14 September 2012

जेम्स लेन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य

         "दि शिवाजी किंग इन इस्लामिक इंडिया" या जेम्स लेन लिखित वादग्रस्त पुस्तकामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला. भारताच्या सर्वाच्च न्यायालयाने या पुस्तकावरील बंदी उठवून जेम्स च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण केली.
          हे पाहुन भारतातील तमाम सनातनी ब्रह्मव्रुंदांना आनंदाच्या उकळ्या फ़ुटल्या  नसतील तरच नवल वस्तुत: ही जेम्स लेन च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण आहे.ही अन्यायी न्याय व्यवस्था अजुनही आमच्याच ताब्यात आहे हे ब्राह्मणांनी दाखवून दिले. जेम्स लेन  खरे तर नावाला आहे या जेम्स लेनच्या माध्यमातून पुण्यातील ब्राह्मणांनी शिवरायांवर तसेच जिजाऊंवर घावा घातला होता.
         तसे पाहिले शिवरायांचे कर्त्रुत्व व जाती अंताचा त्यांनी लढा हा पहिल्या पासूनच ब्राह्मणांच्या पोटात डचडचत होता.शिवरायांच्या लोकउद्धारक संकल्पना आणि विचार आज ना उद्या आमच्या जात भाईंच्या गोरख धंद्यासाठी मारक ठरणार आहेत हे ब्राह्मणांनी चांगले ओळखले होते.हि चाणाक्ष जात शिवरायांच्या हयातीतच जागी झाली होती.शिवरायांचे गुरु जगदगुरु संत तुकोबाराय आणि शिवराय हे ब्राह्मणांना त्यांच्या रस्त्यात काट्यासारखे सलत होते.म्हणुनच त्यांनी शिवरायांना त्रास दिला आणि संत तुकारामांना वैकुंठाला (?)पाठविले.पण या अज्ञानी व भोळ्या माणसांच्या या गोष्टी लक्षात येत नाही.जेम्स लेन ही एक अशीच यांची चाल होती.
        तसे पाहिले तर शिवशाही मातीत घालून पेशवाई निर्माण करणार्यांना  शिवशाहीचे काही देणे घेणे नाही ,शिवरायांचा आणि जिजाऊंचा अपमान झाला तरी चालेल पण आमची अभिव्यक्ती जपली पाहिजे . न्यायपालिका सुद्धा आमचे काही वाकडे करू शकत नाही हे यातून या सर्व मंडळींना दाखवून द्यायचे आहे.
 राष्ट्रपुरुष यांची बदनामी मनुवाद्यांचे हुकमी अस्त्र
            अजुन एक सर्वात महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे परिवर्तनवादी राष्ट्रपुरुष नव्हे तर परिवर्तनवादी छोटे छोटे कार्यकर्ते यांची बदनामी करणे हे ब्राह्मणी हुकमी अस्त्र आहे आणि शस्त्र आहे.राष्ट्रपुरुषांची बदनामी करून समाजात गोंधळ आणि अनादराची स्थिती निर्माण करावयाची वस्तत: स्वत: अतिशय चारित्र्यहिन, नालायक आणि बदमाश असलेले हे आमच्या राष्ट्रपुरुषांची बदनामी करून पतीव्रतेचा आव आणत असतात.बुद्ध, शाहू,फ़ुले, तुकोबाराय सुद्धा यांच्या तावडीतून सुटले नाहीत.मध्यंतरी शाहूराजांविषयी ही जमात असेच घाणेरडे विनोद समाजात पसरवत होती, हाच प्रयत्न जेम्स लेनच्या माध्यमातून यांनी शिवरायांसाठी केला.
          खरे तर करून सवरून नामानिराळे राहण्याची यांची कला कोणालाही जमणार नाही  जेम्स लेन च्या माध्यमातून मात्र या ब्राह्मणांची नालायकी अक्षरबद्ध झाली आहे .तरीही वाईट याचे वाटते की आजही आपला समाज यांना शिवशाहीर, इतिहास संशोधक म्हणून पुजत असतो.भांडारकरवर संभाजी ब्रिगेडने हल्ला केल्यावर त्या संस्थेचे नुकसान होण्याऐवजी फ़ायदाच झाला.जिजाऊंचा अपमान केल्याबद्दल त्यांचे चरित्र्य हनन केल्याबद्दल कोट्यावधी रुपये त्या संस्थेला मिळाले.ज्या जिजाऊंच्या निर्भय त्यागातून हे पुणे शहर उभे राहिले तिथेच जिजाऊंची बदनामी करणारी भांडारकर संस्था आमच्या छाताडावर पाय रोवून उभी आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेबांना अभिप्रेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य
          खरे तर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो  वर्षे ज्यांना याच ब्राह्मणांनी बोलु दिले नाही, लिहु दिले नाही , त्या व्यवस्थेविरुद्ध लढा उभारून अत्यंत उच्चप्रतिच्या प्रतिभेवर बहुजनांसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व त्या अधिकारांचे निर्मान बाबासाहेबांनी  बहुजनांसाठी केले.नाहीतर अभिव्यक्ती ही ब्राह्मणांचीच मिजासदारी होती.आता हे हुशार आणि चाणाक्ष ब्राह्मण याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा डंगोरा पिटत आमच्या अस्मितेला व गौरवशाली इतिहासाला दडपू पाहत आहेत.
         सर्वाच्च न्यायालयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनात्मक चौकटीत राहून निर्णय दिला असला तरी बहुजन समाजाच्या सर्वांगिण द्रुष्टीकोणाचा विचार केलेला दिसत नाही. याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फ़ायदा  घेत स्वत:ला तुकोबांचा वारकरी म्हणवून घेणार्या दिलीप पुरुषोत्तम चित्रे नावाच्या नालायक ब्राह्मणाची तुकोबांना "भ्योंचोद" म्हणण्यापर्यंत मजल गेली होती.दिलीप पुरुषोत्तम चित्रे आपल्या आत्मकथनात म्हणतो "तुकाराम वाण्या भ्योंचोद तु मला मराठीच्या दलदलीत खेचलेस".संदर्भासाठी (आ.ह.साळुंखे, वाद आणि वादांची वादळे).
              असले अभिव्यक्ती स्वतंत्र्य काय चाटायचे आहे आज रोजी जेम्स लेनच्या खांद्यावर बंदुन ठेवून ब्राह्मण आपला निशाणा साधत आहे.या जेम्स लेन प्रकरणातून ब्राह्मणांना एकाच दगडात १०-१२पक्षी आहेत.मुख्य म्हणजे त्यांना मराठ्यांच्या मनगटातील आणि मेंदूतील ताकद मोजायची आहे त्या करीता सर्व मराठा बांधवांनी अतिशय सावध पवित्रा घ्यायला हवा.एकुण सर्व परिवर्तनवादी विचार संघटनांनी मिळुन एक वैचारीक धोबी पछाड यांना देण्याची गरज आहे आणि शेवटी लाथोंके भुत बातोंसे नही मानते हे सार्या समाजाने समजुन घेतले पाहिजे.
          आजवर संस्क्रुतीच्या, धर्माच्या नावाने उडणारे हे कावळे अभिव्यक्तीच्या जिवावर माजणार असतील तर काय चुलीत घालायची आहे ही अभिव्यक्ती ? 

हिंदू - जगण्याची सम्रुद्ध अडगळ

              मराठी साहित्य प्रकाशना दिवशीच रेकॉर्डब्रेक करणारी भालचंद्र नेमाडे यांची "हिंदू - जगण्याची सम्रुद्ध अडगळ" हि प्रदिर्घ प्रतिक्षा असणारी कादंबरी प्रकाशीत झाली तेंव्हा साहित्य विश्वात एकच खळबळ उडाली. कादंबरीवरती अनेक अंगाने चर्चा सुरु झाली.कादंबरीवरती अनेक अंगाने लिहिता येईल, नेमाडेंचा देशी वाद, ब्राह्मणी जोखडातून नेमाडेंनी अस्सल कष्टकर्यांची सुटका केलेली आहे."हिंदू" मध्ये कारुण्य आहे,रंजकता आहे, ग्रामीण जीवणाचे यथार्थ दर्शन आहे, विनोद आहे.गावगाड्यातील समाजजीवनाचे जिवंत असे चित्रण  केले आहे.पारावरच्या, पाराखालच्या, शेतातील. आडोशाचे,खाजगीतील बोली भाषा आहे त्यामुळे कदंबरी अधिकच अक्रुतीम झाली आहे.हिंदू वरती अनेक अंगाने लिहिता येईल भाषाशास्त्राचे, मराठी भाषेचे तज्ञ ते काम करतीलच पण इथे नेमाडेंनी ब्राह्मणी छावणीला दिलेला धक्का याबाबत विवेचन करणार आहे.वैदिक उर्फ़ ब्राह्मणी परंपरेने भारतात विषमता , अंधश्रद्धा, स्त्रीबंधन लादली याविरुद्ध अनेक महापुरुषांनी काम केले, महिलांवर तर ब्राह्मणी परंपरेने अनेक अमानुष नियम लादले.
            ब्राह्मणांची कटकारस्थानं उघड करताना नेमाडे लिहितात "साले हे ब्राह्मण लोकच  गावोगावी अशी जातीभेदाची लफ़डी सुरु करतात....कशावरून  ? .. एवढा मोठा जातिभेद मोडणारा आपला वारकरी पंथ ह्या ब्राह्मणांनी नासवला.पुन्हा ब्राह्मणी धर्मच वारकरी पंथावाटे लादला हो आपल्यावर पेशवाईपासून स्वराज्य तर बुडवलंच, आता चालले एकेक इंग्रजी शिकून नोकर्या धरायला शहराइत, शहरी होत चालले ब्राह्मण ..(प्रुष्ठ क्र.१५७)" जातीभेदाची निर्मिती ब्राह्मणांनीच केली असे नेमाडे सांगतात.तसेच वारकरी पंथ हा जातिभेद मोडणारा होता.पण अलीकडे वारकरी पंथातच जातीभेद पाळला जातो.जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या आरतीला विरोध करणारी प्रव्रुत्ती ब्राह्मणांचीच, वारकरी पंथ हा अंधश्र्द्धा विरोधी आहे पण अलीकडे वारकरी पंथातील लोक अंधश्रद्धाळू,देवभाळे,विषमतावादी झाले आहेत, कारण ब्राह्मण त्यामध्ये घुसले आणि वारकरी पंथ नासवला. वारकरी पंथ हा ब्राह्मण विरोधी पण ब्राह्मणी धर्मच वारकरी पंथाद्वारे लादला आणि हे काम ब्राह्मणांनी पेशवाईच्या काळात केले.छत्रपती शिवरायांनी निर्मान केलेले रयतेचे स्वराज्य ब्राह्मणांनी बुडविले मराठी अस्मितेच्या गप्पा मारणार्या ब्राह्मणांनीच इंग्रजी शिकून शहरे गाठली , हेही नेमाडे यांनी निसंदिग्धपणे लिहिले आहे.भारतातील बौद्ध धर्म का संपला आणि ब्राह्मणांचा हिंदू धर्म खेड्यापाड्यात का गेला ते सांगताना नेमाडे लिहितात "खेडोपाडी कानाकोपर्यात मिलिटरीसारखे ब्राह्मण जाऊन राहिवल्यानं हिंदूधर्म  खेडोपाडी रुजला.बौद्धधर्म शहरीच होता , शहरीच राहिला त्यामुळे संपला" (प्रुष्ठ क्र. १५८,५८७)
          शेतकर्यांची मुलं शिकून डॉक्टर,वकील,इंजिनीअर, प्राध्यापक , कलेक्टर झाली पण परोपकार, प्रेम, समता,विज्ञानवाद विसरत चालली.या बाबत नेमाडे लिहितात "वारकरी हिंदू  धर्माचा नैतिक पाया किती भुसभुशीत झाला आहे.याचा पुरावा म्हणजे ही तळागाळातील गरीब शेतकर्यांची मुलं.शिकून वर गेली आणि शेतकर्यांचा फ़ाळ गोतास काळ बी निसूक निघाल हो हंगाम निष्टुक वाया गेला हो !"(प्रुष्ठ क्र.३०२) ब्राह्मणी धर्म वारकरी पंथात घुसल्यानेच तो नासला आणि पर्यायाने त्यांचे अनुयायी देखील नासले.ब्राह्मण जिथं घुसतो ते नासवुनच टाकतो, असेच नेमाडेंनी सुचित केलेले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काय चालते ? बहुजन मुलांच्या मनावर मुस्लिमद्वेष आणि ब्राह्मणी श्रेष्ठ्त्व कसे बिंबवले जाते याबाबतचे अत्यंत धक्कादायक वर्णन नेमाडे यांनी  प्रुष्ठ क्र.३१८ ते ३२४ वर केलेले आहे.यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही विक्रुतांची टोळधार आहे हे स्पष्टपणे लक्षात येते.
            महात्मा गांधी यांची हत्या ब्राह्मणांने केली असताना देखिल ती मुसलमानानेच केलेली असावी असा संशय होता.पण ती ब्राह्मणाने केली आणि त्यानंतर काय झाले याचे सविस्तर वर्णन नेमाडे यांनी प्रुष्ठ क्र.३२४ ते प्रुष्ठ ३२७ वर केलेले आहे.त्यातील काही भाग पुढील प्रमाने ".. हे असं (गांधी हत्येचं) राक्षसी क्रुत्य फ़क्त ब्राह्मणच  ह्या देशात करु शकतो. ते खरच ठरलं.रात्री दिल्लीहुन इकडे तिकडे केलेल्या ट्रंक फ़ोनवरून खुनी माणूस गोडसे होता, अशा बातम्या मोरगावांत ("हिंदू " कादंबरीचा नायक खंडेराव पाटलांचे गांव) आल्या आणि सकाळी तर ठेंगू जोशीबुवांना दिल्लीहुन मुलाची तारच आली.-- काळजी घ्या ----राजाभाऊ अग्निहोत्री यांनी रात्री ब्राह्मणवाड्यात साखर वाटली. अशी कुजबुज होती." ब्राह्मण आळीत एकाने बायकोला हर्षभरात , अहो, पुरणपोळ्या करा , असंच काहीतरी ओरडून सांगितल्याचही काहिंना ऐकल्याचं स्पष्ट आठवत होतं " ( प्रुष्ठ क्र.३२५) सावरकर देशभक्त वगैरे नसून मुसलमानांचा द्वेष करणारा आणि देशाची फ़ाळणी करणारा असा द्वेषी माणुस होता असे नेमाडे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. "याचं(सावरकराचं) देश कार्य म्हणजे द्वेषकार्य" आपल्या देशात खालच्या जातीच्या लोकांना वैदिक,ब्राह्मणी धर्माने फ़ार छळले त्यामुळेच मुसलमान धर्म लोकांनी जवळ केला, याबाबत उद्वेगाने नेमाडे लिहितात " आपला हिंदूधर्म खालच्यांसाठी काय शेटं करतो ? " (प्रुष्ठ क्र.३२९) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गुप्त अजेंडा काय होता, याबाबत निळुभाऊच्या डायरीतील नोंदिवरून नेमाडे यांनी पुढील विवेचन केले आहे पहिल्याच पानावर.
      " स्वत:च्या रक्तानं रंगवलेला भगवा झेंडा. नंतर एका पानावर एका खाली एक लिहिलं होतं
१७५७
१८५७
१९५७
          काय याचा अर्थ ? याचा अर्थ तुमच्या सारख्यांना सांगुन काय उपयोग ? १७५७ पलाशीची लढाई, १८५७ तात्यांचं बंड, आणि आता १०० वर्षांनी - रक्तरंजित  आसे तु हिमाचल, अखंड हिंदूस्तान, एकुण एक इंग्रज कापून काढला जाणार होता.राजधानी पुणे ठरली होती.राष्ट्रध्वज भगवा, राष्ट्रगीत - नमस्ते सदावत्सले - स्वतंत्रते भगवते एकत्रित घटना वगैरेचा व्यय आणि घोळ कशाला ? मनुस्म्रुती आहेच."(प्रुष्ठ क्र.३३०)मनुस्म्रुतीने बहुजनांच्या हजार पिढ्यांना नरक यातना दिल्या.त्या मनुस्म्रुतीचे राज्य ब्राह्मणांना अपेक्षीत होतं. हे नेमाडेंनी मांडले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करणार्या बहुजन समाजातील तरुनांचा ब्राह्मण वापरून कसा चोथा करतात हे नेमाडेंनी रेखाटलेल्या "निळुकाकाच्या " पात्रावरून लक्षात येतं.ब्राह्मण पत्रकार ,संपादक बहुजनांच्या ग्रामिण भागातील बातम्या वस्तुस्थितीला धरून देत नाहीत.याबाबत ग्रामीण भागातील शेतकर्यांची संपादकाबाबतची प्रतिक्रिया नेमाडे यांनी पुढीलप्रमाणे नोंदवलेली आहे."खरंच आहे हो, तो मायझवाड्या संपादक श्रमाची काय प्रथिष्ठा मानतो ? " (प्रुष्ठ क्र.४०८)
       आजच्या वारकरी पंथात जातीभेद आहे.नुसते देवळात नाचुन अध्यात्मिक सुख मिळवण्याच्या बाता मारतात.मुसलमान तर सोडाच पण महारमांगाना देखील यांनी सामावून घेतले आहे, मुसलमान द्वेष शिकवणार्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांना नेमाडे सवाल विचारतात."एकादशीला मिरची,रताळ,पेरू,पपया, शेंगदाणे,खजुर, बटाटा, साबूदाणा असले म्लेंच्छ यावणी पदार्थ कसे काय चालतात ? हे तर अलीकडे बोटींनी समुद्रावरून आयात केलेले पदार्थ."(प्रुष्ठ क्र.४४१) रामदास हा शिवरायांचा गुरु नसताना , तो तसा ब्राह्मणांनी रेखाटला याउलट तो एका मुलीचे जीवण उद्ध्वस्त करून लग्न मंडपातून पळाला, याबाबत खंडेरावांचे मित्र मछिंदर , वाणखेडे , अनंतराव यांचा संवाद नेमाडे पुढील प्रमाणे रेखाटलेला आहे."(मछिंदर अनंतरावला म्हणतो ) रामदास स्वामींच्या  मंडपात राहुन गेलेल्या बायकोच्या दु:खावर फ़ार सुंदर कविता होईल नाही ? वानखेडे म्हणाला , सुंदर ?  तिकडे कोवळी पोरगी का बोडकी ठवली जन्मभर का मारली - आणि तुला सुंदर कविता लिहायचीय ?  त्यापेक्षा ती उद्ध्वस्त बाई हातात वहान घेऊन याला(रामदासाला) शोधत शिवरथकडे चाललीय अशी कविता - पेक्षा श्लोकच का नाही लिहित- 
         जनाचे श्लोक मनाची नको लाज ठेवू तू जरी ।
     जनाची तरी ठेवी पळपुट्या नागड्या तू ॥
इथे मराठी कवींना तर रामदासाच्या ह्या बिचारीचं नाव सुद्धा माहीत नाही नै.॥" (प्रुष्ठ क्र.४५०)
          ब्राह्मण पत्रकार हा अक्षरज्ञान, धुर्तपणा, कावेबाजपणा याच्या बळावर काय-काय उचापती करतो हे अनंतराव या पत्राद्वारे नेमाडेंनी अत्यंत रसभरीत वर्णन केलेले आहे, आणि हाच अनंतराव काय करायचा हे नेमाडे लिहितात. "मराठे आणि महारांमध्ये कलागती लावून त्याबद्दल कलात्मक भाषेत लिहिणं - ह्या जबाबदार्या एकटा अनंतराव जबाबदारीनं सांभाळायचा" (प्रुष्ठ क्र.४५०) मराठावाडा नामांतराचा लढा पुरोगामी ब्राह्मणांनी कसा लावून दिला, पुणे , मुंबई विद्यापिठाच्या नामांतराबद्दल न बोलणार्या पुरोगामी ब्राह्मणांचे नेमाडे यांनी पितळ उघडे पाडलेले आहे."अशा भंपक सुधारणा आपल्या पुण्यात किंवा मुंबईत न होता दुसर्या मागासलेल्या भागात झाल्या तर उत्तमच, असं वाटणार्या पुण्या - मुंबईच्या उच्चवर्णीय पुरोगामी विचारवंतांनी सगळीकडून मराठावाडा विद्यापिठाचं नाव बदललं पाहिजे , अशी मोहिम सुरु केली "(प्रुष्ठ क्र.४६४) दशमान पद्धती हि आर्य, द्रविडपुर्व अतिप्राचिन असुन त्याबाबतचे संशोधन झाले पाहिजे आणि  ब्राह्मणी व्युत्पतीवर नेमाडेंचा विश्वास नाही , त्याबाबत ते लिहितात "दहा पर्यंतचे आकडे वेगळे करायचे , अकरा- बारा-तेरा - पंधरासतरा-अठरा - ह्या सगळ्यांच्या शेवटी रा आहे. रा म्हणजे दहा -----रावणमध्येही दहा या अर्थी रा-----असावं------राव म्हणजे आवाज म्हणून रावण, असल्या संस्क्रुत बंडल व्युत्पत्त्यांवर आपला विश्वास नाही" (प्रुष्ठ क्र.५३४) ग्रेट निकोबरी सारख्या आदिवासी समाजात बायकोवर कोणत्याही स्वरुपाचा संशय घेत नाहीत्पण हिंदू संस्क्रुतीची अवस्था काय आहे याचे विवेचन करतात , "लहान मुलं ज्या निकोबारी तरुणाला सतत चिकटून असायच त्या तरूणाला मंडीने विचारले , हा कोण ? निकोबारी म्हणाला--माझ्या बायकोचा मुलगा---असं कसं ? ह्यावर तो चिडून म्हणाला , तुम्हा बायकांना हे कळायला पाहिजे, बायकोला मी सोडून दुसर्यापासून मुल नाही होऊ शकत ? आश्चर्य , अरे, इंग्लंड मध्ये सुद्धा कुठलाही नवरा असं चिंतू सुद्धा शकणार नाही.हि नैतिकता भारतीयांच्या केंद्रस्थानी यायला पाहिजे.इथे थोड्याशा संशयावरून बायकोला जाळुन टाकणारी आमची हिंदू संस्क्रुती -----" (प्रुष्ठ क्र.५३८) हिंदूधर्मात मुलींची किंमत नाही, याबाबत नेमाडे लिहितात " मुलींची काय किंमत ?  गचाळ हिंदू कुटूंब व्यवस्था" (प्रुष्ठ क्र.५८३)   
           भालचंद्र नेमाडे यांनी अशा अनेक बाबी प्रस्तुत कादंबरीमध्ये नोंदविल्या आहेत.त्यांचे सविस्तर लेखन म्हणजे एका पुस्तकाचा विषय आहे, हे काम पुढे कोणी तरी करेलच , नेमाडे यांची भाषा लोकभाषा आहे , ती कष्टकरी , श्रमकर्यांना आपली वाटणारी आहे,नेमांडेंच्या भाषेला ब्राह्मणी निकष लावणे गैर आहे, नेमांडेंकडे जस फ़टकळपणा आहे , विनोद आहे तसेच दु:खी, श्रमकरी, कष्टकरी, शेतकरी स्त्रिया यांच्या व्यथा मांडणारे कारुण्य देखील आहे,भाषा , आशय, वाकप्रचार, म्हणी , शब्द, साहित्य, कादंबरी ही ब्राह्मणीच असली पाहिजे या ब्राह्मणी सांस्क्रुतीक दहशदवादाला गाडणारी आणि त्यांच्या  व्यवस्थेला उघडी पाडणारी  भालचंद्र नेमाडे यांची "हिंदू - जगण्याची सम्रुद्ध अडगळ" ही कादंबती आहे.

6 September 2012

आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक

            हिंदुस्तानच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काही तशाच राहून गेल्या.सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला.तो म्हणजे 'उमाजी नाईक'.परंतु रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहिला नाही.आणि उमाजी नाइक फक्त रामोशी-बेरड समाजापुरता सीमित राहून गेल्यासारखे वाटू लागले. क्रांतीकारांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जाती धर्मातील लोकांनी केले पाहिजे मग ते कोणत्या का जातीचे व धर्माचे असेनात.मग हे उमाजी नाइक असे उपेक्षीत का राहून गेले हे समजेनासे झाले आहे.तसे पाहण्यास गेले तर या क्रांतीकाराबद्दल आपल्या समाजाला माहितीही खूप कमी आहे.त्यामुळेच ते उपेक्षीत राहिले असावेत.तर चला थोडेसे जाणून घेऊया या आद्याक्रांतीकाराबद्दल ....
           दिनांक ७ सप्टेंबर हा भारताचे पहिले आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचा जयंती दिन.१७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी उमाजी नाईकांचा जन्म रामोशी जमातीत झाला.महाराष्ट्रात रामोशी जमातीस रानटी जमात म्हणुन ओळखले जायचे.चातुर्वर्णीय व्यवस्थेच्या चौकटीबाहेर फ़ेकले गेल्याने या जमातीच्या वाट्याला असा कोणताच व्यवसाय आला नव्हता.पर्यायाने लुटमार करणे , दरोडे टाकणे त्यांना भाग पडत असे.३५० वर्षापुर्वीही हिच स्थिती होती.शिवरायांनी स्वराज्य निर्मीतीचा निर्णय घेतला, तेंव्हा त्यांनी बहुजनातील अनेक जातीचे मावळे गोळा केले होते. छत्रपती शिवराय रत्नपारखी होते.त्यांच्या सैन्यात सामावून घेण्यासाठी त्यांच्या नजरेतून ही जमातही सुटली नाही.पुरंदरच्या डोंगर कपारीत फ़िरणारे लढाऊ, धाडसी व प्रामाणिक रामोशी आपल्या सैन्यात घेतले. अनेक रामोशी जमातीच्या लोकांनी मर्दमकी गाजवली.स्वराज्यासाठी प्राण दिले.छ.  शिवरायांनी त्यांच्या शौर्याचं चीज म्हणून अनेकांना वतने, इमाने, ताम्रपट देऊ केले, याचा परिणाम असा झाला की , अस्थिर रामोशी स्थिर जीवन जगू लागले.छ.शिवराय गेले तरी त्यांनी स्वराज्याशी कधीही बेईमानी केली नाही.पेशवाई संपेपर्यंत त्यांनी अनेक किल्ल्यांचे किल्लेदार म्हणुन रक्षण केले.
          'मरावे परि क्रांतीरूपे उरावे' अशी उक्ती आहे.ती आद्याक्रांतीकारक उमाजी नाइक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते.ते स्वताच्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीहि स्वताला रोकु शकले नाहीत.इंग्रज अधिकारी रोबर्ट याने १८२० ला इस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे,उमजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजीसारखे राज्य स्थापणार नाही? तर टोस म्हणतो,उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.हे केवळ गौरावौदगार नसून हे सत्य आहे ... जर इंग्रजांनी कुटनीती आखली नसती तर कदाचित तेंव्हाच स्वातंत्र्य लाभले असते.नरवीर उमाजी नाइक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लाक्षिमीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला.उमाजीचे सर्व कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते.त्यामुळेच त्यांना नाइक हि पदवी मिळाली.उमाजी जन्मापासूनच हुशार,चंचल,शरीराने धडधाकट,उंचपुरा,करारी त्यामुळे त्याने पारंपारिक रामोशी हेरकला लवकरच आत्मसात केली होती.जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने दादोजी नाइक यांच्याकडून दांडपट्टा ,तलवार,भाते,कुर्हाडी,तीरकामठी ,गोफणी चालवण्याची कला अवगत केली.या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरवात केली.हळू हळू मराठी मुलुख हि जिंकत पुणे ताब्यात घेतले.१८०३ मध्ये पुण्यात दुसर्या बाजीराव पेशव्यास स्थानपन्न केले.आणि त्याने इंग्रजी पाल्य म्हणून काम सुरु केले.सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्याप्रमाणे पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढू घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली.जनतेवर इंग्रजी आत्त्याचार वाढू लागले.अशा परिस्थतीत करारी उमाजी बेभान झाला.
           छत्रपती शिवरायांना श्रद्धा स्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वताच्या आधीपात्त्या खालील स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक,कृष्ण नाईक,खुशाबा रामोशी,बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली. इंग्रज,सावकार,मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली.कोणत्याही स्त्रीवर अत्याचार ,अन्याय झाल्यास तर तो भावासारखा धावून जाऊ लागला.इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमजीला १८१८ ला एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सरकारने दिली.परंतु तो काळ सत्कारणी लावत त्याने त्याकाळात लिहिणे वाचणे शिकले.आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या कारवाया आणखी वाढल्या.उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटिला आले. उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मोकीन टोस याने सासवड-पुरंदर च्या मामलेदारास फर्मान सोडले.मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला.उमाजीने ५ इंग्रज सैन्याची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली.त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले.उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असत एका टोळीत जवळ जवळ ५ हजार सैन्य होते. १८२४ ला उमाजीने भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता.३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले कि,आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंड सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील,फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.२१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बोईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका,गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते.आणि काहीचे प्राण घेतले होते.
             १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्याने प्रसिद्ध केला त्यात नमूद केले होते,इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात.देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी.इंग्रजांचे खजिने लुटावेत.इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये.इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे.त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून एकप्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला होता.तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला.
            या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले.आणि त्यांनी उमाजीला पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला.मोठे सावकार,वतनदार यांना आमिषे दाखवण्यात आली उमाजीच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले.त्यातच उमाजीने एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून हात कलम केलेला काळोजी नाइक इंग्रजांना जाऊन मिळाला.इंग्रजांनी उमजीची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली.तसेच नाना चव्हाण हि फितूर झाला आणि त्यांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली. १५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला भोरचा सचिव कुलकर्णी याच्या सहाय्याने इंग्रजांनी पकडले.त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला.आणि पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी मोकीन टोस दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता.त्यानेच उमाजीची सर्व माहिती लिहून ठेवली. आहा या नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली.३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाइक हसत हसत फासावर चढला.अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते.उमाजीबरोबर इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाइक आणि बापू सोळकर यानाही फाशी दिली.
            अशा या धाडसी उमाजीनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले.त्यांनी त्यानंतर ३०० रामोशाना बरोबर घेऊन १८५७ चे बंड सुरु केले.त्यावेळीही दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता.

3 September 2012

रा.ग. गडकरीचा राजसंन्यास

            कलेचा , लेखनीचा, आपल्या प्रतिभेचा व आपल्या बुद्धिमत्तेचा वापर प्रत्येकजन विशिष्ठ हेतूने करीत असतात.कुणी समाज प्रबोधनासाठी , कुणी आपल्या सोबत सर्व मानवांचे भले होण्यासाठी कलेचा कलेचा प्रभावी वापर करत असतो, तर कोणी इतिहासाची सत्याशी इमान राखुन ऐतिहासिक महापुरुषांनी दिन-दुबळ्यांसाठी, बहुजनांसाठी केलेल्या कार्याची नोंद करून ठेवण्यासाठी व पुढील पिढीस त्या महापुरुषांकडून प्रेरणा प्राप्त व्हावी यासाठी आपल्या कलेचा, आपल्या प्रतिभेचा वापर करत असतो.पण या भारताचे दुर्भाग्य असे की, भारतातील अनेक ब्राह्मण हे बहुजन  महापुरुषांचे कार्य दुषित करण्यासाठी व या महापुरुषांकडून पुढच्या पिढीला प्रेरणा व प्रोत्साहन मिळु न देण्यासाठी  उलटपक्षी या महापुरुषांची बदनामी करण्यासाठी आपली कला, प्रतिभा, लेखनी वापरत असल्याचे अनेक वेळा जाहीर झाले आहे. 
            राम गणेश गडकरी यांनी "राजसंन्यास" या नावाने एक काल्पनिक नाटक /कथा रचुन या नाटकाआडुन शिवारायांची आणि शिवकुटुंबाची अत्यंत खालच्या पातळीचर जाऊन बदनामी केलेली आहे.या काल्पनिक नाटकाचा रचनाकार गडकरीने शिवकुटुंबाची बदनामी तर केलीच आहे पण ही बदनामी करण्यासाठी त्यांनी बहुजनांच्या दोन महत्वाच्या प्रतिकांचा / नावाचा वापर केलेला आहे आणि या दोन प्रतिकांची नावे आहेत जिवाजी आणि देहु.
        जिवाजी हे छत्रपती शिवरायांचे अत्यंत विश्वासू सेवक होते.अफ़जलखाना विरुद्धच्या मोहिमेत शिवरायांसोबत असताना "होते जिवाजी म्हणुन वाचले शिवाजी " असे इतिहासात जिवाजींच्या शिवप्रेमाची व शौर्याची नोंद आहे.सदर "राजसंन्यास" नाटकात यांच जिवाजी या नावाचा ’जिवाजीपंत’  हे काल्पनिक पात्र रंगवून राम गणेश गडकरी याने बहुजनांना अत्यंत प्रिय असलेल्या ’जिवाजी’ यांचा देखील अपमान केलेला आहे. याच शिवप्रेमी ’जिवाजी’ यांच्या नावाने रंगवलेल्या ’जिवाजीपंत’ च्या तोंडुनच शिवरायांची बदनामी गडकर्याने केलेली आहे आणि आपल्या शिवरायद्वेषाची आग शमुन घेतली आहे.ब्राह्मण इतिहासकारांनी - अभ्यासक - लेखकांनी जिवाजी महालेंचा  आदरार्थी उल्लेख कुठेही केलेला दिसत नाही.  "जिवा" असाच एकेरी उल्लेख सर्वत्र आढळून येतो. 
          दुसरे व बहुजनांचे अत्यंत प्रिय प्रतिक आहे ते "देहू", कारण देहू हे जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान व कर्मस्थान आहे. ब्राह्मणी व्यवस्थेला आपल्या अभंगातून व प्रबोधनातून हादरे देणार्या संत तुकाराम  महाराजांचे त्यांच्या हयातीपासुनच छळ करणारे ब्राह्मण जगदगुरु संत तुकाराम महाराजांना बदनाम करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. छ.शिवरायांवर संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा, वारकरी सांप्रदायाचा  व त्या माध्यमातून तुकाराम महाराज चालवत असलेल्या बहुजन मुक्ती चळवळीचा खुप मोठा प्रभाव होता हे जगप्रसिद्ध आहे.म्हणूनच राम गडकरीने शिवरायांची बदनामी करण्यासाठी मुद्दामच बहुजनांना अत्यंत आदरणीय असलेल्या शिवगुरु  जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा "देहू" या जन्मस्थळाची निवड केली. "देहू" हे संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थळाचं म्हणजे एका गावाचे नाव आहे.मागील हजारो वर्षाच्या इतिहासात "देहू" हे एखाद्या व्यक्तीचे नाव असल्याचे ऐकिवात नाही.
          ही दोन्ही छ.शिवरायांशी जवळीक असलेल्या अत्यंत प्रिय प्रतिकांचा  गडकरी " राजसंन्यास" या नाटकात पात्रांच्या रुपात वापर करून "जिवाजीपंत" व "देहू" यांच्या तोंडून पुढील प्रमाणे छत्रपतींची बदनामी केलेली आहे व ते लक्षात घेण्यासाठी "राजसंन्यास" नाटकातील वरील पात्रांच्या तोंडी बुसडवलेली काही उदाहरणे- 
१)  जिवाजीपंत : शिवाजी सोळा वर्षाचा झाला नाही तोच त्याने आडदांड लोकांची संगत धरून मुलखात पुंडाई (बंडखोरपणा, उपद्रव, लुटारूपणा) आरंभली.
२) जिवाजीपंत : या कलमाच्या करामतीने होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करून दाखविता येते !  ( म्हणजे असे तर नसेल ना की "वाघ्या" हे शिवइतिहासात "अस्तित्वात नसलेले" पात्र "अस्तित्वात आहे " असे दाखुवुन "नव्हत्याचे होते करून दाखविले आहे")
३) जिवाजीपंत : सांगु तुला देहू  ? कलमाच्या मदतीवाचुन कुठल्याही ग्रंथाचे पान हलायचे नाही बघ ! अरे, शिवाजी नुसता नावाला पुढे झाला पण खरी करणी त्या रामदासाची आह.त्याने आपला "दासबोध" ग्रंथ लिहिला नसता , तर शिवबाचा एवढा ग्रंथ कदाकाळी होताच ना ! शिवाजी भवानी तलवारीने ? नाही तुझ्या आडदांड करेलीने ? नाही ! नुसत्या भवानी तलवारीच्या नाचाने मराठेशाहीला रंग चढला नाही, तर दासबोध लिहिणारे कलम त्या सगळ्या भानगडीच्या मुळाशी होते !   आता तुच सांग बघु भवानीचे हातवारे करणारा शिवाजी थोर का कलमाने दासबोध रेखाटणारा रामदास थोर ?
४)जिवाजीपंत : काय, ग्रंथ केला रे शिवाजीने ? मी म्हणतो तसे म्हंटले तर छत्रपती शिवाजी महराजांनी असे  केले आहे तरी  काय ?
        असे अनेक उद्गार आहेत पात्रांच्या तोंडात भटी मेंदूतुन आलेली.हे तर "राजसंन्यास" आहे की "राजसत्यानास" आहे हे लगेच एका ब्राह्मणाला देखील समजु शकेल हां आता तो अमान्य करेल ही गोष्ट वेगळी आहे......
       तमाम जीवस्रुष्टीला फ़सविण्याचा, ठकविण्याचा, गंडविण्याचा आणि बदनाम करण्याचा ठेका ब्राह्मणांनीच घेतला असल्याचे गडकरी येथे अधोरेखीत करतात. अशा अमानवी , कुविचारी टाळक्यांच्या औलादिंना महात्मा फ़ुले "कलमकसाई" का म्हणतात हे यावरून स्पष्ट होते.

19 August 2012

वाघ्या कुत्रा आणि वादाचे कारण

            सध्याचे वातावरण वाघ्या कुत्र्याच्या शिल्पामुळे तापलेले आहे. शिवचरित्रात व इतर सर्व संदर्भ साधनात वाघ्याचा कुठेही उल्लेख नाही.म्हणुन एका काल्पनिक कुत्र्याचे शिल्प  शिवरायांच्या अमाधीसमोर असणे हा शिवरायांचा आणि शिवचरित्राचा अपमान आहे.त्यामुळे शासनाने हे वादग्रस्त शिल्प रायगडावरून तात्काळ हटवावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने गेल्या काही वर्षापासून लावून धरली होती.परंतू वारंवार मागणी करुनही शासनाकडून या शिल्पासंदर्भात कसलाच निर्णय न झाल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी १ ऑगस्ट २०१२ रोजी वाघ्याचे  वादग्रस्त शिल्प हटविले.काही सामाजिक संघटनांनी या कुत्र्याला आपल्या अस्मितेचे प्रतिक मानुन संभाजी ब्रिगेडच्या विरोधात अपप्रचार केला.या सामाजिक दबावाला बळी पडत शासनाने तात्काळ ते शिल्प पुनर्स्थापित केले.
        परंतू या वादात शिवरायांच्या अपमानाचा आणि वाघ्याच्या इतिहासात असण्याचा प्रश्न बाजुला पडला, मुळ प्रश्न आहे तो वाघ्या शिवचरित्र्यात असण्याचा. समकालीन संदर्भ साधनात कसलाही उल्लेख नसणार्या वाघ्याचे शिल्प केवळ दंतकथेवर आधारित आहे.शिवकाळानंतर ज्यांनी ज्यांनी रायगडचा या ना त्या प्रकारे अभ्यास केला  त्यांच्याही साहित्यात या कुत्र्याचा कसलाही उल्लेख मिळत नाही.उदाहरणादाखल : १८६९ साली "महात्मा जोतिराव फ़ुले" स्वत: रायगडावर गेले, शिवरायांची दुर्लक्षीत झालेली समाधी शोधुन काढली आणि शिवरायांवर प्रदिर्घ पोवाडा लिहिला.पण यात कुठेच वाघ्या डोकावला नाही. सन १८८१-८२ मध्ये "जेम्स डग्लज " हा इंग्रज अधिकारीही रायगडावर गेला. या अधिकार्यानेही त्याच्या "बुक ऑफ़ बॉम्बे" या पुस्तकात रायगडचे आणि शिव समाधीचे  नकाशासहीत तपशीलवार वर्णन केले आहे पण त्यांनीही वाघ्याचा कुठेही उल्लेख केला नाही.
१८८५ च्या सुमरास मुंबई इलाख्याचे गव्हर्नर असणरे "सर रिचर्ड टेम्पल" रायगड पाहण्यासाठी गेले त्यावेळी त्यांच्या सोबत "क्रॉफ़र्ड" नावाचा सहकारी होता. या सहकार्याने "सर रिचर्ड टेम्पल" यांच्या मोहिमेवर आधारीत "अवर ट्रबल  इन पुणा एण्ड डेक्कन"  हे पुस्तक लिहिले जे १८९७ मध्ये प्रकाशित झाले.या पुस्तकाचे वैशिष्ट म्हणजे "क्रॉफ़र्ड" यांनी स्वत: शिवरायांच्या शवाचे दहनस्थळ आणि समाधी याचे स्वतंत्र्य चित्र रेखाटले आहे पण याही पुस्तकात वाघ्याचा नामनिर्देश नाही.
            शिवरायांच्या समकालीन संदर्भ साहित्यात वाघ्याचा कोणताही उल्लेख नसणे आणि नंतरच्या मान्यवर लेखकांच्या लिखानातही वाघ्या नसने हे वाघ्याच्या शिल्पाचा फ़ोलपणाच सिद्ध करते. असे असताना वाघ्यासाठी शासनाचा एवढा अट्टाहास का ?
               आता काहींचं मत आहे की या वाघ्याचं अस्तित्व दाखवणारे पुरावे जर्मन लोकांनी अगदी जपुन ठेवले आहेत.आता गंमत अशी की, वाघ्या रायगडावर होता, हे जर्मनीतील लोकांना १० हजार मैलावरून दिसले, पण रायगडाच्या आसपासच्या १० मैलावरील कोणालाही तो दिसला नाही! शिवाजी महाराजांच्या काळातील एकाही माणसाला वाघ्या दिसत नाही. महाराज गेल्यानंतर २५० वर्षांनंतर झालेल्या माणसांना मात्र तो ढळढळीत दिसू लागतो!!असले चमत्कार मद्यपान केल्यानंतर सहजपणे होऊ शकतात.
           दंतकथेतील हा कुत्रा सर्वप्रथम डोकावला तो १९०५ साली "चिं. ग.गोगटे" यांच्या "महाराष्ट्र देशातील किल्ले" या पुस्तकात.या दंतकथेतील कुत्र्याचे ’वाघ्या’ असे नाटककार आद्य नाटककार ’राम गणेश गडकरी’ यांनी त्यांच्या "राजसंन्यास" या नाटकाच्या माध्यमातुन केले.गडकरींनी त्यांचे हे नाटक वाघ्याला अर्पण केलेले आहे म्हणुनच वाघ्याच्या चबुतर्याचर "राजसंन्यास" या नाटकातील काही ओळी कोरल्या आहेत.विशेष म्हणजे गडकरींचे हे नाटक शिवराय आणि शंभुराजे यांच्या बदनामीने ओतप्रत भरलेले आहे हे नाटक वाचतात वाचकांच्या लक्षात येते की , गडकरी हे काही इतिहास संशोधक नव्हते ते एक नाटककार होते.दंतकथा आणि नाटके ही जर इतिहासाच्या वस्तुनिष्ठ पुराव्यांवर टिकत नसतील तर ती एखाद्या युगपुरुषाच्या बदनामीला कारणीभुत ठरत असतील तर अशा दंतकथा नाकारल्याच पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे वाघ्याचे काल्पनिक शिल्प बसविण्यात आले आहे त्या खालील चौथरा हा शिवरायांच्या महाराणी सईबाईंची असण्याची  शक्यता काही इतिहासकारांनी वर्तवली आहे आणि यासंदर्भात इतिहासकारांचे एकमत आहे आणि  तो वाघ्याचा पुतळा शिवरायांच्या समाधीपेक्षा उंच आहे. रायगडावरील वाघ्याला काही संघटनेंचा विरोध आहे तो यामुळेच.वाघ्या कुत्र्याच्या समर्थकांनी आणि पुरातत्व खात्यानेही या कुत्र्या संदर्भात ऐतिहासिक पुरावे द्यावेत अन्यथा शिवप्रेमींची मागणी मान्य करत शिवरायांचा अपमान करणारे शिल्प ताबडतोब हटवावे.

शिवश्री डॉ. बालाजी जाधव, 
प्रकाशक पंचफ़ुला प्रकाशन,औरंगाबाद.
मराठ्यांनो षंड झालात काय ? या विक्रमी खपाच्या पुस्तकाचे लेखक

8 July 2012

समुद्रावरचा राजा - कान्होजी आंग्रे

मराठा साम्राज्याच्या आरमाराचे प्रमुख ’ सरखेल’ कान्होजी आंग्रे यांची ४ जुलै रोजी पुण्यतिथी, त्यानिमित्य त्यांच्या स्म्रुतीला उजाळा देणारा लेख.
             छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्ग येथे चाकरीला होते.१६८८ मध्ये सुवर्णदुर्ग चा किल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेऊन फ़ितूरीने किल्ला सिद्धीकडे सोपवणार असे कळल्यावर कान्होजी यांनी सिद्धीवरून किल्ला लढवला आणि पराक्रम केला.पुढे १६९८ मध्ये सरखेल सिधोजी गुजर गेल्यानंतर राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना सरखेल(आरमाराचा सरसेनापती) पद सोपवले.ते त्यांच्या म्रुत्युनंतर त्यांच्याकडेच होते.मराठा - मुघल युद्धामध्ये कोकणपट्टी सांभाळण्याचे कार्य कान्होजी आंग्रे यांनी यशस्वीरित्या पार पाडले.पोर्तुगीज, इंग्रज, आणि सिद्धी यांना त्यांनी चांगलेच जेरीस आणले आणि संपुर्ण भागात आपला वचक प्रस्थापित केला.
 जन्म आणि वैवाहिक जीवन
            कान्होजी आंग्रे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेडजवळील कालोसे या गावी १६६९ मध्ये झाला वडिलांचे नाव तुकोजी संकपाळ आणि आईचे बिम्बाबाई होते.नवसाने आणि अंगाच्या धुपाराने कन्होजींचा जन्म झाला म्हणून आंग्रे हे आडनाव लावले गेले.त्यांनी ३ लग्ने केली.पहिली पत्नी राजूबाई/मथुराबाई. यांच्याकडून त्यांना सेखोजी आणि संभाजी म्हणजेच आबासाहेब अशी २ मुले झाली.सेखोजी हे नाव त्यांच्या आजोबांच्या नावावरून ठेवले गेले.दुसरी पत्नी राधाबाई/ लक्ष्मीबाई यांच्याकडून त्यांना मानाजी आणि तुळाजी असे २ पुत्र झाले, तर तिसरी पत्नी गहिणबाई यांच्याकडून त्यांना येसाजी आणि धोंडजी असे २ पुत्र झाले.शेवटी एक मुलगी झाल्याने तिचे नाव "लाडूबाई" ठेवले गेले.
समुद्रावरचा शिवाजी
          कान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकुन घेऊन तेथे आपली राजधानी थाटली.छत्रपती महाराजांनी आंग्रे यांना आरमारचा प्रमुख केले आणि आंग्रे कोकण किणार्याचे राजे झाले.इ.स. १७०० मध्ये राणी ताराबाईंनीही या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली.या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना एकाच वेळी परकीय आणि स्वकियांबरोबर लढा द्यावा लागत होता.१७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फ़ुट पडल्यावर त्यांनी कोणाचीही बाजू न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला.पुढे त्यांचे बालमित्र असलेला बाळाजी विश्वनाथ भट (पेशवे ) याने त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर वळवंड, लोणावळा येथे तह करवला.कोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रपासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती.
परकियांना पुरुन उरले 
              सागरी भागात मुक्तपणे संचार करणार्या परकियांवर निर्बंध आले होते. १६९८ पासून मराठी राज्याची सारी सागरी सत्ता कान्होजींकडे आली होती. त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते याचा प्रतिकार करण्याचे परकियांनी ठरवले.सर्व परकियांनी एकत्रित येऊन कान्होजींना संपविण्याचे ठरवले.तरीही त्यांनी इंग्रज, पोर्तुगीजांनाही पराभुत केले.शत्रुच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कान्होजींनी दुर द्रुष्टिने अगोदरच अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवले होते.अशा संबंधांच्या मदतीने त्यांनी आपले आरमार अधिक शस्त्रसज्ज केले.पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीने जहाज बांधनीचे कारखाने त्यांनी उभारले.या सुसज्जतेसह कान्होजींनी समुद्रकिनार्यावर एक दबदबा निर्मान केला होता.कान्होजींचा लढा धार्मिक आक्रमनाची धार कमी करण्यासाठी पण होता.कान्होजी आंग्रे यांनी कोकणातील मंदिरासह , पंढरपुर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या.
         छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्रुत्युनंतरही औरंगजेबाला मराठी मुलूख काबीज करता आला नाही.यामागे अनेक शुर सरदारांचे योगदान होते.कोकण किणार्यावरील राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी हेही त्यातीलच एक. दि.४ जुलै १७२९ रोजी कान्होजींनी जगाचा निरोप घेतला.