Showing posts with label बहुजन महापुरुष. Show all posts
Showing posts with label बहुजन महापुरुष. Show all posts

30 May 2013

स्वराज्याचे शिलेदार - सेनापती संताजी घोरपडे

           संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे (१६८९ ते १६९७) सरसेनापती होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धूरा वाहिली. संताजी घोरपडे हे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत मराठेशाहीत घेतले जाते. या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ (१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा सामना केला,मुघल सैनिकां मध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रंचड दहशत होती. सार्वत्रिकरीत्या मुघल छावण्यांवर हल्ले हे त्यांच्या युद्धनीतीचा भाग होते. अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे औरंगजेबचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसे नंतर धनाजींनी स्वराज्य पसरवण्याचे धोरण अवलंबले. १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यू समयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला होता. शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले. मराठ्यांनी १८ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला. त्यांच्या एका मोहिमेचा हा किस्सा ....... 
           शंभूराजानंतर राजाराम महाराजांनाही आता औरंगजेब वाट मोकळी करत नव्हता त्यामुळे पन्हाळ्या वरूनच राजाराम महाराज राजकारभार पाहत होते. सर्व मराठा मावळ्यांमध्ये एक शल्य होते आणि ते म्हणजे संभाजी महाराजांसाठी काहीच करू शकलो नाही ,मनात ठासून राग भरला होता पण याला पर्याय काय ? कोण घेणार पुढाकार ? कोण राखणार स्वराज्य ? कोण राखणार शिवरायांची शान ? कोण मिळवून देणार मावळ्यांचा आत्मविश्वास ? आणि याचा उद्रेक शेवटी होणार तो झालाच.मराठा सरदारांच्या गुप्त बैठका सुरु झाल्या.. कसे उट्टे काढायचे ? कसा बदला घ्यायचा ? त्या औरंग्याची दात घशात कशी घालायची ? कसे दाखवायचे मराठ्यांचे सळसळते रक्त ? कोण येणार पुढे ? गुप्त सल्लामसलतीमध्ये आघाडीवर होते संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव, सोबतीला संताजींचे दोन बंधू बहिर्जी आणि मालोजी सोबत विठोजी चव्हाण तसेच आणखी काही शूर सेनानी..या गुप्त बैठकीत धाडसी बेत ठरला कि औरंग्याला त्याचाच छावणीत घुसून लज्जित करायचा..त्याचा पाडाव करायचा. त्यात सोन्याहून पिवळी एक गोष्ट म्हणजे शंभूराजांचा बदला तुळापुर येथेच करायचा कारण औरंग्या इथेच होता.. (तुळापुर जिथे संभाजीराजांना मारण्यात आले) चर्चा झाली.. निर्णय ठरला.. धनाजीरावांकडे पाहत संताजी घोरपडे म्हणाले “खानाचा माज तुम्ही जिरवा फलटणला आणि मी खुद्द २००० निवडक मावळ्यान्सोबत औरंग्याला मराठ्यांचा रुद्रावतार दाखवितो, दाखवितो मराठे आजही आहेत.. तुमास्नी आसमंत दाखवायास”या निर्णयावर शिक्कामोर्तब करणे इतके सोपे नव्हते परंतु संताजींनी सर्व मोहीम नियोजनबद्ध आखली, दस्तुरखुद्द संताजींनी एका एका मावळ्याला प्रत्यक्ष भेटून त्याचा जोश वाढविला आणि प्रसंगी संयम राखण्याचा सल्ला दिला.. हळूहळू संताजींची हि तुकडी तुळापुरकडे कूच करू लागली, औरंग्याला त्यावेळी विचारसुद्धा नव्हता कि अशी त्याची वाट मावळे लावतील,भयान अंधारातून पायवाट काढली जाऊ लागली, झाडाझुडपाचा, पालापाचोळ्याचा आणि रातकिड्याचा आवाज कानी घुमू लागला.. तुळापुर जसजस जवळ येत होत तसतस मुघलांची घुबड दिसू लागली.
        रात्रीची भयाण शांतता तुळापुरभोवती पसरलेली होती.. त्यावेळेस काही मराठी लोकांच्या फौजही औरंग्याकडे होत्याच त्यामुळे मुघल सैन्याला वाटले आपलीच माणसे असतील……. आणि नेमका याच गोष्टीचा आणि या अंधाराचा फायदा घेत मावळ्यांची तुकडी थेट औरंग्याच्या छावणीत घुसली,काही कळायच्या आतच मावळ्यांनी “हर हर महादेव” चा जयघोष करत आणि “जय भवानी, जय शिवाजी” या नावाने मोघलांची अक्षरशः कत्तलच सुरु केली शीर धडावेगळे होत होते, कुठे नुसती रक्ताची चिळकांडी दिसून येत होती.औरंग्यासोबत अख्खी त्याची लाखोंची सेना भांबावून गेली होती, या अवस्थेत ते स्वतःच्याच सैन्यासोबत युद्ध करू लागलेबरगडीत मराठ्यांच्या तळपत्या तलवारी घुसून बाहेर पडू लागल्याने तडफडत जीव सोडू लागले.एकच हल्लकल्लोळ सुरु झाला परंतु तरीही संताजींचा एक मनोदय फसला तो म्हणजे औरंग्याला भुईसपाट करायचा अंगरक्षकांनी अक्षरशः पळवूनच नेले त्याला. जेवढे प्रचंड नुकसान करता येईल तेवढे करत करत शेवटी औरंग्याचा तंबुच उखडून टाकला.. औरंग्याचा डेरा भुईसपाट करून त्याचा सुवर्ण कलश निशाणी म्हणून घेऊन संताजींनी मावळ्यांना माघारी फिरण्याचा आदेश दिला.याअगोदर कि औरंग्याची सेना तयार होईल छोट्या छोट्या तुकडीत विभागून संताजींनी मावळ्यांना शेवटी मोहीम सिंहगडाकडे कूच करण्याचा आदेश दिला…. मोहीम फत्ते झाली होती.
रणझुंझार सेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा सलाम........!!!
“ जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे

19 May 2013

स्वराज्याचे शिलेदार - गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक

          स्वराज्य स्थापनेच्या कार्यात श्री शिवरायांच्या पराक्रमी अनुयायांबरोबरच त्यांच्या गुप्तहेर खात्याचा सुद्धा अत्यंत उपयुक्त सहभाग होता. स्वकीय विरोधक व उघड शत्रू यांच्या हालचाली, दूरवरच्या प्रदेशातील परिस्थिती इ. माहिती वेळच्या वेळी मिळण्यावर राजकीय आणि सैनिकी यश अवलंबून आहे हे ओळखून शिवराय गुप्तहेर खात्यावर भरपूर पैसा खर्च करत. शत्रूच्या हालचाली आणि गुप्त कारवाया तसेच शत्रुप्रदेशातील संपन्न शहरे, खजिन्याच्या जागा,हल्ल्यासाठी जाण्याचा आणि परत येण्याचा मार्ग इत्यादी गोष्टींची गुप्तहेरांमार्फत खडानखडा माहिती मिळवून श्री शिवरायांनी अनेक धाडसी हल्ले करून शत्रूंची शहरे लुटली.छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते. या गुप्तहेरांपैकी एक नाव प्रसिद्धीस आले ते म्हणजे बहिर्जी नाईक यांचे. बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवातीपासुन ते महाराजांच्या निधनापर्यंतचा चा साक्षीदार म्हणजेच बहिर्जी नाईक होते.
           दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. महाराजांनी त्यांच्यातील कसब ओळखली, नाईक स्वराज्यनिर्मीतीच्या कामाला हिरा आहेत हे राज्यांनी ओळखेले आणि तात्काळ त्यांना त्या कामात रुजु करुन घेतले. महाराज नेहमी आपल्या माणसांतील गुण ओळखुन त्यांना कामे वाटत असत. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. त्यामुळे राज्यांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजु करुन घेतले.
          बहिर्जी नाईक यांचे गुण सांगायचे ठरले तर अंगात स्फ़ुरण आल्याशिवाय राहणार नाही. नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. फ़किर, वासुदेव, कोळि, भिकारी, संत, अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातुन शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होतं. ह्यातं सर्वात मोठं आश्चर्य हे कि विजापुरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व स्व:त अदिलशहा व बादशहा कडुन ते पक्कि माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच त्यांची बुद्धीमत्ता व चातुर्य दिसुन येतं.
         महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तिन ते चार हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होतं. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापुर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकिची माहिती देणार्यास कडॆलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणुकाही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वार्याचे आवाज असे. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचं. त्याठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत. असं म्हटलं जात कि, महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फ़क्त महराजांनाच ओळखायचे-थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहिच अशी सर्वांची समजुत असायची. ते फ़क्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहिर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहित होते. कुठल्याही घटणेचा ते खुप बारकाईने विचार करी. शत्रुचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रुला चुकिची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रुच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहीती ते ठेवत.
         शिवाजी राजे व शंभु राजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काहि दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पुर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्यात लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले. हा एकच प्रसंग परंतु महारांजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणुन त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफ़जलखानाचा वध, पन्हाळ्यावरुन सुटका, शाईस्ताखाणाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लुट असो प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पुर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रुची इत्यंभुत माहिती महाराजांना दिली होती.बर्याच वेळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्यांचा विचार करुन पाऊल टाके. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्ट मंडळाची निर्मीती केली होती त्यात गुप्तहेर खातं तयार करण्यात आलं होतं. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते.
        राजगडापासून जवळपास ५०० कि.मी. अंतरावर असणारी सुरत हि व्यापारी पेठ लुटण्याचे ठरताच सुरतेची संपूर्ण माहिती, एवढेच नव्हे तर कुठे निश्चितपणे भरपूर धन हाती लागेल अशा सुरतेमधील ठिकाणांची तपशीलवार माहिती आणण्याच्या कामी महाराजांनी बहिर्जी यांना पाठविले. अचूक योजनेसाठी लागणारी अचूक माहिती बहिर्जी नाईकांनी किती कसोशीने मिळविली हे सुरतेची केवळ पाचच दिवसात लुटलेली कोट्यावधींची संपत्ती सांगते. या माहितीसाठी बहिर्जींनी कुठली सोंगे घेतली, गुप्त जागी ठेवलेल्या धनाचा पत्ता कसा लावला हे आजही आपल्यासून गुप्त आहे.१६७९ साली जालानापूर लुटून महाराज येत असताना ती बातमी लागून संगमनेराजवळ मोगली सैन्याने मराठ्यांना गाठून कोंडीत पकडण्याची वेळ आणली होती. या भागातील डोंगरातील गुप्त वाटांची माहिती असणाऱ्या बहिर्जी नाईकांनी महाराजांना लुटीसह सुरक्षितपणे पट्टा उर्फ विश्रामगड या किल्ल्यावर पोहचविले.हेर हे राजाचे डोळे आणि कान असतात हि म्हण सार्थ करणारे बहिर्जी नाईक महाराजांच्या अनेक यशस्वी मोहिमांमागे,धाडसी हल्ल्यांमागे, दूरवरच्या प्रदेशात अचानक जाउन केलेल्या लुटीमागे आणि सुखरूप परत येण्यामागे असणारी कल्पक, चतुर, प्रसंगावधानी आणि हरहुन्नरी व्यक्ती. 
           अश्या ह्या बहिर्जी नाईकांपासुन व त्यांच्या हुशारी पासुन आपण शिकण्यासारखं बरच काहि आहे. हे शक्य झालं नाही तरी नाईकांचे स्वराज्यासाठीचे लाखमोलाचे योगदान विसरु नका.

11 April 2013

शाहू छत्रपतींचा जातीअंताचा लढा

              राजर्षी शाहू छत्रपती यांच्या काळातील फ़ार गाजलेले वेदोक्त प्रकरण तर समद्यास्नी ठाऊक असेलच.त्या वेदोक्त प्रकरणात थुसिडाईडस या तत्वज्ञानाच्या "आमचे मालक होणे तुमच्या हिताचे असेल पण तुमचे गुलाम बनण्यात आमचे कोणते हित आहे ?" या वचनाची प्रचिती आणि अनुभव शाहू महाराजांना आला.वेदोक्त प्रकरणाचे मुळ हिंदुंच्या वर्णव्यवस्थेच्या आधारीत असणार्या समाजरचनेत शोधावे लागते.हिंदु मध्ये ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य आणि क्षुद्र हे चार वर्ण मानले जात होते पण नंतर त्यातही बदल घडला शुरवीर(?) परशुराम याने प्रुथ्विवरील क्षत्रिय नष्ट केले आणि वैश्य आपोआप नष्ट झाले.त्यामुळे या विश्वात ब्राह्मण आणि क्षुद्र असे दोनच वर्ण शिल्लक राहिले.जे ब्राह्मणेत्तर आहेत त्यांना क्षुद्र समजले जाते.वेदोक्त मंत्रांप्रमाणे आपले धार्मिक संस्कार करून घेता येतील ते फ़क्त ब्राह्मणांना.पण ब्राह्मणेत्तरांना मात्र आपले धार्मिक संस्कार वेदोक्त पद्धतीनुसार करण्याचा अधिकार नव्हता.ब्राह्मणेत्तर आपले धार्मिक संस्कार पुराणोक्त पद्धतीने करू शकत होता.पुरोणोक्त पद्धत म्हणजे जे धार्मिक संस्कार पुराणातील मंत्राच्या आधारे केले जातात व वेदोक्त पद्धत म्हणजे वेदातील मंत्राप्रमाणे केले जातात.वेद हे   अपौरुषेय आहे तर पुराणे ही मानवाने रचलेली आहेत.
          हिंदू धर्मातील चार वर्णात ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ मानण्यात आले होते.म्हणूनच हिंदू समाजरचणेत आपणच सर्वश्रेष्ठ आहोत,इतरांचे गुरुपद आणि नेत्रुत्व ही आमची मिरासदारी राहिली पाहिजे,आमचे वर्तन भ्रष्ट झाले तरी त्यामुळे आमच्या श्रेष्ठ्त्वाला काहीच बाधा येवू शकत नाही अशी आडमुठी भुमिका ब्राह्मण वर्गाकडून मांडली जाऊ लागली.या दर्पोक्तीतच जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ हे त्यांचे ब्रीदवाक्य खरे ठरू पाहत होते.या मिरासदारीच्या दर्पोअक्तीतुनच ब्राह्मणांनी मराठे हे क्षत्रिय नसून क्षुद्र आहेत असे म्हणुन वेदोक्ताचा अधिकार नाकारला.
            शाहू छत्रपतींचा जन्म घाटगे नामक मराठा कुळात झाला असल्याने त्यांना क्षत्रियांच्या वेदोक्त संस्कार पद्धतीने आपले धार्मिक विधी करून घेता येणार नाहीत अशी दुराग्रही भुमिका घेतली.त्यातूनच छत्रपतींचा आश्रित असणार्या नारायण भटाने शाहुंच्या १८९९ सालच्या पंचगंगेतील पवित्र कार्तिक स्नानाच्या वेळी बुरस्या अंगाणे पुराणोक्त मंत्र उच्चारून उद्दामपणे म्हंटले ,धर्मानुसार ब्राह्मण श्रेष्ठ आहेत आणि सर्वशक्तिमान ब्राह्मणवर्ग तुम्हाला क्षत्रिय म्हणून मान्यता देत नाही,तोपर्यंत तुम्ही क्षत्रिय कुळावतंस अशी बिरुदावली जरी मिरवली तरी तुम्ही आमच्यासाठी क्षुद्रच.
या अपमानाचे जहर पचवून उद्याची समाजक्रांती घडविण्यासाठी शाहू छत्रपतींच्या मनात अंतर्यामी कोठेतरी विद्रोहाची एक ठिणगी हळूहळू पेट घेत होती.वेदोक्त वादाची सुरुवात करणारा पंचगंगेच्या काठी घडलेला शाहू छत्रपतींचा अपमान करणारा तो प्रसंग छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील क्रांतिकारक क्षण होता.चेदोक्त वादात सनातनी ब्रह्मव्रुंदांनी त्यांचा अत्यंत मानसिक छळ केला.त्यामुळे हिंदू समाजरचणेत प्रत्येक व्यक्तिचा सामाजिक दर्जा ठरविण्याचा जो ब्राह्मणांना सार्वभौम अधिकार होता,त्या अधिकारालाच आव्हान देऊन ब्राह्मणांचे वर्चस्व कमी करण्याचा जबरदस्त प्रयत्न वेदोक्त वादातून शाहू छत्रपतींनी केला.वेदोक्त प्रकरणाने त्यांना दिव्यद्रुष्टी लाभली.त्यानंतर त्यांनी आपली सत्ता व संपत्ती शुद्रातिशुद्रांच्या कल्याणासाठी उपयोगात आणण्याचे अलौकिक कार्य हाती घेतले.वेदोक्त प्रकरणानंतर शाहू महाराज जातीय विषमता नष्ट करण्याच्या प्रयत्नाला लागले.हिंदू समाजातील वर्णव्यवस्था व सम्रुद्धीचे जीवन जगता यावे म्हणून उच्चवर्णीयांसाठी निर्माण करण्यात आलेली सर्वच क्षेत्रातील १०० टक्के राखीव जागांचीच व्यवस्था होती.जातीय समानता प्रस्थापित करणे म्हणजे जातीसंस्थेच्या अस्तित्वाला सुरुंग लावणे हे समीकरण शाहू राजांच्या मनात पक्के रुजले होते.जातीसंस्था नष्ट करण्यासाठी तथाकथित उच्च जातींनीच जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत असा छत्रपती शाहूंचा ठाम विश्वास होता.जपान देशातील जातीभेदाचा बीमोड होण्याचे कारण उच्च वर्गाच्या सामुराई लोकांनी सुरुवात केली हेच आहे.म्हणुनच जपान आज महासत्ता आहे.
             शाहू महाराज जातीसंस्था नष्ट करण्याच्या द्रुष्टीने अनेक क्रांतिकारक निर्णय घेऊन कटाक्षाने त्यांची प्रत्येक्ष अंमलबजावणी करत होते.त्यांची जातीसंस्था संपविण्याच्या द्रुष्टीकोणातून आंतरजातीय विवाहाचा प्रयोग आपल्याच राजघराण्यात केला.शाहू महाराजांची चुलत भगिनी चंद्रप्रभा व इंदुरचे युवराज यसवंतराव होळकर यांचा मराठा-धनगर या दोन्ही पक्षांनी ठरवलेला सुनियोजित आंतरजातीय विवाह ९ फ़ेब्रुवारी १९२४ रोजी इंदुर मुक्कामी मोठ्या थाटामाटात साजरा झाला.परंतू हा विवाह पाहण्यास शाहू छत्रपती हजर नव्हते कारण ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले होते.डॉ.बाबसाहेब आंबेडकरांनी एका ब्राह्मण महिलेशी आंतरजातीय विवाह करून असाच आदर्श समाजाला घालून दिला आहे.
             "विद्येविना मती गेली,मतीविना नीती गेली" हा महात्मा फ़ुले यांचा आदर्श समोर ठेवून छत्रपती शाहूंनी १९०१ ते १९२२ पर्यंत आपली राजधानी कोल्हापूर शहरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, ख्रिश्चन, महार, सोनार, शिंपी, पांचाळ, ब्राह्मण, प्रभू, वैश्य, ढोर, चांभार, सुतार, इ.विविध धर्माच्या आणि अठरापगड जातींच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक शाळा व  अनेक वसतीग्रुहे सुरु केलीत.अस्प्रुष्यांना त्यांनी शिक्षणाचे दरवाजे खुले केलेत आणि कोरवी,वडार, फ़ासेपारदी यांसारख्या गावकुसाबाहेरील जाती जमातींच्या मुलांना सुद्धा त्यांनी शिक्षणाच्या परिघात आणले.त्यांनी सर्वांना प्राथमिक शिक्षण मोफ़त व सक्तीचे केले.१८३५ साली हंटर कमिशनसमोर महात्मा ज्योतिराव फ़ुले यांनी बहुजन समाजातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण  सक्तीचे करण्याची मागणी केली होती.त्यांनी १८५१ मध्ये महार, मांग, समाजातील मुलांसाठी पुण्यात पहिली भारतीय शाळा काढली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये अनुच्छेद ४५ अन्वये १४ वर्षापर्यंतच्या मुलांना मोफ़त व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद केली आहे.परंतू केंद्र सरकारला सदरहू कायदा करण्यासाठी २००९ साल उजडावे लागले त्यातही चालाखी करण्यात आली.पहिली ते आठवी परिक्षा न घेता विद्यार्थ्यांना सरसकट वरच्या वर्गात ढकलायचे आहे.परीक्षाच नाही तर गुणवत्ता कशी कळणार ? याचा दुष्परिणाम असा होईल की पुढील पिढ्यांच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता आठवी पास आणि नववी नापास अशी राहिल.भारतात आज परकिय इंग्रजांचे सरकार आहे की लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले सांददिय लोकशाही सरकार आहे.संभ्रम निर्माण करणारा हा परिक्षा न घेण्याचा निर्णय आहे.असा निष्कर्ष काढण्यावाचुन पर्याय नाही.
              राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील स्नेहसंबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते.३१ जानेवारी १९२० रोजी डॉ.बाबासाहेब यांनी "मुकनायक" हे पत्रक सुरु केले.त्या व्रुत्तपत्रास छत्रपती शाहूंनी २५०० रुपयांची भरघोस मदत दिली होती.शाहू छत्रपतींनी "मुकनायक" ला आर्थिक मदत देऊन पाठीशी सर्वशक्तीनिशी उभे असतात तर दुसरीकडे टिळकांचा "केसरी" पैसे देऊनसुद्धा अस्प्रुष्यांच्या व्रुत्तपत्राची जहिरात देखील छापण्यास तयार नव्हता, हि बाब लक्षात घेतली पाहिजे.१९०२ पासून १९२० पर्यंत शाहूंनी आपल्या संस्थानात मागासवर्गीयांसाठी राखीव जागा, अस्प्रुष्यांसाठी मोफ़त शिक्षणाची सोय,इत्यादि कार्य केले आहेत.
            ज्या मंडल आयोगामुळे आज ओबीसींना २७ टक्के राखीव जागा मिळाल्या आहेत,त्या ओ.बी.सी.च्या प्रतिनिधित्वाचा प्रस्ताव सर्वप्रथम राष्ट्रपिता ज्योतिराव फ़ुले यांनी आपल्या "शेतकर्याचा आसूड" या ग्रंथात मांडला.तर शाहू छत्रपतींनी अस्प्रुष्यता नष्ट करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून २६ जुलै १९०२ रोजी आपल्या संस्थानातील मागासलेल्या जातींसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्याचा जाहीरनामा काढला.मागासवर्गीय व ओबीसींचा भाग्योदय राष्ट्रपिता फ़ुले,छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या प्रचंड संघर्षाचे फ़लित आहे.हे मान्य करावेच लागेल.टिळकांनी तर "तेल्या तांबोळ्यांना संसदेत जाऊन काय नांगर हाकायचा आहे ? " अशी भुमिका घॆऊन या वर्गाचे हक्क नाकारले होते.असे असूनही ओबीसी या तीन महापुरुषांचे विचार स्विकारत नाहीत, हीच आजची शोकांतिका आहे.
          राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फ़ुले यांचे विचार हीच छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा होती.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तर महात्मा फ़ुलेंना तिसरे गुरु मानले होते.महात्मा फ़ुलेंचा जन्म ११ एप्रिल १८२७ व म्रुत्यू २८ नोव्हेंबर १८९०, छत्रपती शाहुंचा जन्म २६ जुन १८७४ व म्रुत्यू ६ मे १९२२ तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ व म्रुत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी झाला.१८२७ ते १९५६ अशा १२९ वर्षाच्या कालखंडातील या तीन महापुरुषांनी केलेल्या सामाजिक संघर्षामुळे हजारो वर्षे उच्चवर्णीयांच्या जुलमी सत्तेखाली दडपला गेलेला बहिष्क्रुत आणि ओबीसी समाज त्यांच्या सामाजिक व अर्थिक गुलामितून मुक्त झाला.या तीन विभुतींनी या देशाचा सामाजिक,सांस्क्रुतीक व राजकीय इतिहास बदलून टाकला आणि सर्वसामान्य माणसाला भयमुक्त जीवन जगण्याचे स्वातंत्र्य बहाल केले.
             जर फ़ुले-शाहू-आंबेडकर यांचे अनुयायी एकत्र आले तर देशातील जातीव्यवस्था नष्ट होऊन सामाजिक समता प्रस्थापित होण्यास वेळ लागणार नाही.आज मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी मागणी होत आहे.परवाच महामोर्चा निघाला मुंबईमध्ये.कालचे तालेवार जमीनदार मराठे आज अल्पभुधारक आणि भुमिहीन होत आहे.तरीही सुंभ जळाला पण जातीय अहंकाराचा पीळ अजुन कायम आहे.त्यामुळे मराठ्यांनी शाहू राजांना स्विकारले नाही.हे आजचे दाहक वास्तव्य आहे.पण आंबेडकरांच्या अनुयायींनी मात्र फ़ुले आणि शाहू यांना स्विकारले आहे.कारण फ़ुले-शाहू आणि आंबेडकरांचे कार्य परस्परांशी पुरक आहे.म्हणूनच आंबेडकरांच्या अनुयायींनी सर्वा जाती-जमातींना एकत्र जोडण्यासाठी आपल्या चळवळीला फ़ुले-शाहू-आंबेडकर चळवळ अशी सर्वसमावेशक केली आहे.हि चळवळ व्रुद्धिवंत होऊन फ़ुले-शाहू-आंबेडकरांचे जातीविरहीत एकसंघ भारताचे स्वप्न साकार होईल,अशी आशा करूया.राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याला विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी मानाचा मुजरा !...

2 April 2013

कुळवाडीभूषण छ.शिवाजी महाराज

           आजपर्यंतच्या जागतिक इतिहास तज्ञांच्या मते कोणालाही राजा होण्यासाठी त्यांच्या अलौकिक राजगुणांची आवश्यकता असली पाहिजे.हे अलौकिक राजगुण कोणते ? याबाबत इटालियन जागतिक किर्तिचे तज्ञ "मॅकिल व्हॅली" यांनी अलौकिक राजगुणांची काही तत्वे आजपर्यंत कोणात्याही इतिहासकाराने आक्षेपार्ह मानली नाहीत ती सर्व मान्य ठरतात.
         मॅकिल व्हॅली यांनी ही राजगुणांची तत्वे दोन विभागात मांडली असून ती पुढीलप्रमाणे :
१) न्याय नीती व चारित्र्य : - राजा हा दिसण्यास सर्वसाधारणपणे सुंदर असावा.तो निरोगी व आरोग्य संपन्न असावा.तो हुशार आणि बुद्धिमान असावा.त्यांची नैतिक पातळी उच्च दर्जाची असावी. तो आध्यात्मिक आणि तात्विक ज्ञान संपन्न असावा.तो कर्तव्यदक्ष, नि:स्वार्थी आणि संयमी तसेच जनतेसाठी झटणारा असावा.स्त्रीदाक्षिण्य हा गुणही त्याच्या असावा.
२)इतर गुण :- राजा हा सिंहाप्रमाणे शुर असावा.नीती व अनीतीचा वेळप्रसंगी विचार करणारा असावा.त्याला द्रव्याची अभिलाषा नसावी.तो इतर कोणाच्या धर्मात हस्तक्षेप करणारा नसावा.न्याय व नीती ही तत्वे मुख्य अंग असले पाहिजे.
वरीलप्रमाणे असणार्या राजगुणांचा विचार करता जगातील अत्यंत पराक्रमी ज्येते म्हणजे नेपोलियन,सिकंदर,ज्युलियस,हॉलिबूड रॉबर्ट वगैरे अनेक देशी - विदेशी राजांचा व छत्रपती शिवाजी राजांचा तुलनात्मकद्रुष्ट्या अभ्यास करता शिवाजी राजांच्या नैतिकतेशी हे पराक्रमी राजे बरोबरी करू शकत नाहीत कारण 
* २७ वर्षे घोड्यावरील मांड कधी काढली नाही व आपली तलवार कधी म्यान केली नाही
* मद्याच्या थेंबालाही कधी स्पर्श केला नाही.
* स्त्रियांना मातेसमान मानले,एवढेच नाही तर शत्रुपक्षातील स्त्रियांना साडी चोळी देऊन सत्कार केला व त्यांचे रक्षण केले. 
* शिवरायांनी कधी मद्याची अभिलाषा केली नाही.
* शिवरायांनी इतर धर्मियांना सहिष्णूतेची वागणूक दिली.
* विशेष म्हणजे छ.शिवरायांनी न्याय व नीतीचा योग्य वापर करून रयतेसाठी राज्य निर्माण केले होते.
वरीलप्रमाणे जागतिक इतिहासकारांनी शिवाजी महाराजांचे अलौकिकत्व मान्य करून हा राजा सर्वात श्रेष्ठ आहे असा निष्कर्ष काढला.
             जागतिक इतिहास तज्ञांचे निष्कर्ष लक्षात घेता हे सिद्ध होते की मध्ययुगीन कालखंडात असा एक राजा होऊन गेला की,असा राजा आजतागायत झाला नाही आणि तेथुन पुढेही होणार नाही.असा राजा म्हणजे कुळवाडी भूषण बहुजनप्रतिपालक छ.शिवाजी महाराज.
           छत्रपती शिवरायांच्या सैन्याचे शिवरायांवर एवढे प्रेम होते की महाराज ज्या ठिकाणी पाय ठेवू पाहात तेथे हे मावळे ह्या राजासाठी स्वत:चे बलीदान देण्यास तयार होत असत.याउलट छ.शिवाजी महाराजांना आपला प्रत्येक मावळा म्हणजे लाख मोलाचा हिरा वाटायचा म्हणुन ते म्हणत, मी माझा लाख मोलाचा हिरा असा तसा गमावणार नाही.म्हणून जेंव्हा अफ़जलखान, शाहिस्तेखान,मिर्जा राजा जयसिंग हे प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर चालून आले त्यावेळी महाराजांनी त्यांच्याशी युद्ध करून आपल्या सैन्याची जीवित हानी होण्यापेक्षा  ते स्वत:चा जीव धोक्यात घालून स्वत: शत्रुवर चालून गेले व त्यांचा पराभव केला.यात अफ़जल खानाला तर ठार केलेच. व मिर्जा राजा जयसिंगाबरोबर तहाची बोलणी करून स्वराज्यासाठी स्वत:चा त्याचबरोबर स्वत:च्या कोवळ्य़ा शंभु राजपुत्राचा जीव धोक्यात घालून तह मंजुर करून घॆण्यासाठी ते आग्रा येथे औरंगजेबाकडे गेले.
            जगामध्ये शिवरायांनंतर जे-जे राजे अथवा जगज्जेते होऊन गेले ते स्वत:साठी, संपत्तीसाठी, स्वत:च्या धर्मासाठी व जातीसाठी लढले.शिवरायांचे युद्ध हे मुस्लिम किंवा कोणत्याही धर्माविरुद्ध किंबहुना जातीविरुद्ध नव्हते तर ते परकिय सत्ताधिशांच्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध होते.म्हणूनच अदिलशहाचे पठाणी सैनिक व घोडदळाच्या तुकड्या शिवरायांना मिळाल्या आणी मोघल सत्तेविरोधात लढल्या तसेच छ.शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम सैन्य होते.ते एकनिष्ठपणाने लढले.अठरापगड जातीचे मावळे शिवरायांच्या जीवाला जीव देणारे सैन्य सर्वशक्तिनिशी यश संपादन करत होते.त्यामुळे शिवरायांचा विजय हा ठरलेलाच असायचा.
           छ.शिवरायांनी शेतकर्यांच्या हितासाठी अनमोल असे कार्य केले त्यांच्या काळामध्ये एकाही शेतकर्याने आत्महत्या केल्याचे दिसून येत नाही.मात्र आज शेतकर्यांचे म्हणुन जे स्वत:ला समजतात त्यांच्या राज्यामध्ये इतकेच नसून देशामध्ये लाखॊ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या.खरेच या नेत्यांना छ.शिवाजी महाराजांच्या कार्यकर्त्रुत्वाची जाणीव असती तर जगाचा पोशिंदा असणार्या शेतकर्यांनी कधीच आत्महत्या केल्या नसत्या.पण हेच नेते छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन देशात,शासन व्यवस्था चालवित आहेत.
इतिहासाचा अभ्यास केला असता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक राजगुणांची ठळक वैशिष्ठे पुढील प्रमाणे दिसून येतात.
१) स्वधर्माभिमानी परंतू इतर धर्मीयांशी सहिष्णुतेने वागणारा राजा..
२) संत सज्जनांचा उपासक परंतू दुष्टांचा संहार करणारा राजा..
३) भारतीय सैन्याबरोबर मुस्लिम सैन्य बाळगणारे व त्यांच्या शौर्याची कदर करणारा राजा..
४) वैदिक धर्माच्या देव-देवळांबरोबर मुस्लिमांच्या मशिदी व मकबरे यांचे पण रक्षण करणारा राजा..
५) युद्धाच्या वेळी कुराणाची प्रत सापडल्यास ती आदरपुर्वक मुल्ला - मौल्लवीकडे परत करा,स्त्रियांच्या आब्रुचे,लहान मुलांचे,म्हातार्या माणसांचे रक्षण करा,शरण आलेल्यांना ठार मारू नका अशी सैन्यास ताकिद देणारा राजा..
६) स्वराज्याच्या व रयतेच्या रक्षणासाठी गडकोट व आरमाराची निर्मिती करून त्याद्वारे रयतेला रोजगार निर्मिती करून देणारा राजा..
७) शेतकरी सुखी तर प्रजा सुखी,प्रजा सुखी तर राजा सुखी ही त्रिसुत्री जाणुन शेतकर्यांना सर्वतोपरी मदत करून शेती सुधारणा करणारा व शेतकर्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावु नका अशी सैन्याला सक्त ताकीद देणारा राजा..
८) अठरापगड जातीचे सैन्य पदरी बाळगणारा,बहुजन समाजातील सैन्यांच्या हाती शस्त्र देऊन त्यांच्या क्षत्रिय बनवणारा म्हणजेच जातीयता व भेदभाव नष्ट करणारा राजा..
९) स्त्रियांच्या अब्रुचे रक्षण कराणारा राजा
१०) धर्मातरितांना स्वधर्मात घेऊन धर्म वाढविणारा  राजा...
११) मराठी भाषेचा पुरस्कार करणारा राजा..
१२) शत्रु सैन्याच्या गोटात निशस्त्र जाऊन आपल्या गगनभेदी सिंहगर्जनेने शत्रुची दानादान उडविणारा राजा...
१३) बलाढ्य व शुर अशा मुस्लिम शत्रुला ठार केल्यानंतर सन्मानाने त्याची कबर बांधणारा राजा.
१४) आजपर्यंत जवळ जवळ ६०० राजे होऊन गेलेत असा इतिहास सांगतो पण शत्रुचीही कबर बांधुन म्रुत्युनंतर वैर संपते हा संदेश देणारा राजा..
१५)राज्याभिषेक शककर्ता राजा...
१६) परकीय राम्राज्यशाहीविरुद्ध बंड पुकारून जगात स्वराज्याची पहिली मुहुर्तमेढ रोवून रयतेसाठी राज्य निर्माण करणारा राजा........
             म्हणजेच जगदवंदनीय जगाचा महामानव ठरलेला राजा म्हणजेच विश्ववंद्य छ.शिवाजी महाराज होय आणि म्हणुनच जागतिक इतिहास तज्ञ "अनॉर्ड टायरबन" म्हणतात- " छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांच्या पराक्रमाचा आणी स्म्रुती चा अक्षय ठेवा आम्ही आमच्या डोक्यावर घेऊन आनंदाने नाचलो असतो " 
जय जिजाऊ । जय शिवराय । जयोस्तु मराठा । जय महाराष्ट्र

15 March 2013

पहिले स्वातंत्र्य योद्धा : छत्रपती शिवाजीराजे भोसले

               इंग्रजांच्या विरोधात १८५७ साली झालेल्या उठावाचा भारतीय इतिहासकारांनी "भारतीय स्वातंत्र्याचा श्रीगणेशा" म्हणुन खुपच उदो उदो केला आहे आणि त्या उठावातील काहीजणांचे इतके उदात्तीकरण करण्यात आले आहे की, एका विशिष्ट समाजापलिकडे भारतीय स्वातंत्र्याबाबत कुणालाही जाणीव नव्हती असे वाटू लागले.खारे पाहता प्रत्यक्ष १८५७ उठाव हे भारतीय स्वातंत्र्यासाठी केले बंड होते की धार्मिक भावना दुखावल्याने निर्माण झालेले बंड होते याचा मागोवा घेतला पाहिजे.इतिहासाचा निरपेक्षपणे अभ्यास केला तर स्पष्ट्पणे जाणवते की भारतीय स्वातंत्र्यासाठी पहिला उठाव त्याच दिवशी झाला ज्या दिवशी शिवरायांनी तोरणागड जिंकला आणि भारतीय स्वातंत्र्याचे तोरण बांधले.म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचे तोरण इ.स.१६४६ मध्ये तोरणगड जिंकुणच बांधले गेले."साम्राज्यशाही विरुद्ध बंड उभारुन स्वराज्याची पहिली मुहुर्तमेढ छ.शिवाजी महाराजांनी रोवली. - मार्शल बुल्गानिन (मा.पंतप्रधान- रशीया)"
 शिवरायांच्या इ.स.१६४६ मधील इस्लामी राजवटी विरोधातील उठावास भारतीय स्वातंत्र्याचा पहिला उठाव म्हणुन संबोधावे लागेल.कारण अखेर इस्लामी राजवट ही अभारतीय होती, परकीय होती.भारतात भारतीयांची राजकीय व्यवस्था (सत्ता) अभिप्रेत ठरविल्यास अन्य सर्व राजवटी परकीय ठरतात.परकीय राजवटीतून भारताची व भारतीयांची मुक्तता करण्यासाठी झालेला प्रत्येक प्रयत्न हा भारतीय स्वातंत्र्यासाठीच झालेला प्रयत्न ठरतो.इंग्रज परकीय होते.म्हणूण त्यांच्या विरोधातील उठाव भारतीय स्वातंत्र्यासाठी ठरतो तर मग त्या इंग्रजांच्या आधी आलेले आणि नंतर प्रशासक म्हणून प्रस्थापित झालेले परकीय ठरत नव्हते काय ? परंतू वर्णवर्चस्ववादी इतिहासकारांना छत्रपती शिवरायांना "पहिले भारतीय स्वातंत्र्य योद्धा" ठरवणे अडचणीचे गेले असावे.कारण त्यातून भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या प्रारंभाचे श्रेय मराठ्यांकडे गेले असते.मग काहीही न करता स्वातंत्र्याचे श्रेय लाटता येत नसते.
            छत्रपती शिवरायांनी अभारतीय राजवटी विरोधात तोरणा किल्यावर स्वातंत्र्याचे निशाण फ़डकवले.ही घटना भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या प्रयत्नातील पहिली घटना होय.असे नमुद केल्यावर काहीजन दुखावतील हे निश्चीत त्याबद्दल क्षमस्व !.यावर असा आक्षेप घेतला जाऊ शकतो की त्यावेळी राज्य व राजवटी होत्या.तशी महाराष्ट्रातही मराठी राज्य स्थापन करण्यासाठी ,एक राजवट स्थापन करण्याचा शिवरायांनी प्रयत्न केला.तथापि त्याला सकल भारतीय स्वातंत्र्यासाठी केलेला प्रयत्न कसा म्हणता येईल ? या प्रश्नाचे उत्त्तर अगदीच सोपे आहे.भारतात वेगवेगळी राजे व राजवटी असल्या तरी भारताच्या केंद्र स्थानावरून दिल्लीवरून होणारा कारभार हा अखेर अभारतीय राजवटीखालीच होत होता जिच्या विरोधात शिवरायांचा उठाव होता.शिवरायांचे लक्ष केवळ महाराष्ट्रात मराठा साम्राज्य स्थापन करण्याइतके सीमित नव्हतेच. त्यांच्यावर तसा आरोप करणे कमालीचे संकुचितपणाचे होईल.शिवाय महाराष्ट्राबाहेर जाऊन गुजरात, कर्नाटक, ओरिसा याही प्रदेशावर स्वार्या करतात आणि दिल्लीशहाच्या भेटीला जाण्यात त्यांचा हेतू असाही असू शकतो की उद्या अखील भारतावर करण्याची संधी मिळाली तर दिल्लीवर स्वारी करण्यासाठी ज्या मार्गाने जावयाचे आहे.तो मार्ग आधीच नजरेखालून घातलेला बरा.या उद्देशानेच ते दिल्लीला गेले व आग्र्यावरून सुटका करून घेतल्यानंतर बिहार मार्गे परतले असण्याची शक्यता आहे.
        भारतीयांचे विशेषत: महाराष्ट्रिय जनतेचे दुर्दैव की शिवरायांसारख्या महापुरुषांना दिर्घायुष्य लाभले नाही,स्वजनांचे सहकार्य लाभले नाही.
सर्वधर्म समभाव की धर्मांधता ?
       धार्मिक व राजकीय स्वार्थापुरता विचार करणारे "विचारवंत" छत्रपती शिवरायांच्या सामाजिक उल्लेखाकडे दुर्लक्ष करतानाच शिवरायांच्या धर्मविषयक द्रुष्टीकोनाकडेही अत्यंत पुर्वाग्रहदुषीत व उपेक्षीत द्रुष्टीनेच बघतात.शिवराय सर्वधर्मसमभाव पाळत होते की धर्मांध होते ?.
          यशस्वी राज्यकर्या हा धर्मांध असून चालत नाही,हा संदेशच जणू शिवरायांनी आपल्या चरित्रात दिलेला आहे.शिवरायांच लढा हा इस्लाम धर्म व सर्व सामान्य मुसलमान याच्या विरोधात नव्हताच.त्यांचा लढा स्वराज्यासाठीचा होता.तो इस्लामी राजवटी विरोधात होता.भारतात हिंदू धर्मातील छळाला कंटाळून शुद्र वर्णातील अनेकांनी मध्ययुगीन काळात बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता.भारतामध्ये अनेक संप्रदाय निर्माण होण्याची कारणे ही सुद्धा शुद्र वर्णातील लोकांना मिळणार्या हिनसकतेच्या वागणुकीमध्येच होती.शुद्रांना हिनसकतेमध्ये ठेवण्यासाठी ज्याप्रकारे ज्ञान संपादनाची मनाई करण्यात आली होती,त्याचप्रमाणे कर्मकाडांदी निराधार प्रकारांची निर्मीती करण्यात आली होती.वैशिष्ट्ये म्हणजे साराच प्रकार धर्माच्या नावाखाली चालत होता.अशा धर्मात शिवरायांनी जन्म घेतला होता हे सत्य असले तरी त्या धर्माची धर्मांध भुमिका स्विकारून त्यांनी व्यवहार केल्याचे एकही उदाहरण संपुर्ण शिवचरित्रामध्ये किंवा इतिहासामध्ये शोधून सापडणार नाही.याउलट त्यांची अन्य धर्माबाबतची भुमिका ही आदराची व सर्वधर्मसमभावाचीच आढळते.
          अजुन महत्वाचे म्हणजे शिवकालीन संघर्ष हा हिंदू विरुद्ध मुस्लिम असाही नव्हता.त्यांचे मुळ कारण त्यापुर्वी सुमारे सहाशे वर्षे अगोदर आलेले मुस्लिम हे या मातीशी समरस झालेले होते.सुफ़ी संप्रदायाने तर निखळ मानवतावादाची पेरणी केली होती.जगदगुरु संत तुकाराम महाराजां प्रमाणेच कुळशी येथील मुस्लिम संत बाबा याकुत हे शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थानी होते.काशीनाथ आठल्ये यांनी "महाराष्ट्राचा राजा : छ.शिवरायांचे चरित्र" या पुस्तकाच्या प्रुष्ठ २१९ वर शिवरायांनी गुरुस्थानी मानलेल्या सत्पुरुषांची यादी दिली आहे.त्यात बाबा याकुत केळशीकर या नावाचा उल्लेख आहे.इतकेच नव्हे प्रुष्ठ २२५ वर  बाबा याकुत यांस आपले गुरु केले असे नमुद केले आहे.क्रुष्णराव केळूसकर लिखित शिवचरित्रातही बाबा याकुतांचा उल्लेख आहे.रियासतकार यांच्या "न्यू हिस्ट्री ऑफ़ द महाराज" या ग्रंथातही रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र तीरावर बागकोटच्या खाडीशी असलेल्या केळशी या गांवचे बाबा याकुत असल्याचा उल्लेख आहे.(प्रुष्ठ १३ ) या सर्व बाबीवरून समजून येईल की  शिवराय व त्यांचे पुर्वज यांचे इस्लाम धर्म आणि सर्व सामान्य मुस्लिम यांच्याशी वैर नव्हते आणि स्वातंत्र्याचा उठाव हा इ.स.१८५७ मध्ये नसून इ.स.१६४६ मध्येच झाला आणि भारतीय स्वातंत्र्याचे पहिले योद्धे विश्ववंद्य कुळवाडीभुषण छ्त्रपती शिवाजी महाराज आहेत.
जय जिजाऊ । जय शिवराय । जयोस्तु मराठा । जय महाराष्ट्र

9 March 2013

इतिहासातील अनमोल रत्न : बळीराजा

            शेतकर्यांच्या द्रुष्टीकोनातून बळीराजाचा इतिहास नीट समजून घेणे आवश्यक आहे.भारतातील समाजाचा सांस्क्रुतीक, सामाजिक, वगैरे प्रकारचा इतिहास जाणुन घेण्यासाठी प्रस्तुत लेखाचा प्रपंच महात्मा जोतिराव फ़ुले यांनी दस्युचा पोवाडा लिहिला आहे.त्यांच्या तिसर्या कडव्याची सुरुवात "बळी राजादि कुळ स्वामीला" या शब्दांनी केलेली आहे.याचाच अर्थ बळीराजाला ते आपल्या अत्यंत आदरणीय पुर्वज मानतात.बळी ! एक लोक कल्याणकारी राजा,मानवतावादाचा महान पुजारी,दानशूर,विश्वबंधुत्वाचे आचरण करणारा भारताच्या इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व.सुमारे साडेतीन हजार वर्षापुर्वी होऊन गेलेला बहुजन समाजाचा एक महासम्राट बळीराजा.ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावले,पण तत्वांशी तडजोड केली नाही.आपल्या जीवात जीव असे पर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिला.बहुजन समाजावर कोणतेही अत्याचार होऊ दिले नाहीत.पण आपण मात्र धन्य की आपण आपल्याच डोळ्यादेखत आपल्याच राजाचा अपमान सहन करत आलो आणि सहन करत आहोतच. आपण आज खॊट्या नाट्या पुराण कथांना बळी पडलो आहोत.स्वत:चे डोके कधी वापरतच नाही.आपण आपल्या राजासाठी कायमची ह्रुदये बंद करून टाकलीत.
बळीराजाच्या काळात शेतकरी अतिशय सुखी व संपन्न होता.आपल्याकडे सुपीक शेतीमध्ये सर्व जनतेला ज्ञान होते.शेतकर्यांना सर्व ज्ञान असल्यामुळेच त्यांची शेती सम्रुद्ध होती.प्रजा सुखी,समाधानी व कर्तबगार होती.कुठलाच अधर्म नव्हता.शोषण विरहीत समाजरचना हे बळीराजाचे खास वैशिष्ट होते.स्त्री-पुरुष आपापल्या कुवतीनुसार आणि कौशल्यानुसार राज्याच्या सर्वच वैभवात भर टाकत असे.अत्यंत सुरेख आणि सम्रुद्ध अशी नगरे सुमारे साडेतीन हजार वर्षापुर्वी वसवली होती.दस्युचे स्वत:ची सम्रुद्ध नगरे होती.याचा अर्थ त्यांचे जीवन अत्यंत सम्रुद्ध आणि संपन्न व विकसित होते.असं हे सुखी व सम्रुद्ध राज्य परकीय आक्रमकांनी नष्ट केले.
महात्मा जोतिराव फ़ुले यांनी केलेली या कथेची चिकित्सा :-
चिकित्सा करताना फ़ुले समग्र वाड:मयात म्हणतात वामनाचा एक पाय प्रुथ्वीवर व दुसरा पाय आकाशात होता.प्रुथ्वी व आकाशातील अंतर करोडो मैल आहे.माणसाचा एक पाय जमिनीवर असल्यास तीन फ़ुट अंतरावर जाता येत नाही कारण त्याच्या पायाची लांबी व दोन पायातील अंतर मर्यादित असते.वामनाचा एक पाय प्रुथ्वीवर व दुसरा पाय आकाशात असता तर वामनाची ....फ़ाटून गेली नसती काय ? (फ़ुले समग्र वाड:मय) डॉ.आ.ह.साळूंखे - बळीवंश या पुस्तकात प्रुष्ठ क्रमांक २०१ वर म्हणतात वामनाने पहिल्या पावलाने विशिष्ट भुप्रदेशातील लोकांना यज्ञाच्या कर्मकांडात गुंतवून टाकले व दुसरे पाऊल वेदप्रामाण्य होते.लोकांनी वेदांवर विश्वास ठेवावा आणि आपली बुद्धी स्वतंत्रपणे मुळीच वापरू नये असा या पावलाचा अर्थ होता.तिसरे पाऊल बहुजनांच्या वाकशक्तिला कुंठित करून टाकणारे होते.म्हणजेच वाणी वापरण्याचा खराखुरा अधिकार ठराविक लोकांनाच असेल  आणि इतरांनी लिहिणे, वाचणे , बोलणे  या बाबतीत स्वतंत्रता राहता कामा नये असा कठोर नियम करण्यात आला.तात्पर्य यज्ञाने भुमी व्यापणे,वेदप्रामाण्याने लोकांना गुलाम करणे आणि वाणीवर एकाधिकार प्रस्थापित करणे हा वामनाच्या तीन पावलांचा खरा अर्थ आहे.
याचात अर्थ आजची आपली स्थिती सर्कशीतल्या वाघाप्रमाणे आहे.तुम्हाला ट्रेनिंग दिलय, तुम्ही तुमच्यात भांडणे करा पण चुकुनही आमच्यावर वार करू नका.तुमची नखे काढून टाकलीत.तुमच्या दाताला रक्ताची चव लागू नये म्हणून तुम्हाला पिंजर्यात कोंडून ठेवलय.एका विशिष्ट चौकटीत आपण बंदिस्त आहोत.जन्मापासून तर मरे पर्यंत आपल्याला बामन चिकटलाय.अरे आठवा आपल्या पुर्वजांचा इतिहास आणि तोडा सर्व गुलामीच्या चौकटा. कोणाच्या आदेशावर कशाला चालता.आपल्याला डोकं आहे ना ? काय खरं आणि काय खोटं तपासून घ्या.अरे कॊण दिड फ़ुट असलेला वामन आपल्या बळीराजाला मारणारा आपला देव अवतार कसा ? आजही शेतकरी बळीप्रतिपदेला "इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे" असं म्हणतात. याचाच अर्थ बळीराजा महान असला पाहिजे आणि वामन वाईट असला पाहिजे.तेंव्हा प्रत्येक बहुजनांने बळीराजाचे गुणगान गायले पाहिजे.इतिहासातील एका अनमोल रत्न असलेल्या महात्मा बळीराजाला खरे अभिवादन हेच ठरेल.
"इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे"  ॥ "इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे" 

1 January 2013

राजर्षी छ.शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर

               महार जातीतील डॉ.आंबेडकर नामक ग्रुहस्थाने उच्च पदवी प्राप्त बातमी राजर्षी शाहू महाराजांच्या कानावर येऊन पडली तेंव्हापासून त्यांच्या आनंदाला पारावारच राहिला नाही, जी व्यक्ती महाराजांना भेटायला येई त्या व्यक्तीसमोर बाबासाहेबांचे तोंडभरून कौतुक करून म्हणायचे "आता या बामनांना बौद्धीक बाबतीत शह देण्यास बहुजन समाजातील माणसे हळू हळू पुढे येऊ लागली. "एक दिवस असा उगवेल की या बामनांपेक्षा आमची बहुजन समाजातील माणसेच पुढे गेलेली असतील"शाहू महाराजांजवळ बापुसाहेब महाराज बसलेले असायचे .आंबेडकरांचे चाललेले कौतुन बघून बापुसाहेब म्हणाले, "महाराज एकदा आंबेडकरांना भेटावयास तरी बोलवा" शाहू महाराज प्रसन्न होऊन म्हणाले,"बापसाब अगदी माझ्या मनातलं बोललासा बघा"
  योगायोगाने तेथे दळवी आर्टिस्ट आले, त्यांना मुंबईचा खडानखडा माहीत असल्याने महाराजांनी आबेंडकरांना बोलविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवीली व त्यांच्या मुंबई प्रवासाची सर्व व्यवस्था करण्याची आज्ञा देऊन महाराज सोनतळीला निघून गेले.
            महाराजांच्या आज्ञेप्रमाणे दळवी मुंबईस गेले डॉ.आंबेडकरांची भेट घेतली महाराजांचा खास निरोप दिला.पण आंबेडकर कोल्हापुरास येण्यास तयार होईनात.कारण संस्थानिकांच्या अनेक गोष्टी त्यांच्या कानावर आल्या होत्या.अखेर दळवींनी इतर संस्थानिकांपेक्षा महाराज कसे वेगळे असून अस्प्रुश्योद्धरांसाठी कसे काम करतात, हे सांगितल्यावर आंबेडकर कोल्हापुरास येण्यास तयार झाले व ते कोल्हापुरला आले.
              पहिल्याच भेटीत शाहू महाराज आणि बाबासाहेब यांची मैत्री जमली.मैत्री ही स्फ़ुल्लिंगासारखी असते, ती केंव्हा प्रकट होते हे सांगणे कठीण असते कित्येक वर्षाच्या सहवासानंतरही प्रकट होत नाही पण काही वेळी विश्वासाच्या वातावरणाने प्रगल्भता धारण केल्यास एकाच भेटीत ती चीरमैत्री होऊ शकते. असेच शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब यांच्या मैत्रीचे झाले. एकाच भेटीत चिरमैत्री जमली.पहिल्याच भेटीत डॉ. बाबासाहेबांनी अस्प्रुश्योद्धरांसाठी निदान एका साप्ताहिकाची गरज असल्याचे प्रदिपाद करून ’मुकनायक’ हे साप्ताहिक चालवत असलो तरी आज ते आर्थिक अडचणीमुळे ’मुक’ झाल्याचे सांगितले.’मुकनायक’ विषयी आधिक माहीती देताना आंबेडकरांनी महाराजांना सांगितले की "आपण ३१ जानेवारीला १९२० ला पहिला अंक प्रकाशित केला. या अंकावर संत तुकाराम यांचे बोधवाक्य आहे, हे बोधवाक्य असे आहे,"
  " काय करू आता धरुनिया भीडा नि:शंक हे तोंड वाजविले ।
    नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण, सार्थक लाजुन नव्हे हित ।"
संत तुकोबारायांचे बोधवाक्य ऐकुन महाराज एकदम प्रसन्न झाले व म्हणाले " व्वा ! व्वा ! छान ! छान !!" असे सहजच म्हनुन गेले.
           आंबेडकरांनी महाराजांना आर्थिक अडचणीमुळे व्रुत्तपत्रे कशी बंद पडतात हे सांगत असतानाच सोमवंशीय मित्र, हिंदू नागरीक, विटाळ विद्वंसक यांची उदाहरणे दिली. तसेच त्यांनी कारणेही सांगितली. त्या काळी व्रुत्तपत्रांना फ़ारश्या जाहीराती मिळत नसत.वर्गणीसारांच्या वर्गणीतुनच अंक चालवावा लागत असत आणि वर्गणीदार आपल्या वर्गणीशी प्रामाणिक राहात नसत. महाराजांच्या ध्यानी सर्व बाबी आल्यानंतर तात्काळ त्यासाठी रू.२,५०० ची भरगोस मदत केली.या मदतीनंतर " मुकनायक" बोलु लागला.
           २० मार्च १९२० रोजी करवीर राज्यातील "कागल" जहागिरीतील माणगाव या ठिकाणी अस्प्रुश्यांची पहिली ऐतिहासिक भव्य परिषद शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीतून व प्रेरणेने आयोजित केली होती. या परिषदेचे अध्यक्षस्थान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना भाषणाच्या सुरुवातीस शाहू राजांनी आंबेडकरांचा उल्लेख "माझे प्रिय मित्र आंबेडकर" असा करताच हजारो दलितांनी महाराज आणि बाबासाहेब यांचा अखंड जयघोष करीत टाळ्यांचा पाउसच पाडला. प्रत्यक्ष छत्रपती आंबेडकरांना "प्रिय मित्र" म्हणतात याचे त्यांना कौतुक वाटले.भाषणाच्या शेवटी आंबेडकरांना आग्रहाचे भोजनाचे आमंत्रन देताना म्हणाले, "आंबेडकरांना माझी विनंती आहे की त्यांनी जाण्यापुर्वी मेहरबानीने माझे रजपुतवाडीच्या कॅंपवर माझ्याबरोबर भोजनाला येण्याची तसदी घ्यावी" महाराजांच्या आमंत्रणाचा स्विकार करून आंबेडकर सोनतळीला आले. भोजनाच्या वेळी महाराजांनी स्वत: आग्रह करून त्यांना यथेच्छ भोजन करावयास लावले. त्यानंतर आंबेडकर आगगाडीने मुंबईस जाणार होते, त्यावेळी महाराजांनी स्वत: स्टेशनवर येऊन त्यांना निरोप दिला.
           डॉ.भिमराव आंबेडकर यांच्या नेत्रुत्वामुळे दलित उद्धाराच्या चळवळीला निर्णायक उभारी आली. शाहू महाराजांनी तर निश्चयच केला होता की "माझे राज्य गेले तरी बेहत्तर पण अस्प्रुश्योद्धराचे कार्य थांबविणार नाही" महाराजांच्या अशा या कार्यामुळे अस्प्रुश्य लोक शाहुंना आपला त्राता, उद्धारक , मित्रच नव्हे तर प्रत्यक्ष देव मानत होते. दिवसेंदिवस महाराज आणि आंबेडकर यांचा स्नेह वाढतच गेला. स्नेह माणसाला त्याग करायला शिकवतो, संकुचीत नात्याची तो सीमा पार करतो.असेच या दोघांच्या नात्यात घडत गेले.खरी मैत्री ही मोकळ्या ह्र्दयाने बोलत असते,केंव्हाही मदत करण्यास तयार असते.
            ४ सप्टेंबर १९२१ रोजी लंडनहुन आंबेडकरांनी महाराजांना एक पत्र पाठवून मदत मागितली, ते लिहितात आपली प्रक्रुती उत्तम असेलच अशी आशा करतो, आपली आम्हाला खुप आवश्यकता आहे,कारण भारतात प्रगती करत असलेल्या सासाजिक लोकशाहीच्या चळवळीचे आपण एक महान आधारस्तंभ आहात, महाराजांविषयी आंबेडकरांना किती आदर होता हे यावरून दिसून येते.आंबेडकरांच्या विनंतीप्रमाणे त्यांना आवश्यक ती मदत केली. त्यानंतर पुढे काही दिवसांनी म्हणजे २६ जानेवारी १९२२ रोजी लंडनहुन डॉ.आंबेडकरांचे महाराजांना पुनश्च मदत मागताना पत्र आले, त्या पत्रात ते म्हणतात, "मला परत येण्यास अवधी लागणार असल्यामुळे घरी खर्चाची अडचण होणार आहे, तरी हुजुरांनी क्रुपावंत होऊन रु.७५० मदत करावी, आजवर जे अनेक उपकार हुजुरांनी केलेत त्यात हाही करतील अशी आशा आहे. "हे पत्र मिळताच महाराजांनी मनिओर्डरने रुपये सातशे पन्नास पाठवून देण्याची व्यवस्था केली.
         डॉ.बाबासाहेबांना शाहू महाराजांविषयी नेहमीच आदरभाव असे. उच्च जाती आपल्या स्वार्थासाठी ब्राह्मणेत्तर आणि बहिष्क्रुत यामध्ये कधीही एकी निर्माण न होता बेकीच रहावी यासाठी प्रयत्नशील होते. तशा प्रकारे ते हिन डावपेच खेळत. प्रत्येक वेळी ते डावपेच शाहू महाराज आपल्या मुत्सद्देगिरीच्या बळावर उधळून लावत. याबाबत २२ सप्टेंबर १९२० च्या  "मुकनायक" मध्ये "प्रेम की सुड" या लेखात् आंबेडकर म्हणतात, "या विसाच्या शतकातील स्वयंनिर्णयाचा काळात राजर्षी शाहू छत्रपती यांनी ब्राह्मण जातीकडून नाडावलेल्या ब्राह्मणेत्तर व बहिष्क्रुत वर्गाच्या चळवळीचा पुरस्कार केल्यावर बहुजन समाजाकडून त्यांस मिळत असलेला धन्यवाद ब्राह्मण या जातीस न खपून त्यांनी बहिष्क्रुत व ब्राह्मणेत्तर या वर्गात् खुद्द मराठ्यांत फ़ुट पाडण्याचा अत्यंत घातक असा उपक्रम चालविला आहे".
             डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणी  शाहू महाराज एकमेकांचा आदर करीत याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिल्ली येथे १३ व १४ फ़ेब्रुवारी १९२२ रोजी ’अखिल भारतीय बहिष्क्रुत परिषद’ आयोजित केली होती.त्या परिषदेत आंबेडकरांच्या अनुपस्थितीत त्यांच्या माघारी त्यांच्याविषयी  प्रशंसोद्गार काढताना शाहू महाराज म्हणाले होते ."भिमराव आंबेडकर तुमचे महान नेते आहेत त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा, त्यांचे अनुकरण करा व त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करा.मी तर तुमच्या सेवेला वाहुन घेतले आहे, मला तुमची सेवा करू द्यावी ही विनंती." बाबासाहेब आंबेडकर अस्प्रुष्यता निर्मुलण व त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी "ऑल इंडिया डिस्प्रेड क्लासेस एज्युकेशन फ़ंड" संस्था उभी करणार होते, या संस्थेत शाहू महाराजांनी कोणत्याही लहानमोठ्या पदावर काम करण्याची इच्छा त्यांनी आंबेडकरांना रुकडी (कोल्हापुर) येथुन दि.७ जुन १९२० रोजी लिहिलेल्या पत्रावरून स्पष्ट होते.
" चांगला मनुष्यच चांगला मित्र होऊ शकतो" हे उभयतांच्या मैत्रीवरून स्पष्ट होते. 
संदर्भ  : शाहुंच्या आठवणी, शाहू गौरव ग्रंथ.

6 November 2012

आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके

           उमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक.... परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी नाईक उपेक्षित क्रांतिकारक आहे....कारण उमाजी नाईक हे रामोशी समाजातील. त्यामुळे त्यांचा खराखुरा इतिहास लिहिण्यापेक्षा लेखणी ज्यांच्या हातात आहे अशा लोकांनी पूर्वग्रह आणि जातीयवाद मनात बाळगून इतिहासाचे लेखन केले. त्यांच्या या उपद्व्यापामुळे उमाजी नाईक सारखे अस्सल हिरो झिरो झाले आणि झिरो हिरो झाले. ही कला अवगत असते ज्याच्या हातात प्रचार-प्रसार माध्यमे असतात त्याला. लोकांना एखादी खोटी गोष्ट सांगितली तर ती पटतेच असे नाही. परंतु एकच खोटे शंभर वेळा खरे म्हणून सांगितले तर लोकांना ते नक्की पटते. 
          आद्य’ या शब्दाचा अर्थ आहे ‘पहिला’. ‘आद्य क्रांतिकारक’ म्हणजे ‘पहिला क्रांतिकारक’. प्रथम ज्याने सशस्त्र क्रांती सुरु केली असा क्रांतिकारक ‘आद्य क्रांतिकारक’ ठरू शकतो. ‘आद्य क्रांतिकारक’ एकच असू शकतो. दोन-दोन आद्य क्रांतिकारक असणे शक्य नाही. दोघांचाही कार्यकाल भिन्न आहे. तरीही या दोघांचीही मांडणी आद्य क्रांतिकारक म्हणून कशी काय होवू शकेल ? यात मला कुणाचाही अवमान करायचा नाही. परंतु हे वास्तव आहे कि दोघांचीही मांडणी आद्य क्रांतिकारक म्हणून होवू शकत नाही.
        त्यासाठी आपण जरा दोघांच्याही जीवनपट आणि कार्यकालावरून नजर टाकू. दोघांचाही इतिहास पारदर्शक आहे त्यामुळे समजायला वेळ लागणार नाही की कोन असली हिरो, आद्य क्रांतिकारक आहेत. 
आधी आपण आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या विषयी जाणुन घेऊया
आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक
               उमाजी नाईक यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ साली पुणे भिवडी येथे झाला. उमाजी नाईक हे शिवरायांचे निस्सीम भक्त होते . शिवरायांनी ज्यापद्धतीने जुलमी, परकीय शक्तीविरोधात लढा उभारून स्वराज्य निर्माण केले तसेच स्वप्न उमाजी नाईक ही पाहत होते. इंग्रजी सत्ता उलथवून टाकण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्याबरोबर इंग्रजी सत्तेच्या विरोधात रणशिंग फुंकले. याकामी त्यांना विठूजी नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळकर आणि इतर सहकाऱ्यांनी बहुमोल मदत केली. इंग्रजांच्या खजिन्यावर धाडी टाकणे, तो गरिबांना वाटणे, इंग्रज सैन्याला सळो कि पळो करून सोडणे, प्रसंगी जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांना ठार कारणे अशा मार्गाने उमाजी नाईक यांनी पाहिली सशस्त्र क्रांती सुरु केली. डिसेंबर १८३० ला त्यांनी इंग्रज सत्तेच्याविरोधात जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. इंग्रजांनी उमाजी नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रचंड धास्ती खाल्ली होती. परंतु फितूर भोरच्या सचीवामुळे १५ डिसेंबर १८३२ रोजी अवघ्या ४१ व्या वर्षी उमाजी नाईक देशासाठी फासावर चढले.
क्रांतिकारक वासूदेव बळवंत फ़डके यांच्या विषयी जाणुन घेऊया
क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके
          वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म उमाजी नाईक यांच्या मृत्युनंतर १३ वर्षांनी म्हणजे ४ नोव्हेंबर १८४५ रोजी झाला. वासुदेव बळवंत फडके हे इंग्रजांच्या सैन्य लेखा सेवेत नोकरीस होते. एकदा त्यांची आई आजारी असताना त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी रजा नाकारली. त्यामुळे ते आजारी आईला भेटायला जावू शकले नाहीत. जेव्हा ते आईला भेटायला गेले तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले होते. या प्रकाराने संतापून फडके यांनी इंग्रजी नोकरीचा राजीनामा दिला आणि इंग्रजाविरुद्ध संघर्ष चालू केला.आता जरा थोडा विचार केला की जर त्यांची रजा मंजुर झाली असती तर ? त्यांनी शस्त्र घेतले असते का ? यामुळे आद्य राहुदेत नुसते क्रांतिकारक यावरच प्रश्न निर्माण होतो असो....
           दोघांचाही कार्यकाल अभ्यासाला तर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात यायला हवी कि उमाजी नाईक यांच्या मृत्युनंतर तब्बल १३ वर्षांनी वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला. मग फडके यांच्या कितीतरी अगोदर उमाजी नाईक यांनी सशस्त्र क्रांती सुरु केली होती. मग आद्य क्रांतिकारक हा बहुमान उमाजी नाईक यांना मिळायला हवा. मात्र त्यांना डावलून वासुदेव बळवंत फडके यांची मांडणी आद्य क्रांतिकारक म्हणून केली जाते. त्यामुळे होते काय कि ज्या अर्थी वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक आहेत त्या अर्थी त्यांनी पाहिली सशस्त्र क्रांती सुरु केली. अर्थात त्यांच्या आधी कुणीही सशस्त्र क्रांती सुरु केली नाही. मग वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हटल्याने उमाजी नाईकांचे कार्य-कर्तुत्व डावलले जात नाही का ? कि मुद्दाम त्यांना उपेक्षित ठेवण्यासाठीच असे प्रकार होतात ? अशाने खरा इतिहास समाजासमोर कसा येणार ?
          महापुरुषांच्या नावाला आणि कर्तुत्वाला जातीचे परिमाण लावणे हे जितके चुकीचे तितकेच त्यांना जातीत बंदिस्त करून त्यांचा इतिहास लिहिणेही चुकीचे. मात्र इतिहास लिहितानाच अशा लबाड्या केल्या गेल्या असतील तर त्या दाखवून देताना जातींचे संदर्भ आले म्हणूण महापुरुषांच्या कर्तुत्वाला धक्का पोहचला असे कुणी मानू नये.याला इतिहासाचे विक्रुतीकरण म्हणत नाहीत तर इतिहासाचे शुद्धीकरण म्हणतात.

5 November 2012

मानवतेचे महान उपासक : संत गाडगे महाराज

        "मनुष्य" सुद्धा उमललेल्या फ़ुलासारखा असतो. मनुष्य जन्माला येतो तो अस्तित्वाचा भाग म्हणून.चैतन्य त्याच्या नसानसातून धवत असतं .दु:खातून आनंदाकडे जाणारा हा प्रवाह अनेक दु:खी,कष्टकरी जनतेच्या अंत:करणात भरून जातो.ते भरणं त्यांच्या कष्टाचं सार्थक असतं.जन्माचं कल्याण करतं , आनंदाची , चेतनेची ज्योती चेतविण्याकरीताच हे अस्तित्वाचं लेणं आकार घेतं.
        "शेणगांव" एक लहानसं खेडं.गावात शंभर - सव्वाशे कौलारू झोपड्या.ह्या खेड्यात परीट जातीचं एक घर,समोर दोन - तीन मडकी,सारवून स्वच्छ केलेलं अंगण.घराचा मालक झिंगराजी.त्यांच्या बायकोचं नाव सखुवाई, कष्ट करणारी. या  मायमाउलीच्या पोटी १८७६ साली जन्माला आलं मुल नाव ठेवलं ’डेबू’.’डेब’ झाला तुकोबांचा कर्मयोगी ,सार्या कुळाचा उद्धार केला.डेबुंचे कार्य महान सारी मानवता खुश झाली.दीनांचा कैवारी मानवतेच्या अपंगाचा आधार..अमाप कार्य महाराष्ट्रावरच नव्हे तर सर्व भारत मातापिता त्यांच्या कार्यावर धन्य झाली.
          संत गाडगेबाबांना संत तसेच कार्यवीर म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.कोणत्याही प्रकारच्या चमत्काराचा स्पर्ष न होता हे व्यक्तिमत्व येवढे थोर कसे ? अंगठेबहाद्दर डेबूजी बघता बघता अनेक स्वनामधन्य विद्वानांचा बाप कसा झाला ? आजुबाजुला पसरलेल्या हजारो निरक्षर , अडाणी , देवभोळ्या व अंधश्रद्ध लोकांच्या ज्ञानाचा दिप चेतविण्यासाठी गाडगेबाबांनी ग्रुहत्याग केला आणि तथागत बुद्ध गाडगेबाबांच्या रुपाने पुन्हा समाजात वावरले.
              संत गाडगेबाबांमध्ये तथागत बुद्धांची करूणा, तुकोबांची अहिंसा यांचे विलक्षण मिश्रण झाले आहे. जेंव्हा तिकडे सावकरांनी डेबुजींच्या मामाची जमीन फ़सवणुकीने  गिळंक्रुत करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा डेबुजींनी त्याला विरोध केला.सावकाराला शेतातून पळवून लावले.सावकाराने डेबुजींच्या आजोबांना व मामेभावाला गाठले आणि धाकदपटशा दाखवून पुन्हा जमीन गिळंक्रुत केली.आपण दाताच्या कण्या करून, हाडाचे काडे करून सावकाराचे कर्ज फ़ेडले आणि तरीही इथल्या व्यवस्थेमुळे आपल्या बापजाद्यांच्या निरक्षरतेमुळे आपला आणी आपल्या कष्टाचा बळी गेला हे बाबांच्या मनाला फ़ार लागले.त्या दिवसापासून बाबा संसार पराड:मुख झाले आणि ग्रुहत्याग केला.
            " बाबा घरातून बाहेर पडल्यावर जेंव्हा वर्षभराने त्यांची आई, बायको व मुलाबाळांची भेट झाली त्यावेळी त्यांच्या आईने आता आम्ही कुणाच्या भरवश्यावर जगावे ?" असा प्रश्न केला.त्यावेळी बाबांनी दिलेले उत्तर मार्मिक आहे.ते म्हणतात "ज्याच्या घरचा माणुस मेला त्याचे काय होते त्याच्या वाचून अडते काय ? " असे समजा की डेबुजी मेला, मग जसे जगले असते तसे जगा.ग्रुहत्याग केलेला माणुस वेगळ्या अर्थाने घरच्यांसाठी मेलेलाच असतो.डेबुजीला स्वत:च्या अंगातला आळस  झडावा म्हणून कोणाच्याही शेतात काबाडकष्ट कर.कोणाच्या घरची लाकडे फ़ोडून दे, कधी स्वत:ला महार मांग म्हणवून घेवून विहिरीला स्पर्श, मालकाचा बेदम मार खा, जिभेचा लोभ झडला पाहिजे म्हणुन केवळ पुरणपोळीची मागणी करायची आणि काटेरी फ़ांदिने स्वत:ला झोडपून घ्यावे.ही सगळी क्रुत्ये वेडेपणाची लक्षणे होती काय ? नक्कीच नाही!
             आपल्या अस्तित्वाचे विश्व चैतन्याशी विलीनीकरण झाले पाहिजे म्हणून स्वत:च्या देहावर केलेला तो उपचार होता ! अंगावर सतरा ठिगळांचे कुडते.एका कानात कवडी तर दुसर्या कानात बांगडीचा तुकडा, डोक्यावर कापर हा सगळा वेश,म्हणजे गबाळेपणा काय ? सतरा ठिगळांचे कुडते सर्वधर्मसमभावाचे निदर्शक, कानातली कवडी माणसाचे जीवन कवडीमोल आहे हे दाखविणारे ,तर फ़ुटक्या बांगडीचा तुकडा जिवनाचे क्षणभंगुरत्व निर्देशित् करणारा, डोक्यावर खापर म्हणजे जीवनाच्या फ़ुटक्या मडक्याचा अन्वयार्थ स्पष्ट करणारे ! म्हणुनच आपण जीवनाचा साक्षात्कार झालेल्या डेबुजींना गाडगेबाबा म्हणतो.संसारात लिप्त असलेल्या ग्रुहस्थाला नाही.
                बाबांना अहंकाराचा वारा लागलाच नाही. त्यांच्या अहंकाराची राख झाली होती.ज्यांचा अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला.बाबा म्हणत "मी काही वेगळं करत नाही. मी करतो ती मानचाची सेवा होय. गरजवंतांकरीता झिजणं हा मानवता धर्म आहे.मी तो धर्म पाळतो आहे.हा देह सेवेत खर्च व्हावा एवढेच मला वाटते."जसं बाबांची सेवा आणि बाबा म्हणजे विलक्षण आश्चर्य होते.त्यांचा शब्द म्हणजे मोत्याचं पाणी.बाबा म्हणजे सन्मार्गाची वाट.त्यांची प्रत्येक क्रुती माणसाला वळणशील बनवी. त्यांची कार्यपद्धती आणि कार्य अचाट होते.
            समाजोपयोगी अनेक कार्याची बाबांनी उभारणी केली.सारा महाराष्ट्र त्यांच्या कार्याने उजळून निघाला. त्यांच्या कार्याची साक्ष म्हणजे त्यांनी बांधलेल्या टोलेजंग धर्मशाळा.शिक्षणावर त्यांचं नितांत प्रेम होतं.ते नेहमी डॉ.बाबासाहेबांचं उदाहरण देत.शिक्षणाशिवाय माणुस आंधळा होतो.परिस्थितीमुळं माणसाला शिक्षण मिळत नाही,अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात.गरिबांना शिक्षण कसं मिळेल याची बाबांना सदैव चिंता.त्याकरीता बाबांनी शाळा काढल्या, वसतीग्रुहे काढली, आश्रमशाळा सुरु केल्या, जागोजागी अन्नछत्रे उभी केली.उपाशी माणसं जेवायला लागली.आंधळे,पांगळे आशेने फ़ुलुन गेले.बाबा त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले.जिवाचं रान करून हे हिमालयाएवढे मोठे कार्य बाबांनी उभं केलं.
            कोहिनुर हिर्याला पहावं रत्नात, सिंहाला पहावं वनात, तसं बाबांना पहावं कीर्तनात. बाबा खराट्याने गावातील घान साफ़ करीत.बाबांनी आपल्या जीवनातील शेवटचे कीर्तन मुंबई पोलीस ठाण्यात करून नोकरदारांच्या डोक्यातील वेडगळ समजुती व अंध:श्रद्धारुपी घान साफ़ केली.गोपाला ॥ गोपाला ॥ देवकीनंदन गोपाला ॥.........गजरात मोटार नागरवाडीच्या मार्गावर असताना पेढीनदीचे पुलावर मोटार आली अन बाबांचे महापरीनिर्वाण झाले.तो दिवस होता २० डिसेंबर १९५६ त्यांच्या स्म्रुतीस मन:पुर्वक अभिवादन ! 

29 October 2012

समता प्रिय संत शिरोमणी संत नामदेव महाराज

           संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत. त्यांचं कर्त्रुत्व महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून उत्तर- वायव्य भारतापर्यंत आपला ठसा उमटवून गेले."नाचू किर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥" यांसारख्या शब्दांनी समाजात समतेच्या मार्गाने ज्ञानदीप लावण्याचा ध्यास घेतलेल्या संर नामदेव महाराजांनी भाषा,प्रांत,धर्म, जातपात या पलीकडे जाऊन समाज जीवणाचा विचार केला.त्यामुळे संत नामदेव महाराज केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता पंजाबमधील शिखांनाही तितकेच पुज्य ठरतात.प्रतिकुल ,राजकीय, सामाजिक अन धार्मिक आतावरणात मराठी आणि अन्य प्रादेशिक लोकजीवनाला नवे वळण लावण्याचे कार्य ज्या काही थोर संतांनी केले त्यांचे अग्रणी संत नामदेव महाराज होते.
                 मध्ययुगीन समाज जीवन प्रामुख्याने धर्मप्रधान होते.पण कर्मकांड आणि विधिनिषेद यांचे स्तोम फ़ार माजलेले होते. वर्णाश्रमाच्या धोरणामुळे उच्चवर्णीय समाजामध्ये अराजकता निर्माण झाली होती.धार्मिक संस्कार तेच करायचे ज्ञान , अध्ययन, अध्यापन, धनसंचय, शस्त्र धारण करण्याचा अधिकार त्यांनाच होता.तसेच मंदिर प्रवेश ,सार्वजनिक पाणवठे इत्यादी ठिकाणी पाणी भरण्याचा अधिकार अस्प्रुष्यांना नव्हता.हळूहळू या रुढींनाच धर्माचे महात्म्य प्राप्त होत गेले आणी समाजात भयानक अज्ञान आणि अंधश्रद्धाचे स्तोम माजले होते.
           या पार्श्वभुमीवर २६ ऑक्टोंबर १२७० रोजी नामदेव महाराजांचा जन्म एका शिंपी कुटुंबात झाला.संत नामदेव केवळ भक्तिभावाची (काव्य) गाणी लिहिणारे नव्हते तर समाजात समता प्रस्थापित करण्यात आणि समाज प्रबोधन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.भेदाभेदांनी विदीर्ण (भग्र) झालेल्या भारतीय समाजात संत नामदेवांनी लोकनिंदेचा विचार न करता समतेची बीज रोवून विषमतेवर प्रहार केला.विसोबा खेचरांना गुरु मानणार्या  संत नामदेवांनी जेंव्हा संत चोखोबांच्या परिवारावर आपत्ती आली तेंव्हा ते मंगळवेढ्याला गेले आणि त्यांच्या (चोखोबांच्या) अस्थी स्वत: आणून सनातन्यांच्याच नगरीत खुद्द पंढरपुरच्या विठ्ठ्लाच्या पायरीशी संत नामदेवांनी चोखोबांच्या स्म्रुतीमंदिरांची निर्मीती केली.
           संत नामदेवांनी नेहमी जातीनिरपेक्ष धार्मिक लोकशाहीचा पुरस्कार केला ते एक प्रतिभासंपन्न कवी व संगीताचे चांगले जाणकार होते आणि कीर्तन कलेवर त्यांचे प्रभुत्व होते.संत नामदेवांनी त्रिप्रकरणात्मक, चरित्र, आत्मचरित्र, व्यक्तिचरित्र, आख्यानक रचना,प्रवास वर्णन, काव्य, कुटरचना,लोक कविता, भाव आणि भक्तीपर कविता,सश्यूकुडी वाणीतील हिंदी रचना अशी त्यांनी वैविध्यपुर्ण वाड:मय संपदा लिहिली.
           संत नामदेव महाराजांनी संपुर्ण भारतभर ५४ वर्ष फ़िरून समाजात समता प्रस्थापित करण्याचा अथक प्रयत्न केला.८० वर्षाचे वय झाल्यावर त्यांनी इहलोकाचा निरोप घॆण्याचे ठरविले आणि ३ जुलै १३५० रोजी पंढरपुर इथे विठ्ठ्ल मंदिराच्या महाद्वारात संत चोखोबांच्या समाधी शेजारी समाधी घॆऊन समाजासमोर समतेचा महान आदर्श ठेवला.अशा या महान संत शिरोमणींची २६ ऑक्टॊंबर रोजी जयंती.अशा या समता प्रिय संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांना कोटी - कोटी विनम्र वंदन....

22 September 2012

शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील

            महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी एका शेतकरी घराण्यात २२सप्टेंबर१८८७ मध्ये भाऊरावांचा जन्म झाला. राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांची छाप त्यांच्या जीवनावर पडलेली दिसून येते. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या भाऊरावांनी सत्यशोधक चळवळीत प्रचारक म्हणून काम केले. हे काम करत असतानाच ''बहुजन समाज सुधारायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरूणोपाय नाही'' हे त्यांना कळून चुकले होते. आणि म्ह्णूनच सन १९२४ मध्ये त्यांनी "शाहू बोर्डिंग हाऊस" ची स्थापना केली. गरीब पण हुशार विद्यार्थ्यांना स्वावलंबी शिक्षण देण्याचा त्यांचा उद्देश होता. स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय, आणि स्वातंत्र्य ही त्यांच्या जीवनाची चतु:सूत्री होती. डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले.. ते जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता.
            महाराष्ट्रातील लहान लहान गावात त्यांनी आनेक शाळा काढल्या. सन १९३५ मध्ये त्यांनी "महात्मा फुले ट्रेनिंग कॉलेज" सुरू केले. सन १९४० मध्ये "महाराजा सयाजीराव हायस्कूल" व सन १९४७ मध्ये "छत्रपती शिवाजी रेसिडेन्सियल कॉलेज" त्यांनी सुरू केले. महात्मा गांधींच्या खुनानंतर आपल्या संस्थांमार्फत १०० हायस्कूले उघडण्याची केलेली प्रतिज्ञा त्यांनी केवळ १० वर्षात पूर्ण केली.भाऊरावांनी शिक्षणाची ज्ञानगंगा गरिबांच्या झोपडीपर्यंत नेऊन पोहोचवली. वसतिगृहयुक्त शिक्षणावर त्यांचा अधिक भर होता. श्रममहात्म्य, राष्ट्रीयबंधुत्व, आणि एकतेचा प्रचार त्यांनी केला. व त्याप्रमाणे ते स्वतः  वागले. स्वाभिमान व स्वत्व यांची जोपासना, अन्यायाबद्दल चीड, न्यायाची चाड, आपल्या भूमातेशी इमान, गोरगरीब समाजाविषयी करूणा व आपुलकी, सामाजिक बांधिलकीची जाण या सर्व गुणांचा संगम  भाऊरावांमध्ये होता. 
             भाऊरावांना पुणे विद्यापीठाची 'डि. लिट.' ही पदवी व शासनाचा 'पद्मभूषण 'हा किताब  मिळाला होता. ९ मे १९५९ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. खरच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या या कोल्हापुरच्या जन्मभुमीत आम्ही जन्मले याचा आम्हाला आज खुप अभिमान वाटतॊ.त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन !

6 September 2012

आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक

            हिंदुस्तानच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काही तशाच राहून गेल्या.सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला.तो म्हणजे 'उमाजी नाईक'.परंतु रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहिला नाही.आणि उमाजी नाइक फक्त रामोशी-बेरड समाजापुरता सीमित राहून गेल्यासारखे वाटू लागले. क्रांतीकारांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जाती धर्मातील लोकांनी केले पाहिजे मग ते कोणत्या का जातीचे व धर्माचे असेनात.मग हे उमाजी नाइक असे उपेक्षीत का राहून गेले हे समजेनासे झाले आहे.तसे पाहण्यास गेले तर या क्रांतीकाराबद्दल आपल्या समाजाला माहितीही खूप कमी आहे.त्यामुळेच ते उपेक्षीत राहिले असावेत.तर चला थोडेसे जाणून घेऊया या आद्याक्रांतीकाराबद्दल ....
           दिनांक ७ सप्टेंबर हा भारताचे पहिले आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचा जयंती दिन.१७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी उमाजी नाईकांचा जन्म रामोशी जमातीत झाला.महाराष्ट्रात रामोशी जमातीस रानटी जमात म्हणुन ओळखले जायचे.चातुर्वर्णीय व्यवस्थेच्या चौकटीबाहेर फ़ेकले गेल्याने या जमातीच्या वाट्याला असा कोणताच व्यवसाय आला नव्हता.पर्यायाने लुटमार करणे , दरोडे टाकणे त्यांना भाग पडत असे.३५० वर्षापुर्वीही हिच स्थिती होती.शिवरायांनी स्वराज्य निर्मीतीचा निर्णय घेतला, तेंव्हा त्यांनी बहुजनातील अनेक जातीचे मावळे गोळा केले होते. छत्रपती शिवराय रत्नपारखी होते.त्यांच्या सैन्यात सामावून घेण्यासाठी त्यांच्या नजरेतून ही जमातही सुटली नाही.पुरंदरच्या डोंगर कपारीत फ़िरणारे लढाऊ, धाडसी व प्रामाणिक रामोशी आपल्या सैन्यात घेतले. अनेक रामोशी जमातीच्या लोकांनी मर्दमकी गाजवली.स्वराज्यासाठी प्राण दिले.छ.  शिवरायांनी त्यांच्या शौर्याचं चीज म्हणून अनेकांना वतने, इमाने, ताम्रपट देऊ केले, याचा परिणाम असा झाला की , अस्थिर रामोशी स्थिर जीवन जगू लागले.छ.शिवराय गेले तरी त्यांनी स्वराज्याशी कधीही बेईमानी केली नाही.पेशवाई संपेपर्यंत त्यांनी अनेक किल्ल्यांचे किल्लेदार म्हणुन रक्षण केले.
          'मरावे परि क्रांतीरूपे उरावे' अशी उक्ती आहे.ती आद्याक्रांतीकारक उमाजी नाइक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते.ते स्वताच्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीहि स्वताला रोकु शकले नाहीत.इंग्रज अधिकारी रोबर्ट याने १८२० ला इस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे,उमजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजीसारखे राज्य स्थापणार नाही? तर टोस म्हणतो,उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.हे केवळ गौरावौदगार नसून हे सत्य आहे ... जर इंग्रजांनी कुटनीती आखली नसती तर कदाचित तेंव्हाच स्वातंत्र्य लाभले असते.नरवीर उमाजी नाइक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लाक्षिमीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला.उमाजीचे सर्व कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते.त्यामुळेच त्यांना नाइक हि पदवी मिळाली.उमाजी जन्मापासूनच हुशार,चंचल,शरीराने धडधाकट,उंचपुरा,करारी त्यामुळे त्याने पारंपारिक रामोशी हेरकला लवकरच आत्मसात केली होती.जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने दादोजी नाइक यांच्याकडून दांडपट्टा ,तलवार,भाते,कुर्हाडी,तीरकामठी ,गोफणी चालवण्याची कला अवगत केली.या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरवात केली.हळू हळू मराठी मुलुख हि जिंकत पुणे ताब्यात घेतले.१८०३ मध्ये पुण्यात दुसर्या बाजीराव पेशव्यास स्थानपन्न केले.आणि त्याने इंग्रजी पाल्य म्हणून काम सुरु केले.सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्याप्रमाणे पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढू घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली.जनतेवर इंग्रजी आत्त्याचार वाढू लागले.अशा परिस्थतीत करारी उमाजी बेभान झाला.
           छत्रपती शिवरायांना श्रद्धा स्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वताच्या आधीपात्त्या खालील स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक,कृष्ण नाईक,खुशाबा रामोशी,बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली. इंग्रज,सावकार,मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली.कोणत्याही स्त्रीवर अत्याचार ,अन्याय झाल्यास तर तो भावासारखा धावून जाऊ लागला.इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमजीला १८१८ ला एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सरकारने दिली.परंतु तो काळ सत्कारणी लावत त्याने त्याकाळात लिहिणे वाचणे शिकले.आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या कारवाया आणखी वाढल्या.उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटिला आले. उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मोकीन टोस याने सासवड-पुरंदर च्या मामलेदारास फर्मान सोडले.मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला.उमाजीने ५ इंग्रज सैन्याची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली.त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले.उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असत एका टोळीत जवळ जवळ ५ हजार सैन्य होते. १८२४ ला उमाजीने भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता.३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले कि,आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंड सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील,फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.२१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बोईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका,गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते.आणि काहीचे प्राण घेतले होते.
             १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्याने प्रसिद्ध केला त्यात नमूद केले होते,इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात.देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी.इंग्रजांचे खजिने लुटावेत.इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये.इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे.त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून एकप्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला होता.तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला.
            या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले.आणि त्यांनी उमाजीला पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला.मोठे सावकार,वतनदार यांना आमिषे दाखवण्यात आली उमाजीच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले.त्यातच उमाजीने एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून हात कलम केलेला काळोजी नाइक इंग्रजांना जाऊन मिळाला.इंग्रजांनी उमजीची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली.तसेच नाना चव्हाण हि फितूर झाला आणि त्यांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली. १५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला भोरचा सचिव कुलकर्णी याच्या सहाय्याने इंग्रजांनी पकडले.त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला.आणि पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी मोकीन टोस दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता.त्यानेच उमाजीची सर्व माहिती लिहून ठेवली. आहा या नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली.३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाइक हसत हसत फासावर चढला.अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते.उमाजीबरोबर इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाइक आणि बापू सोळकर यानाही फाशी दिली.
            अशा या धाडसी उमाजीनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले.त्यांनी त्यानंतर ३०० रामोशाना बरोबर घेऊन १८५७ चे बंड सुरु केले.त्यावेळीही दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता.

26 June 2012

रयतेचा राजा शाहू छत्रपती । जन्म दिन

              २६ जुन १८७४ शाहू छत्रपतींचा जन्म झाला.त्यांचे वडिल जयसिंगराव व आई राधाबाई मुधोळच्या राजकन्या म्हणुन लौकीक होता.तर जयसिंगराव उर्फ़ आबासाहेब हे कोल्हापूरचे छत्रपती बाबासाहेब महाराज यांच्या भगिनी बाळाबाई यांचे पुत्र.असा दोन्ही घराण्यांकडुन यशवंतरावांना उत्तम वारसा मिळाला होता.शाहूंचे पाळण्यातले नाव यशवंत.३जानेवारी १८७६ रोजी आबासाहेबांना दुसरे पुत्ररत्न झाले.त्यांचे नाव पिराजीराव. दोन्ही देखण्या मुलांच्या कौतुकात रमलेल्या राधाबाईंना आकाश पण ठेंगणे झाले होते.१८७७ रोजी त्या निधन पावल्या आणि दोन्ही मुले आईविना पोरकी झाली.त्यानंतर आबासाहेबांवर १८७८ मध्ये कागल जहागीर सांभाळण्याची जबाबदारी आली. मुलांबरोबर मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी १८८४ साली शाळा काढली.१८८० मध्ये त्यांनी "नेटिव्ह लायब्ररी" सुरु केली होती.रयतेच्या आरोग्यासाठी दवाखाने सडका व झाडे लावलीत. कागलचा कायापालट केला त्यामुळे कोल्हापूर संस्थानचे रिजंट म्हणुन इंग्रजांनी त्यांची नेमनुक केली २० मार्च १८८६ रोजी आबासाहेबांचे निधन झाले.
यशवंत ते छ.शाहू 
            शिवरायांनी स्थापण केलेल्या स्वराज्याचे रक्षण संभाजी राजांच्या करुण शेवटानंतर राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराबाई यांनी केले.स्वत: हाती समशेर घेऊन त्या रणरागिणीने औरंगजेबाशी दोन हात केले.औरंगजेबाच्या म्रुत्यू नंतर संभाजीपुत्र शाहू मोघलांच्या ताब्यातून सुटला, त्यांने स्वराज्यावर आपला हक्क सांगितला पण ताराराणी ने नाकारला यातूनच सातारा आणि कोल्हापूर अशी स्वराज्याची दोन शकले झालीत.कोल्हापूर संस्थानच्या संस्थापक ताराराणीच्या निधनानंतर या सिंहासनाला योग्य वारस लाभला नाही कारण या गादीचे वारस अल्पवयीन व अल्पकालीन ठरलेत.इंग्रजांचा अंमल सुरु झाल्यावर त्यांच्या मर्जीनुसार वारस नेमले जात त्या राजाचा अधिकार नाममात्र होता.अधिक्रुत वारस नसल्यामुळे जवळच्या नातलगाचा मुलगा दत्तक घेण्याची प्रथा होती त्यानुसार कोल्हापूर संस्थानचे वारस चौथे शिवाजी यांच्या गादीवर छ.शाहू यांची नेमणूक झाली.कोल्हापुर संस्थानमधील कागलच्या थोरल्या पातीचे जहागिरदार जयसिंगराव घाटगे यांचे पुत्र यशवंतराव यांनाच पुढे शाहू हे नाव मिळाले.दि.१७ मार्च १८८४ रोजी "शाहू छत्रपती " या नावाने दत्तकविधान झाले.त्यावेळी त्यांचे वय दहा वर्ष होतं.
राज्यकारभार
            राज्यकारभारात सर्वच जाती-धर्माच्या लोकांची नेमणुक करून समतोल साधला जावा ही शाहू छत्रपतींची इच्छा होती.कोल्हापूरचे संस्थान हाती घेतल्यावर शाहू छत्रपतींच्या लक्षात एक गोष्ट आली ती अशी की त्यावेळी प्रशासनात गोरे साहेब, पारशी आणि ब्राह्मण जातीतील कर्मचारी मोठ्या प्रमाणात होते. मोक्याच्या जागा विशेषत: चित्पावण ब्राह्मणांनी बळकावल्या होत्या त्यांच्या जागी हुशार व होतकरु ब्राह्मणेत्तरांना योग्य प्रतिनिधीत्व मिळवून देण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे नोकरशाहीतील ब्राह्मणी वर्चस्वाला शह बसला इ.स.१७७८ मध्ये पेशव्यांनी "शिवशक" बंद पाडुन फ़सलीशक सुरु केला होता. तो "शिवशक" छ.शाहू महाराजांनी पुन्हा सुरु केला आणि राज्यकारभारात राज्याभिषेक शकाचा वापर सुरु झाला.
        त्याचशिवाय त्यांनी अनेक शाळा , वसतीग्रुहे बांधली त्यातील पहिले वसतीग्रुह हे कोल्हापूर मध्ये बांधन्यात आले त्यामुळे कोल्हापूरला वसतीग्रुहाची जननी हा मान मिळाला.अशा अनेक पद्धतीने ब्राह्मणांचे वर्चस्व संपुष्टात आणले व संभाजीपुत्र शाहूंनी पेशव्यांच्या हातात कारभार देऊन जी चुक केली होती ती कोल्हापूरच्या राजाने सुधारली आणि पुन्हा उभारल स्वराज्य.
आरक्षणाची घोषणा
             वेदोक्त प्रकरणामुळे टिळक, शि.म.परंजपे, न.चि.केळकर, दादासाहेब खापार्डे इ. राष्ट्रीय चळवळीतील ब्राह्मण नेत्यांचे पितळ उघडे पडले.गोपाळक्रुष्ण गोखले आणि न्या.रानडे यांनीही जातीसाठी माती खान्याचा वसा घेतला.
           सातवे एडवर्ड यांच्या राज्यारोहण समारंभास शाहू महाराज इंग्लंड ला गेले होते. तेथे असतानाच त्यांनी एक क्रांतीकारक घोषणा केली.२६ जुन १९०२ रोजी महाराजांच्या आदेशानुसार कोल्हापूर ग्याजेट मध्ये आरक्षणाची घोषणा करणारे जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आले.तो जाहीरनामा असा "अलीकडे कोल्हापूर संस्थानामधील सर्व वर्गाच्या प्रजाजनांच्या शिक्षणाला उत्तेजन देण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. परंतू विशेष मागासलेल्या जातींत हे प्रयत्न अपेक्षेप्रमाणे फ़लद्रुप झाले नाहीत.या गोष्टीचा उल्लेख करताना महाराजांना मोठा विषाद वाटत आहे.या गोष्टीचा पुर्ण विचार करून महाराजांचे असे मत झाले आहे की , या निराशेचे कारण उच्च शिक्षणाची पारीतोषके विस्त्रुतरितीने विभागली जात नाहीत. ही परिस्थिती काही अंशी दुर करण्यासाठी व संस्थानमध्ये महाराजांच्या प्रजाजनांना उच्चशिक्षण संपादण्यास उत्तेजन देण्यासाठी या वर्गाकरिता आजपर्यंतच्या प्रमाणापेक्षा विस्त्रुत प्रमाणात संस्थानच्या नोकरीत जागा राखून ठेवण्याचा महाराजांचा क्रुतनिश्चय झाला आहे."
        " या धोरणाला अनुसरुन या हुकुमाच्या तारखेपासून ज्या मोकळ्या पडतील त्यापैकी शेकडा ५० जागा मागासलेल्या वर्गातील उमेदवारांना देण्यात येतील,अशी महाराजांची अनुद्न्या झाली आहे. ज्या ज्या ओफ़िसात मागासलेल्या लोकांचे प्रमाण हल्ली शेकडा ५० पेक्षा कमी आहे, त्या त्या ओफ़िसातील इत:पर मोकळी पडणारी जागा मागासलेल्या वर्गातील इसमाला देण्यात येईल. प्रत्येक खात्याच्या मुख्यांनी व हुकुमानंतर भरलेल्या जागांचा तिमाही अहवाल सादर केला पाहिजे."
          असे आरक्षण म्हणजे  ब्राह्मणी वर्चस्वाला चपराक होती.या आरक्षणानंतरच ब्राह्मण वर्गाला हादरा बसला व त्यांनी असंतोषाचा निरर्थक उद्रेक केला.त्यामध्ये टिळक आघाडीवर होते."मागासवर्गीयांना संस्थानच्या नोकर्यात ५०% जागा राखुन ठेवण्याबाबत शाहू छत्रपतींचा निर्णय, आदेश म्हणजे भारतातील आरक्षण धोरणाचा प्रारंभ होय."
रयतेचा राजा गेला
         छ.शाहूंनी बरीच समाजसुधारक कार्य केलेली आहेत. ती इथे मांडता येत नाहीत पण महाराजांचे चरित्र सविस्तर आपण वाचावे व त्यापासून काही बोध घ्यावा म्हणुन ही त्याची ओळख. आज फ़ुले-शाहू-आंबेडकर ही त्रिमुर्ती परीवर्तनाची प्रतिके आहेत.शाहू महाराज म्हणजे फ़ुले व आंबेडकर यांना जोडणारा सांधा होतातो सांधा अचानक निखळला.६ मे१९२२ रोजी सकाळी सहा वाजता त्यांना म्रुत्यु ने कवटाळले. छ.शाहू गेले पण त्यांच्या कार्याची प्रेरणा मात्र कायम आहे. त्यांच्या स्म्रुतीला कोटी कोटी प्रणाम... 

12 June 2012

बहुजन समाजातील विचारवंतांचे मोलाचे कार्य

         शिवरायांचे कार्य आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी बहुजन समाजातील विचारवंतांनी मोलाचे कार्य केले ते पाहुया.
       लाला लजपतरायांनी सिवोजी नावाचे उर्दुमधुन शिवचरित्र लिहिले. त्यामुळे राजे पंजाब, सिंध पर्यंत समजले. रविंद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शिवाजीराजे हे आदर्श होते. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले की प्रसंगी जन्मदात्या बापाचे नाव बदलेन पण कोलेजला दिलेलं शिवाजीराजांचं नाव मी कधिच बदलनार नाही. ते भाऊराव पाटील जैन होते. त्यांच्यामुळे शिवराजांच्या रयतेला शिक्षण मिळाले. कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे, डॉ.पंजाबराव देशमुख, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसिंह नाना पाटील, संत गाडगेबाबा, प्रबोधनकार केशव सी. ठाकरे इ. समाजसुधारकाची शिवरायांवर अनन्यनिष्ठा होती.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शिवचरित्राचा सखोल अभ्यास होता. त्यांनी शुद्र पुर्वी कोन होते ? या ग्रंथात शिवाजीराजांबाबत खुप सखोल माहिती लिहिलेली आहे. शिवाजीराजांच्या त्रिशताब्दी उत्सवाच्या निमित्ताने बदलापूर येथे आयोजित केलेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते.या प्रसंगी त्यांनी राजांच्या जीवनावर अभ्यासपुर्ण आणि प्रभावी भाषण केले.त्यामुळे राजांचे अपरिचीत रुप जनतेला समजले.राष्ट्रपिता ज्योतिराव फ़ुले यांनी शिवजयंती सुरु केली.त्यांचे राजांवर डोळस प्रेम होते आंधळे प्रेम नव्हते.
                शिवाजीराजांचे भांडवल करुन फ़ुलेनी समाजामध्ये धार्मिक जातीय दंगे निर्माण केले नाहीत किंवा शिवाजीराजांच्याद्वारे त्यांनी बहुजन समाजाचे दैवीकरण केले नाही. फ़ुले यांनी शिवाजीराजांचा खरा इतिहास देशाला सांगितला.
                साहीत्यरत्न थोर देशभक्त आणि समाजसुधारक आण्णाभाऊ साठे यांनी गणपतीला वंदन असनारा पारंपारीक गण बदलला.गणाचा प्रारंभ शिवछत्रपतींना वंदन करूनच सुरु केला.आण्णाभाऊंनी शिवरायांवर महाराष्ट्राची परंपरा हा पोवाडा लिहिला. आण्णाभाऊ रशियात गेल्यानंतर त्याठिकाणी शिवचरित्रावर रशियन भाषेत लिहिनारे प्रा.चेलिशेव आण्णांना भेटले.आण्णांनी त्यांना शिवरायांबाबत खुप दुर्मिळ माहीती सांगितली म्हणजेच आण्णाभाऊं मुळेच रशियन जनतेला शिवरायांचे कार्य माहीत झाले. शिवरायांचे कार्य आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी बहुजन समाजातील विचारवंतांनी मोलाचे कार्य केले