20 January 2014

प्राचीन समाज व्यवस्था,संत साहित्य व भारतीय राज्य घटना [१]

        तज्ञांच्या मते अंदाजे दोनशे कोटी वर्षापुर्वी प्रुथ्वीची निर्मिती झाली.डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतानुसार अंदाजे दोन कॊटी वर्षापुर्वी प्रथम जीव जन्माला आला.अंदाजे वीस लक्ष वर्षापुर्वी मानव प्राणी आस्तित्वात आला.प्रुथ्वीच्या निर्मीती पासून आज अखेरचा काळ चार युगांमध्ये विभागला आहे.[१] सत्ययुग/क्रुतयुग-४,३२ लक्षवर्ष,[२] त्रेतायुग-३,३२ लक्षवर्ष.[३] द्वापारयुग-२,३२ लक्षवर्ष व [४] कलीयुग-१,३२ लक्षवर्ष.द्वापार युगारंभी वेदांची निर्मीती झाली.यामध्ये ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद प्रथम लिहिले गेले.कलीयुगारंभी अथर्ववेद लिहिला गेला.यामध्ये एक लक्ष ऋचा प्रुथ्वी निर्मीतीच्या व प्रार्थनेच्या म्हणजे देववर्णनांच्या आहेत.ऐंशी हजार ऋचा यज्ञासंबंधी व चार हजार ऋचा स्रुष्टी ज्ञानाच्या आहेत.सोळा हजार ऋचा भक्ति पर आहेत.त्याकाळी ब्रह्मा,विष्णू व महेश या देवता सर्व मान्य होत्या.नंतर अग्नी व गणेश यांची निर्मीती झाली.या सर्वांमध्ये समाज रचनेचा कोठेही उल्लेख नाही.
        अंदाजे पाच हजार वर्षापुर्वी मनू हा ऋषि होऊन गेला.तो अहंकारी,मुत्सद्दी,ज्ञानी व विद्याव्यासंगी होता.त्याने तत्कालिन परिस्थितीचा सर्वकश विचार करून समाज रचना कशी असावी याची सुसूत्र मांडणी केली.त्यास स्म्रुती असे म्हणतात.मनुस्म्रुती नुसार चार वर्ण असावेत.[१] ब्राह्मण [२] क्षत्रिय [३] वैश्य [४] शुद्र.नंतर कालांतराने निक्रुष्ठ दर्जाची स्वच्छता कामे करणारा शुद्रातिशुद्र वर्ग निर्मान झाला.लोक पुर्व कर्मानुसार पिढ्यानं पिढ्या तीचतीच कामे करू लागला.त्यामुळे ब्राह्मण वर्गाने लेखन,वाचन व मार्गदर्शन केले.क्षत्रियांनी संरक्षण केले.वैश्यांनी व्यापार व उत्पादन केले.शुद्रानी सेवेची कामे केली.अतिशुद्रानी सर्वांच्या स्वच्छतेची निक्रुष्ट कामे केली.
        मनुविचारानुसार माणसाच्या आयुष्याचे चार विभाग झाले.[१]ब्रह्मचर्याश्रम [२] ग्रुहस्थाश्रम [३] वानप्रस्थाश्रम व [४] संन्यासाश्रम,ही व्यवस्था फ़क्त पहिल्या दोन वर्गांना म्हणजे फ़क्त ब्राह्मण व क्षत्रियांना लागू होती.पुढे सत्तासंघर्षामध्ये परशुरामाने एकवीसवेळा प्रुथ्वी नि:क्षत्रिय केली.त्यामुळे समाजात फ़क्त दोनच वर्ण शिल्लक राहिले ते म्हणजे ब्राह्मण व शुद्र त्यामुळे समाजाचे सर्व अधिकार ब्राह्मणांना मिळाले.इतर फ़क्त सांगकामे झाले.ब्राह्मण म्हणतील व सांगतील तोच कायदा व नियम झाला.मनुने  सर्वांचे अधिकार नष्ट केले.स्त्रिया व शुद्रांना कसलेही अधिकार नाहीत.सेवेतच त्यांचे जन्म,जीवन व म्रुत्यू झाले." करा व मरा" हा एकमेव शिक्का त्यांचे कपाळी मारला गेला.तो अंदाजे अकराव्या शतकांपर्यंत.सर्वाधिकार ब्राह्मणांना आहेत.उदा.मनुस्म्रुतीमधील पुढील धर्मादेश पहा.
[१] य:कश्चित्फ़चितधर्मो मनुना परिकीर्तित:।स सर्वो:मिहितो वेदे सर्वज्ञानमयो हि स:॥ (मनुस्म्रुती २/८)
अर्थ : मनुने जे काही सांगितले आहे ते वेद मुलक आहे.मनुस सर्व वेदांचे ज्ञान आहे.कारण मनु स्वयं वेदमुर्ती आहे.
[२] श्रुति स्तु वेदो विज्ञेयो धर्म शास्त्रं तु वै स्म्रुती । ते सर्वाथैष्व मिमांस्थे तांभ्यांम्र धर्मो ही निळैभौ ॥ (मनुस्म्रुती २/१०)
अर्थ : श्रुती म्हणजे वेद व स्म्रुती म्हणजे धर्मशास्त्र.या श्रुती व स्म्रुती विरुद्ध तर्क करून भांडन करू नये.ते चिकित्सेचे विषय नाहीत कारण त्यांच्या पासुनच धर्म तयार झाला आहे.
[३] यो:वमण्येत ते मुल्येहेतुशास्त्राश्रयादद्विज: । ससाधुर्भिषहिष्कार्यो नास्तिको वेद निन्दक ॥ (मनुस्म्रुती २/११)
अर्थ : जो कुतर्काच्या आधारे धर्माचे मुळ श्रुति व स्म्रुतीला प्रमाण न मानता निंदा/चेष्टा करेल तो निंदक म्हणजे पापी होय.तो साधू लोकां (शिष्ट) कडून बहिष्क्रुत केला जावा.
[४] निषेकादिश्मशानान्तो मन्म्रर्यस्योदितो विधी: । तस्य शास्त्रे:धिकारो:स्मिम्झोयो नान्यस्य कस्यचित ॥ (मनुस्म्रुती २/१६)
अर्थ : धर्मशास्त्र श्रुती व स्म्रुती मधील गर्भादान ते अन्त्येष्ठिचे अधिकार / संस्कार फ़क्त ब्राह्मणांना आहेत.अन्य स्त्री शुद्रादिशुद्रांना नाहीत.हे सनातन धर्माचे कटू सत्य आहे.
[५] न शुद्राय मति दद्यान्नोच्छिष्टं न हविष्क्रूतम । न चास्योपदिशेध्दर्म न चास्त्र व्रतमादिषेत ॥ ८० ॥
      यो हयस्य धर्ममाचष्टे यश्चैषादिशति व्रतम । सो संव्रुतं नाम तम: सहतेनैव मज्जति ॥ ८१ ॥
अर्थ : शुद्रास मति (ज्ञान) देऊ नये.कोणताही धर्मोपदेश करू नये.कोणतेही व्रत सांगु नये.जो धर्म सांगतो तो शुद्रासह नरकात बुडतो.(मनुस्म्रुती अ. १०/१२३),१/९१,९/१८,१०/२५,१०/२६.इ.मध्ये असे अनेक श्लोक आहेत की ज्यामध्ये शुद्रांनी फ़क्त ब्राह्मणांची सेवा करावी.लिहु,वाचू नये,अन्यथा ते नरकात जातात.शुद्रांनी फ़क्त उष्टे अन्न खावे.उपास - तपास करू नये.स्त्री शुद्रांना धर्माधिकार नाहीत.विप्राने शुद्राकडून सेवा करून घ्यावी.त्या बदल्यात त्यांना टाकाऊ अन्न व फ़ाटकी वस्त्रे द्यावीत.शुद्रांनी विनातक्रार (अनसुया) तिन्ही वर्गाची सेवा करावी."जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो मानावा श्रेष्ठ","न स्त्री स्वातंत्र्यंअर्हति",ही वेदवाक्य झाली.
यामुळे ब्राह्मणांचे वर्चस्व वाढले.स्त्रीशुद्रादी नगन्य झाले.कसेतरी जगणे त्यांच्या नशिबी आले.परिणामत: शुद्र खचले. स्वातंत्र्य,समानता,बंधुता,संधी,धर्म इ. सर्व हद्दपार झाले.ते अकराव्या शतकापर्यंत.
सन १२७५ मध्ये सर्व स्वातंत्र्य,सदविचार,इ.चे पुनरुज्जिवन झाले.त्याची सुरुवात निव्रुत्तीनाथांपासून झाली.बाराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत निव्रुत्ती महाराज ,ज्ञानदेव महाराज,सोपान,मुक्ताबाई, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आदी संत झाले. त्यांची विद्या,स्वातंत्र्य, बंधुत्व,लेखण,वाचण,भाषण,प्रवचन,भक्ति,समानता इ.ची कवाडे सर्वांना खुली केली.महाराष्ट्रात नवयुग आले.सुर्योदय झाला.मनुनिर्मित अंध:कार नष्ट झाला.सर्वोदय झाला.
महाराष्ट्रात सोलापुर जिल्ह्यात मंगळवेढे आहे.तेथे बाराव्या शतकात बिज्जल नावाचा राजा राज्य करत होता.त्याचे प्रधान बसवेश्वर(११०५ ते ११६५) होते.बसवेश्वरांनी सर्वधर्म परिषद(११५०) बोलाविली."अनुभव मंटप" संस्था सुरु केली.सर्वधर्मसमभाव निर्माण केला.त्यामध्ये काश्मिर ते कन्याकुमारी येथील प्रतिनिधी उपस्थित होते.त्यामध्ये सर्व संतांनी भाग घेतला.त्यांनी शिवधर्माचे सर्व भारतभर प्रसार व प्रचार कार्य केले."अनुभव मंटप" चे सभापती होते संत अल्लमप्रभू ! बसवेश्वर प्रवर्तक होते.त्यामध्ये धानम्मा (जत), अक्कमहादेवी, शिवलिंगव्वा, निलांबिका, लिंगम्मा,लकम्मा,वीरम्मा, सांतव्वा, काळव्वा, कल्याणम्मा आदि स्त्रिया संत होत्या. बसवेश्वर, चन्नबसवेश्वर, सिद्धरामेश्वर(सोलापुर), कक्कय्या(कैकाडी), बोमय्या(ढोर), कन्नया(सोनार), हरळय्या(चांभार), मधुवय्या(चांभार), चन्नय्या(मांग), माचय्या(धोबी), अप्पण्णा(न्हावी) आदि संत होते.या संतांचा कर्नाटकात अति मोठ्या प्रमाणात प्रसार झाला.
ज्ञानदेवांनी भागवत धर्मांचा/परंपरेचा पाया घातला.सातशे श्लोकांच्या गीतेचे मराठीत तत्वज्ञान आणले.यात सोपान मुक्ताई सामील झाले.नामदेवांनी त्याचा विस्तार केला.भारत भ्रमण करून पंजाबी/गुरुमुखी व हिंदी मध्ये अभंग रचना केली.त्यामध्ये सर्व धर्मियांना/जातींना सामावून घेतले. गोरोबा(कुंभार), चोखामेळा.बंका, सोयरा (सर्व महार), सावता (माळी), जनाबाई(दासी),  कान्होपात्रा आदिंना स्थाने दिली. लेखन, वाचन, भजन, पुजन इ.अधिकार दिले.संत तुकोबारायांनी ४५८३ अभंग रचना केली.या संतांनी अंगिकारलेली तत्वे व त्यांचे अभंग पुढील प्रमाणे आहेत.
[१] मनुचे तेहतीस कोटी देव नाकारले व एकच देव मानला.पंढरीचा "विठठल" हे एकमेव दैवत व त्याचे दर्शन म्हणजे सर्वाच्च सुख होय.
सकळ कुळांचा तारकु / तोचि जाणावा पुण्यश्लोकु । पांडुरंगी रंगलानिशंकु । धन्य जन्म तयाचा ॥ - संत ज्ञानेश्वर महाराज
सर्व सुखांचे आगरू । बापरुखत्मादेविवरू ॥ - संत ज्ञानेश्वर महाराज 
विठठल विठठल मंत्र हेचि निजशास्त्र । विचारिता सर्वत्र दुजे नाही ॥ - संत निव्रुत्तीनाथ
नको तु करी सायास । धरी पा विश्वास ॥ एका जनार्दनास डोळा । पाहि ॥ - संत एकनाथ महाराज
बळीया माझा पंढरीराव । जो या देवांचाही देव ॥ - संत तुकाराम महाराज
भागवत धर्मासच वारकरी संप्रदाय म्हणतात.विष्णुभक्तांना वैष्णव म्हणतात.वारकरी संप्रदायात दीक्षा-भिक्षा याचे अवडंबर नाही.

10 प्रतिक्रिया :

  1. बाबासाहेबांनी संत साहित्याचे समिक्षण करूनच घटना स्थापन केली आहे म्हणून समता आणि स्वातंत्र्य लाभले आहे
    सर्व संतांना मानाचा मुजरा....

    ReplyDelete
  2. ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात म्हटले आहे - वेद हे देवाने निर्माण केलेले आहेत, त्यांची चिकित्सा होऊ शकत नाही...
    तुकोबाराय म्हणतात - वेदाचा तो अर्थ, आम्हासी ठावा, इतरांनी वाहवा भार माथ्या मढ्यासारखा..
    नामदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस... ज्ञानदेवाणी नव्हे तर नामदेवांनी वारकरी धर्माचा पाया रचला...
    मी चिकित्सक आहे, आतापर्यंत कित्येक जणांनी वेदांची चिकित्सा केलेली आहे.. म्हणून ज्ञानेश्वराच्या अंधश्रद्धाळू म्हणण्यावर मी विश्वास ठेऊ शकत नाही...

    ReplyDelete
    Replies
    1. ज्ञानेश्वरांनी असंही म्हंटलं अहे
      जरी वेदे बहुत बोलिले । बहुत भेद सुचिले ॥
      तरी हित आपण आपले । तेचि घेपे ॥

      Delete
  3. भुतानां प्राणिन: श्रेष्ठा: प्राणिनां बुद्धि-जीवीन:
    बुद्धीमत्सु नरा: श्रेष्ठा:नरेषु ब्राह्मणा:स्म्रुता:

    म्हणजे : भुतांमध्ये प्राणी श्रेष्ठ । प्राण्यांमध्ये बुद्धीजीवी श्रेष्ठ
    बुद्धीजीवी मध्ये माणुस श्रेष्ठ । माणसांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ

    ReplyDelete
  4. भारद्वाज या ब्राह्मणाने लिहिलेली मनुस्म्रुती "मनु" या क्षत्रियाच्या नावावर खपवली...

    ReplyDelete
  5. राजपुत या सिथ्हियन जमातीमुळे (त्यांच्यात ती प्रथा अपरिहार्यपणे असल्याने) सती प्रथेचे उदात्तीकरण होवू लागले आणि सोयीने ब्राह्मणी संस्क्रुतीने ती नुसती उचलली नाही तर तिचे उदात्तिकरण केले. भारद्वाज या ब्राह्मणाने लिहिलेली मनुस्म्रुती "मनु" या क्षत्रियाच्या नावावर खपवली...अशी अस्म्ख्य उदाहरणे सांगता येतील. सावरकरांचे उदातीकरण हे त्यांच्या योग्यतेपेक्षा अधिक केल्यानेच त्यांच्यावर टीका होते आणि त्यात नथुरामाचे उदात्तीकरण करणे हा सांस्क्रुतिक मुर्खपणाचा कळसच आहे.

    ReplyDelete
  6. मनुस्मृतीच्या तिस-या अध्यायात "ब्राह्मण स्त्रीने स्वजातीतच विवाह करावा" असे म्हटले आहे. इतरत्र केल्यास ते हिणकस असल्याचे सूचित केले आहे. म्हणजे इ. स. २०१० मध्ये एखाद्या ब्राह्मण मुलीने असा एखादा प्रेमविवाह केल्यास तिने सुसंस्कृत परंपरेचा संकेत मोडला असे मानने ठीक होईल काय? सातव्या अध्यायात तर असे म्हटले आहे की राजाने ब्राह्मणांना दान द्यावे व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे "कर" आकारू नयेत. आता चालू युगात ही परंपरा कितपत योग्य मानावी? अध्ययन आणि अध्यापन तर ब्राह्मण जातीनेच करावे, क्षत्रिय व वैश्य यांनी करू नये, तर शूद्रांचा या बाबतीत उल्लेख देखील केलेला नाही. ही कोणत्या प्रकारची परंपरा? हे एक प्रकारचे काही वर्गांवर असह्य असे जोखड नव्हे का?

    ReplyDelete
  7. आता सध्याच्या या युगात जर कुणी म्हटले की "मनुस्मृती" प्रमाणे आचरण करणे गरजेचे आहे, तर आजची युवती पेटून उठेल की नाही? ज्या काळात या परंपरा मागे पडल्या त्यावेळी देखील याच्या योग्यते बाबत बराचसा उहापोह झाला असणारच, विरोधही स्वाभाविकपणे ! तरीही काळाच्या ओघात यातील जोखड स्त्रीने टाकून दिलेच ना? मग ते कोणत्याही समाज सुधारकच्या प्रयत्नाने असो, वा सरकार दरबारी योग्य ते मांडणे झाल्यानंतर अंमलात आले असेल, तो मुद्दा महत्वाचा नाही. महत्वाचे आहे ते हे की, विज्ञान युगाच्या कसोटीवर परंपरेच्या पुस्तिकेतील त्याज्य वाटणारी प्रकरणे समाज धुरंधारणी लोकांनी योग्य त्या कारणासाठी टाकून फेकून दिली आणि त्यामुळेच या देशातील "स्त्री" ही ख-या अर्थाने मोकळा श्वास घेण्यास समर्थ झाली आहे. त्याच अनुषंगाने धर्मातील ज्या अतार्किक तसेच फोलपणा सिद्ध झालेल्या बाबींना "राम राम" म्हणणे म्हणजे परंपरेचा -हास केला असे मानने चुकीचे होईल.

    http://www.misalpav.com/node/12039

    ReplyDelete
  8. बाराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत निव्रुत्ती महाराज ,ज्ञानदेव महाराज,सोपान,मुक्ताबाई,नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आदी संत झाले.त्यांची विद्या,स्वातंत्र्य,बंधुत्व,लेखण,वाचण,भाषण,प्रवचन,भक्ति,समानता इ.ची कवाडे सर्वांना खुली केली.महाराष्ट्रात नवयुग आले.सुर्योदय झाला.मनुनिर्मित अंध:कार नष्ट झाला.सर्वोदय झाला.।।।।

    मी बर्याच पुस्तकात वाचलेले आहे उल्लेख हा ज्ञानेश्वरांपासून तुकोबांपर्यंतच होतो संत म्हणुन..मग रामदासाचं नाव का घेत नाहीत तेच कळत नही..तो काय जातीयवादी होता??

    ReplyDelete
    Replies
    1. रामदासांनी समानतेसाठी कढीचही लिखान केलेले नाही ब्राह्मण उदो उदोच केला आहे नुसता म्हणून ते बाकी संतांच्या मांदियाळीत बसण्यात लायक नाहीत.

      Delete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.