13 April 2014

इतिहासावरील विषाणू दाखवणारा लेखक

             आपल्या देशाचा इतिहास म्हणजे गुलामगिरीचा इतिहास होय. हिंदुस्तान आणि महाराष्ट्राचा विचार केला तर बाहेरून आलेल्या आर्यांच्या टोळ्यांनी इथल्या मुळ रहिवाशी महारट्ठ यांना जिंकुन इथला मुळ इतिहास मिटवण्याचे काम या टोळ्यांनी केले. राजमाता जिजाऊ, विश्ववंद्य शिवराय यांनी गुलामगिरीचा इतिहास बदलला आणि स्वराज्याची स्थापना केली.नंतर फ़ुले, शाहू, आंबेडकरांनी [यामध्ये केळुस्कर गुरुजी आणि जवळकर यांचेही मोलाचे योगदान आहे.] आपल्या इतिहासात घुसखोरी करणार्या विषाणूंना नष्ट केले व स्वत: इतिहास समोर आणला. परंतू [अजुनही] आपल्या इतिहासात विषाणू लपून बसले आहेत हे विषाणू दाखविण्याचे काम डॉ.बालाजी जाधव हे करीत आहेत.
डॉ.बालाजी जाधव समिक्षक, विचारवंत आणि नव्या पिढीचे लेखक आहे. मराठा सेवा संघाची मराठवाडा विभागाची त्यांच्याकडे जबाबदारी आहे. महाराष्ट्रभर त्यांचे व्याख्यानाचे कार्यक्रम होत असतात. त्यांचे कार्यक्षेत्र मोठे आहे. शिवाय ते उच्चशिक्षित बी. एच. एम. एस डॉक्टर आहेत. सध्या एम. डी. चेही शिक्षण चालू आहे. तरूण वयात अल्पावधीतच त्यांनी हे यश प्राप्त केलं आहे. समाजसेवेचे व्रुत्त घॆऊन ते काम करत आहेत. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी मराठ्यांना संघटीत होण्याचे आवाहन केले आहे. त्यांची घेतलेली ही मुलाखत.
खंरत्नाकर डागळे : आपण लेखक म्हणून परिचीत आहात त्याच बरोबर मराठा सेवा संघाचे कार्य ही चालू आहे. या विचाराकडे आपण कसे वळलात ?
डॉ.जाधव साहेब : तसा मी कट्टर शिवसैनिक होतो. घरातही हिंदुत्ववादी वातावरण. माझ्या घरात बाळासाहेब ठाकरे यांचे फ़ोटो असायचे. सामना या दैनिकातील कात्रणं मी काढून ठेवत. ते आजही माझ्याकडे आहेत.मी कट्टर हिंदुत्ववादी होतो.आज अगदी या विरोधी आहे.
रत्नाकर खंडागळे : मग परिवर्तनवादी विचाराकडे कसे ?
डॉ.जाधव साहेब : मी प्रथम कट्टर हिंदुत्ववादी होतो. मी कुणाचेही काही ऐकत नव्हतो. माझ्या भावांनी मला एकदा प्रश्न केला की, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध का झाला ? या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. त्यांनी दुसरा प्रश्न केला की, तुकाराम महाराज वैकुंठी गेले की त्यांच्या खून झाला ? याही प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. मात्र भावाने असे प्रश्न केल्याने मी मात्र भावावर खवळलोच तेंव्हा भावाने मला आ.ह.साळूंके यांचे विद्रोही तुकाराम, मा.म.देशमुख यांचे रामदास पेशवाई आणि गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचण्यास सांगितले. दुसरा प्रसंग असा घडला की, मी लातुरला १२ वी इंटरशीपला असतांना माझा मित्र भोसले मला मा.म.देशमुख यांच्या केडर कॅंपला घेऊन गेला होता. तेंव्हा मला त्यांचे विचार आवडले आणि डोळ्यावरची हिंदुत्ववादाची झाडप गळून पडली. आपणही समाजासाठी काहीतरी करावं असं ठरवलं. त्यावेळेस मा.म.देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी शिक्षण विचारलं, मी १२ वी इंटरशिपला असल्यामुळे त्यांनी नंतर या तुमचं समाजासाठी काम करण्याचं वय नाही असे सांगितले. ही आपलेपणाची भावना मला पटली कारण असे कोणीही सांगत नाही तेंव्हा पासून मी या चळवळीत कार्य करायचं ठरवलं व त्याप्रमाणे मी कार्य करत आहे.
रत्नाकर खंडागळे : आपण लिखानाकडे कसे वळलात ? 
डॉ.जाधव साहेब : मराठा सेवा संघाचे किर्तन ऐकले व जेम्स लेन हे प्रकरण झालं तेंव्हा अक्षरशा मी रडलो. यावेळेस मी या विषयावर अनेक पुस्तकं वाचली यावरच मी माझ्या शैलीत एक प्रकरण लिहिले या प्रकारे मी लेखनाकडे वळलो. एक द्रुष्टी मिळाली ओळीचा मतिअर्थ समजला.
रत्नाकर खंडागळे : आपले पहिले पुस्तक कोणते ? काही अडचणी आल्या का ?
डॉ.जाधव साहेब : रामदासी पेशवे शिवाजी महाराजांवर शिंतौडे उडवत होते. तेंव्हा मराठा हा झोपलेलाच होता त्यांना जागे करण्यासाठी मराठ्यांनो षंड झालात काय ? हे पहिले पुस्तक लिहिले.अडचण म्हणजे हे पुस्तक छापायला कोणी प्रकाशक तयार नव्हता. मुद्रकही छापायला तयार नव्हता. तेंव्हा नाव न टाकण्याच्या अटीवर एक मुद्रक तयार झाला व मी ही आईच्या नावाने पंचफ़ुला प्रकाशन मार्फ़त पहिले पुस्तक छापले. ह्या पुस्तकाची दोन वर्षात १५००० प्रति विकल्या गेल्या. काही पुस्तके तर आमच्या बौद्ध बांधवांनी स्वत: वाटली.७ हजार पुस्तके जिजाऊ स्रुष्टीवर दोन तासात विकल्या गेली या पुस्तकाच्या सात आव्रुत्या आहेत.
रत्नाकर खंडागळे : आगामी कुठलं पुस्तक येतय ? किती पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.
डॉ.जाधव साहेब : सध्या खेडेकर साहेबांच्या जिजाऊ कहे शिवबासे या पुस्तकाचे अनुवाद चालू आहेत. त्याच वाघ्या कुत्र्यावर ही पुस्तक येतय. माझी पाच पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये मराठ्यांनो षंड झालात काय ?, नाठाळांच्या काठी हानू माथा,ब्राह्मणांना का झोडपू नये, जेम्स लेन पुस्तकातील ब्रह्मराक्षस हे पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
रत्नाकर खंडागळे : शिवधर्माबद्दल थोडं सांगा.
डॉ.जाधव साहेब : शिवधर्म म्हणजे एक जाती अंताची चळवळ आहे. इथला बहुजन समाज अठरा पगड जातीत विभागला आहे.त्यांना स्वत:ची ओळख नाही. त्यांना ओळख देण्याचे काम आम्ही करतो. बौद्ध धर्म आणि शिवधर्माच्या माध्यमातून आम्ही जाती अंताचा लढा लढतोय.
रत्नाकर खंडागळे : मराठा आरक्षणा बाबत काय मत आहे ?
डॉ.जाधव साहेब : मराठा समाज हा शिक्षणापासून दुर आहे.आरक्षण हे बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊसाहेब देशमुख यांनी दिले आहे. सामाजिक,शैक्षणिक आणि मागासलेपण दुर करण्यासाठी दिले आहे. परंतू कुणबी आणि मराठा असा भेद करून ते नाकारले गेले आहे. त्यासाठी आम्ही लढत आहोत. ओबीसी ला आमचा विरोध नाही ते आमचे बंधुच आहेत.वैदिक विरुद्ध अवैदिक असा हा लढा आहे.
रत्नाकर खंडागळे : तरुणांना काय संदेश द्याल ?
डॉ.जाधव साहेब : मराठा तरुणांमध्ये एक दुर्गुण आहे ते एकमेकांच्या जवळ येत नाहीत. जेम्स लेन प्रकरणात ब्राह्मण समाज एक झाला परंतू आमचा मराठा समाज एक होत नाही. त्यांच्या अहंमपणाची भावना आहे.
ही भावना टाकून आज तरुणांनी संघटित व्हावे. आज विचार, देवान-घॆवान करणं महत्वाचं आहे. मोठा भाऊ म्हणून काम करावं तेंव्हा इतिहास सांगण्याचा व शिकवण्याचा अधिकार राहिल.
मुलाखत : रत्नाकर खंडागळे

12 प्रतिक्रिया :

  1. बालाजी जाधव यांचे विक्रमी खपाचे पुस्तक "मराठ्यांनो षंड झालात काय ?" हे पुस्तक मी वाचले आहे त्याची कित्येक प्रती मी मित्रांना भेट म्हणून दिल्या आहेत.खुपच छान आहे त्यांचे लेखन.संभाजी ब्रिगेड मध्ये अनेक चांगले लेखक आहेत त्यामध्ये बालाजी जाधव यांचे नाव अग्रणी घेतले पाहिजे.बालाजी जाधव यांना एवढीच विनंती की त्यांनी लेखक असेच चालू ठेवून इतिहासावरील म्हणा किंवा इतर भटी साहित्यावरील विषाणू काढुन टाकावेत आणि साहित्य स्वच्छ बनवावे.
    जय जिजाऊ जय शिवराय जय मुलनिवासी

    ReplyDelete
  2. आज भटी मेंदुतून बहुजनांना मुक्त करणारी कोणती संघटना असेल तर ती संभाजी ब्रिगेड आणि ती संघटना बालाजी जाधव साहेबांसारख्या लेखकांमुळेच वाढीच जात आहे त्यांच्या कार्याला मनापासून अभिवादन
    जय भवानी जय शिवाजी

    ReplyDelete
  3. भाऊसाहेब केसरकरSunday, 13 April, 2014

    बालाजी जाधव यांच्या पुस्तकाची समिक्षा करनारा लेख लिहिला आहे संजय सोनावणी यांनी वाचकांनी लक्ष द्यावे
    http://sanjaysonawani.blogspot.in/2012/02/blog-post_08.html

    ReplyDelete
  4. भाऊसाहेब केसरकरSunday, 13 April, 2014

    संपूर्ण बहुजन समाजाला एकत्र बांधण्याचे शिवसूत्र महाराष्ट्राला मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड ने दिले. अनेक मराठे जे शिकल्यानंतर समाजाकडे पाठ फिरवतात.. इतिहासाशी त्यांचे काही देणे घेणे नसते अश्या लाखो सुशिकक्षित मराठ्यांना एका सुरात जय जिजाऊ म्हणायला मराठा सेवा संघ व MSS ची शाखा असलेल्या संभाजी ब्रिगेड ने शिकवले.

    ReplyDelete
    Replies
    1. जातीपातीच्या गर्तेत अडकलेल्या मराठा बहुजनांची टाळकी भटी गुलामीतुन मुक्त करुन त्यांना धर्म, राज, शिक्षण, अर्थ, प्रचारप्रसार माध्यमसत्ता मिळवण्यासाठी कार्यक्षम करणारी चळवळ म्हणजे मराठा सेवा संघ.
      जय शिवराय

      Delete
  5. भाऊसाहेब केसरकरSunday, 13 April, 2014

    इतिहासासाठी झटणार्या संभाजी ब्रिगेड च्या सर्व इतिहासकारांना मानाचा मुजरा...
    जाधव सरांचे विक्रमी खपाचे पुस्तक जरुर वाचा..आणि विचार करा
    [im]http://4.bp.blogspot.com/-Vpltia7uBbU/U0qu3kFyr_I/AAAAAAAAABk/ciDPnK6deVQ/s1600/IMG.jpg[/im]

    ReplyDelete
    Replies
    1. संभाजी ब्रिगेड च्या सर्व पुस्तकांपैकी जाधव साहेबांचं हे पुस्तक,ब्राह्मणी इतिहासातील घोडचुका आणि ब्राह्मणी गुलामीची प्रतिके ही पुस्तके छान वाटतात
      जय शिवराय

      Delete
  6. काय राव पाटील तुम्ही सर सकट ब्राह्मणांच्या कत्तली करा असं म्हणणार्या लोकांचे गुनगान गाताय तुमचं पुरोगामित्व ढोंग तर नाही ना.

    ReplyDelete
    Replies
    1. काय राव (हिंदू धर्मातल्या) क्षत्रियांच्या कत्तली करणार्या परशुरामाला पुज्य मानता,बळीराजाला मारणार्या वामनाला देवाचा अवतार मानता हे चालतं का तुम्हाला ?

      Delete
  7. म्हणने आणी करणे यात तरी जमीन आसमानचा फ़रक आहे आणि कोनाचे गुणगान गायचे आणि कोणाचे नाही हे "सरसकट क्षत्रियांच्या कत्तली करण्यांना [परशुरामाला] देव माननार्यांनी शिकवावे" यासारखा मुर्खपणा अजुन काय असेल ?

    ReplyDelete
  8. तथागथ गौतम बुद्धांनी स्थापन केलेला
    "[co="blue"]बुद्ध धम्म[/co]"
    महात्मा फ़ुले यांनी स्थापन केलेला
    "[co="#111"]सत्यधर्म[/co]"
    आणि शिवपुत्र पुरुषोत्तम खेडेकरांनी स्थापन केलेला
    "[co="orange"]शिवधर्म[/co]"
    यात बहुजन बांधवांनी फ़रक करू नये.
    संदर्भ : ब्राह्मणी गुलामीची प्रतिके (भिमपुत्र टेक्सास गायकवाड)

    ReplyDelete
  9. पंचफ़ुला प्रकाशन औरंगाबादला स्थापन होऊन काही वर्ष होतात तोच ब्राह्मण मंडळींनी या प्रकाशनचा प्रचंड धसका घेतला.भयभीत बामनांनी या प्रकाशनवर बंदी व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.तरीपी भटुकड्यांच्या धमक्यांना भीक न घालता जाधव साहेब हे कार्य करत आहेत.
    त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा आणि शिवचरणी प्रार्थणा..

    ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.