3 May 2013

इतिहासाच्या फ़ेरलिखाणाची गरज

            काही दिवसांपुर्वी सांगली मध्ये विद्रोही साहित्य आणि सांस्क्रुतीक संमेलन झाले.या साहित्य आणि सांस्क्रुतीक संमेलनात "इतिहासाचे विक्रुतीकरण आणि बहुजनांचे उद्ध्वस्तीकरण" या विषयावर तडाखेबंद परीसंवाद झाला.लेखणी हातात असलेल्या आणी वर्णवर्चस्ववादाच्या भुताने झपाटलेल्या ब्राह्मणी इतिहासकारांनी बहुजनांच्या इतिहासाची,त्यांच्या नायकांची चुकीची मांडणी करून बहुजनांच्या अस्मितेचे जाणीवपुर्वक विक्रुतीकरण केल्याचा सुर विद्रोही साहित्य संमेलनात एका विशेष परीसंवादात उमटला.लोकसाहित्याचा अभ्यास करून इतिहासाच्या फ़ेरमांडणीची गरज व्यक्त करण्यात आली.
बहुजनांच्या इतिहासाचे चुकीचे चित्रण केले जात असल्याची चर्चा होत असलेल्या पार्श्वभुमीवर हा परिसंवाद हा संमेलनाचे एक प्रमुख आकर्षण ठरला होता.ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.अशोक राणा,डॉ. नारायण भोसले, डॉ.राजेंद्र कुंभार यांनी कमालीच्या परखडपणाने आपली मते मांडली.
डॉ.राणा तर म्हणाले ब्राह्मणी वर्णवर्चस्ववादाच्या इतिहास संशोधन लेखनांवर आता केवळ टिका करून चालणार नाही, तर आता अभ्यास करून त्यांनी बहुजनांच्या चुकीच्या मांडलेल्या या इतिहासाची दुरुस्ती करावी लागेल.केवळ ब्राह्मणांना शिव्या घालून चालणार नाही, तर त्यांना रोखणे गरजेचे बनले आहे.भटांच्या ओंजळीतील तीर्थ प्यावेच लागते.त्यांनीच लिहिलेल्या इतिहासातील संदर्भ देऊन आता चालणार नाही.या प्रस्थापितांनी जाणीवपुर्वक संस्क्रुती कोशाची चुकिची रचना करून बहुजनांवर अन्याय केला आहे.मात्र आता नविन कोश तयार करण्याची गरज आहे.रामायण,महाभारत यांची रचना यांनी केली नसल्याचा दावा यावेळी केला.बहुजनांच्या सम्रुद्ध संस्क्रुतीला मोडण्याचा हा डाव मोडून काढण्यासाठी आता बहुजनातील अभ्यासकांनी पुढे येण्याची गरज आहे.
              खोटा इतिहास माथी घेऊनच बहुजनांची वाटचाल सुरु आहे.महाराजा शिवछत्रपतींनी तळागाळातल्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्याची उभारणी केली, पण त्याला लबाड इतिहासकारांनी दोन धर्मातील संघर्षाचे स्वरुप दिले.ब्रिटिश काळापासून विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी इतिहास आणि धर्माचा वापर केला जात आहे.आता देखील तेच सुरु आहे.जातीयवादाच्या इतिहासाला आता महत्व दिले जात आहे, हे चुकीचे आहे.चमचेगिरी करणार्या बखरकारांमुळेच चुकीचा इतिहास मांडला गेला.शिवरायांची सर्वाधिक बदनामी करणार्या बाबासाहेब पुरंदरे यालाच शासन आणि शिवरायांचे वारसदेखील पायघड्या घालून मदत करतात, हे खेदाचे आहे.भाजपचे सरकार मुळेच याला वेग आला आहे.नवीन इतिहासकारांनी बहुजनांचा खरा इतिहास समोर येण्यासाठी प्रचंड अभ्यास करण्याची गरज आहे.
सगळ्यात मोठी खंत म्हणजे बहुजनांचे शत्रु असलेल्यांच्या ताब्यात इतिहास आणि त्याचे पुरावे आहेत.डॉ. नारायण भोसले म्हणाले, लेखणी हातात असणार्यांनीच इतिहासाची चुकिच्या रितीने मांडणी केली आहे. वि.का.राजवाडे यांनी ब्राह्मणी व्यक्तिमत्वांना अडचणीत आणणार्या पुराव्यांना  जाळून टाकले आहे. त्यांनी केवळ  ब्राह्मणांचा गौरव करणारा निवडक इतिहासच निवडला.मुस्लिम राज्यकर्त्यांचे चुकीचे चित्रण करून वर्णवर्चस्ववाद्यांनी समाजात भांडणे लावल्याचा त्यांनी शेवटी आरोप केला.
इतिहासाच्या विक्रुत मांडणीने बहुजन समाजाचे मोठे नुकसान केले गेले आहे.वेदपुराणात ब्राह्मणांनी स्वत:ला देव तर बहुजनांना राक्षस मानल्याची  टीका इतिहास संशोधकांनी केली.आर्य चाणक्य,परशुराम यांचा चुकीचा इतिहास मांडला गेला आहे.महंमद ,अकबर आदी राजांचे चुकीचे चित्रण केले आहे.मुजुमदार,सावरकर यांनी मुघल काळ हिंदुसाठी वाईट ठरवलेला आहे.कुळवाडीभुषण बहुजनप्रतिपालक असलेल्या शिवरायांना सर्वाधिक त्रास देनार्या ब्राह्मणांनीच त्यांना आता गोब्राह्मण प्रतिपालक केले आहे.अफ़जलखान वधाच्या पोस्टरमागे केवळ राजकारण असल्याचा आरोप संशोधकांनी केला.मानवतेच्या सभ्यतेला कलंक असणार्या पेशवाईत विक्रुत सत्ताकारणांचा कळस गाठलेला असताना त्यांचे इतिहासात का चित्रण आले नाही.असाही सवाल बर्याच इतिहास संशोधकांनी केला.
आद्य नाटककार महात्मा फ़ुलेच !
आज विष्णूदास भावे यांची आद्य नाटककार म्हणून करून दिली जात असलेली ओळख हाच सर्वात मोठा बहुजनांच्या इतिहासाचा गळा घोटल्याचा पुरावा आहे.भावे यांनी फ़क्त नाटकातील पदांची रचना केली.महात्मा फ़ुले यांनीच सर्वप्रथम "त्रुतीय रत्न" हे मराठीतील पहिले नाटक लिहिले.पण तसा त्यांचा उल्लेख केला जात नाही, नव्हे तो वर्णवर्चस्ववाद्यांनी करून दिला नाही.राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फ़ुले हेच आद्य नाटककार आहेत.
वक्ते काय बोलले !!
* पेशव्यांचा पराक्रम लिहिणार्या इतिहासकारांनी नानासाहेब पेसव्याने क्षुद्रांना मंदिर प्रवेशाची केलेली बंदी इतिहासात का लिहिली नाही.
* नाना फ़डणीसांच्या भानगडींच्या माहितीचा कागद वि.का.राजवाडे यांनी का जाळून टाकला.
* दुसर्या बाजीरावाच्या काळात विवस्त्र महिलांच्या चालण्याच्या स्पर्धा होत होत्या पण त्यांचा इतिहासात कोठे उल्लेख नाही.
* झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचा दत्तक मुलगा अठरा वर्षाचा असताना पोटाशी लहान मुल बांधुन घोडा चालविणार्या लक्ष्मीबाईची थोरवी गायली जाते.
* ज्यांना ब्राह्मणांकडून सर्वाधिक त्रास सहन करावा लागला, त्या धर्मनिरपेक्ष शिवरायांना गोब्राह्मण प्रतिपालक का व कोणी केले ?
* मानवतेवरील कलंक असणारी पेशवाई येण्यासाठीच रानडे आणि टिळक यांचे लेखन.
* बाबासाहेब पुरंदर्याकडून शिवरायांच्या इतिहासाची विक्रुत मांडणी, तरी देखील सरकार त्यांनाच लाखॊ रुपयांची मदत देते.
* जेम्स लेन ला वर्णवर्चस्ववाद्यांनीच मदत करून शिवछत्रपतींची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.
* रा.चि.ढेरे सर्वाधिक बदमाश असल्याची घाणाघाती टीका यावेळी डॉ.राणा यांनी केली.
[ पण धाकलं पाटील सहमत नाहीत या टीकेला, कारण बाबा पुरंदरेसारखा बदमाश जगात कोठेच सापडायचा नाही ]