3 September 2012

रा.ग. गडकरीचा राजसंन्यास

            कलेचा , लेखनीचा, आपल्या प्रतिभेचा व आपल्या बुद्धिमत्तेचा वापर प्रत्येकजन विशिष्ठ हेतूने करीत असतात.कुणी समाज प्रबोधनासाठी , कुणी आपल्या सोबत सर्व मानवांचे भले होण्यासाठी कलेचा कलेचा प्रभावी वापर करत असतो, तर कोणी इतिहासाची सत्याशी इमान राखुन ऐतिहासिक महापुरुषांनी दिन-दुबळ्यांसाठी, बहुजनांसाठी केलेल्या कार्याची नोंद करून ठेवण्यासाठी व पुढील पिढीस त्या महापुरुषांकडून प्रेरणा प्राप्त व्हावी यासाठी आपल्या कलेचा, आपल्या प्रतिभेचा वापर करत असतो.पण या भारताचे दुर्भाग्य असे की, भारतातील अनेक ब्राह्मण हे बहुजन  महापुरुषांचे कार्य दुषित करण्यासाठी व या महापुरुषांकडून पुढच्या पिढीला प्रेरणा व प्रोत्साहन मिळु न देण्यासाठी  उलटपक्षी या महापुरुषांची बदनामी करण्यासाठी आपली कला, प्रतिभा, लेखनी वापरत असल्याचे अनेक वेळा जाहीर झाले आहे. 
            राम गणेश गडकरी यांनी "राजसंन्यास" या नावाने एक काल्पनिक नाटक /कथा रचुन या नाटकाआडुन शिवारायांची आणि शिवकुटुंबाची अत्यंत खालच्या पातळीचर जाऊन बदनामी केलेली आहे.या काल्पनिक नाटकाचा रचनाकार गडकरीने शिवकुटुंबाची बदनामी तर केलीच आहे पण ही बदनामी करण्यासाठी त्यांनी बहुजनांच्या दोन महत्वाच्या प्रतिकांचा / नावाचा वापर केलेला आहे आणि या दोन प्रतिकांची नावे आहेत जिवाजी आणि देहु.
        जिवाजी हे छत्रपती शिवरायांचे अत्यंत विश्वासू सेवक होते.अफ़जलखाना विरुद्धच्या मोहिमेत शिवरायांसोबत असताना "होते जिवाजी म्हणुन वाचले शिवाजी " असे इतिहासात जिवाजींच्या शिवप्रेमाची व शौर्याची नोंद आहे.सदर "राजसंन्यास" नाटकात यांच जिवाजी या नावाचा ’जिवाजीपंत’  हे काल्पनिक पात्र रंगवून राम गणेश गडकरी याने बहुजनांना अत्यंत प्रिय असलेल्या ’जिवाजी’ यांचा देखील अपमान केलेला आहे. याच शिवप्रेमी ’जिवाजी’ यांच्या नावाने रंगवलेल्या ’जिवाजीपंत’ च्या तोंडुनच शिवरायांची बदनामी गडकर्याने केलेली आहे आणि आपल्या शिवरायद्वेषाची आग शमुन घेतली आहे.ब्राह्मण इतिहासकारांनी - अभ्यासक - लेखकांनी जिवाजी महालेंचा  आदरार्थी उल्लेख कुठेही केलेला दिसत नाही.  "जिवा" असाच एकेरी उल्लेख सर्वत्र आढळून येतो. 
          दुसरे व बहुजनांचे अत्यंत प्रिय प्रतिक आहे ते "देहू", कारण देहू हे जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान व कर्मस्थान आहे. ब्राह्मणी व्यवस्थेला आपल्या अभंगातून व प्रबोधनातून हादरे देणार्या संत तुकाराम  महाराजांचे त्यांच्या हयातीपासुनच छळ करणारे ब्राह्मण जगदगुरु संत तुकाराम महाराजांना बदनाम करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. छ.शिवरायांवर संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा, वारकरी सांप्रदायाचा  व त्या माध्यमातून तुकाराम महाराज चालवत असलेल्या बहुजन मुक्ती चळवळीचा खुप मोठा प्रभाव होता हे जगप्रसिद्ध आहे.म्हणूनच राम गडकरीने शिवरायांची बदनामी करण्यासाठी मुद्दामच बहुजनांना अत्यंत आदरणीय असलेल्या शिवगुरु  जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा "देहू" या जन्मस्थळाची निवड केली. "देहू" हे संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थळाचं म्हणजे एका गावाचे नाव आहे.मागील हजारो वर्षाच्या इतिहासात "देहू" हे एखाद्या व्यक्तीचे नाव असल्याचे ऐकिवात नाही.
          ही दोन्ही छ.शिवरायांशी जवळीक असलेल्या अत्यंत प्रिय प्रतिकांचा  गडकरी " राजसंन्यास" या नाटकात पात्रांच्या रुपात वापर करून "जिवाजीपंत" व "देहू" यांच्या तोंडून पुढील प्रमाणे छत्रपतींची बदनामी केलेली आहे व ते लक्षात घेण्यासाठी "राजसंन्यास" नाटकातील वरील पात्रांच्या तोंडी बुसडवलेली काही उदाहरणे- 
१)  जिवाजीपंत : शिवाजी सोळा वर्षाचा झाला नाही तोच त्याने आडदांड लोकांची संगत धरून मुलखात पुंडाई (बंडखोरपणा, उपद्रव, लुटारूपणा) आरंभली.
२) जिवाजीपंत : या कलमाच्या करामतीने होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करून दाखविता येते !  ( म्हणजे असे तर नसेल ना की "वाघ्या" हे शिवइतिहासात "अस्तित्वात नसलेले" पात्र "अस्तित्वात आहे " असे दाखुवुन "नव्हत्याचे होते करून दाखविले आहे")
३) जिवाजीपंत : सांगु तुला देहू  ? कलमाच्या मदतीवाचुन कुठल्याही ग्रंथाचे पान हलायचे नाही बघ ! अरे, शिवाजी नुसता नावाला पुढे झाला पण खरी करणी त्या रामदासाची आह.त्याने आपला "दासबोध" ग्रंथ लिहिला नसता , तर शिवबाचा एवढा ग्रंथ कदाकाळी होताच ना ! शिवाजी भवानी तलवारीने ? नाही तुझ्या आडदांड करेलीने ? नाही ! नुसत्या भवानी तलवारीच्या नाचाने मराठेशाहीला रंग चढला नाही, तर दासबोध लिहिणारे कलम त्या सगळ्या भानगडीच्या मुळाशी होते !   आता तुच सांग बघु भवानीचे हातवारे करणारा शिवाजी थोर का कलमाने दासबोध रेखाटणारा रामदास थोर ?
४)जिवाजीपंत : काय, ग्रंथ केला रे शिवाजीने ? मी म्हणतो तसे म्हंटले तर छत्रपती शिवाजी महराजांनी असे  केले आहे तरी  काय ?
        असे अनेक उद्गार आहेत पात्रांच्या तोंडात भटी मेंदूतुन आलेली.हे तर "राजसंन्यास" आहे की "राजसत्यानास" आहे हे लगेच एका ब्राह्मणाला देखील समजु शकेल हां आता तो अमान्य करेल ही गोष्ट वेगळी आहे......
       तमाम जीवस्रुष्टीला फ़सविण्याचा, ठकविण्याचा, गंडविण्याचा आणि बदनाम करण्याचा ठेका ब्राह्मणांनीच घेतला असल्याचे गडकरी येथे अधोरेखीत करतात. अशा अमानवी , कुविचारी टाळक्यांच्या औलादिंना महात्मा फ़ुले "कलमकसाई" का म्हणतात हे यावरून स्पष्ट होते.

19 August 2012

वाघ्या कुत्रा आणि वादाचे कारण

            सध्याचे वातावरण वाघ्या कुत्र्याच्या शिल्पामुळे तापलेले आहे. शिवचरित्रात व इतर सर्व संदर्भ साधनात वाघ्याचा कुठेही उल्लेख नाही.म्हणुन एका काल्पनिक कुत्र्याचे शिल्प  शिवरायांच्या अमाधीसमोर असणे हा शिवरायांचा आणि शिवचरित्राचा अपमान आहे.त्यामुळे शासनाने हे वादग्रस्त शिल्प रायगडावरून तात्काळ हटवावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने गेल्या काही वर्षापासून लावून धरली होती.परंतू वारंवार मागणी करुनही शासनाकडून या शिल्पासंदर्भात कसलाच निर्णय न झाल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी १ ऑगस्ट २०१२ रोजी वाघ्याचे  वादग्रस्त शिल्प हटविले.काही सामाजिक संघटनांनी या कुत्र्याला आपल्या अस्मितेचे प्रतिक मानुन संभाजी ब्रिगेडच्या विरोधात अपप्रचार केला.या सामाजिक दबावाला बळी पडत शासनाने तात्काळ ते शिल्प पुनर्स्थापित केले.
        परंतू या वादात शिवरायांच्या अपमानाचा आणि वाघ्याच्या इतिहासात असण्याचा प्रश्न बाजुला पडला, मुळ प्रश्न आहे तो वाघ्या शिवचरित्र्यात असण्याचा. समकालीन संदर्भ साधनात कसलाही उल्लेख नसणार्या वाघ्याचे शिल्प केवळ दंतकथेवर आधारित आहे.शिवकाळानंतर ज्यांनी ज्यांनी रायगडचा या ना त्या प्रकारे अभ्यास केला  त्यांच्याही साहित्यात या कुत्र्याचा कसलाही उल्लेख मिळत नाही.उदाहरणादाखल : १८६९ साली "महात्मा जोतिराव फ़ुले" स्वत: रायगडावर गेले, शिवरायांची दुर्लक्षीत झालेली समाधी शोधुन काढली आणि शिवरायांवर प्रदिर्घ पोवाडा लिहिला.पण यात कुठेच वाघ्या डोकावला नाही. सन १८८१-८२ मध्ये "जेम्स डग्लज " हा इंग्रज अधिकारीही रायगडावर गेला. या अधिकार्यानेही त्याच्या "बुक ऑफ़ बॉम्बे" या पुस्तकात रायगडचे आणि शिव समाधीचे  नकाशासहीत तपशीलवार वर्णन केले आहे पण त्यांनीही वाघ्याचा कुठेही उल्लेख केला नाही.
१८८५ च्या सुमरास मुंबई इलाख्याचे गव्हर्नर असणरे "सर रिचर्ड टेम्पल" रायगड पाहण्यासाठी गेले त्यावेळी त्यांच्या सोबत "क्रॉफ़र्ड" नावाचा सहकारी होता. या सहकार्याने "सर रिचर्ड टेम्पल" यांच्या मोहिमेवर आधारीत "अवर ट्रबल  इन पुणा एण्ड डेक्कन"  हे पुस्तक लिहिले जे १८९७ मध्ये प्रकाशित झाले.या पुस्तकाचे वैशिष्ट म्हणजे "क्रॉफ़र्ड" यांनी स्वत: शिवरायांच्या शवाचे दहनस्थळ आणि समाधी याचे स्वतंत्र्य चित्र रेखाटले आहे पण याही पुस्तकात वाघ्याचा नामनिर्देश नाही.
            शिवरायांच्या समकालीन संदर्भ साहित्यात वाघ्याचा कोणताही उल्लेख नसणे आणि नंतरच्या मान्यवर लेखकांच्या लिखानातही वाघ्या नसने हे वाघ्याच्या शिल्पाचा फ़ोलपणाच सिद्ध करते. असे असताना वाघ्यासाठी शासनाचा एवढा अट्टाहास का ?
               आता काहींचं मत आहे की या वाघ्याचं अस्तित्व दाखवणारे पुरावे जर्मन लोकांनी अगदी जपुन ठेवले आहेत.आता गंमत अशी की, वाघ्या रायगडावर होता, हे जर्मनीतील लोकांना १० हजार मैलावरून दिसले, पण रायगडाच्या आसपासच्या १० मैलावरील कोणालाही तो दिसला नाही! शिवाजी महाराजांच्या काळातील एकाही माणसाला वाघ्या दिसत नाही. महाराज गेल्यानंतर २५० वर्षांनंतर झालेल्या माणसांना मात्र तो ढळढळीत दिसू लागतो!!असले चमत्कार मद्यपान केल्यानंतर सहजपणे होऊ शकतात.
           दंतकथेतील हा कुत्रा सर्वप्रथम डोकावला तो १९०५ साली "चिं. ग.गोगटे" यांच्या "महाराष्ट्र देशातील किल्ले" या पुस्तकात.या दंतकथेतील कुत्र्याचे ’वाघ्या’ असे नाटककार आद्य नाटककार ’राम गणेश गडकरी’ यांनी त्यांच्या "राजसंन्यास" या नाटकाच्या माध्यमातुन केले.गडकरींनी त्यांचे हे नाटक वाघ्याला अर्पण केलेले आहे म्हणुनच वाघ्याच्या चबुतर्याचर "राजसंन्यास" या नाटकातील काही ओळी कोरल्या आहेत.विशेष म्हणजे गडकरींचे हे नाटक शिवराय आणि शंभुराजे यांच्या बदनामीने ओतप्रत भरलेले आहे हे नाटक वाचतात वाचकांच्या लक्षात येते की , गडकरी हे काही इतिहास संशोधक नव्हते ते एक नाटककार होते.दंतकथा आणि नाटके ही जर इतिहासाच्या वस्तुनिष्ठ पुराव्यांवर टिकत नसतील तर ती एखाद्या युगपुरुषाच्या बदनामीला कारणीभुत ठरत असतील तर अशा दंतकथा नाकारल्याच पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे वाघ्याचे काल्पनिक शिल्प बसविण्यात आले आहे त्या खालील चौथरा हा शिवरायांच्या महाराणी सईबाईंची असण्याची  शक्यता काही इतिहासकारांनी वर्तवली आहे आणि यासंदर्भात इतिहासकारांचे एकमत आहे आणि  तो वाघ्याचा पुतळा शिवरायांच्या समाधीपेक्षा उंच आहे. रायगडावरील वाघ्याला काही संघटनेंचा विरोध आहे तो यामुळेच.वाघ्या कुत्र्याच्या समर्थकांनी आणि पुरातत्व खात्यानेही या कुत्र्या संदर्भात ऐतिहासिक पुरावे द्यावेत अन्यथा शिवप्रेमींची मागणी मान्य करत शिवरायांचा अपमान करणारे शिल्प ताबडतोब हटवावे.

शिवश्री डॉ. बालाजी जाधव, 
प्रकाशक पंचफ़ुला प्रकाशन,औरंगाबाद.
मराठ्यांनो षंड झालात काय ? या विक्रमी खपाच्या पुस्तकाचे लेखक

8 July 2012

समुद्रावरचा राजा - कान्होजी आंग्रे

मराठा साम्राज्याच्या आरमाराचे प्रमुख ’ सरखेल’ कान्होजी आंग्रे यांची ४ जुलै रोजी पुण्यतिथी, त्यानिमित्य त्यांच्या स्म्रुतीला उजाळा देणारा लेख.
             छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्ग येथे चाकरीला होते.१६८८ मध्ये सुवर्णदुर्ग चा किल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेऊन फ़ितूरीने किल्ला सिद्धीकडे सोपवणार असे कळल्यावर कान्होजी यांनी सिद्धीवरून किल्ला लढवला आणि पराक्रम केला.पुढे १६९८ मध्ये सरखेल सिधोजी गुजर गेल्यानंतर राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना सरखेल(आरमाराचा सरसेनापती) पद सोपवले.ते त्यांच्या म्रुत्युनंतर त्यांच्याकडेच होते.मराठा - मुघल युद्धामध्ये कोकणपट्टी सांभाळण्याचे कार्य कान्होजी आंग्रे यांनी यशस्वीरित्या पार पाडले.पोर्तुगीज, इंग्रज, आणि सिद्धी यांना त्यांनी चांगलेच जेरीस आणले आणि संपुर्ण भागात आपला वचक प्रस्थापित केला.
 जन्म आणि वैवाहिक जीवन
            कान्होजी आंग्रे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेडजवळील कालोसे या गावी १६६९ मध्ये झाला वडिलांचे नाव तुकोजी संकपाळ आणि आईचे बिम्बाबाई होते.नवसाने आणि अंगाच्या धुपाराने कन्होजींचा जन्म झाला म्हणून आंग्रे हे आडनाव लावले गेले.त्यांनी ३ लग्ने केली.पहिली पत्नी राजूबाई/मथुराबाई. यांच्याकडून त्यांना सेखोजी आणि संभाजी म्हणजेच आबासाहेब अशी २ मुले झाली.सेखोजी हे नाव त्यांच्या आजोबांच्या नावावरून ठेवले गेले.दुसरी पत्नी राधाबाई/ लक्ष्मीबाई यांच्याकडून त्यांना मानाजी आणि तुळाजी असे २ पुत्र झाले, तर तिसरी पत्नी गहिणबाई यांच्याकडून त्यांना येसाजी आणि धोंडजी असे २ पुत्र झाले.शेवटी एक मुलगी झाल्याने तिचे नाव "लाडूबाई" ठेवले गेले.
समुद्रावरचा शिवाजी
          कान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकुन घेऊन तेथे आपली राजधानी थाटली.छत्रपती महाराजांनी आंग्रे यांना आरमारचा प्रमुख केले आणि आंग्रे कोकण किणार्याचे राजे झाले.इ.स. १७०० मध्ये राणी ताराबाईंनीही या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली.या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना एकाच वेळी परकीय आणि स्वकियांबरोबर लढा द्यावा लागत होता.१७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फ़ुट पडल्यावर त्यांनी कोणाचीही बाजू न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला.पुढे त्यांचे बालमित्र असलेला बाळाजी विश्वनाथ भट (पेशवे ) याने त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर वळवंड, लोणावळा येथे तह करवला.कोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रपासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती.
परकियांना पुरुन उरले 
              सागरी भागात मुक्तपणे संचार करणार्या परकियांवर निर्बंध आले होते. १६९८ पासून मराठी राज्याची सारी सागरी सत्ता कान्होजींकडे आली होती. त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते याचा प्रतिकार करण्याचे परकियांनी ठरवले.सर्व परकियांनी एकत्रित येऊन कान्होजींना संपविण्याचे ठरवले.तरीही त्यांनी इंग्रज, पोर्तुगीजांनाही पराभुत केले.शत्रुच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कान्होजींनी दुर द्रुष्टिने अगोदरच अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवले होते.अशा संबंधांच्या मदतीने त्यांनी आपले आरमार अधिक शस्त्रसज्ज केले.पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीने जहाज बांधनीचे कारखाने त्यांनी उभारले.या सुसज्जतेसह कान्होजींनी समुद्रकिनार्यावर एक दबदबा निर्मान केला होता.कान्होजींचा लढा धार्मिक आक्रमनाची धार कमी करण्यासाठी पण होता.कान्होजी आंग्रे यांनी कोकणातील मंदिरासह , पंढरपुर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या.
         छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्रुत्युनंतरही औरंगजेबाला मराठी मुलूख काबीज करता आला नाही.यामागे अनेक शुर सरदारांचे योगदान होते.कोकण किणार्यावरील राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी हेही त्यातीलच एक. दि.४ जुलै १७२९ रोजी कान्होजींनी जगाचा निरोप घेतला.

1 July 2012

पानिपत : मराठ्यांचे कि पेशव्यांचे ?

राज्य पेशव्यांचे आणि पानिपत मराठ्यांचे कसे ? 
         पानिपत कोणाचे झाले ? असा प्रश्न विचारला की, पहिलीच्या मुलांपासून ते पदवीधर तरुणांपर्यंत सर्वजन एकच उत्तर देतात की, मराठ्यांचे पानिपत झाले.परंतू यामध्ये आपल्या मुलांचा किंवा त्या तरुणांचा दोष नाही.कारण त्यासाठी जबाबदार आहे ती  शिक्षण व्यवस्था आणि इतिहासकार वि.का.राजवाडे, अ.रा.कुलकर्णी, सेतु माधवराव पगडी, पांडुरंग सदाशिव पिसूरलेकर,व्ही.टी.गुन्हे, के.एन.चिटणीस, शं.ना.जोशी, वा.क्रु.भावे, सरदेसाई इत्यादी इतिहासकारांनी मराठ्यांचा इतिहास लिहित असताना मराठ्यांचे पानिपत झाले हा विचार इतिहासामध्ये जाणिवपुर्वक रुजवला.परंतू इतिहासाचा एक चिकीत्सक अभ्यासक या नात्याने विचार केल्यास आपणास ही गोष्ट सिद्ध करता येईल की, पानिपत हे मराठ्यांचे झाले नसून पेशव्यांचे  झाले आहे.
               इतिहासामध्ये पानिपतच्या एकुण तीन लढाया झाल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे - 
१) पहिली पानिपतची लढाई - २० एप्रिल इ.स.१५२६(इब्राहिम लोबी द बाबर)
२) दुसरी  पानिपतची लढाई - ५ नोव्हेंबर इ.स.१५५६(अकबर द हेमू)
३) तिसरी पानिपतची लढाई - १४ जानेवारी इ.स.१७६१(पेशवे द अहमदशाह अब्दाली)
            यापैकी तिसर्या पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचे नव्हे तर पेशव्यांचे पानिपत झाले, ते कसे आपण पाहू.
 मराठ्यांच्या सत्तेचा कालखंड - इ.स.१६३० ते इ.स.१७१३.
पेशव्यांचा म्हणजेच ब्राह्मणांचा कालखंड - इ.स. १७१३ ते इ.स. १८१८.
              इ.स. १७१३ मध्ये बाळाजी विश्वनाथ हा मुख्य पेशवा झाला आणि तेंव्हा पासुनच मराठा छत्रपतींच्या हाती नाममात्र सत्ता राहुन सर्व राजकीय सत्ता पेशव्यांनी आपल्या ताब्यात घेतली.त्याच मराठा राज्याची राजधानी सातारा बदलून ती पुण्यास करण्यात आली.याच बाळाजी विश्वनाथला इतिहासकार मराठा सत्तेचा दुसरा संस्थापक असे म्हणतात.
          बाळाजी विश्वनाथ नंतर पहिला बाजीराव (इ.स.१७३०-४०) हा पेशवेपदी आला. या पहिल्या बाजीरावाच्या शौर्याबद्दल तर इतिहासकार फ़ारच उदो उदो करतात.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर शौर्य आणि धाडस यासाठी पहिल्या बाजीरावाचाच क्रम लागतो, असे इतिहासकार लिहितात.कदाचित असे लिहुन छत्रपती शिवाजी महाराजांइतकी लोकप्रियता पहिल्या बाजीरावालाही मिळेल असे त्यांना वाटत असावे.पण आपण एक गोष्ट समजून घ्यायला हवी ती म्हणजे पहिल्या बाजीराव पर्यंतच मराठा स्वराज्य होते नंतर त्याचे रुपांतर पेशवाईत झाले 
          पहिल्या बाजीरावाच्या म्रुत्यूनंतर त्याचा मोठा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ़ नानासाहेब (इ.स.१७४०-६१) हा  पेशवेपदी असता याच दरम्यान म्हणजे इ.स.१७४८ मध्ये छत्रपती शाहूंचा म्रुत्यू झाला.त्यामुळे संपुर्ण मराठ्यांची सत्ता ही नानासाहेब पेशव्यांच्या हाती आली.(याचा अर्थ असा होतो की, पेशवे ठरवतील तीच पुर्व दिशा, मराठे ठरवतील ती नव्हे !).नानासाहेब पेशव्यांच्याच कालखंडात दोन महत्वाच्या घटना घडल्या 
१) अटक येथील प्रदेशावर विजय (१७५८) 
२) पानिपत लढाईमध्ये पराजय (१७६१)
            या दोन घटनांच्या विशेषणा वरून इतिहासकारांचा पक्षपातपणा लक्षात येतो. कारण इ.स.१७५८ मध्ये नानासाहेब पेशव्यांचा कनिष्ट भाऊ रघुनाथरावाने इंदुरच्या मल्हारराव होळकरांच्या मदतीने अटक किल्यावर जरीपटका फ़डकावून विजय मिळवला.या विजयाचे वर्णन करण्यासाठी इतिहासकारांनी इतिहासामध्ये एक म्हण प्रचलित केली :-
" पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले."
             काही हरकत नाही रघुनाथरावाच्या नेत्रुत्वाखाली विजय मिळवला म्हणुन इतिहासकारांनी अगदी सत्य इतिहास समाजासमोर आणण्यासाठी या म्हणीचा उपयोग केला असेल.
             परंतू अवघ्या ३ वर्षानंतर म्हणजेच इ.स.१७६१ मध्ये नानासाहेब पेशव्याचाच चुलत भाऊ सदाशिवराव याच्या नेत्रुत्वाखाली पानिपतचे युद्ध झाले.या पानिपतच्या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या "गनिमीकावा" या युद्ध तंत्राचा सदाशिवरावांनी वापर केला नाही, म्हणुनच पानिपतच्या लढाईत पेशव्यांना पराभव पत्कारावा लागला. हा पराभव आपला नसून मराठ्यांचा आहे, हे सांगण्यासाठी ढोंगी इतिहासकरांनी आणखी एक म्हण प्रचलित केली :-
" मराठ्यांचे पानिपत झाले"
           अशा प्रकारे या दोन घटनांचे विश्लेषण त्यांच्या पद्धतीने केले आहे.विजयाचे श्रेय स्वत:च्या नावावरती घेतले आणि पराजय मात्र मराठ्यांच्या नावावर खपवला.आमचे एवढेच म्हणने आहे की, पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले असतील तर पानिपतही पेशव्यांचेच झाले आणि मराठ्यांचे पानिपत झाले असेल तर अटकेपार झेंडे ही मराठ्यांनीच लावले, याला म्हणतात वस्तुनिष्ठ इतिहास लेखन करणे. परंतू वस्तुनिष्ठ इतिहास लेखन न करता त्यांना अनुकूल असा इतिहास लिहिला.
            परंतू छत्रपतींचा मावळा आता पुस्तक वाचनातून जाग्रुत होत आहे.तो आता कोणत्याही षडयंत्राला बळी पडनार नाही.कारण आता  इतिहासाच्या पुनर्लेखनास सुरुवार झाली आहे.

26 June 2012

रयतेचा राजा शाहू छत्रपती । जन्म दिन

              २६ जुन १८७४ शाहू छत्रपतींचा जन्म झाला.त्यांचे वडिल जयसिंगराव व आई राधाबाई मुधोळच्या राजकन्या म्हणुन लौकीक होता.तर जयसिंगराव उर्फ़ आबासाहेब हे कोल्हापूरचे छत्रपती बाबासाहेब महाराज यांच्या भगिनी बाळाबाई यांचे पुत्र.असा दोन्ही घराण्यांकडुन यशवंतरावांना उत्तम वारसा मिळाला होता.शाहूंचे पाळण्यातले नाव यशवंत.३जानेवारी १८७६ रोजी आबासाहेबांना दुसरे पुत्ररत्न झाले.त्यांचे नाव पिराजीराव. दोन्ही देखण्या मुलांच्या कौतुकात रमलेल्या राधाबाईंना आकाश पण ठेंगणे झाले होते.१८७७ रोजी त्या निधन पावल्या आणि दोन्ही मुले आईविना पोरकी झाली.त्यानंतर आबासाहेबांवर १८७८ मध्ये कागल जहागीर सांभाळण्याची जबाबदारी आली. मुलांबरोबर मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी १८८४ साली शाळा काढली.१८८० मध्ये त्यांनी "नेटिव्ह लायब्ररी" सुरु केली होती.रयतेच्या आरोग्यासाठी दवाखाने सडका व झाडे लावलीत. कागलचा कायापालट केला त्यामुळे कोल्हापूर संस्थानचे रिजंट म्हणुन इंग्रजांनी त्यांची नेमनुक केली २० मार्च १८८६ रोजी आबासाहेबांचे निधन झाले.
यशवंत ते छ.शाहू 
            शिवरायांनी स्थापण केलेल्या स्वराज्याचे रक्षण संभाजी राजांच्या करुण शेवटानंतर राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराबाई यांनी केले.स्वत: हाती समशेर घेऊन त्या रणरागिणीने औरंगजेबाशी दोन हात केले.औरंगजेबाच्या म्रुत्यू नंतर संभाजीपुत्र शाहू मोघलांच्या ताब्यातून सुटला, त्यांने स्वराज्यावर आपला हक्क सांगितला पण ताराराणी ने नाकारला यातूनच सातारा आणि कोल्हापूर अशी स्वराज्याची दोन शकले झालीत.कोल्हापूर संस्थानच्या संस्थापक ताराराणीच्या निधनानंतर या सिंहासनाला योग्य वारस लाभला नाही कारण या गादीचे वारस अल्पवयीन व अल्पकालीन ठरलेत.इंग्रजांचा अंमल सुरु झाल्यावर त्यांच्या मर्जीनुसार वारस नेमले जात त्या राजाचा अधिकार नाममात्र होता.अधिक्रुत वारस नसल्यामुळे जवळच्या नातलगाचा मुलगा दत्तक घेण्याची प्रथा होती त्यानुसार कोल्हापूर संस्थानचे वारस चौथे शिवाजी यांच्या गादीवर छ.शाहू यांची नेमणूक झाली.कोल्हापुर संस्थानमधील कागलच्या थोरल्या पातीचे जहागिरदार जयसिंगराव घाटगे यांचे पुत्र यशवंतराव यांनाच पुढे शाहू हे नाव मिळाले.दि.१७ मार्च १८८४ रोजी "शाहू छत्रपती " या नावाने दत्तकविधान झाले.त्यावेळी त्यांचे वय दहा वर्ष होतं.
राज्यकारभार
            राज्यकारभारात सर्वच जाती-धर्माच्या लोकांची नेमणुक करून समतोल साधला जावा ही शाहू छत्रपतींची इच्छा होती.कोल्हापूरचे संस्थान हाती घेतल्यावर शाहू छत्रपतींच्या लक्षात एक गोष्ट आली ती अशी की त्यावेळी प्रशासनात गोरे साहेब, पारशी आणि ब्राह्मण जातीतील कर्मचारी मोठ्या प्रमाणात होते. मोक्याच्या जागा विशेषत: चित्पावण ब्राह्मणांनी बळकावल्या होत्या त्यांच्या जागी हुशार व होतकरु ब्राह्मणेत्तरांना योग्य प्रतिनिधीत्व मिळवून देण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे नोकरशाहीतील ब्राह्मणी वर्चस्वाला शह बसला इ.स.१७७८ मध्ये पेशव्यांनी "शिवशक" बंद पाडुन फ़सलीशक सुरु केला होता. तो "शिवशक" छ.शाहू महाराजांनी पुन्हा सुरु केला आणि राज्यकारभारात राज्याभिषेक शकाचा वापर सुरु झाला.
        त्याचशिवाय त्यांनी अनेक शाळा , वसतीग्रुहे बांधली त्यातील पहिले वसतीग्रुह हे कोल्हापूर मध्ये बांधन्यात आले त्यामुळे कोल्हापूरला वसतीग्रुहाची जननी हा मान मिळाला.अशा अनेक पद्धतीने ब्राह्मणांचे वर्चस्व संपुष्टात आणले व संभाजीपुत्र शाहूंनी पेशव्यांच्या हातात कारभार देऊन जी चुक केली होती ती कोल्हापूरच्या राजाने सुधारली आणि पुन्हा उभारल स्वराज्य.
आरक्षणाची घोषणा
             वेदोक्त प्रकरणामुळे टिळक, शि.म.परंजपे, न.चि.केळकर, दादासाहेब खापार्डे इ. राष्ट्रीय चळवळीतील ब्राह्मण नेत्यांचे पितळ उघडे पडले.गोपाळक्रुष्ण गोखले आणि न्या.रानडे यांनीही जातीसाठी माती खान्याचा वसा घेतला.
           सातवे एडवर्ड यांच्या राज्यारोहण समारंभास शाहू महाराज इंग्लंड ला गेले होते. तेथे असतानाच त्यांनी एक क्रांतीकारक घोषणा केली.२६ जुन १९०२ रोजी महाराजांच्या आदेशानुसार कोल्हापूर ग्याजेट मध्ये आरक्षणाची घोषणा करणारे जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आले.तो जाहीरनामा असा "अलीकडे कोल्हापूर संस्थानामधील सर्व वर्गाच्या प्रजाजनांच्या शिक्षणाला उत्तेजन देण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. परंतू विशेष मागासलेल्या जातींत हे प्रयत्न अपेक्षेप्रमाणे फ़लद्रुप झाले नाहीत.या गोष्टीचा उल्लेख करताना महाराजांना मोठा विषाद वाटत आहे.या गोष्टीचा पुर्ण विचार करून महाराजांचे असे मत झाले आहे की , या निराशेचे कारण उच्च शिक्षणाची पारीतोषके विस्त्रुतरितीने विभागली जात नाहीत. ही परिस्थिती काही अंशी दुर करण्यासाठी व संस्थानमध्ये महाराजांच्या प्रजाजनांना उच्चशिक्षण संपादण्यास उत्तेजन देण्यासाठी या वर्गाकरिता आजपर्यंतच्या प्रमाणापेक्षा विस्त्रुत प्रमाणात संस्थानच्या नोकरीत जागा राखून ठेवण्याचा महाराजांचा क्रुतनिश्चय झाला आहे."
        " या धोरणाला अनुसरुन या हुकुमाच्या तारखेपासून ज्या मोकळ्या पडतील त्यापैकी शेकडा ५० जागा मागासलेल्या वर्गातील उमेदवारांना देण्यात येतील,अशी महाराजांची अनुद्न्या झाली आहे. ज्या ज्या ओफ़िसात मागासलेल्या लोकांचे प्रमाण हल्ली शेकडा ५० पेक्षा कमी आहे, त्या त्या ओफ़िसातील इत:पर मोकळी पडणारी जागा मागासलेल्या वर्गातील इसमाला देण्यात येईल. प्रत्येक खात्याच्या मुख्यांनी व हुकुमानंतर भरलेल्या जागांचा तिमाही अहवाल सादर केला पाहिजे."
          असे आरक्षण म्हणजे  ब्राह्मणी वर्चस्वाला चपराक होती.या आरक्षणानंतरच ब्राह्मण वर्गाला हादरा बसला व त्यांनी असंतोषाचा निरर्थक उद्रेक केला.त्यामध्ये टिळक आघाडीवर होते."मागासवर्गीयांना संस्थानच्या नोकर्यात ५०% जागा राखुन ठेवण्याबाबत शाहू छत्रपतींचा निर्णय, आदेश म्हणजे भारतातील आरक्षण धोरणाचा प्रारंभ होय."
रयतेचा राजा गेला
         छ.शाहूंनी बरीच समाजसुधारक कार्य केलेली आहेत. ती इथे मांडता येत नाहीत पण महाराजांचे चरित्र सविस्तर आपण वाचावे व त्यापासून काही बोध घ्यावा म्हणुन ही त्याची ओळख. आज फ़ुले-शाहू-आंबेडकर ही त्रिमुर्ती परीवर्तनाची प्रतिके आहेत.शाहू महाराज म्हणजे फ़ुले व आंबेडकर यांना जोडणारा सांधा होतातो सांधा अचानक निखळला.६ मे१९२२ रोजी सकाळी सहा वाजता त्यांना म्रुत्यु ने कवटाळले. छ.शाहू गेले पण त्यांच्या कार्याची प्रेरणा मात्र कायम आहे. त्यांच्या स्म्रुतीला कोटी कोटी प्रणाम... 

12 June 2012

मृत दादोजी करवी केले लालमहाल चे बारसे

                  पुण्यातील शिवारायांच्या या लालमहालाचं वर्णन बाबासाहेब पुरंदरेने आपल्या "राजाशिवछत्रती" या पुस्तकातही केलं आहे ते ते लिहितात- पुण्यातील वाडा बांधून पुर्ण झाला आईसाहेबांस वा शिवबास वाडा आवडला. पागा, गोशाळा, शिलेखाना, कचेरी, दफ़्तरखाना, सदर, कोठी,राहण्याचे महाल, देवघर वगैरे जागा बांधून झाल्या.मुहुर्त पाहून आईसाहेब आणि शिवबा यांना वाड्यात राहावयास पंतांनी आणलं,पंतांनी वाडा तर अगदी सायसंगीन,दणकट,पण झोकदार बांधला.वाड्याला पंतांनी नाव दिलं "लालमहाल".त्यांनी वाड्याचे जोते पूर्व पश्चिम १७॥ गज लांब व दक्षिण - उत्तर २८॥ गज रूंद (५२॥ x ८३॥)धरले होते.वाड्याची उंची १०। गज (३०॥ फ़ूट) होती.आत चौकात कारंजी तयार केली होती.कारंजाचे पश्चिमेस भव्य प्रशस्त सदर होती.सदर म्हणजे छोटासा दरबारी महालच. वाड्यात पाण्याचा मुबलक पुरवठा केला होता.तीन विहिरी बांधल्या होत्या.पंतांनी अस थाट एकूण केला होता.शिवाय लालमहालात तळघरं बरीच बांधली होती.तळघरांची खोली ४॥ गज (१२ ॥ फ़ुट) होती.
         पुरंदरेनी लालमहालाचं वर्णन मोठं बहारीचं व त्याचा भव्य विस्तार स्पष्ट करणारं केलं असलं तरी तो पंतांनी म्हणजे दादोजी कोंडदेव ने बांधला व पंतांनीच त्याला लाल महाल असं नाव ठेवलं, अशी चुकीची माहीती त्यात आहे.कदाचीत वर्णन करण्याच्या भरात आणि दादोजी कोंडदेव ला मोठं करण्याच्या कैफ़ात त्यांना शिवाजी महाराज आणि जिजाऊमांसाहेब या दादोजी कोंडदेव वारल्यानंतर (दादू इ.स.१६४७ ला वारला) दोन-तीन वर्षांनी म्हणजे इ.स. १६४८ -४९ ला पुण्यात कायम मुक्कामास आले.हे ऐतिहासिक सत्य पुरंदरे विसरले.त्यामुळे त्याने वारलेल्या दादोजी कोंडदेव पंतास लालमहाल बांधण्याचा व त्याचं बारसं घालण्याचा मान दिला.शिवाजी महाराज व जिजामाता खेडला राहात असल्या तरी ते काही काळासाठी पुण्यात येऊन राहत होते.पण ते लालमहालात नव्हे, तर पुण्याच्या झांबरे पाटलांच्या वाड्यात राहत असत.त्यावेळी पंताच्या हयातीत लालमहाल बांधलाच नव्हता.तसे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत.शिवाय शिवरायांना शहाजी महाराजांनी बंगरूळहून इ.स.१६४२ मध्ये पुणे जहागिरीवर पाठवलं, तेंव्हा ते पहिल्यांदा खेड ला राहिले.या संदर्भात जेधे करीन्यात स्पष्टपणे लिहिलंय - महाराजांनी (शहाजी महाराजांनी) राजश्री सिवाजीराजे यासमागमे (सोबत)  राजश्री सामराजपंत पेशवे व मानकोजी दहातोंडे सरनोबत व बालाजी हरी मज्यालसी व कारकून व स्वराजा जमाव देऊन पुण्यास पाठवले त्यावरी कसबे खेडेबारे येथे वाडे बांधले.या पुराव्याला पुष्टी देणार्या अनेक निंदी उपलब्ध आहेत.