15 March 2013

पहिले स्वातंत्र्य योद्धा : छत्रपती शिवाजीराजे भोसले

               इंग्रजांच्या विरोधात १८५७ साली झालेल्या उठावाचा भारतीय इतिहासकारांनी "भारतीय स्वातंत्र्याचा श्रीगणेशा" म्हणुन खुपच उदो उदो केला आहे आणि त्या उठावातील काहीजणांचे इतके उदात्तीकरण करण्यात आले आहे की, एका विशिष्ट समाजापलिकडे भारतीय स्वातंत्र्याबाबत कुणालाही जाणीव नव्हती असे वाटू लागले.खारे पाहता प्रत्यक्ष १८५७ उठाव हे भारतीय स्वातंत्र्यासाठी केले बंड होते की धार्मिक भावना दुखावल्याने निर्माण झालेले बंड होते याचा मागोवा घेतला पाहिजे.इतिहासाचा निरपेक्षपणे अभ्यास केला तर स्पष्ट्पणे जाणवते की भारतीय स्वातंत्र्यासाठी पहिला उठाव त्याच दिवशी झाला ज्या दिवशी शिवरायांनी तोरणागड जिंकला आणि भारतीय स्वातंत्र्याचे तोरण बांधले.म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचे तोरण इ.स.१६४६ मध्ये तोरणगड जिंकुणच बांधले गेले."साम्राज्यशाही विरुद्ध बंड उभारुन स्वराज्याची पहिली मुहुर्तमेढ छ.शिवाजी महाराजांनी रोवली. - मार्शल बुल्गानिन (मा.पंतप्रधान- रशीया)"
 शिवरायांच्या इ.स.१६४६ मधील इस्लामी राजवटी विरोधातील उठावास भारतीय स्वातंत्र्याचा पहिला उठाव म्हणुन संबोधावे लागेल.कारण अखेर इस्लामी राजवट ही अभारतीय होती, परकीय होती.भारतात भारतीयांची राजकीय व्यवस्था (सत्ता) अभिप्रेत ठरविल्यास अन्य सर्व राजवटी परकीय ठरतात.परकीय राजवटीतून भारताची व भारतीयांची मुक्तता करण्यासाठी झालेला प्रत्येक प्रयत्न हा भारतीय स्वातंत्र्यासाठीच झालेला प्रयत्न ठरतो.इंग्रज परकीय होते.म्हणूण त्यांच्या विरोधातील उठाव भारतीय स्वातंत्र्यासाठी ठरतो तर मग त्या इंग्रजांच्या आधी आलेले आणि नंतर प्रशासक म्हणून प्रस्थापित झालेले परकीय ठरत नव्हते काय ? परंतू वर्णवर्चस्ववादी इतिहासकारांना छत्रपती शिवरायांना "पहिले भारतीय स्वातंत्र्य योद्धा" ठरवणे अडचणीचे गेले असावे.कारण त्यातून भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या प्रारंभाचे श्रेय मराठ्यांकडे गेले असते.मग काहीही न करता स्वातंत्र्याचे श्रेय लाटता येत नसते.
            छत्रपती शिवरायांनी अभारतीय राजवटी विरोधात तोरणा किल्यावर स्वातंत्र्याचे निशाण फ़डकवले.ही घटना भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या प्रयत्नातील पहिली घटना होय.असे नमुद केल्यावर काहीजन दुखावतील हे निश्चीत त्याबद्दल क्षमस्व !.यावर असा आक्षेप घेतला जाऊ शकतो की त्यावेळी राज्य व राजवटी होत्या.तशी महाराष्ट्रातही मराठी राज्य स्थापन करण्यासाठी ,एक राजवट स्थापन करण्याचा शिवरायांनी प्रयत्न केला.तथापि त्याला सकल भारतीय स्वातंत्र्यासाठी केलेला प्रयत्न कसा म्हणता येईल ? या प्रश्नाचे उत्त्तर अगदीच सोपे आहे.भारतात वेगवेगळी राजे व राजवटी असल्या तरी भारताच्या केंद्र स्थानावरून दिल्लीवरून होणारा कारभार हा अखेर अभारतीय राजवटीखालीच होत होता जिच्या विरोधात शिवरायांचा उठाव होता.शिवरायांचे लक्ष केवळ महाराष्ट्रात मराठा साम्राज्य स्थापन करण्याइतके सीमित नव्हतेच. त्यांच्यावर तसा आरोप करणे कमालीचे संकुचितपणाचे होईल.शिवाय महाराष्ट्राबाहेर जाऊन गुजरात, कर्नाटक, ओरिसा याही प्रदेशावर स्वार्या करतात आणि दिल्लीशहाच्या भेटीला जाण्यात त्यांचा हेतू असाही असू शकतो की उद्या अखील भारतावर करण्याची संधी मिळाली तर दिल्लीवर स्वारी करण्यासाठी ज्या मार्गाने जावयाचे आहे.तो मार्ग आधीच नजरेखालून घातलेला बरा.या उद्देशानेच ते दिल्लीला गेले व आग्र्यावरून सुटका करून घेतल्यानंतर बिहार मार्गे परतले असण्याची शक्यता आहे.
        भारतीयांचे विशेषत: महाराष्ट्रिय जनतेचे दुर्दैव की शिवरायांसारख्या महापुरुषांना दिर्घायुष्य लाभले नाही,स्वजनांचे सहकार्य लाभले नाही.
सर्वधर्म समभाव की धर्मांधता ?
       धार्मिक व राजकीय स्वार्थापुरता विचार करणारे "विचारवंत" छत्रपती शिवरायांच्या सामाजिक उल्लेखाकडे दुर्लक्ष करतानाच शिवरायांच्या धर्मविषयक द्रुष्टीकोनाकडेही अत्यंत पुर्वाग्रहदुषीत व उपेक्षीत द्रुष्टीनेच बघतात.शिवराय सर्वधर्मसमभाव पाळत होते की धर्मांध होते ?.
          यशस्वी राज्यकर्या हा धर्मांध असून चालत नाही,हा संदेशच जणू शिवरायांनी आपल्या चरित्रात दिलेला आहे.शिवरायांच लढा हा इस्लाम धर्म व सर्व सामान्य मुसलमान याच्या विरोधात नव्हताच.त्यांचा लढा स्वराज्यासाठीचा होता.तो इस्लामी राजवटी विरोधात होता.भारतात हिंदू धर्मातील छळाला कंटाळून शुद्र वर्णातील अनेकांनी मध्ययुगीन काळात बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता.भारतामध्ये अनेक संप्रदाय निर्माण होण्याची कारणे ही सुद्धा शुद्र वर्णातील लोकांना मिळणार्या हिनसकतेच्या वागणुकीमध्येच होती.शुद्रांना हिनसकतेमध्ये ठेवण्यासाठी ज्याप्रकारे ज्ञान संपादनाची मनाई करण्यात आली होती,त्याचप्रमाणे कर्मकाडांदी निराधार प्रकारांची निर्मीती करण्यात आली होती.वैशिष्ट्ये म्हणजे साराच प्रकार धर्माच्या नावाखाली चालत होता.अशा धर्मात शिवरायांनी जन्म घेतला होता हे सत्य असले तरी त्या धर्माची धर्मांध भुमिका स्विकारून त्यांनी व्यवहार केल्याचे एकही उदाहरण संपुर्ण शिवचरित्रामध्ये किंवा इतिहासामध्ये शोधून सापडणार नाही.याउलट त्यांची अन्य धर्माबाबतची भुमिका ही आदराची व सर्वधर्मसमभावाचीच आढळते.
          अजुन महत्वाचे म्हणजे शिवकालीन संघर्ष हा हिंदू विरुद्ध मुस्लिम असाही नव्हता.त्यांचे मुळ कारण त्यापुर्वी सुमारे सहाशे वर्षे अगोदर आलेले मुस्लिम हे या मातीशी समरस झालेले होते.सुफ़ी संप्रदायाने तर निखळ मानवतावादाची पेरणी केली होती.जगदगुरु संत तुकाराम महाराजां प्रमाणेच कुळशी येथील मुस्लिम संत बाबा याकुत हे शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थानी होते.काशीनाथ आठल्ये यांनी "महाराष्ट्राचा राजा : छ.शिवरायांचे चरित्र" या पुस्तकाच्या प्रुष्ठ २१९ वर शिवरायांनी गुरुस्थानी मानलेल्या सत्पुरुषांची यादी दिली आहे.त्यात बाबा याकुत केळशीकर या नावाचा उल्लेख आहे.इतकेच नव्हे प्रुष्ठ २२५ वर  बाबा याकुत यांस आपले गुरु केले असे नमुद केले आहे.क्रुष्णराव केळूसकर लिखित शिवचरित्रातही बाबा याकुतांचा उल्लेख आहे.रियासतकार यांच्या "न्यू हिस्ट्री ऑफ़ द महाराज" या ग्रंथातही रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र तीरावर बागकोटच्या खाडीशी असलेल्या केळशी या गांवचे बाबा याकुत असल्याचा उल्लेख आहे.(प्रुष्ठ १३ ) या सर्व बाबीवरून समजून येईल की  शिवराय व त्यांचे पुर्वज यांचे इस्लाम धर्म आणि सर्व सामान्य मुस्लिम यांच्याशी वैर नव्हते आणि स्वातंत्र्याचा उठाव हा इ.स.१८५७ मध्ये नसून इ.स.१६४६ मध्येच झाला आणि भारतीय स्वातंत्र्याचे पहिले योद्धे विश्ववंद्य कुळवाडीभुषण छ्त्रपती शिवाजी महाराज आहेत.
जय जिजाऊ । जय शिवराय । जयोस्तु मराठा । जय महाराष्ट्र

9 March 2013

इतिहासातील अनमोल रत्न : बळीराजा

            शेतकर्यांच्या द्रुष्टीकोनातून बळीराजाचा इतिहास नीट समजून घेणे आवश्यक आहे.भारतातील समाजाचा सांस्क्रुतीक, सामाजिक, वगैरे प्रकारचा इतिहास जाणुन घेण्यासाठी प्रस्तुत लेखाचा प्रपंच महात्मा जोतिराव फ़ुले यांनी दस्युचा पोवाडा लिहिला आहे.त्यांच्या तिसर्या कडव्याची सुरुवात "बळी राजादि कुळ स्वामीला" या शब्दांनी केलेली आहे.याचाच अर्थ बळीराजाला ते आपल्या अत्यंत आदरणीय पुर्वज मानतात.बळी ! एक लोक कल्याणकारी राजा,मानवतावादाचा महान पुजारी,दानशूर,विश्वबंधुत्वाचे आचरण करणारा भारताच्या इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व.सुमारे साडेतीन हजार वर्षापुर्वी होऊन गेलेला बहुजन समाजाचा एक महासम्राट बळीराजा.ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावले,पण तत्वांशी तडजोड केली नाही.आपल्या जीवात जीव असे पर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिला.बहुजन समाजावर कोणतेही अत्याचार होऊ दिले नाहीत.पण आपण मात्र धन्य की आपण आपल्याच डोळ्यादेखत आपल्याच राजाचा अपमान सहन करत आलो आणि सहन करत आहोतच. आपण आज खॊट्या नाट्या पुराण कथांना बळी पडलो आहोत.स्वत:चे डोके कधी वापरतच नाही.आपण आपल्या राजासाठी कायमची ह्रुदये बंद करून टाकलीत.
बळीराजाच्या काळात शेतकरी अतिशय सुखी व संपन्न होता.आपल्याकडे सुपीक शेतीमध्ये सर्व जनतेला ज्ञान होते.शेतकर्यांना सर्व ज्ञान असल्यामुळेच त्यांची शेती सम्रुद्ध होती.प्रजा सुखी,समाधानी व कर्तबगार होती.कुठलाच अधर्म नव्हता.शोषण विरहीत समाजरचना हे बळीराजाचे खास वैशिष्ट होते.स्त्री-पुरुष आपापल्या कुवतीनुसार आणि कौशल्यानुसार राज्याच्या सर्वच वैभवात भर टाकत असे.अत्यंत सुरेख आणि सम्रुद्ध अशी नगरे सुमारे साडेतीन हजार वर्षापुर्वी वसवली होती.दस्युचे स्वत:ची सम्रुद्ध नगरे होती.याचा अर्थ त्यांचे जीवन अत्यंत सम्रुद्ध आणि संपन्न व विकसित होते.असं हे सुखी व सम्रुद्ध राज्य परकीय आक्रमकांनी नष्ट केले.
महात्मा जोतिराव फ़ुले यांनी केलेली या कथेची चिकित्सा :-
चिकित्सा करताना फ़ुले समग्र वाड:मयात म्हणतात वामनाचा एक पाय प्रुथ्वीवर व दुसरा पाय आकाशात होता.प्रुथ्वी व आकाशातील अंतर करोडो मैल आहे.माणसाचा एक पाय जमिनीवर असल्यास तीन फ़ुट अंतरावर जाता येत नाही कारण त्याच्या पायाची लांबी व दोन पायातील अंतर मर्यादित असते.वामनाचा एक पाय प्रुथ्वीवर व दुसरा पाय आकाशात असता तर वामनाची ....फ़ाटून गेली नसती काय ? (फ़ुले समग्र वाड:मय) डॉ.आ.ह.साळूंखे - बळीवंश या पुस्तकात प्रुष्ठ क्रमांक २०१ वर म्हणतात वामनाने पहिल्या पावलाने विशिष्ट भुप्रदेशातील लोकांना यज्ञाच्या कर्मकांडात गुंतवून टाकले व दुसरे पाऊल वेदप्रामाण्य होते.लोकांनी वेदांवर विश्वास ठेवावा आणि आपली बुद्धी स्वतंत्रपणे मुळीच वापरू नये असा या पावलाचा अर्थ होता.तिसरे पाऊल बहुजनांच्या वाकशक्तिला कुंठित करून टाकणारे होते.म्हणजेच वाणी वापरण्याचा खराखुरा अधिकार ठराविक लोकांनाच असेल  आणि इतरांनी लिहिणे, वाचणे , बोलणे  या बाबतीत स्वतंत्रता राहता कामा नये असा कठोर नियम करण्यात आला.तात्पर्य यज्ञाने भुमी व्यापणे,वेदप्रामाण्याने लोकांना गुलाम करणे आणि वाणीवर एकाधिकार प्रस्थापित करणे हा वामनाच्या तीन पावलांचा खरा अर्थ आहे.
याचात अर्थ आजची आपली स्थिती सर्कशीतल्या वाघाप्रमाणे आहे.तुम्हाला ट्रेनिंग दिलय, तुम्ही तुमच्यात भांडणे करा पण चुकुनही आमच्यावर वार करू नका.तुमची नखे काढून टाकलीत.तुमच्या दाताला रक्ताची चव लागू नये म्हणून तुम्हाला पिंजर्यात कोंडून ठेवलय.एका विशिष्ट चौकटीत आपण बंदिस्त आहोत.जन्मापासून तर मरे पर्यंत आपल्याला बामन चिकटलाय.अरे आठवा आपल्या पुर्वजांचा इतिहास आणि तोडा सर्व गुलामीच्या चौकटा. कोणाच्या आदेशावर कशाला चालता.आपल्याला डोकं आहे ना ? काय खरं आणि काय खोटं तपासून घ्या.अरे कॊण दिड फ़ुट असलेला वामन आपल्या बळीराजाला मारणारा आपला देव अवतार कसा ? आजही शेतकरी बळीप्रतिपदेला "इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे" असं म्हणतात. याचाच अर्थ बळीराजा महान असला पाहिजे आणि वामन वाईट असला पाहिजे.तेंव्हा प्रत्येक बहुजनांने बळीराजाचे गुणगान गायले पाहिजे.इतिहासातील एका अनमोल रत्न असलेल्या महात्मा बळीराजाला खरे अभिवादन हेच ठरेल.
"इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे"  ॥ "इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे" 

5 March 2013

सत्य इतिहास जाणुन घ्या

तुषार शिंदे
संपर्क : ७६२००६०९२२
           छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फ़ेब्रुवारी १६३० रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. रयतेला राजा मिळाला. ब्राह्मणांच्या हजारो वर्षापासूनच्या व्यवस्थेला पायदळी तुडविणारे व भारतातील बहुजन महापुरुष कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या जयंती निमित्त फ़क्त ढोल - ताश्यांच्या तालात नाचण्या ऐवजी त्यांच्या विचारधारेचा प्रसार- प्रचार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्वांनीच वेगवेगळ्या माध्यमातून करायला पाहिजे.कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घ्यायला पाहिजेत. तरच त्यांच्या विचारांचा जय होईल.कारण महापुरुषांचा जय त्यांनी आपल्या हयातीतच बघितलेला असतो.पण आजचा समाज जय-जय करण्यातच धन्य मानतो.जय शिवाजी आणी जय भवानी अशा घोषणा तोंड फ़ाटेस्तोवर देऊन स्वत:ची फ़सगत करून घेतो.
भारत देशामध्ये अनेक क्रांत्या व प्रतिक्रांत्या झाल्यात तसेच काही होऊ घातल्या आहेत.भारत देशावर विदेशी लोकांनी आक्रमन करून कब्जा केला व भारत देशाला गुलाम बनवले.येथील व्यवस्था त्यांच्या ताब्यात घेतली.हजारो वर्षापासून ही व्यवस्था परकियांच्या हाती होती.त्याविरोधात आपल्या भारतातील महापुरुष गौतम बुद्ध,सम्राट अशोका,संत कबीर,छत्रपती शिवाजी महाराज, जगदगुरु संत तुकाराम महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फ़ुले,राजर्षी छत्रपती शाहू महाराज,विश्वभुषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,संत गाडगेबाबा,साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे या महापुरुषांनी लढा दिला.आपल्या या महापुरुषांचे आंदोलन आपल्याला पुढे न्यायचे आहे आणि यशस्वी करायचे आहे म्हणून या विचाराची प्रेरणा आपण घेतली पाहिजे.यातच आपला उद्धार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी या व्यवस्थेच्या विरोधात खुप मोठा संघर्ष केला.येथील भुमिपुत्रांना स्वातंत्र्याच्या आस्तित्वाची जाणीव करून दिली.१६३० ते १६८० या अर्धशतकाच्या कालावधीत त्यांनी इतिहास घडविला.शिवरायांना त्यांच्या आई जिजाऊमाता यांची प्रेरणा मिळाली होती तसेच वडील शहाजीराजांनी त्यांना सर्व युद्धाची सर्व तंत्रे शिकवली होती.छत्रपती शिवाजी राजे संत तुकारामांना गुरु मानत.छत्रपती शिवरायांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत जात-पात, धर्म न मानता भुमिपुत्रांसाठी लढा दिला.थोडक्यात सांगायचे म्हणजे शिवरायांनी समता,बंधुता व न्यायाची शिकवण भुमिपुत्रांना दिली.खरच छत्रपती शिवरायांचे कार्य महान होते.
आज या भटाळलेल्या देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात अशा या थोर महापुरुषाचा वापर आपले लोक,नेते,पुढारी जनतेला भावनिक बनवून स्वार्थसाठी फ़ायदा करून घेत आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन महाराष्ट्रात अनेक संघटना व पक्ष पुढे आले आहेत.पण त्यांना छत्रपतींच्या कार्याबद्दल तसेच त्यांच्या बदनामीच्या विरोधात बंड करणे याविषयी काहीही गंभीरता वाटत नाही.
"शिवाजी - हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया" हे पुस्तक जेम्स लेनकडून लिहुन घेणार्या १४ भांडारकरी ब्राह्मणांना धडा शिकवण्यासाठी सर्वांचीच पाठफ़िरवणी झाल्याची दिसून येते.हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊमाता यांच्या बदनामीचे ब्राह्मणी षडयंत्र होय.या विरोधात आपण आवाज उठविला पाहिजे.छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास आपण जाणुन घ्यावा कारण शिवरायांचा खोटा इतिहास या षडयंत्रकारी ब्राह्मणांच्या सांगण्यावरून सांगण्यावरून जेम्स लेनने लिहिला आहे.शिवरायांचे गुरु त्यांची आई,वडील आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज असतानांही दादू कोंडदेव आणि रामदास यांसारखी माणसं त्यांचे गुरु म्हणुन लादले गेले.कुठे आहे आमचा शिवप्रेमी समाज ? शिवरायांची बदनामी करणारे साहित्य लिहिले जात आहे.त्यांचा खोटा इतिहास सांगितला जात आहे.आजही आंतरजालावर अशा संघटना कार्यरत आहेत ज्या कायम खोटा प्रसार करत असतात व इतिहासाचे विक्रुतीकरण करत असतात.शिवरायांच्या नावाचा दुरुपयोग केला जात आहे.तेंव्हा छत्रपतींच्या मावळ्यांनी आता जाग्रुत व्हायला पाहिजे.
छत्रपती शिवरायांच्या बदनामी विरोधात लढणार्या व त्यांचे कार्य व खरा इतिहास सांगणार्या संघटनांमुळे शिवरायांची खरी चळवळ जीवंत आहे.ही चळवळ वाढविण्याची जबाबदारी आम्हा मावळ्यांची आहे.म्हणून एवढे सांगावेसे वाटते की छत्रपती शिवराय कोणत्या जाती - धर्मासाठी लढले नव्हते, ते खर्या अर्थाने आपल्या रयतेच्या हितासाठी लढणारे राजे होते.पुर्वी शिवरायांनी खुप संघर्ष केला आहे मग तो वैदिक ब्राह्मणांच्या विरुद्ध असो नाहीतर मुस्लिमांच्या विरुद्ध असो.पण शिवरायांना मुस्लिम विरोधी दर्शवण्याचे काम ब्राह्मण इतिहास लिहिणार्यांनी केले आहे.शिवराय हे विखुरलेल्या देशबांधवांसाठी व त्यांच्या ऐक्यासाठी झगडले होते.तेंव्हा जाती-धर्म विसरून एकिने लढून शत्रुंना धडा शिकवण्यास सज्ज झाले पाहिजे.आपला इतिहास आपला वारसा आहे.इतिहास जाणुन घ्या व मुक्तीचा मार्ग स्विकारा .या व्यवस्थेच्या मुळावर घाव घातल्याशिवाय आपला देश या गुलामगिरीतून मुक्त होणार नाही.हा देश छत्रपती शिवरायांचा आहे तेंव्हा इथे त्यांचीच व्यवस्था आम्हाला पाहिजे.
जय जिजाऊ । जय शिवराय

3 January 2013

लेखणीची करामत...

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की "एका लेखणीत हजार तलवारीची ताकद असते" ते आजच्या काळात अगदी सत्यच ठरत आहे कारण हजार तलवारीने जरी पराक्रम केला आणि लेखणी कुचकामी निघाली तर त्या हजार तलवारीचे कर्त्रुत्व नाहिशे होते शुन्य होते.
लेखणीचा एक फ़टका काय करू शकतो हे बघायचे असेल तर भारतीय इतिहासाकडे बघावे लागेल.ज्यांच्या हाती लेखणी होती त्यांनी किती " हिरोंचे झिरो आणि झिरोंचे हिरो" केले ते भारतीय इतिहासाचे पान अन पान आक्रंदुन सांगेल.
तुम्हाला एक कथा सांगतो तुम्ही ती ऐकली असेलच की एक माणुस एकदा जंगलात गेला आणि वाघाला म्हणाला की सांग "माणुस श्रेष्ट की वाघ"वाघ म्हणाला अर्थातच वाघ.तेंव्हा माणुस म्हणाला चुक माणुसच श्रेष्ट ,ते कसं काय ? माणुस म्हणाला चल माझ्याबरोबर तुला पुराव्यासहीत दाखवतो. वाघ त्याच्या बरोबर घराकडे  जातो त्या माणसाने वाघाला भले मोठे एक चित्र दाखवले  त्या चित्रामध्ये माणुस वाघाच्या डोक्यावर पाय ठेऊन उभा होता आणि म्हणाला आता सांग कोण श्रेष्ट ? तु की मी ? वाघ थोडा विचार करून उद्गारला " हे चित्र तु काढलंस म्हणून असं आहे ,जर मी चित्र काढलं असतं तर परिस्थिती काही वेगळीच असती.
मराठा समाजाची परिस्थिती वरच्या कथेतील वाघासारखीच आहे.लेखणीच्या ठेकेदारांनी लेखण्यांचा पुरेपुर वापर करून आपल्या पुर्वजांचा उदो उदो केला.त्यातूनच टिळक "लोकमान्य" झाले,,बळीराजाला मारणारा वामन " पाचवा अवतार" झाला,इंग्रजांना घाबरलेला शिपाई "साईबाबा" झाला,दुसरा क्रांतिकारक आद्य झाला अशी ही लेखणीची करामत आहे.ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे,वाचलं पाहिजे, चिंतन-मनन-मंथन केलं पाहिजे.तरच भारतीय इतिहासाचा भटाळलेला ’मुखवटा’ ओरबडला जाऊन अस्सल मराठमोळा चेहरा समोर येईल.अर्थात हे कार्य कित्येकांनी सुरु केलं आहे.त्यांचं मनापासून अभिनंदन.
अशाच तर्हेने आमच्या सार्या दैदिप्यमान इतिहासाचा विचका करून टाकला त्यातच जगातील सर्वश्रेष्ट राजांपैकी एक असलेला राजा लुटारू, बंडखोर करण्यात आला, ज्या राज्याच्या शौर्याला जगामध्ये तोड नाही त्या राजाला बदफ़ैली, स्त्रीलंपट करून टाकले,एका सामान्य चाकराला गुरु पदावरती बसवले,शिवरायांचा आणि शाहू महाराजांचा अपमान करणार्यांना लोकमान्य बनविले एवढेच नाही तर अमच्या प्रत्येक महामानवाच्या डोक्यावर एक वामन आणुस बसवला, "रामांच्या डोक्यावर वसिष्ठ बसवला, क्रुष्णाच्या डोक्यावर सांदीपनी बसवला, चंद्रगुप्त मौर्याच्या डोक्यावर चाणक्य बसवला, नामदेवांच्या डोक्यावर विसोबा खेचर बसवला, रामचंद्रराय यादवांच्या डोक्यावर हेमाद्री पंडीत बसवला,तुकोबांच्या डोक्यावर बाबाजी चैतन्य बसवला आणि यांचा कळस म्हणजे शिवरायांच्या डोक्यावर दादू कोंडदेव बसवला.
                लेखणीचा फ़टका काय असतो हे बघाचे असेल तर हे जाणीवपुर्वक शब्दप्रयोग कसे असतात पहा..
"आर्यांचे आगमन - मुस्लिमांचे आक्रमण",पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले - मराठ्यांचं पानिपत झालं", "क्रुष्णाजी भास्कर यांनी शिवरायांवर वार केला - जिवा महालाने सय्यद बंडास मारले".सावरकरांची संडासातली उडी म्हणजे मार्सेलिसची ऐतिहासिक उडी,क्रांतीसिंह नाना पाटलांनी क्रुष्णा नदीत १५० फ़ुट उंचीवरून रेल्वेतून मारलेल्या उडीचा उल्लेख नाही.विशेष ही बाब की सावरकर पकडले गेले पण क्रांतीसिंह यशस्वीरित्या निसटले.मराठ्यांचे नेत्रुत्व करून औरंगजेबाची कबर इथेच खोदणार्या ताराराणींवर इतिहासामध्ये काही ओळीच पण गोषातून कधी बाहेर न पडलेल्या (तलवार चालविणे तर लांबच)आणि आपली अंगरक्षिका झलकारीदेवीस आपल्या वेशात लडावयास लावणार्या दुप्लिकेट झाशीच्या लक्ष्मिबाई वर चित्रपट काय अन मालिका काय! तिचे जागोजागी पुतळे.खरं तर गीत असं होतं की " खुब लढी मर्दानी वो तो झाशी की झलकारी थी" ते बदलून "खुब लढी मर्दानी वो तो झाशी वाली राणी थी" असं करण्यात आलं.
वर लिहिलेली तथ्ये ही मोजकीच उदाहरणे आहेत.लेखणी काय करू शकते,तर लेखणी अशा करामती करू शकते."जिसकी लाठी उसकी भैंस" अशी एक म्हण आहे,त्याच अर्थाने "ज्याच्या हाती लेखणी तोच इतिहासाचा धनी" असेही म्हणता येईल.याच लेखणी मुळे आमचे हिरॊ झिरो झाले आणि भटी वरवंटे हिरो ठरलेत.

1 January 2013

राजर्षी छ.शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर

               महार जातीतील डॉ.आंबेडकर नामक ग्रुहस्थाने उच्च पदवी प्राप्त बातमी राजर्षी शाहू महाराजांच्या कानावर येऊन पडली तेंव्हापासून त्यांच्या आनंदाला पारावारच राहिला नाही, जी व्यक्ती महाराजांना भेटायला येई त्या व्यक्तीसमोर बाबासाहेबांचे तोंडभरून कौतुक करून म्हणायचे "आता या बामनांना बौद्धीक बाबतीत शह देण्यास बहुजन समाजातील माणसे हळू हळू पुढे येऊ लागली. "एक दिवस असा उगवेल की या बामनांपेक्षा आमची बहुजन समाजातील माणसेच पुढे गेलेली असतील"शाहू महाराजांजवळ बापुसाहेब महाराज बसलेले असायचे .आंबेडकरांचे चाललेले कौतुन बघून बापुसाहेब म्हणाले, "महाराज एकदा आंबेडकरांना भेटावयास तरी बोलवा" शाहू महाराज प्रसन्न होऊन म्हणाले,"बापसाब अगदी माझ्या मनातलं बोललासा बघा"
  योगायोगाने तेथे दळवी आर्टिस्ट आले, त्यांना मुंबईचा खडानखडा माहीत असल्याने महाराजांनी आबेंडकरांना बोलविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवीली व त्यांच्या मुंबई प्रवासाची सर्व व्यवस्था करण्याची आज्ञा देऊन महाराज सोनतळीला निघून गेले.
            महाराजांच्या आज्ञेप्रमाणे दळवी मुंबईस गेले डॉ.आंबेडकरांची भेट घेतली महाराजांचा खास निरोप दिला.पण आंबेडकर कोल्हापुरास येण्यास तयार होईनात.कारण संस्थानिकांच्या अनेक गोष्टी त्यांच्या कानावर आल्या होत्या.अखेर दळवींनी इतर संस्थानिकांपेक्षा महाराज कसे वेगळे असून अस्प्रुश्योद्धरांसाठी कसे काम करतात, हे सांगितल्यावर आंबेडकर कोल्हापुरास येण्यास तयार झाले व ते कोल्हापुरला आले.
              पहिल्याच भेटीत शाहू महाराज आणि बाबासाहेब यांची मैत्री जमली.मैत्री ही स्फ़ुल्लिंगासारखी असते, ती केंव्हा प्रकट होते हे सांगणे कठीण असते कित्येक वर्षाच्या सहवासानंतरही प्रकट होत नाही पण काही वेळी विश्वासाच्या वातावरणाने प्रगल्भता धारण केल्यास एकाच भेटीत ती चीरमैत्री होऊ शकते. असेच शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब यांच्या मैत्रीचे झाले. एकाच भेटीत चिरमैत्री जमली.पहिल्याच भेटीत डॉ. बाबासाहेबांनी अस्प्रुश्योद्धरांसाठी निदान एका साप्ताहिकाची गरज असल्याचे प्रदिपाद करून ’मुकनायक’ हे साप्ताहिक चालवत असलो तरी आज ते आर्थिक अडचणीमुळे ’मुक’ झाल्याचे सांगितले.’मुकनायक’ विषयी आधिक माहीती देताना आंबेडकरांनी महाराजांना सांगितले की "आपण ३१ जानेवारीला १९२० ला पहिला अंक प्रकाशित केला. या अंकावर संत तुकाराम यांचे बोधवाक्य आहे, हे बोधवाक्य असे आहे,"
  " काय करू आता धरुनिया भीडा नि:शंक हे तोंड वाजविले ।
    नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण, सार्थक लाजुन नव्हे हित ।"
संत तुकोबारायांचे बोधवाक्य ऐकुन महाराज एकदम प्रसन्न झाले व म्हणाले " व्वा ! व्वा ! छान ! छान !!" असे सहजच म्हनुन गेले.
           आंबेडकरांनी महाराजांना आर्थिक अडचणीमुळे व्रुत्तपत्रे कशी बंद पडतात हे सांगत असतानाच सोमवंशीय मित्र, हिंदू नागरीक, विटाळ विद्वंसक यांची उदाहरणे दिली. तसेच त्यांनी कारणेही सांगितली. त्या काळी व्रुत्तपत्रांना फ़ारश्या जाहीराती मिळत नसत.वर्गणीसारांच्या वर्गणीतुनच अंक चालवावा लागत असत आणि वर्गणीदार आपल्या वर्गणीशी प्रामाणिक राहात नसत. महाराजांच्या ध्यानी सर्व बाबी आल्यानंतर तात्काळ त्यासाठी रू.२,५०० ची भरगोस मदत केली.या मदतीनंतर " मुकनायक" बोलु लागला.
           २० मार्च १९२० रोजी करवीर राज्यातील "कागल" जहागिरीतील माणगाव या ठिकाणी अस्प्रुश्यांची पहिली ऐतिहासिक भव्य परिषद शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीतून व प्रेरणेने आयोजित केली होती. या परिषदेचे अध्यक्षस्थान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना भाषणाच्या सुरुवातीस शाहू राजांनी आंबेडकरांचा उल्लेख "माझे प्रिय मित्र आंबेडकर" असा करताच हजारो दलितांनी महाराज आणि बाबासाहेब यांचा अखंड जयघोष करीत टाळ्यांचा पाउसच पाडला. प्रत्यक्ष छत्रपती आंबेडकरांना "प्रिय मित्र" म्हणतात याचे त्यांना कौतुक वाटले.भाषणाच्या शेवटी आंबेडकरांना आग्रहाचे भोजनाचे आमंत्रन देताना म्हणाले, "आंबेडकरांना माझी विनंती आहे की त्यांनी जाण्यापुर्वी मेहरबानीने माझे रजपुतवाडीच्या कॅंपवर माझ्याबरोबर भोजनाला येण्याची तसदी घ्यावी" महाराजांच्या आमंत्रणाचा स्विकार करून आंबेडकर सोनतळीला आले. भोजनाच्या वेळी महाराजांनी स्वत: आग्रह करून त्यांना यथेच्छ भोजन करावयास लावले. त्यानंतर आंबेडकर आगगाडीने मुंबईस जाणार होते, त्यावेळी महाराजांनी स्वत: स्टेशनवर येऊन त्यांना निरोप दिला.
           डॉ.भिमराव आंबेडकर यांच्या नेत्रुत्वामुळे दलित उद्धाराच्या चळवळीला निर्णायक उभारी आली. शाहू महाराजांनी तर निश्चयच केला होता की "माझे राज्य गेले तरी बेहत्तर पण अस्प्रुश्योद्धराचे कार्य थांबविणार नाही" महाराजांच्या अशा या कार्यामुळे अस्प्रुश्य लोक शाहुंना आपला त्राता, उद्धारक , मित्रच नव्हे तर प्रत्यक्ष देव मानत होते. दिवसेंदिवस महाराज आणि आंबेडकर यांचा स्नेह वाढतच गेला. स्नेह माणसाला त्याग करायला शिकवतो, संकुचीत नात्याची तो सीमा पार करतो.असेच या दोघांच्या नात्यात घडत गेले.खरी मैत्री ही मोकळ्या ह्र्दयाने बोलत असते,केंव्हाही मदत करण्यास तयार असते.
            ४ सप्टेंबर १९२१ रोजी लंडनहुन आंबेडकरांनी महाराजांना एक पत्र पाठवून मदत मागितली, ते लिहितात आपली प्रक्रुती उत्तम असेलच अशी आशा करतो, आपली आम्हाला खुप आवश्यकता आहे,कारण भारतात प्रगती करत असलेल्या सासाजिक लोकशाहीच्या चळवळीचे आपण एक महान आधारस्तंभ आहात, महाराजांविषयी आंबेडकरांना किती आदर होता हे यावरून दिसून येते.आंबेडकरांच्या विनंतीप्रमाणे त्यांना आवश्यक ती मदत केली. त्यानंतर पुढे काही दिवसांनी म्हणजे २६ जानेवारी १९२२ रोजी लंडनहुन डॉ.आंबेडकरांचे महाराजांना पुनश्च मदत मागताना पत्र आले, त्या पत्रात ते म्हणतात, "मला परत येण्यास अवधी लागणार असल्यामुळे घरी खर्चाची अडचण होणार आहे, तरी हुजुरांनी क्रुपावंत होऊन रु.७५० मदत करावी, आजवर जे अनेक उपकार हुजुरांनी केलेत त्यात हाही करतील अशी आशा आहे. "हे पत्र मिळताच महाराजांनी मनिओर्डरने रुपये सातशे पन्नास पाठवून देण्याची व्यवस्था केली.
         डॉ.बाबासाहेबांना शाहू महाराजांविषयी नेहमीच आदरभाव असे. उच्च जाती आपल्या स्वार्थासाठी ब्राह्मणेत्तर आणि बहिष्क्रुत यामध्ये कधीही एकी निर्माण न होता बेकीच रहावी यासाठी प्रयत्नशील होते. तशा प्रकारे ते हिन डावपेच खेळत. प्रत्येक वेळी ते डावपेच शाहू महाराज आपल्या मुत्सद्देगिरीच्या बळावर उधळून लावत. याबाबत २२ सप्टेंबर १९२० च्या  "मुकनायक" मध्ये "प्रेम की सुड" या लेखात् आंबेडकर म्हणतात, "या विसाच्या शतकातील स्वयंनिर्णयाचा काळात राजर्षी शाहू छत्रपती यांनी ब्राह्मण जातीकडून नाडावलेल्या ब्राह्मणेत्तर व बहिष्क्रुत वर्गाच्या चळवळीचा पुरस्कार केल्यावर बहुजन समाजाकडून त्यांस मिळत असलेला धन्यवाद ब्राह्मण या जातीस न खपून त्यांनी बहिष्क्रुत व ब्राह्मणेत्तर या वर्गात् खुद्द मराठ्यांत फ़ुट पाडण्याचा अत्यंत घातक असा उपक्रम चालविला आहे".
             डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणी  शाहू महाराज एकमेकांचा आदर करीत याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिल्ली येथे १३ व १४ फ़ेब्रुवारी १९२२ रोजी ’अखिल भारतीय बहिष्क्रुत परिषद’ आयोजित केली होती.त्या परिषदेत आंबेडकरांच्या अनुपस्थितीत त्यांच्या माघारी त्यांच्याविषयी  प्रशंसोद्गार काढताना शाहू महाराज म्हणाले होते ."भिमराव आंबेडकर तुमचे महान नेते आहेत त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा, त्यांचे अनुकरण करा व त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करा.मी तर तुमच्या सेवेला वाहुन घेतले आहे, मला तुमची सेवा करू द्यावी ही विनंती." बाबासाहेब आंबेडकर अस्प्रुष्यता निर्मुलण व त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी "ऑल इंडिया डिस्प्रेड क्लासेस एज्युकेशन फ़ंड" संस्था उभी करणार होते, या संस्थेत शाहू महाराजांनी कोणत्याही लहानमोठ्या पदावर काम करण्याची इच्छा त्यांनी आंबेडकरांना रुकडी (कोल्हापुर) येथुन दि.७ जुन १९२० रोजी लिहिलेल्या पत्रावरून स्पष्ट होते.
" चांगला मनुष्यच चांगला मित्र होऊ शकतो" हे उभयतांच्या मैत्रीवरून स्पष्ट होते. 
संदर्भ  : शाहुंच्या आठवणी, शाहू गौरव ग्रंथ.

पानिपत, मराठा संज्ञा आणि परिभाषा

            पानिपत येथे १५ जानेवारी १७६१ रोजी झाली होती.या लढाईमध्ये पेशव्यांचा पराभव झाला होता.परंतू आजही या पराभवाचे खापर मराठ्यांच्या डोक्यावर फ़ोडले जाते.या लढाई संदर्भात मुलभुत प्रश्न असा की "पानिपतच्या लढाईसोबत मराठ्यांचे नाव का जोडले जाते ? " ही लढाई शिवशाहीची नसून पेशवाईची होती.
         संपुर्ण पेशवाईच्या इतिहासापैकी फ़क्त पानिपतच्या लढाईच्या पराभवाची जबाबदारी घेण्याची वेळ जेंव्हा येते तेंव्हाच फ़क्त "मराठा" शब्दाचा आधार घेतला जातो.याशिवाय उरलेला इतिहास हा मराठ्यांचा नसतोच.तो फ़क्त पेशवाईचा असतो.
      आमच्याच समाजातील लोक जेंव्हा पानिपतच्या लढाईबाबत बोलू किंवा लिहु लागतात,तेंव्हा ते गळा काढून रडतात की ,"मराठ्यांचा पानिपत मध्ये पराभव झाला, मराठे पानिपतमध्ये हरले" तर काही महाभाग असेही म्हणतात की "पानिपत मध्ये मराठ्यांचा पराभव झाला नाही ते हुतात्मे झाले ".या दोन्हीही प्रकारे रडणे म्हणजे यांचा हेतू एकच असतो तो म्हणजे पानिपतच्या लढाईचा संबंध मराठा या शब्दाशी जोडणे! या लढाईच्या वेळी सत्ता आणि नेत्रुत्व हे दोन्हीही पेशव्यांचे होते.पण पराभवाची व्याख्या मात्र "मराठा" या शब्दाच्या आधारे करायची, आहे की नाही चालूबाजी.स्वत:च्या नाकर्तेपणाचे खापर मराठ्यांच्या नावावर फ़ोडायचे! यालाच म्हणतात इतिहासाचे विक्रुतीकरण!. दोषी आहेत पेशवे पण आरोपी मात्र मराठ्यांना केले जाते.हा किती अत्याचार आहे! ब्राह्मणी व्यवस्था बहुजनांना आरोपीत करते हे एक वेळ ठीक आहे पण  आपणच आपल्याला न केलेल्या गुन्ह्याबद्दल अरोपीत करून घेण्यात काय अर्थ आहे.? आणि काय शहाणपणा आहे ? यालाच महात्मा फ़ुले यांनी गुलामगिरी असे म्हंटले आहे.तर डॉ.बाबासाहेब म्हणतात की "गुलाम लोकांमध्ये जन्माला येणे गुन्हा नसून ,गुलामी सहन करणे हा खरा गुन्हा आहे!.
मराठा या शब्दामुळे नक्की काय घडते ?
१] पेशव्यांना लपण्याची संधी मिळते! जे पेशवे या पराभवाचे खरे सुत्रधार आहेत.
२] पेशव्यांच्या ऐवजी मराठ्यांचा संबंध लढाईशी जोडता येतो.
३] एकदा का पराभवाची व्याख्या मराठा शब्दाच्या आधारे गेली पराभवाचे धनी मराठेच आपोआप होतात.
४] मराठ्यांना ऐतिहासिक द्रुष्ट्या बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो.
५] व्यवस्था मराठ्यांमध्ये पराभवाचा न्युनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न करते.
६] पानिपतच्या संपुर्ण घटनेचे विक्रुतीकरण करणे शक्य होते.
पानिपतच्या सर्व लढायांचा संक्षिप्त इतिहास
               पानिपत मध्ये एक नाही तर तीन मोठ्या लढाया लढल्या गेल्या आहेत.या तिन्ही लढायांना पानिपतची लढाई याच नावाने संबोधित केले जाते.
१] पहिली पानिपतची लढाई - २१ एप्रिल १५२६ , मोघल सेना विरुद्ध लोधी सुलतान सेना
नेत्रुत्व - बाबर विरुद्ध सुलतान ईब्राहिम लोधी, विजयी - मोघल सेना
२] दुसरी पानिपतची लढाई - ५ नोव्हेंबर १५५६ , मोघल सेना विरुद्ध सम्राट हेमचंद्र सेना
नेत्रुत्व - इटांगा खान विरुद्ध सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य, विजयी - मोघल सेना
३] तिसरी पानिपतची लढाई - १४ जानेवारी १७६१ , दुररानी सेना विरुद्ध पेशवे(ब्राह्मण)
नेत्रुत्व - अहमदशहा अब्दाली विरुद्ध सदाशिव भाऊ, विजयी - दुररानी सेना 
मराठ्यांना पानिपतच्या सर्व लढायांची किमान माहीती असणे गरजेचे आहे.यापैकी तिसर्या लढाईत पेशवाई व्यवस्था गळा काढून रडत असते आणि ते स्वाभाविक आहे कारण पानिपतच्या तिसर्या लढाईत पेशव्यांचा पराभव झाला आहे.
मराठ्यांनी जस्टीफ़िकेशन (Justification)का म्हणून द्यावे
         युद्धातील पराभव असो किंवा कब्बडी या खेळतील पराभव असो,या पराभवाची जबाबदारी ही घ्यावी लागते आणि त्यानंतर पराभवाच्या कारणांचा विचार करावा लागतो.पानिपतच्या लढाईमध्ये पराभव हा पेशव्यांचा झालेला आहे.त्यामुळे पर्यायाने या पराभवाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडते.पेशव्यांचे वारस मात्र या पराभवाची जबाबदारी स्वत:च्या अंगावर घेऊ इच्छित नाही.याउलट ब्राह्मणी व्यवस्था या पराभवाला ’जस्टिफ़ाय’(Justify) करण्याचा बेगडी प्रयत्न करत असते आणि तो सुद्धा मराठ्यांना बदनाम करूनच.!
         पेशव्यांचे वारस म्हणतात की "पानिपत मध्ये मराठ्यांचा पराभव झाला नाही, मराठे पानिपत मध्ये हुतात्मे झाले" हा या पराभवाला जस्टीफ़ाय करण्याचा केवीलवाना प्रयत्न आहे.इथे पेशव्यांचे वारस सफ़ाई देण्याचा प्रयत्न करत असतात.पानिपत मध्ये पेशव्यांचा पराभव झाला होता हे जगजाहीर आहेच त्यामुळे काय जस्टिफ़िकेशन द्यायचे ते त्यांनी द्यावे त्यासाठी मराठ्यांना बदनाम करण्याची गरज नाही.पेशवाई व्यवस्था असे का म्हणत नाही की "पानिपत मध्ये पेशव्यांचा पराभव झाला नाही तर पेशवेहुतात्मे झाले ! असे म्हंटले तर संपुर्ण भारतामध्ये कोणालाही वाईट वाटणार नाही. याउलट पेशवाई व्यवस्थेचे हसू येईल! हे पेशवाई व्यवस्था जाणुन आहे.म्हनुन ही व्यवस्था या पराभवाला "मराठा" शब्दाशी जोडण्याचा प्रयत्न करते.यामुळे या व्यवस्थेला पराभवातून लपण्याची संधी मिळते.
        हे दुसर्या उदाहरणाद्वारे सांगावयाचे झाल्यास असे सांगता येईल की पेशवाईव्यवस्था मोठ मोठ्याने गळा काढून म्हणते की "गर्व से कहो हम हिंदू है !" जर आम्ही हिंदू आहोत तर सांगायची गरज काय आहे ? याचप्रमाणे पानिपत मध्ये मराठ्यांचा पराभव झाला असता सांगायची गरज नसते,पण पराभव मराठ्यांचा झालेलाच नाही तर सांगावयाची गरजच काय आहे ? यामुळे मराठ्यांना या लढाईबाबत कोणतेही जस्टीफ़िकेशन देण्याची गरजच नाही.