26 June 2013

स्वराज्याचे पहिले सरसेनापती : हंबीरराव मोहिते

           शिवशाहीच्या उदयापुर्वी अनेक कर्तबगार घराणी उदयास आली होती त्यामध्ये मोहिते, घाटगे, महाडिक, सुर्वे, जाधव, सावंत या विविध घराण्यांनी पराक्रमी पुरुषांनी मुस्लिम शाह्यामध्ये लष्करी सेवा करून नावलौकिक मिळवला होता.त्यांच्या भोसले घराण्याशी संबंध आला त्यावेळी नावलौकीकात आणखीनच भर पडली.काही घराण्यांनी छत्रपती घराण्यांशी नातेसंबंध निर्माण केला.त्यापैकी मोहिते घराणे जवळचे घराणे होते.या घराण्यात अनेक कर्तबगार पुरुष निर्माण झाले.याच घराण्यातील हंबीरराव मोहिते यांना शिवरायांनी अष्ठ्प्रधान मंडळामध्ये सरसेनापती म्हणुन स्थान दिले.खर्या अर्थाने हंबीरराव हे स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते.हंबीररावांच्या अगोदर शिवरायांचे पराक्रमी सेनापती प्रतापराव गुजर व नेताजी पालकर यांचे स्वराज्यस्थापनेत मोठे योगदान आहे.परंतू त्यांच्याबाबतीत शोकांतिका झाली आणि साहजिकच हंबीरराव सरसेनापती झाले.
           सरसेनापती हंबीररावांच्या गराण्याचा इतिहास पाहिला तर तो गौरवशाली आहे.हंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता.त्यांना निजामशाहीने "बाजी" हा किताब दिला होता.हे घराणे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते.तुकोजी मोहिते हे पराक्रमी पुरुष तळबीड येथे आला व तेथील पाटीलकी सांभाळत सेवा करू लागला या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्याशी सोयरीक जुळवून आणली.याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येवून शहाजीराजांच्या लष्कारात सामील झाले व मोठे शौर्य गाजवले.संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील प्रराक्रमी सेनानी होते.त्यांच्या शौर्याची गाथा अदिलशाही फ़र्मानामध्ये पहावयास मिळतात.यातील संभाजी मोहितेचा मुलगा म्हणजे हंबीरराव मोहिते हा मर्दमराठा शिवरायांच्या सानिध्यात आले.स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते.संभाजी मोहिते पुढे कर्नाटकला गेले मात्र आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह शिवरायांसोबत लावून दिला व छत्रपती घराण्यांशी पुन्हा नाते निर्माण केले.पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंबीरराव मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा शिवपुत्र राजाराम महाराजांशी विवाह लावून दिला.मोहिते घराणे हे छत्रपतीचे अगदी जवळचे घराणे आहे.याच घराण्यातील उदयास आलेला मर्द मराठा म्हणजेच हंबीरराव मोहिते.
            शिवरायांच्या राज्याभिषेकापुर्वी महापराक्रमी सेनापती प्रतापराव गुजर बहलोल खानाशी झालेल्या संघर्षात मारले गेले.त्यांच्या शोकांतिकेनंतर ते सेनापती पद रिकामे झाले व ते पद हंबीरराव मोहितेंना दिले आणि अष्टप्रधान मंडळातील सरसेनापती पद म्हणुन मान मिळाला.हंबीरराव हा प्रतापरावांच्या सैन्यात सेनानी होता.ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेंव्हा हंबीररावांनी अदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला.शत्रुला विजापुरपर्यंत पिटाळून लवण्यात हंबिररावांचे मोठे योगदान आहे.सरसेनापती हा केवळ पराक्रमीच असून चालत नाही.तर तो प्रसंगाचा जाणकार व ह्रुदयाठायी शहाणपण आणि सबुरी असावी लागते.हे सर्व गुण हंबीररावांकडे होते.छत्रपती शिवरायांनी त्याच्या पराक्रमाचा गौरव म्हणुनच अष्ठ्प्रधान मंडळात स्थान दिले.हंबीररावांचे मुळ नाव हंसाजी मोहिते होते.महाराजांनी हंसाजी चा "हंबीरराव" हा किताबाने सन्मान केला.सरनौबत दिली.राज्याभिषेकानंतर मोघली सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश शिवरायांनी हंबीररावांना दिला.ही स्वारी यशस्वी करून खानदेशातील मोघलांची खानदेश,बागलाल,गुजरात,बर्हाणपूर,वर्हाड,माहूड, वरकड प्रर्यंत प्रदेशात धुमाकूळ घातला होता.यानंतर (सन १६७६) सरसेनापती हंबिररावाने कर्नाटकातील कोप्पल येथील अदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान मियाणच्या  येलबुर्गा येथे मोठा पाडाव करूण त्याच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली.सरसेनापती हंबीररावांच्या तलवारीची कमाल या विषयीचे वर्णन बखरीतून आलेले आहे.हुसेनखान केंद्र करून सेनानी धनाजी जाधव व सरसेनापती हंबीरराव मोहिते शिवरायांस येवून मिळाले त्यावेळी शिवराय गोवळकोंड्यात भागानगर येथे होते. यानंतर महाराजांना आपले बंधू व्यंकोजीराजेंबरोबर सामोपचाराने चांगले संबंध निर्माण करावयाचे होते.मात्र व्यंकोजींची भेट यशस्वी झाली नाही.पुढे महाराजांनी कर्नाटकातील मोहिम आटोपती घेतली आणि महाराष्ट्रात (स्वराज्यात) आले.नंतर हंबिरराव सन १६७८ मध्ये महाराष्ट्रात (स्वराज्यात) आले.दरम्यान युवराज छत्रपती संभाजी राजेंचे मोघालांना जाऊन मिळणे पुन्हा स्वराज्यात येणे यानंतर छत्रपती शिवराय व संभाजी राजेंची पन्हाळा गडावर भेट या घटना घडल्या.त्यानंतर महाराजांनी लहान पुत्र राजाराम महाराजांचा प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईशी विवाह घडवून आणला.त्यानंतर अवघ्या दहा ते बारा दिवसांनी छत्रपती शिवरायांचे निधन झाले.यावेळी हंबीरराव कर्हाड परिसरात छावणी टाकून होते.
           थोड्याच दिवसांत काही ब्राह्मण प्रधानांनी संभाजी राजेंना छत्रपतीपदावर न बसविता त्यांचा हक्क डावलून राजाराम महाराजांचे मंचकारोहन केले ही बाब संभाजी राजांना कळली तेंव्हा त्यांनी आपल्या सर्व किल्लेदार व अधिकारांना आपल्या पायाशी रुजु होण्याचे आदेश सोडले.हे आज्ञापत्र सरसेनापती हंबीररावांनाही मिळाले होते.हंबीररावांनी संभाजी राजांचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला.ज्यावेळी राजाराम महाराजांच्या बाजुने असणारे प्रधान हंबीररावांना भेटण्यास आले तेंव्हा त्यांची तिव्र शब्दात निर्भलना केली.याठिकाणी स्वामीनिष्ठा दिसून येते कारण स्वराज्याचा वारसदार म्हणुन संभाजी राजांचा खरा हक्क होता.हंबीररावांळेच बंडखोर प्रधानांचे  मनोरथ विरून गेले व संभाजी राजे छत्रपती झाले.यावेळीचा हंबीररावांचा न्यायीपणा इतिहासात प्रसिद्ध आहे.संभाजी राजेंच्या राज्याभिषेकानंतर संभाजी राजेंच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हंबीररावांनी आपला पराक्रम गाजवला त्यापैकी बुर्हाणपुरचा विजय, त्यांनी मिळवलेली प्रचंड लुट महत्वाची आहे.या विजयाने मोघलांची नाचक्की झाली.त्यानंतर मोघली सरदार शहाबुदीनखान उर्फ़ गाजीउदीनखान बाहदूर याच्यावरील हंबीररावांची स्वारी महत्वाची आहे.खान रामसेज किल्ल्याला वेढा देऊन होता त्यावेळी हंबीररावांनी त्याच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला.यावेढ्यात हंबीरराव जखमी झाले होते.यानंतर पुढे संभाजी राजांच्या आदेशानुसार भिमानदीच्या परीसरातून मोघली सरदार कुलीचखान व पन्हाळा परीसरातून शहाजादा आज्जमला पिटाळून लावण्यासाठी हंबीररावांनी शर्थीचा यशस्वी प्रयत्न केला.त्यानंतर कल्याण जवळ रहुल्लाखान व बाहदुरखानाचा पराभव केला.सन १६८८ मध्ये रायगडाजवळ हंबिररावांनी गाजीउद्दीन खानाबरोबर दोन हात केले या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले.यानंतरच्या कालखंडात खुद्द संभाजीराजेंच्या बरोबर अनेक मोहिमेत हंबीररावांचा मोठा सहभाग होता.सरसेनापती हंबीररावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ या युद्धात मोघली सरदार सर्जाखानाचा पराभव झाला परंतू हंबीररावांना तोफ़ेचा गोळा लागून धारातिर्थी पडले.नेमकी ही लढाई कोठे झाली याची नोंद नाही.मात्र वाईजवळील युद्धात हा मर्द मराठा सरसेनापती धारातिर्थी पडला.डिसेंबर १६८७ मध्ये हंबीररावांच्या म्रुत्युने मोठी पोकळी निर्माण केली.संभाजीराजांपुढे अनेक आव्हाने निर्माण झाली.
             एकंदरीत सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे मराठा स्वराज्यप्रेम व स्मामीनिष्ठा दिसून येत असताना छत्रपती शिवरायांची शिकवण ही महत्वाची होती हे ही दिसून येते. हंबीररावांच्या ठायी शत्रुशी लढण्याची जिद्द व जबर आत्मविश्वास या सर्व गोष्टी छत्रपती शिवरायांच्या तालमीतुनच हंबीररावांना मिळाल्या होत्या. इतिहासानेही दाखवून दिले आहे की विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांची सरसेनापतीची निवड अगदी योग्य होती.अशा या मर्दमराठ्यास मानाचा मुजरा.

3 June 2013

महानायक : राष्ट्रपिता जोतिराव फ़ुले

           १८५१ साली घडलेली एक घटना ! एक जोडपे आपापसात चर्चा करत होते, अहो आपल्याला स्व:चे मुलबाळ नाही, मेल्यावर आपल्या समाधीवर फ़ुले वाहण्यासाठी आपल्या रक्ताचा वारस असावा ! असे पत्निने विचारताच पती म्हणाला,अग ! भले आज आपल्या रक्ताचा वारसदार नाही, परंतू आपण जे समाजोद्धाराचे काम करीत आहोत यातून आपण पेरलेल्या क्रांतीकारी विचारांचे हजारो,लाखो वारस तयार होतील आणि आपल्या समाधीवर फ़ुले वाहतील. विचारांचे वारस निर्माण होतील असे म्हणणारे ते ग्रुहस्त कोण ? ते होते महात्मा फ़ुले.१६० वर्षापुर्वीची भविष्यवाणी जोतिरावांनी केली होती त्याप्रमाणे त्यांच्या विचारांचे किती वारस निर्माण झाले ? याची समीक्षा आम्ही केली तर लोककल्याणकारी राजर्षी छ.शाहू महाराज आणि युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर या दोन नावाच्या पलीकडे नावे आम्हाला सापडत नाहीत.
मग यांच्या शिवाय फ़ुलेंच्या विचारांचे वारसदार आम्हाला का सापडत नाहीत ? तरीही त्यांची जयंती आपण उत्साहाने साजरी करतो.वारसदार नसताना जयंती का साजरी होते ? कारण जयंती साजरी करणे एवढंच वारसदारांचे काम आहे, असे महापुरुषांचे भक्त समजतात परंतू महापुरुषांना त्यांच्या कार्याला,विचारांना भक्तांची नसूण अनुयायांची गरज आहे.
जयंती कोणाची व कशासाठी साजरी करतो ?
                जे ध्येयासाठी जगतात,ध्येयपुर्तीसाठी जीवन समर्पित करतात त्यांना आपल्या स्म्रुती जपतो.हे जे महापुरुष आहेत त्यांनी जीवन काळात एक निश्चित असा मोठा संघर्ष चालवला त्यामुळे ते आज समाजाचे आदर्श बनले आहेत आज त्यांना जपन्याचे,पुजा करण्याचे अभियान जोरात चालू आहे.त्यांनी ज्या व्यवस्थेच्या विरोधात काम केले ती व्यवस्था आजही समाजाचे शोषण करीत आहे.ज्या समाजाचे आंदोलन चालवले त्या समाजाच्या समस्या आजुनही कायम आहेत.मग ज्या महात्मा फ़ुलेंनी शेतकर्यांच्या हातात आसूड देऊन त्याला बैलाप्रमाणे माजलेल्या ब्राह्मणी व्यवस्थेला वटणीवर आणायला शिकवले तोच शेतकरी आज आत्महत्या का करीत आहे ?
ज्या हातात छत्रपती शिवरायांनी तलवार देऊन त्यांच्या करवी बहुजनांचे छत्र निर्माण केले,टिपरीची तलवार करून ज्यांनी पराक्रम घडविला ती मनगडे आज इतकी लाचार का झाली,की पोटाची टिचभर खळगी भरण्यासाठी दुसर्यापुढे हात पसरू लागली ?ज्याचे हात देण्यासाठीच निर्माण झाले होते तो बळीराजा आज स्वत:च मागणार्याच्या दारात उभा आहे.ज्या जमातीला  राज्यकर्ती जमात व्हा म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या पंखात गरूडाचे बळ देऊन त्यांना भरारी घ्यायला शिकवली तीच जमात ते गरूडाची उंची गाठणारे आज इतके लाचार का झाले ? 
असे एक ना अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात.क्रुषीप्रधान देशामध्ये शेतकर्यालाच आत्महत्या करावी लागते याचे नेमके कारण काय ? हे पहिला शोधावे लागेल. मग आपल्याला आठवेल की जे ध्येय जो मार्ग अपल्याला आपल्या महापुरुषांनी दिला ते ध्येय ,तो मार्ग आपण सोडून दिला ? आज आपला समाज प्रचंड भ्रमित झालेला आहे, गोंधळात आहे.हजारो समस्या डोळ्यावासून उभ्या आहेत.पण समाधानाचा रस्ता आपल्या समोर नाही.उलट ज्यांनी या समस्या निर्माण केल्या  त्यांच्यावरच त्याने समाधानाची जबाबदारी सोपविली म्हणून ही अशी अवस्था !
ह्या अशा अवस्थेत पुन्हा आपल्याला गरज पडेल ती आपल्या महापुरुषांच्या विचारांची त्यांच्या सत्यवादी मार्गाची.ती समजून घेतली तरच समाधान होईल अन्यथा नाही.बळीराजाने आपल्या पदरात भरभरून माप दिलं होतं, अगदी सोन्याचा धुर निघावा अशी आमची परिस्थिती होती त्या बळीराजावर ही परिस्थिती का आली ? आधुनिक भारताच्या इतिहासापासून जरी पाहिले तरी स्पष्ट पणे या बाबी आपल्यासमोर येतात की, आज या शेतकर्याची,बहुजन समाजाची काय अवस्था झाली आहे ?महात्मा फ़ुलेंच्या काळापासून परिस्थिती जर डोळ्यासमोर घेतली तर काय दिसते.
तो काळ एका संक्रमन अवस्थेचा होता.पेशवाई नुकतीच संपली होती.जरी पेशवाई संपली होती तरी पेशवाई ज्यांच्या अंगात रुजली होती त्यांची धुंदी, मस्ती उतरली नव्हती जे राज्य क्षेत्र निर्माण करण्यासाठी मावळ्यांनी रक्त सांडले त्या मराठा स्वराज्याचे पेशव्यांनी पेशवाईत रुपांतर केले होते.परीणामी नंगानाच पेशवाईत सुरु झाला.पेशवाई म्हंटले की एकच आठवते ते म्हणजे गळ्यात गाडगे आणि कमरेला खराटा !शिक्षणावर केलेली बंदी म्हणजे धर्म बुडतो जेंव्हा क्षुद्र शिक्षण घेतो.
विद्या नाकारणे हा काय धर्म असू शकतो का ? असे प्रश्न उभे करून त्यांनी ठरवले ही व्यवस्था आमच्या शेतकर्याला न्याय देऊ शकत नाही.त्यासाठी ही व्यवस्था बदलावी लागेल.शेतकर्यांना या अवस्थेतून मुक्त करावे लागेल.त्यासाठी सर्वात प्रथम शेतकर्याला मुक्त करायचे असेल तर वामनाने गाडलेल्या बळीराजाला पाताळातून बाहेर काढावे लागेल.त्याशिवाय आमच्या समस्यांचे समाधान होणार नाही.त्यासाठी ब्राह्मणांनी केलेल्या आपमतलबी धर्मग्रंथातील लांडी-लबाडी महात्मा फ़ुलेंनी आपल्या गुलामगिरीतून जगासमोर मांडली.या ग्रंथामध्ये शेतकर्याला आपल्या सांस्क्रुतीक संघर्षाचा इतिहास समजावून दिला.महात्मा फ़ुले जाणीवपुर्वक या देशाला बळीस्थान मानतात.बळीराजाची क्रुषीप्रधान संस्क्रुती नष्ट करून ब्राह्मणी धर्माने निर्माण केलेली  संस्क्रुती अशी बनावटी,ढोंगी,आपमतलबी आहे हे जगाला समजावून दिले.एवढ्यावरच थांबले नाहीत तर शिक्षणाची बंदी उठवली,मनुस्म्रुतीचे उल्लंघन केले.ज्ञानाच्या किल्ल्या ब्राह्मणांच्या कमरेला होत्या त्या काढून आपल्या ज्ञानाची कवाडे खुली केली.
जे काम छत्रपती शिवरायांच्या तलवारीने केले तेच काम महात्मा फ़ुले यांच्या लेखणीने केले.त्यांची धार तेवढीच होती.आज मात्र ती धार बोथट झाली आहे.ब्राह्मणांनी सांगितले उत्त्तम शेती,मध्यम व्यापार आणि कनिष्ट नोकरी.महात्मा फ़ुलेंनी सांगितले की उत्तम शिक्षण, याच शिक्षणामुळे फ़ुलेंचा अनुयायी ब्राह्मणांना आव्हान देऊ शकेल.यातूनच सत्यशोधक समाजाची स्थापना झाली.ज्या दिवशी शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक करवून घेतला त्याच दिवशी २४ सप्टेंबर १८७३ ला महात्मा फ़ुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
सत्याला प्रमाण मानणारा ,असत्याला जुगारून देऊन सत्याची कास धरणारा समाज,प्रामाण्यवादी समाज.याच समाजाची चळवळ एवढी मोठी होती की यातूनच शाहू महाराजांसारखे नेत्रुत्व तयार झाले.त्या आधारावरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले.सत्यशोधक चळवळीची धुरा मराठा बांधवांनी दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे, जाधवांसारखी मंडळी यांनी सांभाळली.
महात्मा फ़ुले यांनी आपल्या शेतकर्याचा आसुड मध्ये १८८३ मध्ये जी शेतकर्याची दयनीय परिस्थिती वर्णन केली आहे तीच आजही लागू आहे.शेतकर्यांचे परिस्थितीचे वर्णन करताना महात्मा फ़ुले म्हणतात की शेतकरी हा भ्रष्ट नोकरशाही आणि सावकारशाही यांनी पिळला जात आहे.आज शेतकरी कर्जबाजारी होत आहे.आत्महत्या करत आहे.पण हे कर्ज काही त्यांनी शेतीच्या कामासाठी काढलेले नाही.९०% कर्ज हे धार्मिक कारणासाठी काढलेले आहे.हे सर्व कशामुळे होते ? कारण महात्मा फ़ुलेंनी शिकवलेला शेतकर्याचा आसूड शिकवला गेला नाही.जोतिरावांनी समाजाला तयार करण्यासाठी २५ वर्षे मेहनत घेतली,शेवटी त्यांचा समाज रस्त्यावर आला. त्यांच्या या सार्वजनिक आंदोलनाचे प्रमुख पाच टप्पे होते.१.शिक्षण, २.साहित्य, ३. महिलांचे प्रबोधन, ४.शिवजयंती, ५.सत्यशोधक समाज.
पहिला टप्पा शिक्षण : शिक्षणाच्या बाबतीत महात्मा फ़ुलेंनी एक मंत्र दिला होता.
विद्येविना मती गेली । मती विना नीती गेली ॥
नीती विना गती गेली । गती विन वित्त गेले ॥
वित्ताविना शूद्र खचले । एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले ॥
           विद्येच्या या मंत्रात महात्मा फ़ुलेंनी जो मार्ग सांगितला आहे तो विद्या,मती-नीती-गती-वित्त असा होता.परंतू आजच्या शिकलेल्या लोकांनी विद्येवरून जी उडी मारली ती थेट वित्तावर.विद्येचा जो संबंध मतीशी, तर्काशी होता तो थेट वित्ताशी जोडला.शिक्षणाची फ़ार सोपी व्याख्या महात्मा फ़ुलेंनी केली होती.आमच्या लोकांना इतकं शिकवा इतकं शिकवा की त्यांना खरं काय नि खोटं काय हे समजेल.ते खर्याचं समर्थन करतील.परंतू आज परिस्थिती काय आहे.
या शिक्षण- साहित्य- महिला प्रबोधन-शिवजयंती- सत्यशोधक समाज या टप्प्यामध्ये शेवटचा टप्पा म्हणजे सत्यशोधक समाज.या समाजातून याच्या आंदोलनातून शाहू महाराजांनी प्रेरणा घेतली.सत्यशोधक चळवळ चालविण्याचे काम मराठा बांधवांनी केले.यामधुनच बाबासाहेबांनी राष्ट्रव्यापी आंदोलन उभे केले.परंतू महात्मा फ़ुले-शाहू महाराज-बाबासाहेब यांच्यामधील ही नाळ सुसंगत सुत्रबद्धता आमच्या लोकांपर्यंत पोहचली नाही.म्हणूनच त्यांना मानणारे आपापसात भांडतात.आज जे सत्यशोधक आहेत त्यांनी सत्यशोधकाचा अर्थ सत्ताशोधन असा घेतला आणि सत्ताशोधनाच्या नादाने स्वत:चा व समाजाचा सत्यानाश कधी झाला हे त्यांना कळलेच नाही.हा सत्यानाश जर थांबवायचा असेल तर महापुरुषांचा जयजयकार करण्याने तो थांबनार नाही त्यासाठी आम्हाला फ़ुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे.ते विचार आचरणात आणण्याची गरज आहे आणि महापुरुषांनी दाखवलेल्या मार्गाने जर आम्ही चाललो तरच आज आम्ही आमच्या समस्यांचे समाधान करू शकतो.म्हणूनच आजपासून स्वत:ला फ़ुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार मानून त्यांचे कार्य आणि विचार जगभर पसरविणे हीच खरी फ़ुले-शाहू-आंबेडकर यांना आदरांजली ठरेल.हेच खरे विनम्र अभिवादन ठरेल. 
शिका !                                                संघटित व्हा !                                      संघर्ष करा !

30 May 2013

स्वराज्याचे शिलेदार - सेनापती संताजी घोरपडे

           संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे (१६८९ ते १६९७) सरसेनापती होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धूरा वाहिली. संताजी घोरपडे हे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत मराठेशाहीत घेतले जाते. या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ (१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा सामना केला,मुघल सैनिकां मध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रंचड दहशत होती. सार्वत्रिकरीत्या मुघल छावण्यांवर हल्ले हे त्यांच्या युद्धनीतीचा भाग होते. अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे औरंगजेबचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसे नंतर धनाजींनी स्वराज्य पसरवण्याचे धोरण अवलंबले. १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यू समयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला होता. शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले. मराठ्यांनी १८ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला. त्यांच्या एका मोहिमेचा हा किस्सा ....... 
           शंभूराजानंतर राजाराम महाराजांनाही आता औरंगजेब वाट मोकळी करत नव्हता त्यामुळे पन्हाळ्या वरूनच राजाराम महाराज राजकारभार पाहत होते. सर्व मराठा मावळ्यांमध्ये एक शल्य होते आणि ते म्हणजे संभाजी महाराजांसाठी काहीच करू शकलो नाही ,मनात ठासून राग भरला होता पण याला पर्याय काय ? कोण घेणार पुढाकार ? कोण राखणार स्वराज्य ? कोण राखणार शिवरायांची शान ? कोण मिळवून देणार मावळ्यांचा आत्मविश्वास ? आणि याचा उद्रेक शेवटी होणार तो झालाच.मराठा सरदारांच्या गुप्त बैठका सुरु झाल्या.. कसे उट्टे काढायचे ? कसा बदला घ्यायचा ? त्या औरंग्याची दात घशात कशी घालायची ? कसे दाखवायचे मराठ्यांचे सळसळते रक्त ? कोण येणार पुढे ? गुप्त सल्लामसलतीमध्ये आघाडीवर होते संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव, सोबतीला संताजींचे दोन बंधू बहिर्जी आणि मालोजी सोबत विठोजी चव्हाण तसेच आणखी काही शूर सेनानी..या गुप्त बैठकीत धाडसी बेत ठरला कि औरंग्याला त्याचाच छावणीत घुसून लज्जित करायचा..त्याचा पाडाव करायचा. त्यात सोन्याहून पिवळी एक गोष्ट म्हणजे शंभूराजांचा बदला तुळापुर येथेच करायचा कारण औरंग्या इथेच होता.. (तुळापुर जिथे संभाजीराजांना मारण्यात आले) चर्चा झाली.. निर्णय ठरला.. धनाजीरावांकडे पाहत संताजी घोरपडे म्हणाले “खानाचा माज तुम्ही जिरवा फलटणला आणि मी खुद्द २००० निवडक मावळ्यान्सोबत औरंग्याला मराठ्यांचा रुद्रावतार दाखवितो, दाखवितो मराठे आजही आहेत.. तुमास्नी आसमंत दाखवायास”या निर्णयावर शिक्कामोर्तब करणे इतके सोपे नव्हते परंतु संताजींनी सर्व मोहीम नियोजनबद्ध आखली, दस्तुरखुद्द संताजींनी एका एका मावळ्याला प्रत्यक्ष भेटून त्याचा जोश वाढविला आणि प्रसंगी संयम राखण्याचा सल्ला दिला.. हळूहळू संताजींची हि तुकडी तुळापुरकडे कूच करू लागली, औरंग्याला त्यावेळी विचारसुद्धा नव्हता कि अशी त्याची वाट मावळे लावतील,भयान अंधारातून पायवाट काढली जाऊ लागली, झाडाझुडपाचा, पालापाचोळ्याचा आणि रातकिड्याचा आवाज कानी घुमू लागला.. तुळापुर जसजस जवळ येत होत तसतस मुघलांची घुबड दिसू लागली.
        रात्रीची भयाण शांतता तुळापुरभोवती पसरलेली होती.. त्यावेळेस काही मराठी लोकांच्या फौजही औरंग्याकडे होत्याच त्यामुळे मुघल सैन्याला वाटले आपलीच माणसे असतील……. आणि नेमका याच गोष्टीचा आणि या अंधाराचा फायदा घेत मावळ्यांची तुकडी थेट औरंग्याच्या छावणीत घुसली,काही कळायच्या आतच मावळ्यांनी “हर हर महादेव” चा जयघोष करत आणि “जय भवानी, जय शिवाजी” या नावाने मोघलांची अक्षरशः कत्तलच सुरु केली शीर धडावेगळे होत होते, कुठे नुसती रक्ताची चिळकांडी दिसून येत होती.औरंग्यासोबत अख्खी त्याची लाखोंची सेना भांबावून गेली होती, या अवस्थेत ते स्वतःच्याच सैन्यासोबत युद्ध करू लागलेबरगडीत मराठ्यांच्या तळपत्या तलवारी घुसून बाहेर पडू लागल्याने तडफडत जीव सोडू लागले.एकच हल्लकल्लोळ सुरु झाला परंतु तरीही संताजींचा एक मनोदय फसला तो म्हणजे औरंग्याला भुईसपाट करायचा अंगरक्षकांनी अक्षरशः पळवूनच नेले त्याला. जेवढे प्रचंड नुकसान करता येईल तेवढे करत करत शेवटी औरंग्याचा तंबुच उखडून टाकला.. औरंग्याचा डेरा भुईसपाट करून त्याचा सुवर्ण कलश निशाणी म्हणून घेऊन संताजींनी मावळ्यांना माघारी फिरण्याचा आदेश दिला.याअगोदर कि औरंग्याची सेना तयार होईल छोट्या छोट्या तुकडीत विभागून संताजींनी मावळ्यांना शेवटी मोहीम सिंहगडाकडे कूच करण्याचा आदेश दिला…. मोहीम फत्ते झाली होती.
रणझुंझार सेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा सलाम........!!!
“ जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे

19 May 2013

स्वराज्याचे शिलेदार - गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक

          स्वराज्य स्थापनेच्या कार्यात श्री शिवरायांच्या पराक्रमी अनुयायांबरोबरच त्यांच्या गुप्तहेर खात्याचा सुद्धा अत्यंत उपयुक्त सहभाग होता. स्वकीय विरोधक व उघड शत्रू यांच्या हालचाली, दूरवरच्या प्रदेशातील परिस्थिती इ. माहिती वेळच्या वेळी मिळण्यावर राजकीय आणि सैनिकी यश अवलंबून आहे हे ओळखून शिवराय गुप्तहेर खात्यावर भरपूर पैसा खर्च करत. शत्रूच्या हालचाली आणि गुप्त कारवाया तसेच शत्रुप्रदेशातील संपन्न शहरे, खजिन्याच्या जागा,हल्ल्यासाठी जाण्याचा आणि परत येण्याचा मार्ग इत्यादी गोष्टींची गुप्तहेरांमार्फत खडानखडा माहिती मिळवून श्री शिवरायांनी अनेक धाडसी हल्ले करून शत्रूंची शहरे लुटली.छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते. या गुप्तहेरांपैकी एक नाव प्रसिद्धीस आले ते म्हणजे बहिर्जी नाईक यांचे. बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवातीपासुन ते महाराजांच्या निधनापर्यंतचा चा साक्षीदार म्हणजेच बहिर्जी नाईक होते.
           दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. महाराजांनी त्यांच्यातील कसब ओळखली, नाईक स्वराज्यनिर्मीतीच्या कामाला हिरा आहेत हे राज्यांनी ओळखेले आणि तात्काळ त्यांना त्या कामात रुजु करुन घेतले. महाराज नेहमी आपल्या माणसांतील गुण ओळखुन त्यांना कामे वाटत असत. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. त्यामुळे राज्यांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजु करुन घेतले.
          बहिर्जी नाईक यांचे गुण सांगायचे ठरले तर अंगात स्फ़ुरण आल्याशिवाय राहणार नाही. नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. फ़किर, वासुदेव, कोळि, भिकारी, संत, अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातुन शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होतं. ह्यातं सर्वात मोठं आश्चर्य हे कि विजापुरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व स्व:त अदिलशहा व बादशहा कडुन ते पक्कि माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच त्यांची बुद्धीमत्ता व चातुर्य दिसुन येतं.
         महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तिन ते चार हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होतं. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापुर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकिची माहिती देणार्यास कडॆलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणुकाही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वार्याचे आवाज असे. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचं. त्याठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत. असं म्हटलं जात कि, महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फ़क्त महराजांनाच ओळखायचे-थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहिच अशी सर्वांची समजुत असायची. ते फ़क्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहिर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहित होते. कुठल्याही घटणेचा ते खुप बारकाईने विचार करी. शत्रुचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रुला चुकिची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रुच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहीती ते ठेवत.
         शिवाजी राजे व शंभु राजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काहि दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पुर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्यात लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले. हा एकच प्रसंग परंतु महारांजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणुन त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफ़जलखानाचा वध, पन्हाळ्यावरुन सुटका, शाईस्ताखाणाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लुट असो प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पुर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रुची इत्यंभुत माहिती महाराजांना दिली होती.बर्याच वेळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्यांचा विचार करुन पाऊल टाके. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्ट मंडळाची निर्मीती केली होती त्यात गुप्तहेर खातं तयार करण्यात आलं होतं. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते.
        राजगडापासून जवळपास ५०० कि.मी. अंतरावर असणारी सुरत हि व्यापारी पेठ लुटण्याचे ठरताच सुरतेची संपूर्ण माहिती, एवढेच नव्हे तर कुठे निश्चितपणे भरपूर धन हाती लागेल अशा सुरतेमधील ठिकाणांची तपशीलवार माहिती आणण्याच्या कामी महाराजांनी बहिर्जी यांना पाठविले. अचूक योजनेसाठी लागणारी अचूक माहिती बहिर्जी नाईकांनी किती कसोशीने मिळविली हे सुरतेची केवळ पाचच दिवसात लुटलेली कोट्यावधींची संपत्ती सांगते. या माहितीसाठी बहिर्जींनी कुठली सोंगे घेतली, गुप्त जागी ठेवलेल्या धनाचा पत्ता कसा लावला हे आजही आपल्यासून गुप्त आहे.१६७९ साली जालानापूर लुटून महाराज येत असताना ती बातमी लागून संगमनेराजवळ मोगली सैन्याने मराठ्यांना गाठून कोंडीत पकडण्याची वेळ आणली होती. या भागातील डोंगरातील गुप्त वाटांची माहिती असणाऱ्या बहिर्जी नाईकांनी महाराजांना लुटीसह सुरक्षितपणे पट्टा उर्फ विश्रामगड या किल्ल्यावर पोहचविले.हेर हे राजाचे डोळे आणि कान असतात हि म्हण सार्थ करणारे बहिर्जी नाईक महाराजांच्या अनेक यशस्वी मोहिमांमागे,धाडसी हल्ल्यांमागे, दूरवरच्या प्रदेशात अचानक जाउन केलेल्या लुटीमागे आणि सुखरूप परत येण्यामागे असणारी कल्पक, चतुर, प्रसंगावधानी आणि हरहुन्नरी व्यक्ती. 
           अश्या ह्या बहिर्जी नाईकांपासुन व त्यांच्या हुशारी पासुन आपण शिकण्यासारखं बरच काहि आहे. हे शक्य झालं नाही तरी नाईकांचे स्वराज्यासाठीचे लाखमोलाचे योगदान विसरु नका.

3 May 2013

इतिहासाच्या फ़ेरलिखाणाची गरज

            काही दिवसांपुर्वी सांगली मध्ये विद्रोही साहित्य आणि सांस्क्रुतीक संमेलन झाले.या साहित्य आणि सांस्क्रुतीक संमेलनात "इतिहासाचे विक्रुतीकरण आणि बहुजनांचे उद्ध्वस्तीकरण" या विषयावर तडाखेबंद परीसंवाद झाला.लेखणी हातात असलेल्या आणी वर्णवर्चस्ववादाच्या भुताने झपाटलेल्या ब्राह्मणी इतिहासकारांनी बहुजनांच्या इतिहासाची,त्यांच्या नायकांची चुकीची मांडणी करून बहुजनांच्या अस्मितेचे जाणीवपुर्वक विक्रुतीकरण केल्याचा सुर विद्रोही साहित्य संमेलनात एका विशेष परीसंवादात उमटला.लोकसाहित्याचा अभ्यास करून इतिहासाच्या फ़ेरमांडणीची गरज व्यक्त करण्यात आली.
बहुजनांच्या इतिहासाचे चुकीचे चित्रण केले जात असल्याची चर्चा होत असलेल्या पार्श्वभुमीवर हा परिसंवाद हा संमेलनाचे एक प्रमुख आकर्षण ठरला होता.ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.अशोक राणा,डॉ. नारायण भोसले, डॉ.राजेंद्र कुंभार यांनी कमालीच्या परखडपणाने आपली मते मांडली.
डॉ.राणा तर म्हणाले ब्राह्मणी वर्णवर्चस्ववादाच्या इतिहास संशोधन लेखनांवर आता केवळ टिका करून चालणार नाही, तर आता अभ्यास करून त्यांनी बहुजनांच्या चुकीच्या मांडलेल्या या इतिहासाची दुरुस्ती करावी लागेल.केवळ ब्राह्मणांना शिव्या घालून चालणार नाही, तर त्यांना रोखणे गरजेचे बनले आहे.भटांच्या ओंजळीतील तीर्थ प्यावेच लागते.त्यांनीच लिहिलेल्या इतिहासातील संदर्भ देऊन आता चालणार नाही.या प्रस्थापितांनी जाणीवपुर्वक संस्क्रुती कोशाची चुकिची रचना करून बहुजनांवर अन्याय केला आहे.मात्र आता नविन कोश तयार करण्याची गरज आहे.रामायण,महाभारत यांची रचना यांनी केली नसल्याचा दावा यावेळी केला.बहुजनांच्या सम्रुद्ध संस्क्रुतीला मोडण्याचा हा डाव मोडून काढण्यासाठी आता बहुजनातील अभ्यासकांनी पुढे येण्याची गरज आहे.
              खोटा इतिहास माथी घेऊनच बहुजनांची वाटचाल सुरु आहे.महाराजा शिवछत्रपतींनी तळागाळातल्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्याची उभारणी केली, पण त्याला लबाड इतिहासकारांनी दोन धर्मातील संघर्षाचे स्वरुप दिले.ब्रिटिश काळापासून विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी इतिहास आणि धर्माचा वापर केला जात आहे.आता देखील तेच सुरु आहे.जातीयवादाच्या इतिहासाला आता महत्व दिले जात आहे, हे चुकीचे आहे.चमचेगिरी करणार्या बखरकारांमुळेच चुकीचा इतिहास मांडला गेला.शिवरायांची सर्वाधिक बदनामी करणार्या बाबासाहेब पुरंदरे यालाच शासन आणि शिवरायांचे वारसदेखील पायघड्या घालून मदत करतात, हे खेदाचे आहे.भाजपचे सरकार मुळेच याला वेग आला आहे.नवीन इतिहासकारांनी बहुजनांचा खरा इतिहास समोर येण्यासाठी प्रचंड अभ्यास करण्याची गरज आहे.
सगळ्यात मोठी खंत म्हणजे बहुजनांचे शत्रु असलेल्यांच्या ताब्यात इतिहास आणि त्याचे पुरावे आहेत.डॉ. नारायण भोसले म्हणाले, लेखणी हातात असणार्यांनीच इतिहासाची चुकिच्या रितीने मांडणी केली आहे. वि.का.राजवाडे यांनी ब्राह्मणी व्यक्तिमत्वांना अडचणीत आणणार्या पुराव्यांना  जाळून टाकले आहे. त्यांनी केवळ  ब्राह्मणांचा गौरव करणारा निवडक इतिहासच निवडला.मुस्लिम राज्यकर्त्यांचे चुकीचे चित्रण करून वर्णवर्चस्ववाद्यांनी समाजात भांडणे लावल्याचा त्यांनी शेवटी आरोप केला.
इतिहासाच्या विक्रुत मांडणीने बहुजन समाजाचे मोठे नुकसान केले गेले आहे.वेदपुराणात ब्राह्मणांनी स्वत:ला देव तर बहुजनांना राक्षस मानल्याची  टीका इतिहास संशोधकांनी केली.आर्य चाणक्य,परशुराम यांचा चुकीचा इतिहास मांडला गेला आहे.महंमद ,अकबर आदी राजांचे चुकीचे चित्रण केले आहे.मुजुमदार,सावरकर यांनी मुघल काळ हिंदुसाठी वाईट ठरवलेला आहे.कुळवाडीभुषण बहुजनप्रतिपालक असलेल्या शिवरायांना सर्वाधिक त्रास देनार्या ब्राह्मणांनीच त्यांना आता गोब्राह्मण प्रतिपालक केले आहे.अफ़जलखान वधाच्या पोस्टरमागे केवळ राजकारण असल्याचा आरोप संशोधकांनी केला.मानवतेच्या सभ्यतेला कलंक असणार्या पेशवाईत विक्रुत सत्ताकारणांचा कळस गाठलेला असताना त्यांचे इतिहासात का चित्रण आले नाही.असाही सवाल बर्याच इतिहास संशोधकांनी केला.
आद्य नाटककार महात्मा फ़ुलेच !
आज विष्णूदास भावे यांची आद्य नाटककार म्हणून करून दिली जात असलेली ओळख हाच सर्वात मोठा बहुजनांच्या इतिहासाचा गळा घोटल्याचा पुरावा आहे.भावे यांनी फ़क्त नाटकातील पदांची रचना केली.महात्मा फ़ुले यांनीच सर्वप्रथम "त्रुतीय रत्न" हे मराठीतील पहिले नाटक लिहिले.पण तसा त्यांचा उल्लेख केला जात नाही, नव्हे तो वर्णवर्चस्ववाद्यांनी करून दिला नाही.राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फ़ुले हेच आद्य नाटककार आहेत.
वक्ते काय बोलले !!
* पेशव्यांचा पराक्रम लिहिणार्या इतिहासकारांनी नानासाहेब पेसव्याने क्षुद्रांना मंदिर प्रवेशाची केलेली बंदी इतिहासात का लिहिली नाही.
* नाना फ़डणीसांच्या भानगडींच्या माहितीचा कागद वि.का.राजवाडे यांनी का जाळून टाकला.
* दुसर्या बाजीरावाच्या काळात विवस्त्र महिलांच्या चालण्याच्या स्पर्धा होत होत्या पण त्यांचा इतिहासात कोठे उल्लेख नाही.
* झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचा दत्तक मुलगा अठरा वर्षाचा असताना पोटाशी लहान मुल बांधुन घोडा चालविणार्या लक्ष्मीबाईची थोरवी गायली जाते.
* ज्यांना ब्राह्मणांकडून सर्वाधिक त्रास सहन करावा लागला, त्या धर्मनिरपेक्ष शिवरायांना गोब्राह्मण प्रतिपालक का व कोणी केले ?
* मानवतेवरील कलंक असणारी पेशवाई येण्यासाठीच रानडे आणि टिळक यांचे लेखन.
* बाबासाहेब पुरंदर्याकडून शिवरायांच्या इतिहासाची विक्रुत मांडणी, तरी देखील सरकार त्यांनाच लाखॊ रुपयांची मदत देते.
* जेम्स लेन ला वर्णवर्चस्ववाद्यांनीच मदत करून शिवछत्रपतींची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.
* रा.चि.ढेरे सर्वाधिक बदमाश असल्याची घाणाघाती टीका यावेळी डॉ.राणा यांनी केली.
[ पण धाकलं पाटील सहमत नाहीत या टीकेला, कारण बाबा पुरंदरेसारखा बदमाश जगात कोठेच सापडायचा नाही ]

11 April 2013

शाहू छत्रपतींचा जातीअंताचा लढा

              राजर्षी शाहू छत्रपती यांच्या काळातील फ़ार गाजलेले वेदोक्त प्रकरण तर समद्यास्नी ठाऊक असेलच.त्या वेदोक्त प्रकरणात थुसिडाईडस या तत्वज्ञानाच्या "आमचे मालक होणे तुमच्या हिताचे असेल पण तुमचे गुलाम बनण्यात आमचे कोणते हित आहे ?" या वचनाची प्रचिती आणि अनुभव शाहू महाराजांना आला.वेदोक्त प्रकरणाचे मुळ हिंदुंच्या वर्णव्यवस्थेच्या आधारीत असणार्या समाजरचनेत शोधावे लागते.हिंदु मध्ये ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य आणि क्षुद्र हे चार वर्ण मानले जात होते पण नंतर त्यातही बदल घडला शुरवीर(?) परशुराम याने प्रुथ्विवरील क्षत्रिय नष्ट केले आणि वैश्य आपोआप नष्ट झाले.त्यामुळे या विश्वात ब्राह्मण आणि क्षुद्र असे दोनच वर्ण शिल्लक राहिले.जे ब्राह्मणेत्तर आहेत त्यांना क्षुद्र समजले जाते.वेदोक्त मंत्रांप्रमाणे आपले धार्मिक संस्कार करून घेता येतील ते फ़क्त ब्राह्मणांना.पण ब्राह्मणेत्तरांना मात्र आपले धार्मिक संस्कार वेदोक्त पद्धतीनुसार करण्याचा अधिकार नव्हता.ब्राह्मणेत्तर आपले धार्मिक संस्कार पुराणोक्त पद्धतीने करू शकत होता.पुरोणोक्त पद्धत म्हणजे जे धार्मिक संस्कार पुराणातील मंत्राच्या आधारे केले जातात व वेदोक्त पद्धत म्हणजे वेदातील मंत्राप्रमाणे केले जातात.वेद हे   अपौरुषेय आहे तर पुराणे ही मानवाने रचलेली आहेत.
          हिंदू धर्मातील चार वर्णात ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ मानण्यात आले होते.म्हणूनच हिंदू समाजरचणेत आपणच सर्वश्रेष्ठ आहोत,इतरांचे गुरुपद आणि नेत्रुत्व ही आमची मिरासदारी राहिली पाहिजे,आमचे वर्तन भ्रष्ट झाले तरी त्यामुळे आमच्या श्रेष्ठ्त्वाला काहीच बाधा येवू शकत नाही अशी आडमुठी भुमिका ब्राह्मण वर्गाकडून मांडली जाऊ लागली.या दर्पोक्तीतच जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ हे त्यांचे ब्रीदवाक्य खरे ठरू पाहत होते.या मिरासदारीच्या दर्पोअक्तीतुनच ब्राह्मणांनी मराठे हे क्षत्रिय नसून क्षुद्र आहेत असे म्हणुन वेदोक्ताचा अधिकार नाकारला.
            शाहू छत्रपतींचा जन्म घाटगे नामक मराठा कुळात झाला असल्याने त्यांना क्षत्रियांच्या वेदोक्त संस्कार पद्धतीने आपले धार्मिक विधी करून घेता येणार नाहीत अशी दुराग्रही भुमिका घेतली.त्यातूनच छत्रपतींचा आश्रित असणार्या नारायण भटाने शाहुंच्या १८९९ सालच्या पंचगंगेतील पवित्र कार्तिक स्नानाच्या वेळी बुरस्या अंगाणे पुराणोक्त मंत्र उच्चारून उद्दामपणे म्हंटले ,धर्मानुसार ब्राह्मण श्रेष्ठ आहेत आणि सर्वशक्तिमान ब्राह्मणवर्ग तुम्हाला क्षत्रिय म्हणून मान्यता देत नाही,तोपर्यंत तुम्ही क्षत्रिय कुळावतंस अशी बिरुदावली जरी मिरवली तरी तुम्ही आमच्यासाठी क्षुद्रच.
या अपमानाचे जहर पचवून उद्याची समाजक्रांती घडविण्यासाठी शाहू छत्रपतींच्या मनात अंतर्यामी कोठेतरी विद्रोहाची एक ठिणगी हळूहळू पेट घेत होती.वेदोक्त वादाची सुरुवात करणारा पंचगंगेच्या काठी घडलेला शाहू छत्रपतींचा अपमान करणारा तो प्रसंग छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील क्रांतिकारक क्षण होता.चेदोक्त वादात सनातनी ब्रह्मव्रुंदांनी त्यांचा अत्यंत मानसिक छळ केला.त्यामुळे हिंदू समाजरचणेत प्रत्येक व्यक्तिचा सामाजिक दर्जा ठरविण्याचा जो ब्राह्मणांना सार्वभौम अधिकार होता,त्या अधिकारालाच आव्हान देऊन ब्राह्मणांचे वर्चस्व कमी करण्याचा जबरदस्त प्रयत्न वेदोक्त वादातून शाहू छत्रपतींनी केला.वेदोक्त प्रकरणाने त्यांना दिव्यद्रुष्टी लाभली.त्यानंतर त्यांनी आपली सत्ता व संपत्ती शुद्रातिशुद्रांच्या कल्याणासाठी उपयोगात आणण्याचे अलौकिक कार्य हाती घेतले.वेदोक्त प्रकरणानंतर शाहू महाराज जातीय विषमता नष्ट करण्याच्या प्रयत्नाला लागले.हिंदू समाजातील वर्णव्यवस्था व सम्रुद्धीचे जीवन जगता यावे म्हणून उच्चवर्णीयांसाठी निर्माण करण्यात आलेली सर्वच क्षेत्रातील १०० टक्के राखीव जागांचीच व्यवस्था होती.जातीय समानता प्रस्थापित करणे म्हणजे जातीसंस्थेच्या अस्तित्वाला सुरुंग लावणे हे समीकरण शाहू राजांच्या मनात पक्के रुजले होते.जातीसंस्था नष्ट करण्यासाठी तथाकथित उच्च जातींनीच जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत असा छत्रपती शाहूंचा ठाम विश्वास होता.जपान देशातील जातीभेदाचा बीमोड होण्याचे कारण उच्च वर्गाच्या सामुराई लोकांनी सुरुवात केली हेच आहे.म्हणुनच जपान आज महासत्ता आहे.
             शाहू महाराज जातीसंस्था नष्ट करण्याच्या द्रुष्टीने अनेक क्रांतिकारक निर्णय घेऊन कटाक्षाने त्यांची प्रत्येक्ष अंमलबजावणी करत होते.त्यांची जातीसंस्था संपविण्याच्या द्रुष्टीकोणातून आंतरजातीय विवाहाचा प्रयोग आपल्याच राजघराण्यात केला.शाहू महाराजांची चुलत भगिनी चंद्रप्रभा व इंदुरचे युवराज यसवंतराव होळकर यांचा मराठा-धनगर या दोन्ही पक्षांनी ठरवलेला सुनियोजित आंतरजातीय विवाह ९ फ़ेब्रुवारी १९२४ रोजी इंदुर मुक्कामी मोठ्या थाटामाटात साजरा झाला.परंतू हा विवाह पाहण्यास शाहू छत्रपती हजर नव्हते कारण ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले होते.डॉ.बाबसाहेब आंबेडकरांनी एका ब्राह्मण महिलेशी आंतरजातीय विवाह करून असाच आदर्श समाजाला घालून दिला आहे.
             "विद्येविना मती गेली,मतीविना नीती गेली" हा महात्मा फ़ुले यांचा आदर्श समोर ठेवून छत्रपती शाहूंनी १९०१ ते १९२२ पर्यंत आपली राजधानी कोल्हापूर शहरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, ख्रिश्चन, महार, सोनार, शिंपी, पांचाळ, ब्राह्मण, प्रभू, वैश्य, ढोर, चांभार, सुतार, इ.विविध धर्माच्या आणि अठरापगड जातींच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक शाळा व  अनेक वसतीग्रुहे सुरु केलीत.अस्प्रुष्यांना त्यांनी शिक्षणाचे दरवाजे खुले केलेत आणि कोरवी,वडार, फ़ासेपारदी यांसारख्या गावकुसाबाहेरील जाती जमातींच्या मुलांना सुद्धा त्यांनी शिक्षणाच्या परिघात आणले.त्यांनी सर्वांना प्राथमिक शिक्षण मोफ़त व सक्तीचे केले.१८३५ साली हंटर कमिशनसमोर महात्मा ज्योतिराव फ़ुले यांनी बहुजन समाजातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण  सक्तीचे करण्याची मागणी केली होती.त्यांनी १८५१ मध्ये महार, मांग, समाजातील मुलांसाठी पुण्यात पहिली भारतीय शाळा काढली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये अनुच्छेद ४५ अन्वये १४ वर्षापर्यंतच्या मुलांना मोफ़त व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद केली आहे.परंतू केंद्र सरकारला सदरहू कायदा करण्यासाठी २००९ साल उजडावे लागले त्यातही चालाखी करण्यात आली.पहिली ते आठवी परिक्षा न घेता विद्यार्थ्यांना सरसकट वरच्या वर्गात ढकलायचे आहे.परीक्षाच नाही तर गुणवत्ता कशी कळणार ? याचा दुष्परिणाम असा होईल की पुढील पिढ्यांच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता आठवी पास आणि नववी नापास अशी राहिल.भारतात आज परकिय इंग्रजांचे सरकार आहे की लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले सांददिय लोकशाही सरकार आहे.संभ्रम निर्माण करणारा हा परिक्षा न घेण्याचा निर्णय आहे.असा निष्कर्ष काढण्यावाचुन पर्याय नाही.
              राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील स्नेहसंबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते.३१ जानेवारी १९२० रोजी डॉ.बाबासाहेब यांनी "मुकनायक" हे पत्रक सुरु केले.त्या व्रुत्तपत्रास छत्रपती शाहूंनी २५०० रुपयांची भरघोस मदत दिली होती.शाहू छत्रपतींनी "मुकनायक" ला आर्थिक मदत देऊन पाठीशी सर्वशक्तीनिशी उभे असतात तर दुसरीकडे टिळकांचा "केसरी" पैसे देऊनसुद्धा अस्प्रुष्यांच्या व्रुत्तपत्राची जहिरात देखील छापण्यास तयार नव्हता, हि बाब लक्षात घेतली पाहिजे.१९०२ पासून १९२० पर्यंत शाहूंनी आपल्या संस्थानात मागासवर्गीयांसाठी राखीव जागा, अस्प्रुष्यांसाठी मोफ़त शिक्षणाची सोय,इत्यादि कार्य केले आहेत.
            ज्या मंडल आयोगामुळे आज ओबीसींना २७ टक्के राखीव जागा मिळाल्या आहेत,त्या ओ.बी.सी.च्या प्रतिनिधित्वाचा प्रस्ताव सर्वप्रथम राष्ट्रपिता ज्योतिराव फ़ुले यांनी आपल्या "शेतकर्याचा आसूड" या ग्रंथात मांडला.तर शाहू छत्रपतींनी अस्प्रुष्यता नष्ट करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून २६ जुलै १९०२ रोजी आपल्या संस्थानातील मागासलेल्या जातींसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्याचा जाहीरनामा काढला.मागासवर्गीय व ओबीसींचा भाग्योदय राष्ट्रपिता फ़ुले,छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या प्रचंड संघर्षाचे फ़लित आहे.हे मान्य करावेच लागेल.टिळकांनी तर "तेल्या तांबोळ्यांना संसदेत जाऊन काय नांगर हाकायचा आहे ? " अशी भुमिका घॆऊन या वर्गाचे हक्क नाकारले होते.असे असूनही ओबीसी या तीन महापुरुषांचे विचार स्विकारत नाहीत, हीच आजची शोकांतिका आहे.
          राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फ़ुले यांचे विचार हीच छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा होती.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तर महात्मा फ़ुलेंना तिसरे गुरु मानले होते.महात्मा फ़ुलेंचा जन्म ११ एप्रिल १८२७ व म्रुत्यू २८ नोव्हेंबर १८९०, छत्रपती शाहुंचा जन्म २६ जुन १८७४ व म्रुत्यू ६ मे १९२२ तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ व म्रुत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी झाला.१८२७ ते १९५६ अशा १२९ वर्षाच्या कालखंडातील या तीन महापुरुषांनी केलेल्या सामाजिक संघर्षामुळे हजारो वर्षे उच्चवर्णीयांच्या जुलमी सत्तेखाली दडपला गेलेला बहिष्क्रुत आणि ओबीसी समाज त्यांच्या सामाजिक व अर्थिक गुलामितून मुक्त झाला.या तीन विभुतींनी या देशाचा सामाजिक,सांस्क्रुतीक व राजकीय इतिहास बदलून टाकला आणि सर्वसामान्य माणसाला भयमुक्त जीवन जगण्याचे स्वातंत्र्य बहाल केले.
             जर फ़ुले-शाहू-आंबेडकर यांचे अनुयायी एकत्र आले तर देशातील जातीव्यवस्था नष्ट होऊन सामाजिक समता प्रस्थापित होण्यास वेळ लागणार नाही.आज मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी मागणी होत आहे.परवाच महामोर्चा निघाला मुंबईमध्ये.कालचे तालेवार जमीनदार मराठे आज अल्पभुधारक आणि भुमिहीन होत आहे.तरीही सुंभ जळाला पण जातीय अहंकाराचा पीळ अजुन कायम आहे.त्यामुळे मराठ्यांनी शाहू राजांना स्विकारले नाही.हे आजचे दाहक वास्तव्य आहे.पण आंबेडकरांच्या अनुयायींनी मात्र फ़ुले आणि शाहू यांना स्विकारले आहे.कारण फ़ुले-शाहू आणि आंबेडकरांचे कार्य परस्परांशी पुरक आहे.म्हणूनच आंबेडकरांच्या अनुयायींनी सर्वा जाती-जमातींना एकत्र जोडण्यासाठी आपल्या चळवळीला फ़ुले-शाहू-आंबेडकर चळवळ अशी सर्वसमावेशक केली आहे.हि चळवळ व्रुद्धिवंत होऊन फ़ुले-शाहू-आंबेडकरांचे जातीविरहीत एकसंघ भारताचे स्वप्न साकार होईल,अशी आशा करूया.राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याला विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी मानाचा मुजरा !...