20 January 2014

प्राचीन समाज व्यवस्था,संत साहित्य व भारतीय राज्य घटना [२]

[२] सर्वधर्मसमभाव 
म्हणोनी कुळजाती वर्ण । हे अबघेचि गाअकारण । एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ॥ - ज्ञानदेव (ओ.४५६)
त्या प्रमाणे क्षत्रिय,वैश्य स्त्रिया,पापी,अत्यंत,शुद्र अंगणा,जर मला भजत असतील तर ते माझेच आहेत. - (ओ.४७४)
याती कुळ माझे गेले हरपुनी । श्रीरंगा वाचून आणू नये ॥ - ज्ञानदेव
[३] फ़ड,दिंडी,टाळ,भजन,कीर्तन,हरीकथा,पताका,तुळस,कळस व वारकरी यांच्या प्रती अतूट श्रद्धा बाळगणे आवश्यक
[४] संत वाडमय ही समतेची शिदोरी जगकल्याणासाठी आहे.
[५] ज्ञानमेवाम्रुतम - ज्ञानासारखे पवित्र व श्रेष्ठ दुसरे काही नाही.
[६] साधी भाषा,सोपे नाम,सर्व राव रंक,लहान थोर इ. सर्वांसाठी विठठल देव,पंढरी स्थान राम नाम आहे.
[७] प्रसन्न चित्त,सर्वाभुती नम्रता व कार्य हाच परमेश्वर :
कुलजातीवर्ण हे अवघेचि गाअकारण - ज्ञानेश्वर महाराज
अर्भकाचे साठी । पंथे हाती धरली पाटी ॥ - तुकाराम महाराज
कांदा,मुळा,भाजी । अवघी विठाई माझी - सावता माळी
दळीता कांडिता,तुज गाईन अनंता - जनाबाई
नाचु किर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी - नामदेव महाराज
सकळाचे पायी माझे दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा ॥ - तुकाराम महाराज
[८] भाषा संम्रुद्धी भाषा हेच धन व भाषा हेच शस्त्र
आम्हा घरी धन शब्दांचीच शस्त्रे । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ॥ - तुकाराम महाराज
माझा मराठाची बोल कवतीकें । परि अम्रुतातेही पैजा जिंकें ॥ - ज्ञानेश्वर महाराज
[९] आम्ही ज्ञानी व आम्ही संत
वेदाचातो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथ्या ॥
तुका म्हणे तोची संत । सोसी जगाचे आघात ॥
तेची संत तेची संत ।  ज्यांचा हेत विठठल ॥
[१०] सर्वांचे सहकार्य,शुद्ध भाव व बीज,उत्तम व्यवहार.
एकमेकां सहाय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥
शुद्ध बिजापोटी । फ़ळे रसाळ गोमटी 
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ॥ - तुकाराम महाराज
चोखा डोंगा परी । भाव नोहे डोंगा ॥ - चोखामेळा
[११] जाती धर्माची बंधने नाहीत
वर्ण अभिमाणे कोण झाले पावन । ऐसे द्या सांगून मजपाशी ॥
    अंत्यजादी योनी तरल्या हरी भजने । तयांची पुराणे भार झाली ॥ - तुकाराम महाराज
भेदाभेद अमंगळ । - तुकाराम महाराज
[१२] विश्वबंधुत्व
हे विश्वचि माझे घर । ज्ञानदेव:चोखा माझा जीव । चोखा माझा भाव ॥ -  नामदेव महाराज
जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥ तोचि साधू ओळखावा । देव तेथोचि जाणावा ॥ -                     तुकाराम महाराज
जो जे वांछील तो ते लाहो । प्राणीजात ॥ - ज्ञानेश्वर महाराज
यारे यारे लहान थोर । याती भलत्या नारीनर ॥ - तुकाराम महाराज
उच्च नीच काही नेणे भगवंत । - तुकाराम महाराज
          स्वातंत्र्य,समता,बंधुता,सहकार्य,समुदाय,शुद्धभाव,समान संधी,श्रद्धा,एक ध्येय,एकदेव,विक्रम आणि वैराग्य,भक्ति आणि युक्ती,एकच धर्म-राष्ट्रकार्य,शिस्त व ऐक्य इ.मार्गदर्शक तत्वे आपल्या अभंग - ओव्यातून सांगून,म्लेंच्छांच्या काळात राष्ट्रधर्मा(भागवत धर्मा)ची ध्वजा फ़डकत ठेवली.समाज जाग्रुती केली.समाज ऐक्य टिकवले.इतके सगळे संत साहित्याने घडविले.
                हे सर्व शिवकाळांत झाले.राजा शिवछत्रपतींनी तत्कालीन मातब्बर सरदारांना विचारले.ते सर्व म्हणजे निंबाळकर, घोरपडे, शिर्के, सावंत, मोरे, जाधव, जेधे इ . निजामशाह व आदिशहाचे मांडलिक होते. शिवाजींनी बारा बलुतेदार एकत्र करून त्यांच्यातून सैन्य गोळा केले.त्यांना सरदार ते सेनापती केले.स्वत:स राज्याभिषेक केला व स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली.संतांना मान-सन्मान दिला.छत्रपती संतांपुढे नतमस्तक झाले.
    हुन,चौल,चालुक्य,शालिवाहन,बहामनी,मोघल,तुघलक,पेशवाई व आंग्ल इ.च्या अस्थिर राजकीय अटळ परिस्थितीत व प्रचंड देशी व विदेशी वादळामध्ये भारतीय संस्क्रुती व परंपरा(वारकरी धर्म) म्हणजेच भारतीय समाज संतांनी रुजविलेल्या अत्मिक विचारामुळे व सदाचारामुळे भारतीय समाज एकसंघ राहिला.संत शिकवणीच्या भक्कम पायावरच भारतीय स्वातंत्र्याची चळवळ उभी राहिली.संत साहित्याचे सुमधुरफ़ळ म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य होय.
             पेशवाई मध्ये ब्राह्मण पंतप्रधान(पेशवे) झाले.त्यांनी लेखणी सोडून तलवार हाती घेतली पण ती काही काळच.पेशवाई मध्ये पुजा अर्चा,बेल-फ़ुले यांचे महत्व वाढले.सत्यनारायण पुजा,अघोरी उपाय,जादुटोणा,गंडादोरा यांचे स्तोम माजले.सन १८१८ मध्ये पेशवाई (शुरवीर महारांच्या हाती )संपली.महात्मा जोतिबा फ़ुलेंनी समाज सुधारणा व शिक्षण कार्य चळवळ सुरु केली.इंग्रज राज्यकर्ते झाले.त्यांनी १५० वर्षे राज्य केले.त्यांनी शिस्त आणली,देश एक केला.धर्मात हस्तक्षेप केला नाही.जाती-पाती-धर्म यांनी छिन्न विछिन्न झालेला समाज तसाच अज्ञान अंध:कारात चाचपडत राहिला.विनाधिकार संस्थाने जिवंत राहिली.
       सन १९०१ ते १९४७ या काळात तीन मोठ्या चळवळी झाल्या.महात्मा गांधींची स्वातंत्र्याची चळवळ,कर्मवीर भाऊराव पाटील यांची यांची शैक्षणिक चळवळ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची दलित मुक्ती चळवळ.१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य झाला.सर्वांच्या प्रयत्नांना स्वातंत्र्याचे फ़ळ आले.तत्पुर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकराजा शाहू छत्रपती व बडोदानरेश सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक मदतीने व स्वकष्टाने उच्च आंग्लविभूषित झाले.त्यांनी संत वांडमयाचा संपुर्ण अभ्यास केला.त्याचे बहुजन उद्धाराचे कार्य दि.२५ मे १९४१ रोजी "महार जात पंचायतीची" स्थापना करून सुरु केले.ते दि.६ डिसें.१९५६ रोजी त्यांच्या निर्वानानेच थांबले.या अदभुत कार्याचा गौरव म्हणुन त्यांना दि.१४ एप्रिल १९९० भारतरत्न म्हणून घोषित केले.
१ नोव्हेंबर १९४६ रोजी पंडीत नेहरुंनी इंग्लंडमधील घटना विषारद डॉ.जेन आयर यांना स्वतंत्र भारतासाठी घटना लिहुन देण्यासाठी विनंती केली.डॉ.आयर म्हणाले "आमच्या पेक्षा बुद्धिमान बॅरि.जयकर,बॅरि.सप्रु व डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतात आहेत.त्यांच्या कडून घटना का लिहुन घेत नाही.?" घटना मसुदा समितीमध्ये सात लोकं होती पण काही अडचणींमुळे मसुदा लेखनाची जबाबदारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्याने समर्थपणे पेलली.डॉ.बाबासाहेबांनी अनेक देशांच्या (इंग्लंड,फ़्रांस,अमेरीका,कॅनडा,रशिया इ.) घटनांचा व संतसाहित्याचा सर्वकश तपशीलवार अभ्यास केला.त्यांनी तथागत गौतम बुद्ध,संत कबीर व महात्मा फ़ुले यांना गुरु मानले.त्यांनी देशाला "स्वतंत्र,सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष व लोकसाही" इ.तत्वांचा पाया असलेली घटना दिली.घटनेच्या प्रास्ताविकात घटनेचा सारांश दिला आहे.तो खालील प्रमाणे.
भारतीय संविधान 
प्रास्ताविका :
            आम्ही भारताचे नागरिक,भारताचे एक सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष,लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरीकास : सामाजिक,आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र, दर्जाची व संधीची समानता;निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपुर्वक निर्धार करून,आमच्या संविधान सभेत आज दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगिक्रुत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
           मनुस्म्रुतीने नाकारलेली,सर्व संतांनी अंगिकारलेली,आचरलेली,ओवी-अभंगातून प्रचारलेली व प्रसारित केलेली, न्याय(सामाजिक,आर्थिक,राजकीय), स्वातंत्र (विचार,अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा, उपासना), समानता (दर्जा व संधी), आश्वासन(प्रतिष्ठा, एकता, एकात्मता),  बंधुता (धर्मनिरपेक्ष, सामाजिक, लोकशाहीवादी),  सार्वभौमत्व(देश, लोक व संसद)इ.पायाभुत भक्कम तत्वे व आचरणाची हमी असलेली घटना देशाला मिळालेली आहे.घटनेमध्ये २२ भाग व ३९५ कलमे असून आवश्यकतेनुसार आज अखेर ८५ वेळा त्यामध्ये दुरुस्त्या केलेल्या आहेत.घटनेचा पायाभूत भक्कम ढाचा बदलण्याचा कोणासही अधिकार नाही.स्वातंत्र्य,न्याय,समानता व बंधुता इ.ची शिकवण व तत्वे दिल्याबद्दल आम्ही सर्व अखिल भारतीय संतांचे व सर्वश्रेष्ठ संत सहित्याचे चिरंतर ऋणि आहोत.

******************
प्राचार्य एस.एस.माळी
M.A.,LL.B.,M.B.A.,(USA)
सांगली
संपर्क : ९३७१४९७५९८

4 प्रतिक्रिया :

  1. लेख मस्त आहे खरं तर या प्रबोधनाच्या पायर्या आहेत आणि सर्वात यशस्वी पायरी म्हणजे समानतेचा पुरस्कर्ते संविधान आणि निर्माता.
    जय हिंद

    ReplyDelete
  2. श्रीविठ्ठल हा मुळचा धनगर-कुरुबांचा दैवत प्रतिष्ठा प्राप्त करून बसलेला एक पुरातन पूर्वज. पौंड्र वंशातील म्हणून पौंड्रंक विठ्ठल… ज्याचा कालौघात झाला पांडुरंग विठ्ठल. या पौंड्र लोकांचा आराध्य देव म्हणजे पौंड्रिकेश्वर शिव… आणि पौंड्रांची राजधानी पौंड्रपूरचं कालौघात झालं पंढरपूर. म्हणजे हे स्थान पुरातन कालापासून शैवस्थान होतं. पुराऐतिहासिक धनगर-कुरुबांचं सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र होतं. आजही पुंड्रिकेशचं जे मंदिर आहे ते शिवमंदिरच आहे. धनगर-कुरुबांची वारी शेळ्या-मेंढ्या घेऊन होतच असे… पण तिचं स्वरूप सर्वस्वी वेगळं होतं… हेतुही वेगळे होते.

    ReplyDelete
  3. प्रतिक्रांती हवीच आहे. ब्राह्मणी सम्स्क्रुतीने स्वत:ची वंचना करत करत इतिहासाची असह्य मोडतोड केलेली आहे. बहुजनीय व्यक्तींचे-देवतांचे अपहरण केलेच आहे. ते त्यांनी केले ते फार बुद्धीवंत होते म्हणुन नव्हे तर बहुजन महामुर्ख होते म्हणुन. बुद्धाला विष्णुचा दहावा अवतार घोषित का केला हे तरी या मुर्खांना माहित आहे काय? असुरांच्या मनात संभ्रम निर्माण करून बुद्धाने त्यांना मार्गभ्रष्ट केले म्हणुन बुद्धाला वैदिकांनी हा सन्मान दिला. पण बहुजनीय चलवळवाले आजही महामुर्ख आहेत आणि तात्कालिक यशांनी शेफारुन जात आपल्या अक्कलेचे दिवाळे काढत आहेत. द्वेष आणि फक्त द्वेषाने जागरण होत नसून ते सत्य मांडल्यामुळेच होवू शकते.
    ----संजय सोनवणी

    ReplyDelete
  4. स्त्रीच्या बाबतीत तर अशा प्रकारच्या आज्ञा आहेत की त्या वाचल्यानंतर, त्या मांडणीचा विचार केल्यावर, 'त्या काळात ते ठीक होते' अशा प्रकारचे समर्थन आजची एक ब्राह्मण स्त्री देखील करण्यास धजावणार नाही. १. वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत ब्रह्मचर्य पाळून विद्येची उपासना करावी, हे एकवेळ ठीक मानू या, पण हा अधिकार सर्व जातीच्या स्त्रियांना नाकारलेला होता. २. मुलीचे लग्न वयाच्या ८ व्या (आठव्या) वर्षी झाले पाहिजे (म्हणजे तिचा "पाय" घसरणार नाही....); तर वराचे वय त्यावेळी १८ असायला हरकत नाही. २४ वर्षाच्या युवकाला १२ वर्षाची मुलगी करावी. ३. पुत्राला पुत्र झाल्यानंतर आजोबा आजीनी वानप्रस्थास निघून जावे. ४. सगळ्यात अविश्वसनीय आणि भयावह तरतूद अशी आहे की, नवरा वेडा , व्यसनी, वा नपुंसक असला तरी स्त्रीला घटस्फोट घेण्याचा अधिकार नव्हता. पती मेल्यानंतर दुसरा विवाह करण्याला तिला मुभा नव्हती.
    सतीच्या चालीबाबत लिहायचे म्हणजे आणखीन एक नवा धागा करावा लागेल.

    ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.