2 April 2013

कुळवाडीभूषण छ.शिवाजी महाराज

           आजपर्यंतच्या जागतिक इतिहास तज्ञांच्या मते कोणालाही राजा होण्यासाठी त्यांच्या अलौकिक राजगुणांची आवश्यकता असली पाहिजे.हे अलौकिक राजगुण कोणते ? याबाबत इटालियन जागतिक किर्तिचे तज्ञ "मॅकिल व्हॅली" यांनी अलौकिक राजगुणांची काही तत्वे आजपर्यंत कोणात्याही इतिहासकाराने आक्षेपार्ह मानली नाहीत ती सर्व मान्य ठरतात.
         मॅकिल व्हॅली यांनी ही राजगुणांची तत्वे दोन विभागात मांडली असून ती पुढीलप्रमाणे :
१) न्याय नीती व चारित्र्य : - राजा हा दिसण्यास सर्वसाधारणपणे सुंदर असावा.तो निरोगी व आरोग्य संपन्न असावा.तो हुशार आणि बुद्धिमान असावा.त्यांची नैतिक पातळी उच्च दर्जाची असावी. तो आध्यात्मिक आणि तात्विक ज्ञान संपन्न असावा.तो कर्तव्यदक्ष, नि:स्वार्थी आणि संयमी तसेच जनतेसाठी झटणारा असावा.स्त्रीदाक्षिण्य हा गुणही त्याच्या असावा.
२)इतर गुण :- राजा हा सिंहाप्रमाणे शुर असावा.नीती व अनीतीचा वेळप्रसंगी विचार करणारा असावा.त्याला द्रव्याची अभिलाषा नसावी.तो इतर कोणाच्या धर्मात हस्तक्षेप करणारा नसावा.न्याय व नीती ही तत्वे मुख्य अंग असले पाहिजे.
वरीलप्रमाणे असणार्या राजगुणांचा विचार करता जगातील अत्यंत पराक्रमी ज्येते म्हणजे नेपोलियन,सिकंदर,ज्युलियस,हॉलिबूड रॉबर्ट वगैरे अनेक देशी - विदेशी राजांचा व छत्रपती शिवाजी राजांचा तुलनात्मकद्रुष्ट्या अभ्यास करता शिवाजी राजांच्या नैतिकतेशी हे पराक्रमी राजे बरोबरी करू शकत नाहीत कारण 
* २७ वर्षे घोड्यावरील मांड कधी काढली नाही व आपली तलवार कधी म्यान केली नाही
* मद्याच्या थेंबालाही कधी स्पर्श केला नाही.
* स्त्रियांना मातेसमान मानले,एवढेच नाही तर शत्रुपक्षातील स्त्रियांना साडी चोळी देऊन सत्कार केला व त्यांचे रक्षण केले. 
* शिवरायांनी कधी मद्याची अभिलाषा केली नाही.
* शिवरायांनी इतर धर्मियांना सहिष्णूतेची वागणूक दिली.
* विशेष म्हणजे छ.शिवरायांनी न्याय व नीतीचा योग्य वापर करून रयतेसाठी राज्य निर्माण केले होते.
वरीलप्रमाणे जागतिक इतिहासकारांनी शिवाजी महाराजांचे अलौकिकत्व मान्य करून हा राजा सर्वात श्रेष्ठ आहे असा निष्कर्ष काढला.
             जागतिक इतिहास तज्ञांचे निष्कर्ष लक्षात घेता हे सिद्ध होते की मध्ययुगीन कालखंडात असा एक राजा होऊन गेला की,असा राजा आजतागायत झाला नाही आणि तेथुन पुढेही होणार नाही.असा राजा म्हणजे कुळवाडी भूषण बहुजनप्रतिपालक छ.शिवाजी महाराज.
           छत्रपती शिवरायांच्या सैन्याचे शिवरायांवर एवढे प्रेम होते की महाराज ज्या ठिकाणी पाय ठेवू पाहात तेथे हे मावळे ह्या राजासाठी स्वत:चे बलीदान देण्यास तयार होत असत.याउलट छ.शिवाजी महाराजांना आपला प्रत्येक मावळा म्हणजे लाख मोलाचा हिरा वाटायचा म्हणुन ते म्हणत, मी माझा लाख मोलाचा हिरा असा तसा गमावणार नाही.म्हणून जेंव्हा अफ़जलखान, शाहिस्तेखान,मिर्जा राजा जयसिंग हे प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर चालून आले त्यावेळी महाराजांनी त्यांच्याशी युद्ध करून आपल्या सैन्याची जीवित हानी होण्यापेक्षा  ते स्वत:चा जीव धोक्यात घालून स्वत: शत्रुवर चालून गेले व त्यांचा पराभव केला.यात अफ़जल खानाला तर ठार केलेच. व मिर्जा राजा जयसिंगाबरोबर तहाची बोलणी करून स्वराज्यासाठी स्वत:चा त्याचबरोबर स्वत:च्या कोवळ्य़ा शंभु राजपुत्राचा जीव धोक्यात घालून तह मंजुर करून घॆण्यासाठी ते आग्रा येथे औरंगजेबाकडे गेले.
            जगामध्ये शिवरायांनंतर जे-जे राजे अथवा जगज्जेते होऊन गेले ते स्वत:साठी, संपत्तीसाठी, स्वत:च्या धर्मासाठी व जातीसाठी लढले.शिवरायांचे युद्ध हे मुस्लिम किंवा कोणत्याही धर्माविरुद्ध किंबहुना जातीविरुद्ध नव्हते तर ते परकिय सत्ताधिशांच्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध होते.म्हणूनच अदिलशहाचे पठाणी सैनिक व घोडदळाच्या तुकड्या शिवरायांना मिळाल्या आणी मोघल सत्तेविरोधात लढल्या तसेच छ.शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम सैन्य होते.ते एकनिष्ठपणाने लढले.अठरापगड जातीचे मावळे शिवरायांच्या जीवाला जीव देणारे सैन्य सर्वशक्तिनिशी यश संपादन करत होते.त्यामुळे शिवरायांचा विजय हा ठरलेलाच असायचा.
           छ.शिवरायांनी शेतकर्यांच्या हितासाठी अनमोल असे कार्य केले त्यांच्या काळामध्ये एकाही शेतकर्याने आत्महत्या केल्याचे दिसून येत नाही.मात्र आज शेतकर्यांचे म्हणुन जे स्वत:ला समजतात त्यांच्या राज्यामध्ये इतकेच नसून देशामध्ये लाखॊ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या.खरेच या नेत्यांना छ.शिवाजी महाराजांच्या कार्यकर्त्रुत्वाची जाणीव असती तर जगाचा पोशिंदा असणार्या शेतकर्यांनी कधीच आत्महत्या केल्या नसत्या.पण हेच नेते छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन देशात,शासन व्यवस्था चालवित आहेत.
इतिहासाचा अभ्यास केला असता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक राजगुणांची ठळक वैशिष्ठे पुढील प्रमाणे दिसून येतात.
१) स्वधर्माभिमानी परंतू इतर धर्मीयांशी सहिष्णुतेने वागणारा राजा..
२) संत सज्जनांचा उपासक परंतू दुष्टांचा संहार करणारा राजा..
३) भारतीय सैन्याबरोबर मुस्लिम सैन्य बाळगणारे व त्यांच्या शौर्याची कदर करणारा राजा..
४) वैदिक धर्माच्या देव-देवळांबरोबर मुस्लिमांच्या मशिदी व मकबरे यांचे पण रक्षण करणारा राजा..
५) युद्धाच्या वेळी कुराणाची प्रत सापडल्यास ती आदरपुर्वक मुल्ला - मौल्लवीकडे परत करा,स्त्रियांच्या आब्रुचे,लहान मुलांचे,म्हातार्या माणसांचे रक्षण करा,शरण आलेल्यांना ठार मारू नका अशी सैन्यास ताकिद देणारा राजा..
६) स्वराज्याच्या व रयतेच्या रक्षणासाठी गडकोट व आरमाराची निर्मिती करून त्याद्वारे रयतेला रोजगार निर्मिती करून देणारा राजा..
७) शेतकरी सुखी तर प्रजा सुखी,प्रजा सुखी तर राजा सुखी ही त्रिसुत्री जाणुन शेतकर्यांना सर्वतोपरी मदत करून शेती सुधारणा करणारा व शेतकर्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावु नका अशी सैन्याला सक्त ताकीद देणारा राजा..
८) अठरापगड जातीचे सैन्य पदरी बाळगणारा,बहुजन समाजातील सैन्यांच्या हाती शस्त्र देऊन त्यांच्या क्षत्रिय बनवणारा म्हणजेच जातीयता व भेदभाव नष्ट करणारा राजा..
९) स्त्रियांच्या अब्रुचे रक्षण कराणारा राजा
१०) धर्मातरितांना स्वधर्मात घेऊन धर्म वाढविणारा  राजा...
११) मराठी भाषेचा पुरस्कार करणारा राजा..
१२) शत्रु सैन्याच्या गोटात निशस्त्र जाऊन आपल्या गगनभेदी सिंहगर्जनेने शत्रुची दानादान उडविणारा राजा...
१३) बलाढ्य व शुर अशा मुस्लिम शत्रुला ठार केल्यानंतर सन्मानाने त्याची कबर बांधणारा राजा.
१४) आजपर्यंत जवळ जवळ ६०० राजे होऊन गेलेत असा इतिहास सांगतो पण शत्रुचीही कबर बांधुन म्रुत्युनंतर वैर संपते हा संदेश देणारा राजा..
१५)राज्याभिषेक शककर्ता राजा...
१६) परकीय राम्राज्यशाहीविरुद्ध बंड पुकारून जगात स्वराज्याची पहिली मुहुर्तमेढ रोवून रयतेसाठी राज्य निर्माण करणारा राजा........
             म्हणजेच जगदवंदनीय जगाचा महामानव ठरलेला राजा म्हणजेच विश्ववंद्य छ.शिवाजी महाराज होय आणि म्हणुनच जागतिक इतिहास तज्ञ "अनॉर्ड टायरबन" म्हणतात- " छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांच्या पराक्रमाचा आणी स्म्रुती चा अक्षय ठेवा आम्ही आमच्या डोक्यावर घेऊन आनंदाने नाचलो असतो " 
जय जिजाऊ । जय शिवराय । जयोस्तु मराठा । जय महाराष्ट्र

29 March 2013

॥ राजा शिवछत्रपती ॥

॥ राजा शिवछत्रपती ॥
लेखक : बळवंत मोरेश्वर पुरंदरे
आव्रुत्ती चौदावी, दिनांक : १ एप्रिल २००१
        राजाशिवछत्रपती ग्रंथ पुरंदरे यांनी १ एप्रिल २००१ रोजी प्रसिद्ध केला. त्यांनी महाराष्ट्रातील लोकांना चांगलच एप्रिल फ़ुल बनवलं असं दिसतं. त्यांनी ग्रंथात पान नं.१२५ व १२६ तसेच १८१ व १८२ वर जेम्स लेन सारखेच लेखन केलेले आहे. कदाचित त्यांना असं सुचवायचं आहे की काही शब्द व वाक्य वगळून अर्थबोध असे उतारे करा.

पुरंदरेंच्या ग्रंथातील काही लेखन : पंतांचे शहाजीराजांवर, आईसाहेबांवर, शिवबाबर, भोसले कुटुंबावर असे प्रेम होते की स्वामी आणि सेवक हे नाते उरलेच नव्हते. पंत म्हणजे भोसल्यांच्या कुटुंबातलेच. आजपर्यंतची सारी हयात राजांच्या पदरीच गेलेली होती. ते वयाने सत्तरीच्या दारात उभे होते. शहाजी राजेही त्यांना फ़ार मान देत. राजांच्या घरातले ते मानाचे, धाकाचे, दरार्याचे, मायेचे आणि ममतेचे वडीलधारे पुरूष होते, ते सर्वांवर हक्काने प्रेम करीत.
सतत दोन पिढ्या पंत राजकारणात वावरत असावेत. राजांचा आणि त्यांचा स्वभाव सारखाच होता. स्वतंत्र दौलत स्थापावी असं दोघांनाही वाटले. आईसाहेबांवर ते फ़ार माया करीत. हि बाई अशी तशी नाही, हिची जडण घडण काही वेगळीच आहे; पण त्यांची ती मुळची रग थोडीच जाते, हे त्यांनी ओळखले होते. शिवबांवर तर खुद्द शहाजीराजांचाही नसेल इतका जीव पंताचा होता.
ते अधुनमधुन, कधी कधी स्वत:च्या संसारातही लक्ष घालीत. पंत देशस्थ रुग्वेदी ब्राह्मण. गोत्र ? गोत्र शांडिल्य; पण खरे म्हणजे त्यांचे, आईसाहेबांचे आणि शिवबाचे गोत्र एकच होते. पंत म्हातारे झाले होते; पण त्यांच्या स्वभावातला हौशीपणा कमी झाला नव्हता. मोठा हौशी म्हातारा !. म्हातारपणी हौस करायला मन तरूण असावे लागते.
वरील उतार्यांमध्ये एकही शब्द किंवा वाक्य बाहेरचे नाही. किंवा अनुस्वार मात्रा, उद्गारवाचक चिन्हे, प्रश्नचिन्हे  बाहेरून लावलेली नाहीत. वरील लिखाण पुरंदरेंच्या कादंबरीमध्ये पान नं.१२५ व १२६ वर आहे.

पाने १८१ व १८२ वर पुरंदरे त्यांच्या ग्रंथात लिहितात : एखाच्या शिल्पकाराने देवाची सुंदर मुर्ती घडवावी, प्रसन्न देवपण त्या मुर्तीत उतरावे, ओंजळभर फ़ुले भक्तिभावाने वाहावीत अन असे म्हणावे, त्वमेव माता पिता त्वमेव... त्वमेव सर्व ममदेव देव! ही मुर्ती मी घडवली, मीच हिचा निर्माता आहे, हा अहंकार तेथे रतीभरही न सापडावा. त्यांचा आनंद त्या शिल्पकाराचा होता, शिवरायांची मुर्ती त्यांनी घडवली होती. पण ही मुर्ती मी घडवली, मीच हिचा निर्माता आहे असा अहंकार पंतांच्या मनात कधीही उमटला नाही.
            याआधीच्या जुण्या आव्रुत्ती मध्ये सुद्धा पुरंदरेनी जे अकलेचे तारे तोडले आहेत ते तर कहरच आहेत. हे सर्व करण्यामागे पुरंदरेंच्या मनात काय पाप आहे ते दिसून येते. हळू हळू येईल बाहेर यांनी काय काय दिवे लावलेत ते. बर्याच ठिकाणी पुरंदरेनी घेतलेले मुद्दे अनाकलनीय आहेत. परत मला प्रश्न पडतो की पुरंदरेंना शिवशाहीर का म्हंटलं जातं ? वासरात लंगडी गाय शहाणी असा प्रकार आहे हा. पण आज खर्या इतिहासकारांमुळे पुरंदरेंचे पितळ उघडे पडले आहे हे निश्चित.
            पुरंदरे शिवरायांचा इतिहास सांगत नाही, तर ते दादोजी कोंडदेवचे उदात्तीकरण पडद्यामागून करत आहेत. पुरंदरेनी लेन ला कोणत्या प्रकारची माहीती दिली हे चाबकाचे फ़टके मारून काढून घ्यावेत. या अगोदरच सोलापुरच्या समारंभात त्यांनी जेम्स लेन च्या पुस्तकाचे कौतुक केले होते. पुरंदरेचे वरील उतारे जिजामाता, शिवाजी राजांचे चरित्रहनन करतात. आता पर्यंत साप सोडून जमीन धोपटण्यासारखा प्रकार चालला होता. चोर सोडून संन्याशाला फ़ाशी असा प्रकार चालू होता. मराठी संघटना, मराठा समाज यांच्याविषयी पुरंदरेंच्या मनात असुया आहे. व्यासपिठावर त्याचे खाण्याचे दात व दाखवण्याचे दात निराळेच असतात.

पुरंदरे पान नं.५० व लिहितात : मरायला माणसे मराठ्यांची चांगली. दुसर्यासाठी वक्तशीरपणे मरतात. कडक झुंजतात. अगदी कोंबड्यासारखी जीव खावून! मालकाला यश मिळवून देतात...कुठेही चार दाणे फ़ेकले की तेवढे टिपीट पोट भरतात. त्यांना मालकाने कापून खाल्ले तरी त्यांची तक्रार नसते.
            पुरंदरेने लेनच्या पुस्तकाची स्तुती केलेली आहे. आनंद देशपांडे यानेे सप्टेंबर २००३ च्या दैनिक "सामना" मध्ये लेनच्या पुस्तकाचे कौतुक करताना म्हंटले की लेन चे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणुन ग्रंथालयामध्ये असावे. ब्राह्मण संपादक, वार्तापत्रे यांनी मराठी संघटनांना दोष दिला आहे. जेम्स लेनच्या पुस्तकाला कारणीभुत झालेला पुरंदरे यांनी मात्र तोंड उघडले नाही. ते पाहत आहेत महान नाटक. त्यांचे स्वतःचे नव्हे; महाराष्ट्रातील लोकभावनांचे. चाणक्यनितीचा मनुष्य तो म्हणतो "मी माझ्या ’राजाशिवछत्रपती’ चौदावी आव्रुत्ती या ग्रंथात एवढे लिहुनही त्यांच्या डोक्यात अजुनही कसे शिरले नाही ?" या सर्व सर्व घटनांत पुरंदरे सर्वात पुढे आणि पिलावळ त्याच्या मागून. 
            पुरंदरे लेनची स्तुती करतात, धिक्कारही करतात. बेभरवशाचा माणुस! लोकं म्हणतात त्याला शाहीर. पण मला अजुनही समजलं नाही की पुरंदरेंना शाहीर का म्हणतात. कधिही शाहिरी न गायलेली. पण ब्राह्मण लेखकांनी दिलेला शाहिरीचा डगला मात्र अंगावर घालतात आणि शाहिरीचं ढोंग करून ,शिवरायांचा खोटा इतिहास सांगुण साध्या भोळ्या लोकांना फ़सवतात. मराठ्यांचा खरा इतिहास सांगण्याऐवजी खोटा इतिहास सांगतात.
         आधीच्या काळात होनाजी बाळा, राम जोशी, पट्ठे बापुराव हे शाहीर होते. शाहीर स्वतंत्र असतो. तो बुद्धीचातुर्याने लोकांचे मनोरंजन करतो. पोवाडे, कथानकांचे वर्णन करतो. पुरंदरेंचा रग मुस्लिमद्वेष. जळी, स्थळी, पाषाणी त्यांना मुसलमान दिसतो. मुसलमान राज्यकर्यांविषयी ते राईचा पर्वत करतात. पण खरं तर मुस्लिम सुलतानांनी जेवढे अत्याचार प्रजेवर केले तेवढे  अत्याचार पेशवे काळात प्रजेवर झाले आहेत.
            पुरंदरेचा इतिहास थोडा, कल्पना मात्र भव्य. कल्पनेतच वाचायचं...अहंगडाला गोंजारून, सत्याला बाजुला सारून. पुरंदरेवर सेतूमाधवराव पगडी, शेजवळकर, एम.व्ही.धोंड यांनी कडाडून हल्ला केला आहे. हे सर्व जण म्हणतात की ब्राह्मण शाहिरांनी, कादंबरीकारांनी, कथाकारांनी, नाटककारांनी, सिनेमावाल्यांनी इतिहास नासवला आहे. या सर्वांवर पुरंदरेने कडी केली आहे. 
इतिहासकार, इतिहाससंशोधक, श्रीमंत कोकाटे यांनी पुरंदरेच्या फ़ोटोसहीत एका छोट्याशा पुस्तिकेमध्ये लिहिले आहे की, "बाबा पुरंदरे हाच खरा जेम्स लेन" ते म्हणतात लेन च्या लिखाणासारखेच पुरंदरेंचे लिखान भयानक, वाचवतही नाही. मन,अंत:करण द्रुढ करावे लागते. जसजसे वाचत जावे तसतसे रक्त तापत जाते आणि शेवटी उद्गार बाहेर येतात. "काय हा उलट्या काळजाचा माणुस! याने तर जिजामाता, शिवबांचे पंख लावून कोट्यावदी रुपये मिळवले आणि या अशा माणसाने जिजामातेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवावेत ! "
काही वर्षापुर्वी प्रतिकात्मक "शिवस्रुष्टी" शिवाजी पार्क, मुंबई इथे उभी केली होती. चिपळून तालुक्यातील डेरवण येथे कोल्हापुरच्या वालावलकर धर्मादाय विश्वस्त संस्थेकडून "शिवस्रुष्टी" उभा केली. उद्घाटन सरसंचालक सुदर्शन यांच्या हस्ते झाले. त्यासाठी त्यांना त्यांच्या डोक्यावर पडलेल्या चपलांच्या पावसाचे स्वागत करावे लागले. कारण होते "शिवस्रुष्टी"त रामदास आणि कोंडदेवाची शिल्पे. तेथे जी शिल्पे आहेत तेथे शहाजी राजांची शिल्पे नाहीत.

॥ राजा शिवछत्रपती ॥ पान २

             पुण्यात लालमहालाच्या पश्चिम बाजुला शिवाजी राजे सोन्याच्या नांगराने मशागत करत आहेत आणि शेजारी जिजामाता, शिवबा आणि कोंडदेव यांची शिल्पे दाखवली आहेत. त्या ठिकाणी शहाजी राजेंचे शिल्प नाही. ही शिल्पे महापालिकेची परवानगी न घेता पुरंदरेनी निनाद बेडेकर आणि त्याचा पंत यांच्या साह्याने उभारली आहेत. जेजुरीला शिवाजी राजे - शहाजी राजे भेट होत आहे. अशी शिल्पे आहेत. मतितार्थ हा सांगायचा आहे की, पुण्याहुन शिवाजी राजे, जिजामाता आणि कोंडदेव हे जेजुरीपर्यंत आले आहेत आणि शहाजी महाराज बेंगलोर वरून जेजुरी पर्यंत आले आहेत. जणूकाही पहिल्यांदाच शिवाजी राजे आणि शहाजी महाराजांची भेट होत आहे, हे पुरंदरे यांनी सूचित केले आहे. वरील सर्व ठिकाणी शिल्पे उभारण्याचे कारस्थान पुरंदरेनी केलं आहे. पण, वस्तुस्थिती अशी आहे की, शिवाजी राजे स्वराज्याची स्थापना करत असताना ते शहाजी महाराज आणि जिजामाता यांच्या सहवासात राहिले होते. शहाजी महाराजांनी या दोघांनाही मार्गदर्शन केलेले आहे. (डॉ.जयसिंगराव पवार)
          महाराष्ट्रात पुरंदरेनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर महानाट्याचे अनेक प्रयोग केले. विषेश करून प्रयोगास मराठा सरदार, जहागिरदार, शिवाजी राजांचे वंशज, आमदार, खासदार मंत्री या सर्वांचे सहाय्य घेतले. शिवरायांच्या नावाने ललकार्या दिल्या. प्रयोगाच्या सुरुवातीस उपस्थित असलेल्या थोरामोठ्यांवर स्तुतीसुमने उधळली. त्यांच्यासमोर आपल्या डोक्यातील इतिहास कथन केला. किर्तनकारांप्रमाने अधुनमधुन प्रेक्षकांना वेठीस धरून शिवाजीराजे आणि जिजामातेच्या नावाने घोषना केल्या. श्रोते डोलू लागले. लगेच व्यासपीठावर घोडे येऊन नाचू लागले. असा हा त्यांच्या महानाट्याचा कोट्यावदी रुपये मिळवण्याचा महान प्रयोग आहे.
         पण या प्रयोगातील महत्वाच्या घटनांचे पुरंदरे वर्णन करत नाही. अफ़जलखान वधाचे वर्णन : अफ़जलखान - शिवाजी राजे यांच्या युद्धाचे वर्णन करताना दोन्ही बाजुचे दहा-दहा संरक्षक, सय्यद बंडा, जिवा महाला, संभाजी कावजी, शिवरायांचे चुलते मंबाजी भोसले या सर्वांचे पुरंदरे वर्णन करतात; पण एक गोष्ट लपवतात, ती म्हणजे शिवरायांच्या डोक्यावर हल्ला करणारा अफ़जलखानाचा वकील क्रुष्णा भास्कर कुलकर्णी. ते द्रुष्य पुरंदरे दाखवतच नाही. अशा अनेक सत्य घटना पुरंदरे सांगत नाहीत. पुरंदरे मराठी माणसाला फ़सवत आहेत. तरुणांना त्यांच्या महानाटकांत त्यांनी बळीचा बकरा केले. ते राबराब राबले आणि पुरंदरे यांनी त्यांच्या हातावर चणे, चिरमुरे ठेवले. स्वत: मात्र पैशाला चिकटून बसले. पुरंदरे अनेक राजकीय व्यक्तिंच्या जवळ गेला आणि कार्यभाग पुर्ण झाल्यावर त्यांच्यापासून दुर गेला. आपल्या मधाळ भाषणाने त्यांच्यावर मोहिनी घालून आपलेसे करून त्यांना वापरून फ़ेकून दिले.
            प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचे मोठेपण दाखवले आहे. प्रबोधनकार ठाकरेंचे इंग्रजीत एक वाक्य आहे - Thakare Fried the brain of brahmin. अर्थ : ठाकरेंनी ब्राह्मणांचा मेंदू तळला. उद्वेगाने त्यांना असे का म्हणावे लागले. तर ब्राह्मण लेखकांनी खोटा इतिहास लिहिण्याच्या संदर्भावरून. ब्राह्मणांनी शिवरायांचा खोटा इतिहास लिहिलाच, वर त्यांच्या डोक्यावर कोंडदेव, रामदास हे दोन गुरु बसवले; पण हे दोघेही शिवाजी राजांचे गुरु नव्हते, मार्गदर्शक शिक्षकही नव्हते.
            प्रबोधनकार आपल्या "दगलबाज शिवाजी" मध्ये लिहितात की पुरंदरेचे व मेहेंदळेचे शिवाजीवरील लिखाण पौराणिक दंतकथांवर आहे. शिवाजींची स्वराज्य स्थापना ही परमेश्वराची इच्छा होती आणि त्या स्वराज्य स्थापनेला आकस्मिकरित्या रामदासांचा आशीर्वाद मिळाला. या विचारावर प्रबोधनकार हल्ला करतात. "हे केवळ ब्राह्मण लेखकांचे बिनबुडाचे पोकळ शब्द आहेत" पुढे ते लिहितात, इतिहासकारांचे कर्तव्य म्हणजे त्यांनी राष्ट्रीय महानायकांचे कार्य, त्यांचे शौर्य, त्यांचा देशाभिमान नि देशासाठी दिलेले बलिदान याचा जगात प्रसार केला पाहिजे. पण आमचे इतिहासकार राष्ट्रीय नायकांच्या कथा, पुराणं दंतकथेच्या चौकटीत बसवतात. असले इतिहासकार शिवाजी राजांना परमेश्वाचा अवतार मानतात.
          उत्तम उदाहरण प्रबोधनकार कौसल्याचे देतात, "अयोध्याचा राजा दशरथ यांची पट्टराणी कौसल्या रामाच्या वेळी गर्भवती होत्या आणि त्यांना अनेक प्रकारची स्वप्ने पडत होती", या प्रकारची दोहाळ्यांची स्वप्ने जिजाऊंना शिवबांच्या वेळी पडत होती. असले इतिहासकार छोटासा कुठला तरी धागा पकडून त्यावर कल्पनेचा भव्य राजवाडा बांधतात. त्या राजवाड्याला रुप नसते, निराळा द्रुष्टीकोन नसतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत भावनांचा खरकटवाडा. शक्य, अशक्यतेचा विचार नाही. वातावरणाची आणि त्याच्या निरिक्षणाची द्रुष्टी नाही. मानवी स्वभाव जाणण्याचं ज्ञान नाही.
            सर्वकष पाहता पुरंदरेंची कृत्ये या पलीकडची आहेत. हिंदुत्ववादी संघटनांना काळजी वाटते की, पुरंदरेंच्या मागे इतिहासाचे काय होणार ? महाराष्ट्राला शिवकथा कोण सांगणार ? यांचं आवडीचे साधन, अफ़जलखानाच्या कोथळ्याची पोस्टर्स की जी माजी कै.बाबासाहेब भोसले यांनी शिवून टाकली होती; पण या राजकीय संघटनांना अफ़जलखानाचा कोथळा उसवून, पुन्हा पोस्टर्स तयार करून समाजाला दाखवण्यात रस फ़ार. यामध्ये सर्वच पक्ष सहभागी आहेत.
          जात्यांध पुरंदरे यांनी माता-पुत्र जिजाऊ -शिवाजी राजे यांचे चरित्रहनन केले आहे. हे त्यांच्या "राजा शिवछत्रपती" १४ व्या आव्रुत्ती मध्ये आढळते. द्रुष्य स्वरुपात लालमहालातील शिवबा - जिजाऊ शिल्पे. हे पुरंदरेनी केलेले महापाप दर्शवतात. या कारणास्तव दादोजी कोंडदेवाच्या लालमहालातील शिल्पाबाबत २६ ऑगस्ट २०१० रोजी पुण्यात विराट मोर्चा निघाला. माजी न्यायमुर्ती पी.बी.सावंत व बी.जी.कोळसे पाटील यांच्या नेत्रुत्वाखाली लोकशासन आंदोलनाने कष्टकरी, शेतकरी व वारकर्यांचा मोर्चा महानगरपालिकेवर नेला होता. राज्यभरातील मच्छिमार, कोळीबांधव व आदिवासीही मोर्च्यात सामील होते. शिवप्रेमी संघटेनेचे नेतेही मोर्च्यात सामील होते. महापौर मोहनसिंग राजपाल हे मोर्च्याला सामोरे गेले. चुकिच्या मार्गाने उभारलेला पुतळा २४ तासाच्या आत काढला जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले. नेत्यांची पोटतिडकिने भाषणे झाली. वातावरण शिवमय होऊन जिंकु किंवा मरू असे होते. माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी काही आव्हाने उभी केली, अशी की पुरंदरे डाकू आहे, बाळासाहेब ठाकरे सावरकर यांच्या च्या पुतळ्याला जोडे मारतील का ?, बहुलकराचे समर्थन करणार्या ठकरेलाच काळे फ़ासायला पाहिजे.
            मराठा संघटनेचे नेते श्री मानकर, अरविंद शिंदे आणि इतर नेते म्हणाले : कोंडदेवाचा पुतळा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना ते शिल्प जर लालमहालातून हलविले नाही तर आम्ही तलवारी उपसू ! न्यायमुर्ती कोळसे पाटील म्हणाले : अम्ही मराठा - ब्राह्मण वाद घालत नसून खोटा इतिहास लिहिणार्या अपप्रव्रुत्तीविरुद्ध उमटलेला हा जनतेचा आवाज आहे. मुठभर लोकांनी आपला इतिहास लिहिल्याने खरा इतिहास समोर आलाच नाही. सर्व शिक्षणसम्राट, साखरसम्राट व नेते मराठी आहेत. पण पुतळा हलविण्याची एकाचीही हिंमत झाली नाही.(२६ ऑगस्ट २०१० - पुढारी)
           आतापर्यंत शिवचरित्राचे सिंहावलोकन केल्यानंतर लक्षात येते की, लेखकांचे दोन तट, ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तरांचा. ब्राह्मण लेखकांनी शिवाजी राजांचे अपहरण केले आहे. त्यांच्या पाठीमागून शिवरायांना सोडवण्यासाठी ब्राह्मणेत्तर लेखक धावत आहेत. मराठा नेत्यांनी बगळ्याची भुमिका घेतली. मासा दिसतो आहे पण पकडत नाहीत. मोठा मासा तर त्यांना वाकुल्या दाखवतो आहे; पण नेत्यांनी पाण्यात उभा राहून झोपेचे सोंग घेतले आहे. त्यांना जागे करण्याकरीता हा बडा मासा त्यांच्या ढेंगेतून, मागुन पुढून फ़िरत त्यांच्या वाढदिवसाचे निमंत्रण स्विकारत आहे. प्रश्न अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा असो अगर ऐतिहासिक सत्य - असत्याविषयी असो, त्या बड्या माशाशिवाय या राजकीय नेत्यांचे पान हलत नाही. शाहीर जनतेला अमृत पाजत आहेत की विष, हे राजकीय नेत्यांना समजत नाही. नेत्यांचा काडीचाही संबंध शिवरायांविषयी येत नाही; पण जेथे जेथे शिवपुतळा, तेथे तेथे हजर. त्यांना शिवरायांच्या डोळ्यातून येणारे अश्रू दिसत नाहीत. ते अश्रू सामान्य जनता पाहते आणि पुसण्याचा प्रयत्न करते.

॥ राजा शिवछत्रपती ॥ पान ३

         ब्राह्मण लेखकांनी शिवाजी महाराजांवर पक्षपाती लिखाण केले आहे. ब्राह्मण लेखक स्वत:ला श्रेष्ठ मानतात. बळीराजाचा जसा धर्ममार्तंड वामनाने बळी गेतला. तसा शिवचरित्राचा हे लेखक बळी घेत आहेत. प्रजाहितदक्ष राजा शिवरायांची गणना जगातील चिरंजींवांमध्ये आहे. "मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज"  ग्रंथ गारगोटीचे सुभाष देसाई यांनी लिहिला. या ग्रंथात रयतेच्या कल्याणकारी सम्राटांची पत्रे, साम्राज्यांचे नकाशे व वैभवशाली कालांचे वर्णन आहे. त्यांचा ग्रंथ ज्ञानाचा अनमोल खजीना आहे.
           या प्रुथ्वीतलावर क्षत्रियच उरला नाही, असे धर्ममार्तंड माणतात. त्यांचा हा अहंमगंड त्यांच्याच जातीतील माजी पोलिस प्रताप जोशी(IPS) यांनी खोडून काढला आहे. ते लिहितात : परशुरामाने २१ वेळा क्षत्रियांचा संहार केला हे काल्पनिक आहे. त्रेतायुगातील परशूरामाने कोकण भुमीची स्थापणा केली, ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. ग्रीक लोक व्यापाराच्या निमित्ताने भारताच्या किणार्यावर इ.स.६४३ ते ६५६ या दरम्यान आले. त्यातील काही लोकं कारणास्तव १४ लोकं म्रुत झाले. परशूरामाने त्या १४ लोकांना जीवंत केले व त्याचे स्थानिक स्त्रियांशी लग्न लावून दिले, अशा स्वकल्पनेनेरचलेल्या कथा खोट्या आहेत. अशाच कथा पुरंदरेे  यांनी त्यांच्या ग्रंथात रचलेल्या आहेत.
          आता एक नवीन संशोधन समोर आले आहे. पुण्यातील राम पायगुडे यांचा " परशूराम नव्हे, तर जामदग्न्य राम" अशा शिर्षकाचा प्रदिर्घ लेख इ.स.२००५ च्या "शिवराय" या विशेषकांत प्रसिद्ध झालेला आहे. त्यात जामदग्न्य राम हा क्षत्रिय राजा होता. त्याने २१ वेळा क्षेत्र संहार केला नाही तर २१ इंद्रियांवर ताबा मिळवला होता. परशूराम हा पुरुष जन्माला घालून त्याला ब्राह्मणांनी चिरंजीवित्वही बहाल करण्यात आलं आहे.
               इतिहास संशोधक, इतिहासकार डॉ.जयसिंगराव पवार जेम्स लेनच्या ग्रंथाला शिवचरित्र मानत नाहीत. लेनचा ग्रंथ म्हणजे शिवचरित्राचा अभ्यास आहे. लेन पुर्णत: बखरी, दंतकथा यावर अवलंबून आहे. शिवाजी महाराजांच्या पित्रुत्वाबद्दल कुणी तरी हेतुत: कुचाळकी सांगुण ती ग्रंथात घालण्यास प्रव्रुत्त केले असावे. जो घाणेरडा मजकूर होता, तो विनोद होता असे लेन म्हणतो, लेनला मुळ सुत्रधाराला पाठीशी घालावयाचे आहे.
          डॉ.जयसिंगराव पवार यांनी लेनचे विधान व विचारवंतांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जेम्स लेनच्या ग्रंथावर हल्ला करून त्याच्या विक्रुत विधानांना चव्हाट्यावर आणण्याचे पहिले धाडस साप्ताहिक "चित्रलेखा" चे संपादक श्री ज्ञानेश महाराव यांनी दाखवले. २२ डिसेंबर २००३ च्या "चित्रलेखा" च्या अंकात "विदेशी पुस्तक व देशी मस्तक" या शीर्षकाखाली त्यांची लेनचे विधान प्रसिद्ध करून शिवरायांप्रमाणेच जिजाऊमातेला दैवत मानणार्या काळजाला अस्सल कोब्रा नाग डसावा अशी ही पिचकारी आहे.
           डॉ.जयसिंगराव पवारांनी थोर समाजवादी नेते प्रा.मधू दंडवतेंची प्रतिक्रिया दिली आहे. प्रा.मधू दंडवते यांनी म्हंटले आहे की ऐकिव दंतकथा किंवा कुटाळकीने पसरवलेल्या महान व्यक्तीच्या जीवनाबद्दलच्या अफ़वा हा इतिहासाचा आधार होऊ शकणार नाही, हा संकेत पाळला गेला नाही तर इतिहास लेखणाची विश्वासार्हता संपुष्टात येईल. नागरिकांची सहिष्णुता आणि इतिहासकारांची विश्वासार्हता यांची सांगड हिच इतिहास संशोधनाची खरी आधारशिला होऊ शकते. सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव यांनी म्हंटले आहे की, लेनची विधाने म्हणजे त्याच्या विद्वत्तेची दिवाळखॊरीच होय. विचारवंत व पत्रकार श्री मुकुंदराव किर्लोस्कर यांनी लिहिले आहे की, लेनची विधाने अत्यंत खोडसाळ व हेतुपुर्वक गैरसमज निर्माण करणारी आहेत,विलक्षण चिड यावी अशी आहेत.
            विचारवंत प्रा.सोनाळकरांनी लेनच्या विक्रुत मनोभुमिकेवर हल्ला करताना म्हंटले आहे : लेनसारखी विधाने काही विशिष्ट जातीची मंडळी महाराष्ट्रात खाजगीत करत असतात. त्यामागे वर्णवर्चस्व मनोभुमिका आहे. इतकी थोर, बुद्धिमान, कर्त्रुत्ववान व्यक्ती फ़क्त आमच्याच जातीत जन्माला येवू शकते. बुद्धिमत्तेचा सारा ठेका फ़क्त आमच्याकडेच आहे. महाराष्ट्रातील सगळी कर्त्रुत्ववान माणसे आमच्यात जातीत जन्माला आलेली आहेत, मग हा अपवाद कसा ? कदाचित याचे मुळ आमच्याच जातीत असेल अशी ही घ्रुणास्पद विक्रुत मनोभुमिका आहे.
थोर विचारवंत न्या.बी.जी.कोळसे पाटील म्हणतात की इतका कुचका मेंदू, इतकी नीच मनोव्रुत्ती व विक्रुत प्रव्रुत्ती या देशात विशेषत: पुण्यात का निर्माण होते याचे संशोधन इतिहासकारांनी, मानसशास्त्रज्ञांनी, समाजशात्रज्ञांनीही करण्याची गरज आहे.
          वरील सर्व विचारवंतांचे विचार डॉ.जयसिंगराव पवार यांनी डॉ.वसंतराव मोरे यांच्या "जेम्स लेन संशोधक की विध्वंसक ?" या पुस्तकामध्ये प्रदिर्घ प्रस्तावनेत दिलेले आहे. 
डॉ.जयसिंगराव पवार यांनी आणखी काही विचारवंतांचे विचार दिले आहेत. भांडारकर संस्थेवरील हल्ल्याबाबत मुंबईच्या विदुषी डॉ.वर्षा शिरगावकर लिहितात: आपण एखाच्या व्यक्तीला दैवी पातळीवर बसवतो, तेंव्हा तिच्याबद्दल विश्लेषणाचा आमच्या मनात कधीच विचार येत नाही. त्या व्यक्तीबद्दल कोणी विश्लेषणात्मक काही लिहिले तर आमच्या अभिमानाचा अंगार इतका फ़ुलतो की त्याचा वणवा होतो. अमुक विशिष्ट ऐतिहासिक व्यक्तींबद्दल लिहिणे ही आमचीच मक्तेदारी असून इतरांनी तसा प्रयत्न केल्यास आम्ही पुरावे नष्ट करू, असा दहशतवाद पसरवू की, परत कोणी आमच्या अतीव प्रितीच्या व्यक्तीबद्दल लिहिण्याचे धाडस करणार नाही. ही व्रुत्ती पाशवी व्रुत्तीपेक्षा वेगळी नाही. इतिहास संशोधन ही कोणाची मक्तेदारी नाही (दैनिक.महाराष्ट्र टाईम्स : दि.१६ जानेवारी २००४)
             पत्रकार व विचारवंत श्री प्रकाश बाळ म्हणतात, आपला समाज परंपरागत, पुराणमतवादीच राहिला. राज्यसंस्था मात्र आधुनिक बनत गेली. अशा परिस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याला या परंपरा व पुराणमतवादाच्या मर्यादा पडल्या. जेम्स लेनसारखे रस्त्यावरच्या गोष्टी ऐकूण. लेनची विधाने कागदपत्रांच्या आधारावर केलेली नाहीत. इतिहास लेखनशास्त्राशी तो प्रामाणिक राहिलेला नाही.
७ फ़ेब्रुवारी २००४, NDTV वर Big Fight या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते श्री संजय निरूपम, राष्ट्र्वादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, "लोकसत्ता" चे संपादक कुमार केतकर होते. चर्चेचा विषय : भांडारकर संस्थेवरील हल्ला : कुमार केतकरांची भुमिका : हि पुस्तकबंदी केवळ लोकशाहीविरोधी नव्हे तर संस्क्रुतीविरोधी आहे. अशा मार्गाने जाणारे शेवटी बुद्धाच्या मुर्त्या फ़ोडणारे तालिबानवादीच होणार. भांडारकर संस्थेवरील हल्ला हा केवळ रानटीपणा असून पुस्तकावरील बंदी ही हुकुमशाहीचे निदर्शक आहे. आपण लोकशाहीत राहतो, आम्ही संस्क्रुती, परंपरा व विचारस्वातंत्र्य यांची बुज ठेवली आहे. विचाराला विचाराने, पुस्तकाला पुस्तकाने उत्तर दिले पाहिजे, दगडाने नव्हे !
             पण जिथे विकार आहे, विक्रुती आहे तिथे काय करायाचे ? केतकर म्हणतात : विक्रुत लेखन करणार्या लेखकांची उपेक्षा केली पाहिजे. हे केतकर यांचे बालीश उत्तर आहे. थोर स्त्रिच्या चारित्र्यावर जर तो किंवा इतर कोणी हल्ला करत असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर होत आहे. भांडारवरील हल्ला हा हिंसात्मक, रानटी नाही काय ?
             ब्राह्मणेत्तरांच्या मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांसारख्य़ा संघटना या ब्राह्मणी वर्चस्वाविरोधात सतत दंड थोपटून उभ्या आहेत. या उलट ब्राह्मणवाद्यांचे प्रयत्न गनिमी काव्याचे, भुमिगत स्वरुपाचे आहेत. आज ब्राह्मण - ब्राह्मणेत्तर या दोन समजाच्या सरम्यान संशयाचे व अविश्वासाचे धुके निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात इतिहास संशोधन व लेखन या क्षेत्रात ब्राह्मण आघाडीवर होते. रामदास हा शिवरायांचा गुरु नव्हता, हे ब्राह्मण लेखक प्रा.न.र.फ़ाटक यांनी त्यांच्या पुस्तकार निदर्शनास आणुन दिले आहे.
            भांडारकरवरील मंडळींनी लेनला मदत करणार्यांची नावे पुण्याचे श्री म.अ.मेहंदळे यांनी एका लेखात दिलेली आहे. ही माहिती दैनिक सकाळ दि.३ जुन २००४ मधली आहे.ती नावे अशी आहेत. ग्रंथपाल श्री वा.ल.मंजुळ, डॉ.श्रीकांत बहुलकर आणि सुचेता परांजपे, श्री मंजुळ यांनी लेन ला ग्रंथ उलपब्ध करून दिले. डॉ.बहुलकर याने त्याला "शिवभारत" या संस्क्रुत ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर करण्यात सहाय्य दिले आणि डॉ.परांजपे यांनी त्याला मराठी शिकवले.
संदर्भग्रंथ :
राजा शिवछत्रपती ,आव्रुत्ती १४ वी,२००१.[बाबा पुरंदरे], शिवशाही[प्रा.मा.म. देशमुख], शिवधर्म[प्रा.मा.म. देशमुख], शिवछत्रपती एक मागोवा[डॉ.जयसिंगराव पोवार], मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज[डॉ.सुभाष के.देसाई], जेम्स लेन :संशोधक की विध्वंसक[डॉ.वसंतराव मोरे], ब्राह्मण द्वेष्टा जेम्स लेन[प्रा.विष्णूदास एच.मगदूम], शिवाजी राजेंचे खरे शत्रू कोण ?[प्रा.श्रीमंत कोकाटे], शिवाजी आणि शिवकाळ [सर जदुनाथ सरकार], छ.शिवाजी आणि त्यांची प्रभावळ[सेतु माधवराव पगडी], छ.शिवाजी की साहित्यिक प्रतिमा. कितनी सही, कितनी प्रेरक[डॉ.वसंतराव मोरे], जेम्स लेन च्या पुस्तकावर विद्वानांची मते.,महाराष्ट्रातील वार्तापत्रे आणि विद्वानांची मत

19 March 2013

सनातनी ब्राह्मण आणि पुरोगामी ब्राह्मण एकच..

माझ्या मते सनातनी ब्राह्मण आणी पुरोगामी ब्राह्मण यांच्यात फ़रक करणे मुर्खपणाचे लक्षण आहे.ते दोघे एकच आहेत.ते एकाच शरीराच्या दोन भुजा आहेत आणि एकाला वाचवण्यास त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडा करायला सुद्धा ते कटिबद्ध आणि वचनबद्ध असतात.
- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
आज सतत असे म्हंटले जाते की,सगळे ब्राह्मण वाईट नाहीत.आंतरजालावर तर हा मुद्दा कायमच असतो.थोड्या लोकांमुळे सर्व समाज कसा काय दोषी असू शकतो ?,सगळेच ब्राह्मण वाईट आहेत का ? काही चांगले ब्राह्मण देखील असतात.अगदी बरोबर ! सगळेच ब्राह्मण वाईट नसतात,काही चांगले ब्राह्मण देखील असतात,होते आणि असतील देखील,पण जेंव्हा शिवरायांची बदनामी एखादा ब्राह्मणच करतो तेंव्हा चांगले ब्राह्मण कोठे जावून बसतात कोणाच ठाऊक.जेंव्हा विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी झाली तेंव्हा पुरोगामी -चांगले ब्राह्मण कोठे गेले होते ? शिवरायांच्या बदनामी कटातील  भांडारकर संस्थेवर जेंव्हा संभाजी ब्रिगेड ने कारवाई केली तेंव्हा ब्राह्मणांसह बहुजनांनीदेखील संभाजी ब्रिगेड वर टिका केली.तेंव्हा एक तरी पुरोगामी ब्राह्मण भांडारकरवरील संभाजी ब्रिगेड चा हल्ला निषेधार्ह असेल तर शिवरायांची बदनामी करण्यार्यांचा निषेद करण्यासाठी पुढे का आले नाहीत ? अनेक मराठ्यांनी संभाजी ब्रिगेडचा निषेद केला.तेंव्हा एका तरी पुरोगामी ब्राह्मणाने शिवरायांची बदनामी करणार्या पुरंदरे, बेडेकर, लेन, भांडारकर संस्था यांचा निषेद का केला नाही ? याउलट पुरोगामी ब्राह्मण भांडारकर संस्थेच्या मदतीला धावले. त्यामध्ये डॉ.श्रीराम लागू, कुमार केतकर, डॉ.नरेंद्र दाभोळकर, कुमार सप्तर्षी, अनंत दीक्षित इत्यादी पुरोगामी ब्राह्मण आहेत.डॉ.श्रीराम लागू,कुमार केतकर इत्यादी पुरोगामी ब्राह्मणांनी भांडारकर संस्थेला आर्थिक मदत केली.
लाल महालातील "जिजाऊ - शिवबा" पुतळ्याशेजारील दादू कोंडदेवाचा पुतळा काढण्याचा निर्णय महानगरपालिकेने कायदेशीर बाबी पुर्ण करून घेतला.तेंव्हा पुणे मनपाचे कायदेशीर सल्लागार एड.अभ्यंकर यांनी या बाबीचा निषेद म्हणून राजीनामा दिला.नगरसेवक शाम देशपांडे,उज्वल केसकर,प्रा.मेधा कुलकर्णी, मुक्ता टिळक यांनी दादू कोंडदेवाचा पुतळा काढण्यास विरोध केला.पुतळा काढू नये म्हणुन शिवसेनेच्या आमदार डॉ.निलम गोर्हे या लालमहालाबाहेर तीन दिवस पहारा देत होत्या.आमदार निलम गोर्हे या स्त्रीवादी आहेत.स्त्रियांना हक्क अधिकार मिळावेत यासाठी लढत असतात.स्त्रियांवर कोठे अन्याय झाला तर त्या त्यांच्या मदतीला धावून जातात.पण जेंव्हा जिजाऊंची बदनामी झाली तेंव्हा त्या रस्त्यावर आल्या नाहीत.बदनामी करणार्यांचा निषेद केला नाही.जिजाऊ माता कोणत्या जातीच्या आहेत, कोणत्या धर्माच्या, पंथाच्या आहेत याचा विचार न करता त्या एक स्त्री आहेत.त्या स्त्री ची बदनामी होत असताना स्त्रीवादी नेत्या निलम गोर्हे जिजाऊमातांच्या नव्हे तर दादू कोंडदेवाच्या मदतीला आल्या.दादू कोंडदेवाचा पुतळा काढल्याच्या निषेधार्थ निलम गोर्हे यांनी पुण्यात दंगल घडविण्याचा कट केला.त्याबद्द्ल पुणे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.सांगा ब्राह्मण खरेच चांगले आणि पुरोगामी आहेत का ? स्त्रीभ्रुणहत्या करणारे परळीचे डॉ.सुदाम मुंडे यांच्या निषेधार्थ बीडच्या आ.उषा दराडे आणि सुशीलाताई मोराळे ह्या डॉ.मुंडे यांच्या विरोधात निषेद करण्यासाठी रस्त्यावर आल्या.ही नैतिकता आणि प्रामाणिकता आ.निलम गोर्हे, मेधा पाटकर यांच्याकडे कधी येणार ? स्त्री ची बदनामी करणार्या पुरंदरे आणि बेडेकर यांच्याविरोधात आ.गोर्हे, विद्या बाळ, मेधा पाटकर कधी मोर्चा काढणार आहे का ? यावरून स्पष्ट होते की ब्राह्मण स्त्रिया देखील ब्राह्मणी व्यवस्थेच्या बळी आहेत.जगातील सर्व स्त्रीयांचा आदर सन्मान झाला पाहिजे.शिवरायांनी शत्रुंच्या स्त्रीयांचा देखील आदर केला.त्यांच्या मातेची बदनामी करणार्यांचा निषेद करण्यासाठी एकही पुरोगामी ब्राह्मण किंवा ब्राह्मण स्त्री पुढे आली नाही.दादू कोंडदेव शिवरायांचे गुरु नव्हते असे नगरसेवक रविंद्र माळवदकर पुणे मनपात म्हणाले तेंव्हा नगसेविका मेधा कुलकर्णी ढसाढसा रडल्या असेही आम्हांस ऐकावयास मिळाले.जिजाऊंची  बदनामी झाली तेंव्हा कुलकर्णी रडल्या नाहीत.मराठी साहित्य संमेलनाचे उमेदवार पुरोगामी ब्राह्मण ह.मो.मराठे याने शिवरायांबद्दल गरळ ओकले (शेण खाले इ.स.२०१२) तेंव्हा त्यांच्यावर संभाजी ब्रिगेडने पोलिस कारवाई केली.
यावरूनच स्पष्ट होते की शाहू महाराजांनी जे म्हंटले आहे की ब्राह्मण हा ब्राह्मणच असतो हे खरे आहे.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हंटल्याप्रमाणे पुरोगामी ब्राह्मण निर्णायक क्षणी प्रतिगामी ब्राह्मणांच्या मदतीला धावतो.तो कधीही सत्याच्या, बहुजनांच्या बाजुने उभा राहत नाही.पुरोगामी ब्राह्मणांनी माझा आरोप खोटा ठरावा इतक्या चांगल्या पद्धतीने वागावे ही अपेक्षा.

15 March 2013

पहिले स्वातंत्र्य योद्धा : छत्रपती शिवाजीराजे भोसले

               इंग्रजांच्या विरोधात १८५७ साली झालेल्या उठावाचा भारतीय इतिहासकारांनी "भारतीय स्वातंत्र्याचा श्रीगणेशा" म्हणुन खुपच उदो उदो केला आहे आणि त्या उठावातील काहीजणांचे इतके उदात्तीकरण करण्यात आले आहे की, एका विशिष्ट समाजापलिकडे भारतीय स्वातंत्र्याबाबत कुणालाही जाणीव नव्हती असे वाटू लागले.खारे पाहता प्रत्यक्ष १८५७ उठाव हे भारतीय स्वातंत्र्यासाठी केले बंड होते की धार्मिक भावना दुखावल्याने निर्माण झालेले बंड होते याचा मागोवा घेतला पाहिजे.इतिहासाचा निरपेक्षपणे अभ्यास केला तर स्पष्ट्पणे जाणवते की भारतीय स्वातंत्र्यासाठी पहिला उठाव त्याच दिवशी झाला ज्या दिवशी शिवरायांनी तोरणागड जिंकला आणि भारतीय स्वातंत्र्याचे तोरण बांधले.म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचे तोरण इ.स.१६४६ मध्ये तोरणगड जिंकुणच बांधले गेले."साम्राज्यशाही विरुद्ध बंड उभारुन स्वराज्याची पहिली मुहुर्तमेढ छ.शिवाजी महाराजांनी रोवली. - मार्शल बुल्गानिन (मा.पंतप्रधान- रशीया)"
 शिवरायांच्या इ.स.१६४६ मधील इस्लामी राजवटी विरोधातील उठावास भारतीय स्वातंत्र्याचा पहिला उठाव म्हणुन संबोधावे लागेल.कारण अखेर इस्लामी राजवट ही अभारतीय होती, परकीय होती.भारतात भारतीयांची राजकीय व्यवस्था (सत्ता) अभिप्रेत ठरविल्यास अन्य सर्व राजवटी परकीय ठरतात.परकीय राजवटीतून भारताची व भारतीयांची मुक्तता करण्यासाठी झालेला प्रत्येक प्रयत्न हा भारतीय स्वातंत्र्यासाठीच झालेला प्रयत्न ठरतो.इंग्रज परकीय होते.म्हणूण त्यांच्या विरोधातील उठाव भारतीय स्वातंत्र्यासाठी ठरतो तर मग त्या इंग्रजांच्या आधी आलेले आणि नंतर प्रशासक म्हणून प्रस्थापित झालेले परकीय ठरत नव्हते काय ? परंतू वर्णवर्चस्ववादी इतिहासकारांना छत्रपती शिवरायांना "पहिले भारतीय स्वातंत्र्य योद्धा" ठरवणे अडचणीचे गेले असावे.कारण त्यातून भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या प्रारंभाचे श्रेय मराठ्यांकडे गेले असते.मग काहीही न करता स्वातंत्र्याचे श्रेय लाटता येत नसते.
            छत्रपती शिवरायांनी अभारतीय राजवटी विरोधात तोरणा किल्यावर स्वातंत्र्याचे निशाण फ़डकवले.ही घटना भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या प्रयत्नातील पहिली घटना होय.असे नमुद केल्यावर काहीजन दुखावतील हे निश्चीत त्याबद्दल क्षमस्व !.यावर असा आक्षेप घेतला जाऊ शकतो की त्यावेळी राज्य व राजवटी होत्या.तशी महाराष्ट्रातही मराठी राज्य स्थापन करण्यासाठी ,एक राजवट स्थापन करण्याचा शिवरायांनी प्रयत्न केला.तथापि त्याला सकल भारतीय स्वातंत्र्यासाठी केलेला प्रयत्न कसा म्हणता येईल ? या प्रश्नाचे उत्त्तर अगदीच सोपे आहे.भारतात वेगवेगळी राजे व राजवटी असल्या तरी भारताच्या केंद्र स्थानावरून दिल्लीवरून होणारा कारभार हा अखेर अभारतीय राजवटीखालीच होत होता जिच्या विरोधात शिवरायांचा उठाव होता.शिवरायांचे लक्ष केवळ महाराष्ट्रात मराठा साम्राज्य स्थापन करण्याइतके सीमित नव्हतेच. त्यांच्यावर तसा आरोप करणे कमालीचे संकुचितपणाचे होईल.शिवाय महाराष्ट्राबाहेर जाऊन गुजरात, कर्नाटक, ओरिसा याही प्रदेशावर स्वार्या करतात आणि दिल्लीशहाच्या भेटीला जाण्यात त्यांचा हेतू असाही असू शकतो की उद्या अखील भारतावर करण्याची संधी मिळाली तर दिल्लीवर स्वारी करण्यासाठी ज्या मार्गाने जावयाचे आहे.तो मार्ग आधीच नजरेखालून घातलेला बरा.या उद्देशानेच ते दिल्लीला गेले व आग्र्यावरून सुटका करून घेतल्यानंतर बिहार मार्गे परतले असण्याची शक्यता आहे.
        भारतीयांचे विशेषत: महाराष्ट्रिय जनतेचे दुर्दैव की शिवरायांसारख्या महापुरुषांना दिर्घायुष्य लाभले नाही,स्वजनांचे सहकार्य लाभले नाही.
सर्वधर्म समभाव की धर्मांधता ?
       धार्मिक व राजकीय स्वार्थापुरता विचार करणारे "विचारवंत" छत्रपती शिवरायांच्या सामाजिक उल्लेखाकडे दुर्लक्ष करतानाच शिवरायांच्या धर्मविषयक द्रुष्टीकोनाकडेही अत्यंत पुर्वाग्रहदुषीत व उपेक्षीत द्रुष्टीनेच बघतात.शिवराय सर्वधर्मसमभाव पाळत होते की धर्मांध होते ?.
          यशस्वी राज्यकर्या हा धर्मांध असून चालत नाही,हा संदेशच जणू शिवरायांनी आपल्या चरित्रात दिलेला आहे.शिवरायांच लढा हा इस्लाम धर्म व सर्व सामान्य मुसलमान याच्या विरोधात नव्हताच.त्यांचा लढा स्वराज्यासाठीचा होता.तो इस्लामी राजवटी विरोधात होता.भारतात हिंदू धर्मातील छळाला कंटाळून शुद्र वर्णातील अनेकांनी मध्ययुगीन काळात बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता.भारतामध्ये अनेक संप्रदाय निर्माण होण्याची कारणे ही सुद्धा शुद्र वर्णातील लोकांना मिळणार्या हिनसकतेच्या वागणुकीमध्येच होती.शुद्रांना हिनसकतेमध्ये ठेवण्यासाठी ज्याप्रकारे ज्ञान संपादनाची मनाई करण्यात आली होती,त्याचप्रमाणे कर्मकाडांदी निराधार प्रकारांची निर्मीती करण्यात आली होती.वैशिष्ट्ये म्हणजे साराच प्रकार धर्माच्या नावाखाली चालत होता.अशा धर्मात शिवरायांनी जन्म घेतला होता हे सत्य असले तरी त्या धर्माची धर्मांध भुमिका स्विकारून त्यांनी व्यवहार केल्याचे एकही उदाहरण संपुर्ण शिवचरित्रामध्ये किंवा इतिहासामध्ये शोधून सापडणार नाही.याउलट त्यांची अन्य धर्माबाबतची भुमिका ही आदराची व सर्वधर्मसमभावाचीच आढळते.
          अजुन महत्वाचे म्हणजे शिवकालीन संघर्ष हा हिंदू विरुद्ध मुस्लिम असाही नव्हता.त्यांचे मुळ कारण त्यापुर्वी सुमारे सहाशे वर्षे अगोदर आलेले मुस्लिम हे या मातीशी समरस झालेले होते.सुफ़ी संप्रदायाने तर निखळ मानवतावादाची पेरणी केली होती.जगदगुरु संत तुकाराम महाराजां प्रमाणेच कुळशी येथील मुस्लिम संत बाबा याकुत हे शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थानी होते.काशीनाथ आठल्ये यांनी "महाराष्ट्राचा राजा : छ.शिवरायांचे चरित्र" या पुस्तकाच्या प्रुष्ठ २१९ वर शिवरायांनी गुरुस्थानी मानलेल्या सत्पुरुषांची यादी दिली आहे.त्यात बाबा याकुत केळशीकर या नावाचा उल्लेख आहे.इतकेच नव्हे प्रुष्ठ २२५ वर  बाबा याकुत यांस आपले गुरु केले असे नमुद केले आहे.क्रुष्णराव केळूसकर लिखित शिवचरित्रातही बाबा याकुतांचा उल्लेख आहे.रियासतकार यांच्या "न्यू हिस्ट्री ऑफ़ द महाराज" या ग्रंथातही रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र तीरावर बागकोटच्या खाडीशी असलेल्या केळशी या गांवचे बाबा याकुत असल्याचा उल्लेख आहे.(प्रुष्ठ १३ ) या सर्व बाबीवरून समजून येईल की  शिवराय व त्यांचे पुर्वज यांचे इस्लाम धर्म आणि सर्व सामान्य मुस्लिम यांच्याशी वैर नव्हते आणि स्वातंत्र्याचा उठाव हा इ.स.१८५७ मध्ये नसून इ.स.१६४६ मध्येच झाला आणि भारतीय स्वातंत्र्याचे पहिले योद्धे विश्ववंद्य कुळवाडीभुषण छ्त्रपती शिवाजी महाराज आहेत.
जय जिजाऊ । जय शिवराय । जयोस्तु मराठा । जय महाराष्ट्र