20 January 2014

प्राचीन समाज व्यवस्था,संत साहित्य व भारतीय राज्य घटना [२]

[२] सर्वधर्मसमभाव 
म्हणोनी कुळजाती वर्ण । हे अबघेचि गाअकारण । एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ॥ - ज्ञानदेव (ओ.४५६)
त्या प्रमाणे क्षत्रिय,वैश्य स्त्रिया,पापी,अत्यंत,शुद्र अंगणा,जर मला भजत असतील तर ते माझेच आहेत. - (ओ.४७४)
याती कुळ माझे गेले हरपुनी । श्रीरंगा वाचून आणू नये ॥ - ज्ञानदेव
[३] फ़ड,दिंडी,टाळ,भजन,कीर्तन,हरीकथा,पताका,तुळस,कळस व वारकरी यांच्या प्रती अतूट श्रद्धा बाळगणे आवश्यक
[४] संत वाडमय ही समतेची शिदोरी जगकल्याणासाठी आहे.
[५] ज्ञानमेवाम्रुतम - ज्ञानासारखे पवित्र व श्रेष्ठ दुसरे काही नाही.
[६] साधी भाषा,सोपे नाम,सर्व राव रंक,लहान थोर इ. सर्वांसाठी विठठल देव,पंढरी स्थान राम नाम आहे.
[७] प्रसन्न चित्त,सर्वाभुती नम्रता व कार्य हाच परमेश्वर :
कुलजातीवर्ण हे अवघेचि गाअकारण - ज्ञानेश्वर महाराज
अर्भकाचे साठी । पंथे हाती धरली पाटी ॥ - तुकाराम महाराज
कांदा,मुळा,भाजी । अवघी विठाई माझी - सावता माळी
दळीता कांडिता,तुज गाईन अनंता - जनाबाई
नाचु किर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी - नामदेव महाराज
सकळाचे पायी माझे दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा ॥ - तुकाराम महाराज
[८] भाषा संम्रुद्धी भाषा हेच धन व भाषा हेच शस्त्र
आम्हा घरी धन शब्दांचीच शस्त्रे । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ॥ - तुकाराम महाराज
माझा मराठाची बोल कवतीकें । परि अम्रुतातेही पैजा जिंकें ॥ - ज्ञानेश्वर महाराज
[९] आम्ही ज्ञानी व आम्ही संत
वेदाचातो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथ्या ॥
तुका म्हणे तोची संत । सोसी जगाचे आघात ॥
तेची संत तेची संत ।  ज्यांचा हेत विठठल ॥
[१०] सर्वांचे सहकार्य,शुद्ध भाव व बीज,उत्तम व्यवहार.
एकमेकां सहाय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥
शुद्ध बिजापोटी । फ़ळे रसाळ गोमटी 
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ॥ - तुकाराम महाराज
चोखा डोंगा परी । भाव नोहे डोंगा ॥ - चोखामेळा
[११] जाती धर्माची बंधने नाहीत
वर्ण अभिमाणे कोण झाले पावन । ऐसे द्या सांगून मजपाशी ॥
    अंत्यजादी योनी तरल्या हरी भजने । तयांची पुराणे भार झाली ॥ - तुकाराम महाराज
भेदाभेद अमंगळ । - तुकाराम महाराज
[१२] विश्वबंधुत्व
हे विश्वचि माझे घर । ज्ञानदेव:चोखा माझा जीव । चोखा माझा भाव ॥ -  नामदेव महाराज
जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥ तोचि साधू ओळखावा । देव तेथोचि जाणावा ॥ -                     तुकाराम महाराज
जो जे वांछील तो ते लाहो । प्राणीजात ॥ - ज्ञानेश्वर महाराज
यारे यारे लहान थोर । याती भलत्या नारीनर ॥ - तुकाराम महाराज
उच्च नीच काही नेणे भगवंत । - तुकाराम महाराज
          स्वातंत्र्य,समता,बंधुता,सहकार्य,समुदाय,शुद्धभाव,समान संधी,श्रद्धा,एक ध्येय,एकदेव,विक्रम आणि वैराग्य,भक्ति आणि युक्ती,एकच धर्म-राष्ट्रकार्य,शिस्त व ऐक्य इ.मार्गदर्शक तत्वे आपल्या अभंग - ओव्यातून सांगून,म्लेंच्छांच्या काळात राष्ट्रधर्मा(भागवत धर्मा)ची ध्वजा फ़डकत ठेवली.समाज जाग्रुती केली.समाज ऐक्य टिकवले.इतके सगळे संत साहित्याने घडविले.
                हे सर्व शिवकाळांत झाले.राजा शिवछत्रपतींनी तत्कालीन मातब्बर सरदारांना विचारले.ते सर्व म्हणजे निंबाळकर, घोरपडे, शिर्के, सावंत, मोरे, जाधव, जेधे इ . निजामशाह व आदिशहाचे मांडलिक होते. शिवाजींनी बारा बलुतेदार एकत्र करून त्यांच्यातून सैन्य गोळा केले.त्यांना सरदार ते सेनापती केले.स्वत:स राज्याभिषेक केला व स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली.संतांना मान-सन्मान दिला.छत्रपती संतांपुढे नतमस्तक झाले.
    हुन,चौल,चालुक्य,शालिवाहन,बहामनी,मोघल,तुघलक,पेशवाई व आंग्ल इ.च्या अस्थिर राजकीय अटळ परिस्थितीत व प्रचंड देशी व विदेशी वादळामध्ये भारतीय संस्क्रुती व परंपरा(वारकरी धर्म) म्हणजेच भारतीय समाज संतांनी रुजविलेल्या अत्मिक विचारामुळे व सदाचारामुळे भारतीय समाज एकसंघ राहिला.संत शिकवणीच्या भक्कम पायावरच भारतीय स्वातंत्र्याची चळवळ उभी राहिली.संत साहित्याचे सुमधुरफ़ळ म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य होय.
             पेशवाई मध्ये ब्राह्मण पंतप्रधान(पेशवे) झाले.त्यांनी लेखणी सोडून तलवार हाती घेतली पण ती काही काळच.पेशवाई मध्ये पुजा अर्चा,बेल-फ़ुले यांचे महत्व वाढले.सत्यनारायण पुजा,अघोरी उपाय,जादुटोणा,गंडादोरा यांचे स्तोम माजले.सन १८१८ मध्ये पेशवाई (शुरवीर महारांच्या हाती )संपली.महात्मा जोतिबा फ़ुलेंनी समाज सुधारणा व शिक्षण कार्य चळवळ सुरु केली.इंग्रज राज्यकर्ते झाले.त्यांनी १५० वर्षे राज्य केले.त्यांनी शिस्त आणली,देश एक केला.धर्मात हस्तक्षेप केला नाही.जाती-पाती-धर्म यांनी छिन्न विछिन्न झालेला समाज तसाच अज्ञान अंध:कारात चाचपडत राहिला.विनाधिकार संस्थाने जिवंत राहिली.
       सन १९०१ ते १९४७ या काळात तीन मोठ्या चळवळी झाल्या.महात्मा गांधींची स्वातंत्र्याची चळवळ,कर्मवीर भाऊराव पाटील यांची यांची शैक्षणिक चळवळ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची दलित मुक्ती चळवळ.१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य झाला.सर्वांच्या प्रयत्नांना स्वातंत्र्याचे फ़ळ आले.तत्पुर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकराजा शाहू छत्रपती व बडोदानरेश सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक मदतीने व स्वकष्टाने उच्च आंग्लविभूषित झाले.त्यांनी संत वांडमयाचा संपुर्ण अभ्यास केला.त्याचे बहुजन उद्धाराचे कार्य दि.२५ मे १९४१ रोजी "महार जात पंचायतीची" स्थापना करून सुरु केले.ते दि.६ डिसें.१९५६ रोजी त्यांच्या निर्वानानेच थांबले.या अदभुत कार्याचा गौरव म्हणुन त्यांना दि.१४ एप्रिल १९९० भारतरत्न म्हणून घोषित केले.
१ नोव्हेंबर १९४६ रोजी पंडीत नेहरुंनी इंग्लंडमधील घटना विषारद डॉ.जेन आयर यांना स्वतंत्र भारतासाठी घटना लिहुन देण्यासाठी विनंती केली.डॉ.आयर म्हणाले "आमच्या पेक्षा बुद्धिमान बॅरि.जयकर,बॅरि.सप्रु व डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतात आहेत.त्यांच्या कडून घटना का लिहुन घेत नाही.?" घटना मसुदा समितीमध्ये सात लोकं होती पण काही अडचणींमुळे मसुदा लेखनाची जबाबदारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्याने समर्थपणे पेलली.डॉ.बाबासाहेबांनी अनेक देशांच्या (इंग्लंड,फ़्रांस,अमेरीका,कॅनडा,रशिया इ.) घटनांचा व संतसाहित्याचा सर्वकश तपशीलवार अभ्यास केला.त्यांनी तथागत गौतम बुद्ध,संत कबीर व महात्मा फ़ुले यांना गुरु मानले.त्यांनी देशाला "स्वतंत्र,सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष व लोकसाही" इ.तत्वांचा पाया असलेली घटना दिली.घटनेच्या प्रास्ताविकात घटनेचा सारांश दिला आहे.तो खालील प्रमाणे.
भारतीय संविधान 
प्रास्ताविका :
            आम्ही भारताचे नागरिक,भारताचे एक सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष,लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरीकास : सामाजिक,आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र, दर्जाची व संधीची समानता;निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपुर्वक निर्धार करून,आमच्या संविधान सभेत आज दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगिक्रुत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
           मनुस्म्रुतीने नाकारलेली,सर्व संतांनी अंगिकारलेली,आचरलेली,ओवी-अभंगातून प्रचारलेली व प्रसारित केलेली, न्याय(सामाजिक,आर्थिक,राजकीय), स्वातंत्र (विचार,अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा, उपासना), समानता (दर्जा व संधी), आश्वासन(प्रतिष्ठा, एकता, एकात्मता),  बंधुता (धर्मनिरपेक्ष, सामाजिक, लोकशाहीवादी),  सार्वभौमत्व(देश, लोक व संसद)इ.पायाभुत भक्कम तत्वे व आचरणाची हमी असलेली घटना देशाला मिळालेली आहे.घटनेमध्ये २२ भाग व ३९५ कलमे असून आवश्यकतेनुसार आज अखेर ८५ वेळा त्यामध्ये दुरुस्त्या केलेल्या आहेत.घटनेचा पायाभूत भक्कम ढाचा बदलण्याचा कोणासही अधिकार नाही.स्वातंत्र्य,न्याय,समानता व बंधुता इ.ची शिकवण व तत्वे दिल्याबद्दल आम्ही सर्व अखिल भारतीय संतांचे व सर्वश्रेष्ठ संत सहित्याचे चिरंतर ऋणि आहोत.

******************
प्राचार्य एस.एस.माळी
M.A.,LL.B.,M.B.A.,(USA)
सांगली
संपर्क : ९३७१४९७५९८

प्राचीन समाज व्यवस्था,संत साहित्य व भारतीय राज्य घटना [१]

        तज्ञांच्या मते अंदाजे दोनशे कोटी वर्षापुर्वी प्रुथ्वीची निर्मिती झाली.डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतानुसार अंदाजे दोन कॊटी वर्षापुर्वी प्रथम जीव जन्माला आला.अंदाजे वीस लक्ष वर्षापुर्वी मानव प्राणी आस्तित्वात आला.प्रुथ्वीच्या निर्मीती पासून आज अखेरचा काळ चार युगांमध्ये विभागला आहे.[१] सत्ययुग/क्रुतयुग-४,३२ लक्षवर्ष,[२] त्रेतायुग-३,३२ लक्षवर्ष.[३] द्वापारयुग-२,३२ लक्षवर्ष व [४] कलीयुग-१,३२ लक्षवर्ष.द्वापार युगारंभी वेदांची निर्मीती झाली.यामध्ये ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद प्रथम लिहिले गेले.कलीयुगारंभी अथर्ववेद लिहिला गेला.यामध्ये एक लक्ष ऋचा प्रुथ्वी निर्मीतीच्या व प्रार्थनेच्या म्हणजे देववर्णनांच्या आहेत.ऐंशी हजार ऋचा यज्ञासंबंधी व चार हजार ऋचा स्रुष्टी ज्ञानाच्या आहेत.सोळा हजार ऋचा भक्ति पर आहेत.त्याकाळी ब्रह्मा,विष्णू व महेश या देवता सर्व मान्य होत्या.नंतर अग्नी व गणेश यांची निर्मीती झाली.या सर्वांमध्ये समाज रचनेचा कोठेही उल्लेख नाही.
        अंदाजे पाच हजार वर्षापुर्वी मनू हा ऋषि होऊन गेला.तो अहंकारी,मुत्सद्दी,ज्ञानी व विद्याव्यासंगी होता.त्याने तत्कालिन परिस्थितीचा सर्वकश विचार करून समाज रचना कशी असावी याची सुसूत्र मांडणी केली.त्यास स्म्रुती असे म्हणतात.मनुस्म्रुती नुसार चार वर्ण असावेत.[१] ब्राह्मण [२] क्षत्रिय [३] वैश्य [४] शुद्र.नंतर कालांतराने निक्रुष्ठ दर्जाची स्वच्छता कामे करणारा शुद्रातिशुद्र वर्ग निर्मान झाला.लोक पुर्व कर्मानुसार पिढ्यानं पिढ्या तीचतीच कामे करू लागला.त्यामुळे ब्राह्मण वर्गाने लेखन,वाचन व मार्गदर्शन केले.क्षत्रियांनी संरक्षण केले.वैश्यांनी व्यापार व उत्पादन केले.शुद्रानी सेवेची कामे केली.अतिशुद्रानी सर्वांच्या स्वच्छतेची निक्रुष्ट कामे केली.
        मनुविचारानुसार माणसाच्या आयुष्याचे चार विभाग झाले.[१]ब्रह्मचर्याश्रम [२] ग्रुहस्थाश्रम [३] वानप्रस्थाश्रम व [४] संन्यासाश्रम,ही व्यवस्था फ़क्त पहिल्या दोन वर्गांना म्हणजे फ़क्त ब्राह्मण व क्षत्रियांना लागू होती.पुढे सत्तासंघर्षामध्ये परशुरामाने एकवीसवेळा प्रुथ्वी नि:क्षत्रिय केली.त्यामुळे समाजात फ़क्त दोनच वर्ण शिल्लक राहिले ते म्हणजे ब्राह्मण व शुद्र त्यामुळे समाजाचे सर्व अधिकार ब्राह्मणांना मिळाले.इतर फ़क्त सांगकामे झाले.ब्राह्मण म्हणतील व सांगतील तोच कायदा व नियम झाला.मनुने  सर्वांचे अधिकार नष्ट केले.स्त्रिया व शुद्रांना कसलेही अधिकार नाहीत.सेवेतच त्यांचे जन्म,जीवन व म्रुत्यू झाले." करा व मरा" हा एकमेव शिक्का त्यांचे कपाळी मारला गेला.तो अंदाजे अकराव्या शतकांपर्यंत.सर्वाधिकार ब्राह्मणांना आहेत.उदा.मनुस्म्रुतीमधील पुढील धर्मादेश पहा.
[१] य:कश्चित्फ़चितधर्मो मनुना परिकीर्तित:।स सर्वो:मिहितो वेदे सर्वज्ञानमयो हि स:॥ (मनुस्म्रुती २/८)
अर्थ : मनुने जे काही सांगितले आहे ते वेद मुलक आहे.मनुस सर्व वेदांचे ज्ञान आहे.कारण मनु स्वयं वेदमुर्ती आहे.
[२] श्रुति स्तु वेदो विज्ञेयो धर्म शास्त्रं तु वै स्म्रुती । ते सर्वाथैष्व मिमांस्थे तांभ्यांम्र धर्मो ही निळैभौ ॥ (मनुस्म्रुती २/१०)
अर्थ : श्रुती म्हणजे वेद व स्म्रुती म्हणजे धर्मशास्त्र.या श्रुती व स्म्रुती विरुद्ध तर्क करून भांडन करू नये.ते चिकित्सेचे विषय नाहीत कारण त्यांच्या पासुनच धर्म तयार झाला आहे.
[३] यो:वमण्येत ते मुल्येहेतुशास्त्राश्रयादद्विज: । ससाधुर्भिषहिष्कार्यो नास्तिको वेद निन्दक ॥ (मनुस्म्रुती २/११)
अर्थ : जो कुतर्काच्या आधारे धर्माचे मुळ श्रुति व स्म्रुतीला प्रमाण न मानता निंदा/चेष्टा करेल तो निंदक म्हणजे पापी होय.तो साधू लोकां (शिष्ट) कडून बहिष्क्रुत केला जावा.
[४] निषेकादिश्मशानान्तो मन्म्रर्यस्योदितो विधी: । तस्य शास्त्रे:धिकारो:स्मिम्झोयो नान्यस्य कस्यचित ॥ (मनुस्म्रुती २/१६)
अर्थ : धर्मशास्त्र श्रुती व स्म्रुती मधील गर्भादान ते अन्त्येष्ठिचे अधिकार / संस्कार फ़क्त ब्राह्मणांना आहेत.अन्य स्त्री शुद्रादिशुद्रांना नाहीत.हे सनातन धर्माचे कटू सत्य आहे.
[५] न शुद्राय मति दद्यान्नोच्छिष्टं न हविष्क्रूतम । न चास्योपदिशेध्दर्म न चास्त्र व्रतमादिषेत ॥ ८० ॥
      यो हयस्य धर्ममाचष्टे यश्चैषादिशति व्रतम । सो संव्रुतं नाम तम: सहतेनैव मज्जति ॥ ८१ ॥
अर्थ : शुद्रास मति (ज्ञान) देऊ नये.कोणताही धर्मोपदेश करू नये.कोणतेही व्रत सांगु नये.जो धर्म सांगतो तो शुद्रासह नरकात बुडतो.(मनुस्म्रुती अ. १०/१२३),१/९१,९/१८,१०/२५,१०/२६.इ.मध्ये असे अनेक श्लोक आहेत की ज्यामध्ये शुद्रांनी फ़क्त ब्राह्मणांची सेवा करावी.लिहु,वाचू नये,अन्यथा ते नरकात जातात.शुद्रांनी फ़क्त उष्टे अन्न खावे.उपास - तपास करू नये.स्त्री शुद्रांना धर्माधिकार नाहीत.विप्राने शुद्राकडून सेवा करून घ्यावी.त्या बदल्यात त्यांना टाकाऊ अन्न व फ़ाटकी वस्त्रे द्यावीत.शुद्रांनी विनातक्रार (अनसुया) तिन्ही वर्गाची सेवा करावी."जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो मानावा श्रेष्ठ","न स्त्री स्वातंत्र्यंअर्हति",ही वेदवाक्य झाली.
यामुळे ब्राह्मणांचे वर्चस्व वाढले.स्त्रीशुद्रादी नगन्य झाले.कसेतरी जगणे त्यांच्या नशिबी आले.परिणामत: शुद्र खचले. स्वातंत्र्य,समानता,बंधुता,संधी,धर्म इ. सर्व हद्दपार झाले.ते अकराव्या शतकापर्यंत.
सन १२७५ मध्ये सर्व स्वातंत्र्य,सदविचार,इ.चे पुनरुज्जिवन झाले.त्याची सुरुवात निव्रुत्तीनाथांपासून झाली.बाराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत निव्रुत्ती महाराज ,ज्ञानदेव महाराज,सोपान,मुक्ताबाई, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आदी संत झाले. त्यांची विद्या,स्वातंत्र्य, बंधुत्व,लेखण,वाचण,भाषण,प्रवचन,भक्ति,समानता इ.ची कवाडे सर्वांना खुली केली.महाराष्ट्रात नवयुग आले.सुर्योदय झाला.मनुनिर्मित अंध:कार नष्ट झाला.सर्वोदय झाला.
महाराष्ट्रात सोलापुर जिल्ह्यात मंगळवेढे आहे.तेथे बाराव्या शतकात बिज्जल नावाचा राजा राज्य करत होता.त्याचे प्रधान बसवेश्वर(११०५ ते ११६५) होते.बसवेश्वरांनी सर्वधर्म परिषद(११५०) बोलाविली."अनुभव मंटप" संस्था सुरु केली.सर्वधर्मसमभाव निर्माण केला.त्यामध्ये काश्मिर ते कन्याकुमारी येथील प्रतिनिधी उपस्थित होते.त्यामध्ये सर्व संतांनी भाग घेतला.त्यांनी शिवधर्माचे सर्व भारतभर प्रसार व प्रचार कार्य केले."अनुभव मंटप" चे सभापती होते संत अल्लमप्रभू ! बसवेश्वर प्रवर्तक होते.त्यामध्ये धानम्मा (जत), अक्कमहादेवी, शिवलिंगव्वा, निलांबिका, लिंगम्मा,लकम्मा,वीरम्मा, सांतव्वा, काळव्वा, कल्याणम्मा आदि स्त्रिया संत होत्या. बसवेश्वर, चन्नबसवेश्वर, सिद्धरामेश्वर(सोलापुर), कक्कय्या(कैकाडी), बोमय्या(ढोर), कन्नया(सोनार), हरळय्या(चांभार), मधुवय्या(चांभार), चन्नय्या(मांग), माचय्या(धोबी), अप्पण्णा(न्हावी) आदि संत होते.या संतांचा कर्नाटकात अति मोठ्या प्रमाणात प्रसार झाला.
ज्ञानदेवांनी भागवत धर्मांचा/परंपरेचा पाया घातला.सातशे श्लोकांच्या गीतेचे मराठीत तत्वज्ञान आणले.यात सोपान मुक्ताई सामील झाले.नामदेवांनी त्याचा विस्तार केला.भारत भ्रमण करून पंजाबी/गुरुमुखी व हिंदी मध्ये अभंग रचना केली.त्यामध्ये सर्व धर्मियांना/जातींना सामावून घेतले. गोरोबा(कुंभार), चोखामेळा.बंका, सोयरा (सर्व महार), सावता (माळी), जनाबाई(दासी),  कान्होपात्रा आदिंना स्थाने दिली. लेखन, वाचन, भजन, पुजन इ.अधिकार दिले.संत तुकोबारायांनी ४५८३ अभंग रचना केली.या संतांनी अंगिकारलेली तत्वे व त्यांचे अभंग पुढील प्रमाणे आहेत.
[१] मनुचे तेहतीस कोटी देव नाकारले व एकच देव मानला.पंढरीचा "विठठल" हे एकमेव दैवत व त्याचे दर्शन म्हणजे सर्वाच्च सुख होय.
सकळ कुळांचा तारकु / तोचि जाणावा पुण्यश्लोकु । पांडुरंगी रंगलानिशंकु । धन्य जन्म तयाचा ॥ - संत ज्ञानेश्वर महाराज
सर्व सुखांचे आगरू । बापरुखत्मादेविवरू ॥ - संत ज्ञानेश्वर महाराज 
विठठल विठठल मंत्र हेचि निजशास्त्र । विचारिता सर्वत्र दुजे नाही ॥ - संत निव्रुत्तीनाथ
नको तु करी सायास । धरी पा विश्वास ॥ एका जनार्दनास डोळा । पाहि ॥ - संत एकनाथ महाराज
बळीया माझा पंढरीराव । जो या देवांचाही देव ॥ - संत तुकाराम महाराज
भागवत धर्मासच वारकरी संप्रदाय म्हणतात.विष्णुभक्तांना वैष्णव म्हणतात.वारकरी संप्रदायात दीक्षा-भिक्षा याचे अवडंबर नाही.