Showing posts with label संभाजी ब्रिगेड. Show all posts
Showing posts with label संभाजी ब्रिगेड. Show all posts

17 January 2017

राजसंन्यास, धर्मवीर आणि शंभुप्रेमींची जबाबदारी

             महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात ३ जानेवारी २०१७ हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाच्या दिवसातील एक ठरला. छत्रपती संभाजी महाराज उद्यानात असलेला रा. ग. गडकरी यांचा पुतळा काही तरुणांनी मध्यरात्री हातोडी, कुर्‍हाडीचे घाव घालून फोडला आणि तो मुठा नदीत फेकून दिला. काही वेळातच हा प्रकार सर्वदुर पसरला. या घटनेचे शंभुप्रेमींनी जोरदार समर्थन केले तथा नितेश राणेंनी त्या तरुणांचा शब्द दिल्याप्रमाणे उचित सन्मान केला तर गडकरी प्रेमींनी निषेद आणि संताप व्यक्त केला. पण रा. ग. गडकरींचा पुतळा का तोडला,  यामागची भावना काय होती याचा विचार करणे निषेदार्ह संताप व्यक्त करणार्यां गडकरी प्रेमींना महत्वाचे वाटले नाही. कारण शिवभक्तांनी केलेल्या कोणत्याही घटनेला ब्राह्मणद्वेषाचे लेबल लावून त्यातुम निसटणे हा आज लोकप्रिय फ़ंडा झालेला आहे.
          राम गणेश गडकरीं यांची ओळख सांगायची तर, गडकरींचा जन्म गुजरात मधील नवसारी येथे २६ मे १८८५ रोजी झाला. तर २३ जानेवारी १९१९ रोजी त्यांचा म्रुत्यु झाला. वयाच्या ३४ वर्षात त्यांनी कविता, नाटक तथा विनोदी लेख यांसारखे बरेच साहित्य निर्माण केले. त्यांच्या साहित्यांनी आयुष्याच्या शेवटच्या काळात मराठी भाषा आणि साहित्यावर सत्ता गाजवली. प्रेमसंन्यास, राजसंन्यास, एकच प्याला, पुण्यप्रभाव ही त्यांची गाजलेली काही नाटके लिहिणारे गडकरी हे मराठीतील शेक्सपियर म्हणून ओळखले जात. राम गणेश गडकरींच्या पुतळ्याला मुठा नदीच्या पाण्याची चव चाखायला लावणारे त्यांचे साहित्य म्हणजे "राजसंन्यास" नाटक. आजपर्यंत इतिहासाचे बर्याच प्रमाणात विक्रुतीकरण झालेले आहे तसेच सत्य इतिहासही बाहेर आलेला आहे.महाराष्ट्राच्या इतिहासात अशा विक्रुती करताना बर्याच मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यापैकी म्हणजे इतिहासाचे संशोधन करताना नाना फ़डणीस याने भोगलेल्या रखेल्यांची यादी सापडली होती ती दत्तो वामन पोतदार याने गिळून टाकली. नाना ने रखेल्या भोगल्या पण पोतदार ने तर अखंड रखेल्या गिळुन नाना फ़डणीस वरच कढी केली. महाराष्ट्रातील इतिहास विक्रुतीने सडलेला आहे त्यात गडकरींच्या "राजसंन्यास" ची भर पडली.
राजसंन्यास आणि आधुनिक धर्मप्रेमी
        हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे विरश्रींचे शिरोमणी. वयाच्या १४ व्या वर्षी बुधभुषणम सारखा ग्रंथ लिहुन साहित्य क्षेत्रात आपले नाव अजरामर केले.शिवराज्याभिषेक विधी करणार्या गागा भट्टांनी देखील त्यांचा समयनद हा ग्रंथ संभाजी राजांना अर्पण केला आहे. या महानायकाने भारतातील साहित्यिकांना, कादंबरीकारांना, कथाकारांना, नाटककारांना वेगवेगळ्या प्रकारे खाद्य पुरविले. बुद्धीच्या अनेक ठेकेदारांनी आपापल्या पद्धतीने शंभुराजांचे चरित्र लोकांसमोर मांडले. परंतु राष्ट्ररक्षणार्थ बलिदान देणार्या पराक्रमी शिवपुत्रावर साहित्यिकांनी प्रचंड अन्याय केलेला आहे. राम गणेश गडकरींनी "राजसंन्यास" नाटकाच्या माध्यमातून सर्वांवर कढी केलेली आहे. कारण राजसंन्यास नाट्य छ.संभाजी राजांचे बदफ़ैली, स्त्रीलंपट चरित्र रंगवून प्रचंड अन्याय करणारे आहे. संभाजी राजांच्या बदनामीला सर्वप्रथम कारणीभूत होती ती मल्हार रामराव चिटणीसची बखर. स्वराज्यद्रोहा बद्दल संभाजी राजांनी बाळाजी आवजी चिटणीसला देहांत शासन दिले होते. बाळाजी हा मल्हार रामराव चिटणीसचा खापरपणजोबा होता. आपल्या खापर पणजोबाला शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिले होते, त्याचाच सूड घेण्यासाठी तब्बल १२२ वर्षांनी मल्हार रामरावाने बखर लिहून त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान केले. परंतू कै. वा. सी. बेंद्रे यांनी चाळीस वर्षे कष्ट घेऊन शंभुचरित्राचा खरा इतिहास उभा केला आणि जाज्वल्य इतिहासातून अनेक लेखकांना दिव्य द्रुष्टी दिली. त्यामध्ये शिवाजी सावंत, डॉ.जयसिंगराव पवार, विश्वास पाटील, डॉ.कमल गोखले, विजय देशमुख यांसारख्या विद्वानांनी खरे आणि भव्य दिव्य असे  शंभुराजांचे चरित्र जनमानसांसमोर आणले. पण दुर्दैवाने संभाजी राजांच्या ज्वाज्वल कर्त्रुत्वापेक्षा त्यांच्या इतिहासाची विक्रुत मांडणी करणार्यांना साहित्य क्षेत्रामध्ये आढळ स्थान दिले गेले. त्यावर कढी म्हणजे संभाजी राजांच्या चरित्रावर प्रचंड अन्याय करणार्या गडकरींचा पुतळा संभाजी राजांच्या नावाने असणार्या उद्यानात उभारणे हीच खरी महाराष्ट्राची शोकांतिका आहे.
          संभाजी महाराज उद्यानातील गडकरींचा पुतळा काढल्यानंतर खरी कसोटी लागली ती शंभुच्या रक्तगटाची तरून पिढी निर्माण करायला निघालेल्या आणि आयुष्य ब्राह्मणप्रतिपालनाला वाहुन घेतलेल्या हिंदुत्ववाद्यांची. आता काय करावे ? या प्रश्नाने गोंधळ घातला. एकिकडे शंभुराजांविषयी निष्ठा दाखायची होती तर दुसरीकडे गडकरींचा निषेद करायचा होता अशा धर्मसंकटात सापडलेल्या हिंदुत्ववाद्यांनी या सगळ्या कृत्याला नेहमीप्रमाणे ब्राह्मणद्वेषाची लेबल लावून हात झटकून घेतले. हिंदुत्वावाद्यांचे शिव-शंभुंवरचे खोटे प्रेम वेळोवेळी उघडे पडले आहे. संभाजी ब्रिगेड ने केलेली प्रत्येक गॊष्ट ब्राह्मणद्वेषाचा शिक्का मारून झाकुन ठेवायची ही हिंदुत्ववाद्यांची जुनी खोड आहे, म्हणुनच की काय जेम्स लेन प्रकरणावेळी संभाजी ब्रिगेडने जिजाऊ मातांच्या अपमानाचा तिव्र संताप आणि निषेद व्यक्त केल्यावर हिंदुत्ववाद्यांनी मात्र शांत राहाणंच पसंत केलं होतं. तोच स्थायी स्वभाव त्यावेळीही त्यांनी अबाधित ठेवला आहे. हिंदुत्ववाद्यांना जर संभाजी राजेंविषयी आदर आणि प्रेम असता तर गडकरींच्या लिखानाचा विचार केला असता आणि काही कारणास्तव निषेद करायला जमत नसले तरी किमान खंत तरी व्यक्त असती पण या दोन्ही ठिकाणी ते असमर्थ ठरलेत. बहुजनवाद्यांची काय वेगळी स्थिती नाही. संभाजी राजेंना शाक्तवीर ठरवनार्या बहुजनवाद्यांनी पण या प्रकराणाकडे केवळ संभाजी मराठा आणि गडकरी ब्राह्मण त्यामुळे ते दोघे बघून घेतील असा सोईस्कर विचार करून दुर्लक्ष करणंच पसंत केलेलं दिसतं. त्यामुळे सच्चा शंभुभक्तांच्या जबाबदाऱ्या आहेत.
महात्मा फ़ुले, केळुस्करादी लेखक आणि राजसंन्यास
गडकरींचा पुतळा  काढून फ़ेकल्यानंतर त्यांच्या साहित्यविषयी चर्चेला उधान आलं. बर्याच विद्वानांनी मते मांडली. संभाजी महाराजांविषयीचे हे चित्र दुर्दैवाने इतिहासकारांमध्येच बराच काळ प्रचलित होते. तेंव्हाचे सर्वच इतिहासकार या गैरसमजाला बळी पडलेले आहेत. केवळ गडकरीच नव्हे. त्यामुळे गडकरींनी लिहिलेले नाटक हे त्यावेळच्या संदर्भ आणि पुराव्यावर आधारीत आहे असे म्हणून या विद्वानांनी पद्धतशीरपणे गडकरींना पाठिशी घातले आहे. परंतु हे विद्वान हे विसरले आहेत की गडकरींनी राजसंन्यास मध्ये जो विक्रुतीचा उन्माद मांडलाय तो याआधी कोनत्याही लेखकाने किंवा इतिहासकाराने मांडलेला नाही. इतर लेखकांनी संभाजीराजेंच्या विक्रुत इतिहासातील संदर्भ आहे तसे वापरले आहेत पण गडकरींनी मात्र त्या विक्रुतीमध्ये स्वत:च्या विकृतीची घुसळण केलेली स्पष्ट जाणवते. त्यामुळे इतर इतिहासकार चुकिच्या इतिहासाला बळी पडले असे म्हणता येईल पण गडकरींबद्दल तसं समजता येणार नाही.
               महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड जे काही करेल त्याला ब्राह्मनद्वेषाची पार्श्वभुमी असते तसेच अफ़जल आणि औरंगजेबाची कबर उध्वस्त करणे हा इस्लामद्वेष नाही पण कोंडदेव आणि गडकरींचा पुतळा काढणे म्हणजे ब्राह्मणद्व्वेष आहे असा एक लाडका सिद्धांत हिंदुत्ववाद्यांचा असतो. पण संभाजी ब्रिगेडला विरोध करण्याच्या नादात आपण काय करतोय याचही भान त्यांना राहात नाही. याही प्रकरणात संभाजी ब्रिगेडला विरोध करण्याच्या भरात त्यांनी गडकरींच्या लेखनाचे समर्थन केले. मग खरच जर गडकरींच्या वेळी संभाजी राजेंचा तोच इतिहास प्रचलित होता तर त्या इतिहासामध्ये संभाजींची बदनामी आहे आणि तो आपण ऐतिहासिक आधार म्हणून घेऊ नये एवढी पण अक्कल गडकरींना असू नये हे मात्र न पटण्यासारखे आहे. एक वेळ मान्य केले की संभाजींचा इतिहास त्यावेळी तोच होता त्याला गडकरी बळी पडले पण शिवरायांचा इतिहास तर सत्य होताच ना तरीही शिवरायांना दुय्यम स्थान देऊन स्वराज्ज्याचे श्रेय रामदासांच्या घस्यात घालण्यामागचा गडकरींचा काय हेतु होता ? किमान याचा तरी विचार हिंदुत्ववाद्यांनी करावा. हिंदुत्ववादी मंडळीं दावा करतात की ते नाटक प्रकाशित झालं नाही त्यामुळे जे नाटक कोणीच वाचलेले नव्हते ते आता संर्वांना माहीत झाले. हिंदुत्ववाद्यांची एक सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे त्यांना जे माहीत नाही ते आस्तित्वातच नाही असे ते ग्रुहित धरतात त्यामुळे "राजसंन्यास" आम्हाला माहीत नाही म्हणजे कोणालाच माहीत नाही असे त्यांनी सहज ठरवूनही ठाकले. पण त्यांना माहीत असणे गरजेचे आहे की,  'महाराष्ट्र शासनाने' 'राम गणेश गडकरी समग्र वाड्मय' प्रकाशित केलेले आहे.त्याचे संपादन प्र. के. अत्रे यांनी केलेले आहे. त्यामध्ये राजसंन्यास नाटकही प्रकाशित केले आहे. त्यामुळे हे नाटक कोणालाच माहीत नाही या भ्रमातून हिंदुत्ववाद्यांनी स्वत:ची सुटका करावी.
               राम गणेश गडकरींच्या बचावा साठी हिंदुत्ववाद्यांची एक मांडणी असते की, महात्मा फ़ुलेंनी शिवरायांना अक्षरशुन्य म्हंटले. तसेच क्रुष्णा अर्जुन केळूस्कर यांनीही संभाजी राजें आणि शिवरायांविषयी हेच मत मांडलेले आहे मग यांचं काय करायचं ?. महात्मा फ़ुलेंनी शिवरायांवर जे लिखाण केले ते त्या काळात जे पुरावे उपलब्ध होते त्यानुसार. शिवरायांना ते कमी लेखत नव्हते. किंबहुना शिवरायांचे श्रेष्ठ्त्व त्यांच्या साहित्यातून दिसून येतेच. शिवराय हे निरक्षर नव्हते. आज याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे महात्मा फ़ुलेंना कोणताही दोष लागत नाही. आज महात्मा फ़ुले हयात नाहीत. ते हयात असताना जर असे पुरावे उपलब्ध झाले असते तर त्यांनी आपल्या भुमिकेत निश्चित बदल केला असता.किंबहुना त्यांना या गोष्टींचा खुप आनंदच झाला असता. महात्मा फ़ुले हे खरे सत्यशोधक छ्त्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे अनुयायी होते. परंतु महात्मा फ़ुलेंच्या शिवरायांविषयीच्या बोलण्याची तुलना गडकरींच्या राजसंन्यास शी करणे म्हणजे कानाखाली चपटी मारलेल्याची तुलना आयसीस च्या आतंकवाद्याशी करण्यासारखे आहे. शिवरायांना दुय्यम ठरवून संभाजी राजेंना चरित्रहीन ठरवण्यापेक्षा केवळ अक्षरशुन्य म्हणने हा खुप मोठा अपमान हिंदुत्ववाद्यांना वाटतो यातून शिवरायांविषयीचा आदर नाही तर महात्मा फ़ुलेंविषयीचा द्वेषच स्पष्ट जाणवतो. केळुस्कर गुरुजींबद्दल बोलायचे झाले तर त्यांनीच आपल्या छत्रपती शिवाजी महाराज या पहिल्या शिवचरित्रामध्ये प्रस्थावनेत नमुद असे केले आहे कि, "लेखकाला ज्या गोष्टी आज सत्य वाटल्या व ज्या क्रमाने त्या घडल्या अशी त्याची खात्री झाली, त्या गोष्टी त्या क्रमाने त्याने प्रस्तुत ग्रंथात नमूद केल्या आहेत. अनेक पंडितांचे इतिहाससंशोधनाचे काम सांप्रत चालू आहे. त्यांचे शोध जगापुढे आल्यावर प्रस्तुत चरित्रलेखात दुरुस्ती करावी लागेल हे उघड आहे." त्यामुळे आज आपण त्यांच्या ग्रंथातील अनैतिहासिक मुद्दे बाजुला काढू शकतो पण गडकरींच्या राजसंन्यास मधील असे मुद्दे बाजुला काढण्याची हिम्मत गडकरीप्रेमी हिंदुत्ववाद्यांमध्ये आहे काय ?. त्यामुळे गडकरींच्या राजसंन्यास मधील विक्रुतीची तुलना इतर इतिहासकारांच्या लेखणाशी करणे ही सुद्धा एक विक्रुतीच आहे असं म्हणावं लागेल.
शंभुप्रेमींची जबाबदारी
           संभाजीराजे म्हणजे शिवरायांच्या वंदणीय व्यक्तिमत्वातून हे प्रकटलेले शंभुतेज. आपल्या अफ़ाट पराक्रमाने शंभुराजांनी हिंदवी स्वराज्याच्या सीमारेषा वर्धिष्णू करीत या तेजाची दाहकता सिद्ध केली. शिवरायांनंतर हिंदवी स्वराज्यावर लाखोंचा फ़ौजफ़ाटा घेऊन चालून आलेल्या औरंगजेबाला नामोहरण करणे ही सामान्य बाब नव्हती. नऊ वर्षाच्या अखंड संघर्षात एकही लढाई हरले नाहीत किंवा एकही तह केला नाही.मोगली सल्तनत, पोर्तुगिज, इंग्रज या बलाढ्य शत्रुबरोबरच स्वकियांविरोधात हिंदवी स्वराज्याच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी केलेली एकाकी झुंज ही निश्चितच संभाजीराजांच्या महानतेची आणि पराक्रमाची साक्ष देते.हे सगळं त्यांनी कोणासाठी केले ? स्वराज्यासाठी, तुमच्या - आमच्यासाठी. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षीच संभाजीराजेंनी स्वराज्यकार्यी हौतात्म्य पत्करले. अटकेत असताना त्यांनी दिर्घकाळ यमयातना सहन केल्या, एक - एक अवयव तोडला गेला, अंगाची साल सोलून काढण्यात आली, डोळे काढून जीभ कापली गेली, पायापासून ते मस्तकापर्यंत अवघ्या शरीराची खांडोळी केली गेली, आणि हे सगळं सहन केलं ते स्वराज्यासाठी, आपल्या साठी. एवढ्या मरणयातना सहन करूनही स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा अभेदच राखुन बलिदानाची, त्यागाची एक परंपरा या राष्ट्राला समर्पित केली जिला देशातच काय पण जगाच्या इतिहासात तोड नाही. पण मालती तेंडुलकर "मराठ्यांचा राजा" या नाटकात म्हणतात, "संभाजी म्हणजे स्वाभिमानाची व शौर्याची जळती मशाल, परंतु दुर्दैवाने ते महाराष्ट्रात जन्मले ! त्यांच्या अतुल व अमोघ क्रुतीला आमच्या कारस्थानी इतिहासकारांनी हिडिस रुप दिले व मानभावी इतिहासकारांनी त्याला माना डोलवल्या". याचप्रमाणे संभाजी राजांच्या इतिहासाचे विक्रुतीकरण पुन्हा होऊ शकते.आपल्या समाजाची मानसिकता ही नाटक, कादंबरी, चित्रपट या माध्यमातून मांडला जाणारा इतिहास हाच खरा असे माननारी आहे. कारण ग्रंथापेक्षा या नाटक आणि चित्रपट माध्यमांचा प्रभाव खुप असतो. हेच काही वर्षात हे नाटक प्रकाशित होऊन त्या विक्रुतीखाली संभाजी राजांचा खरा इतिहास दडपला जाऊ शकतो. त्यामुळे संभाजी राजांचं खरे चरित्र आणि इतिहास सर्वांसमोर आणने हे महत्वाचे कर्तव्य आहे. संभाजी राजांचे मद्यान्हीच्या तळपत्या सुर्यप्रकाशाइतके शुद्ध चरित्र सर्वांसमोर आणने हे शंभुप्रेमींचे आद्य कर्तव्य आहे, हिच सर्वात मोठी जबाबदारी आहे. 

13 April 2014

इतिहासावरील विषाणू दाखवणारा लेखक

             आपल्या देशाचा इतिहास म्हणजे गुलामगिरीचा इतिहास होय. हिंदुस्तान आणि महाराष्ट्राचा विचार केला तर बाहेरून आलेल्या आर्यांच्या टोळ्यांनी इथल्या मुळ रहिवाशी महारट्ठ यांना जिंकुन इथला मुळ इतिहास मिटवण्याचे काम या टोळ्यांनी केले. राजमाता जिजाऊ, विश्ववंद्य शिवराय यांनी गुलामगिरीचा इतिहास बदलला आणि स्वराज्याची स्थापना केली.नंतर फ़ुले, शाहू, आंबेडकरांनी [यामध्ये केळुस्कर गुरुजी आणि जवळकर यांचेही मोलाचे योगदान आहे.] आपल्या इतिहासात घुसखोरी करणार्या विषाणूंना नष्ट केले व स्वत: इतिहास समोर आणला. परंतू [अजुनही] आपल्या इतिहासात विषाणू लपून बसले आहेत हे विषाणू दाखविण्याचे काम डॉ.बालाजी जाधव हे करीत आहेत.
डॉ.बालाजी जाधव समिक्षक, विचारवंत आणि नव्या पिढीचे लेखक आहे. मराठा सेवा संघाची मराठवाडा विभागाची त्यांच्याकडे जबाबदारी आहे. महाराष्ट्रभर त्यांचे व्याख्यानाचे कार्यक्रम होत असतात. त्यांचे कार्यक्षेत्र मोठे आहे. शिवाय ते उच्चशिक्षित बी. एच. एम. एस डॉक्टर आहेत. सध्या एम. डी. चेही शिक्षण चालू आहे. तरूण वयात अल्पावधीतच त्यांनी हे यश प्राप्त केलं आहे. समाजसेवेचे व्रुत्त घॆऊन ते काम करत आहेत. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी मराठ्यांना संघटीत होण्याचे आवाहन केले आहे. त्यांची घेतलेली ही मुलाखत.
खंरत्नाकर डागळे : आपण लेखक म्हणून परिचीत आहात त्याच बरोबर मराठा सेवा संघाचे कार्य ही चालू आहे. या विचाराकडे आपण कसे वळलात ?
डॉ.जाधव साहेब : तसा मी कट्टर शिवसैनिक होतो. घरातही हिंदुत्ववादी वातावरण. माझ्या घरात बाळासाहेब ठाकरे यांचे फ़ोटो असायचे. सामना या दैनिकातील कात्रणं मी काढून ठेवत. ते आजही माझ्याकडे आहेत.मी कट्टर हिंदुत्ववादी होतो.आज अगदी या विरोधी आहे.
रत्नाकर खंडागळे : मग परिवर्तनवादी विचाराकडे कसे ?
डॉ.जाधव साहेब : मी प्रथम कट्टर हिंदुत्ववादी होतो. मी कुणाचेही काही ऐकत नव्हतो. माझ्या भावांनी मला एकदा प्रश्न केला की, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध का झाला ? या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. त्यांनी दुसरा प्रश्न केला की, तुकाराम महाराज वैकुंठी गेले की त्यांच्या खून झाला ? याही प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. मात्र भावाने असे प्रश्न केल्याने मी मात्र भावावर खवळलोच तेंव्हा भावाने मला आ.ह.साळूंके यांचे विद्रोही तुकाराम, मा.म.देशमुख यांचे रामदास पेशवाई आणि गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचण्यास सांगितले. दुसरा प्रसंग असा घडला की, मी लातुरला १२ वी इंटरशीपला असतांना माझा मित्र भोसले मला मा.म.देशमुख यांच्या केडर कॅंपला घेऊन गेला होता. तेंव्हा मला त्यांचे विचार आवडले आणि डोळ्यावरची हिंदुत्ववादाची झाडप गळून पडली. आपणही समाजासाठी काहीतरी करावं असं ठरवलं. त्यावेळेस मा.म.देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी शिक्षण विचारलं, मी १२ वी इंटरशिपला असल्यामुळे त्यांनी नंतर या तुमचं समाजासाठी काम करण्याचं वय नाही असे सांगितले. ही आपलेपणाची भावना मला पटली कारण असे कोणीही सांगत नाही तेंव्हा पासून मी या चळवळीत कार्य करायचं ठरवलं व त्याप्रमाणे मी कार्य करत आहे.
रत्नाकर खंडागळे : आपण लिखानाकडे कसे वळलात ? 
डॉ.जाधव साहेब : मराठा सेवा संघाचे किर्तन ऐकले व जेम्स लेन हे प्रकरण झालं तेंव्हा अक्षरशा मी रडलो. यावेळेस मी या विषयावर अनेक पुस्तकं वाचली यावरच मी माझ्या शैलीत एक प्रकरण लिहिले या प्रकारे मी लेखनाकडे वळलो. एक द्रुष्टी मिळाली ओळीचा मतिअर्थ समजला.
रत्नाकर खंडागळे : आपले पहिले पुस्तक कोणते ? काही अडचणी आल्या का ?
डॉ.जाधव साहेब : रामदासी पेशवे शिवाजी महाराजांवर शिंतौडे उडवत होते. तेंव्हा मराठा हा झोपलेलाच होता त्यांना जागे करण्यासाठी मराठ्यांनो षंड झालात काय ? हे पहिले पुस्तक लिहिले.अडचण म्हणजे हे पुस्तक छापायला कोणी प्रकाशक तयार नव्हता. मुद्रकही छापायला तयार नव्हता. तेंव्हा नाव न टाकण्याच्या अटीवर एक मुद्रक तयार झाला व मी ही आईच्या नावाने पंचफ़ुला प्रकाशन मार्फ़त पहिले पुस्तक छापले. ह्या पुस्तकाची दोन वर्षात १५००० प्रति विकल्या गेल्या. काही पुस्तके तर आमच्या बौद्ध बांधवांनी स्वत: वाटली.७ हजार पुस्तके जिजाऊ स्रुष्टीवर दोन तासात विकल्या गेली या पुस्तकाच्या सात आव्रुत्या आहेत.
रत्नाकर खंडागळे : आगामी कुठलं पुस्तक येतय ? किती पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.
डॉ.जाधव साहेब : सध्या खेडेकर साहेबांच्या जिजाऊ कहे शिवबासे या पुस्तकाचे अनुवाद चालू आहेत. त्याच वाघ्या कुत्र्यावर ही पुस्तक येतय. माझी पाच पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये मराठ्यांनो षंड झालात काय ?, नाठाळांच्या काठी हानू माथा,ब्राह्मणांना का झोडपू नये, जेम्स लेन पुस्तकातील ब्रह्मराक्षस हे पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
रत्नाकर खंडागळे : शिवधर्माबद्दल थोडं सांगा.
डॉ.जाधव साहेब : शिवधर्म म्हणजे एक जाती अंताची चळवळ आहे. इथला बहुजन समाज अठरा पगड जातीत विभागला आहे.त्यांना स्वत:ची ओळख नाही. त्यांना ओळख देण्याचे काम आम्ही करतो. बौद्ध धर्म आणि शिवधर्माच्या माध्यमातून आम्ही जाती अंताचा लढा लढतोय.
रत्नाकर खंडागळे : मराठा आरक्षणा बाबत काय मत आहे ?
डॉ.जाधव साहेब : मराठा समाज हा शिक्षणापासून दुर आहे.आरक्षण हे बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊसाहेब देशमुख यांनी दिले आहे. सामाजिक,शैक्षणिक आणि मागासलेपण दुर करण्यासाठी दिले आहे. परंतू कुणबी आणि मराठा असा भेद करून ते नाकारले गेले आहे. त्यासाठी आम्ही लढत आहोत. ओबीसी ला आमचा विरोध नाही ते आमचे बंधुच आहेत.वैदिक विरुद्ध अवैदिक असा हा लढा आहे.
रत्नाकर खंडागळे : तरुणांना काय संदेश द्याल ?
डॉ.जाधव साहेब : मराठा तरुणांमध्ये एक दुर्गुण आहे ते एकमेकांच्या जवळ येत नाहीत. जेम्स लेन प्रकरणात ब्राह्मण समाज एक झाला परंतू आमचा मराठा समाज एक होत नाही. त्यांच्या अहंमपणाची भावना आहे.
ही भावना टाकून आज तरुणांनी संघटित व्हावे. आज विचार, देवान-घॆवान करणं महत्वाचं आहे. मोठा भाऊ म्हणून काम करावं तेंव्हा इतिहास सांगण्याचा व शिकवण्याचा अधिकार राहिल.
मुलाखत : रत्नाकर खंडागळे

16 January 2014

मराठा सेवा संघ बदलतो आहे?

             सिंदखेडराजाला १२ जानेवारीला होणारा मराठा सेवा संघाचा जिजाऊ महोत्सव. या सार्‍या उत्सवांना लाखोंची गर्दी असते. हे उत्सव आयोजित करणार्‍या संस्था, संघटना या महाराष्ट्राचे राजकारण व समाजकारणावर निर्णायक प्रभाव टाकणार्‍या असल्याने स्वाभाविकच या उत्सवांमध्ये कुठले निर्णय होतात, कार्यकर्त्यांना कुठली दिशा दिली जाते, याकडे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसोबतच माध्यमांचंही बारकाईने लक्ष असतं.
महाराष्ट्रात काही संस्था-संघटनांच्या वार्षिक उत्सवांचं एक वेगळं महत्त्व आहे. दसर्‍याच्या दिवशी नागपुरात दीक्षाभूमीवर आयोजित होणारा धम्मचक्र परिवर्तन दिन, त्याचदिवशी रेशीमबागमध्ये होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, तिकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा उत्सव आणि
         या संघटनांमध्ये मराठा सेवा संघ ही तुलनेने नवी संघटना. मात्र केवळ २४ वर्षांच्या कालावधीत या संघटनेने सार्‍याच क्षेत्रातील दिग्गजांना दखल घेणे भाग पडावे, असे आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच जिजाऊ महोत्सवात काय निर्णय होतात, याबाबत सार्‍यांनाच उत्सुकता असते. मराठा सेवा संघाबद्दल त्यांचे टीकाकार, विश्लेषक काहीही म्हणो, मात्र महाराष्ट्राच्या समाजजीवनात त्यांनी घडविलेले काही बदल कोणालाच नाकारता येणार नाही. मराठा सेवा संघाचं सर्वात मोठं कुठलं योगदान असेल, तर हजारो वर्षे चुकीच्या रूढी-परंपरा आणि कर्मकांडांचा जबरदस्त पगडा असलेल्या बहुजन समाजाला त्यांनी खडबडून जागं केलं. इतिहासाचं जाणीवपूर्वक केलेलं विकृतीकरण या समाजाच्या लक्षात आणून देताना त्यांना त्यांच्या सत्त्वाची जाण सेवा संघाने करून दिली. असं म्हटलं जातं की, पोथी वाचणार्‍या समाजाला सेवा संघानं पुस्तकं वाचायला शिकविली. ते खरंच आहे. धार्मिक पोथी, पुराणांशिवाय काही न वाचणार्‍या समाजाला सेवा संघानं फुले, आंबेडकर वाचायला लावले. हे परिवर्तन खूप मोठं आहे. सामाजिक समरसता वगैरे अशा भंपक गोष्टी न करता एका समाजाची मानसिकता बदलविण्याचं मोठं काम सेवा संघानं केलं आहे. एका मोठय़ा समूहाला आत्मभान देणारं हे परिवर्तन आहे. हा असा बदल घडवायला शेकडो वर्षे जातात. 
         मात्र २५ वर्षांपेक्षा कमी कालावधीत सेवा संघाने हे काम केलं. दुसरं महत्त्वाचं कुठलं काम सेवा संघानं केलं असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था अशा जातीयवादी आणि समाजात द्वेषाची पेरणी करणार्‍या संघटनांविरुद्ध ताकदीने शड्ड ठोकला. सरकार नावाची यंत्रणा आणि इतर पुरोगामी संघटना या संस्थांचा मुकाबला करताना सपशेल अयशस्वी ठरत असताना सेवा संघाने वैचारिक मार्गाने आणि वेळप्रसंगी मैदानातही या संघटनांना जबरदस्त आव्हान दिले. बहुजन समाजाचं ब्राह्मणीकरण करायला निघालेल्या या संघटनांच्या कारवायांना सेवा संघाने बर्‍यापैकी चाप लावला हे कबूल करावंच लागतं. पुरोगामी विचारसरणीचा पुरस्कार करणारा एक जबरदस्त दबाव गट सेवा संघाच्या निमित्ताने महाराष्ट्रात तयार झाला. हे परिवर्तन करताना मराठा सेवा संघालाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखाच द्वेषाचा मार्ग पत्करावा लागला. ब्राह्मण समाजाला टार्गेट करून इतर जातीयवादी संघटनांप्रमाणेच स्वतंत्र विचार न करू शकणारी पिढी सेवा संघाने तयार केली, असा आरोप त्यांच्यावर होतो. या आरोपात काही अंशी तथ्यांश निश्‍चित आहे. सेवा संघाच्या प्रारंभीच्या काळात आणि अगदी आताआतापर्यंतही देशातील प्रत्येक समस्येला ब्राह्मण जबाबदार आहेत, अशी मांडणी सेवा संघाकडून होत होती. कुठलाही अपवाद न करता सरसकट सर्व ब्राह्मणांना सेवा संघाचे नेते आडव्या हाताने घेत होते. ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या सर्व प्रथा, परंपरा मोडित काढल्या पाहिजेत, आर्यांनी (ब्राह्मणांनी) या देशावर आक्रमण केल्यानंतर येथील समाजाला गुलाम केल्यानंतर ज्या-ज्या गोष्टी लादल्या, त्या सार्‍या नाकारायचा चंग सेवा संघानं बांधला. त्यातून मग गुलामगिरीची सारी प्रतीकं झिडकारून लावायचे आवाहनही सेवा संघाच्या विचारपीठावरून करण्यात येत असे. 
         अगदी आताआतापर्यंत महिलांनी मंगळसूत्र घालू नये, कुंकू लावू नये, बांगड्या घालू नये, असे ठासून सांगणारे काही वक्ते जिजाऊ महोत्सवात असायचे. हिंदू धर्मातील बहुसंख्य ज्यांना देव म्हणून भक्तिभावानं पूजतात, ते आपले देव असू शकत नाही, असेही सांगितले जात असे. हा सर्व प्रचार सनातन व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारण्यासाठी व्यूहरचना म्हणून कदाचित ठीक असेल, पण यातून सामान्य कार्यकर्त्यांच्या डोक्यात जबरदस्त गोंधळ तयार होत होता. तसंही देवाधर्माच्या विषयात हात टाकला की सॉलिड केमिकल लोचा निर्माण होतो, हा पुरोगामी संघटनांचा नेहमीचा अनुभव आहे. मराठा सेवा संघही सध्या या अवस्थेतून जात आहे. त्यामुळेच परवाच्या जिजाऊ महोत्सवात डॉ. आ. ह. साळुंखे यांनी सुधारित शिवधर्मगाथेबद्दल माहिती देताना मानवी स्वातंत्र्यांचा आदर करण्याचे आवाहन करताना महिलांनी मंगळसूत्र घालावे की नाही, कुंकू लावावे की नाही, बांगड्या घालाव्या की घालू नये, हा त्यांचा अधिकार आहे. या विषयात जबरदस्ती करता येणार नाही, अशी भाषा वापरली तेव्हा सेवा संघाचे अनेक कार्यकर्ते चमकले. सेवा संघ बदलत तर नाही ना, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. जिजाऊ महोत्सवाचे अनेक वर्षांपासून वार्तांकन करणार्‍या वार्ताहरांनाही सेवा संघ बदलतो आहे, काहीसा सौम्य होत आहे, हे या वेळी जाणवले. कधी काळी क्रिकेट या खेळाची तीन लाकडं आणि अकरा माकडं अशा वाक्यात संभावना करणारा सेवा संघ आता एका क्रिकेटपटूला मराठा विश्‍वभूषण पुरस्कार देतो, ही विसंगतीही अनेकांना खटकली. अर्थात, रेखाताई खेडेकरांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविण्यासारख्या अनेक विसंगती सेवा संघाच्या प्रवासात दाखविता येतात. मात्र सेवा संघाच्या विचारपीठावर आणि कोअर मीटिंगमध्ये त्यावर वेळोवेळी मोकळेपणाने चर्चाही होते. या लेखाचा तो विषय नाही. सेवा संघ बदलतो आहे का, हा मुद्दा आहे. या विषयात सेवा संघाच्या जडणघडणीत सुरुवातीपासून सहभागी असलेल्या काही जणांसोबत चर्चा केली असता त्यांनी सेवा संघ निश्‍चितपणे बदलत आहे, हे मान्य केले. मात्र हे बदल वैज्ञानिक बदल असून संघटनेला निकोप वाढीकडे नेणारे बदल असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ब्राह्मण समाजाबद्दलचा आक्रमक प्रचार आणि प्रतीक नाकारण्याबाबतचा टोकाचा अट्टाहास याबाबत सेवा संघामध्ये प्रारंभापासूनच दोन मतप्रवाह होते. 
         एक गट इतिहासाचं विकृतीकरण ज्यांनी केलं, ज्यांनी वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था निर्माण करून बहुजन समाजाला हजारो वर्षे गुलामगिरीत ठेवलं त्यांच्याबद्दल आक्रमकतेनेच बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे आणि त्यांनी निर्माण केलेली सारी प्रतीकं उखडून फेकली पाहिजे, नाकारली पाहिजे, या मताचा होता. दुसरा गट मात्र हजारो वर्षांच्या माथी मारलेल्या का होईना परंपरा, प्रतीकं काही दिवसात मोडीत काढता येत नसतात. तसेही माणसं जबरदस्तीने बदलत नसतात. त्यामुळे वैयक्तिक आचरणाबाबत कुठलेही फतवे काढू नयेत. माणसं तयार झालीत की त्यांचे अपसमज आपोआप मोडित निघतात. त्यामुळे टोकाचा विचार न करता चळवळ निकोप आणि सशक्त केली पाहिजे, या मताचा होता. कोणं कोणत्या जातीत जन्माला यावं हे कोणाच्याच हाती नसतं. त्यामुळे ठरावीक समाजाबद्दल न बोलता प्रवृत्तीला विरोध असला पाहिजे, असेही हा गट आग्रहाने सांगत होता. शेवटी डॉ. आ. ह. साळुंखेंसारख्या ज्यांचा इतिहास, धर्म, संस्कृती, समाजशास्त्राबद्दल प्रचंड अभ्यास आहे, त्यांना भूमिका ठरविण्याचे अधिकार देण्यात आले. डॉ. साळुंखे यांचा लौकिक हा अतिशय संतुलित व निकोप विचार करणारा विचारवंत असा आहे. त्यांनी शिवधर्मगाथेतील बदलाबाबत सांगताना, 'लढाई ही ईश्‍वराच्या अस्तित्वाबद्दल कधीच नव्हती. संघर्ष हा शोषणाविरोधातला आहे. त्याविरोधात ठामपणे उभं राहून समतेची शिकवण देणं हाच शिवधर्माचा गाभा आहे,' असे सांगितले. हे त्यांचं सांगणं समजून घेण्याजोगं आहे. 
            विवेकवाद आणि विवेकाचा आधार हीच सुजाण म्हणविणार्‍या सर्वांची जगण्याची पद्धत असली पाहिजे. त्यातही परिवर्तनाच्या चळवळीत काम करणार्‍या माणसांनी चळवळीच्या वाढीसाठी आवश्यक ते बदल स्वीकारले पाहिजे. बदल हा शेवटी माणसाचा स्थायिभाव आहे आणि तसंही कट्टरता ती कोणाचीही असो, शेवटी ती नुकसानच करते. त्यामुळे रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करताना एका व्यापक उद्देशाने मराठा सेवा संघात सकारात्मक बदल होत असेल, तर त्याचं स्वागतच करायला हवं. 

(लेखक दैनिक 'पुण्य नगरी'चे कार्यकारी संपादक आहेत.) भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

22 September 2013

महापुरुषांना डोक्यावर घेण्याऐवजी डोक्यात घ्या

महापुरुषांना डोक्यावर घेण्याऐवजी महापुरुषांचे कार्य विचार डोक्यात घ्या त्यानेच खरी प्रगती होईल.
                                         - शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब
                                                         (मराठा सेवा संघ संस्थापक)
            संपूर्ण बहुजन समाजाच्या मनात ज्या शिवरायांबद्दल आदर आणि अभिमान आहे त्यांना खरा इतिहास सर्वप्रथम महात्मा फ़ुलेंनीच समोर आणला.महात्मा फ़ुले यांची शिवरायांवर अतोनात श्रद्धा होती.त्यांनीच रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढून पहिली शिवजयंती साजरी केली.शिवरायांचे खरे चरित्र प्रथम महात्मा फ़ुले यांनी लिहिले.शिवरायांचा पोवाडा लिहुन खरे शिवराय गो-ब्राह्मण प्रतिपालक नव्हे तर कुळवाडीभुषण होते हे सत्य सर्वप्रथम मांडले.महात्मा फ़ुलेंनी शिवरायांवर जे लिखाण केले ते त्या काळात जे पुरावे उपलब्ध होते त्यानुसार.शिवरायांना ते कमी लेखत नव्हते.किंबहुना शिवरायांचे श्रेष्ठ्त्व त्यांच्या साहित्यातून दिसून येतेच.शिवराय हे निरक्षर नव्हते.आज याचे पुरावे उपलब्ध आहेत.त्यामुळे महात्मा फ़ुलेंना कोणताही दोष लागत नाही.आज महात्मा फ़ुले हयात नाहीत.ते हयात असताना जर असे पुरावे उपलब्ध झाले असते तर त्यांनी आपल्या भुमिकेत निश्चित बदल केला असता.किंबहुना त्यांना या गोष्टींचा खुप आनंदच झाला असता.महात्मा फ़ुले हे खरे सत्यशोधक छ्त्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे अनुयायी होते.
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना गुरु मानत होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा जोतिबा फ़ुले यांना गुरु मानत होते.महात्मा जोतिबा फ़ुले हे शिवरायांना गुरु मानत होते.छ.शिवाजी महाराज गुरु मानत होते संतशिरोमणी तुकोबारायांना आणि तुकोबारायांच्या गाथे वर तथागत बुद्धांच्या विचारांचा प्रभाव होता.महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीचे दर्शन घॆतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्यांनी जय शिवराय ,छ.शिवाजी महाराजांचा विजय, छ.शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या.अशा रीतीने बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची शिवरायांचे दर्शन घॆऊन केली.बेळगांव येथे शिवरायांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते.महाराष्ट्र शासनाने ही पत्रे प्रकाशित केलेली आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर लहान असताना "क्रुष्णराव अर्जुन केळूस्कर" गुरुजींनी त्यांना बुद्ध चरित्र भेट दिले होते.या चरित्रामुळे बाबासाहेबांना धर्मांतराची प्रेरणा मिळाली.केळूस्कर गुरुजी हे एक बहुजन विद्वान होते.छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर "बॅरिस्टर" झाल्यावर त्यांची कोल्हापूर शहारात रथातून मिरवणूक काढून फ़ुले उधळली होती.राजा सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना परदेशात शिक्षणासाठी सहाय्य केले होते.सयाजीराव गायकवाड हे इ.स. १८७५ ते इ.स.१९३९ सालादरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते.बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.
मराठा स्वराज्याचा सक्रिय स्वाभिमान उरी बाळगणार्या महाराजांनी आपल्या पराक्रमाने मराठी मुलुखाची शान भारत खंडात वाढवून भगवा झेंडा मोठ्या अभिमानाने फ़डकत ठेवला;पण त्यांची पायरी कधीच बदलली नाही.परंतू आपला इतिहास न समजलेला बहुजन आजही आपण कोण आहोत हे विसरत आहेत.त्यामुळे आता आपणच ठरवावे की,आपण कोण आहोत ? कारण जो समाज आपला इतिहास विसरतो तो कधी इतिहास घडवू शकत नाही असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत.सध्याचा आंबेडकरी भक्त हे फ़क्त आंबेडकरांना डोक्यावर घेऊन जय भिम करून नाचतात पण सच्चा आंबेडकरी अनुयायी हे आंबेडकरी विचार डोक्यात घेऊन समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन समाजप्रबोधन करतात.असेच सर्वच बहुजन महापुरुषांच्या बाबतीत झाले आहे.त्यामुळे बहुजन महापुरुषांचे भक्त सच्चे अनुयायी कधी होतील ? हाच खरा प्रश्न आहे.

8 October 2012

उल्लेखनीय प्रतिक्रिया !

[ विश्व मराठी ब्लॉग लिहिल्या पासून आतापर्यंत १५०० च्या आसपास प्रतिक्रिया कट्ट्यावर धडकल्या.प्रतिक्रिया या महत्वाच्या असतात कारण त्या लिहायला उत्सुक करतात, प्रेरणा देतात अशीच एक प्रेरणादायक प्रतिक्रिया कट्ट्यावर येवून धडकली ती प्रतिक्रिया एक मोठे लेखक आहे ते म्हणजे "मराठ्यांनॊ षंड झालात का ? " या पुस्तकाचे लेखक डॉ.बालाजी जाधव साहेब यांची.त्यांची प्रतिक्रिया खाली देत आहे. ]
"आपला ब्लोग अतिशय आवडला. अत्यंत सुंदर आणि प्रभावी रीतीने आपण आपल्या ब्लॉगची मांडणी केली आहे. खरेच आहे जिथे आयुष्याला कलाटणी देणारे शिव विचार वाचायला मिळतात ते स्थानही तेवढेच शिवमय असू नये काय? तंत्रज्ञानाचा फार चांगला फायदा आपण करून घेतला आहे. समाजाला लागणारे वैचारिक खाद्य आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पुरवित आहात. आजपर्यंत एवढा नीटनेटका ब्लोग माझ्या तरी पाहण्यात आला नाही. हा ब्लोग खरोखरच लोकप्रियतेच्या कळसावर आहे हे त्याच्या सभासद संखे वरूनच लक्षात येते. यापुढेही आपण समाजाला योग्य दिशा देणारे साहित्य निर्माण करावे आणि आम्हा वाचकांची भूक भागवावी. आपले कार्य हे पुस्तक पेक्षाही अत्यंत प्रभावी आहे कारण पुस्तक निर्मिती प्रक्रियेत बराच वेळ जातो आणि नजर चुकीने जर काही चूक झाली तर ती चूक पुस्तकांच्या प्रती संपे पर्यंत काढता येत नाही, हे मी एक प्रकाशक या नात्याने चांगलेच जाणतो. हा धोका आपल्याला नाही. लेख लिहिला की वाचकांच्या मनाचा वेध घ्यायला तो तयार होतो. चूक असेल तर लगेच दूरोस्त करता येते आणि वाचकही आपल्या विचारांचा आस्वाद घेऊन लगेचच आपली कडू गोड प्रतिक्रिया देऊ शकतो. आपल्या पुढील कार्यास शिवेछ्या. हा ब्लोग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा. विशेष गोस्त म्हणजे आपण आपल्या प्रोफिले मध्ये माझ्या "मराठ्यांनो षंढ झालात काय?" या पुस्तकातील "मराठा लढवय्यी जात ,एकेकाळची राज्यकर्ती जात ,जगातल्या १३ लढवय्या जातीपैकी प्रथम क्रमांक पटकावणारी जात, "पंजाब, सिंध , गुजरात, मराठा "या राष्ट्रगीतात महाराष्ट्राचा उल्लेख "मराठा" असा करायला भाग पडणारी जात , स्वतःच्या शौर्य, धैर्य, त्याग आणि उदारपणा या गुणांमुळे महाराष्ट्राची ओळख बनलेली जात". या ओळी टाकल्या. याचे मला फार बरे वाटले. आई जिजाऊ आपल्याला प्रचंड यश देओ हीच शिव कामना."
जय जिजाऊ!

डॉ.बालाजी जाधव
लेखक : "मराठ्यांनो षंड झालात काय ?"
धन्यवाद ! डॉ. जाधव साहेब आपल्यासारख्या लेखकांमुळेच आणि वाचकांमुळेच आम्हाला लिहायला प्रेरणा मिळते.आपण आमचा मराठी कट्टा ब्लोग वाचत रहा आणि आपलेविचार कळवत रहा.
धन्यवाद पुन्हा एकदा ..
जय जिजाऊ । जय शिवराय  ।

14 September 2012

जेम्स लेन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य

         "दि शिवाजी किंग इन इस्लामिक इंडिया" या जेम्स लेन लिखित वादग्रस्त पुस्तकामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला. भारताच्या सर्वाच्च न्यायालयाने या पुस्तकावरील बंदी उठवून जेम्स च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण केली.
          हे पाहुन भारतातील तमाम सनातनी ब्रह्मव्रुंदांना आनंदाच्या उकळ्या फ़ुटल्या  नसतील तरच नवल वस्तुत: ही जेम्स लेन च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण आहे.ही अन्यायी न्याय व्यवस्था अजुनही आमच्याच ताब्यात आहे हे ब्राह्मणांनी दाखवून दिले. जेम्स लेन  खरे तर नावाला आहे या जेम्स लेनच्या माध्यमातून पुण्यातील ब्राह्मणांनी शिवरायांवर तसेच जिजाऊंवर घावा घातला होता.
         तसे पाहिले शिवरायांचे कर्त्रुत्व व जाती अंताचा त्यांनी लढा हा पहिल्या पासूनच ब्राह्मणांच्या पोटात डचडचत होता.शिवरायांच्या लोकउद्धारक संकल्पना आणि विचार आज ना उद्या आमच्या जात भाईंच्या गोरख धंद्यासाठी मारक ठरणार आहेत हे ब्राह्मणांनी चांगले ओळखले होते.हि चाणाक्ष जात शिवरायांच्या हयातीतच जागी झाली होती.शिवरायांचे गुरु जगदगुरु संत तुकोबाराय आणि शिवराय हे ब्राह्मणांना त्यांच्या रस्त्यात काट्यासारखे सलत होते.म्हणुनच त्यांनी शिवरायांना त्रास दिला आणि संत तुकारामांना वैकुंठाला (?)पाठविले.पण या अज्ञानी व भोळ्या माणसांच्या या गोष्टी लक्षात येत नाही.जेम्स लेन ही एक अशीच यांची चाल होती.
        तसे पाहिले तर शिवशाही मातीत घालून पेशवाई निर्माण करणार्यांना  शिवशाहीचे काही देणे घेणे नाही ,शिवरायांचा आणि जिजाऊंचा अपमान झाला तरी चालेल पण आमची अभिव्यक्ती जपली पाहिजे . न्यायपालिका सुद्धा आमचे काही वाकडे करू शकत नाही हे यातून या सर्व मंडळींना दाखवून द्यायचे आहे.
 राष्ट्रपुरुष यांची बदनामी मनुवाद्यांचे हुकमी अस्त्र
            अजुन एक सर्वात महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे परिवर्तनवादी राष्ट्रपुरुष नव्हे तर परिवर्तनवादी छोटे छोटे कार्यकर्ते यांची बदनामी करणे हे ब्राह्मणी हुकमी अस्त्र आहे आणि शस्त्र आहे.राष्ट्रपुरुषांची बदनामी करून समाजात गोंधळ आणि अनादराची स्थिती निर्माण करावयाची वस्तत: स्वत: अतिशय चारित्र्यहिन, नालायक आणि बदमाश असलेले हे आमच्या राष्ट्रपुरुषांची बदनामी करून पतीव्रतेचा आव आणत असतात.बुद्ध, शाहू,फ़ुले, तुकोबाराय सुद्धा यांच्या तावडीतून सुटले नाहीत.मध्यंतरी शाहूराजांविषयी ही जमात असेच घाणेरडे विनोद समाजात पसरवत होती, हाच प्रयत्न जेम्स लेनच्या माध्यमातून यांनी शिवरायांसाठी केला.
          खरे तर करून सवरून नामानिराळे राहण्याची यांची कला कोणालाही जमणार नाही  जेम्स लेन च्या माध्यमातून मात्र या ब्राह्मणांची नालायकी अक्षरबद्ध झाली आहे .तरीही वाईट याचे वाटते की आजही आपला समाज यांना शिवशाहीर, इतिहास संशोधक म्हणून पुजत असतो.भांडारकरवर संभाजी ब्रिगेडने हल्ला केल्यावर त्या संस्थेचे नुकसान होण्याऐवजी फ़ायदाच झाला.जिजाऊंचा अपमान केल्याबद्दल त्यांचे चरित्र्य हनन केल्याबद्दल कोट्यावधी रुपये त्या संस्थेला मिळाले.ज्या जिजाऊंच्या निर्भय त्यागातून हे पुणे शहर उभे राहिले तिथेच जिजाऊंची बदनामी करणारी भांडारकर संस्था आमच्या छाताडावर पाय रोवून उभी आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेबांना अभिप्रेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य
          खरे तर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो  वर्षे ज्यांना याच ब्राह्मणांनी बोलु दिले नाही, लिहु दिले नाही , त्या व्यवस्थेविरुद्ध लढा उभारून अत्यंत उच्चप्रतिच्या प्रतिभेवर बहुजनांसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व त्या अधिकारांचे निर्मान बाबासाहेबांनी  बहुजनांसाठी केले.नाहीतर अभिव्यक्ती ही ब्राह्मणांचीच मिजासदारी होती.आता हे हुशार आणि चाणाक्ष ब्राह्मण याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा डंगोरा पिटत आमच्या अस्मितेला व गौरवशाली इतिहासाला दडपू पाहत आहेत.
         सर्वाच्च न्यायालयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनात्मक चौकटीत राहून निर्णय दिला असला तरी बहुजन समाजाच्या सर्वांगिण द्रुष्टीकोणाचा विचार केलेला दिसत नाही. याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फ़ायदा  घेत स्वत:ला तुकोबांचा वारकरी म्हणवून घेणार्या दिलीप पुरुषोत्तम चित्रे नावाच्या नालायक ब्राह्मणाची तुकोबांना "भ्योंचोद" म्हणण्यापर्यंत मजल गेली होती.दिलीप पुरुषोत्तम चित्रे आपल्या आत्मकथनात म्हणतो "तुकाराम वाण्या भ्योंचोद तु मला मराठीच्या दलदलीत खेचलेस".संदर्भासाठी (आ.ह.साळुंखे, वाद आणि वादांची वादळे).
              असले अभिव्यक्ती स्वतंत्र्य काय चाटायचे आहे आज रोजी जेम्स लेनच्या खांद्यावर बंदुन ठेवून ब्राह्मण आपला निशाणा साधत आहे.या जेम्स लेन प्रकरणातून ब्राह्मणांना एकाच दगडात १०-१२पक्षी आहेत.मुख्य म्हणजे त्यांना मराठ्यांच्या मनगटातील आणि मेंदूतील ताकद मोजायची आहे त्या करीता सर्व मराठा बांधवांनी अतिशय सावध पवित्रा घ्यायला हवा.एकुण सर्व परिवर्तनवादी विचार संघटनांनी मिळुन एक वैचारीक धोबी पछाड यांना देण्याची गरज आहे आणि शेवटी लाथोंके भुत बातोंसे नही मानते हे सार्या समाजाने समजुन घेतले पाहिजे.
          आजवर संस्क्रुतीच्या, धर्माच्या नावाने उडणारे हे कावळे अभिव्यक्तीच्या जिवावर माजणार असतील तर काय चुलीत घालायची आहे ही अभिव्यक्ती ? 

19 August 2012

वाघ्या कुत्रा आणि वादाचे कारण

            सध्याचे वातावरण वाघ्या कुत्र्याच्या शिल्पामुळे तापलेले आहे. शिवचरित्रात व इतर सर्व संदर्भ साधनात वाघ्याचा कुठेही उल्लेख नाही.म्हणुन एका काल्पनिक कुत्र्याचे शिल्प  शिवरायांच्या अमाधीसमोर असणे हा शिवरायांचा आणि शिवचरित्राचा अपमान आहे.त्यामुळे शासनाने हे वादग्रस्त शिल्प रायगडावरून तात्काळ हटवावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने गेल्या काही वर्षापासून लावून धरली होती.परंतू वारंवार मागणी करुनही शासनाकडून या शिल्पासंदर्भात कसलाच निर्णय न झाल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी १ ऑगस्ट २०१२ रोजी वाघ्याचे  वादग्रस्त शिल्प हटविले.काही सामाजिक संघटनांनी या कुत्र्याला आपल्या अस्मितेचे प्रतिक मानुन संभाजी ब्रिगेडच्या विरोधात अपप्रचार केला.या सामाजिक दबावाला बळी पडत शासनाने तात्काळ ते शिल्प पुनर्स्थापित केले.
        परंतू या वादात शिवरायांच्या अपमानाचा आणि वाघ्याच्या इतिहासात असण्याचा प्रश्न बाजुला पडला, मुळ प्रश्न आहे तो वाघ्या शिवचरित्र्यात असण्याचा. समकालीन संदर्भ साधनात कसलाही उल्लेख नसणार्या वाघ्याचे शिल्प केवळ दंतकथेवर आधारित आहे.शिवकाळानंतर ज्यांनी ज्यांनी रायगडचा या ना त्या प्रकारे अभ्यास केला  त्यांच्याही साहित्यात या कुत्र्याचा कसलाही उल्लेख मिळत नाही.उदाहरणादाखल : १८६९ साली "महात्मा जोतिराव फ़ुले" स्वत: रायगडावर गेले, शिवरायांची दुर्लक्षीत झालेली समाधी शोधुन काढली आणि शिवरायांवर प्रदिर्घ पोवाडा लिहिला.पण यात कुठेच वाघ्या डोकावला नाही. सन १८८१-८२ मध्ये "जेम्स डग्लज " हा इंग्रज अधिकारीही रायगडावर गेला. या अधिकार्यानेही त्याच्या "बुक ऑफ़ बॉम्बे" या पुस्तकात रायगडचे आणि शिव समाधीचे  नकाशासहीत तपशीलवार वर्णन केले आहे पण त्यांनीही वाघ्याचा कुठेही उल्लेख केला नाही.
१८८५ च्या सुमरास मुंबई इलाख्याचे गव्हर्नर असणरे "सर रिचर्ड टेम्पल" रायगड पाहण्यासाठी गेले त्यावेळी त्यांच्या सोबत "क्रॉफ़र्ड" नावाचा सहकारी होता. या सहकार्याने "सर रिचर्ड टेम्पल" यांच्या मोहिमेवर आधारीत "अवर ट्रबल  इन पुणा एण्ड डेक्कन"  हे पुस्तक लिहिले जे १८९७ मध्ये प्रकाशित झाले.या पुस्तकाचे वैशिष्ट म्हणजे "क्रॉफ़र्ड" यांनी स्वत: शिवरायांच्या शवाचे दहनस्थळ आणि समाधी याचे स्वतंत्र्य चित्र रेखाटले आहे पण याही पुस्तकात वाघ्याचा नामनिर्देश नाही.
            शिवरायांच्या समकालीन संदर्भ साहित्यात वाघ्याचा कोणताही उल्लेख नसणे आणि नंतरच्या मान्यवर लेखकांच्या लिखानातही वाघ्या नसने हे वाघ्याच्या शिल्पाचा फ़ोलपणाच सिद्ध करते. असे असताना वाघ्यासाठी शासनाचा एवढा अट्टाहास का ?
               आता काहींचं मत आहे की या वाघ्याचं अस्तित्व दाखवणारे पुरावे जर्मन लोकांनी अगदी जपुन ठेवले आहेत.आता गंमत अशी की, वाघ्या रायगडावर होता, हे जर्मनीतील लोकांना १० हजार मैलावरून दिसले, पण रायगडाच्या आसपासच्या १० मैलावरील कोणालाही तो दिसला नाही! शिवाजी महाराजांच्या काळातील एकाही माणसाला वाघ्या दिसत नाही. महाराज गेल्यानंतर २५० वर्षांनंतर झालेल्या माणसांना मात्र तो ढळढळीत दिसू लागतो!!असले चमत्कार मद्यपान केल्यानंतर सहजपणे होऊ शकतात.
           दंतकथेतील हा कुत्रा सर्वप्रथम डोकावला तो १९०५ साली "चिं. ग.गोगटे" यांच्या "महाराष्ट्र देशातील किल्ले" या पुस्तकात.या दंतकथेतील कुत्र्याचे ’वाघ्या’ असे नाटककार आद्य नाटककार ’राम गणेश गडकरी’ यांनी त्यांच्या "राजसंन्यास" या नाटकाच्या माध्यमातुन केले.गडकरींनी त्यांचे हे नाटक वाघ्याला अर्पण केलेले आहे म्हणुनच वाघ्याच्या चबुतर्याचर "राजसंन्यास" या नाटकातील काही ओळी कोरल्या आहेत.विशेष म्हणजे गडकरींचे हे नाटक शिवराय आणि शंभुराजे यांच्या बदनामीने ओतप्रत भरलेले आहे हे नाटक वाचतात वाचकांच्या लक्षात येते की , गडकरी हे काही इतिहास संशोधक नव्हते ते एक नाटककार होते.दंतकथा आणि नाटके ही जर इतिहासाच्या वस्तुनिष्ठ पुराव्यांवर टिकत नसतील तर ती एखाद्या युगपुरुषाच्या बदनामीला कारणीभुत ठरत असतील तर अशा दंतकथा नाकारल्याच पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे वाघ्याचे काल्पनिक शिल्प बसविण्यात आले आहे त्या खालील चौथरा हा शिवरायांच्या महाराणी सईबाईंची असण्याची  शक्यता काही इतिहासकारांनी वर्तवली आहे आणि यासंदर्भात इतिहासकारांचे एकमत आहे आणि  तो वाघ्याचा पुतळा शिवरायांच्या समाधीपेक्षा उंच आहे. रायगडावरील वाघ्याला काही संघटनेंचा विरोध आहे तो यामुळेच.वाघ्या कुत्र्याच्या समर्थकांनी आणि पुरातत्व खात्यानेही या कुत्र्या संदर्भात ऐतिहासिक पुरावे द्यावेत अन्यथा शिवप्रेमींची मागणी मान्य करत शिवरायांचा अपमान करणारे शिल्प ताबडतोब हटवावे.

शिवश्री डॉ. बालाजी जाधव, 
प्रकाशक पंचफ़ुला प्रकाशन,औरंगाबाद.
मराठ्यांनो षंड झालात काय ? या विक्रमी खपाच्या पुस्तकाचे लेखक