8 October 2012

उल्लेखनीय प्रतिक्रिया !

[ विश्व मराठी ब्लॉग लिहिल्या पासून आतापर्यंत १५०० च्या आसपास प्रतिक्रिया कट्ट्यावर धडकल्या.प्रतिक्रिया या महत्वाच्या असतात कारण त्या लिहायला उत्सुक करतात, प्रेरणा देतात अशीच एक प्रेरणादायक प्रतिक्रिया कट्ट्यावर येवून धडकली ती प्रतिक्रिया एक मोठे लेखक आहे ते म्हणजे "मराठ्यांनॊ षंड झालात का ? " या पुस्तकाचे लेखक डॉ.बालाजी जाधव साहेब यांची.त्यांची प्रतिक्रिया खाली देत आहे. ]
"आपला ब्लोग अतिशय आवडला. अत्यंत सुंदर आणि प्रभावी रीतीने आपण आपल्या ब्लॉगची मांडणी केली आहे. खरेच आहे जिथे आयुष्याला कलाटणी देणारे शिव विचार वाचायला मिळतात ते स्थानही तेवढेच शिवमय असू नये काय? तंत्रज्ञानाचा फार चांगला फायदा आपण करून घेतला आहे. समाजाला लागणारे वैचारिक खाद्य आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पुरवित आहात. आजपर्यंत एवढा नीटनेटका ब्लोग माझ्या तरी पाहण्यात आला नाही. हा ब्लोग खरोखरच लोकप्रियतेच्या कळसावर आहे हे त्याच्या सभासद संखे वरूनच लक्षात येते. यापुढेही आपण समाजाला योग्य दिशा देणारे साहित्य निर्माण करावे आणि आम्हा वाचकांची भूक भागवावी. आपले कार्य हे पुस्तक पेक्षाही अत्यंत प्रभावी आहे कारण पुस्तक निर्मिती प्रक्रियेत बराच वेळ जातो आणि नजर चुकीने जर काही चूक झाली तर ती चूक पुस्तकांच्या प्रती संपे पर्यंत काढता येत नाही, हे मी एक प्रकाशक या नात्याने चांगलेच जाणतो. हा धोका आपल्याला नाही. लेख लिहिला की वाचकांच्या मनाचा वेध घ्यायला तो तयार होतो. चूक असेल तर लगेच दूरोस्त करता येते आणि वाचकही आपल्या विचारांचा आस्वाद घेऊन लगेचच आपली कडू गोड प्रतिक्रिया देऊ शकतो. आपल्या पुढील कार्यास शिवेछ्या. हा ब्लोग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा. विशेष गोस्त म्हणजे आपण आपल्या प्रोफिले मध्ये माझ्या "मराठ्यांनो षंढ झालात काय?" या पुस्तकातील "मराठा लढवय्यी जात ,एकेकाळची राज्यकर्ती जात ,जगातल्या १३ लढवय्या जातीपैकी प्रथम क्रमांक पटकावणारी जात, "पंजाब, सिंध , गुजरात, मराठा "या राष्ट्रगीतात महाराष्ट्राचा उल्लेख "मराठा" असा करायला भाग पडणारी जात , स्वतःच्या शौर्य, धैर्य, त्याग आणि उदारपणा या गुणांमुळे महाराष्ट्राची ओळख बनलेली जात". या ओळी टाकल्या. याचे मला फार बरे वाटले. आई जिजाऊ आपल्याला प्रचंड यश देओ हीच शिव कामना."
जय जिजाऊ!

डॉ.बालाजी जाधव
लेखक : "मराठ्यांनो षंड झालात काय ?"
धन्यवाद ! डॉ. जाधव साहेब आपल्यासारख्या लेखकांमुळेच आणि वाचकांमुळेच आम्हाला लिहायला प्रेरणा मिळते.आपण आमचा मराठी कट्टा ब्लोग वाचत रहा आणि आपलेविचार कळवत रहा.
धन्यवाद पुन्हा एकदा ..
जय जिजाऊ । जय शिवराय  ।

7 October 2012

जातीच्या वर्गात सत्यानाशच..

         "जातीसाठी माती खावी " अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. दैनंदिन जीवण जगत असताना अनेकदा आपण या म्हणीनुसार वागतो, क्रुती करतो.यामुळे आपल्याला समाधान वाटत असते.
पण खरोखरच जातीविषयक असलेला हा गर्व, अभिमान दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या समस्या सोडवू शकतो काय ? याचे उत्तर नकारार्थी असेच आहे.आपल्याला प्रश्न पडणॆ स्वभाविक आहे की जातीविषयीचा अभिमान किंवा गर्व तसेच आपल्या जीवनाशी निगडीत असलेल्या समस्या याचा काय संबंध आहे ? याचा अनिष्ट संबंध आहे.
        संपुर्ण भारतात तथागत बुद्ध, सम्राट अशोक यांच्या काळात जातीव्यवस्था अस्तित्वात नव्हती, तर तथागत बुद्धांनी इथल्या वर्णवर्चस्वादा विरुद्ध संपुर्ण लोकांना जाग्रुत  करून सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्क्रुतीक आदि क्षेत्रात क्रांती केली. याचा अर्थ तत्कालीन वर्ण व्यवस्थेला छेद दिला ही वर्ण व्यवस्था या देशात पसरली होती त्यामध्ये यज्ञयाग,कर्मकांड, पाप-पुण्य, पुनर्जन्म, ब्राह्मणवर्चस्व आदि विषमतावादी गोष्टी होत्या, वर्ण व्यवस्था ही उतरंडीसारखी उभी होती.सर्वात खाली शुद्र, त्यांच्यावर वैश्य, त्यांच्यावर क्षत्रिय़ व सर्वात वरती ब्राह्मण.
            आधुनिक वर्तमान परिस्थिती : वर्तमानात आज आपण आपले महापुरुष व संत यांना जाती-जातीत बंदिस्त करून ठेवलेले आहे.ज्या महापुरुष व संतांनी वर्ण व्यवस्था,जाती व्यवस्था, अस्प्रुश्यता,विषमता, स्त्रीदास्य इ. विषयांवर लोकांचे प्रबोधन केले . त्या सर्वांना इथल्या व्यवस्थेने जाती-जातीत विभाजन करून ठेवलेलं आहे.माझा प्रश्न आहे की, काय महापुरुष व संतांनी केवळ स्वत:च्या जातीपुरतेच प्रबोधन केले ? काय ते स्वत:च्या जातीच्या प्रगतीसाठी आयुष्यभर झटले ? काय त्यांना स्वत:च्याच जातीचा गर्व होता ? या प्रश्नांचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे.यावर चिंतन,मनन होऊन योग्य निष्कर्ष काढला पाहिजे. निष्कर्षावरच योग्य दिशा मिळुन एकत्रितपणे संघटित होण्यासाठी प्रयत्न करता येईल,अहो जात हा बंदिस्त वर्ग आहे.या बंदिस्त वर्गानेच सर्वांना दार उघडे करून देण्यासाठी महापुरुष व संतांनी आपले संपुर्ण आयुष्य खर्ची घातले.सर्वसाधारणपणे आपण दैनंदिन व्यवहारात आमचा समाज, तुमचा समाज असा शब्द प्रयोग करतो.वास्तवीक हा समाज हा भारतीय समाज समजला पाहिजे.
           समस्येचे समाधान करण्यासाठी काय करावे लागेल ? विद्यमान प्रचलित असलेल्या जाती व्यवस्थेची पाळेमुळे जी अतिशय खोलवर रुजली आहेत.यासाठी सर्व प्रथम आपण स्वत:ची ओळख करून घेणे गरजेचे आहे.ओळख ही जातीची नाही तर रक्ताची आहे.केवळ स्वत:च्या जातीचा जर आपण विचार केला तर जाती व्यवस्था नष्ट होण्याऐवजी ती अधिकच घट्ट होईल.म्हणून जातीचे हे मढे स्वत:च्या मन व मस्तिष्कामधुन काढून टाकावे लागेल.यामुळे जातीव्यवस्था.खिळखिळ होऊन आपल्या समोरील अनेक समस्यांना एकत्रीतपणे येवून लढा देण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण होईल.सर्वांच्या समस्या या सारख्याच आहेत.समस्या सारख्याच असतील तर केवळ समस्येवर चर्चा करून रडून दुसर्याला दोष देऊन, त्यावर उपाय काढणे शक्यच नाही.कारण सिद्धांत म्हणतो.की जो समस्या निर्मान करतो तो समस्येचे कधीही समाधान करणार नाही.समस्या जर आपल्याच असतील तर उपाय सुद्धा आपल्यालाच संघटीत होऊन काढावा लागेल.समस्येपासून दुर जाऊन  चालणार नाही तर समस्येला तोंड दिल्यानेच समस्या सुटू शकतात.
           बंधुंनॊ जातीचा गर्व व अभिमान यांचा त्याग केल्यामुळेच आपण भविष्यात एकत्र येवून समता, स्वातंत्र्य बंधुता व न्याय या मानवी मुलभुत तत्वावर आधारीत सम्रुद्ध भारत घडवू शकतो,अशी मला केवळ आशाच नाही तर आत्मविश्वास सुद्धा आहे.