29 October 2012

समता प्रिय संत शिरोमणी संत नामदेव महाराज

           संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत. त्यांचं कर्त्रुत्व महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून उत्तर- वायव्य भारतापर्यंत आपला ठसा उमटवून गेले."नाचू किर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥" यांसारख्या शब्दांनी समाजात समतेच्या मार्गाने ज्ञानदीप लावण्याचा ध्यास घेतलेल्या संर नामदेव महाराजांनी भाषा,प्रांत,धर्म, जातपात या पलीकडे जाऊन समाज जीवणाचा विचार केला.त्यामुळे संत नामदेव महाराज केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता पंजाबमधील शिखांनाही तितकेच पुज्य ठरतात.प्रतिकुल ,राजकीय, सामाजिक अन धार्मिक आतावरणात मराठी आणि अन्य प्रादेशिक लोकजीवनाला नवे वळण लावण्याचे कार्य ज्या काही थोर संतांनी केले त्यांचे अग्रणी संत नामदेव महाराज होते.
                 मध्ययुगीन समाज जीवन प्रामुख्याने धर्मप्रधान होते.पण कर्मकांड आणि विधिनिषेद यांचे स्तोम फ़ार माजलेले होते. वर्णाश्रमाच्या धोरणामुळे उच्चवर्णीय समाजामध्ये अराजकता निर्माण झाली होती.धार्मिक संस्कार तेच करायचे ज्ञान , अध्ययन, अध्यापन, धनसंचय, शस्त्र धारण करण्याचा अधिकार त्यांनाच होता.तसेच मंदिर प्रवेश ,सार्वजनिक पाणवठे इत्यादी ठिकाणी पाणी भरण्याचा अधिकार अस्प्रुष्यांना नव्हता.हळूहळू या रुढींनाच धर्माचे महात्म्य प्राप्त होत गेले आणी समाजात भयानक अज्ञान आणि अंधश्रद्धाचे स्तोम माजले होते.
           या पार्श्वभुमीवर २६ ऑक्टोंबर १२७० रोजी नामदेव महाराजांचा जन्म एका शिंपी कुटुंबात झाला.संत नामदेव केवळ भक्तिभावाची (काव्य) गाणी लिहिणारे नव्हते तर समाजात समता प्रस्थापित करण्यात आणि समाज प्रबोधन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.भेदाभेदांनी विदीर्ण (भग्र) झालेल्या भारतीय समाजात संत नामदेवांनी लोकनिंदेचा विचार न करता समतेची बीज रोवून विषमतेवर प्रहार केला.विसोबा खेचरांना गुरु मानणार्या  संत नामदेवांनी जेंव्हा संत चोखोबांच्या परिवारावर आपत्ती आली तेंव्हा ते मंगळवेढ्याला गेले आणि त्यांच्या (चोखोबांच्या) अस्थी स्वत: आणून सनातन्यांच्याच नगरीत खुद्द पंढरपुरच्या विठ्ठ्लाच्या पायरीशी संत नामदेवांनी चोखोबांच्या स्म्रुतीमंदिरांची निर्मीती केली.
           संत नामदेवांनी नेहमी जातीनिरपेक्ष धार्मिक लोकशाहीचा पुरस्कार केला ते एक प्रतिभासंपन्न कवी व संगीताचे चांगले जाणकार होते आणि कीर्तन कलेवर त्यांचे प्रभुत्व होते.संत नामदेवांनी त्रिप्रकरणात्मक, चरित्र, आत्मचरित्र, व्यक्तिचरित्र, आख्यानक रचना,प्रवास वर्णन, काव्य, कुटरचना,लोक कविता, भाव आणि भक्तीपर कविता,सश्यूकुडी वाणीतील हिंदी रचना अशी त्यांनी वैविध्यपुर्ण वाड:मय संपदा लिहिली.
           संत नामदेव महाराजांनी संपुर्ण भारतभर ५४ वर्ष फ़िरून समाजात समता प्रस्थापित करण्याचा अथक प्रयत्न केला.८० वर्षाचे वय झाल्यावर त्यांनी इहलोकाचा निरोप घॆण्याचे ठरविले आणि ३ जुलै १३५० रोजी पंढरपुर इथे विठ्ठ्ल मंदिराच्या महाद्वारात संत चोखोबांच्या समाधी शेजारी समाधी घॆऊन समाजासमोर समतेचा महान आदर्श ठेवला.अशा या महान संत शिरोमणींची २६ ऑक्टॊंबर रोजी जयंती.अशा या समता प्रिय संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांना कोटी - कोटी विनम्र वंदन....

8 October 2012

उल्लेखनीय प्रतिक्रिया !

[ विश्व मराठी ब्लॉग लिहिल्या पासून आतापर्यंत १५०० च्या आसपास प्रतिक्रिया कट्ट्यावर धडकल्या.प्रतिक्रिया या महत्वाच्या असतात कारण त्या लिहायला उत्सुक करतात, प्रेरणा देतात अशीच एक प्रेरणादायक प्रतिक्रिया कट्ट्यावर येवून धडकली ती प्रतिक्रिया एक मोठे लेखक आहे ते म्हणजे "मराठ्यांनॊ षंड झालात का ? " या पुस्तकाचे लेखक डॉ.बालाजी जाधव साहेब यांची.त्यांची प्रतिक्रिया खाली देत आहे. ]
"आपला ब्लोग अतिशय आवडला. अत्यंत सुंदर आणि प्रभावी रीतीने आपण आपल्या ब्लॉगची मांडणी केली आहे. खरेच आहे जिथे आयुष्याला कलाटणी देणारे शिव विचार वाचायला मिळतात ते स्थानही तेवढेच शिवमय असू नये काय? तंत्रज्ञानाचा फार चांगला फायदा आपण करून घेतला आहे. समाजाला लागणारे वैचारिक खाद्य आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पुरवित आहात. आजपर्यंत एवढा नीटनेटका ब्लोग माझ्या तरी पाहण्यात आला नाही. हा ब्लोग खरोखरच लोकप्रियतेच्या कळसावर आहे हे त्याच्या सभासद संखे वरूनच लक्षात येते. यापुढेही आपण समाजाला योग्य दिशा देणारे साहित्य निर्माण करावे आणि आम्हा वाचकांची भूक भागवावी. आपले कार्य हे पुस्तक पेक्षाही अत्यंत प्रभावी आहे कारण पुस्तक निर्मिती प्रक्रियेत बराच वेळ जातो आणि नजर चुकीने जर काही चूक झाली तर ती चूक पुस्तकांच्या प्रती संपे पर्यंत काढता येत नाही, हे मी एक प्रकाशक या नात्याने चांगलेच जाणतो. हा धोका आपल्याला नाही. लेख लिहिला की वाचकांच्या मनाचा वेध घ्यायला तो तयार होतो. चूक असेल तर लगेच दूरोस्त करता येते आणि वाचकही आपल्या विचारांचा आस्वाद घेऊन लगेचच आपली कडू गोड प्रतिक्रिया देऊ शकतो. आपल्या पुढील कार्यास शिवेछ्या. हा ब्लोग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा. विशेष गोस्त म्हणजे आपण आपल्या प्रोफिले मध्ये माझ्या "मराठ्यांनो षंढ झालात काय?" या पुस्तकातील "मराठा लढवय्यी जात ,एकेकाळची राज्यकर्ती जात ,जगातल्या १३ लढवय्या जातीपैकी प्रथम क्रमांक पटकावणारी जात, "पंजाब, सिंध , गुजरात, मराठा "या राष्ट्रगीतात महाराष्ट्राचा उल्लेख "मराठा" असा करायला भाग पडणारी जात , स्वतःच्या शौर्य, धैर्य, त्याग आणि उदारपणा या गुणांमुळे महाराष्ट्राची ओळख बनलेली जात". या ओळी टाकल्या. याचे मला फार बरे वाटले. आई जिजाऊ आपल्याला प्रचंड यश देओ हीच शिव कामना."
जय जिजाऊ!

डॉ.बालाजी जाधव
लेखक : "मराठ्यांनो षंड झालात काय ?"
धन्यवाद ! डॉ. जाधव साहेब आपल्यासारख्या लेखकांमुळेच आणि वाचकांमुळेच आम्हाला लिहायला प्रेरणा मिळते.आपण आमचा मराठी कट्टा ब्लोग वाचत रहा आणि आपलेविचार कळवत रहा.
धन्यवाद पुन्हा एकदा ..
जय जिजाऊ । जय शिवराय  ।

7 October 2012

जातीच्या वर्गात सत्यानाशच..

         "जातीसाठी माती खावी " अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. दैनंदिन जीवण जगत असताना अनेकदा आपण या म्हणीनुसार वागतो, क्रुती करतो.यामुळे आपल्याला समाधान वाटत असते.
पण खरोखरच जातीविषयक असलेला हा गर्व, अभिमान दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या समस्या सोडवू शकतो काय ? याचे उत्तर नकारार्थी असेच आहे.आपल्याला प्रश्न पडणॆ स्वभाविक आहे की जातीविषयीचा अभिमान किंवा गर्व तसेच आपल्या जीवनाशी निगडीत असलेल्या समस्या याचा काय संबंध आहे ? याचा अनिष्ट संबंध आहे.
        संपुर्ण भारतात तथागत बुद्ध, सम्राट अशोक यांच्या काळात जातीव्यवस्था अस्तित्वात नव्हती, तर तथागत बुद्धांनी इथल्या वर्णवर्चस्वादा विरुद्ध संपुर्ण लोकांना जाग्रुत  करून सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्क्रुतीक आदि क्षेत्रात क्रांती केली. याचा अर्थ तत्कालीन वर्ण व्यवस्थेला छेद दिला ही वर्ण व्यवस्था या देशात पसरली होती त्यामध्ये यज्ञयाग,कर्मकांड, पाप-पुण्य, पुनर्जन्म, ब्राह्मणवर्चस्व आदि विषमतावादी गोष्टी होत्या, वर्ण व्यवस्था ही उतरंडीसारखी उभी होती.सर्वात खाली शुद्र, त्यांच्यावर वैश्य, त्यांच्यावर क्षत्रिय़ व सर्वात वरती ब्राह्मण.
            आधुनिक वर्तमान परिस्थिती : वर्तमानात आज आपण आपले महापुरुष व संत यांना जाती-जातीत बंदिस्त करून ठेवलेले आहे.ज्या महापुरुष व संतांनी वर्ण व्यवस्था,जाती व्यवस्था, अस्प्रुश्यता,विषमता, स्त्रीदास्य इ. विषयांवर लोकांचे प्रबोधन केले . त्या सर्वांना इथल्या व्यवस्थेने जाती-जातीत विभाजन करून ठेवलेलं आहे.माझा प्रश्न आहे की, काय महापुरुष व संतांनी केवळ स्वत:च्या जातीपुरतेच प्रबोधन केले ? काय ते स्वत:च्या जातीच्या प्रगतीसाठी आयुष्यभर झटले ? काय त्यांना स्वत:च्याच जातीचा गर्व होता ? या प्रश्नांचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे.यावर चिंतन,मनन होऊन योग्य निष्कर्ष काढला पाहिजे. निष्कर्षावरच योग्य दिशा मिळुन एकत्रितपणे संघटित होण्यासाठी प्रयत्न करता येईल,अहो जात हा बंदिस्त वर्ग आहे.या बंदिस्त वर्गानेच सर्वांना दार उघडे करून देण्यासाठी महापुरुष व संतांनी आपले संपुर्ण आयुष्य खर्ची घातले.सर्वसाधारणपणे आपण दैनंदिन व्यवहारात आमचा समाज, तुमचा समाज असा शब्द प्रयोग करतो.वास्तवीक हा समाज हा भारतीय समाज समजला पाहिजे.
           समस्येचे समाधान करण्यासाठी काय करावे लागेल ? विद्यमान प्रचलित असलेल्या जाती व्यवस्थेची पाळेमुळे जी अतिशय खोलवर रुजली आहेत.यासाठी सर्व प्रथम आपण स्वत:ची ओळख करून घेणे गरजेचे आहे.ओळख ही जातीची नाही तर रक्ताची आहे.केवळ स्वत:च्या जातीचा जर आपण विचार केला तर जाती व्यवस्था नष्ट होण्याऐवजी ती अधिकच घट्ट होईल.म्हणून जातीचे हे मढे स्वत:च्या मन व मस्तिष्कामधुन काढून टाकावे लागेल.यामुळे जातीव्यवस्था.खिळखिळ होऊन आपल्या समोरील अनेक समस्यांना एकत्रीतपणे येवून लढा देण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण होईल.सर्वांच्या समस्या या सारख्याच आहेत.समस्या सारख्याच असतील तर केवळ समस्येवर चर्चा करून रडून दुसर्याला दोष देऊन, त्यावर उपाय काढणे शक्यच नाही.कारण सिद्धांत म्हणतो.की जो समस्या निर्मान करतो तो समस्येचे कधीही समाधान करणार नाही.समस्या जर आपल्याच असतील तर उपाय सुद्धा आपल्यालाच संघटीत होऊन काढावा लागेल.समस्येपासून दुर जाऊन  चालणार नाही तर समस्येला तोंड दिल्यानेच समस्या सुटू शकतात.
           बंधुंनॊ जातीचा गर्व व अभिमान यांचा त्याग केल्यामुळेच आपण भविष्यात एकत्र येवून समता, स्वातंत्र्य बंधुता व न्याय या मानवी मुलभुत तत्वावर आधारीत सम्रुद्ध भारत घडवू शकतो,अशी मला केवळ आशाच नाही तर आत्मविश्वास सुद्धा आहे.

22 September 2012

शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील

            महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी एका शेतकरी घराण्यात २२सप्टेंबर१८८७ मध्ये भाऊरावांचा जन्म झाला. राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांची छाप त्यांच्या जीवनावर पडलेली दिसून येते. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या भाऊरावांनी सत्यशोधक चळवळीत प्रचारक म्हणून काम केले. हे काम करत असतानाच ''बहुजन समाज सुधारायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरूणोपाय नाही'' हे त्यांना कळून चुकले होते. आणि म्ह्णूनच सन १९२४ मध्ये त्यांनी "शाहू बोर्डिंग हाऊस" ची स्थापना केली. गरीब पण हुशार विद्यार्थ्यांना स्वावलंबी शिक्षण देण्याचा त्यांचा उद्देश होता. स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय, आणि स्वातंत्र्य ही त्यांच्या जीवनाची चतु:सूत्री होती. डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले.. ते जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता.
            महाराष्ट्रातील लहान लहान गावात त्यांनी आनेक शाळा काढल्या. सन १९३५ मध्ये त्यांनी "महात्मा फुले ट्रेनिंग कॉलेज" सुरू केले. सन १९४० मध्ये "महाराजा सयाजीराव हायस्कूल" व सन १९४७ मध्ये "छत्रपती शिवाजी रेसिडेन्सियल कॉलेज" त्यांनी सुरू केले. महात्मा गांधींच्या खुनानंतर आपल्या संस्थांमार्फत १०० हायस्कूले उघडण्याची केलेली प्रतिज्ञा त्यांनी केवळ १० वर्षात पूर्ण केली.भाऊरावांनी शिक्षणाची ज्ञानगंगा गरिबांच्या झोपडीपर्यंत नेऊन पोहोचवली. वसतिगृहयुक्त शिक्षणावर त्यांचा अधिक भर होता. श्रममहात्म्य, राष्ट्रीयबंधुत्व, आणि एकतेचा प्रचार त्यांनी केला. व त्याप्रमाणे ते स्वतः  वागले. स्वाभिमान व स्वत्व यांची जोपासना, अन्यायाबद्दल चीड, न्यायाची चाड, आपल्या भूमातेशी इमान, गोरगरीब समाजाविषयी करूणा व आपुलकी, सामाजिक बांधिलकीची जाण या सर्व गुणांचा संगम  भाऊरावांमध्ये होता. 
             भाऊरावांना पुणे विद्यापीठाची 'डि. लिट.' ही पदवी व शासनाचा 'पद्मभूषण 'हा किताब  मिळाला होता. ९ मे १९५९ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. खरच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या या कोल्हापुरच्या जन्मभुमीत आम्ही जन्मले याचा आम्हाला आज खुप अभिमान वाटतॊ.त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन !

21 September 2012

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गटार

               कुविचारी टाळक्याचे भांडार असलेल्या भांडारकर संस्थेमधील वर्णवर्चस्ववादी आणि जेम्स लेन यांनी कट कारस्थान करून लिहिलेल्या "दि हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया" या पुस्तकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल असलेल्या भारतीय न्यायपालिकेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुळका आणित मुक्त केले आहे.वास्तविक पाहता संविधानाच्या (१९/२) या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कलमाचा न्यायालयाने सर्वांगिण विचारच केला नाही.मुख्य म्हणजे या न्यायालयाने या कलमांच्या आधारे न्यायच दिला नाही.खरे तर न्यायालयाने न्याय दिला तो या वर्चस्ववादी नीच अभिव्यक्तीला. आमचे स्फ़ुर्तीस्थान प्राणप्रिय राजे शिवराय आणि माता जिजाऊ यांच्या बदनामी पेक्षा न्यायालयाला अभिव्यक्ती जास्त महत्वाची वाटली.या गोष्टीमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले ते म्हणजे या देशात न्याय नाही आणि तो कधीही नव्हता....
          या सर्व प्रकाराने जेम्स लेनचा खरा मेंदू बाबा पुरंदरे व त्यांचे साथीदार यांना गुद गुल्या होत नसतील  तर नवलच.एकतर स्वत:ला शिवशाहीर व शिवप्रेमी म्हणविणार्या या पुरंदरेने आपल्या हयातीत सारे शिवचरित्रच विक्रुत करून त्यांच्या जातभाईंना सोईस्कर असे शिवचरित्र अडाणी व भोळ्या समाज मनावर बिंबविण्याचे काम केले आहे.शिवरायांच्या नावावर कोट्यावदी रुपयांचा मलिदा लाटून जेम्स लेनच्या माध्यमातून शेवटी हा शिवद्रोही शाहीर जेवेलेल्या ताटातच थुकला आहे. 
          या भारतात सर्व प्रसारमाध्यमे, न्यायव्यवस्था व राजकीय व्यवस्था आपल्या मेंदुच्या इशार्यावर नाचणार्या या ब्राह्मणी निधाडांची बहुजनां प्रति असलेली  व्रुत्ती तसूभरही बदललेली नाही हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
राजकीय पोळी भाजणारे यांचेच हात
           जेम्स लेन प्रकरणातून महाराष्ट्रातील तमाम परिवर्तनवादी विचार संघटनांनी केलेल्या संघर्षामुळेच महाराष्ट्रात एक जाग्रुतीची लाट निर्माण झाली आहे.या नीच अभिव्यक्ती संपन्न विद्वानांच्या पेकाटात लाथा घालण्याची कामना जनसमुदायातून उद्रेकाच्या रुपात बाहेर येत येवू लागले आहे.हा विषय राजकारणाच्या पलीकडे तमाम बहुजनांच्या अस्मितेचा असला तरी या शिवद्रोह्यांचेच राजकीय हात आपली पोळी शेकून घेण्यासाठी पुढे सरसावत आहेत.शिवसेना, मनसे यासारखे पक्ष शिवरायांच्या प्रेमाचा फ़ुसका पुळका आणत जेम्स लेन ला नाईलाजाने निषेद करत आहेत.पण या शिवद्रोही लोकांना रस्त्यावर खेचा असे म्हणताना यांच्या थोबाडातील जीभ मात्र खुपच अडखळते आहे.
         मध्यंतरीच्या काळात मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्या दणक्याने भांबावलेल्या बाबा पुरंदरेची बाजू घेताना राज ठाकरे पुरंदरेंच्या केसाला धक्का लावणार्याचे हात छाटू अशी भाषा करीत होता जसे काय ? बापानेच याच्यासाठी ठेव म्हणुन महाराष्ट्राला परिवर्तनवादी मराठयांना आणि संभाजी ब्रिगेड ला खुले आम दम देत होता.आमच्या शिवरायांवरती व आमच्या आई जिजाऊ यांच्या इज्जतीला धुळीस मिळविणार्या या पुरंदरे विषयी याला प्रेमाच्या उकळ्या फ़ुटतात, त्याच्या संरक्षणाची काळजी वाटते. वारे ! शिवप्रेमी !
ह्यांच्या कुर्हाडीला आमचेच दांडे
                 शिवरायांच्या आणि जिजाऊंच्या इज्जतीला हात घालणार्यांना हे तळ जाताच्या फ़ोडा सारखे जपतात.वर वर मात्र शिवरायांचे नाव घ्यायचे.आतून बदनामीला साथ द्यायची आणि शिवप्रेमाचा पुळका आणित आपली राजकीय दुकानदारी वाढवायची पैसा लाटायचा आणि वेळ आली की, आमच्यावरच कुर्हाडी चालवायच्या.वाईट एवढेच की या कुर्हाडीला आमचेच दांडे असतात.झेंडे तुमचे काठ्या व काठ्या पकडणारे हात आमचेच.शिवरायांचे पोस्टर लावून शिवप्रेमाची हाक दिली की ,आमचे मराठे बांधव निघालेच आपल्याच पैशाने काठ्या घेऊन राडा करायला.यांनी राडे करून आपल्या माड्या भरायच्या या जमलेल्या पैश्याच्या ताकतीवर उन्मादावर आमच्याच बाप जाद्यांच्या आया बहिनींच्या इज्जतीचे धिंडवडे काढणार्या बाबा पुरंदरे , बहुलकर, बेडेकर यांच्या संरक्षणाची भाषा करायचीच नव्हे तर ते त्यांना पुरवायचे ही.शिवरायांच्या महाराष्ट्रातून शिवरायांच्या नावावर पैसा गोळा करायचा आणि शिवरायांची बदनामी करणार्या डुकरांना तुप पोळ्या खाऊ घालून माजवायचे.कुणाला काय का वाटेना पण गेल्या घंट्या मारी.बाबा पुरंदरे याला ठाकरे परिवाराने असेच माजवून ठेवले आणि आमच्या सांस्क्रुतीक इतिहासाच्या बोकांडी बसवले.आमच्या आदर्श शिवचरित्राला हा बाबा पुरंदरे इतका उतला आहे की त्याचे कुठल्या शब्दात वर्णन करू हे मलाच समजत नाही. सर्वोत्तम घाण उपमा सुद्धा याला कमी पडते इतका नीच माणुस आहे.स्वत:ला खुले आम शिवशाहिर म्हणवुन घेतो.अरे शिवरायांचा आमच्या डोळ्यादेखत बाप बदलणारा हा विषारी साप हार,तुरे स्विकारतो.आमचेच काही मेंदू हीन राजकारणी याचे पाय धरत असतात.ह्या सारखी या महाराष्ट्रची शरमेची आणि अक्कल गहान ठेवलेली दुसरी गोष्ट नसावी.पुण्यातील (खोट्या शिवमहालात) खरा शिवमहाल शनिवार वाड्याच्या जागी होता.या ठिकाणी माता जिजाऊ व शिवराय यांच्या सोबत नोकर दादू कोंडदेव चा पुतळा उभा करण्यामागे बाबा पुरंदरे ह्या पेशवाई किड्याचीच पुण्याई होती.खरे तर ही न्यायालयाच्या भाषेत पुरंदरेची अभिव्यक्ती आहे.बाबा पुरंदरे,निनाद बेडेकर व तमाम ब्राह्मणांनी मिळुन दादु कोंडदेव, शिवराय व जिजामाता यांचे एकत्रीत नीच ब्राह्मणी अभिव्यक्ती संपन्न शिल्प उभारले आहे.पुणे महानगरपालिका सुद्धा यांच्या पापात बेअकलीमुळे सामील झाली.
 बाबा पुरंदरे ला ही अभिव्यक्ती का सुचत नाही !
                  बाबा पुरंदरेसह , निनाद बेडेकर सारख्या ब्रह्मव्रुंदांना माझा प्रश्न आहे.तुम्हाला एखाद्या गुरुजीने शाळेत शिकवले असेलच ना ! मग तुमचा एखादा आवडता गुरुजी उदा.बाबा पुरंदरे, त्याची आई आणि तिचा नवरा दिसेल असा तो गुरुजी अशी याची एकत्रित फ़्रेम करून का लावत नाही ? अशी फ़्रेम मी स्वखर्चाने बाबा पुरंदरे व बेडेकर यांना घरात लावण्यासाठी  व जेम्स लेन ला दिसण्यासाठी देण्यास तयार आहे.इतक्या खालच्या स्तरावर जाऊन बोलण्याची ही वेळ आमच्या सारख्या शिवभक्तांवर यावी याचा आम्हाला मानसिक त्रास होतोय.पण नालायकांनो तुम्हाला त्याचा काही फ़रक पडत नाही हे नक्की ! याच बदमाशगिरिचा बादशहा असलेल्या बाबा पुरंदरेला संरक्षणाची हमी व संरक्षण देनार्या राज ठाकरेसह इतर ठाकरे कुटुंबीयांच्या शिवप्रेमाची तपासनीही आता महाराष्ट्राने करायला हवी.
आमची अभिव्यक्ती इंद्रायणीत फ़ेकता ? 
               जगाचे कल्याण आणि मानवतेच्या करूणेचा उद्गार ! तसेच जगातील सर्वोच्च तत्वज्ञानाचा अंतर्भाव असलेली आमच्या तुकोबांची गाथा इंद्रायणीत फ़ेकता.त्यांना कोर्टात खेचता.त्यांच्या वर खोटा धर्म द्रोहाचा आरोप लावून त्यांना ना ना प्रकारे छळता.राष्ट्रपिता जोतिराव फ़ुलेंनी, माता सावित्रीबाईंनी आम्हासाठी शिक्षण हे अभिव्यक्तिचे महाद्वार आमच्यासाठी खुले करू नये म्हणुन त्यांना मारेकरी घातला त्यांच्या अंगावर शेण टाकता ? शिवरायांचे चरित्र समजू नये म्हणुन कागदपत्रे जाळून टाकता ? शिवरायांची पहिली शिवजयंती साजरी करणार्या महात्मा फ़ुलेंचे संदर्भ दडवून ठेवता ? डॉ.बाबासाहेबांचे सहित्य प्रकाशित होऊ नये म्हणुन जिवाचा आटा पिटा करता.आम्ही बोललो तर जिभा छाटणारी,लिहिले तर हात तोडणारी, वाचले तर डोळे काढणारी , ऐकले तर कानात शिसे ओतणारी तुमची औलाद.जेम्स लेन व त्या १४ शिवद्रोह्यांच्या अभिव्यक्तीचा न्याय करीत आहेत.बामणांच्या चारित्राच्या इतिहासात अभिव्यक्ती गटारं तुडुंब भरली आहेत त्याची दुर्गंधी इतकी सुटली आहे की त्याची सीमा नाही.त्यांच्या या गटारघाणीयुक्त अभिव्यक्तीची घाण संस्क्रुतीच्या व धर्माच्या नावाने आता आपण किती दिवस घरात पुजायची हे सार्या मराठ्यांनी एकदाचे ठरविण्याची निर्णायक वेळ आली आहे.नाहीतर या घाणेरड्या अभिव्यक्तीची घाण घेऊन वाहणारी ह्या भटीविचाराची गटारं शिवचरित्रातच नव्हे तर आमच्या रोजच्या निर्मळ जिवनात सुद्धा वाहतच राहतील आणि परत अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली ही वर्णवर्चस्ववादी डुकरं त्यात खेळायला  मोकळी आहेतच.

16 September 2012

जेम्स लेन ब्राह्मणी षडयंत्र,राजकीय पक्ष आणि शिवप्रेमींची जबाबदारी

           कुविचारी टाळक्याचे भांडार असलेल्या भांडारकर संस्थेमधील ब्रह्मव्रुदांनी जेम्स लेन द्वारे छत्रपती शिवाजीराजे आणि राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांची बदनामी करून खर्या शिवप्रेमींच्या अंत:करणावर मोठा घाव घातला आहे. त्यामुळेच पुण्यातील शिवसैनिकांनी डिसेंबर २००३ ला जेम्स लेनचा सहलेखक श्रीकांत बहुलकर याला काळे फ़ासले तेंव्हा तत्कालीन शिवसेना नेते आणि आजचे मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रीकांत बहुलकरांची माफ़ी मागितली आणि शिवरायांची बदनामी  करणार्यांना संरक्षण दिले.आनंद देशपांडे याने शिवसेनेचे मुखपत्र दै.सामना मध्ये ७ सप्टेंबर २००३ रोजी जेम्स लेन च्या पुस्तकाचे कौतुक करणारे परिक्षण लिहिले.ब.मो.पुरंदरे याने सोलापुरच्या जनता बॅंक व्यख्यानमालेत लेनचे दि.१सप्टेंबर २०३३ रोजी कौतूक केले.शिवरायांच्या बदनामी कटाचे केंद्र भांडारकर संस्थेवर संभाजी ब्रिगेडने ५ जानेवारी २००४ कारवाई केली, तेंव्हा मीडियाने संभाजी ब्रिगेड वर आगपाखड  केली.तेंव्हा दै.देशोन्नती, दै.पुण्यनगरी, दै.पुढारी, दै.सम्राट यासारख्या वर्तमानपत्रांनी खरी बाजू जनतेसमोर ठेवली.ग्रुहमंत्री आर.आर.पाटलांनी त्याच दिवशी भांडारकर संस्थेला भेट देऊन हल्ला करणार्यांचा निषेद केला.पण शिवरायांची बदनामी करणारी भांडारकरी व्रुती ना. पाटील यांना समजताच त्यांनी आपली भुमिका बदलली आणि दि.१४ जानेवारी २००४ रोजी पुस्तकावर बंदी घातली , तेंव्हा दि.१६ जानेवारी तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी पुस्तकावर बंदी घालणे चुकिचे आहे असे मुंबई येथील जाहीत कार्यक्रमात सांगितले आणि त्याच वेळी बाळ ठाकरे उपस्थित होते, ते शांतच बसले. २२ जानेवारी रोजी दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पंढरपुर येथे अटलबिहारी वाजपेयींना काळे झेंडॆ दाखवून त्यांचा निषेद केला.तत्कालीन केंद्रीय ग्रुहमंत्री लालक्रुष्ण अडवानी यांनी सोलापुर येथे दि.१६ मार्च रोजी लेनच्या पुस्तकावर बंदी घालण्यास विरोध केला. तेंव्हा १७ मार्च रोजी उमरगा येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवानीचा रथ अडविला व निषेद केला.तर संभाजी ब्रिगेडने २० मार्च रोजी बीड येथे वाजपेयीची जाहीर सभा उधळली. 
            जेम्स लेन ला बेड्या ठोकुन फ़रफ़टत भारतात आणतो असे ओरडणार्या ना.आर.आर.पाटील यांनी लेनच्या पुण्यातील सुत्रधारांना साधी अटक देखील केली नाही.याउलट चौदा ब्राह्मणांना आणि पुरंदरे,बेडेकरांना ना.आर.आर.पाटील यांनी संरक्षण दिले.तर संभाजी ब्रिगेड च्या ७२ कार्यकर्त्यांवर कारवाई केली.सन २००४ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकात ना.आर.आर.पाटील यांनी शिवरायांच्या बदनामीचे भांडवल करून सत्ता काबीज केली.पण न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी जी  शिस्त राखायला पाहिजे होती ती राखली नाही .फ़ुले-शाहू-आंबेडरांचे नाव घेणार्या महाराष्ट्र शासनाने वकील आशुतोष कुंभकोणी या वकिलाला सरकारची बाजू मांडण्यासाठी नेमले आणि त्यामुळे मुंबई हायकोर्टात पुस्तकावरील बंदी उठविली.रयतेला न्याय देणार्या शिवरायांना त्यांच्या महाराष्ट्रातच न्याय मिळाला नाही.याला कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या सरकारचा नालायकपणा जबाबदार आहे.महाराष्ट्रातील जनतेने कॉंग्रेस - राष्ट्रवादीला लायक म्हणुन निवडले नाही तर भाजप - शिवसेनेपेक्षा कमी नालायक म्हणुन निवडले पण हे तर त्यांच्या पेक्षा नालायक निघाले.
         महाराष्ट्र सरकार सुप्रिम कोर्टात गेले.वकील रविंद्र अडसुरे यांचेकडे सदर केस होती .पण बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात्यातील जो सुप्रिम कोर्टात प्रॅक्टीस करण्यासाठीची परिक्षा अनुतिर्ण झाला आहे. अशा वकील संदीप खरडे या वकीलाला कॉंग्रेस - राष्ट्रवादी सरकारने नेमले आणि खरडे यांच्या आणि कॉंग्रेस - राष्ट्रवादी सरकारच्या नालायकपणामुळे पुस्तकावरील बंदी उठली.एरवी सर्वच पक्षाच्या नेत्यांचे वैयक्तिक प्रकरण असेल तर त्या केस मध्ये लक्ष घालणार्या नेत्यांनी शिवाजीराजांच्या प्रकरणी गांभिर्याने लक्ष घातले नाही.त्यामुळे न्यायाधिशांनी पुस्तकावरील बंदी ९ जुलै २०१० रोजी उठवली खरे तर हा निकाल संविधानाला धरून दिला नाही, अभिव्यक्ती विचाराला आहे.घटनेतील कलम १९ नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नैतिकता, सुसंस्क्रुतपणा, जबाबदार पणा, सामाजिक स्वास्थ , राखणारे लेखन असावे असे निर्बंध घातलेले आहेत.लेनचे पुस्तक हे ब्राह्मणांच्या डोक्यातील विक्रुती आहे.न्यायाधिशांनी संविधानाचा अपमान केला आहे.सारांश महाराष्ट्रातील कॉंग्रेस - राष्ट्रवादी - शिवसेना - भाजप, मनसे हे सर्वच राजकीय पक्ष केवळ शिवरायांचे नावच घेतात पण व्रुत्ती तशी नाही.त्यामुळे यांच्या कडून चांगल्या कामाची अपेक्षा करणं म्हणजे हिजड्याकडून पुत्रप्राप्तीची अपेक्षा केल्यासारखे आहे.ना.आर.आर. पाटलांनी तर शिवरायांशी गद्दारी केली आहे.शिवप्रेमी त्यांना कदापी माफ़ करणार नाहीत.ना. पाटील म्हणजे शरद पवारांचा सोंगाड्या आहेत.
             शिवप्रेमींनो काळ कठीण आहे.खचून जाऊ नका, निराश होऊ नका, शिवाजी महाराजांशी गद्दारी करणार्याचा आतापर्यंत सत्यानाश झाला आहे आणि होईल.पुस्तकाचे व शिवरायांचे अपमानाचे समर्थन करणारे जेम्स लेनचे औलाद आहेत.शिवरायांसाठी सर्वस्व पणाला लावा.शिवाजी महाराज आमच्यासाठी आग्राच्या तुरुंगात ५ महिने राहिले आणि स्वराज्यासाठी रक्त सांडले त्यांचे उपकार तर फ़ेडायला तर सात जन्म पण अपुरे आहेत. मग तुम्ही काय करणार शिवरायांसाठी ? जेम्स लेन आला आणि बदनामी करून गेला असे सहजासहजी घडलेले नाही.पुरंदरे - बेडेकर या जेम्स च्या औलादिंनी कथा, कादंबर्या, नाटके, पाठ्यपुस्तके , शिल्प याद्वारे दादू कोंडदेव , रामदास यांना शिवराय व जिजाऊ यांच्या सोबत दाखवुन त्याला समांतर  जोक तयार केला व तो जोक लेनद्वारे  ब्राह्मणांनि लिहुन आणला.दादू कोंडदेव आणि रामदास हे शिवरायांचे गुरु नव्हते हे ऐतिहासिक रित्या सिद्ध झालेले आहे.तेंव्हा शिवप्रेमींनो खर्या शिवचरित्राचा अभ्यास करा आणि विक्रुत आणि भटी महाभागांचे तोंड कायमचे बंद करा हेच शिवरायांना अभिवादन !