1 January 2013

पानिपत, मराठा संज्ञा आणि परिभाषा

            पानिपत येथे १५ जानेवारी १७६१ रोजी झाली होती.या लढाईमध्ये पेशव्यांचा पराभव झाला होता.परंतू आजही या पराभवाचे खापर मराठ्यांच्या डोक्यावर फ़ोडले जाते.या लढाई संदर्भात मुलभुत प्रश्न असा की "पानिपतच्या लढाईसोबत मराठ्यांचे नाव का जोडले जाते ? " ही लढाई शिवशाहीची नसून पेशवाईची होती.
         संपुर्ण पेशवाईच्या इतिहासापैकी फ़क्त पानिपतच्या लढाईच्या पराभवाची जबाबदारी घेण्याची वेळ जेंव्हा येते तेंव्हाच फ़क्त "मराठा" शब्दाचा आधार घेतला जातो.याशिवाय उरलेला इतिहास हा मराठ्यांचा नसतोच.तो फ़क्त पेशवाईचा असतो.
      आमच्याच समाजातील लोक जेंव्हा पानिपतच्या लढाईबाबत बोलू किंवा लिहु लागतात,तेंव्हा ते गळा काढून रडतात की ,"मराठ्यांचा पानिपत मध्ये पराभव झाला, मराठे पानिपतमध्ये हरले" तर काही महाभाग असेही म्हणतात की "पानिपत मध्ये मराठ्यांचा पराभव झाला नाही ते हुतात्मे झाले ".या दोन्हीही प्रकारे रडणे म्हणजे यांचा हेतू एकच असतो तो म्हणजे पानिपतच्या लढाईचा संबंध मराठा या शब्दाशी जोडणे! या लढाईच्या वेळी सत्ता आणि नेत्रुत्व हे दोन्हीही पेशव्यांचे होते.पण पराभवाची व्याख्या मात्र "मराठा" या शब्दाच्या आधारे करायची, आहे की नाही चालूबाजी.स्वत:च्या नाकर्तेपणाचे खापर मराठ्यांच्या नावावर फ़ोडायचे! यालाच म्हणतात इतिहासाचे विक्रुतीकरण!. दोषी आहेत पेशवे पण आरोपी मात्र मराठ्यांना केले जाते.हा किती अत्याचार आहे! ब्राह्मणी व्यवस्था बहुजनांना आरोपीत करते हे एक वेळ ठीक आहे पण  आपणच आपल्याला न केलेल्या गुन्ह्याबद्दल अरोपीत करून घेण्यात काय अर्थ आहे.? आणि काय शहाणपणा आहे ? यालाच महात्मा फ़ुले यांनी गुलामगिरी असे म्हंटले आहे.तर डॉ.बाबासाहेब म्हणतात की "गुलाम लोकांमध्ये जन्माला येणे गुन्हा नसून ,गुलामी सहन करणे हा खरा गुन्हा आहे!.
मराठा या शब्दामुळे नक्की काय घडते ?
१] पेशव्यांना लपण्याची संधी मिळते! जे पेशवे या पराभवाचे खरे सुत्रधार आहेत.
२] पेशव्यांच्या ऐवजी मराठ्यांचा संबंध लढाईशी जोडता येतो.
३] एकदा का पराभवाची व्याख्या मराठा शब्दाच्या आधारे गेली पराभवाचे धनी मराठेच आपोआप होतात.
४] मराठ्यांना ऐतिहासिक द्रुष्ट्या बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो.
५] व्यवस्था मराठ्यांमध्ये पराभवाचा न्युनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न करते.
६] पानिपतच्या संपुर्ण घटनेचे विक्रुतीकरण करणे शक्य होते.
पानिपतच्या सर्व लढायांचा संक्षिप्त इतिहास
               पानिपत मध्ये एक नाही तर तीन मोठ्या लढाया लढल्या गेल्या आहेत.या तिन्ही लढायांना पानिपतची लढाई याच नावाने संबोधित केले जाते.
१] पहिली पानिपतची लढाई - २१ एप्रिल १५२६ , मोघल सेना विरुद्ध लोधी सुलतान सेना
नेत्रुत्व - बाबर विरुद्ध सुलतान ईब्राहिम लोधी, विजयी - मोघल सेना
२] दुसरी पानिपतची लढाई - ५ नोव्हेंबर १५५६ , मोघल सेना विरुद्ध सम्राट हेमचंद्र सेना
नेत्रुत्व - इटांगा खान विरुद्ध सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य, विजयी - मोघल सेना
३] तिसरी पानिपतची लढाई - १४ जानेवारी १७६१ , दुररानी सेना विरुद्ध पेशवे(ब्राह्मण)
नेत्रुत्व - अहमदशहा अब्दाली विरुद्ध सदाशिव भाऊ, विजयी - दुररानी सेना 
मराठ्यांना पानिपतच्या सर्व लढायांची किमान माहीती असणे गरजेचे आहे.यापैकी तिसर्या लढाईत पेशवाई व्यवस्था गळा काढून रडत असते आणि ते स्वाभाविक आहे कारण पानिपतच्या तिसर्या लढाईत पेशव्यांचा पराभव झाला आहे.
मराठ्यांनी जस्टीफ़िकेशन (Justification)का म्हणून द्यावे
         युद्धातील पराभव असो किंवा कब्बडी या खेळतील पराभव असो,या पराभवाची जबाबदारी ही घ्यावी लागते आणि त्यानंतर पराभवाच्या कारणांचा विचार करावा लागतो.पानिपतच्या लढाईमध्ये पराभव हा पेशव्यांचा झालेला आहे.त्यामुळे पर्यायाने या पराभवाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडते.पेशव्यांचे वारस मात्र या पराभवाची जबाबदारी स्वत:च्या अंगावर घेऊ इच्छित नाही.याउलट ब्राह्मणी व्यवस्था या पराभवाला ’जस्टिफ़ाय’(Justify) करण्याचा बेगडी प्रयत्न करत असते आणि तो सुद्धा मराठ्यांना बदनाम करूनच.!
         पेशव्यांचे वारस म्हणतात की "पानिपत मध्ये मराठ्यांचा पराभव झाला नाही, मराठे पानिपत मध्ये हुतात्मे झाले" हा या पराभवाला जस्टीफ़ाय करण्याचा केवीलवाना प्रयत्न आहे.इथे पेशव्यांचे वारस सफ़ाई देण्याचा प्रयत्न करत असतात.पानिपत मध्ये पेशव्यांचा पराभव झाला होता हे जगजाहीर आहेच त्यामुळे काय जस्टिफ़िकेशन द्यायचे ते त्यांनी द्यावे त्यासाठी मराठ्यांना बदनाम करण्याची गरज नाही.पेशवाई व्यवस्था असे का म्हणत नाही की "पानिपत मध्ये पेशव्यांचा पराभव झाला नाही तर पेशवेहुतात्मे झाले ! असे म्हंटले तर संपुर्ण भारतामध्ये कोणालाही वाईट वाटणार नाही. याउलट पेशवाई व्यवस्थेचे हसू येईल! हे पेशवाई व्यवस्था जाणुन आहे.म्हनुन ही व्यवस्था या पराभवाला "मराठा" शब्दाशी जोडण्याचा प्रयत्न करते.यामुळे या व्यवस्थेला पराभवातून लपण्याची संधी मिळते.
        हे दुसर्या उदाहरणाद्वारे सांगावयाचे झाल्यास असे सांगता येईल की पेशवाईव्यवस्था मोठ मोठ्याने गळा काढून म्हणते की "गर्व से कहो हम हिंदू है !" जर आम्ही हिंदू आहोत तर सांगायची गरज काय आहे ? याचप्रमाणे पानिपत मध्ये मराठ्यांचा पराभव झाला असता सांगायची गरज नसते,पण पराभव मराठ्यांचा झालेलाच नाही तर सांगावयाची गरजच काय आहे ? यामुळे मराठ्यांना या लढाईबाबत कोणतेही जस्टीफ़िकेशन देण्याची गरजच नाही.

24 December 2012

इतिहास म्हणजे चोपड्या नव्हेच !

          "इतिहास" हा व्यक्तींभोवती फ़िरतो, व्यक्तिपरत्वे गुणदोष आलेच.इतिहास लेखणाची पुर्नछाननी व मुल्य तपासले जावे.त्यातील बारकावे आणि तपशील देताना शास्त्रशुद्ध ओघवते विवेचन दिसले पाहिजे. सत्याचा अपलाप न करता काल्पनिक, पुर्णत: कादंबरीमय घटना आणि व्यक्तिचित्रणे असता कामा नयेत.तटस्थ व्रुत्तीने आणि निष्पक्षपणे लेखण व्हावे लागते.मराठ्यांच्या इतिहासात अनेक समज, गैरसमज आणि अपसमज आढळून येतात.इतिहासलेखण देखील व्यक्तिच करतात.छत्रपती संभाजी महाराज, महादजी शिंदे, होळकर, दुसरे बाजीराव, आनंदीबाई, सोयराबाई शिर्के, टिळक, शाहू एवढेच काय पण विश्ववंद्य छत्रपती शिवाजी राजे यांच्याबाबतीतही आपल्या काही इतिहासकारांनी अवास्तव, अवाजवी गोष्टी लिहुन ठेवल्या आहेत. तसेच काही काल्पनिक पात्र इतिहासात घुसडली आहेत.विशेषत: बखरकारांना गोंधळ व भडक, रंजक चित्रणे तर विचारायला नकोच , म्हणूनच त्यातील सत्य शोधणे आवश्यक आहे. 
आता याला इतिहास तरी कसे म्हणावे ? कारण इतिहास शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिलेला असतो.ती पद्धत या इतिहासात जास्त दिसून येत नाही.इतिहास लेखण हे ब्राह्मण इतिहासकारांना लिहिता येते का ? कारण इतिहास लेखणात प्रामाणिकपणा असावा लागतो, पण तो यांच्यात दिसून येत नाही.इतिहासकार हुशार असू शकतात पण प्रामाणिक असू शकत नाहीत.त्यांनी जो इतिहास लिहिला तो इतिहास नसून काल्पनिक गोष्टी आहेत.असे त्यांच्या लिहिलेल्या इतिहासाची चिकित्सा केल्यावर दिसून येते.म्हणून असा इतिहास म्हणजे "चोपड्या" आहेत असे हमखास मानावं लागेल आणि या चोपड्यांना जे बिनडोक इतिहास समजतात ते भटांचे "पिट्टू" आहेत असे समजावे.अर्थात वर्णवर्चस्ववादी इतिहासकर नसून इतिहासविध्वंसक आहेत.हा इतिहास केवळ बहुजनांवर वर्चस्व लादण्यासाठी लिहिलेला आहे.पण आता त्यांची चांगलीच चिकित्सा होत चालली आहे.जाग्रुतीचा वनवा पसरला आहे.या वणव्यात त्यांना खाक व्हावे लागेल अन्यथा सुधरावे लागेल.काय करायचे ते त्त्यांनीच ठरवायचे आहे.दादू कोंडदेवचा पुतळा काढून इतिहास शुद्धीकरणाला सुरुवात झाली आहे असे म्हणायला काही हरकत नसावी.अजुन अशी बरीच घाण साफ़ करायची आहे.त्यांनी जे लिहिले ते त्यांचे वर्चस्व रहावे म्हणून  लिहिले तो इतिहास होऊ शकत नाही.जातीयपुर्वाग्रहातून जे लेखण केले जाते त्याला इतिहास म्हणता येत नाही. मुळात इतिहास म्हणजे काय ? ते समजुन घेतले पाहिजे.
फ़्रॉंन्सिस बेकन यांचे मत इतिहास म्हणजे "मानवाला शहाणे बनविणारी विद्याशाखा म्हणजे इतिहास होय", तर हेन्री जॉन्सन म्हणतात इतिहास म्हणजे " जे घडले ते जसेच्या तसे सांगणे होय" आणि" ज्या घटनांनी मानवी मनावर खोल ठसा उमटतो , अशा घटना म्हणजे इतिहास होय".इतिहासाची व्याख्या करताना प्रो.लेस्की म्हणतात, "इतिहास म्हणजे नैतिक कल्पनांचा संग्रह व स्पष्टीकरण होय".तर इतिहास लेखणाबाबत डॉ.भिमराव आंबेडकर म्हणतात "प्राचीन भारताच्या इतिहासाचा बहुतेक हिस्सा हा इतिहास नाही, असे नाही की प्राचीन भारत इतिहासविना आहे.प्राचीन भारताला फ़ार इतिहास आहे परंतू तो आपले स्वरून गमावून बसलेला आहे.स्रियांचे व मुलांचे मनोरंजन करण्यासाठी त्याला जाणीवपुर्वक पौराणिक  स्वरूप दिले आहे" ,"पुढे ते म्हणतात की ,प्राचीन भारताच्या इतिहासावरील पडदा हटविला जावा याशिवाय प्राचीन भारत इतिहासविहीन राहील.आनंदाची गोष्ट अशी की बौद्ध साहित्याच्या मदतीने प्राचीन इतिहासाला त्या मलब्यातून खोदून काढता येवू शकते. ज्या मलब्याखाली इतिहासकारांनी पागलपणात त्याला लपवून ठेवले आहे "
           या द्रुष्टिने विचार करता ब्रह्मव्रुंदांचे लिखाण इतिहास लेखनाच्या कसोटीवर खरे उतरत नाही.जर ते इतिहासाच्या नावाने आमच्यावर गुलामी लादत असतील तर ती आम्ही ठोकारून लावणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे.जो इतिहास त्यांनी रचला आहे तो साफ़ चुकीचा व दिशाभुल करणारा आहे.त्यांनी जो इतिहास लिहिला तो स्वत:चे हित बघुनच.ब्रह्मव्रुंद इतिहासकारांनी लिहिलेल्या इतिहासात शेंबड्याला राष्ट्रिय नेता बनविले जाते व आमच्या महापुरुषाला हे एवढे लहान करून ठेवतात की आम्हाला आमचा महापुरुष आमचा वाटत नाही. तेली,तांबोळी, कुणबी यांचा जाहीर अपमान करणारे टिळक राष्ट्रिय पुरुष ठरतातच कसे ? महात्मा फ़ुले यांचे कार्य राष्ट्रीय स्वरुपाचे असताना त्यांना महाराष्ट्रापुरतेच मर्यादित करण्याचे महापातक याच वर्णवस्चस्ववादी इतिहासकारांनी केले.उमाजी नाईक हे पहिले क्रांतीकारक असताना कोणा दुसर्याला आद्य क्रांतीकारक म्हणने हा इतिहास आहे ? ज्या राजाच्या शौर्याला जगामध्ये तोड नाही अशा राजाला स्त्रीलंपट म्ह्णून अपमानित केले हा इतिहास आहे ? शिवरायांच्या आकाशाला गवसणी घालणार्या कार्याचे श्रेय स्वजातीय किड्यांना देणे हा इतिहास होऊ शकतो ? एका  चाकराला गुरुपदी बसवले जाते हा इतिहास आहे ? इतिहास लिहिताना स्वार्थाचा लवलेशही नसावा. मग याला आपण इतिहास म्हणायचे ?.
काय हा खरा इतिहास होऊ शकतो ? वर्णवस्चस्ववादी पुरुषांचा इतिहास (गोष्टी) रंगवून सांगितल्या जातात. खलनायकांना नायक बनविणे हा इतिहास होऊ शकतो काय? अशा इतिहासातून राष्ट्रिय भावना कशी काय निर्माण होऊ शकते ?. म्हणूण अशा इतिहासातील घाण साफ़ करणे आवश्यक आहे.पण ती घाण ब्राह्मण साफ़ करणार नाहीत.ते बहुजन इतिहासकारांनाच करावी लागेल.कारण यांचा इतिहास अर्थात चोपड्या रद्दीत फ़ेकण्यालायकच असतात.म्हणून बहुजन इतिहासकार निर्माण होणं आवश्यक आहे.आत्ता पर्यंत बराच इतिहास स्वच्छ झालेलाच आहे त्याबद्दल त्या इतिहासकारांचे आभार आणि अभिनंदन.
  आज बरेच साहित्यिक ,इतिहासकार सत्य इतिहास लेखण करीत आहेत.अर्थात त्याची आवश्यकता आहेच.खरा इतिहास जाणुन घ्यायचा असेल तर हे होणे नक्कीच गरजेचे आहे."ध" चा "मा" करण्यात वर्णवस्चस्ववादी इतिहासकार पटाईट असतात.संभाजी महाराजांचे चरित्र बदनाम करण्याचे काम या वर्णवस्चस्ववादी तथाकथित विद्वानांनीच केले.जिजामातेची बदनामी याच तथाकथित विद्वानांनीच केली.त्यामुळे बहुजन इतिहासकार व साहित्यिकाने या गोष्टीकडे विशेष लक्ष देऊन त्यांचे मनसुबे नेस्तनाबूत करावेत आणि या पिढीला स्वच्छ आणि खरा इतिहास द्यावा हिच विनंती.
जय शिवराय ॥ जय महाराष्ट्र 

6 November 2012

जेंव्हा इतिहास लिहिला जाईल.........

            एक कथा आहे चिमणी आणि कावळ्याची की एक जंगल होते त्या जंगलात विविध प्राणी राहत होते.एक दिवस जंगलाला आग लागली सर्व प्राणी,पक्षी इकडे तिकडे पळू लागले.त्यावेळी चिमणीने विचार केला ही आग कशी विझवायची.त्यावेळी चिमणी चोचीमध्ये पाणी भरून ती त्या आग आगीवर आणुन टाकू लागली. तिची ती धडपड बराच वेळ चालली. तिथेच असलेला कावळा त्या चिमणीला पाहुन हसत होता.तेंव्हा त्या कावळ्याने चिमणीला प्रश्न केला."चिऊताई चिऊताई तुझ्या इवल्याशा चोचीमधील पाण्याने जंगलाला लागलेली आग विझेल का ?" असे म्हणून तो कावळा हसला.चिमणीने त्याच्या हसण्याकडे लक्ष न देता पुन्हा आपल्या कामात ती गर्क राहीली.चिमणीने धडपड करून चोचीत जेवढे मावेल तेवढे पाणी आणुन त्या घरट्यावर ओतत होती.ती आग वाढतच चालली होती.पण चिमणीची धडपड कमालीची होती.चिमणीची ती धडपड बघून कावळा आणखी मोठ्याने हसू लागला.त्याचे ते हास्य कुत्सित होते.पुन्हा तो कावळा चिमणीला म्हणाला-"चिऊताई चिऊताई तु वेडी आहेस का ? तुझ्या चोचीतल्या पाण्याने आग विझेल का ? ". आता मात्र चिमणीला रहावले नाही.चिमणी त्याला म्हणाली- " अहो कावळेदादा, या जंगलाला आग लागली आणि या जंगलाच्या आगीला विझविण्याचा जेंव्हा इतिहास लिहिला जाईल तेंव्हा त्यात माझे नाव नक्कीच आग विझवणार्यांच्या यादीत असेल, आग लावणार्यांच्या किंवा त्याच्या समर्थकांच्या यादीत माझे नाव नसेल".
         ही कथा सांगण्याचे कारण हे आहे की आज सर्वत्र जातीयवाद,वर्चस्ववाद, ब्राह्मणवाद वाढला आहे. कोणत्याही  अडाणी लोकांना हाताशी धरून महापुरुषांचा अपमान करणे ,इतिहासाचे विक्रुतीकरण करणे याचे प्रमाण वाढले आहे.इतिहासाचे विक्रुतीकरण करणे हे काही लोकांचे धंदेच बनले आहेत.त्यातील एक वाद म्हणजे जेम्स लेन आणि दादू कोंडदेव  प्रकरण.आता ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे की जेंव्हा जेम्स लेन ला हाताशी धरून काही वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणांनी शिवरायांचा अपमान केला तेंव्हा फ़क्त संभाजी ब्रिगेड सारख्या शिवप्रेमी संघटनाच पुढे सरसावल्या निषेद नोंदवायला.संभाजी ब्रिगेड ने जेंव्हा दादू कोंडदेव यांचा पुतळा काढला तेंव्हा ते शुभ क्रुत्य सर्व जाणव्यांना झोंबले.कुणीही असो ते क्रुत्य त्यांना झोंबण्याचे कारण देखील होते.कारण हे इतिहास शुद्धीकरणाचे संकेत होते.याचे कारण म्हणजे दादू कोंडदेव यांच्या प्रती असलेले प्रेम.पण जे कार्य संभाजी ब्रिगेड ने केले त्याबद्दल समाजामध्ये मोठी चर्चा सुरु झाली.संभाजी ब्रिगेड ही एक शिवप्रेमी संघटना आहे हे विचार रुजू लागले.संभाजी ब्रिगेड गावोगावी पसरली.समाजामध्ये चित्र स्पष्ठ झाले की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी ही प्राच्यविद्या संस्थेतील त्या १४ भटांनीच केली आहे.
आज पर्यंत इतिहासाला वाचविण्याचे आणि शुद्ध करण्याचे काम संभाजी ब्रिगेड ने केले.खरे तर समाज काय आहे किंवा जातीपाती काय आहेत? सगळ्या जाती-धर्मा मधले लोक आपले बांधव आहेत हे विचार समाजात संभाजी ब्रिगेड मुळेच पसरले.आपले खरे शत्रु कोण आहेत आणि मित्र कोण आहेत हे संभाजी ब्रिगेड मुळेच समजले. नाहीतरी वर्णवर्चस्ववादी लोकांनी सगळ्यांना अंधारात ठेवून जाती - धर्मात फ़ुट पडण्याचे काम केले होते.शिवप्रेमी कोण आणि शिवद्रोही कोण हे सर्व बहुजनांना संभाजी ब्रिगेड मुळेच कळले.आज अशा बर्याच गोष्टी होत्या त्यामुळे महापुरुष बदनाम होत होते,इतिहास विक्रुत होत होता पण संभाजी ब्रिगेड ने त्यावर गदा आणली.आपल्या इतिहासाला वाचविण्याचे महत्वाचे काम संभाजी ब्रिगेड ने केले आहे.संभाजी ब्रिगेड नसते तर काय अवस्था झाली असती इतिहासाची, कल्पना ही करवत नाही.उदा.दादू कोंडदेव हा शिवरायांचा गुरु म्हणूनच बोंबाबोंब झाली असती आणि पावलो-पावली शिवराय दादू कोंडदेव मुळे कर्त्रुत्ववान झाले, नाही तर कुठ्ले ! हे ऐकावे लागले असते.इथेच हे थांबले नसते तर यापुढे जेम्स लेन च्या पुस्तकाच्या माध्यमातून अतिशय अपमान कारक इतिहास आपल्या माथ्यावर मारला गेला असता जर संभाजी ब्रिगेड नसते तर. हे तर संभाजी ब्रिगेडचे आभार मानले पाहिजेत.
संभाजी ब्रिगेड हा बहुजन महापुरुषांच्या स्वाभिमानाचा त्यांच्या चळवळीचा मुद्दा आहे.त्यामुळे वरील बोधकथा येथे सुद्धा लागू होते.छत्रपती शिवरायांचा आणि जिजामातेचा अपमान झाला त्या इतिहासामध्ये बदनामी करणार्यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड लढले असा इतिहास होईल ना की समर्थकांच्या यादीत त्यांचे नाव असेल.भांडारकर प्राच्यविद्या संस्था ही संशोधनाचे किंवा ज्ञानाचे केंद्र राहीले नसून ते मनुवाद्यांच्या नालायकपणाचा आणि षडयंत्राचा अड्डा बनले आहे.ही बाब तेंव्हा  नोंदविली जाईल.ज्याप्रमाणे चिमणीने आपल्या क्षमते प्रमाणे आग विझवण्यासाठी धडपड केली म्हणूण तीचे नाव आग विझवण्यार्यांच्या इतिहासात अव्वल राहील.तसेच आज ज्या भांडारकर नावाच्या बौद्धिक वेश्यागिरी केंद्राने जी घाण किंवा जे षडयंत्र केले त्याच्या विरोधात संभाजी ब्रिगेड लढले हा इतिहास लिहिला जाईल.त्या इतिहासात संभाजी ब्रिगेड चे नाव अमर होईल यात तीळमात्र शंका नाही.छत्रपती शिवरायांचा आणि जिजामातेचा अपमान करणार्या मनुवाद्यांना संभाजी ब्रिगेड चांगलाच धडा शिकवेल अशी अपेक्षा करुया.मराठ्यांनो आपला तेजस्वी इतिहास जीवंत ठेवायचा असेल तर संभाजी ब्रिगेडला पर्याय नाही हे लक्षात घ्या. तो इतिहास त्याचा पुरावा राहील.हे होणार आहे ते निश्चित होणारच आहे.      

आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके

           उमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक.... परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी नाईक उपेक्षित क्रांतिकारक आहे....कारण उमाजी नाईक हे रामोशी समाजातील. त्यामुळे त्यांचा खराखुरा इतिहास लिहिण्यापेक्षा लेखणी ज्यांच्या हातात आहे अशा लोकांनी पूर्वग्रह आणि जातीयवाद मनात बाळगून इतिहासाचे लेखन केले. त्यांच्या या उपद्व्यापामुळे उमाजी नाईक सारखे अस्सल हिरो झिरो झाले आणि झिरो हिरो झाले. ही कला अवगत असते ज्याच्या हातात प्रचार-प्रसार माध्यमे असतात त्याला. लोकांना एखादी खोटी गोष्ट सांगितली तर ती पटतेच असे नाही. परंतु एकच खोटे शंभर वेळा खरे म्हणून सांगितले तर लोकांना ते नक्की पटते. 
          आद्य’ या शब्दाचा अर्थ आहे ‘पहिला’. ‘आद्य क्रांतिकारक’ म्हणजे ‘पहिला क्रांतिकारक’. प्रथम ज्याने सशस्त्र क्रांती सुरु केली असा क्रांतिकारक ‘आद्य क्रांतिकारक’ ठरू शकतो. ‘आद्य क्रांतिकारक’ एकच असू शकतो. दोन-दोन आद्य क्रांतिकारक असणे शक्य नाही. दोघांचाही कार्यकाल भिन्न आहे. तरीही या दोघांचीही मांडणी आद्य क्रांतिकारक म्हणून कशी काय होवू शकेल ? यात मला कुणाचाही अवमान करायचा नाही. परंतु हे वास्तव आहे कि दोघांचीही मांडणी आद्य क्रांतिकारक म्हणून होवू शकत नाही.
        त्यासाठी आपण जरा दोघांच्याही जीवनपट आणि कार्यकालावरून नजर टाकू. दोघांचाही इतिहास पारदर्शक आहे त्यामुळे समजायला वेळ लागणार नाही की कोन असली हिरो, आद्य क्रांतिकारक आहेत. 
आधी आपण आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या विषयी जाणुन घेऊया
आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक
               उमाजी नाईक यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ साली पुणे भिवडी येथे झाला. उमाजी नाईक हे शिवरायांचे निस्सीम भक्त होते . शिवरायांनी ज्यापद्धतीने जुलमी, परकीय शक्तीविरोधात लढा उभारून स्वराज्य निर्माण केले तसेच स्वप्न उमाजी नाईक ही पाहत होते. इंग्रजी सत्ता उलथवून टाकण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्याबरोबर इंग्रजी सत्तेच्या विरोधात रणशिंग फुंकले. याकामी त्यांना विठूजी नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळकर आणि इतर सहकाऱ्यांनी बहुमोल मदत केली. इंग्रजांच्या खजिन्यावर धाडी टाकणे, तो गरिबांना वाटणे, इंग्रज सैन्याला सळो कि पळो करून सोडणे, प्रसंगी जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांना ठार कारणे अशा मार्गाने उमाजी नाईक यांनी पाहिली सशस्त्र क्रांती सुरु केली. डिसेंबर १८३० ला त्यांनी इंग्रज सत्तेच्याविरोधात जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. इंग्रजांनी उमाजी नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रचंड धास्ती खाल्ली होती. परंतु फितूर भोरच्या सचीवामुळे १५ डिसेंबर १८३२ रोजी अवघ्या ४१ व्या वर्षी उमाजी नाईक देशासाठी फासावर चढले.
क्रांतिकारक वासूदेव बळवंत फ़डके यांच्या विषयी जाणुन घेऊया
क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके
          वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म उमाजी नाईक यांच्या मृत्युनंतर १३ वर्षांनी म्हणजे ४ नोव्हेंबर १८४५ रोजी झाला. वासुदेव बळवंत फडके हे इंग्रजांच्या सैन्य लेखा सेवेत नोकरीस होते. एकदा त्यांची आई आजारी असताना त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी रजा नाकारली. त्यामुळे ते आजारी आईला भेटायला जावू शकले नाहीत. जेव्हा ते आईला भेटायला गेले तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले होते. या प्रकाराने संतापून फडके यांनी इंग्रजी नोकरीचा राजीनामा दिला आणि इंग्रजाविरुद्ध संघर्ष चालू केला.आता जरा थोडा विचार केला की जर त्यांची रजा मंजुर झाली असती तर ? त्यांनी शस्त्र घेतले असते का ? यामुळे आद्य राहुदेत नुसते क्रांतिकारक यावरच प्रश्न निर्माण होतो असो....
           दोघांचाही कार्यकाल अभ्यासाला तर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात यायला हवी कि उमाजी नाईक यांच्या मृत्युनंतर तब्बल १३ वर्षांनी वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला. मग फडके यांच्या कितीतरी अगोदर उमाजी नाईक यांनी सशस्त्र क्रांती सुरु केली होती. मग आद्य क्रांतिकारक हा बहुमान उमाजी नाईक यांना मिळायला हवा. मात्र त्यांना डावलून वासुदेव बळवंत फडके यांची मांडणी आद्य क्रांतिकारक म्हणून केली जाते. त्यामुळे होते काय कि ज्या अर्थी वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक आहेत त्या अर्थी त्यांनी पाहिली सशस्त्र क्रांती सुरु केली. अर्थात त्यांच्या आधी कुणीही सशस्त्र क्रांती सुरु केली नाही. मग वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हटल्याने उमाजी नाईकांचे कार्य-कर्तुत्व डावलले जात नाही का ? कि मुद्दाम त्यांना उपेक्षित ठेवण्यासाठीच असे प्रकार होतात ? अशाने खरा इतिहास समाजासमोर कसा येणार ?
          महापुरुषांच्या नावाला आणि कर्तुत्वाला जातीचे परिमाण लावणे हे जितके चुकीचे तितकेच त्यांना जातीत बंदिस्त करून त्यांचा इतिहास लिहिणेही चुकीचे. मात्र इतिहास लिहितानाच अशा लबाड्या केल्या गेल्या असतील तर त्या दाखवून देताना जातींचे संदर्भ आले म्हणूण महापुरुषांच्या कर्तुत्वाला धक्का पोहचला असे कुणी मानू नये.याला इतिहासाचे विक्रुतीकरण म्हणत नाहीत तर इतिहासाचे शुद्धीकरण म्हणतात.

5 November 2012

मानवतेचे महान उपासक : संत गाडगे महाराज

        "मनुष्य" सुद्धा उमललेल्या फ़ुलासारखा असतो. मनुष्य जन्माला येतो तो अस्तित्वाचा भाग म्हणून.चैतन्य त्याच्या नसानसातून धवत असतं .दु:खातून आनंदाकडे जाणारा हा प्रवाह अनेक दु:खी,कष्टकरी जनतेच्या अंत:करणात भरून जातो.ते भरणं त्यांच्या कष्टाचं सार्थक असतं.जन्माचं कल्याण करतं , आनंदाची , चेतनेची ज्योती चेतविण्याकरीताच हे अस्तित्वाचं लेणं आकार घेतं.
        "शेणगांव" एक लहानसं खेडं.गावात शंभर - सव्वाशे कौलारू झोपड्या.ह्या खेड्यात परीट जातीचं एक घर,समोर दोन - तीन मडकी,सारवून स्वच्छ केलेलं अंगण.घराचा मालक झिंगराजी.त्यांच्या बायकोचं नाव सखुवाई, कष्ट करणारी. या  मायमाउलीच्या पोटी १८७६ साली जन्माला आलं मुल नाव ठेवलं ’डेबू’.’डेब’ झाला तुकोबांचा कर्मयोगी ,सार्या कुळाचा उद्धार केला.डेबुंचे कार्य महान सारी मानवता खुश झाली.दीनांचा कैवारी मानवतेच्या अपंगाचा आधार..अमाप कार्य महाराष्ट्रावरच नव्हे तर सर्व भारत मातापिता त्यांच्या कार्यावर धन्य झाली.
          संत गाडगेबाबांना संत तसेच कार्यवीर म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.कोणत्याही प्रकारच्या चमत्काराचा स्पर्ष न होता हे व्यक्तिमत्व येवढे थोर कसे ? अंगठेबहाद्दर डेबूजी बघता बघता अनेक स्वनामधन्य विद्वानांचा बाप कसा झाला ? आजुबाजुला पसरलेल्या हजारो निरक्षर , अडाणी , देवभोळ्या व अंधश्रद्ध लोकांच्या ज्ञानाचा दिप चेतविण्यासाठी गाडगेबाबांनी ग्रुहत्याग केला आणि तथागत बुद्ध गाडगेबाबांच्या रुपाने पुन्हा समाजात वावरले.
              संत गाडगेबाबांमध्ये तथागत बुद्धांची करूणा, तुकोबांची अहिंसा यांचे विलक्षण मिश्रण झाले आहे. जेंव्हा तिकडे सावकरांनी डेबुजींच्या मामाची जमीन फ़सवणुकीने  गिळंक्रुत करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा डेबुजींनी त्याला विरोध केला.सावकाराला शेतातून पळवून लावले.सावकाराने डेबुजींच्या आजोबांना व मामेभावाला गाठले आणि धाकदपटशा दाखवून पुन्हा जमीन गिळंक्रुत केली.आपण दाताच्या कण्या करून, हाडाचे काडे करून सावकाराचे कर्ज फ़ेडले आणि तरीही इथल्या व्यवस्थेमुळे आपल्या बापजाद्यांच्या निरक्षरतेमुळे आपला आणी आपल्या कष्टाचा बळी गेला हे बाबांच्या मनाला फ़ार लागले.त्या दिवसापासून बाबा संसार पराड:मुख झाले आणि ग्रुहत्याग केला.
            " बाबा घरातून बाहेर पडल्यावर जेंव्हा वर्षभराने त्यांची आई, बायको व मुलाबाळांची भेट झाली त्यावेळी त्यांच्या आईने आता आम्ही कुणाच्या भरवश्यावर जगावे ?" असा प्रश्न केला.त्यावेळी बाबांनी दिलेले उत्तर मार्मिक आहे.ते म्हणतात "ज्याच्या घरचा माणुस मेला त्याचे काय होते त्याच्या वाचून अडते काय ? " असे समजा की डेबुजी मेला, मग जसे जगले असते तसे जगा.ग्रुहत्याग केलेला माणुस वेगळ्या अर्थाने घरच्यांसाठी मेलेलाच असतो.डेबुजीला स्वत:च्या अंगातला आळस  झडावा म्हणून कोणाच्याही शेतात काबाडकष्ट कर.कोणाच्या घरची लाकडे फ़ोडून दे, कधी स्वत:ला महार मांग म्हणवून घेवून विहिरीला स्पर्श, मालकाचा बेदम मार खा, जिभेचा लोभ झडला पाहिजे म्हणुन केवळ पुरणपोळीची मागणी करायची आणि काटेरी फ़ांदिने स्वत:ला झोडपून घ्यावे.ही सगळी क्रुत्ये वेडेपणाची लक्षणे होती काय ? नक्कीच नाही!
             आपल्या अस्तित्वाचे विश्व चैतन्याशी विलीनीकरण झाले पाहिजे म्हणून स्वत:च्या देहावर केलेला तो उपचार होता ! अंगावर सतरा ठिगळांचे कुडते.एका कानात कवडी तर दुसर्या कानात बांगडीचा तुकडा, डोक्यावर कापर हा सगळा वेश,म्हणजे गबाळेपणा काय ? सतरा ठिगळांचे कुडते सर्वधर्मसमभावाचे निदर्शक, कानातली कवडी माणसाचे जीवन कवडीमोल आहे हे दाखविणारे ,तर फ़ुटक्या बांगडीचा तुकडा जिवनाचे क्षणभंगुरत्व निर्देशित् करणारा, डोक्यावर खापर म्हणजे जीवनाच्या फ़ुटक्या मडक्याचा अन्वयार्थ स्पष्ट करणारे ! म्हणुनच आपण जीवनाचा साक्षात्कार झालेल्या डेबुजींना गाडगेबाबा म्हणतो.संसारात लिप्त असलेल्या ग्रुहस्थाला नाही.
                बाबांना अहंकाराचा वारा लागलाच नाही. त्यांच्या अहंकाराची राख झाली होती.ज्यांचा अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला.बाबा म्हणत "मी काही वेगळं करत नाही. मी करतो ती मानचाची सेवा होय. गरजवंतांकरीता झिजणं हा मानवता धर्म आहे.मी तो धर्म पाळतो आहे.हा देह सेवेत खर्च व्हावा एवढेच मला वाटते."जसं बाबांची सेवा आणि बाबा म्हणजे विलक्षण आश्चर्य होते.त्यांचा शब्द म्हणजे मोत्याचं पाणी.बाबा म्हणजे सन्मार्गाची वाट.त्यांची प्रत्येक क्रुती माणसाला वळणशील बनवी. त्यांची कार्यपद्धती आणि कार्य अचाट होते.
            समाजोपयोगी अनेक कार्याची बाबांनी उभारणी केली.सारा महाराष्ट्र त्यांच्या कार्याने उजळून निघाला. त्यांच्या कार्याची साक्ष म्हणजे त्यांनी बांधलेल्या टोलेजंग धर्मशाळा.शिक्षणावर त्यांचं नितांत प्रेम होतं.ते नेहमी डॉ.बाबासाहेबांचं उदाहरण देत.शिक्षणाशिवाय माणुस आंधळा होतो.परिस्थितीमुळं माणसाला शिक्षण मिळत नाही,अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात.गरिबांना शिक्षण कसं मिळेल याची बाबांना सदैव चिंता.त्याकरीता बाबांनी शाळा काढल्या, वसतीग्रुहे काढली, आश्रमशाळा सुरु केल्या, जागोजागी अन्नछत्रे उभी केली.उपाशी माणसं जेवायला लागली.आंधळे,पांगळे आशेने फ़ुलुन गेले.बाबा त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले.जिवाचं रान करून हे हिमालयाएवढे मोठे कार्य बाबांनी उभं केलं.
            कोहिनुर हिर्याला पहावं रत्नात, सिंहाला पहावं वनात, तसं बाबांना पहावं कीर्तनात. बाबा खराट्याने गावातील घान साफ़ करीत.बाबांनी आपल्या जीवनातील शेवटचे कीर्तन मुंबई पोलीस ठाण्यात करून नोकरदारांच्या डोक्यातील वेडगळ समजुती व अंध:श्रद्धारुपी घान साफ़ केली.गोपाला ॥ गोपाला ॥ देवकीनंदन गोपाला ॥.........गजरात मोटार नागरवाडीच्या मार्गावर असताना पेढीनदीचे पुलावर मोटार आली अन बाबांचे महापरीनिर्वाण झाले.तो दिवस होता २० डिसेंबर १९५६ त्यांच्या स्म्रुतीस मन:पुर्वक अभिवादन ! 

29 October 2012

समता प्रिय संत शिरोमणी संत नामदेव महाराज

           संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत. त्यांचं कर्त्रुत्व महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून उत्तर- वायव्य भारतापर्यंत आपला ठसा उमटवून गेले."नाचू किर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥" यांसारख्या शब्दांनी समाजात समतेच्या मार्गाने ज्ञानदीप लावण्याचा ध्यास घेतलेल्या संर नामदेव महाराजांनी भाषा,प्रांत,धर्म, जातपात या पलीकडे जाऊन समाज जीवणाचा विचार केला.त्यामुळे संत नामदेव महाराज केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता पंजाबमधील शिखांनाही तितकेच पुज्य ठरतात.प्रतिकुल ,राजकीय, सामाजिक अन धार्मिक आतावरणात मराठी आणि अन्य प्रादेशिक लोकजीवनाला नवे वळण लावण्याचे कार्य ज्या काही थोर संतांनी केले त्यांचे अग्रणी संत नामदेव महाराज होते.
                 मध्ययुगीन समाज जीवन प्रामुख्याने धर्मप्रधान होते.पण कर्मकांड आणि विधिनिषेद यांचे स्तोम फ़ार माजलेले होते. वर्णाश्रमाच्या धोरणामुळे उच्चवर्णीय समाजामध्ये अराजकता निर्माण झाली होती.धार्मिक संस्कार तेच करायचे ज्ञान , अध्ययन, अध्यापन, धनसंचय, शस्त्र धारण करण्याचा अधिकार त्यांनाच होता.तसेच मंदिर प्रवेश ,सार्वजनिक पाणवठे इत्यादी ठिकाणी पाणी भरण्याचा अधिकार अस्प्रुष्यांना नव्हता.हळूहळू या रुढींनाच धर्माचे महात्म्य प्राप्त होत गेले आणी समाजात भयानक अज्ञान आणि अंधश्रद्धाचे स्तोम माजले होते.
           या पार्श्वभुमीवर २६ ऑक्टोंबर १२७० रोजी नामदेव महाराजांचा जन्म एका शिंपी कुटुंबात झाला.संत नामदेव केवळ भक्तिभावाची (काव्य) गाणी लिहिणारे नव्हते तर समाजात समता प्रस्थापित करण्यात आणि समाज प्रबोधन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.भेदाभेदांनी विदीर्ण (भग्र) झालेल्या भारतीय समाजात संत नामदेवांनी लोकनिंदेचा विचार न करता समतेची बीज रोवून विषमतेवर प्रहार केला.विसोबा खेचरांना गुरु मानणार्या  संत नामदेवांनी जेंव्हा संत चोखोबांच्या परिवारावर आपत्ती आली तेंव्हा ते मंगळवेढ्याला गेले आणि त्यांच्या (चोखोबांच्या) अस्थी स्वत: आणून सनातन्यांच्याच नगरीत खुद्द पंढरपुरच्या विठ्ठ्लाच्या पायरीशी संत नामदेवांनी चोखोबांच्या स्म्रुतीमंदिरांची निर्मीती केली.
           संत नामदेवांनी नेहमी जातीनिरपेक्ष धार्मिक लोकशाहीचा पुरस्कार केला ते एक प्रतिभासंपन्न कवी व संगीताचे चांगले जाणकार होते आणि कीर्तन कलेवर त्यांचे प्रभुत्व होते.संत नामदेवांनी त्रिप्रकरणात्मक, चरित्र, आत्मचरित्र, व्यक्तिचरित्र, आख्यानक रचना,प्रवास वर्णन, काव्य, कुटरचना,लोक कविता, भाव आणि भक्तीपर कविता,सश्यूकुडी वाणीतील हिंदी रचना अशी त्यांनी वैविध्यपुर्ण वाड:मय संपदा लिहिली.
           संत नामदेव महाराजांनी संपुर्ण भारतभर ५४ वर्ष फ़िरून समाजात समता प्रस्थापित करण्याचा अथक प्रयत्न केला.८० वर्षाचे वय झाल्यावर त्यांनी इहलोकाचा निरोप घॆण्याचे ठरविले आणि ३ जुलै १३५० रोजी पंढरपुर इथे विठ्ठ्ल मंदिराच्या महाद्वारात संत चोखोबांच्या समाधी शेजारी समाधी घॆऊन समाजासमोर समतेचा महान आदर्श ठेवला.अशा या महान संत शिरोमणींची २६ ऑक्टॊंबर रोजी जयंती.अशा या समता प्रिय संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांना कोटी - कोटी विनम्र वंदन....