12 June 2012

मृत दादोजी करवी केले लालमहाल चे बारसे

                  पुण्यातील शिवारायांच्या या लालमहालाचं वर्णन बाबासाहेब पुरंदरेने आपल्या "राजाशिवछत्रती" या पुस्तकातही केलं आहे ते ते लिहितात- पुण्यातील वाडा बांधून पुर्ण झाला आईसाहेबांस वा शिवबास वाडा आवडला. पागा, गोशाळा, शिलेखाना, कचेरी, दफ़्तरखाना, सदर, कोठी,राहण्याचे महाल, देवघर वगैरे जागा बांधून झाल्या.मुहुर्त पाहून आईसाहेब आणि शिवबा यांना वाड्यात राहावयास पंतांनी आणलं,पंतांनी वाडा तर अगदी सायसंगीन,दणकट,पण झोकदार बांधला.वाड्याला पंतांनी नाव दिलं "लालमहाल".त्यांनी वाड्याचे जोते पूर्व पश्चिम १७॥ गज लांब व दक्षिण - उत्तर २८॥ गज रूंद (५२॥ x ८३॥)धरले होते.वाड्याची उंची १०। गज (३०॥ फ़ूट) होती.आत चौकात कारंजी तयार केली होती.कारंजाचे पश्चिमेस भव्य प्रशस्त सदर होती.सदर म्हणजे छोटासा दरबारी महालच. वाड्यात पाण्याचा मुबलक पुरवठा केला होता.तीन विहिरी बांधल्या होत्या.पंतांनी अस थाट एकूण केला होता.शिवाय लालमहालात तळघरं बरीच बांधली होती.तळघरांची खोली ४॥ गज (१२ ॥ फ़ुट) होती.
         पुरंदरेनी लालमहालाचं वर्णन मोठं बहारीचं व त्याचा भव्य विस्तार स्पष्ट करणारं केलं असलं तरी तो पंतांनी म्हणजे दादोजी कोंडदेव ने बांधला व पंतांनीच त्याला लाल महाल असं नाव ठेवलं, अशी चुकीची माहीती त्यात आहे.कदाचीत वर्णन करण्याच्या भरात आणि दादोजी कोंडदेव ला मोठं करण्याच्या कैफ़ात त्यांना शिवाजी महाराज आणि जिजाऊमांसाहेब या दादोजी कोंडदेव वारल्यानंतर (दादू इ.स.१६४७ ला वारला) दोन-तीन वर्षांनी म्हणजे इ.स. १६४८ -४९ ला पुण्यात कायम मुक्कामास आले.हे ऐतिहासिक सत्य पुरंदरे विसरले.त्यामुळे त्याने वारलेल्या दादोजी कोंडदेव पंतास लालमहाल बांधण्याचा व त्याचं बारसं घालण्याचा मान दिला.शिवाजी महाराज व जिजामाता खेडला राहात असल्या तरी ते काही काळासाठी पुण्यात येऊन राहत होते.पण ते लालमहालात नव्हे, तर पुण्याच्या झांबरे पाटलांच्या वाड्यात राहत असत.त्यावेळी पंताच्या हयातीत लालमहाल बांधलाच नव्हता.तसे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत.शिवाय शिवरायांना शहाजी महाराजांनी बंगरूळहून इ.स.१६४२ मध्ये पुणे जहागिरीवर पाठवलं, तेंव्हा ते पहिल्यांदा खेड ला राहिले.या संदर्भात जेधे करीन्यात स्पष्टपणे लिहिलंय - महाराजांनी (शहाजी महाराजांनी) राजश्री सिवाजीराजे यासमागमे (सोबत)  राजश्री सामराजपंत पेशवे व मानकोजी दहातोंडे सरनोबत व बालाजी हरी मज्यालसी व कारकून व स्वराजा जमाव देऊन पुण्यास पाठवले त्यावरी कसबे खेडेबारे येथे वाडे बांधले.या पुराव्याला पुष्टी देणार्या अनेक निंदी उपलब्ध आहेत.         

छ.शिवरायांबद्दल जगातील मान्यवरांचे गौरवोद्गार

मार्शल बुल्गानिन (मा.पंतप्रधान- रशीया) - "साम्राज्यशाहीविरुद्ध बंड उभारुन स्वराज्याची पहिली मुहुर्तमेढ छ.शिवाजी महाराजांनी रोवली."
प्रिंस ओफ़ वेल्स (इंग्लंड) - "छ.शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. त्यांच्या स्मारकाची कोनशिला बसविताना मला अत्यानंद होत आहे."
ब्यारन कादा (जपान) - "छ.शिवाजी महाराज सत्पुरुष होते. त्यांनी अखिल मानव जातीचे हित केले."
मि.एनोल्ड टायबर्न (जगविख्यात इतिहासकार) - "छ.शिवाजी महाराजांसारखे राजे आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांच्या स्म्रुतीचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन आम्ही आनंदाने नाचलो असतो."
डॉ.डेलोन (शिवकालीन युरोपीयन प्रवासी) - " छ.शिवाजी राजे अत्यंत हुशार आणि जाणकार असून सर्व धर्माशी ते सहिष्णुतेने वागतात"

वॉरन हेस्टिंग (व्हाईसराय जनरल) - "सर्व भारतात केवळ शिवरायांचे अनुयायी जाग्रुत व जिवंत आहेत, हा छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचा  परिणाम आहे."
प्रबोधनकार ठाकरे - "शिवाजीराजे इतके महान आहेत की त्यांच्या पुढे ३३ कोटी देवांची फ़लटण बाद होते."
स्वातंत्र्यवीर नेताजी सुभाषचंद्र बोस, क्रांतीसिंह नाना पाटील, भगतसिंग, उमाजी नाईक - " स्वातंत्र्य आंदोलनाची प्रेरणा आम्हास छ.शिवरायांच्या चरित्रातून मिळाली " 
कर्मवीर भाऊराव पाटील  (शिक्षणमहर्षी ) -  "प्रसंग पडला तर जन्मदात्या बापाचे नाव बदलेन पण कोलेज  ला दिलेले शिवरायांचे नाव मी कधीच बदलणार नाही "
ग्रेंड  डफ (इंग्लंड ) - "राजे केवळ लढवय्ये नव्हते तर सामाजिक आणि अर्थकारण यांची उत्तम जाण असणारे राजकारणी पुरुष होते. त्यांच्या चानाक्ष योजकतेमुळेच हतबल झालेल्या बहुजनांना सत्ताधिश होता आले."
साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे - "प्रथम मायभुमीच्या । छत्रपती शिवबा चरणा । स्मरोनी गातो कवना । "
नेताजी सुभाषचंद्र बोस - "हिंदुस्तानच्या इतिहासातील फ़क्त शिवाजी महाराजांचे तेजस्वी चरित्र माझ्या अंत:करणात मध्यान्हिच्या तळपत्या सुर्याप्रमाणे प्रकाशमान होऊन राहीलय.शिवाजी महाराजांइतके उज्वल चरित्र दुसर्या कुणाचे मला दिसले नाही सद्य:स्थितीत या महापुरुषाच्या वीर चरित्राचा आदर्शच आम्हाला मार्गदर्शक आहे.शिवाजी महाराजांचा हा आदर्शच  सगळ्या हिंदुस्तानासमोर ठेवला पाहिजे ." 
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर - " छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि चरित्र उत्तम होते. त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे पेशव्यांनी नुकसान केले " 
पो.व्हाईसराय आंतोनियू द मेलु - द काश्चू (१४ जानेवारी १६६४ ) - "शिवाजी राजा हा एक कष्टाळू आणि पराक्रमी राजा आहे."
ब्रिटीश इतिहासकार ग्रेंड डफ़ - "मराठा साम्राज्याच्या राजाची तुलनाच करावयाची झाली तर ती जगजेत्ता अलेक्झांडर व नेपोलियन बोनापार्ट  यांच्या बरोबर करावी लागेल"

दादोजीचा पुतळा हटला : इतिहासाचे शुद्धीकरण.[पान २]

            सोन्याच्या नांगराने भुमी नांगरली. दादू कोंडदेवाने सोन्याच्या नांगराने भुमी नांगरली, हा इतिहास आहे आणि तो कसा बदलायचा , असा प्रश्नही काहीजनांना पडला आहे.पुण्यातील संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी ७ जानेवरी २०११ च्या लोकप्रभा या साप्ताहिकात दादोजी पंती सिऊबांस शाहणे केले या मथळ्याखाली एक लेख लिहुन दादू कोंडदेव बद्दल शिवरायांस किती आदर होता, तो त्यांचा गुरु कसा होता, याची अनेक उदाहरणे दिली आहेत.पण त्यांनी दिलेल्या समकालीन पत्रांमध्ये शहाजी महाराज, शिवाजी महाराज, जिजामाता यांनी कुठेच दादू गुरु म्हणुन उल्लेख केलेला नाही हे मात्र स्पष्ट आहे. ज्या बखरी पेशवाईच्या उत्तराधार्त म्हणजे पळपुटा बाजीराव म्हणुन प्रसिद्ध असणार्या बाजीरावाच्या काळात किंवा त्याच्यानंतर लिहिल्या गेल्या.ज्या काळात ब्राह्मण - ब्राह्मणेत्तर वाद जोरात पेटलेला होता. तो इतका टोकाला गेला होता की पळपुट्या बाजीरावाने त्याला जेंव्हा मुलगा झाला तेंव्हा त्याचं नाव वामनराव ठेवलं. कारण त्याला वाटलं की हा वामन ब्राह्मणेत्तर बळीराजाला पुन्हा पाताळात गाडेल. पण हा वामन अल्पवयातच गेला आणि बाजीरावाचं स्वप्न अपुर्णच राहिलं.अशा काळातील अनेक चुकांनी भरलेल्या बखरींचा आधार घेऊन त्यांनी दादू ला शिवरायांचा गुरु करायचं योग्य नाही. कारण या  बखरींबद्दल इतिहास संशोधक सेतू माधवराव पगडी म्हणतात - मराठा साधनांपैकी एक्क्याण्णव कलमी बखर काय किंवा चिटणीस बखर काय, उत्तर पेशवाईतील असल्यामुळे भारूडांनी भरल्या आहेत.
           अशा बखरींमध्ये आलेला इतिहास हा आजपर्यंत होऊन गेलेल्या इतिहासकारांनी नाकारलेला आहे.एवढंच नव्हे तर पुण्याचे इतिहासकार मेहेंदळे ही या बखरीमधील इतिहास टाकाऊ व खोटा समजतात ( वाचा : राजाशिवछत्रपती प्रुष्ट : १००-११२)
               दादू कोंडदेवाने पुण्याच्या भुमीवर (पांढरी)  सोन्याचा नांगर धरला की नाही याचाही थोडासा मागावा घेऊ या. बलकवडे आपल्या उपरोक्त लेखात लिहितात -पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याचा उल्लेख फ़क्त सहा कलमी शकावलीत आहे.तीच्यातील शेवटच्या कलमातील तो उल्लेख असा आहे : शके १५५७ युव नाम संवत्छरी शाहजी राजे भोसले यांसि बारा हजार फ़ौजेची सरदारी इदलशाहीकडुन जाली सरजांमास मुलुक दिल्हे त्यात पुणे देश राज्याकडे दिलकहा राज्याची आपले तर्फ़ेने दादू कोंडदेव मलटणकर यांसि सुभा सांगुन पुणियात ठाणे गातले तेंव्हा सोहन्याचा नांगर पांढरीवर धरिला शांती केली मग सुभेदार याणी कसब्याची व गावगणाची प्रांतात वस्ती केली.
               पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरला, असा उल्लेख असलेला हा एकमेव जुना कागद आतापर्यंत उजेडास आला आहे आणि त्यात दादू कोंडदेवचा स्पष्ट उल्लेख आहे.
            बलकवडे या शकावलीचं सहावं कलम अपुर्ण देतात. मुळात या शकावलीत लिहिलं आहे ... शके १५५७ युव नाम संवत्छरी शाहजी राजे भोसले यांसि बारा हजार फ़ौजची सरदारी इदलशाईकडुन जाली सरजांमास मुलुक दिल्हे.त्यांत पुणे देश राज्याकडे दिलकहा राज्यानी आपले तर्फ़ेने दादू कोंडदेव मलटणकर यांसि सुभा सांगुन पुणियास ठाणे गातले. तेंव्हा सोहन्याचा नांगर पांढरीवर धरीला. शांती केली मग सुभेदार याणी कसब्याची व गावगणाची प्रांतात वस्ती केली.कोल्याचे वषे दिल्हे.साहावे साली तनखा घेतला शाहजी राजे विज्यापूर प्रांती गेले. कलम १.
            बलकवडे या शकावलीतील शेवटचं एक वाक्यच्या वाक्यच गाळतात.कारण या वाक्यामुळे या कलमाचा स्पष्ट अर्थ समजुन येतो.साहावे साली तनखा घेतला शाहजी राजे विज्यापूर प्रांती गेले, हे वाक्य नसेल तर सोन्याची नांगर धरलेली घटना दादू कोंडदेव नी केली असं स्पष्ट होतं आणि शेवटचं वाक्य दिलं तर सोन्याचा नांगर शहाजी महाराजांनी स्वत:च धरल्याचं स्पष्ट होतं.वर दिलेली सहा कलमी शकावली ही ऐतिहासिक द्रुष्ट्या फ़ारशी विश्वसनीय नाही. तरीही या शकावलीतील इतिहास स्वीकारून निष्कर्ष काढायचा झाला तर सोन्याचा नांगर पुण्याच्या पांढरीवर धरला  असेलच तर तो शहाजी महाराजांनी धरल्याचं स्पष्ट होतं.
                 या सहा कलमी शकावलीतील उल्लेखावरून शिल्प करायचे झाले तर ते शहाजी महाराज सोन्याच्या नांगराने भुमी नांगरतात, आसे करायला पाहिजे. आणि सुसंगत तर्क म्हणुन त्यावेळी संभाजीराजे, बालशिवबा, व जिजाऊंना दाखवलं तर योग्य झालं असतं पण असं न करता पहिल्यांदा ऐतिहासिक साधनांचा अर्धवट उल्लेख करायचा. त्याच्या आधारावर असत्य गोष्ट सत्य म्हणुन ठासून सांगावयाची  आणि वेळवखत पाहून तशी शिल्प चित्र करावयाची या मागील कावा काय होता हे जेम्स लेनच्या पुस्तकाने जाहीर केलंय.
                 अशा या सोन्याच्या नांगराने भुमी नांगरणार्या समुहचित्राची मुळ कल्पना लढवण्याचा मान मात्र शिवशाहीर (?) बाबा पुरंदरे यांच्याकडे जातो. त्यांनी आपल्या राजाशिवछत्रपती व महाराज या पुस्तकात पहिल्यांदा अशा पद्धतीचं चित्र काढून घेऊन ती छापली.
           या चित्रांच्या आधारावरच १९९७-९८ मध्ये एक समुह शिल्प करून ते पुणे महानगरपालिकेने शनिवारवाड्याच्या मागे बांधलेल्या लालमहालात बसवायचं ठरवलं. त्यासाठी पुण्यातीलच संशोधक निनाद बेडेकर याच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाखाली एक शिल्प तयार केलं गेलं. यामध्ये नांगरधारी बैलजोडी , बालशिवबा तो नांगर धरून, शेजारी थोडं वाकून बालशिवबाला नांगर धरायला शिकवणारे दादू कोंडदेव व शिवबांच्यामागे जिजाऊसाहेब असं शिल्प तयार झालं. हे शिल्प तयार करताना मात्र पुरंदरे ने काढून घेतलेल्या चित्रातही नाहीत  अशा जिजाऊसाहेबांना या शिल्पात आणलं गेलं.
          २००० मध्ये या शिल्पाचं अनावरण झालं. यासाठी छत्रपतींच्या वंशजांनाही बोलाविण्यात आलं.यात कोल्हापूरकर छ.शाहू  महाराज आणि सातारकर राजमाता सुमित्राराजे यांचा समावेश होता.शिवरायांचा कार्यक्रम म्हणुन या व्यक्ती हजर राहिल्या पण जेंव्हा इ.स. २००३ -०४ मध्ये जेम्स लेन चं पुस्तक प्रदर्शीत झालं आणि त्याने त्यातील दादू आणि रामदास संबंधाने जिजाऊंच्या चरित्राची विटंबना करणारे घाणेरडे उल्लेख समजले, तेंव्हा असे इतिहासाचा कोणतही पुरावा नसताना हे शिल्प का तयार केलं याचा उलगडा झाला. तेंव्हापासून या शिल्पातून दादू कोंडदेव काढावा अशी मागणी जोर धरू लागली. हे शिल्प चुकीच्या संदर्भावर तद्दन काल्पनिक व जिजाऊ, शिवराय, शहाजी महाराजांचा अपमान करणारं असल्यामुळे त्यात बदल करणं पुणे महानगरपालिकेला भाग पडल्याने २७-१२-२०१० रोजी दादू कोंडदेवाचा पुतळा काढावा लगला.
            असा हा पुतळा काढल्यामुळे इतिहास बदलत नाही तर इतिहासाचं शुद्धीकरण होतं त्यातील चुका दुरुस्त होतात हे आपण समजुन घेतलं पाहिजे. असंच इतिहासाचं शुद्धीकरण शिवपुत्र संभाजी महाराजांच्या बाबतीतही काही दशकापुर्वी इतिहास संशोधक वा.सी.बेंद्रे व डॉ.कमल गोखले यांनी केलं होतं. संभाजी महाराजांची उत्तरकालीन बखरकार,संशोधक, कादंबरीकार, लेखक यांनी केलेली बदनामी वरील संशोधकांनी अस्सल पुराव्यांच्या आधारे धुवून काढली होती.त्यावेळी त्यांनाही आज दादू चा पुतळा काढायला जशा काही प्रव्रुत्ती विरोध होत्या तसा विरोध झाला होता. पण आज शिवपुत्र संभाजी महाराजांचा कर्त्रुत्वशाली इतिहास सर्वांना मान्य झाला आहे.तसाच शिवचरित्रातील दादू कोंडदेव - रामदास शिवरायांचे गुरु नव्हते हा इतिहासही मान्य होईल, आणि तो मान्य करावाच लागेल.

दादोजीचा पुतळा हटला : इतिहासाचे शुद्धीकरण.

इंद्रजित सावंत (इतिहास अभासक)
१७ जानेवारी २०११
शिवाजीराजांचं पुण्यातलं वास्तव्य कुठे होतं ?शनिवारवाड्याच्या पिछाडीला असलेल्या लालमहालात दादू कोंडदेवच्या पुतळ्याने वादग्रस्त झालेल्या या लालमहालात शिवाजीराजे राहीले होते ? तिथेच शाहीस्तेखानाची बोटं छाटली का ? ठाऊक नाही ?!
मग, "रामदास किंवा दादू कोंडदेव हे शिवाजी राजांचे गुरु होते", ही क्लुप्ती ब्राह्मणांची आहे. असं छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राजर्षी शाहू महाराज इ.स. १९२० मध्येच एका सनदेत लिहुन ठेवलं असलं तरी दादू - रामदास शिवरायांचे गुरु होते असं सांगणं - लिहिणं मात्र काही थांबलेलं नाही. उलट,नव्या जोमाने दादू कोंडदेवाचं नसलेलं कर्तृत्व मांडण्याची चढाओढ लागली.
          एवढंच नव्हे तर चित्र,शिल्पांच्या माध्यमातून ते शिवरायांचे पालक - गुरु होते हे असत्य जास्तच द्रुढ करण्याचा प्रयत्नही होत आहे. याचाच एक भाग म्हणुन लालमहालातील हे समुह शिल्प तयार झालं होतं.
            पुण्यातील शिवरायांचा लालमहाल म्हणुन आज दाखवली जाणारी वास्तू ही अलीकडच्या काळात म्हणजे १९८८ मध्ये बांधण्यात आलेली इमारत आहे.शिवाजी महाराज राहात होते तो मुळचा लालमहाल आज अस्तित्वातच नाही.असं असलं तरी शिवरायांच्या लालमहालाविषयी अनेक संदर्भ आपल्याला इतिहासाच्या कागदपत्रातून मिळतात. यातील सर्वात विश्वसनीय पुरावा म्हणजे जेधे करीन्यात आलेला आहे.यात म्हंटलं आहे- "१५१५ शोभक्रुत संवछरी चैन शुध अष्टमी रविवारी लोकाची निवडी करून पुणियात राजश्री स्वामींनी खासा दाहा लोकानसी लाल महालात जाऊन शास्ताखानाकरवी छापा घातला बा कान्होजी ना यांचे पुत्र चांदजी जेधे होते मारामारी झाली.तेंव्हा शास्ताखानाचा हात तुटला.मग पळोन गेला.त्याचा लेक अबदुल फ़ते ठार झाला. त्याउपरी स्वामी परसातील दिंडीने बाहीर निघाले.तो सर्जाभाऊ जेधे घोडियावरी बैसोन पागेचा घोडा दुसरा खासदाराजवल देऊन दिंडी समीप आज्ञाप्रमाणे राहीले होते.राजश्री स्वामी येताच घोडियावरी बैसोन मुळा उतरोन जरेसाकडे निघाले.जागाजागा लस्कराच्या टोळ्या व करणे नगारे ठेविले होते.त्याची गुली मोगलाच्या लस्करात जाली.राजश्री स्वामी हशमाच्या व लष्कराच्या जमावानसी दुसरे दिवसी सिहगडास आले.शास्ताखान कुच करुन गेला."(या मजकुरात पुर्णविराम वाचण्याच्या सोयीसाठी दिले आहे,मुळ मजकुर मोडी लिपित आहे.त्यात स्वल्प-अर्ध-पुर्ण विराम नाही त्यामुळे संदर्भ देताना अडचणिचा मजकुर गाळला जातो. त्याचा दाखला पुढे आहेच)
           करीन्यातील या उल्लेखावरून हा महाल पुण्यात मुळा नदिच्या जवळ होता व त्यास लालमहाल हे नाव शिवकाळात मिळालं होतं. हे समजुन येतं. यानंतरचा या महालाचा उल्लेख एका शकावलीत आला असून ही शकावलीतील नोंद पेशवे दफ़्तरातून निवडलेले कागद खंड २२ मध्ये लेख नं.२९२ वर छापलेली आहे.यावर या कगदाची तारीख २८-०६-१७३५ अशी दिली आहे. या नोंदीत म्हंटले आहे - "आश्याढ वद्ये ४ सुक्रवारी पंतप्रधान यांणी राजश्री सिवाजी राजे यांचा मालमहाल राजश्री दादाजी कोंडदेऊ याणी राजश्री शाहाजी राजे याचे कारकीर्दीस बांधला होता.त्यांचे भाऊ राजश्री संभाजी राजे सिवाजी राजे याचे भाऊ त्याचा महाल वेदमूर्ती राजश्री खंडभट शालेग्राम याच्या वाडियापावेतो होता. त्याचे जोते उतरामुख होते. ते उखळुन चिरे कारंजियापासी घर बांधले त्याजला जोतीयास नेले.राजश्रीच्या माहालावरही येक दोन घरे बांधोन अबदार वाडा करून ठेवावा. तुर्त एक दोन घरे बांधली, माहलात नेहमी घरे रहावयास होतील म्हणुन पंती लालमहाल बांधायची तजवीज केली.आठरापंधरा रोज झाले. जुना हौद कारंजियाचा पका आहे, त्यावरती पछेकेमडे दिवाणखाणा जुना होता तेथे घर बांधिले त्यास यांची साधत नाही त्या दिवाणखानियाची जुनी काहीवाही भिंताडे होती ते धोंडे काहडुन आपल्या वाडियाच्या सुताने दोरी धरून प्रांची साधून कारंजियाचा सुमार टाकून तुर्त येक घर कारंजियाच्या कोनासी दक्षणेकडल्या लाऊन (?) केले होता. मुळे हे कारंजे रद जाले असे.देसपांडियाच्या पछमेस खंडभटाने दक्षणेस जे जागा आहे ते आजी पंती उखळुन चिरे हाऊदाकडे नेऊन तुर्त घर बांधतात.त्याच्या जोतियास लाविले असेत.लालमाहलाचा वगैरे दोन यैस तीन आठ पंती गाडले होते ते उकरिले. पाणी लागले. म-हामती तोडाची केली असे.लालमाहालाची जमीन पछमेसहि काही गेली असावीसी आहे. तुर्त जोते काहडलियाने माहालचे हादेचे हिंदाने मोडले; परंतु ते जागा महालाची असे"
         वरील उल्लेख हा महत्वाचा असून यातील माहीतीवरून हा महाल शहाजी महाराजांच्या कारकीर्दित दादू कोंडदेवनं बांधल्याचं नोंदवलं आहे.पण यामध्ये कुठेही दादु शिवरायांचा गुरु असं म्हंटलेलं नाही. त्यावरून इ.स.१७३५ पर्यंत तरी दादू हा शिवरायांचा गुरु होता, असा प्रवाद रुढ झाला नव्हता, हे स्पष्ट होतं.
             एवढंच नाहीतर, या लालमहालासोबत शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू संभाजी महाराजांचा वाडाही या लालमहालाच्या शेजारी होता, हे समजुन येतं. हा संभाजी महाराजांचा वाडा व लालमहाल पंती म्हणजे पंतप्रधान उर्फ़ पेशव्यांनी पाडुन त्या बांधकामातील दगडाचे चिरे व जागा आपला वाडा बांधण्यासाठी वापरले होते.या लालमहालात कमीत कमी तीन पाण्याचे आड (विहिरी) होते.मोठा दिवाणखाना होता.पाण्याचे हौद व कारंजे होते, हेही वरील उल्लेखावरून स्पष्ट होतं.
         म्हणजे शिवरायांचा मुळचा लालमहाल अलीकडचा लालमहाल दिसतो तेवढा लहान निश्चितच नव्हता.कारण इ.स.१६६१-६३ शायिस्तेखानाने जेंव्हा पुण्यात मुक्काम ठोकला होता, तेंव्हा त्याने आपलं निवासस्थान म्हणुन या शिवरायांच्याच वाड्याची निवड केली होती.ज्यावेळी शिवरायांनी शायिस्तेखानावर छापा टाकला, त्यावेळी मुघली इतिहासकार भिमसेना सक्सेना व ख्वाफ़ीखानाने केलेली वर्णने उपलब्ध आहेत. या वर्णनांवरूनही लालमहालाची भव्यता समजून येतं.
             या वर्णानांवरून या वाड्याला मोठा नगारखाना होता.शिवाय या वाड्यात पाण्याचे हौद होते.भली मोठी बाग होती.या बागेला "राजबाग" असं म्हणत असत.या बागेच्या देखभालीचं काम महाराजांनी मोतमाळी दरवडा याला दिलं होतं. पुढे शायिस्तेखानावर छापा टाकला, त्यावेळी या माळ्यांनी शिवरायांना माहिती देऊन मदत केल्याचा उल्लेखही मिळुन येतो.
            असा हा शिवरायांच्या महालाचा काही भाग जरी पेशव्यांनी पाडला असला तरी या भल्या  मोठ्या महालाचा काही भाग इंग्रज आमदनीपर्यंत शिल्लक होता त्या भागास अंबरखाना म्हणुन ओळखलं जात असे.याची नोंद इ.स.१८८५ च्या बोम्बे प्रेसिडेंसी ग्याझेटीअरमध्ये आली आहे.(बोम्बे ग्याझेटीयर प्रेसिडेंसी व्होल्यूम १९ भाग ३ पुना)
              असा हा शिवरायांचा भव्य लालमहाल पेशव्यांनी पाडल्यामुळे आज अस्तित्वात नाही. हा महाल शहाजी महाराजांनी बांधून घेतला व या महालात शिवाजी महाराज, जिजामाता, संभाजी महाराज, शहाजी महाराज यांचं वास्तव्य अनेक वर्षे झलं होतं. 
               लालमहाल नेमका कधी बांधला याचा उल्लेख अजुन पर्यंत उजेडात आलेला नाही. पण इ.स. १६४२ नंतर शिवराय जेंव्हा बंगरुळवरुन पुण्यास आले तेंव्हा त्यांचं वास्तव्य काही काळ म्हणजे इ.स.१६४९ पर्यंत तरी खेडमध्ये बांधलेल्या वाड्यात होतं. हे निश्चित. शिवाजी महाराज इ.स. १६४२ मध्ये पुणे जहागिरीवर आले तेंव्हा पहिल्यांदा ते खेड मध्ये आले. तेथे त्यांच्यासाठी एक वाडा बांधण्यात आला पुढे हा वाडा बांधण्यासाठी काही लोकांची घरे पाडण्यात आली. त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी खेडजवळच एक पेठ बसविण्यात आली. या पेठेला शिवापुर असं नाव देण्यात आलं. या गावाजवळच कामथाडी इथे जिजाऊंची शेती होती.या शेतीसाठी शिवगंगानदीवर दगडाचे बांधही घालण्यात आले होते. ते आजही पहावयास मिळतात. पण शिवरायांचा वाडा खेडमध्ये नेमका कुठे होता याचा शोध घेणं बाकी आहे.
               १६४९ नंतर जिजामाता व शिवाजी महाराज पुण्यात रहावयास आले.त्यावेळी काही काळ ते पुण्यातील झांबरे पाटलांच्या वाड्यात राहीले होते.(पुढे याच झांबरे पाटलांकडुन जागा विकत घेऊन त्या जागेवर ललमहाल बांधला.) म्हणजे तोपर्यंत तरी लालमहाल व संभाजी महाराजांचा महाल बांधुन पुर्ण झाला नव्हता, हे समजुन येतं. पुढे लालमहाल बांधुन पुर्ण झाल्यावर शिवराय व जिजामाता या महालात राहावयास आल्या.
                 शिवरायांच्या वास्तव्याची इतकी सविस्तर माहीती देण्याचं कारण; आज ज्या लालमहालातील दादू कोंडदेवच्या पुतळ्याचा विषय पुण्यातील काही संशोधक व त्यांचे पाठीराखे धरत आहेत.त्यांना हे माहीत व्हावं की ज्यावेळी शिवराय लालमहालात राहावयास आले, त्याच्या खुपच अगोदर म्हणजे दोन-तीन वर्षापुर्वी दादू कोंडदेवाचा म्रुत्यु झाला होता.अशा व्यक्तीचा पुतळा त्या ठिकाणी बसवावा म्हणुन आग्रह धरणे, हे कोणत्याही तर्कशास्त्रात बसत नाही.त्यामुळे लालमहालातील बाल शिवबा, जिजामाता आणि दादू कोंडदेवाचं समुह शिल्प हे इतिहासाच्या अडाणीपणातून उभं राहिलं हे सिद्ध होतं.

बहुजन समाजातील विचारवंतांचे मोलाचे कार्य

         शिवरायांचे कार्य आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी बहुजन समाजातील विचारवंतांनी मोलाचे कार्य केले ते पाहुया.
       लाला लजपतरायांनी सिवोजी नावाचे उर्दुमधुन शिवचरित्र लिहिले. त्यामुळे राजे पंजाब, सिंध पर्यंत समजले. रविंद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शिवाजीराजे हे आदर्श होते. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले की प्रसंगी जन्मदात्या बापाचे नाव बदलेन पण कोलेजला दिलेलं शिवाजीराजांचं नाव मी कधिच बदलनार नाही. ते भाऊराव पाटील जैन होते. त्यांच्यामुळे शिवराजांच्या रयतेला शिक्षण मिळाले. कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे, डॉ.पंजाबराव देशमुख, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसिंह नाना पाटील, संत गाडगेबाबा, प्रबोधनकार केशव सी. ठाकरे इ. समाजसुधारकाची शिवरायांवर अनन्यनिष्ठा होती.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शिवचरित्राचा सखोल अभ्यास होता. त्यांनी शुद्र पुर्वी कोन होते ? या ग्रंथात शिवाजीराजांबाबत खुप सखोल माहिती लिहिलेली आहे. शिवाजीराजांच्या त्रिशताब्दी उत्सवाच्या निमित्ताने बदलापूर येथे आयोजित केलेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते.या प्रसंगी त्यांनी राजांच्या जीवनावर अभ्यासपुर्ण आणि प्रभावी भाषण केले.त्यामुळे राजांचे अपरिचीत रुप जनतेला समजले.राष्ट्रपिता ज्योतिराव फ़ुले यांनी शिवजयंती सुरु केली.त्यांचे राजांवर डोळस प्रेम होते आंधळे प्रेम नव्हते.
                शिवाजीराजांचे भांडवल करुन फ़ुलेनी समाजामध्ये धार्मिक जातीय दंगे निर्माण केले नाहीत किंवा शिवाजीराजांच्याद्वारे त्यांनी बहुजन समाजाचे दैवीकरण केले नाही. फ़ुले यांनी शिवाजीराजांचा खरा इतिहास देशाला सांगितला.
                साहीत्यरत्न थोर देशभक्त आणि समाजसुधारक आण्णाभाऊ साठे यांनी गणपतीला वंदन असनारा पारंपारीक गण बदलला.गणाचा प्रारंभ शिवछत्रपतींना वंदन करूनच सुरु केला.आण्णाभाऊंनी शिवरायांवर महाराष्ट्राची परंपरा हा पोवाडा लिहिला. आण्णाभाऊ रशियात गेल्यानंतर त्याठिकाणी शिवचरित्रावर रशियन भाषेत लिहिनारे प्रा.चेलिशेव आण्णांना भेटले.आण्णांनी त्यांना शिवरायांबाबत खुप दुर्मिळ माहीती सांगितली म्हणजेच आण्णाभाऊं मुळेच रशियन जनतेला शिवरायांचे कार्य माहीत झाले. शिवरायांचे कार्य आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी बहुजन समाजातील विचारवंतांनी मोलाचे कार्य केले