालमहालाच्या पश्चिम बाजुला शिवाजी राजे सोन्याच्या नांगराने मशागत करत आहेत आणि शेजारी जिजामाता, शिवबा आणि कोंडदेव यांची शिल्पे दाखवली आहेत. त्या ठिकाणी शहाजी राजेंचे शिल्प नाही. ही शिल्पे महापालिकेची परवानगी न घेता पुरंदरेनी निनाद बेडेकर आणि त्याचा पंत यांच्या साह्याने उभारली आहेत. जेजुरीला शिवाजी राजे - शहाजी राजे भेट होत आहे. अशी शिल्पे आहेत. मतितार्थ हा सांगायचा आहे की, पुण्याहुन शिवाजी राजे, जिजामाता आणि कोंडदेव हे जेजुरीपर्यंत आले आहेत आणि शहाजी महाराज बेंगलोर वरून जेजुरी पर्यंत आले आहेत. जणूकाही पहिल्यांदाच शिवाजी राजे आणि शहाजी महाराजांची भेट होत आहे, हे पुरंदरे यांनी सूचित केले आहे. वरील सर्व ठिकाणी शिल्पे उभारण्याचे कारस्थान पुरंदरेनी केलं आहे. पण, वस्तुस्थिती अशी आहे की, शिवाजी राजे स्वराज्याची स्थापना करत असताना ते शहाजी महाराज आणि जिजामाता यांच्या सहवासात राहिले होते. शहाजी महाराजांनी या दोघांनाही मार्गदर्शन केलेले आहे. (डॉ.जयसिंगराव पवार)
          महाराष्ट्रात पुरंदरेनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर महानाट्याचे अनेक प्रयोग केले. विषेश करून प्रयोगास मराठा सरदार, जहागिरदार, शिवाजी राजांचे वंशज, आमदार, खासदार मंत्री या सर्वांचे सहाय्य घेतले. शिवरायांच्या नावाने ललकार्या दिल्या. प्रयोगाच्या सुरुवातीस उपस्थित असलेल्या थोरामोठ्यांवर स्तुतीसुमने उधळली. त्यांच्यासमोर आपल्या डोक्यातील इतिहास कथन केला. किर्तनकारांप्रमाने अधुनमधुन प्रेक्षकांना वेठीस धरून शिवाजीराजे आणि जिजामातेच्या नावाने घोषना केल्या. श्रोते डोलू लागले. लगेच व्यासपीठावर घोडे येऊन नाचू लागले. असा हा त्यांच्या महानाट्याचा कोट्यावदी रुपये मिळवण्याचा महान प्रयोग आहे.
         पण या प्रयोगातील महत्वाच्या घटनांचे पुरंदरे वर्णन करत नाही. अफ़जलखान वधाचे वर्णन : अफ़जलखान - शिवाजी राजे यांच्या युद्धाचे वर्णन करताना दोन्ही बाजुचे दहा-दहा संरक्षक, सय्यद बंडा, जिवा महाला, संभाजी कावजी, शिवरायांचे चुलते मंबाजी भोसले या सर्वांचे पुरंदरे वर्णन करतात; पण एक गोष्ट लपवतात, ती म्हणजे शिवरायांच्या डोक्यावर हल्ला करणारा अफ़जलखानाचा वकील क्रुष्णा भास्कर कुलकर्णी. ते द्रुष्य पुरंदरे दाखवतच नाही. अशा अनेक सत्य घटना पुरंदरे सांगत नाहीत. पुरंदरे मराठी माणसाला फ़सवत आहेत. तरुणांना त्यांच्या महानाटकांत त्यांनी बळीचा बकरा केले. ते राबराब राबले आणि पुरंदरे यांनी त्यांच्या हातावर चणे, चिरमुरे ठेवले. स्वत: मात्र पैशाला चिकटून बसले. पुरंदरे अनेक राजकीय व्यक्तिंच्या जवळ गेला आणि कार्यभाग पुर्ण झाल्यावर त्यांच्यापासून दुर गेला. आपल्या मधाळ भाषणाने त्यांच्यावर मोहिनी घालून आपलेसे करून त्यांना वापरून फ़ेकून दिले.
            प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचे मोठेपण दाखवले आहे. प्रबोधनकार ठाकरेंचे इंग्रजीत एक वाक्य आहे - Thakare Fried the brain of brahmin. अर्थ : ठाकरेंनी ब्राह्मणांचा मेंदू तळला. उद्वेगाने त्यांना असे का म्हणावे लागले. तर ब्राह्मण लेखकांनी खोटा इतिहास लिहिण्याच्या संदर्भावरून. ब्राह्मणांनी शिवरायांचा खोटा इतिहास लिहिलाच, वर त्यांच्या डोक्यावर कोंडदेव, रामदास हे दोन गुरु बसवले; पण हे दोघेही शिवाजी राजांचे गुरु नव्हते, मार्गदर्शक शिक्षकही नव्हते.
            प्रबोधनकार आपल्या "दगलबाज शिवाजी" मध्ये लिहितात की पुरंदरेचे व मेहेंदळेचे शिवाजीवरील लिखाण पौराणिक दंतकथांवर आहे. शिवाजींची स्वराज्य स्थापना ही परमेश्वराची इच्छा होती आणि त्या स्वराज्य स्थापनेला आकस्मिकरित्या रामदासांचा आशीर्वाद मिळाला. या विचारावर प्रबोधनकार हल्ला करतात. "हे केवळ ब्राह्मण लेखकांचे बिनबुडाचे पोकळ शब्द आहेत" पुढे ते लिहितात, इतिहासकारांचे कर्तव्य म्हणजे त्यांनी राष्ट्रीय महानायकांचे कार्य, त्यांचे शौर्य, त्यांचा देशाभिमान नि देशासाठी दिलेले बलिदान याचा जगात प्रसार केला पाहिजे. पण आमचे इतिहासकार राष्ट्रीय नायकांच्या कथा, पुराणं दंतकथेच्या चौकटीत बसवतात. असले इतिहासकार शिवाजी राजांना परमेश्वाचा अवतार मानतात.
          उत्तम उदाहरण प्रबोधनकार कौसल्याचे देतात, "अयोध्याचा राजा दशरथ यांची पट्टराणी कौसल्या रामाच्या वेळी गर्भवती होत्या आणि त्यांना अनेक प्रकारची स्वप्ने पडत होती", या प्रकारची दोहाळ्यांची स्वप्ने जिजाऊंना शिवबांच्या वेळी पडत होती. असले इतिहासकार छोटासा कुठला तरी धागा पकडून त्यावर कल्पनेचा भव्य राजवाडा बांधतात. त्या राजवाड्याला रुप नसते, निराळा द्रुष्टीकोन नसतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत भावनांचा खरकटवाडा. शक्य, अशक्यतेचा विचार नाही. वातावरणाची आणि त्याच्या निरिक्षणाची द्रुष्टी नाही. मानवी स्वभाव जाणण्याचं ज्ञान नाही.
            सर्वकष पाहता पुरंदरेंची कृत्ये या पलीकडची आहेत. हिंदुत्ववादी संघटनांना काळजी वाटते की, पुरंदरेंच्या मागे इतिहासाचे काय होणार ? महाराष्ट्राला शिवकथा कोण सांगणार ? यांचं आवडीचे साधन, अफ़जलखानाच्या कोथळ्याची पोस्टर्स की जी माजी कै.बाबासाहेब भोसले यांनी शिवून टाकली होती; पण या राजकीय संघटनांना अफ़जलखानाचा कोथळा उसवून, पुन्हा पोस्टर्स तयार करून समाजाला दाखवण्यात रस फ़ार. यामध्ये सर्वच पक्ष सहभागी आहेत.
          जात्यांध पुरंदरे यांनी माता-पुत्र जिजाऊ -शिवाजी राजे यांचे चरित्रहनन केले आहे. हे त्यांच्या "राजा शिवछत्रपती" १४ व्या आव्रुत्ती मध्ये आढळते. द्रुष्य स्वरुपात लालमहालातील शिवबा - जिजाऊ शिल्पे. हे पुरंदरेनी केलेले महापाप दर्शवतात. या कारणास्तव दादोजी कोंडदेवाच्या लालमहालातील शिल्पाबाबत २६ ऑगस्ट २०१० रोजी पुण्यात विराट मोर्चा निघाला. माजी न्यायमुर्ती पी.बी.सावंत व बी.जी.कोळसे पाटील यांच्या नेत्रुत्वाखाली लोकशासन आंदोलनाने कष्टकरी, शेतकरी व वारकर्यांचा मोर्चा महानगरपालिकेवर नेला होता. राज्यभरातील मच्छिमार, कोळीबांधव व आदिवासीही मोर्च्यात सामील होते. शिवप्रेमी संघटेनेचे नेतेही मोर्च्यात सामील होते. महापौर मोहनसिंग राजपाल हे मोर्च्याला सामोरे गेले. चुकिच्या मार्गाने उभारलेला पुतळा २४ तासाच्या आत काढला जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले. नेत्यांची पोटतिडकिने भाषणे झाली. वातावरण शिवमय होऊन जिंकु किंवा मरू असे होते. माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी काही आव्हाने उभी केली, अशी की पुरंदरे डाकू आहे, बाळासाहेब ठाकरे सावरकर यांच्या च्या पुतळ्याला जोडे मारतील का ?, बहुलकराचे समर्थन करणार्या ठकरेलाच काळे फ़ासायला पाहिजे.
            मराठा संघटनेचे नेते श्री मानकर, अरविंद शिंदे आणि इतर नेते म्हणाले : कोंडदेवाचा पुतळा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना ते शिल्प जर लालमहालातून हलविले नाही तर आम्ही तलवारी उपसू ! न्यायमुर्ती कोळसे पाटील म्हणाले : अम्ही मराठा - ब्राह्मण वाद घालत नसून खोटा इतिहास लिहिणार्या अपप्रव्रुत्तीविरुद्ध उमटलेला हा जनतेचा आवाज आहे. मुठभर लोकांनी आपला इतिहास लिहिल्याने खरा इतिहास समोर आलाच नाही. सर्व शिक्षणसम्राट, साखरसम्राट व नेते मराठी आहेत. पण पुतळा हलविण्याची एकाचीही हिंमत झाली नाही.(२६ ऑगस्ट २०१० - पुढारी)
           आतापर्यंत शिवचरित्राचे सिंहावलोकन केल्यानंतर लक्षात येते की, लेखकांचे दोन तट, ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तरांचा. ब्राह्मण लेखकांनी शिवाजी राजांचे अपहरण केले आहे. त्यांच्या पाठीमागून शिवरायांना सोडवण्यासाठी ब्राह्मणेत्तर लेखक धावत आहेत. मराठा नेत्यांनी बगळ्याची भुमिका घेतली. मासा दिसतो आहे पण पकडत नाहीत. मोठा मासा तर त्यांना वाकुल्या दाखवतो आहे; पण नेत्यांनी पाण्यात उभा राहून झोपेचे सोंग घेतले आहे. त्यांना जागे करण्याकरीता हा बडा मासा त्यांच्या ढेंगेतून, मागुन पुढून फ़िरत त्यांच्या वाढदिवसाचे निमंत्रण स्विकारत आहे. प्रश्न अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा असो अगर ऐतिहासिक सत्य - असत्याविषयी असो, त्या बड्या माशाशिवाय या राजकीय नेत्यांचे पान हलत नाही. शाहीर जनतेला अमृत पाजत आहेत की विष, हे राजकीय नेत्यांना समजत नाही. नेत्यांचा काडीचाही संबंध शिवरायांविषयी येत नाही; पण जेथे जेथे शिवपुतळा, तेथे तेथे हजर. त्यांना शिवरायांच्या डोळ्यातून येणारे अश्रू दिसत नाहीत. ते अश्रू सामान्य जनता पाहते आणि पुसण्याचा प्रयत्न करते.

॥ राजा शिवछत्रपती ॥ पान ३

         ब्राह्मण लेखकांनी शिवाजी महाराजांवर पक्षपाती लिखाण केले आहे. ब्राह्मण लेखक स्वत:ला श्रेष्ठ मानतात. बळीराजाचा जसा धर्ममार्तंड वामनाने बळी गेतला. तसा शिवचरित्राचा हे लेखक बळी घेत आहेत. प्रजाहितदक्ष राजा शिवरायांची गणना जगातील चिरंजींवांमध्ये आहे. "मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज"  ग्रंथ गारगोटीचे सुभाष देसाई यांनी लिहिला. या ग्रंथात रयतेच्या कल्याणकारी सम्राटांची पत्रे, साम्राज्यांचे नकाशे व वैभवशाली कालांचे वर्णन आहे. त्यांचा ग्रंथ ज्ञानाचा अनमोल खजीना आहे.
           या प्रुथ्वीतलावर क्षत्रियच उरला नाही, असे धर्ममार्तंड माणतात. त्यांचा हा अहंमगंड त्यांच्याच जातीतील माजी पोलिस प्रताप जोशी(IPS) यांनी खोडून काढला आहे. ते लिहितात : परशुरामाने २१ वेळा क्षत्रियांचा संहार केला हे काल्पनिक आहे. त्रेतायुगातील परशूरामाने कोकण भुमीची स्थापणा केली, ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. ग्रीक लोक व्यापाराच्या निमित्ताने भारताच्या किणार्यावर इ.स.६४३ ते ६५६ या दरम्यान आले. त्यातील काही लोकं कारणास्तव १४ लोकं म्रुत झाले. परशूरामाने त्या १४ लोकांना जीवंत केले व त्याचे स्थानिक स्त्रियांशी लग्न लावून दिले, अशा स्वकल्पनेनेरचलेल्या कथा खोट्या आहेत. अशाच कथा पुरंदरेे  यांनी त्यांच्या ग्रंथात रचलेल्या आहेत.
          आता एक नवीन संशोधन समोर आले आहे. पुण्यातील राम पायगुडे यांचा " परशूराम नव्हे, तर जामदग्न्य राम" अशा शिर्षकाचा प्रदिर्घ लेख इ.स.२००५ च्या "शिवराय" या विशेषकांत प्रसिद्ध झालेला आहे. त्यात जामदग्न्य राम हा क्षत्रिय राजा होता. त्याने २१ वेळा क्षेत्र संहार केला नाही तर २१ इंद्रियांवर ताबा मिळवला होता. परशूराम हा पुरुष जन्माला घालून त्याला ब्राह्मणांनी चिरंजीवित्वही बहाल करण्यात आलं आहे.
               इतिहास संशोधक, इतिहासकार डॉ.जयसिंगराव पवार जेम्स लेनच्या ग्रंथाला शिवचरित्र मानत नाहीत. लेनचा ग्रंथ म्हणजे शिवचरित्राचा अभ्यास आहे. लेन पुर्णत: बखरी, दंतकथा यावर अवलंबून आहे. शिवाजी महाराजांच्या पित्रुत्वाबद्दल कुणी तरी हेतुत: कुचाळकी सांगुण ती ग्रंथात घालण्यास प्रव्रुत्त केले असावे. जो घाणेरडा मजकूर होता, तो विनोद होता असे लेन म्हणतो, लेनला मुळ सुत्रधाराला पाठीशी घालावयाचे आहे.
          डॉ.जयसिंगराव पवार यांनी लेनचे विधान व विचारवंतांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जेम्स लेनच्या ग्रंथावर हल्ला करून त्याच्या विक्रुत विधानांना चव्हाट्यावर आणण्याचे पहिले धाडस साप्ताहिक "चित्रलेखा" चे संपादक श्री ज्ञानेश महाराव यांनी दाखवले. २२ डिसेंबर २००३ च्या "चित्रलेखा" च्या अंकात "विदेशी पुस्तक व देशी मस्तक" या शीर्षकाखाली त्यांची लेनचे विधान प्रसिद्ध करून शिवरायांप्रमाणेच जिजाऊमातेला दैवत मानणार्या काळजाला अस्सल कोब्रा नाग डसावा अशी ही पिचकारी आहे.
           डॉ.जयसिंगराव पवारांनी थोर समाजवादी नेते प्रा.मधू दंडवतेंची प्रतिक्रिया दिली आहे. प्रा.मधू दंडवते यांनी म्हंटले आहे की ऐकिव दंतकथा किंवा कुटाळकीने पसरवलेल्या महान व्यक्तीच्या जीवनाबद्दलच्या अफ़वा हा इतिहासाचा आधार होऊ शकणार नाही, हा संकेत पाळला गेला नाही तर इतिहास लेखणाची विश्वासार्हता संपुष्टात येईल. नागरिकांची सहिष्णुता आणि इतिहासकारांची विश्वासार्हता यांची सांगड हिच इतिहास संशोधनाची खरी आधारशिला होऊ शकते. सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव यांनी म्हंटले आहे की, लेनची विधाने म्हणजे त्याच्या विद्वत्तेची दिवाळखॊरीच होय. विचारवंत व पत्रकार श्री मुकुंदराव किर्लोस्कर यांनी लिहिले आहे की, लेनची विधाने अत्यंत खोडसाळ व हेतुपुर्वक गैरसमज निर्माण करणारी आहेत,विलक्षण चिड यावी अशी आहेत.
            विचारवंत प्रा.सोनाळकरांनी लेनच्या विक्रुत मनोभुमिकेवर हल्ला करताना म्हंटले आहे : लेनसारखी विधाने काही विशिष्ट जातीची मंडळी महाराष्ट्रात खाजगीत करत असतात. त्यामागे वर्णवर्चस्व मनोभुमिका आहे. इतकी थोर, बुद्धिमान, कर्त्रुत्ववान व्यक्ती फ़क्त आमच्याच जातीत जन्माला येवू शकते. बुद्धिमत्तेचा सारा ठेका फ़क्त आमच्याकडेच आहे. महाराष्ट्रातील सगळी कर्त्रुत्ववान माणसे आमच्यात जातीत जन्माला आलेली आहेत, मग हा अपवाद कसा ? कदाचित याचे मुळ आमच्याच जातीत असेल अशी ही घ्रुणास्पद विक्रुत मनोभुमिका आहे.
थोर विचारवंत न्या.बी.जी.कोळसे पाटील म्हणतात की इतका कुचका मेंदू, इतकी नीच मनोव्रुत्ती व विक्रुत प्रव्रुत्ती या देशात विशेषत: पुण्यात का निर्माण होते याचे संशोधन इतिहासकारांनी, मानसशास्त्रज्ञांनी, समाजशात्रज्ञांनीही करण्याची गरज आहे.
          वरील सर्व विचारवंतांचे विचार डॉ.जयसिंगराव पवार यांनी डॉ.वसंतराव मोरे यांच्या "जेम्स लेन संशोधक की विध्वंसक ?" या पुस्तकामध्ये प्रदिर्घ प्रस्तावनेत दिलेले आहे. 
डॉ.जयसिंगराव पवार यांनी आणखी काही विचारवंतांचे विचार दिले आहेत. भांडारकर संस्थेवरील हल्ल्याबाबत मुंबईच्या विदुषी डॉ.वर्षा शिरगावकर लिहितात: आपण एखाच्या व्यक्तीला दैवी पातळीवर बसवतो, तेंव्हा तिच्याबद्दल विश्लेषणाचा आमच्या मनात कधीच विचार येत नाही. त्या व्यक्तीबद्दल कोणी विश्लेषणात्मक काही लिहिले तर आमच्या अभिमानाचा अंगार इतका फ़ुलतो की त्याचा वणवा होतो. अमुक विशिष्ट ऐतिहासिक व्यक्तींबद्दल लिहिणे ही आमचीच मक्तेदारी असून इतरांनी तसा प्रयत्न केल्यास आम्ही पुरावे नष्ट करू, असा दहशतवाद पसरवू की, परत कोणी आमच्या अतीव प्रितीच्या व्यक्तीबद्दल लिहिण्याचे धाडस करणार नाही. ही व्रुत्ती पाशवी व्रुत्तीपेक्षा वेगळी नाही. इतिहास संशोधन ही कोणाची मक्तेदारी नाही (दैनिक.महाराष्ट्र टाईम्स : दि.१६ जानेवारी २००४)
             पत्रकार व विचारवंत श्री प्रकाश बाळ म्हणतात, आपला समाज परंपरागत, पुराणमतवादीच राहिला. राज्यसंस्था मात्र आधुनिक बनत गेली. अशा परिस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याला या परंपरा व पुराणमतवादाच्या मर्यादा पडल्या. जेम्स लेनसारखे रस्त्यावरच्या गोष्टी ऐकूण. लेनची विधाने कागदपत्रांच्या आधारावर केलेली नाहीत. इतिहास लेखनशास्त्राशी तो प्रामाणिक राहिलेला नाही.
७ फ़ेब्रुवारी २००४, NDTV वर Big Fight या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते श्री संजय निरूपम, राष्ट्र्वादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, "लोकसत्ता" चे संपादक कुमार केतकर होते. चर्चेचा विषय : भांडारकर संस्थेवरील हल्ला : कुमार केतकरांची भुमिका : हि पुस्तकबंदी केवळ लोकशाहीविरोधी नव्हे तर संस्क्रुतीविरोधी आहे. अशा मार्गाने जाणारे शेवटी बुद्धाच्या मुर्त्या फ़ोडणारे तालिबानवादीच होणार. भांडारकर संस्थेवरील हल्ला हा केवळ रानटीपणा असून पुस्तकावरील बंदी ही हुकुमशाहीचे निदर्शक आहे. आपण लोकशाहीत राहतो, आम्ही संस्क्रुती, परंपरा व विचारस्वातंत्र्य यांची बुज ठेवली आहे. विचाराला विचाराने, पुस्तकाला पुस्तकाने उत्तर दिले पाहिजे, दगडाने नव्हे !
             पण जिथे विकार आहे, विक्रुती आहे तिथे काय करायाचे ? केतकर म्हणतात : विक्रुत लेखन करणार्या लेखकांची उपेक्षा केली पाहिजे. हे केतकर यांचे बालीश उत्तर आहे. थोर स्त्रिच्या चारित्र्यावर जर तो किंवा इतर कोणी हल्ला करत असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर होत आहे. भांडारवरील हल्ला हा हिंसात्मक, रानटी नाही काय ?
             ब्राह्मणेत्तरांच्या मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांसारख्य़ा संघटना या ब्राह्मणी वर्चस्वाविरोधात सतत दंड थोपटून उभ्या आहेत. या उलट ब्राह्मणवाद्यांचे प्रयत्न गनिमी काव्याचे, भुमिगत स्वरुपाचे आहेत. आज ब्राह्मण - ब्राह्मणेत्तर या दोन समजाच्या सरम्यान संशयाचे व अविश्वासाचे धुके निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात इतिहास संशोधन व लेखन या क्षेत्रात ब्राह्मण आघाडीवर होते. रामदास हा शिवरायांचा गुरु नव्हता, हे ब्राह्मण लेखक प्रा.न.र.फ़ाटक यांनी त्यांच्या पुस्तकार निदर्शनास आणुन दिले आहे.
            भांडारकरवरील मंडळींनी लेनला मदत करणार्यांची नावे पुण्याचे श्री म.अ.मेहंदळे यांनी एका लेखात दिलेली आहे. ही माहिती दैनिक सकाळ दि.३ जुन २००४ मधली आहे.ती नावे अशी आहेत. ग्रंथपाल श्री वा.ल.मंजुळ, डॉ.श्रीकांत बहुलकर आणि सुचेता परांजपे, श्री मंजुळ यांनी लेन ला ग्रंथ उलपब्ध करून दिले. डॉ.बहुलकर याने त्याला "शिवभारत" या संस्क्रुत ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर करण्यात सहाय्य दिले आणि डॉ.परांजपे यांनी त्याला मराठी शिकवले.
संदर्भग्रंथ :
राजा शिवछत्रपती ,आव्रुत्ती १४ वी,२००१.[बाबा पुरंदरे], शिवशाही[प्रा.मा.म. देशमुख], शिवधर्म[प्रा.मा.म. देशमुख], शिवछत्रपती एक मागोवा[डॉ.जयसिंगराव पोवार], मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज[डॉ.सुभाष के.देसाई], जेम्स लेन :संशोधक की विध्वंसक[डॉ.वसंतराव मोरे], ब्राह्मण द्वेष्टा जेम्स लेन[प्रा.विष्णूदास एच.मगदूम], शिवाजी राजेंचे खरे शत्रू कोण ?[प्रा.श्रीमंत कोकाटे], शिवाजी आणि शिवकाळ [सर जदुनाथ सरकार], छ.शिवाजी आणि त्यांची प्रभावळ[सेतु माधवराव पगडी], छ.शिवाजी की साहित्यिक प्रतिमा. कितनी सही, कितनी प्रेरक[डॉ.वसंतराव मोरे], जेम्स लेन च्या पुस्तकावर विद्वानांची मते.,महाराष्ट्रातील वार्तापत्रे आणि विद्वानांची मत